Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोलापूरमधून सप्टेंबरमध्ये विमान उड्डाणजेट एअरवेजकडून पाहणी; कारखान्याची चिमणी पंधरा दिवसात पडणार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत राज्यातील विमानतळांवरुन विमानसेवा सुरू होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर सोलापूर विमानतळाच्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. बुधवारी जेट एअरवेज कंपनीचे एरिया मॅनेंजर किरण ताम्हणकरांसह दोन अधिकाऱ्यांनी सोलापूर विमानतळाची पाहणी केली. विमानतळाचे अधिकारीचे संतोष कौलगी यांनी त्यांना विमानतळाची तर उद्योजक राम रेड्डी यांनी सोलापुरातील उद्योगाची माहिती दिली.
दरम्यान, जेट किंवा अन्य कोणतीही कंपनी आता सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करणार असून, सप्टेंबर महिन्यात विमान आकाशात झेप घेणार असल्याचे खासदार शरद बनसोडे यांनी सांगितले आहे. या पूर्वी सोलापूर विमानतळावरून किंगफिशर कंपनीची सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाली होती. मात्र, काही महिन्यात ती विमानसेवा बंद पडली. प्रवाशी न मिळाल्याने किंगफिशर कंपनीला आपला गाशा गुंडाळावा लागला होता. मोठा गाजावाजा करून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विमासेवा सुरू केली होती. बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी शिंदे, मोहिते-पाटील यांनी अनेकदा प्रयत्न केले मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यावेळी साडेतीन हजार रुपये तिकीट असतानाही अनेक महिने विमानसेवा सुरू राहिली होती.
दरम्यान, केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर विमानसेवा सुरू करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख तसेच खासदार शरद बनसोडे यांनी यांनी दिल्ली दरबारी आपले वजन खर्ची घातले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोट्या छोट्या शहरांना जोडण्यासाठी काही दिवसांपूर्वी उडान योजना जाहीर केली. त्यानुसार ज्या विमानतळावरून विमासेवा सुरू होणार आहे. त्यांना विमानतळ सुसज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोलापूरचे विमानतळ सुसज्ज आहेच शिवाय विमानतळ इमारतीत पाडकाम करून काही बदल करण्याबरोबरच प्रतीक्षा कक्षही सुधारणा करून तयार ठेवण्यात आला आहे.

पंधरा दिवसांत
चिमणी पाडणार
सोलापूर विमानतळावरून सप्टेंबर महिन्यापासून कोणत्याही परिस्थितीत सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. त्यासाठी विमानसेवेला अडथळा ठरणारी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची मोठी चिमणी पाडावीच लागणार आहे. चिमणी पाडण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाली असून, येत्या पंधरा दिवसांत चिमणी पाडून विमानसेवेत येणारा मोठा अडथळा दूर करण्यात येणार आहे, अशी माहिती माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कासव तस्करीप्रकरणीतिघांना अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
पाटण येथील ब्राह्मणपुरी येथे कासवाच्या पिल्लाची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पाटण वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पकडून दोघा आरोपींना कासवाच्या पिल्लासह रंगेहात ताब्यात घेऊन अटक केली. रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली होती. यातील तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू होता बुधवारी दुपारी ढेबेवाडी येथून त्याला ताब्यात घेवून त्याला अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी त्याला पाटण येथील न्यायालयात हजर केले असता त्यालाही एक दिवसाची फॉरेस्ट कस्टडी देण्यात आली आहे.
कासवाचे पिल्लू ५० हजार रुपये किंमतीला विकण्याचा आरोपींचा बेत असतानाच ही कारवाई करण्यात आली. सह्याद्री पर्वत रागांच्या परिसरातून कासवाची तस्करी करून ती कोकणातून समुद्रमार्गे परदेशात विक्री होत असल्याची शक्यता या कारवाईमुळे आणखी गडद झाली आहे.
पाटण येथील ब्राह्मणपुरी विठ्ठल घाटावरील केरा नदीवर आठवड्याभरापूर्वी आरोपी महेंद्र तुकाराम सूर्यवंशी (वय-२८, रा. शिरळ सद्या ब्राह्मणपुरी पाटण), रामचंद्र जयसिगं शिंदे (वय ३०, रा. मारूल हवेली, ता. पाटण) व बापू भवानी पाटील (४५, सध्या रा. ढेबवाडी, मूळ रा. सळवे, ता. पाटण) यांनी कासवाच्या पिल्लाला पकडून आरोपी महेंद्र सूर्यंवशी राहत असलेल्या पाटण येथील देशपांडेवाडा, ब्राह्मणपुरी येथील भाड्याच्या खोलीत एका भांड्यात ठेवले होते. येत्या शनिवारी रात्री या कासवाची पन्नास हजार रुपये किंमतीला विक्री होणार असल्याची खबर पाटण वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना समजली होती. त्यानुसार रविवारी जुलै रोजी रात्री सापळा लावून आरोपी महेंद्र सूर्यवंशी, रामचंद्र शिंदे यांना कासवाच्या प्पिल्लासह रंगेहाथ पकडले.
संशयितांकडे झडती घेतली असता खोलीत एका भांड्यात आरोपींनी कासवाचे पिल्लू लपवून ठेवल्याचे उघड झाले. त्यानंतर संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली. कासवाचे पिल्लूही ताब्यात घेतले होते. या दोघांकडे कसून चौकशी केली असता यामध्ये आणखी एक संशयित बापू भवानी पाटील याचा सहभाग असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. बुधवारी दुपारी त्याला ढेबेवाडी येथून ताब्यात घेत अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुनीश्वरांच्या याचिकेवर आणखी तीन अर्ज दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव वादाबाबत पुजारी गजानन मुनीश्वर यांनी दाखल केलेल्या दिवाणी न्यायालयातील याचिकेवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दोन अर्ज दाखल केले. याशिवाय शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनीही थर्टपार्टी अर्ज दाखल करून या वादात म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. बुधवारी (ता. २) वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश सी. व्ही मराठे यांच्यासमोर युक्तीवाद झाले असून, सोमवारी (ता. ७) यावर निर्णय होणार आहे.

श्री अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांना हटवून पगारी पुजाऱ्यांची नेमणूक करावी, असा आग्रह पुजारी हटाव संघर्ष समितीने धरला आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. पुजारी आणि पुजारी हटाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे म्हणणे मांडले जात आहे, मात्र ही सुनावणी बेकायदेशीर असून, जिल्हाधिकाऱ्यांना सुनावणी घेण्याचे अधिकार नसल्याने याला स्थगिती मिळावी अशी मागणी पुजारी गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात केली आहे. मुनीश्वर यांच्या याचिकेवर पुजारी हटाव संघर्ष समितीचे दिलीप देसाई, दिलीप पाटील, आनंद माने, निशिकांत मेथे आणि प्रताप नाईक-वरुटे यांनी थर्ट पार्टी अर्ज दाखल केले होते. न्यायाधीश मराठे यांनी दोन्ही बाजुचे युक्तीवाद ऐकल्यानंतर यातील नाईक-वरुटे यांचा अर्ज वगळता इतरांचे अर्ज नामंजूर केले होते.

