Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

केएमटी कर्मचारी दोन महिने पगाराच्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर्थिक स्थिती बेताची असल्याचे कारण देत महापालिकेने केएमटी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगार दिलेला नाही. मार्चचा पगार जूनच्या पहिल्या आठवड्यात दिला आहे. कंत्राटी, रोजंदारी आणि कायमस्वरूपी असलेले एक हजार कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत आहेत.

आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण देऊन महापालिकेने केएमटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबविले आहेत. दरमहा एक हजार कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करावी लागते. मात्र, महापालिकेचे आर्थिक गणित बिघडल्याचे कारण केएमटी प्रशासनाला दिले जात आहे. त्याचा फटका म्हणून कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचा पगार झालेला नाही. मार्च २०१७ चा पगार जूनच्या पहिल्या आठवड्यात दिला आहे. कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांची संख्या ५०० आहे, तर कायम सेवेत असलेले कर्मचारी ५०० आहेत. केएमटीच्या ताफ्यात १२० बसेस आहेत. यापैकी काही बसेस तांत्रिक कारणांमुळे नादुरुस्त आहेत.

महापालिका प्रशासन केएमटीकडून दर महिन्याला खर्चाच्या तुलनेत उत्पन्न येत नसल्याचे कारण देत आहेत. केएमटीचे उत्पन्न आणि फायदा यासह महापालिकेला अन्य मार्गाने मिळणारे उत्पन्न कमी झाल्याचे कारणही दिले जात आहे. या सर्वांचा फटका केएमटीला बसत आहे. अनेकदा निधीची तरतूद झाली तरीही टप्याटप्याने महिन्याचे वेतन केले जाते. गेले वर्षभर कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार झालेले नाहीत.

महापालिका प्रशासनाकडे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या पगाराचा प्रस्ताव दिला आहे. त्याबाबत आठवडाभरात निर्णय होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने केले जात असल्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाकडून दिले जात आहे.

- संजय इनामदार, जनसंपर्क अधिकारी, केएमटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्रीपूजकासह तिघांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीला पारंपरिक साडीऐवजी घागरा-चोली नेसवून समाजाच्या भावना भडकतील असे कृत्य केल्याबद्दल झालेल्या सर्वपक्षीय आंदोलन आणि तक्रारीनंतर जुना राजवाडा पोलिसांनी श्रीपूजक व नगरसेवक अजित ठाणेकर, त्यांचे वडील बाबूराव ठाणेकर आणि योगेश जोशी या तिघांवर गुन्हा दाखल केला. याबाबत लक्ष्मीनारायण नगर येथील भाविक दिलीप मधुकर पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. दरम्यान, भाविकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी श्रीपूजकांना अटक करण्याची मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थआन समितीच्यावतीनेही केली आहे.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीला दररोज सकाळी पूजेनंतर साडी नेसविण्यात येते. विविध सणांवेळी त्या-त्या प्रकारे मात्र पारंपरिक पद्धतीने साडी नेसविण्यात येते. शक्यतो पारंपारिक काठा-पदराची साडी नेसवण्याची प्रथा आहे. मात्र, शुक्रवारी (ता. ९) अंबाबाईच्या मूर्तीला घागरा-चोलीचा पोषाख नेसवून पूजा करण्यात आली. याचे फोटो शनिवारी व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे भाविकांमध्ये असंतोष निर्माण झाला. सोशल मीडियातून दिवसभर उमटलेल्या प्रतिक्रीयांनंतर रविवारी सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन केले. सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते भवानी मंडपात जमले. त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जाऊन त्या श्रीपूजकांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. यावेळी पोलिस निरीक्षक निशिकांत भुजबळ यांनी लेखी तक्रार द्या, त्यावर आपण वरिष्ठांशी बोलून अभ्यासाअंती गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले. मात्र कार्यकर्त्यांचे समाधान न झाल्याने पोलिस ठाण्यात घोषणाबाजी करीत दीड तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. अखेरीस शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी फिर्याद दाखल करुन घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. आंदोलकांतर्फे क्षत्रिय मराठा संघटनेचे दिलीप पाटील यांनी फिर्याद दिली. त्यानंतर अजित ठाणेकर यांच्यासह बाबूराव ठाणेकर, व योगेश जोशी यांच्यावर आयपीसी २९५ ‘अ’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आज दिवसभरही याप्रकरणी िवविध माध्यमातून प्रतिक्रीया व्यक्त झाल्या.


श्रीपूजक म्हणतात...

