Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तर पीएचडीला प्रवेशच नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या पीएचडी आणि एमफील पदवीसाठी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याकडे अद्यापही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नाही. पात्रतेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर न केल्यास प्रवेश नाकारण्यावर शिवाजी विद्यापीठ प्रशासन ठाम राहणार असल्याने विद्यार्थ्यांना कागदपत्रे न दिल्यास संशोधनपदवीसाठी प्रवेशच मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावर्षी शिवाजी विद्यापीठातर्फे पीएचडी व एमफिल या पदवीसाठी पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. पदव्युत्तर शाखांमधील ४३ विद्याशाखांसाठी पीएचडी पात्रता परीक्षा तर २० विद्याशाखांसाठी एफफिल पात्रता परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर झाल्यानंतर त्याबाबत काही शंका उपस्थित करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक दिवसाची मुदत देण्यात आली होती.

दरम्यान, प्रवेशपरीक्षेनंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. या यादीनुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या विषयानुसार मुलाखत द्यावी लागते. तसेच विषयाचे सादरीकरण करावे लागते. या प्रक्रियेनंतरच विद्यार्थ्यांचा संशोधनासाठी प्रवेश निश्चित होतो. पीएचडीसाठी पात्रता कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्याचा नियम आहे. यासाठी प्रवेश घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. परंतु प्रवेश निश्चित झाल्यानंतर दिलेल्या मुदतीत पात्रता कागदपत्रे सादर करण्याबाबत विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन उदासीन असल्यामुळे सध्या पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पात्रताकागदपत्रांअभावी अपूर्ण आहेत. गेल्या दहा वर्षांत कागदपत्रे सादर न केलेल्या विद्यार्थ्यांची ही संख्या सद्य:स्थितीत आठ हजारांच्या घरात आहे. पीएचडीचा साठीचा संशोधन प्रकल्प सादर करण्याची मुदत सहा वर्षे आहे. ज्यांचा प्रकल्प सहा वर्षात पूर्ण होत नाही त्यांना नव्याने नोंदणी करून कागदपत्रे जोडावी लागतात.

यापुर्वी ज्यांनी प्रवेशनिश्चितीनंतर दिलेल्या मुदतीत पात्रता कागदपत्रे सादर केलेली नाही अशा विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केला नव्हता. मात्र यावर्षीपासून पात्रता कागदपत्रे सादर न केल्यास प्रवेशच देण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास यावर्षी ४० विद्याशाखांमधून पीएचडी तर २० विद्याशाखांमधून एमफिल पदवीसाठी विद्यार्थ्यांनी पात्रता परीक्षा दिली आहे. यामध्ये ५० टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मात्र त्यांच्याकडून पात्रता कागदपत्रे सादर झाली नाहीत तर त्यांची प्रवेशनिश्चिती होणार नाही.

डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिराळा परिसरात पुन्हा दमदार सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा
शिराळा तालुक्यात दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा दमदार सुरुवात केली. चांदोली धरण परिसरासह तालुक्यात दिवसभर संततधार होती. चांदोली धरण परिसरात गेल्या चोवीस तासांत ६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण ७८.९३ टक्के भरले आहे.

धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात धरणात येत आहे. त्यामुळे धरणाची पाण्याची पातळी वाढत आहे. धरणात २७.१६ अब्जघनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणी पातळी ६१९ मीटरवर गेली आहे. धरण परिसरात आतापर्यंत १४१० मिमी पाऊस झाला आहे. चांदोली धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग सुरू झालेला नसल्यामुळे वारणा नदीचे पाणी जलदगतीने कमी होऊन, सर्व पुलांवरून वाहतूक सुरू झाली आहे.

सध्या पडणारा पाऊस पिकांसाठी उपयुक्त असल्यामुळे भात, भुईमूग, सोयाबीनसह इतर पिके जोमदार आली आहेत. पावसाने उघडीप दिलेल्या कालावधीत पिकांच्या अांतरमशागतीची कामे शेतकऱ्यांनी उरकून घेतली आहेत. दमदार पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही मिटला आहे. डोंगर हिरवाईने नटून गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगेची पाणीपातळी ओसरू लागली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात पावसाचा जोर कमी झाला असून पंचगंगा नदीची पाणी पातळी दोन फुटाने कमी झाली आहे. धरणक्षेत्रात मात्र पावसाचा जोर कायम असून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कासारी धरण क्षेत्रात १६० मिलीमीटर पाऊस झाल्याने धरणाचा एक दरजावा उघडला आहे. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरण ९३ टक्के भरले आहे.

रविवारी व सोमवारी शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगेची पाणी पातळी ओसरू लागली आहे. सोमवारी सकाळी राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी ४० फूट १ इंचावर होती. दुपारी दोन वाजता पाण्याची पातळी ३९ फूट ७ इंचांवर पोचली. सायंकाळी आठच्या सुमारास पाणी पातळी ३ फूट ७ इंच म्हणजे इशारा पातळीपेक्षा पाच इंचाने कमी झाली.

दरम्यान, शहरात जरी पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली असली तरी धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कासारी धरण क्षेत्रात १६० मिली मीटर, जंगमहट्टी धरणक्षेत्रात ८५, घटप्रभा धरणक्षेत्रात ८० तर कोदे धरण क्षेत्रात ७८ मिलीमीटर पाऊस पडला.

चिकोत्रा धरण (३० टक्के) वगळता सर्व धरणे ७० टक्क्यांवर भरली आहेत. कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारे राधानगरी धरण ९३ टक्के भरले आहे. तुळशी धरण ८४ टक्के तर वारणा धरण ७९ टक्के भरले आहे. दूधगंगा धरण ७० टक्के भरले आहे.

जिल्ह्यातील ४७ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, शिंगणापूर बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, कसबा तारळे, शिरंगाव हे बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद आहे. रेडेडोहाजवळ रस्त्यांवरील पाणी उतरले असले तरी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शिवाजी पुलावरून दुचाकी वाहने वगळता अन्य वाहनांना प्रवेश नाकारला आहे.

धरणातील पाणीसाठा

धरणाचे नाव पाणी साठा (टक्केवारीत)

राधानगरी ९३

तुळशी ८४

वारणा ७९

दूधगंगा ७०

कासारी ८८

कडवी ९१

कुंभी ८२

पाटगांव ७७

चिकोत्रा ३०

चित्री ७१

जंगमहट्टी ९३

घटप्रभा १००

जांबरे ९७

कोदे १००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाच्या वाढदिनीच काळाचा घाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे-बेंगळुरू महामार्गावर सांगली फाटा येथील बुधले मंगल कार्यालयासमोर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाले. मोहन आण्णासो कोरे (वय ४५, मूळ रा. अर्जुनवाड, ता. शिरोळ, सध्या रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव असून, ते पट्टणकोडोलीहून हालोंडी (ता. हातकणंगले) येथे जात होते. कोरे यांच्या लग्नाच्या वाढदिनीच काळाने घाला घातल्याने कोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मोहन कोरे हालोंडी येथील सन मोटर्स या शोरुममध्ये वर्क्स मॅनेजर पदावर काम करीत होते. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे शोरुमला जाण्यासाठी दुचाकीवरून (एम. एच. ०९ सीय वाय. ७७३९) घरातून बाहेर पडले. साडेनऊच्या सुमारास ते सांगली फाट्याजवळील बुधले मंगल कार्यालयासमोर पोहोचले. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव महिंद्रा झायलो कारने (एम. एच. ०९ डी. ए. १७७७) दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मोहन कोरे हे दुचाकीसह सुमारे तीस फूट फरफटत गेले. डोक्यावरील हेल्मेट फुटून गंभीर इजा झाल्याने अतिरक्तस्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला. १०८ रुग्णवाहिकेतून कोरे यांना सीपीआरमध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. अपघाताची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