बुधवारी झलेल्या सुनावणीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सदस्य शिवाजी जाधव आणि संगीता खाडे यांनी थर्डा पार्टी अर्ज दाखल केले. ‘अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांबाबत सुरू असलेला वाद देवस्थान समितीशी संबंधित आहे. निर्णयाचा थेट परिणाम देवस्थान समितीवर होणार आहे, त्यामुळे याबाबत स्वतंत्र म्हणणे मांडण्याची परवानगी मिळावी,’ असा युक्तीवाद देवस्थान समितीच्या वतीने अड. ए. पी. पवार यांनी केला. शिवेसनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या वतीने अड. अजित मोहिते यांनी युक्तीवाद केला. ‘अंबाबाई मंदिरावर कुणाची एकाची मालकी नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेल्या सुनावणीस उपस्थित राहण्याची नोटीस आम्हाला मिळाली आहे, त्यामुळे कोर्टातील सुनावणीत म्हणणे मांडण्याची संधी मिळावी,’ अशी विनंती पवार यांनी अर्जाद्वारे केली आहे. संघर्ष समितीचे प्रताप नाईक-वरुटे यांचा यापूर्वीच अर्ज दाखल आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अड. वैभव इनामदार उपस्थित होते. सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी देवस्थान समितीचे अर्ज दाखल करून घेण्याची विनंती केली.

पुजारी गजानन मुनीश्वर यांचे वकील नरेंद्र गांधी यांनी देवस्थान समितीसह संजय पवार यांच्या थर्ड पार्टी अर्जावर जोरदार आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, ‘देवीची पूजाआर्चा करणे हा पुजाऱ्यांचा वैयक्तिक हक्क व अधिकार आहे. यात सार्वजनिक हिताचा संबंध येत नाही, त्यामुळे देवस्थान समितीसह इतरांचे अर्ज नामंजूर करावेत.’ कोर्टाने दोन्हीकडील युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर पुढील सुनावणीसाठी ७ ऑगस्ट ही तारीख दिली. यावेळी पुजारी गजानन मुनीश्वर, संजय पवार, संगीता खाडे, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरूंदवाडचे उपनगराध्यक्ष तीन जिल्ह्यांतून हद्दपार

0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

कुरूंदवाड (ता.शिरोळ) येथील उपनगराध्यक्ष जवाहर उर्फ बाबासाहेब जिनगोंडा पाटील यांना इचलकरंजीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपारीचे आदेश दिले आहेत. हा आदेश येताच कुरूंदवाड पोलिसांनी पाटील यांना कर्नाटक राज्यात नेऊन सोडले.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, जवाहर पाटील यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कुरूंदवाड पोलिसांनी मुंबई पोलिस कायदा १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव २०१६ साली सादर केला होता. यानंतर प्रांताधिकारी शिंगटे यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतून जवाहर पाटील यांना हद्दपार करण्याचे आदेश दिले. जवाहर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असून, पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आठ महिन्यांपूर्वी त्यांना उपनगराध्यक्षपदी संधी देण्यात आली होती. उपनगराध्यक्षपदावर असताना त्यांना हद्दपार करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

झिरो पेंडन्सी दरम्यान निलंबित कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याबरोबरच प्रशासन अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांना कार्यालयीन प्रवेशास मज्जाव करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले काम बंद आंदोलन दुपारी मागे घेतले. मात्र, वाघमारे यांचे निलबंन होत नाही, तोपर्यंत काळ्या फिती लावून कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतल्याने गुरुवारपासून (ता. ३ ऑगस्ट) जिल्हा परिषदेचे कामकाज पूर्ववत होईल.

करवीर पंचायत समितीचे कर्मचारी बाळकृष्ण गुरव यांनी रविवारी आत्महत्या केली होती. गुरव यांनी कामाच्या अतिरीक्त ताणामुळे आत्महत्या केल्याचा आरोप करत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. प्रशासन अधिकारी वाघमारे यांनी हाती घेतलेली मोहीम ताण वाढवण्यास कारणीभूत असल्याने त्यांचे निलंबन करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समित्यांमध्ये आंदोलनाचे लोण पसरल्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते.

बुध‍वारी सकाळी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारत अधिकाऱ्यांच्या मनमानीविरोधात जोरदार टिका केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. पदाधिकाऱ्यांनी कर्मचारी संघटनांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यास कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेवटी अध्यक्षा महाडिक यांच्यासह उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अंबरिशसिंह घाटगे, अरुण इंगवले आदींनी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांनी ‘वाघमारे यांनी कामावर हजर करून घेऊ नये, कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घ्यावे, आंदोलनातील कर्मचाऱ्यांवर आकसापोटी कारवाई करू नये, झिरो पेंडन्सीसाठी मुदत अथवा वेळ ठरवू नये’ आदी मागण्या केल्या. मागण्यांबाबत अध्यक्षा महाडिक यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला.

वाघमारेंच्या चौकशीसाठी समिती

झिरो पेंडन्सीच्या मुद्यावरुन प्रशासन अधिकारी वाघमारे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या. तक्रारींची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असून चौकशी अधिकारी म्हणून अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख काम पाहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा नियोजन समितीवर भाजपचे वर्चस्व

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा नियोजन समितीची निवडणूक यंदा बिनविरोध झाली. शेवटच्या दिवशी नगरपालिका मतदारसंघातून १६ उमेदवारांनी १७ अर्ज तर जिल्हा परिषद मतदारसंघातून दोन उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने ​निवडणूक बिनविरोध करण्याचा मार्ग मोकळा झाला. बिनविरोधच्या घडामोडीत जिल्हा नियोजन समितीवर भारतीय जनता पक्षाच्या १२ सदस्यांच्या निवडीने वर्चस्व निर्माण झाले. त्या खालोखाल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची वर्णी लागली आहे.

समितीच्या ४० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. नगरपालिका मतदारसंघातील पाच जागांसाठी २२ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची चिन्हे होती. मात्र निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गेल्या काही दिवसांत हालचाली गतिमान झाल्या. सर्वच पक्षाच्या आणि आघाड्यांच्या नेत्यांनी सामज्यंसाची भूमिका घेतल्याने जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला. त्यानुसार भाजप आणि मित्रपक्षांना २१ जागा तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांना १९ जागा देण्याचा निर्णय झाला. मंगळवारी नगरपालिका मतदारसंघातील १६ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. जिल्हा​ परिषदेच्या मतदारसंघातील दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा पुनर्वसन ​अधिकारी अशोक पाटील, राधानगरीच्या प्रांताधिकारी मनीषा कुंभार यांनी काम पाहिले.

पक्षनिहाय बलाबल

भाजप १२

काँग्रेस १०

राष्ट्रवादी काँग्रेस ७

शिवसेना ४

जनसुराज्य २

ताराराणी आघाडी २

(आवाडे गट, युवक क्रांती दल, अपक्ष : प्रत्येकी १)



जिल्हा परिषद मतदारसंघ

भाजप : अरुण इंगवले, विजया पाटील, अॅड. हेमंत कोलेकर, अशोक माने, प्रा. अनिता चौगुले, कल्पना चौगुले, महेश चौगले, मनीषा टोणपे, स्मिता शेंडुरे.

शिवसेना : स्वाती सासने, प्रवीण यादव, आकाक्षां पाटील, वंदना जाधव.

काँग्रेस : पांडूरंग भादिंगरे, राहुल पाटील, भगवान पाटील, बंडा माने, वंदना पाटील, शिल्पा पाटील.

राष्ट्रवादी काँग्रेस : विजय बोरगे, प्रियांका पाटील, जीवन पाटील, मनोज फराकटे, सविता भाटळे.

जनसुराज्य शक्ती : शिवाजी मोरे

जिल्हा ताराराणी आघाडी : राहुल आवाडे

ताराराणी आघाडी - सुनीता रेडेकर

युवक क्रांती आघाडी : विद्या पाटील

अपक्ष : रसिका पाटील



महापालिका मतदारसंघातील नगरसेवक

काँग्रेस : भूपाल शेटे, माधुरी लाड, दीपा मगदूम.