श्री करवीर निर्वासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाने, शुक्रवारी बांधलेल्या पूजेचे समर्थन केले आहे. याबाबत निवेदनात म्हटले आहे की, देवीची जी अलंकारीक पूजा बांधण्यात आली, ती राजस्थानमधील देवी खोडीवारच्या पूजेशी साधर्म्य साधणारी आहे. देवीची कुमारी रुपातील पूजा बांधताना अशाच पद्धतीने पूजा बांधली जाते. राजस्थानी घागरा हा सलवार-कमीज किंवा पंजाबी चुडीदारसारखा नसून ती गोल शिवलेली साडीच असते. अंबाबाई देवीला अलंकार पूजा बांधण्यात काहीच गैर नाही, असे मंडळाने स्पष्ट केले.


भाविकांतून तीव्र आक्षेप

दरम्यान, यापूर्वी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या गाभारा प्रवेश आंदोलनावेळी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या पेहरावावरून वाद झाला होता. अंबाबाई मंदिरात गाभारा प्रवेशासाठी आलेल्या देसाई यांनी श्रीपूजक आणि भाविकांनी पंजाबी ड्रेसवर आक्षेप घेत मारहाण केली होती. आता तर श्रीपूजकांनी देवीच्या साडी- चोळी या पारंपरिक पोषाखाला फाटा देत त्याऐवजी अन्य भारतीय पोषाख नेसवला. श्रीपूजकांच्या या परस्पर विरोधी भूमिकेचा आक्षेप घेणाऱ्या प्रतिक्रीया सोशल मीडियावरून व्यक्त होत आहेत.

शुक्रवारी भाविक योगेश जोशी हे चोली-घागरा घेऊन समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्याकडे आले होते. त्यावेळी जाधव यांनी, देवीला पारंपरिक काठा-पदराची साडी नेसवण्याची प्रथा आहे. त्यामुळे चोली-घागरा नेसवता येणार नाही असे स्पष्ट केले होते. तरीही जोशी आणि ठाणेकर यांनी देवीस ‘चोली-घागरा’ हा पेहराव केला. श्रीपूजक आपली अरेरावी करीत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी भूमिका आहे.

- शिवाजीराव जाधव, सदस्य, देवस्थान व्यवस्थापन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्च शिक्षणाला जीएसटी नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकार देशभरात जीएसटी कर प्रणाली लागू करत आहे. एक जुलैपासून लागू होणाऱ्या या कर प्रणालीत शिक्षण क्षेत्रात जीएसटी लागू केल्यामुळे महागाई वाढणार आहे. त्यामुळे या क्षेत्राला जीएसटी लागू करू नये, अशी मागणी आज, शुक्रवारी कोल्हापूर शहर राष्ट्रीय स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवदेन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

निवदेनात म्हटले आहे की, देशात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात. या संस्थेतील शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. मध्यमवर्गाला तर आपल्या मिळकतीतील सर्वाधिक भाग मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा लागत आहे. शिक्षण क्षेत्रात यापूर्वी ज्या ज्या बाबींना सेवाकर लागू होता त्या सर्व बाबींवर आता जीएसटी लागू होणार आहे. अनेक बाबतीत जीएसटी हा पूर्वीच्या सेवाकरापेक्षा अधिक आहे. विद्यार्थी आणि पालकांकडूनच हा कर वसूल केला जाणार असल्यामुळे त्याची झळ स्वाभाविकच सामान्य माणसांना बसणार आहे. या क्षेत्रातील जीवघेण्या महागाईमुळे कोणालाही जीएसटीचा लाभ मिळणार नाही. सर्वाधिक फटका शहरी मध्यमवर्गाला बसणार आहे. आतापर्यंत १५ टक्के सेवाकर कोचिंग क्लासेसच्या फीवर घेतला जात होता. तो आता १८ टक्के जीएसटी स्वरूपात घेतला जाणार आहे.