मोहन कोरे यांचा सोमवारी लग्नाचा २१ वा वाढदिवस होता. सकाळी घरात पती-पत्नीचे औक्षण करून नातेवाईकांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. श्रावणातील पहिला सोमवार आणि लग्नाचा वाढदिवस हा योग असल्याने कोरे कुटुंबीयांनी रात्री गोडधोड जेवण करून लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. दुर्दैवाने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे नियोजन केल्यानंतर अवघ्या दोन तासातच कोरे यांच्यावर काळाने घाला घातला. अपघाताची माहिती मिळताच कोरे कुटुंबीयांनी सीपीआरमध्ये धाव घेतली, मात्र मोहन यांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी सीपीआरच्या आवारात हंबरडा फोडला. मोहन कोरे यांची दोन्ही मुले इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. पत्नी गृहिणी आहे. लग्नाच्या वाढदिनीच पती अर्ध्यावर सोडून गेल्याने मोहन यांच्या पत्नीला धक्का बसला. रात्री उशिरा मूळ गावी अर्जुनवाड येथे कोरे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची चौकशी करून दोषी कारचालकावर कारवाई करण्याची मागणी मोहन कोरे यांच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, शिरोली एमआयडीसी पोलिसांनी कारचालक भोपाल उर्फ सुधीर विष्णू लोंढे (धुळगाव, ता. तासगाव, जि. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेल्मेट असूनही ओढवला मृत्यू

मोहन कोरे यांना रोजच महामार्गावरून प्रवास करावा लागत असल्याने ते सातत्याने हेल्मेट वापरत होते. सोमवारीही ते हेल्मेट घालून कामासाठी निघाले, मात्र भरधाव कारच्या धडकेत जोराने रस्त्यावर पडल्याने कोरे यांचे हेल्मेट फुटून डोक्याला इजा झाली. या अपघातामुळे हेल्मेटच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी हेल्मेट विक्रीची तपासणी करून दर्जेदार हेल्मेट विक्रीसाठी खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पुलाला पर्यायी पुलाचे काम पुरातत्व खात्याच्या अनास्थेमुळेच रखडले आहे, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून काम मार्गी लावा, अशी आक्रमक मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत केली. आजवर दहावेळा बैठका घेवूनही, पुरातत्वच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी आल्यानंतर पर्यायी पुलाला परवानगी देवू, असे मोघम उत्तर दिले आहे. त्यामुळे खासदार महाडिक यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली.

लोकसभेत शून्य प्रहरात झालेल्या चर्चेत भाग घेत, खासदार धनंजय महाडिक यांनी, शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे काम रखडल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. एकच मुद्दा संसदेत तिसऱ्यांदा उपस्थित करावा लागणे दुःखदायक आणि खेदजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘गेल्यावर्षी रायगड जिल्ह्यातील पूल वाहून गेला आणि त्या घटनेत अनेक व्यक्तींनी जीव गमावले. या पार्श्वभूमीवर राज्यातील जुन्या पुलांचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामध्ये शिवाजी पुलाचा समावेश आहे. कोल्हापूर शहराला कोकणाशी जोडणारा शिवाजी पूल १३८ वर्ष जुना झाल्याने, गेल्यावर्षी त्यावरील वाहतूक रोखली होती. शिवाजी पुलाला पर्यायी पुलाचे काम सुरू असताना, पुरातत्व खात्याने हे काम बविले होते. हा मुद्दा संसदेत उपस्थित केल्यानंतर, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पर्यटन-पुरातत्व खात्याचे मंत्री महेश शर्मा आणि संबंधित खात्यांचे अधिकारी अशी संयुक्त बैठक घेण्यात आली. पुरातत्व खात्याने पर्यायी पुलाला घेतलेली हरकत चुकीची असल्याचे त्या बैठकीत निष्पन्न झाले. त्यामुळे नव्या पुलाला एका महिन्यात मंजुरी मिळेल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते, याकडे खासदार महाडिक यांनी लोकसभा अध्यक्षा महाजन यांचे लक्ष वेधले.

एका वर्षाच्या कालावधीत महाड जवळील सावित्री नदीवर नवा पूल बांधून त्याचे उद्‍घाटनही झाले. मात्र कोल्हापूरला १५० गावांशी जोडणाऱ्या पर्यायी पुलाची मंजुरी प्रशासकीय पातळीवर अडकली असल्याचे खासदार महाडिक यांनी सभागृहात सांगितले. गेल्या तीन दिवसांपासून शिवाजी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या ५० हजारांहून अधिक व्यक्तींना त्याचा फटका बसला. एकीकडे आपला देश तंत्रज्ञानात प्रगती करत असून, स्पेसशिप बांधणी, बुलेट ट्रेनची घोषणा होत असताना, केवळ अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे, लोककल्याणाची कामे रखडतात ही बाब योग्य नाही, असे महाडिक म्हणाले.

गेल्या वर्षभरात कॅबिनेटची बैठकच झाली नाही का? आणि त्यामध्ये हा मुद्दा चर्चेला आला नाही का? याचे उत्तर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सभागृहाला द्यावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. जर शासकीय अधिकाऱ्यांमुळे सर्वसामान्य लोकांच्या जीविताला धोका पोहचत असेल, तर अशा अधिकाऱ्यांना खुर्ची सोडायला लावा, अशी भूमिका महाडिक यांनी मांडली. लोकसभा अध्यक्षा महाजन यांनी, संबंधित मंत्र्यांना यावर सविस्तर निवेदन देण्यास सूचना करू, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'उदयनराजेंना अटक झाल्यास महाराष्ट्र पेटेल'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

खंडणीसाठी उद्योजकाला मारहाण करून धमकावल्याप्रकरणी खासदार उदयनराजे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मुंबई हायकोर्टाने खासदार उदयनराजे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्याने त्यांच्या अटकेची चर्चा सुरू आहे. ' मात्र उदयनराजे भोसले यांना अटक झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि रस्त्यावर येईल' असा इशारा देत संभाजी भिडे गुरूजी उदयनराजेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

'उदयनराजे यांच्यावर करण्यात आलेले आरोप घाणेरडे आहेत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणाकडे लक्ष द्यावे. उदयनराजेंकडून अशी वागणूक कधीही होणार नाही, त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी सुरू असलेले प्रयत्न थांबवावेत. त्यांची अटक आम्ही कधीच खपवून घेणार नाही. तसे झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि रस्त्यावर उतरेल' असा इशारा भिडे गुरुजींनी दिला.

काय आहे प्रकरण?
खासदार उदयनराजे यांच्यावर खंडणीसाठी व्यापाऱ्याला धमकावल्याचा गुन्हा सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद आहे. या गुन्ह्यातील इतर १० संशयितांना यापूर्वीच अटक झाली आहे. जिल्हा कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर उदयनराजे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने उदयनराजे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर वेळप्रसंगी उदयनराजे यांना अटक करणार असल्याचे वक्तव्य आयजी नांगरे-पाटील यांनी केले होते. शुक्रवारी उदयनराजे साताऱ्यात आले असता त्यांचे हजारो समर्थक रस्त्यावर उतरले होते.