राष्ट्रवादी काँग्रेस : सुनील पाटील.

भाजप : विजय सूर्यवंशी

ताराराणी आघाडी : रुपाराणी निकम



नगरपालिका मतदारसंघातील नगरसेवक

भाजप : अलका स्वामी (इचलकरंजी), प्रवीण प्रभावळकर (मलकापूर)

राष्ट्रवादी काँग्रेस : हारुण सय्यद (गडहिंग्लज)

​जनसुराज्य : यास्मिन मुजावर (पन्हाळा)

काँग्रेस : तेजश्री भोसले (इचलकरंजी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबोलीत दरीत पडून तरुणाचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

पर्यटनानिमित्त आंबोली परिसरातील कावळेसाद येथे गेलेल्या युवकांपैकी खोल दरीत बेपत्ता झालेल्या दोघांपौकी एका युवकाचा मृतदेह शोधपथकाला आढळून आला. दुसरा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. लाल टी-शर्टमधील सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या शोधमोहिमेत बाबल अल्मेडा व किरण नार्वेकर दुपारी दरीमध्ये उतरले होते. सोमवारी (ता.३१) सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेत इम्रान गारदी (वय-२१, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) व प्रताप राठोड (वय २३, रा. बीड) हे दोन तरुण बेपत्ता होते. मृतदेह काढण्यासाठी क्रेनसह पाच शोधपथकांनी सकाळपासून प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र एका मृतदेहाचा शोध घेता आला. पुरेसा वेळ नसल्यामुळे मोहीम थांबविण्यात आली. बुधवारी पुन्हा मोहीम सुरू राहील.

आत्याळ (ता. गडहिंग्लज) परिसरातील पोल्ट्रीत कामगार असलेल्या गारदी व राठोड यांच्यासह अवधूत देवरकर, श्रीधर मगदूम, राजेश चोरगे व रमेश देसाई अशा सहाजणांसह पोल्ट्री मालक दयानंद पाटील सोमवारी पर्यटनासाठी आंबोलीकडे रवाना झाले होते. धनगरवाडी धरण परिसराकडून ते कावळेसाद स्थळावर सायंकाळी पोहोचले. तेथे सर्वजण जेवण करणार होते. त्यावेळी गारदी व राठोड परिसरात फिरायला गेले होते. खूप उशीर झाला तरी ते परतले नसल्याने उर्वरित तरूण त्यांना शोधू लागले. दरीच्या काठावर एकाचा रेनकोट आढळून आल्याने ते दोघेजण दरीत पडले असल्याचा अंदाज केला गेला. त्यानुसार परिसरातील स्थानिकांनी पोलिसांना कळविले. सांगेलीच्या (ता. सावंतवाडी) बाबल आल्मेडा यांच्या शोधपथकासह पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पण वाढता अंधार व दाट धुक्यामुळे शोधमोहीम सायंकाळी थांबविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियम डावलल्यास कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘गेल्यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवात आवाजाची मर्यांदेचा भंग केल्याप्रकरणी १६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर गुन्हे दाखल केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई होईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तालीम संस्थांनी गणेशोत्सव म्हणजे डॉल्बीचा दणदणाट या भ्रामक कल्पनेतून बाहेर पडावे. डॉल्बी नियमानुसार डेसिबलमध्ये लावावा. कोणत्याही उत्सवाच्या विरोधात पोलिस नसून कायद्याचे पालन प्रत्येकाने करावे. क्षणिक आनंदापलिकडे जाऊन सार्वजनिक तालीम मंडळाच्या अध्यक्षांनी तरूणाईला विधायक मार्गाकडे नेण्याचा जाणीवपूर्क प्रयत्न करावा’ असा सल्ला शहर पोलिस उपअक्षीक्षक प्रशांत अमृतकर यांनी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्याना दिला. गणेशोत्सवानिमित्त शिवाजी पेठेतील मंडळे, कार्यकर्ते आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक शिवाजी पेठेतील शिवाजी तरूण मंडळात बुधवारी झाली. या बैठकीत ते बोलत होते.

शिवाजी पेठेतील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत अनेक सूचना मांडल्या. काहींनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव, पारंपारिक वाद्यांचा वापर गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत करावा, अशी सूचना केली. काहींनी डॉल्बी लावण्यास परवानगी देण्याची मागणी केली.

यावर उपअधीक्षक प्रशांत अमृतकर म्हणाले, ‘पोलिस म्हणजे दंडुकशाही नाही. कायदा हा सर्वांना समान आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहूनच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक मंडळाने प्रयत्न करावेत. संवदेनशील ठिकाणी सक्षम अधिकारी नेमले जातील. विनाकाठी प्रयोगाचा विचार केला जाईल. मंडळांनी जमलेल्या निधीचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करावा. प्रत्येक मंडळाने कोल्हापूरच्या शिरपेचात तुरा खोवणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करावा.’

जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक निशिकांत भुजबळ म्हणाले, ‘मंडळांना न्यायालयात खेचण्याची वेळ येऊ देऊ नका. प्रत्येक मंडळाने नियमांचे पालन करावे.’

भाजपचे माजी महानगराध्यक्ष आणि तटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ‘पोलिसांनी बोलाविलेल्या बैठकीला मंडळे उपस्थित का राहत नाही, याचा शोध घ्यावा. पोलिसांनी देखावे बंद करण्यासाठी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर दादागिरी करू नये. सक्तीपेक्षा प्रबोधनावर अधिक भर द्यावा. डॉल्बी लावण्यास परवानगी द्यावी. जादा डेसिबल झाल्यास संबधितांवर कठोर कारवाई करावी. गुन्हे दाखल करण्याची घाई करू नये. गुन्हा दाखल केलेल्या १६ मंडळावर कारवाई करू नये.’

शिवाजी तरूण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण म्हणाले, ‘बिनखांबी गणेश मंदिर, अंबाबाई मंदिर, पापाची तिकटी आदी संवेदनशील ठिकाणी सक्षम पोलिस अधिकारी नेमावा. हा अधिकारी संबधित मंडळाच्या कार्यकर्त्यांना ओळखणारा असावा.’

लाला गायकवाड म्हणाले, ‘उत्सव मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करावी. डॉल्बीसंदर्भात ठोस निर्णय घ्यावा.’

के. एम. साळोखे म्हणाले, ‘डॉल्बी लावलेल्या मंडळावर पोलिसांकडून जुजबी कारवाई केली जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे.’

सरदार तालीम मंडळाचे मोहनराव साळोखे म्हणाले, ‘मुंबई, पुणे शहरात डॉल्बीला परवानगी दिली जाते. केवळ कोल्हापूरवर अन्याय केला जात आहे.’

मित्रप्रेम तरूण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव म्हणाले, ‘केवळ गणेशोत्सवामुळेच ध्वनी आणि पाणी प्रदुषण होत नाही. जिल्हा प्रशासनाने अन्य कारणांचा शोध घ्यावा.’

शाहीर दिलीप सावंत म्हणाले, ‘डॉल्बीमुळे अनेकांचे जीवन उद्धवस्त झाले आहे. महाद्वार रोडवर झालेली अपघाताची घटना नागरिकांच्या स्मरणात कायम आहे. त्यामुळे डॉल्बीला फाटा देऊन पारंपारिक वाद्यांवर भर द्यावा.’

शहर वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, पंडित पोवार, श्रीकांत भोसले, अजित खराडे, विजय माने आदी उपस्थित होते. सुरेश जरग यांनी प्रास्ताविक केले.