न्यायालयीन प्रक्रिया महाग होऊ नये, म्हणून वकिलांची फी सरकारने जीएसटी कक्षेच्या बाहेर ठेवली आहे. मात्र, हाच नियम वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रासाठी लागू केलेला नाही. जीएसटीचे दर वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळे आहेत. विमान प्रवासावर पाच टक्के, तर उच्च शिक्षणात १८ टक्के प्रस्तावित आहे. यावरून सरकारचा शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. त्यामुळ हे संभाव्य आर्थिक लूट थांबविण्यासाठी जीएसटीला शिक्षण क्षेत्रातून वगळावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर पार्थ मुंडे, उदय पोवार, सुशांत चव्हाण, सुरेश साबळे, अजिंक्य पाटील, ऋषिकेश गुरव, जयराज घोरपडे, आदित्य डोंगळे, अक्षय शेळके, दिग्विजय पाटील आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोळीचा ‘स्पेशल २६’ कारनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीबीआय पथकाचे अधिकारी असल्याचे भासवत बेमालूमपणे छापेमारी करून कोट्यवधी रुपयांचा ऐवज घेऊन लंपास करणारे चोरटे तुम्ही ‘स्पेशल २६’ या हिंदी चित्रपटात पाहिले असतील. अशाच दरोडेखोरांच्या एका टोळीने ‘स्पेशल २६’ च्या आठवणींना उजाळा दिला आहे. पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून सराफांना लुटायचे किंवा सराफांना बनावट सोने विकण्यासाठी जाऊन पोलिसांचा धाक दाखवत दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीच्या फिल्मी स्टाईल चोरीने पोलिसही आचंबित झाले आहेत.

शहरातील वाढत्या चोऱ्या रोखताना पोलिसांच्या हाती दरोडे टाकणारी टोळी लागली आहे. या टोळीचा म्होरक्या आहे वडणगेतील गणेश बळवंत पाटील. पोलिस अधिकारी असल्याचा बनाव करणाऱ्या पाटीलने स्वतःचे बनावट ओळखपत्र बनवले आहे. त्याच्याकडे खाकी युनिफॉर्म आणि पोलिस अधिकाऱ्यांची काठीही (केन) आहे. याची ठाण्यातील सुरेंद्र जैसवाल याच्याशी मैत्री झाली. यानंतर दोघांनी टोळी तयार करून लोकांना गंडा घालण्याचा उद्योग सुरू केला.

ही टोळी बनावट सोने घेऊन सराफांकडे विकण्यासाठी जायचे. काही वेळातच गणेश पाटील हा पोलिस असल्याचे भासवून दुकानात एन्ट्री करणार. मग चोरीतील सोने खरेदी करीत असल्याबद्दल सराफाला दमदाटी करायची आणि त्याला लुटायचे अशी यांची पद्धत होती. याशिवाय पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवूनही ही टोळी नागरिकांना गंडा घालत होती. राज्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये या टोळीने दरोडे टाकले आहेत. काहीच हाती लागले नाही तर, घरफोड्या आणि चोऱ्या करण्यातही ही टोळी माहीर आहे. कोल्हापूर शहरात ही टोळी दाखल झाल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. वडणगेतील एका सराफ दुकानावर दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या टोळीला पोलिसांनी कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वडणगे फाटा येथे सापळा रचून पकडले. गणेश पाटील (वय ४४, रा. वडणगे) याच्यासह सुधीर रायप्पा येनोळगे (५६, रा. मोरेवाडी, ता. करवीर), संजयकुमार रामजी शर्मा (४०, रा. फतेहपूर, जि. महू, उत्तरप्रदेश), सुरेंद्र बनारसी जैसवाल (३७, रा. निराबाई आपार्टमेंट, ठाणे पश्चिम, हरिष रामसाहाज शर्मा (२५, रा. कळवा, ठाणे, मूळ रा. उत्तरप्रदेश), वासूराम रामदवर जैसवार (४३, रा. ठाणे पश्चिम), हवालदार तपसी सरोज (४४, रा. कांदिवली पूर्व, मुंबई) आणि शशिकुमार रामजी शर्मा (३१, उत्तरप्रदेश) हे आठ संशयित पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी यांच्याकडून दोन पिस्टल, एक एअरगन, तलवारी, चाकू, बनावट सोने, बनावट नोटा यासह दोन तवेरा कार जप्त केल्या आहेत. या टोळीने चाळीसहून अधिक ठिकाणी चोऱ्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, याचा तपास सुरू आहे.