उदयनराजे पोलीस ठाण्यात हजर
न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर साताऱ्यात परतलेले उदयनराजे काही वेळापूर्वीच स्वत:हून सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजेंना अटक; साताऱ्यात बंदची हाक

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

खंडणी व मारहाणीचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले स्वत:ला अटक करून घेण्यासाठी आज पोलीस ठाण्यात आले असता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्यांना चक्क मिठी मारली आणि बंद खोलीत त्यांच्याशी चर्चा करून मगच त्यांना अटक केली. उदयनराजेंवर खंडणीचा गंभीर आरोप असतानाही पोलिसांनी त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, राजेंना अटक झाल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात बंद पुकारण्यात आला आहे.

व्यापाऱ्याला मारहाण व खंडणीप्रकरणी अटकेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उदयनराजेंनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळं त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. मात्र, त्याआधीच उदयनराजे आज सकाळी स्वत:हून सातारा पोलीस ठाण्यात हजर झाले. उदयनराजे अवघे पाच मिनिटं पोलीस ठाण्यात थांबले. त्यानंतर तिथून बाहेर पडले आणि पुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाले. नंतर त्यांना अटक केल्याचं जाहीर करून वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. दुपारनंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

शाळांना सुट्टी

उदयनराजेंना अटक झाल्याने त्यांच्या समर्थकांनी सातारा बंदची हाक दिली. बाजारपेठाही बंद करण्यात आल्या. तसेच शाळा- महाविद्यालयांनाही सुट्ट्या देण्यात आल्या. बंदच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साताऱ्यात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

गळाभेटीची चर्चा

पोलीस ठाण्यात अटक करून घेण्यासाठी गेलेल्या उदयनराजेंना इतर आरोपींप्रमाणेच वागणूक मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्यांना चक्क मिठी मारली. त्यांचं स्वागत करून त्यांना बसायला खुर्चीही दिली. पोलिसांनी त्यांना दिलेल्या या व्हीआयपी ट्रीटमेंटवर टीका होत आहे. पोलिसांनी आरोपींची गळाभेट घेणे कितपत योग्य आहे? इतर आरोपींना पोलीस अधिकारी अशीच वागणूक देतील काय? उदयनराजेंवर सामाजिक आरोप असते तर वेगळी गोष्ट होती, हे तर गंभीर आरोप आहेत, असं असताना पोलिसांना हे वागणं शोभतं का? असे सवालही यावेळी उपस्थित केले जात आहेत. या पोलीस अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरीतील अतिक्रमणे हटविली

$
0
0

हातकणंगले

हुपरी (ता.हातकणंगले) येथे नगरपालिका व हुपरी पोलिस ठाणे यांच्या वतीने शहरातील वाहतुकीस होणाऱ्या अडथळ्यांसह झेंडे, डिजिटल फलक, बॅनर यांचे अतिक्रमण काढण्याची मोहीम जोरदारपणे राबविण्यात आली. दिवसभर चाललेल्या या कारवाईमुळे हुपरीकरांतून समाधान व्यक्त होत आहे.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी तानाजी नरळे, हुपरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी ही मोहिम राबविली.

हुपरी येथे नुकतीच नगरपरिषद मंजूर झाली असून लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. ग्रामपंचायतीच्या काळात सर्वत्र मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होऊन संपूर्ण रस्त्यावर डिजिटल फलक, झेंडे, बॅनर यामुळे वाहतुकीस मोठ्याप्रमाणात अडथळे निर्माण होत होते. या अतिक्रमणामध्ये शहरातील सर्वच क्षेत्रातील लोकांचा समावेश असल्याने ही अतिक्रमणे निघण्याची चिन्हे दिसत नव्हती.या अतिक्रमणांनी वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.

सोमवारी सकाळी जवाहर साखर कारखाना रोडवरील हॉटेल अपेक्षापासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. यावेळी रस्त्यावरील बॅनर,डिजीटल फलक जे.सी.बी.च्या सहाय्याने अक्षरशः मोडून काढली. तसेच होळकर नगरमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी असलेले तीन झेंडे सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन काढून टाकण्यात आले. यानंतर नवीन बस स्थानकावर गाळ्यांच्या समोर असलेली अतिक्रमणे काढून वाहतुकीतील अडथळे दूर केले. त्यानंतर गावभागामध्ये विविध पक्षांच्या नेत्यांचे डिजीटल फलक, दुकानाबाहेरील फलक काढून टाकण्यात आले. काहींनी स्वतः हून अतिक्रमणे काढून टाकली. परंतु हुतात्मा स्मारक समोरील व्यापारी कॉम्पलेक्सच्या दारातील फलक काढताना हद्दीतील फलकांवर कारवाई केल्याची तक्रार कॉम्पलेक्सच्या मालकाने केल्याने किरकोळ वादावादीचा प्रसंग घडला. या कारवाईत मुख्याधिकारी तानाजी नरळे ,रामचंद्र मुधाळे, किरण हुपरीकर,मिलिंद भोगले,मिरासो शिंगे यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच हुपरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे,पी.एस.आय.विलास पाटील,सुशील गायकवाड, राजू सनदी,विनोद सणगर,सुभाष खोडवे,वायबसे आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, शहरातील युवकांनी अतिक्रमण मोहीमेत सहभाग नोंदवून पाठिंबा व्यक्त केला.


चौकट

प्रथमच अतिक्रमण हटाव मोहीम

ग्रामपंचायतीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात नेत्यांच्या आशिर्वादाने अनेक अतिक्रमणे, डिजिटल फलक,झेंडे भर रस्त्यात लावले जात असल्याने वाहतुकीस अडथळा होत होता. ही अतिक्रमणे कधीच हटविली गेली नव्हती. त्यामुळे हुपरीकरांना नवीन असलेली अतिक्रमण हटाव मोहीम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.



चौकट

नरळे, शिंदे यांचा सत्कार

सोमवारी दिवसभर हुपरी शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून यशस्वी केल्याबद्दल हुपरीकर जनतेच्या वतीने मुख्याधिकारी तानाजी नरळे व सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आराखड्याचा उडतोय बोजवारा