पोलिसांनी केलेल्या सूचना

५ ऑगस्टपासून मंडळांसाठी एक खिडकी योजना

प्रत्येक पदाधिकाऱ्याचे आधार कार्ड, फोटो अत्यावश्यक

१८ वर्षे पूर्ण झालेल्यांना कार्यकारिणीचे सदस्यत्व द्या

परवानगी घेतलेल्या दिवशीच श्रींची प्रतिष्ठापना करा

मंडळांच्या मंडपांनी ५० टक्क्यांपेक्षा अधिक रस्ता व्यापू नये

एमएसईबीकडून वीजेची तपासणी करा

२४ तास स्वयंसेवक नेमावेत

मंडळ परिसरात पत्ते खेळणे, व्यसन केल्यास कारवाई

आक्षेपार्ह कमानी, देखावे नको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सनातन’चे साधक रडारवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी विनय पवार आणि सारंग आकोळकर या दोघांचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), सीबीआय आणि कोल्हापुरातील एसआयटी अशा तीन तपास यंत्रणांकडून शोध सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोलिस या दोन्ही संशयितांच्या मागावर आहेत. मात्र, दोघेही संशयित पोलिसांना गुंगारा देत आहेत. सीबीआय आणि एसआयटीने यांच्यावर १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

विनय बाबूराव पवार (वय ३७, रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा) आणि सारंग दिलीप आकोलकर (३५, रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) हे दोघे सनातन संस्थेचे पूर्णवेळ साधक आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर हे दोघेही गायब आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), सीबीआय आणि कोल्हापुरातील एसआयटी या तीन तपास यंत्रणा पवार आणि आकोलकर या दोघांच्या मागावर आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्याशी पवार आणि आकोलकर यांचा वारंवार संपर्क आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

पवार आणि आकोलकर हे दोघे सनातन संस्थेचे पूर्णवेळ साधक म्हणून काम करताना अनेक शिबिरांमध्ये उपस्थित होते. मडगाव स्फोटातील फरार आरोपी रुद्रगौडा पाटील याच्याशीही संशयितांचा संपर्क होता, असे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. सनातन संस्थेने जत येथे घेतलेल्या शस्त्र प्रशिक्षण शिबिरात या दोघांचा सहभाग होता. त्याचबरोबर दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी हे दोघे पिस्तूल घेण्यासाठी कोल्हापुरात आले होते, अशी माहिती एका साक्षीदाराने पोलिसांना दिली आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ मध्ये हल्ला झाला तेव्हा पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे घटनास्थळी होत्या. हल्ल्याच्या त्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. संशयित हल्लेखोरांचे फोटो दाखवले असता, उमा पानसरे यांनी पवार आणि आकोळकर यांचे फोटो ओळखले आहेत. पानसरेंवर या दोघांनीच गोळ्या झाडल्याचा उल्लेख पोलिसांनीही आरोपपत्रात केला आहे. यानुसार एसआयटी आणि सीबीआयने कोल्हापूर, पुणे, पनवेल आणि मडगाव परिसरात संशयितांचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत.

या दोन्ही संशयितांची संपत्ती सील करण्याची मागणीही एसआयटीने कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडे केली होती. मात्र आधी अटकेचे प्रयत्न करा, अशी सूचना न्यायालयाने पोलिसांना दिली होती. या दोघांची माहिती देणाऱ्या व्यक्तीस राज्य सरकारकडून १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाल्याने संशयितांच्या अटकेस मदत होईल, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

सीबीआयने जाहीर केले पाच लाख

सीबीआयने मार्च २०१७ मध्ये पवार आणि आकोळकर यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीस ५ लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले. दोन्ही आरोपींची छायाचित्रे आणि गुन्ह्यातील सहभागाची माहितीपत्रके राज्यातील सर्व पोलिस ठाणी आणि सार्वजनिक ठिकाणी लावली आहेत. अजूनही पवार आणि आकोलकर सीबीआयच्या हाती लागले नाहीत.

घरझडतीही घेतली

तपास यंत्रणांनी पवार आणि आकोलकर या दोघांच्याही घरांची झडती घेतली आहे. दोघेही सनातन संस्थेचे पूर्णवेळ साधक असून, त्यांचे नातेवाईकही सनातनशी संबंधित आहेत. घरझडतीत मिळालेली कागदपत्रे आणि वस्तूंबाबत पोलिसांची गोपनीयता बाळगली आहे. पानसरे यांच्यावर गोळ्या घालणारे हेच संशयित होते अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने पवार आणि आकोलकर यांची नावे आरोपपत्रात दाखल केली आहेत.

गरज पडल्यास मालमत्तेवर टाच

पवार आणि आकोलकर यांच्या अटकेसाठी त्यांच्या नावावरील मालमत्ता जप्त करण्याची परवानगी पोलिसांनी जिल्हा कोर्टाकडे मागितली होती. कोर्टाने ती मागणी फेटाळली होती, मात्र गरजेनुसार पुन्हा संशयितांची संपत्ती जप्त करण्याची मागणी कोर्टाकडे केली जाईल. कायदेशीर प्रक्रियेनुसार आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती आयजी नांगरे-पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलेवाडीत केबीन हटविल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फुलेवाडी व रिंगरोड परिसरात प्रमुख मार्गावर बिनधिक्कतपणे थाटलेली केबीन्स, खाद्य पदार्थांच्या गाड्या बुधवारी हटविण्यात आल्या. तसेच फुलेवाडी सहावा बस स्टॉप गोसावी गल्लीत झोपडपट्टीधारकांनी रस्तावर बांधलेल्या नऊ झोपड्या तसेच पत्र्याचे शेडवर कारवाई झाली. दिवसभराच्या कारवाईत ४० अनधिकृत केबीन व खाद्यपदार्थांच्या गाड्यावर कारवाई झाली. कारवाईत अडथळा आणणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी बाजूला केले. सोमवारी पेठ, अकबर मोहल्ला येथील अनधिकृत बांधकाम काढताना कर्मचारी आणि नागरिकांत वादावादी झाली. प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात येथील बेकायदेशीर बांधकाम पाडले.

दसरा चौक येथील होर्डिग्ज हटविताना सहायक इस्टेट अधिकारी सचिन जाधव यांच्यासोबत हुज्जत घालण्याचा प्रकार घडला. परवाना शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय व अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत कारवाई करण्यात आली. फुलेवाडी रिंग रोड सहावा बस थांबा गोसावी वसाहत येथे झोपडपट्टीधारकांनी रस्त्यावर अतिक्रमण झोपड्या बांधल्या होत्या. तसेच पत्र्याचे शेड उभारले होते. ५०० फूट लांबीचा व १५ फूट रुंदीचा असा ७५०० चौरस फूट क्षेत्राच्या रस्त्यावर टाकलेले स्क्रॅप मटेरियल जेसीबीच्या सहाय्याने काढले.