तोतया पोलिसच टोळीचा म्होरक्या

पोलिसांनी पकडलेल्या टोळीचा म्होरक्या गणेश पाटील हा वडणगेतील आहे. त्याने पोलिस अधिकारी असल्याचे स्वतःचे ओळखपत्र तयार करून घेतले आहे. पोलिस अधिकाऱ्यांकडील काठी (केन) नेहमी त्याच्या कारमध्ये असत. त्याने ओळखपत्र कोठून तयार करून घेतले याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या कर्जाला ‌जिल्हा बँकेचा नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून त्यांना सोमवारपासून नवीन पीक कर्जपुरवठा करण्याचा निर्णय रविवारी उच्चाधिकार समिती आणि सुकाणू समितीच्या बैठकीत घेतला होता. या निर्णयानुसार शिरोळ तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्जाची मागणी केली असता, थकबाकी जमा झाल्याशिवाय नवीन कर्ज मिळणार नसल्याचा पवित्रा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. बँकेवर सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. भाजपने जाहीर केलेल्या कर्जमाफीला राष्ट्रवादीने नियमाच्या कचाट्यात पकडून टोला दिल्याने नवे राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे. याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील वादाची देखील किनार आहे.
रविवारी झालेल्या समितीच्या बैठकीत अल्पभूधारक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ झाले असून त्यांना त्वरित नवीन पीककर्ज मिळेल, अशी घोषणा केली. निर्णयानुसार शिरोळ तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये पीककर्जाची मागणी केली, पण पीककर्ज किंवा मध्यम मुदतीच्या कर्जापैकी कोणतेही एक कर्ज थकीत राहिल्यास कर्जपुरवठा करता येणार नसल्याचे जिल्हा बँकेच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. मुश्रीफ या बँकेचे अध्यक्ष होऊ नयेत यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न केले होते. मुश्रीफांनी त्यांच्या घरावर काढलेल्या मोर्चामुळे दोघातील वाद वाढला होता. त्यामुळे मुश्रीफांना टार्गेट करत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेत्यांच्या हातात कमळ दिले. यामुळे मुश्रीफ त्यांच्यावर नाराज आहेत.

कर्जमाफी जाहीर करताना सोमवारपासून नवीन कर्ज मिळेल, अशी घोषणा मंत्री पाटील यांनी केली होती. पण प्रत्यक्षात जिल्हा बँकेत कर्ज मागायला गेलेल्यांना कर्ज मिळाले नाही. भाजप आणि राष्ट्रवादी पक्षातील संबंधाच्या पार्श्वभूमीवर नवीन सरकारच्या निर्णयाला टोलविल्याची चर्चा बँकेत रंगली होती. दरम्यान, याबाबत जिल्हा बँकेचे चेअरमन व आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘जिल्हा बँकेवर आरबीआय व नाबार्डचे नियंत्रण असते. रविवारच्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय झालेला असला, तरी त्याचे निकष अद्याप प्राप्त झालेले नाहीत. तसेच पीककर्ज किंवा मध्यम मुदत यापैकी कोणतेही एक कर्ज थकीत असल्याने नवीन कर्जाचे पुनर्गठन होऊ शकत नाही. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याशिवाय नवीन कर्ज देता येणार नाही.’

बँकेचे चीईओ प्रतापसिंह चव्हाण म्हणाले, ‘पाच एकराच्या आतील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय झालेला असला, तरी त्याचे निकष आल्याशिवाय पुढील प्रक्रिया राबवू शकणार नाही. त्यामुळे निकष प्राप्त होऊ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.’

१४ टक्क्याने पीककर्ज भरावे लागणार

कोणत्याही बँकेकडून घेतलेले पीककर्ज ३० जूनअखेर जमा करावे लागते. जूनअखेर कर्जाची परतफेड केल्यास कर्जदारांस पंजाब देशमुख व्याज सवलतीचा फायदा होतो. मुदतीत कर्जभरणा न झाल्यास त्यांना व्याज सवलतीपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ३० जूनअखेर सरकारला जमा करावी लागणार आहे. ३० जूनअखेर पीककर्जाची परतफेड न झाल्यास त्यांना १४ टक्के व्याजदराने परतफेड करावी लागणार आहे.

‘चंद्रकांत पाटीलच मुख्यमंत्री’

कर्जमाफीची मागणी झाल्यानंतर सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीमुळे केवळ जिल्हा बँकेचे उखळ पांढरे होणार असल्याचे बोलत होते. त्यानंतर त्यांच्या भूमिकेमध्ये बदल झाला. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करुन कर्जमाफीचा निर्णय घेतला. पण असा निर्णय जाहीर करताना मंत्र‌िमंडळाची बैठक घेऊन स्वत: मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा होती. पण कायदेशीर प्रक्रिया न करता थेट महसूल मंत्र्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने तेच मुख्यमंत्री आहेत, असा उपरोध‌िक टोला आमदार मुश्रीफ यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेडसगावात मतदानापूर्वीच बाटली आडवी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