$
0
0

इचलकरंजी

शहरातील वाढत्या वाहतुकीला शिस्त लागावी याचबरोबर वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी तीन वर्षापूर्वी मंजूर केलेल्या इचलकरंजी नगरपरिषदेमया वाहतूक आराखड्याची सध्या प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी केली जात आहे. पण त्यासाठी नागरिक व वाहनधारकांची जनजागृती करणे आवश्यक होते. तसे न करता आराखड्याच्या नावाखाली दंडुकशाही करुन आपलीच पोळी भाजण्याचा प्रयत्न वाहतूक नियंत्रण शाखेकडून केला जात आहे. यामध्ये क्रेनधारकाला सुगीचे दिवस आले असल्याचा आरोप वाहनधारकांतून केला जात आहे. शॉपिंग सेंटर परिसरातील दुकानगाळ्यासमोरच सिग्नल परिसर नो पार्किंग झोन असतानाही त्याठिकाणी बिनधिक्कतपणे वाहने लावली जात आहेत. त्यासाठी वाहनधारकांनीही शिस्त पाळण्याची गरज असून लावलेल्या फलकांचा विचार करावा. अन्यथा ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशीच स्थिती या आराखड्याची होऊन जाईल.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे व्हावी यासाठी इचलकरंजी नगरपरिषदेने नागरिकांच्या सूचना व हरकती मागवून त्या अनुषंगाने व वाढती लोकसंख्या विचारात घेऊन १२ डिसेंबर २०१४ रोजीच्या सभेत वाहतूक आराखडा मंजूर केला होता. या वाहतूक आराखड्यास प्रायोगिक तत्वावर मान्यता देण्यात आली. त्यासाठी प्रथमत: २७ जूनचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. पण आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी येथील वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी गेल्याने हा मुहूर्त टाळण्यात आला. त्यानंतर १७ जुलैपासून या आराखड्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. पण तत्पूर्वी नागरिकांची विशेषत: वाहनधारकांची जनजागृती करणे आवश्यक होते. पण त्याची वाहतूक नियंत्रण शाखेला काही गरज वाटली नाही. आराखड्यात निश्चित केलेल्या नियमांनुसार आवश्यक त्या ठिकाणी फलकही लावण्यात आले. पण हे फलक नागरिकांऐवजी वाहतूक शाखेलाच फायदेशीर ठरत आहेत.

या आराखड्यात शहरातील सिग्नल व्यवस्था, एकेरी मार्ग, पार्किंग, नो पार्किंग झोन, अवजड वाहने, एस. टी. वाहतूक, रिक्षा थांबे, ट्रॅव्हल्स व ट्रान्सपोर्टसाठी पार्किंग, हॉकर्स झोन, मुख्य चौकातील आयलंड आदी ठिकाणी आवश्यक ते बदल करुन फलक लावण्यात आले आहेत. या आराखड्यातील सूचनांचे पालन करुन इचलकरंजी बसस्थानकाने प्राधान्याने त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. सांगली-मिरज मार्गावर जाणारी वाहने डॉ. आंबेडकर पुतळा, थोरात चौक, जुना सांगली नाका मार्गे जात आहेत. त्यामुळे वाहतूकीवरील ताण कमी झाला आहे. असे असले तरी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून मात्र या आराखड्याला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. थोरात चौकाचा पर्याय दिला असतानाही मुख्य मार्गावरच रस्त्याकडेला ही वाहने बिनधिक्कतपणे उभी केली जात आहेत.

शाहू पुतळा ते शिवाजी पुतळा ते मेनरोड, हॉटेल तारा ते हॉटेल नाई्नस रस्ता, आण्णाभाऊ साठे पुतळा ते थोरात चौक ते वर्धमान चौक, थोरात चौक ते विक्रमनगर, मेनरोड शॉपिंग सेंटर इमारत ते व्यंकटराव हायस्कूल, हॉटेल सोनाली ते शिक्षक कॉलनी, आराधना क्लॉथ ते बँक ऑफ इंडिया रस्ता, नगरभूमापन कार्यालय ते नारायण टॉकिज रोडवर डावे बाजूस या मार्गावर वाहतूकीत सुसूत्रता येण्यासाठी सम-विषम तारखांना पार्किंगची व्यवस्था करण्याचे सूचित केले आहे. पण त्याची काही अंमलबजावणी होताना दिसत नाही.

..............

चौकट

नागरिकांचीही जबाबदारी

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आराखडला बनविण्यात आला आहे. त्याची शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून अंमलबजावणी केली जात आहे. पण शिस्त लावण्याचे काम हे केवळ वाहतूक शाखेचे नसून त्याची जबाबदारी नागरिक व वाहनधारकांचीही आहे. पार्किंगसाठी जागेचा प्रश्न असला तरी अत्यल्प काळाचे काम म्हणून वाहने रस्त्यावर कशीही लावली जातात. मग वाहतूक शाखेच्या क्रेनद्वारे कारवाई होऊ लागली की वादाचे प्रसंग घडतात. त्यामुळे वाहतुकीला वळण लागण्याऐवजी केवळ दंडात्मक कारवाईवर निभावले जात आहे.

................

चौकट

कोंडी शहरात नियंत्रण नाक्यांवर

शहरातील राजवाडा चौक, कॉ. मलाबादे चौक, शिवाजी पुतळा, शाहू पुतळा परिसरात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत वाहतुकीची कोंडी नित्याची बनली आहे. त्याला शिस्त लावण्याऐवजी वाहतूक शाखेचे अनेक कर्मचारी गावाबाहेर थांबण्यात धन्यता मानत आहेत. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही त्यामध्ये काहीच सुधारणा झालेली नाही. त्यामुळे वाहतूक आराखड्याची नेमकेपणाने अंमलबजावणी होणार का हे सध्यातरी अनुत्तरीतच दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजे भोसलेंना अंतरिम जामीन मंजूर

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। सातारा

खंडणी आणि मारहाणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. उदयनराजे भोसले यांच्या अटकेनंतर सातारा शहरात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी कोर्टाने खासदार उदयनराजे यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

उदयनराजे यांना आज सकाळी अटक झाली होती. शासकीय विश्रामगृहात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले जाणार होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांना कोर्टात हजर केले गेले नाही.

उदयनराजे भोसले यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर सातारा शहरात तणावाचे वातावरण पसरले होते. उदयनराजे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला होता. मात्र कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर शुक्रवारी रात्री उदयनराजे हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली. यावेळी उदयनराजे यांचे हजारो समर्थक रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले होते.

याबरोबरच, शिवप्रतिष्ठानचे संस्थापर संभाजी भिडे गुरूजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे खासदार राजीव सातव आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही उदयनराजे यांना पाठिंबा दिला. उद्यनराजेंना अटक झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि रस्त्यावर येईल असा इशारा संभाजी भिडे गुरूजी यांनी दिला.

उदयनराजेंना अटक झाल्यानंतर सातारा शहरात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये अनेक व्यापारीही सहभागी झाले होते. शिवाय शहरातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनीच केला राजेंच्या सुटकेचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

उद्योजकाला खंडणी मागितल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर उदयनराजे मंगळवारी स्वतःहून सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांना साताऱ्याचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश बी. ए. ढोलकिया यांनी सात दिवसांसाठी जामीन मंजूर केला.

उदयनराजेंना अटक होण्याच्या शक्यतेमुळे हे प्रकरण संवेदनशील झाले होते. मात्र, कायद्याचा मान राखत वकिलांनाही कल्पना न देता उदयनराजे मंगळवारी सकाळी सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. वैद्यकीय तपासणी करून त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांच्या वकिलांच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला. या प्रकरणी पुढील सुनावणी २ ऑगस्टला होणार आहे.

पोलिसांनीच केला जामिनाचा मार्ग मोकळा

या प्रकारच्या प्रकरणात आरोपीला अटक झाल्यास कोर्टात दुपारी हजर करण्यात येते. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची विनंती अॅड. धैर्यशील पाटील यांनी पोलिसांना केली. त्यानुसार पोलिसांनी विनंती केल्यानंतर अकराच्या सुमारास उदयनराजेंना न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे सुमारे पाच हजार कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यामुळे उदयनराजेंचा जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला. पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली असती तर त्यांना जामिनासाठी अर्ज करता आला नसता.