फुलेवाडी रिंगरोड ते गगनबावडा या मार्गावरील फुलेवाडी जकात नाक्याच्यासमोरील जागेत अतिक्रमण करुन वीस केबीन थाटले होते. तसेच रस्त्याला अडथळा होतील या पध्दतीने सरु असलेल्या १५ खाद्यपदार्थांच्या हातगाड्या होत्या. अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान केबीन, हातगाड्यावर कारवाई झाली. सहा विना परवनाना फलक काढण्यात आले. अकबर मोहल्ला येथील पॅसेजमध्ये सपुराबी महात यांनी विना परवाना केलेले बांधकामावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आयुक्त अभिजित चौधरी यांनी शहरातील अनिधकृत केबीन, होर्डिग्जवर कारवाईचे आदेश दिले आहेत.त्यानुसार उपशहर अभियंता एस. के. माने, ​कनिष्ठ अभियंता राजेंद्र वेल्हाळ, रमेश कांबळे, अनिरुध्द कोरडे अतिक्रमण निर्मूलन पथकाचे चंद्रकांत खांडेकर, सहायक इस्टेट ऑफीसर सचिन जाधव, मुकादम मिलिंद कारेकर,उमेश माने आदींचा मोहीम राबवली. अतिक्रमण विरोधी मोहिम चालू राहणार असून बेकायदेशीर होर्डिग्ज, केबीन काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोहिमेत सहभागी

लक्ष्मीपुरी व राजवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी

अग्निशमन विभाग व पवडी विभागाकडील ५० कर्मचारी

दोन डंपर, एक जेसीबी मशिन, अग्शिनमन दलाची गाडी

दिवसभरात ४० अनधिकृत केबीन व खाद्य पदार्थांच्या हातगाड्या काढल्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रलंबित बिलांवरील जीएसटीला विरोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये समावेश नसताना त्याची वसुली कंत्राटदारांकडून केली जात आहे. प्रलंबित बिलावरही हा कर लागू झाल्याने कंत्राटदारांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे अर्थसंल्पीय तरतुदीमध्ये जीएसटीचा समावेश करूनच करवसुली करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन केले. निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना महासंघाच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत महासंघाने सर्व निविदांवर बहिष्कार घालण्यासह सध्या सुरू असलेली सरकारी, निमसरकारी कामे बंद ठेवत असल्याचे जाहीर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ‘एक जुलैपासून कंत्राटदारांना १८ टक्के जीएसटी लागू झाला आहे. मात्र हा कर लागू करताना चालू निविदा व चालू असलेल्या कामांचा विचार केला गेलेला नाही. व्हॅट, सेवाकर, अबकारी करांच्या एकत्रीकरणातून जीएसटी तयार झाला आहे. शासकीय इमारत, रस्ते, धरणे, कॅनॉल व इतर शेती कामांसाठी कंत्राटदारांना सर्व्हिस टॅक्स लागू होत नव्हता. केवळ व्हॅट द्यावा लागत होता. जीएसटीमध्ये सर्व्हिस टॅक्सचा समावेश असल्याने जादा टॅक्स द्यावा लागणार आहे. एक जुलैच्या आधीपासून सुरू असलेल्या कामांमध्ये केवळ व्हॅटचा समावेश होता. त्यामध्येही मजूर व माती खुदाईच्या कामांना व्हॅट आकारला जात नव्हता. शासकीय कंत्राटदरांना सर्व्हिस टॅक्स लागू नव्हता. जीएसटी लागू झाल्यानंतर काही नव्याने निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याच्या अंदाजपत्रकात व्हॅटचा समावेश असून निविदेत जीएसटी भरण्याची अट घातली आहे. अर्थसंकल्प तयार करताना व्हॅटनुसार तयार केला आहे. त्याऐवजी जीएसटीचा समावेश करून अर्थसंकल्प तयार करावा. जोपर्यंत सरकार कंत्राटदारांना लावलेला जीएसटी अंदाजपत्रकात समाविष्ट करत नाही, तोपर्यंत सर्व निविदांवर बहिष्कार घालू. सध्या सुरू असलेली सरकारी व निमसरकारी कामे बंद ठेवण्यावर संघ ठाम आहे.’

आंदोलनात एन. डी. लाड, संजय खोत, संजीव श्रेष्ठी, सुनील नागराळे, प्रशांत देसाई, विक्रम नलवडे, धीरज तिळगंणी, कुणाल संसारे, मधुकर कदम, विजय सावंत, सागर घुमाई, सुरेश नलवडे, बबन पोवार, बी. एस. पाटील, प्रसन्ना मुधाळे, भगवान अस्वले, आर. आर. पाटील आदींसह कंत्राटदार महासंघाचे सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेल्फीच्या मोहात गमावला जीव

0
0


म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

मुलाच्या सोनेरी आयुष्याची स्वप्ने पाहिली... शिक्षण दिले... पाठोपाठ नोकरी आणि लग्नही झाले... संसारवेलीवर एक नन्ही परी उमलली... सर्वकाही सुरळीत असतानाच अतिसाहसाने डाव साधला आणि होत्याचे नव्हते झाले. ज्या डोळ्यांनी मुलाचा उत्कर्ष पहिला त्याच डोळ्यांनी दरीत पडलेला मृतदेह दोन दिवस पाहावा लागला. आंबोली येथे सेल्फीच्या मोहापायी मृत्यूमुखी पडलेल्या इम्रानच्या आईची ही हृयद्रावक कहाणी.

मोबाइलवरील सेल्फी, त्यांना सोशल मीडियार पोस्ट करण्याची धडपड आणि त्याला मिळणारे ‘लाइक’ यासाठी आजचा कोणताही तरूण अगदी काहीही करायला तयार असतो. पोलिस प्रशासनाची नियमावली पायदळी तुडवीत ही मंडळी जीव धोक्यात घालत आहेत.

गडहिंग्लज येथून अवधूत देवरकर (वय २७), राजेंद्र चोरगे (वय ३५), दयानंद गंगाराम पाटील, रमेश देसाई (वय ३२), श्रीधर मगदूम (वय २६, सर्व रा. अत्याळ,), प्रताप राठोड (वय २१, रा.मूळगाव बीड, सध्या अत्याळ) व इम्रान गारदी (वय २५, रा. हुनगीनहाळ) हे सातजण कावळेसाद येथे वर्षापर्यटनासाठी गेले होते. अत्याळ येथे नंदिनी पोल्ट्री फार्ममध्ये सार्वजण कामाला आहेत. सोमवारी पोल्ट्रीमालक दयानंद पाटील यांच्यासह हे सर्वजण वर्षा पर्यटनासाठी आंबोलीला गेले होते. आंबोलीतून ते कावळेसाद पॉइंटकडे रवाना झाले. येथे सर्वांनी जेवण करण्याचा निर्णय घेतला. पण जेवत असताना प्रताप व गारदी हे फेरफटका मारून येतो असे सांगून उठले. मात्र बराच वेळ लोटूनही दोघे परतले नाहीत. दरम्यान, कावळेसाद दरीत दोन तरुण दरीत पडल्याचे तेथील पर्यटकांनी पहिले. एका महिलेने हे दोघे सेल्फी घेत असताना दरीत पडल्याचे पाहिले. तिने याबाबत तेथील स्वीटकॉर्न विक्रेत्याला माहिती दिली.

केवळ सेल्फीच्या मोहापोटी दोन कुटुंबे उघड्यावर पडली. यापैकी इम्रान गारदी मूळचा हुनगिनहाळचा असून तो गारदी वसाहत येथे राहतो. त्याला दीड वर्षांची मुलगी आहे. इम्रान व त्यांचे कुटुंब मोलमजुरी करून चरितार्थ चालवतात. त्याच्या मागे आईवडील, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. गेले दोन दिवस सर्व कुटुंबीय घटनास्थळी ठाण मांडून आहेत. प्रताप राठोड मूळचा बीडचा असून ऊसतोड कामगार म्हणून गडहिंग्लज तालुक्यात आला होता. गेल्या वर्षभरापासून तो येथेच एकटा राहत असून नंदिनी पोल्ट्रीमध्ये कामाला होता. त्याच्या पश्चात आईवडील व चार भावंडे आहेत.