दोन एसटींची तोडफोड

खासदार उदयनराजे भोसले यांना अटक झाल्याचे समजताच त्यांच्या काही समर्थक व कार्यकर्त्यांनी पोवईनाका व कन्याशाळा परिसरात एसटी बसेसची तोडफोड बंद केली. तसेच काही जणांनी शहरात ठिकठिकाणी दुचाकीवरुन घोषणाबाजी करीत रॅली काढली. बंदची माहिती समजताच मंडई, मेडिकल, पेट्रोलपंप बंद झाले. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक सेवाही मिळणे मुश्किल झाले होते. शहरातील सर्व भागात पोलिसांनी गस्त घालून बंदोबस्तात अत्यावश्यक सेवा सुरू केल्या.

जामिनावर सुटल्यानंतर साता-यात जल्लोष

खासदार उदयनराजे यांना तात्पुरता जामीन अर्ज मंजूर झाल्याचे कळताच सातारा शहरात त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी फटाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. समर्थक, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खासदार उदयनराजे पोवई नाक्यावर येणार असल्याचे समजताच पोवई नाका परिसरात समर्थक, कार्यकर्ते आणि सातारकर युवक, युवती, नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली. जवळपास एक तासानंतर खासदार उदयनराजे भोसले पोवई नाका परिसरात दाखल होताच एकच जल्लोष आणि घोषणाबाजी झाली. उदयनराजे आणि दमयंतीराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. खासदार उदयनराजे यांनीही नेहमीच्या स्टाईलने उपस्थितांना हात दाखवताच एकच जल्लोष झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ विठ्ठल मंदिरात मारामारी करणारे दोन कर्मचारी निलंबित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून पैसे घेऊन झटपट दर्शन देण्याच्या कारणावरून मंदिर समितीच्या दोन हंगामी सुरक्षा रक्षकांमध्ये हाणामारी झाली होती. या प्रकरणी समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई केली.
काही दिवसांपूर्वी मंदिराच्या एका पुजाऱ्याने भाविकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यावेळी मंदिर व्यवस्थापन करणारी समितीच अस्तित्वात नसल्याने समितीचे कर्मचारी मंदिराचे कारभारी बनले होते. समिती व्यवस्थापनाचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रणच राहिले नसल्याने पैसे घेऊन भाविकांना दर्शनाला सोडण्याचा धंदा काही कर्मचाऱ्यांनी सुरू केला होता. त्यातूनच २३ जुलै रोजी सुरक्षा रक्षक पांडुरंग साळुंखे आणि नारायण वाघ यांच्यात भाविकांना दर्शनाला सोडण्यावरुन चक्क हणामारी झाल्याने मंदिराचा कारभार चव्हाट्यावर आली आहे. या घटनेनंतर मंदिराचे अध्यक्ष अतुल भोसले यानी तातडीने या दोघांना निलंबित केले असले तरी या कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावल्याशिवाय भाविकांना विठूरायाचे व्यवस्थित दर्शन होणार नाही. या सर्व प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज मंदिर व्यवस्थापनाकडे असले तरी हे प्रकरण गुंडाळण्याची व्यवस्थापनाची तयारी दिसते, हे फुटेज प्रसारमाध्यमांना देण्यास प्रशासनाने स्पष्ट नकार दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजेत तेरा लाखांची ‘ऑनलाइन’ फसवणूक

$
0
0

मिरज शहरातील एका महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक असलेले शहाजहान अमीर मुजावर (वय ५६ रा. कृषी कॉलनी, स्फूर्ती चौक, विश्रामबाग) यांना ऑनलाइन टाटा सफारी वाहन बक्षीस लागल्याचे सांगून १३ लाख १६ हजार ७५० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बाबत मुजावर यांनी चौघांविरोधात महात्मा गांधी पोलिसांत तक्रार दिली आहे.
मुजावर यांनी काही दिवसांपूर्वी ऑनलाइन घरगुती साहित्य खरेदी केले होते. काही दिवसांनी त्यांना मोबाइलवर फोन आला की, तुम्ही घेतलेल्या घरगुती साहित्यावर बंपर बक्षीस लागले आहे. तुम्ही रोख रक्कम किंवा टाटा सफारी चारचाकी वाहन दोन्हीपैकी एक घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला वाहनाच्या एकतृतीयांश रक्कम भरावी लागेल. त्यानंतर मुजावर यांनी फोनवरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे स्टेट बँक मिरज शाखेत काही रक्कम भरली. काही दिवसांनी त्या व्यक्तींचा पुन्हा फोन आला आणि आणखी काही रक्कम भरण्यास सांगितले.
मुजावर यांनी टाटा सफारीच्या मोहापोटी पुन्हा काही रक्कम भरली. तरीही त्या व्यक्तींचे समाधान झाले नाही. त्यांनी मुजावर यांच्याकडे विविध व्यक्तींच्या नावे रक्कम भरण्यास सांगतच राहिले, असे करीत मुजावर यांनी सुमारे १३ लाख १६ हजार ७५० रुपये रक्कम बँकेत भरले. मुजावर यांनी वारंवार फोनवरुन वाहन अथवा बंपर बक्षीसाची मागणी करण्यास सुरुवात करताच फोन वरील व्यक्ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने मुजावर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मुजावर यांनी स्टेट बँकेत ज्या व्यक्तींच्या खात्यावर रक्कम भरले होते, अशा राहुल सिन्हा, मनोज पांडे, विनोद कुमार, राहुल कुमार या व्यक्तींच्या विरोधात महात्मा गांधी पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजारी हटाओ प्रकरणी कोर्टातही सुनावणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांच्या हक्कांसंदर्भात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सुरू असलेली सुनावणी बेकायदा आहे. या सुनावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करत पुजारी गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर पुजारी हटाओ संघर्ष समितीनेही या याचिकेवर तीन अर्ज दाखल केले आहेत. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी ते दाखल करून घेत दोन्ही बाजूचा युक्त‌िवाद ऐकून घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनीही वकिलांमार्फत कोर्टात लेखी म्हणणे मांडले. याबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी (ता. २८) होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमोरील सुनावणीबरोबरच आता कोर्टातही याप्रश्नी सुनावणी सुरू राहणार आहे.

अंबाबाई मंदिरातील पुजारी आणि पुजारी हटाओ संघर्ष समितीतील वादावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेण्याची सूचना केली होती. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू होताच मुनीश्वार यांनी दिवाणी कोर्टात धाव घेतली. ‘याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुनावणीचे अधिकार नाहीत, त्यामुळे सुनावणीला स्थगिती मिळावी,’ अशी मागणी याचिकेद्वारे केली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीत मुनीश्वरांच्या याचिकेवर अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्यावतीने तीन अर्ज दाखल करण्यात आले. दिलीप पाटील, दिलीप देसाई यांनी अॅड. सतीश माने आणि सूर्यकांत चौगुले यांच्याकरवी अर्ज दाखल केला. ते कोर्टाने दाखल करून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक एसटीच्या धडकेत चालक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली येथील जगबुडी पुलावर भरधाव ट्रकने एसटीला समोरासमोर धडक दिल्याने एसटी चालक जागीच ठार झाला. तर पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले. अर्जुन सदाशिव दुधाणे (वय ४८, रा. वडणगे पाडळी, ता. करवीर) असे मृत चालकाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. सर्व जखमींना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारच्या सुमारास कोल्हापूरकडून पन्हाळ्याकडे एसटी चालली होती. केर्लीजवळील जगबुडी पुलाजवळ ही एसटी आली असता याच दरम्यान कोल्हापूरकडे गॅस कंपनीच्या रिकाम्या टाक्या घेऊन जाणारा ट्रक ( एमएच - १० झेड ५५६६) येत असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर जोराची धडक होवून प्रचंड मोठा आवाज झाला. या धडकेमुळे ट्रक जागीच रस्त्यामध्ये फिरून आडवा झाला तर एसटी शेजारील झाडावर आदळली. समोरासमोर धडक बसल्यामुळे दोन्ही वाहनांच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. धडक बसून एसटी झाडावर आदळल्याने एसटीतील सुमारे ४० प्रवासी सीटवरून पुढे फेकले गेल्याने अनेकांच्या डोके, हात, पाय, तोंडाला जोराचा मार बसला. काहीजण गंभीर जखमी तर काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेऊन एसटीच्या काचा फोडून जसे शक्य होईल त्या मार्गाने एसटीतील प्रवाशांना बाहेर काढले. केर्ली येथील सतीश बंगडे व संदीप गायकवाड यांच्या खासगी वाहनासह रुग्णवाहिकेतून जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एसटी व ट्रकची समोरासमोर झालेली ही धडक एवढी प्रचंड मोठी होती की, दोन्ही वाहनांचा समोरच्या भागाचा चक्काचुरा झाला.तर एसटीतील सर्व सीट वाकल्या गेल्या.मृत एसटी चालक अर्जुन दुधाणे हे गेल्या १० वर्षांपासून एसटी सेवेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इचलकरंजीचा रेड झोन अलर्टवरच

$
0
0

राजेंद्र पाटील, इचलकरंजी

सन २००५ च्या महापूराची आठवण झाल्यास आजही मन हेलावून जाते. पंचगंगा नदीकाठच्या नागरी वस्तीच्या परिसराला महापुराचा सर्वाधिक फटका सोसावा लागला. नदीकाठची शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. तर गावभागातील राम मंदिरापर्यंत महापूराच्या पाण्याने वेढा दिला होता. या महापुराने प्रशासनाला अनेक चांगल्या-वाईट गोष्टींची जणू शिकवणच दिली. तरीही बारा वर्षानंतर प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेण्यात असफल ठरल्याचे दिसून येत आहे. पूर नियंत्रण रेषेतील (रेड झोन) अनेक घरांत आजही पूराचे पाणी शिरते. मात्र त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सरकारकडे लोंबकळत पडला आहे.

इचलकरंजी शहरापासून अगदी काही अंतरावरून पंचगंगा नदी वाहते. परिसरातील जुना चंदूर रस्त्यावरील दक्षिण बाजूला नागरी वस्ती आहे. त्याचबरोबर शेळके मळा, मुजावरपट्टी या परिसरातही अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे वास्तव्यास आहेत. सुमारे एक हजार घरे या रेड झोन परिसरात आहेत. नागरी वस्तीबरोबरच मुकी जनावरेही हजारोंच्या संख्येने आहेत. याच परिसरात महापुरानंतरही अनेक औद्योगिक व्यवसाय, अपार्टमेंट विनापरवाना बेकायदेशीरपणे उभे करण्यात आले आहेत.

सन २००५ साली आलेल्या महापूरात अनेक घरातील प्रापंचिक साहित्यासह औद्योगिक क्षेत्रालाही मोठा फटका सोसावा लागला होता. शेकडो यंत्रमाग अनेक दिवस पूराच्या पाण्यात अडकल्याने अखेरीस उद्योजकांना ते भंगारात विकण्याची वेळ आली. ही घटना ताजी असतानाही आजही या परिसरात झपाट्याने औद्योगिकरण वाढत आहे.

या महापुरामुळे त्यावेळी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. तर शहराचा कर्नाटकशी असलेला संपर्क पंधरा दिवस तुटला होता. गावभागात जवळपास जुन्या पद्धतीची घरे आहेत. या घरांना महापुराचा सामना करताना नुकसानच सोसावे लागले. सन २००५ च्या महापुरातील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळाली असली तरी ती समाधानकारक नसल्याच्या तक्रारी त्यानंतर करण्यात आल्या. प्रशासनाने मात्र याकडे फारसे लक्ष दिले नाही. महापुरानंतरही या परिसरात नागरी वस्ती वाढतच गेली. अत्यल्प मोबदल्यात जागा मिळत असल्याने आणि परवानगी आवश्यकता वाटत नसल्याने या भागात अनेक विनापरवाना बांधकामे केली गेली. आजही या परिसरात अनधिकृत बांधकामांची संख्या हजारांच्या घरात आहे. प्रशासन मात्र याकडे गांभिर्याने पहात नाही.

महापुरानंतर तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पूर नियंत्रण रेषेतील नागरिकांचे अन्यत्र कायस्वरुपी स्थलांतर करावे असे आदेश दिले होते. नगरपरिषद स्तरावर अशी जागा शोधण्याचे कामही सुरू होते. त्यानंतर या परिसराला २००५च्या महापुरासारखा फटका न बसल्याने हा विषय तेथेच बारगळला. परंतु संततधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर पंचगंगेची पातळी वाढत गेल्यास या परिसरातील नागरिकांना पुराचा धसका बसतो. पंचगंगेची इशारा पातळी ६८ फुटांवर आहे. यंदा पाणी पातळी इशाऱ्यासमीप पोहोचली होती. नगरपरिषद प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली असली तरी ती तात्पुरत्या स्वरुपाची असते.

पंचगंगा नदीकाठच्या परिसरात पूर नियंत्रण रेषा निश्चित करण्यात आली आहे. न्यूनमत व उच्चतम पूर नियंत्रण रेषा अशी दोन विभागात वर्गवारी करण्यात आली आहे. या दोन्हीचा मध्य असलेल्या जागेतील बांधकामासाठी परवाना घेताना पाटबंधारे विभागाचा नाहरकत दाखला जोडणे आवश्यक असतो. नगरपरिषदेत बांधकाम परवाना मागताना या दाखल्याची गरज भासते. हा परवाना देताना काही अटी घातल्या जातात. मात्र त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचे दिसत आहे. पूर नियंत्रण रेषेत बांधकामा परवाना न घेता अनेक यंत्रमाग कारखाने, अपार्टमेंट, घरे उभी आहेत. यावर प्रशासन कोणता निर्णय घेणार हाही प्रश्न अनुत्तरीतच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाप्रलयकारी पुराच्या आठवणी

$
0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

मुसळधार पाऊस सुरू झाला अन् कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली की, काळजाचा ठोका चुकतो. २६ जुलै २००५चा महाप्रलंयकारी महापूर आठवतो. गेल्या बारा वर्षात शिरोळ तालुक्यात पाण्याखाली जाणारे रस्ते भराव टाकून उंच करण्यात आले. अनेक मार्गावर नवे पूल बांधण्यात आले. मात्र, आजही पावसाची संततधार आणि त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला की महापूर डोळ्यासमोर उभा रहातो, केवळ आठवणीनेच अंगावर रोमांच उभे राहतात.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागाच्या तुलनेत पूर्व भागात शिरोळ तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, पाऊस पडला नाही तरी येथे नद्यांना पूर ठरलेला असतो. सातारा, सांगली जिल्ह्यातून येणारी कृष्णा, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातून येणारी वारणा, पंचगंगा तसेच दूधगंगा या नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात. या नद्या शिरोळ तालुक्यास वरदायिनी म्हणून ओळखल्या जातात. मात्र संथ वाहणाऱ्या कृष्णामाईसह अन्य नद्या पावसाळ्यात रौद्ररूप धारण करतात.