अक्षयचा मृत्यूही सेल्फीच्या मोहातूनच

दरम्यान, राधानगरी तालुक्यातील न्यू करंजे येथील माउली कुंड येथून चार दिवसांपूर्वी वाहून गेलेल्या अक्षय बुरूड या तरूणाचा मृतदेह बुधवारी ओढ्यात आढळला. हा तरूणही सेल्फी काढतानाच धबधब्यात वाहून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदा दुरूस्तीचा मसुदा ऑक्टोबरपर्यंत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘राज्य सरकारकडून सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सहकारी कायद्यात बदल व दुरुस्ती सुचवण्यासाठी राज्य सहकारी कायदा बदल समितीच्या पुणे, लातूर, कोल्हापूर येथे बैठका झाल्या आहेत. उर्वरीत चार महसूल विभागांत बैठका झाल्यानंतर असोसिएशन, संस्था व व्यक्तींकडून आलेल्या सूचनांचा अभ्यास करून दुरुस्तीचा मसुदा ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारला सादर करणार आहे’ अशी माहिती राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी दिली. सहकार कायद्यातील दुरुस्तीमुळे संस्थांच्या सक्षमीकरणाबरोबर भ्रष्टाचाराला आळा बसेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र सहकार परिषदेचे काम १९६०च्या सहकार कलामांनुसार सुरू आहे. सहकार कायद्यात ५४ प्रकारच्या सहकारी संस्थांचा समावेश आहे. सर्वच सहकारी संस्थांना एकच कायदा लागू आहे. त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी समोर येत आहेत. अडचणी दूर करण्यासाठी आणि सहकारी संस्थाचा कायदा लोकाभिमुख होण्यासाठी दुरुस्ती व बदल करण्यात येणार आहेत. यासाठी सतीश मराठे यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी कायदा बदल समिती महसूल विभागनिहाय बैठका घेत आहे. बुधवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये समितीची बैठक झाली. बैठकीत नागरी बँक असोसिएशन, जिल्हा सहकारी बँक असोसिएशन, जिल्हा बार असोसिएशन, पतसंस्था असोसिएशन, औद्योगिक संस्थेसह सभासद व्यक्तींनी कायद्यातील बदल व दुरुस्ती सुचवले आहेत.

याबाबत अध्यक्ष चरेगावकर म्हणाले, ‘५४ प्रकारच्या सहकारी संस्थांना एकच कायदा आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रत्येक संस्थेच्या वेगळा चॅप्टर करण्याची सूचना आली आहे. सहकारी संस्थांना थकबाकी वसुली करण्यासाठी विशेष अधिकार नाही. एखाद्या संस्थेमध्ये संचालकांचे रिक्त पद निर्माण भरण्याची तरतूद करा. सहकारी संस्थांना वसुलीचे अधिकार नसताना, विभागाचे कर्मचारी वसूल करत होते. त्यामुळे सरचार्ज लावला जात होता. सध्या सहकारी संस्थांकडून वसुली होत असल्याने सरचार्ज कमी करण्याची मागणी पुढे आली आहे. सर्व महसूल विभागांतून आलेल्या मागण्यांचा विचार करून हा दुरुस्तीचा मसुदा सरकारला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सादर करणार आहे.’

समितीचे सदस्य उदय जोशी, धरणीधर पाटील, जयंत कुलकर्णी, अॅड. शंतनू खुर्जोकर, विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, सातारा जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम, करवीरचे सहायक निबंधक सुनील धायगुडे, प्रदीप मालगावे आदी उपस्थित होते.

संस्था, व्यक्तींकडून आलेल्या सूचना

वसुली पद्धत गतीमान करा

५४ प्रकारच्या संस्थांना एकच कायदा नको

रिक्तपद भरण्यासाठी तरतूद करा

कलम २४ नुसार सभासदांना प्रशिक्षण द्या

सहकारी संस्थांना माहिती अधिकार लागू करा

सरचार्ज माफ करा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाव ठेक्याप्रश्नी मच्छिमारांची निदर्शने

0
0



कोल्हापूर टाइम्स टीम

तलाव ठेका रकमेतील वाढ कमी करावी, एका तलावावर एकच संस्था नोंदणी करावी. मच्छिमारांना २५ किलो सूतजाळी अनुदान दरवर्षी द्यावे, यांसह अन्य मागण्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती मस्त्यव्यवसाय सहकारी संघाच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी ‌अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.

राज्य सरकारने भांडवलदारांचे हित जपण्यासाठी मच्छिमारांना उद‍्ध्वस्त करणारा कायदा केला आहे. तलाव ठेका रकमेत भरमसाठ वाढ केली आहे. या वाढीमुळे स्थानिक मच्छिमारांचे जगणे असह्य झाले आहे. जिल्ह्यात ४९ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था असून, ४५ हजार मच्छिमार आहेत. तलाव आणि नदीभागात मासेमारी करून उदरनिर्वाह केला जातो. साखर कारखानादारांच्या प्रदूषित पाण्यामुळे मासे मरून जात आहेत. त्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. राज्य सरकार मच्छिमारांना पाठबळ देण्याऐवजी खासगी भांडवलदारांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे ३० जून २०१७ च्या परिपत्रकानुसार केलेली अन्यायकारक ठेका रक्कम तातडीने रद्द करावी. नदीभागावर नवीन संस्था नोंदणी करू नये. अभयारण्य क्षेत्रातील तलाव मासेमारीसाठी स्थानिक मच्छिमारांना उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

निदर्शनात संघाचे अध्यक्ष अमोल देसाई, उपाध्यक्ष विजय नाईक, गणपतराव नलवडे, दत्तराज निकम, प्रकाश गोसावी, अंबोजी पाटील, नितीन मुळे, सुनील काटकर, बाळासाहेब निकम, गजानन भोई, संगीता निंबाळकर, सुभाष देसाई आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्याप्रकरण : माहितीदारास १० लाख

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी विनय बाबूराव पवार (३५, रा. उंब्रज, ता. कराड) आणि सारंग दिलीप अकोलकर (३७, रा. पुणे) या दोघांवर राज्य सरकारने १० लाख रु.चे बक्षीस जाहीर केले आहे. पोलिसांनी शोध घेऊनही संशयित सापडत नसल्याने या दोघांची माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी समीर विष्णू गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे या दोन संशयितांना अटक केली होती. या दोघांवर आरोपपत्रही दाखल केले आहे. सनातन संस्थेचे साधक विनय पवार आणि सारंग अकोलकर या दोघांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याने पोलिसांनी या दोघांच्या नावांचा उल्लेख आरोपपत्रात केला आहे. पोलिसांनी पवार आणि अकोलकर यांचा शोध घेतला. मात्र अद्याप ते हाती लागलेले नाहीत. ‘पवार आणि अकोलकर यांची माहिती देणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस जाहीर करावे, असा प्रस्ताव विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य सरकारकडे पाठवला होता. राज्य सरकारने १७ जुलैला या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. संशयितांची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे,’ अशी माहिती नांगरे-पाटील यांनी यावेळी दिली.

फरार आरोपी पवार आणि अकोलकर या दोघांनीच कॉम्रेड पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा दावा आहे. या दोघांचेही फोटो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उमा पानसरे यांनी ओळखले आहेत. शिवाय पवार आणि अकोलकर हे दोघे पिस्तूल तयार करून घेण्यासाठी कोल्हापुरात आले होते. त्यांनी पानसरे यांच्यावर पाळत ठेवल्याची माहिती एका साक्षीदाराने सीबीआय आणि एसआयटीला दिली होती. यापूर्वी अटक केलेले समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे या दोघांशी पवार आणि अकोलकर यांचा वारंवार संबंध आल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. जत येथे घेतलेल्या शस्त्र चालवण्याच्या प्रशिक्षण शिबिरातही पवार आणि अकोलकर यांचा सहभाग होता. दरम्यान, ‘पोलिसांनी पूर्वग्रहदूषित वृत्तीने सनातनच्या साधकांवर बक्षीस जाहीर केले आहे. सनातनच्या साधकांचा दाभोलकर किंवा पानसरे यांच्या हत्येशी संबंध नाही. सनातनच्या साधकांवर बक्षीस जाहीर करण्यातून पोलिसांचा तपास भरकटल्याचे स्पष्ट होत आहे,’ अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या क्रमांकांवर करा संपर्क

राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे – ०२० – २५६३४४५९

अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर – ०२३१ – २६५६१६३

रमेश ढाणे, पोलिस उपनिरीक्षक, एसआयटी - ९८२३५०२७७७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


असा झाला 'सोनू साँग'चा जन्म!