सन २००५साली जून महिन्याच्या प्रारंभीच पावसाने जोर धरल्याने सुरुवातीलाच धरणे भरली. त्यानंतर अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. अलमट्टी धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा केल्याने शिरोळ तालुक्यास महापुराचा फटका बसला. शंभर वर्षातील विक्रम मोडीत काढून महापुराने नवा विक्रम केला.

त्या महापुरात शिरोळ तालुनयातील १९ हजार ५०० हेक्टर पीकक्षेत्र पाण्याखाली गेले. १३६२ घरे जमिनदोस्त झाली. चार हजारहून अधिक घरांची पडझड झाली. दुकाने, हातगाड्या पाण्याखाली गेल्याने अतोनात नुकसान झाले. रस्त्यांवर दहा ते पंधरा फूट पाणी आल्याने मदतकार्यात अडथळे आले. कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांच्या महापुराने शिरोळ तालुक्यास मोठा तडाखा दिल्याने सर्वत्र हाहाकार माजला होता. पावसाचे थैमान तसेच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने बघता - बघता पुराचे पाणी पात्राबाहेर पडले. कृष्णा व पंचगंगा नदीने रौद्ररूप धारण केले. पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने अनेक गावांना बेटाचे स्वरूप आले. महापुराने हजारो कुटूंबांचे संसार आणि शेतजमिनीतील पिकांना आपल्या कवेत घेतले. शेकडो घरे जमिनदोस्त झाली. शेतीचेही कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. अक्राळ-विक्राळ रुप धारण केलेल्या या महापुराने लोकांचे जगणे मरणप्राय केले. घरे पाण्याखाली गेल्याने प्रापंचिक साहित्याबरोबरच पशुधन वाहून गेले. अशा स्थितीत लष्कराच्या मदतीने ग्रामस्थांना यांत्रिक बोटीतून आपला गाव सोडावा लागला. राजापूर अकिवाट दरम्यान राजापुरातील पूरग्रस्तांना सुरक्षीत स्थळी हलविण्याचे प्रयत्न लष्करी जवान आपल्या नौकेतून करीत होते. सायंकाळी सहाच्या सुमारास शेवटची खेप होती. यानंतर दोन नौका जात असतानाच एक नौका पाण्यात उलटली. अन् बघता बघता दहाजण महापुरात वाहून गेले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र महापुराने त्यांना आपल्या कवेत घेतले.

शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना महापुराने वेढा दिल्याने तसेच पाणी वाढू लागल्याने पूरग्रस्तांना घरावरील छताचा, उंच इमारतींचा आधार घेतला. महापुराचे अक्राळ-विक्राळ रुप पाहून निसर्गासमोर शरणागती पत्करलेल्या माणसांना अन् पाण्यासाठी सुरक्षितस्थळी जाण्यासाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. स्थानिक गावकऱ्यांच्या तसेच लष्कराच्या मदतीने पूरग्रस्तांनी शाळा, मंदिरे, छावणीत स्थलांतर केले. शिरोळ तालुक्यात कुरुंदवाड, बस्तवाड, खिद्रापूर, मजरेवाडी, अकिवाट, टाकळी, राजापूर या नदीकाठच्या गावातील घरांत पुराचे पाणी शिरले. पुराचे पाणी दोन दिवसात उतरेल ही आशा फोल ठरली. वाढणारे पुराचे पाणी अन् आभाळातून बरसणारा पाऊस यामुळे पूरग्रस्तांनी धीर सोडला. अशा स्थितीत टाकळीवाडी येथील गुरूदत्त साखर कारखान्याने पूरग्रस्तांना आधार दिला. राजापूर, राजापूरवाडी, अकिवाट, मजरेवाडी, बस्तवाड येथील महिला, पुरुष अबालवृद्ध पूरग्रस्तांची गुरुदत्त कारखान्यावर संस्थापक अध्यक्ष, भगवानराव घाटगे व त्यांचे चिरंजीव माधवराव घाटगे यांनी राहण्याची, जेवणाची सोय केली. पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी स्वतंत्र छावणी उभारण्यात आली. पूरग्रस्तांना मानसिक आधार दिला.

शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यानेही पूरग्रस्तांची जेवणाची सोय करण्याबरोबरच त्यांच्या जनावरांसाठीही छावणी उभारून चाऱ्याची सोय केली. दत्त कारखान्याच्या वैद्यकीय पथकाने पूरग्रस्तांच्या आरोग्याची काळजी घेतली. औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी, आलास, बुबनाळ या गावातील सहा ते सात हजार पूरग्रस्तांची सोय दत्त कारखान्यावर करण्यात आली. शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांवर उपचार करण्यासाठी जयसिंगपूर मेडिकल असोसिएशनचे शंभरहून अधिक डॉक्टर व्यस्त होते. रोटरी क्लबने वैद्यकीय पथकांना स्वयंसेवकाबरोबरच औषधे पुरविली. लायन्स क्लब, जैन श्वेतांबर संघ, रेड क्रॉस सोसायटी, घोडावत ग्रुप, तुलसी ब्लड बँक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लष्कराचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिला. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यासाठी विविध सेवाभावी संस्था व संघटनांचे पदाधिकारीही धावले. महापुरात पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढताना त्यांना मोठी कसरत करावी लागली.

महापुराच्या काळात कवठेसार, कोथळी, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, नांदणी, धरणगुत्ती, शिरोळ, शिरटी, हसूर, नृसिंहवाडी येथील पूरग्रस्तांना जयसिंगपूरकरांनी मदत केली. तत्कालीन आमदार राजू शेट्टी, शरद साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील-यड्रावकर, उद्योगपती संजय घोडावत, राजेंद्र मालू, दलितमित्र अशोकराव माने, उल्हास पाटील, सावकर मादनाईक यांच्यासह सेवाभावी संस्थांच्या सदस्यांनी विस्थापितांना मदत केली. शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देऊन पूरग्रस्तांची निवाऱ्याची सोय करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले डबे पूरग्रस्तांना दिले तर काही विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून बाजारातून बिस्कीटे, दूध आणून पूरग्रस्तांच्या लहान मुलांना दिले. जयसिंगपूर शहरातून मदतीसाठी फेऱ्या काढण्यात आल्या. कुणी कपडे, कुणी पैसे, चादरी प्रत्येकाने शक्य तितकी सढळ हाताने मदत केली. पूरग्रस्तांना ताजे व चांगले जेवण मिळावे म्हणून जयसिंगपुरात घराघरात अन्न शिजले. नागरिकांनी अन्न, वस्त्र, निवारा दिला. महापूर ओसरल्यानंतर गावी परतणाऱ्या पूरग्रस्तांना पंधरा दिवस पुरेल इतका शिधाही देऊनही माणुसकीचे दर्शन घडविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पूल वाहतुकीसाठी खुला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलीच उसंत घेतल्यामुळे पंचगंगेची पातळी घटली आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला शिवाजी पूल मंगळवारी पूर्ववत खुला करण्यात आला आहे. मात्र पुलावरील पोलिस बंदोबस्त कायम ठेवला आहे.