0
0

सुनील दिवाण । पंढरपूर

'सोनू, तुला माझ्यावर भरवसा नाय काय' या गाण्याने सोशल मीडियात धुमाकूळ घातलेला असताना या गाण्याच्या जन्माची कथा आता पुढे आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील अजय क्षीरसागर या तरुणाने हे गाणे लिहिले असून त्याचा किस्साही भन्नाट आहे.

भावाला नवं आणि जरा हटके लोकगीत रचून द्यावे, असे अजयला वाटत होते. त्याच्या मनात अनेक शब्द घोळत होते. तेवढ्यातच त्याच्या पत्नीने 'सोनू बाजारात चलायचं का' अशी लाडाने विचारणा केली आणि यातला नेमका सोनू शब्द उचलत अजयने झरझर गाणे लिहून काढले. हे गाणे नंतर अजयचा भाऊ अविनाश अवघडेने सोशल मीडियावर शेअर केले आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळाला.

मुख्य म्हणजे प्रसिद्ध आरजे मलिष्काने या गाण्याच्या चालीवर 'मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय' हे विडंबन गीत रचून पालिकेच्या कारभाराचा जोरदार समाचार घेतला. त्यानंतर देशभर 'सोनू साँग' व्हायरल झाले. भारतातच नाही तर पाकिस्तानातही या गाण्याची कॉपी करून नवे गाणे तयार करण्यात आले आहे. या गाण्याला इतकी लोकप्रियता मिळत असताना अजय मात्र तितका प्रकाशझोतात येऊ शकलेला नाही. याबाबत त्यालाही खंत वाटत आहे.

आजोबाच अजयचे गुरू

सोलापूर जिल्ह्याला लोकसंगीताचा मोठा वारसा आहे. शाहीर अमर शेख यांच्यापासून प्रल्हाद शिंदेंपर्यंत अनेक दिग्गज कलावंत सोलापूरच्या मातीने महाराष्ट्राला दिले. हाच वारसा अजय क्षीरसागर नावाचा नवोदित कलावंत पुढे नेत आहे. कुर्डूवाडीतील अण्णाभाऊ साठे झोपडपट्टीमधील छोट्याशा घरात त्याचे कुटुंब राहते. आजोबा नामदेव भिसे हेच त्याचे गुरू. अभ्यासाची पुस्तके उघडण्याऐवजी लोकगीताचा सराव करण्यातच अजयला नेहमी रस राहिला. अजयचे आजोबा एकतारीवर सुरेख भजने म्हणायचे. त्यांच्या तालमीत अजय गाणे शिकला. गाण्यासोबत लिहिण्याची आवड असलेल्या अजयने देवीची गाणीही लिहून म्हणायला सुरुवात केली. त्याच्या आवाजाची छाप चंदन कांबळे या संगीतकारावर भुरळ पाडून गेली आणि त्यांनी अजयला संगीताच्या 'ट्रॅक'वर आणले. अजयने विविध कार्यक्रमांतून चंदन कांबळे यांच्या संगीतसाथीने लोकगीते सादर केलीत. आता तर त्याला व्यावसायिक ऑफरही मिळू लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर महानगरपालिकेचे ‘स्कूल चले हम’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पदाधिकारी व अधिकारी संयुक्तपणे प्रयत्न करणार आहेत. शाळेसाठी आवश्यक सुविधा, शिक्षकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सोमवारपासून पदाधिकारी व अधिकारी शाळा तपासणी करणार आहेत. शाळांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी आराखडा तयार केला जाईल अशी माहिती महापौर हसीना फरास व शिक्षण समिती सभापती वनिता देठे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

सभापती देठे म्हणाल्या, ‘महपालिका शाळेतील पटसंख्या वाढावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शिक्षकांना प्रोत्साहित करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा, शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर आहे. त्यासाठी पहिल्यांदा महापालिकेच्या सर्व शाळांची तपासणी, मुख्याध्यापक-शिक्षकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या जातील. त्यानंतर शाळेनिहाय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कृती आराखडा राबवला जाईल.’

महिला व बालकल्याण समिती सभापती वहिदा सौदागर म्हणाल्या, ‘महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडील सुमारे चार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याचे नियोजन आहे. मुलांना गणवेश, शाळेत बेंचेस, शाळेत वॉटर प्युरिफायर यासाठी निधी खर्च करण्याचे प्रस्तावित आहे.’ पत्रकार परिषदेला उपमहापौर अर्जुन माने, ‘स्थायी’ सभापती संदीप नेजदार, नगरसेवक शारंगधर देशमुख, संजय मोहिते, उमा बनछोडे, माधुरी लाड, प्रशासनाधिकरी विश्वास सुतार उपस्थित होते.

पटसंख्येअभावी ११ शाळा बंद

पटसंख्येअभावी ऑगस्ट २०१४ पासून महापालिकेच्या ११ शाळा बंद आहेत. न्यायमूर्ती रानडे विद्यामंदिर, देवी रमाबाई आंबेडकर विद्यामंदिर, महात्मा जोतिराव फुले विद्यामंदिर शाहूपुरी, छत्रपती राजाराम विद्यामंदिर नऊ नंबरशाळा, विजयमाला कन्या विद्यामंदिर, पद्माराजे विद्यालय मुले व मुली, रंगराव साळुंखे विद्यालय, नेहरु कन्या विद्यालय, अण्णा भाऊ साठे विद्यालय, महाराणी ताराराणी विद्यालय मुले या शाळा बंद आहेत. अकरा शाळापैकी आठ शाळांच्या इमारती वापरात आहेत.


लोकसहभाग घेणार

लोकसहभागातून शालेय विकास साधण्यात येणार आहे. समाजातील विविध घटकांना शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी साद घातली जाईल. कारखानदार, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनीअरसह स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींची महापालिकेत बैठक घेऊन त्यांना शालेय विकासात समावून घेतले जाईल असे महापौर फरास यांनी स्पष्ट केले.

नियोजन

प्रत्येक शाळेत ई लर्निंग, मुलांना बसण्यासाठी बाकडी,

शाळा तिथं प्रयोगशाळा, कोल्हापूर टँलेंट सर्च परीक्षा

प्रत्येक शाळेत प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल

सेमी इं​ग्रजी विषयांच्या शिक्षकांसाठी विशेष शिबिर

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशासाठी वार्षिक कार्यक्रम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस दरवाढीने कंबरडे मोडणार

0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

गॅस सिलिंडवरील अनुदान संपुष्टात आणण्यासाठी सिलिंडरमागे दरमहा चार रुपये दरवाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी होत असताना सरकार सिलिंडरमागे चार रुपये दरवाढ करून सामान्य ग्राहकांच्या खिशावर भार टाकत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे.

जिल्ह्यात गॅस सिलिंडर ग्राहकांची संख्या सात लाख ११ हजार ९५९ आहे. दर महिन्याला जिल्ह्यातून सरकारला २८ लाख ४७ हजार ८३६ रुपये जादा रक्कम मिळणार आहे. नऊ महिन्यातून दोन कोटी ५६ लाख ३० हजार ५२४ रुपयांचा सरकारकडे जमा होणार आहे.

स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ही जीवनाश्यक गरज आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी इंधनाची साधने हळहळू कमी होऊ लागली आहेत. सरपण, शेणी इंधन म्हणून ग्रामीण भागात वापरले जाते. शहरात गॅस व रॉकेलचा वापर केला जातो. पण, रेशनकार्डवरील रॉकेलही बंद झाले आहे. लवकरच रॉकेलमुक्त जिल्हा म्हणून घोषणा होण्याची शक्यता आहे. स्वयंपाकासाठी पारंपरिक इंधन आणि रॉकेल हे मार्ग बंद झाल्याने शहरातील बहुतांशी घरांत स्वयंपाकाचा गॅस वापरला जातो.

दहा वर्षांपूर्वी गॅस सिलिंडरचा दर वाढला की जनता रस्त्यांवर येत असे. पण, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर कमी झाल्याने स्वयंपसकाचा दर कमी होऊ लागला आहे. सिलिंडरचा दर जानेवारीमध्ये सव्वा सहाशे रुपये होता. दर जास्त असले तरी ग्राहकाच्या खात्यावर सबसिडी जमा होत होती. पण, फेब्रुवारीनंतर हा दर उतरत गेला. गेल्या जून महिन्यात ५५५ रुपये दर होता. जुलैमध्ये तो ५१४ रुपये ५० पैसे इतका कमी झाला आहे. घरगुती सिलिंडरवरही सरकारने सर्व कर रद्द करुन पाच टक्के जीसएटी लावला आहे. तसेच या महिन्यापासून चार रुपये दरवाढ केली असून एप्रिलपासून सर्व अनुदान बंद होणार आहे. नऊ महिन्यात सिलिंडरमध्ये तब्बल ३४ रुपये वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुढील नऊ महिन्यात दर वाढले तर ग्राहकालाही चढ्या दराने सिलिंडर खरेदी करावे लागणार आहे. त्याचा फटका स्वयंपाकाला बसणार आहे. सरकारने अनुदान बंद करण्याचा फेरविचार करावा, अशी मागणी ग्राहकांकडून होत असताना सरकारने मात्र यावर कोणतेच निवेदन केलेले नाही. त्यामुळे मुकाटपणे ही वाढ सोसावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरवर्तन करणारे दोघे ‌शिक्षक निलंबीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर ‌

विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणी अटकेत असलेला राजकुवर अहिरे आणि मुलीशी अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली संजयकुमार कोरवी या प्राथमिक शिक्षकांना गुरूवारी निलंबित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सीइओ डॉ. कुणाल खेमनार यांनी ही कारवाई केली.

धुळे जिल्ह्यातील पुरूषवाडीतील शिक्षक अहिरे हा सांगशीतील विद्या मंदिर शाळेत नोकरीस होता. अहिरे त्याने दीप्ती संतोष लाड (१६) या विद्यार्थिनीचा गळा आवळून खून केला होता. पोलिसांकडून आलेल्या अहवालानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने त्याचे निलंबन केले. आजरा तालुक्यातील मोरेवाडी विद्या मंदिरातील शिक्षक संजयकुमार कोरवी याने मुलींशी गैरवर्तन केले होते. त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या दोघांचे निलंबन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटी प्रवास होणार स्वस्त

0
0

Gurubal.mali@timesgroup.com

Tweet:@gurubalmaliMT

कोल्हापूर :दोन रुपये वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून ‘वडाप’ ने प्रवास करणाऱ्या प्रवाशासाठी महापालिका आनंदाचा निर्णय घेणार आहे. पहिला टप्पा ७ रुपयांऐवजी पाच रुपये करण्यात येणार असून त्यामध्ये तब्बल चार किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवाशांचे पैसे तर वाचणार आहेतच शिवाय केएमटीला देखील रोज पन्नास हजाराचा तोटा कमी होणार आहे. रोज अडीच लाखाचा तोटा सहन करणाऱ्या केएमटीला वाचवण्यासाठी प्रशासनाने आता नवनवीन संकल्पना अमंलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर शहर व परिसरातील ग्रामीण भागात रोज सध्या ११० केएमटी बसेस धावतात. यामधून रोज लाखावर प्रवाशी प्रवास करतात. यामध्ये शहरातंर्गत प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पाच हजारावर रिक्षा, हजारावर इतर प्रवाशी वाहतुकीची वाहने शहरात धावतात. त्यांच्याशी स्पर्धा करताना केएमटीची दमछाक होत आहे. त्यामुळे चार वर्षांपूर्वी ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी ही बससेवा सध्या रोज अडीच लाखाचा तोटा सहन करत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी दर कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सध्या तीन टप्यात तिकीट दराची आकारणी केली जाते. त्यामध्ये पहिला टप्पा ७ रु. (पहिले चार किलोमीटर), दुसरा टप्पा ८ रु. ( सहा किलोमीटर), तिसरा टप्पा दहा रुपयांपासून पुढे सुरू होतो.

बुलाव डाव करणारे रिक्षाचालक काही ठिकाणी पाच रूपये तर काही ठिकाणी दहा रूपये घेतात. या रिक्षातून प्रवास करणाऱ्या रिक्षाचालकांना आकर्षित करण्यासाठी चार किलोमीटरचे सध्याचे भाडे पाच रुपये करण्यात येणार आहे. चार किलोमीटरचा ​प्रवास करण्यास वडाप रिक्षाचालक दहा रुपये घेतात. तोच प्रवास केवळ पाच रुपयात होणार असल्याने आणि रिकाम्या धावणाऱ्या बसेसमध्ये गर्दी होणार असल्याने केएमटीचा फायदा होणार आहे. यामुळे सुट्या पैशांचा प्रश्नही आपोआप मिटून वाद थांबणार आहेत. या बसेसमधून सध्या ७२ टक्के प्रवाशी प्रवास करतात, दर कमी केल्याने प्रवाशांची संख्या वाढून रोज पन्नास हजाराचा फायदा होणार आहे. हा फायदा केएमटीचा तोटा कमी करण्यास मदत करणार आहे.

मध्यवर्ती बसस्थानकातून रोज दर तीन मिनिटांनी एक बस शिवाजी पुतळा,गंगावेश बिंदू चौक आणि खासबाग मैदानकडे जाते. येथून जेवढे प्रवाशी बसने जातात तेवढेच खासगी वाहनाने देखील जातात. नव्या दराचा फायदा या मार्गावर जादा होण्याची शक्यता आहे.


केएमटी चे आकडे बोलतात

केएमटीकडील एकूण बसेस १२९

रस्त्यावर धावणाऱ्या बसेस ११०

कर्मचारी संख्या ११००

रोजचा केएमटी प्रवास २६ हजार किलोमीटर

रोजचे उत्पन्न ८ लाख ते ९ लाख

रोजचा तोटा दोन ते अडीच लाख

कर्मचाऱ्यांचा पगार १ कोटी ८२ लाख

दुसऱ्या टप्यापर्यंत प्रवास करणारे प्रवाशी २६ हजार

दुसऱ्या टप्यानंतर प्रवास करणारे प्रवाशी ३६ हजार


केएमटीचा तोटा कमी करण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी तिकीट दर कमी करण्याबरोबर अन्य काही सुविधा देण्यात येणार आहेत. रिक्षा व इतर वाहनाशी स्पर्धा करताना प्रवाशांना आकर्षित करून घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

संजय भोसले, अतिरिक्त व्यवस्थापक, केएमटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images