गेल्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने नद्यांची पातळी वाढली होती. पंचगंगेलाही पूर आला होता. त्यामुळे धोका टाळण्यासाठी शिवाजी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आता उघडीपीमुळे पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सर्वच वाहनांसाठी मंगळवारी दुपारपासून पूल खुला करण्यात आला.

दरम्यान, जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरी धरणांत मुबलक पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरणाच्या वीजगृहातून २००० क्युसेक विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरण ९४ टक्के भरले आहे. तुळशी ८६, वारणा ८२, कडवी ९५ टक्के भरले आहे. कासारी धरण क्षेत्राला मंगळवारीही पावसाने झोडपून काढले. दिवसभरात १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यासह कोदे धरण क्षेत्रात ८४, कडवी धरण क्षेत्रात ७५, घटप्रभेत ५५ मिलिमीटर पाऊस झाला. अन्य तालुक्यात सरासरी १० ते ४० मिलीमीटर पाऊस झाला.

शहरात जयंती नाल्याची पाणी पातळी कमी झाली आहे. दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राजवळील पाण्यालाही उतार पडत आहे. जिल्ह्यात अद्याप ४९ बंधारे पाण्याखाली आहे. कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील पाण्याला उतार पडल्याने कोकणकडील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईतील मोर्चास लाखोने जावू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबईत ९ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चास कोल्हापुरातून बहुसंख्येने सहभागी होण्याचा निर्धार मंगळवारी येथे कोल्हापुरात झालेल्या बैठकीत करण्यात आला. जिल्ह्यातून एक लाख मराठा बांधव मोर्चासाठी जाण्याचा संकल्प करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचा निर्णय झाला. शाहू स्मारक भवनात ही बैठक पार पडली.

गेल्यावर्षी संपूर्ण राज्यात मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले. सरकारकडून समाजाच्या मागण्यांसंदर्भात ठोस असे काही हाती लागले नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईत काढण्यात येणारा ९ ऑगस्टला मराठा क्रांती मोर्चा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करण्याचा निर्धार कोल्हापुरातील बैठकीत घेण्यात आला. बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यात कोल्हापुरातील मोर्चाप्रमाणेच मुंबईतील मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापुरातील तरुण-तरुणींकडे नियोजनाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यकर्त्यांकडे ओळखपत्र देऊन त्यावर संयोजकांचे मोबाइल क्रमांक देण्याची सूचना दिलीप देसाई यांनी यावेळी केली. बाबा इंदूलकर यांनी ‘मराठा समाजाला आरक्षणाशिवाय न्याय मिळू शकणार नाही,’ असे मत व्यक्त केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोर्चाविषयी अफवा पसरविण्यात येतात, यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन लालासाहेब गायकवाड यांनी केले.

वैशाली महाडिक म्हणाल्या, ‘मोर्चात महिला मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे स्वखर्चाने सहभागी होतील. संयोजनात महिलांनाही सहभागी करून घ्यावे आणि तरुणींकडे या संयोजनाची जबाबदारी द्यावे.’ रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रमाणे मुंबईतील मोर्चाची तयारी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही, फत्तेसिंह सावंत यांनी यावेळी दिली. कोल्हापुरातील मोर्चासाठी दहा हजार तरुण-तरुणींनी संयोजन केले होते. त्याच प्रमाणे मोबाइलवरून या संयोजक तरुणांना संदेश पाठविण्यात येणार आहेत. बैठकीस उमेश पोवार, जयेश कदम, सुरेश भोसले, दिलीप पाटील, राजू सावंत, अमर पाटील, साक्षी पन्हाळकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवाई अंतर मोजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात शाळा आणि प्रार्थनास्थळांना दारू दुकानांचा विळखा वाढत असल्याची वस्तुस्थिती ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पाहणीत उघडकीस आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू दुकानांच्या परिसरातील शाळा आणि प्रार्थनास्थळांचे हवाई अंतर मोजावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दारू विक्रेते आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने दारू दुकानांनी अंतराची मर्यादा ओलांडल्याने सर्वच दुकानांच्या तपासणीची गरज निर्माण झाली आहे.

वाईन शॉप, परमिटरुम आणि बिअर शॉपी सुरू करण्यासाठी शाळा आणि प्रार्थनास्थळांपासून किमान ७५ मीटरचे अंतर आवश्यक आहे. बहुतांश मार्गांवर शाळा आणि प्रार्थनास्थळे असलेल्या शहरात दारू दुकानांना अंतराची मर्यादा डोकेदुखी ठरते, मात्र यावर नियमांचा सोयीस्कर वापर करण्याच्या प्रवृत्तीने शाळा आणि प्रार्थनास्थळांना दारू दुकानांचा विळखा बसला आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या पाहणीत ही धक्कादायक वस्तुस्थिती समोर आल्यानंतर दारू दुकानांच्या अंतर मर्यादेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दारू दुकाने सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागासह जिल्हा प्रशासनाने नियमांची मोडतोड केल्याचाही आरोप लावला जात आहे. नागरिकांच्या तक्रारींचीही राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांकडून दखल घेतली जात नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये सरकारी कार्यालयांच्या कार्यशैलीबाबत नाराजी आहे.

शहरातील ओढ्यावरील गणपती मंदिराच्या पाठीमागेच दारूचे दुकान आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि तरुणींना तळीरामांचा त्रास सहन करावा लागतो. मंदिराच्या आसपास दारूच्या रिकाम्या बाटल्या टाकल्या जातात. रात्रीच्या वेळी काही तळीराम मंदिरालगतच मद्यप्राशन करीत असतात. अनेकदा मंदिराच्या परिसरात नशेत पडलेले तळीराम दिसतात. हॉकी स्टेडिअमसमोर नव्याने सुरू झालेले वाईन शॉप मंदिरापासून ३० मीटर अंतरावर आहे. समोरच्या हॉकी स्टेडिअमचाही तळीरामांनी ओपन बार केला आहे. दारू पिल्यानंतर मैदानातच रिकाम्या बाटल्या फोडण्याचे उद्योग तळीरामांकडून सुरू असतात. बिंदू चौकापासून जवळच एका मशिदीच्या समोर दारू दुकान आहे. नेहमीच या ठिकाणी तळीरामांची वर्दळ असते. ताराबाई पार्कातील आयकर कार्यालयाच्या जवळच परमिटरूम आहे. याच्या समोर काही मीटर अंतरावर नामांकित शाळा आहे. याशिवाय शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळही या मार्गावर सुरू असते. कसबा बावड्यातील रेणुका मंदिरासमोरही अशीच स्थिती आहे. याशिवाय राजारामपुरी, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ आदी परिसरातही दारू दुकानांचा शाळा आणि प्रार्थनास्थळांना विळखा आहे.

अधिकाऱ्यांशी संगनमत

दारू विक्रेत्यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून नियमांची मोडतोड केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शाळा आणि प्रार्थना स्थळांपासून दुकानांचे अंतर मोजताना पळवाटा शोधल्या आहेत. जाणीवपूर्वक हवाई अंतर मोजणे टाळून वळणाचे रस्ते, जिने, पायऱ्या मोजून अंतर मर्यादेची गोळाबेरीज केली आहे. विक्रेत्यांची चालाखी सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी असल्याने दारू दुकाने आणि परिसरातील शाळा, प्रार्थनास्थळांच्या अंतराची तपासणी करण्याची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>