तालुक्यातील गावागावांत दारूबंदीचे लोण वेगाने पसरू लागले आहे. शिवारे, सरूड नंतर दारूबंदीचे नगारे वाजू लागलेल्या भेडसगांव येथे जनभावनांचा आदर करून प्रशासकीय कारवाईला सामोरे जाण्यापूर्वीच सर्व प्रकारची मद्यालये कायमची बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या विशेष सभेत घेण्यात आला. दारूबंदीच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत निलकंठेश्वर मंदिराच्या आवारात जि. प. सदस्य हंबीरराव पाटील-भेडसगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन केले होते. येथील दारूबंदी लढ्याचे प्रवर्तक पोलिस उपअधीक्षक विजय लगारे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या हाकेला ओ देत सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन भेडसगांव (ता.शाहूवाडी) येथील सर्व प्रकारची दारू दुकाने रविवार (ता. ११) पासून कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांच्या विशेष सभेत या निर्णयाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत संबंधित मद्य व्यावसायिकांनीही गावातील मद्यविक्री कायमस्वरूपी बंद करत असल्याची स्वतःहून घोषणा केली.

यावेळी बोलताना जि. प. सदस्य हंबीरराव पाटील म्हणाले, ‘गावागावात दारूमुळे अनेक संसार उध्वस्त होत आहेत. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे कलहाचे वातावरण निर्माण होत आहे. दारूबंदीची लोक चळवळ ही व्यसनमुक्त समाजात परावर्तित व्हावी. व्यसनमुक्त भेडसगांवात यापुढे आरोग्य शिबीर, उदबोधनपर व्याख्याने, परीसंवाद यांचेही आयोजन केले जाईल. यानंतर गावात अवैध दारू विक्री करणाऱ्यांचा गावकऱ्यांच्या सहकार्याने बंदोबस्त केला जाईल.’

भेडसगाव दारूबंदी चळवळीचे मुख्य प्रवर्तक पोलिस उपाधीक्षक विजय लगारे म्हणाले, ‘भेडसगांव परिसराला समृद्ध इतिहासाची परंपरा लाभली आहे. गेल्या काही वर्षांत कित्येक पिढ्या व्यसनापायी बरबाद झाल्या आहेत. बरबादीच्या उंबरठ्यावरील तरुणांची यात लक्षणीय संख्या आहे. यापुढे गावातील सर्व मद्यविक्री बंद करण्यासाठी मद्यविक्रेत्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपली दुकाने बंद करावीत.’

या दारूबंदी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते भोला कारंडे यांनी बैठकीत पोलीस उपाधीक्षक विजय लगारे, जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, सर्व दारू दुकानदार, आंदोलक महिला व ग्रामस्थ यांचे विशेष अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मांडताच सर्व उपस्थित ग्रामस्थांनी प्रस्तावाला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. यावेळी डॉ. सुभाष पाटील, मानसिंग लगारे, अमर पाटील, बाबासाहेब पाटील, आप्पासो साळुंखे, आनंद फाळके, मारुती फाळके, सिंधुताई फाळके, संगीता पवार, ईश्वरा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली.

बैठकीस सरपंच रेश्मा फाळके, उपसरपंच सर्जेराव पाटील, ग्रा.प.सदस्य बाबूराव पाटील, मानसिंग घाटगे, जयराज पाटील, लक्ष्मण कारंडे, भानुदास लगारे, रेश्मा लगारे, संदीप गुरव, राजू नारकर यांच्यासह गावातील तरुण मंडळांच्या कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची सायकलवरून गस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘सायकलवाल्या पोलिसवाल्या बिरेक लावून थांब’, या गाण्याची आता तुम्हाला हटकून आठवण होईल. याचे कारण म्हणजे पोलिसांना सायकलवरून गस्त घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. गल्लीबोळात पोलिसांना पोहोचता यावे आणि गुन्हेगारांवर वचक राहावा यासाठी सध्या सात पोलिस ठाण्यांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा प्रारंभ सोमवारी (ता. १२) सकाळी दसरा चौकातून झाला.

पोलिस आणि सायकल यांचे नाते तसे जुनेच आहे. वाहनांचे प्रमाण कमी होते त्या काळात पोलिस सायकलवरूनच गस्त घालत होते. मात्र कालौघात सायकल मागे पडली आणि गस्तीसाठी पोलिसांना दुचाकी मिळाल्या. काही पोलिस ठाण्यांनी दुचाकींचा योग्य वापर केला, मात्र बहुतांश ठिकाणी गस्तीच्या दुचाकींची दुरवस्थाच आहे. यावर उपाय म्हणून गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी सायकल गस्तीची सुरुवात केली. याच धर्तीवर कोल्हापुरातही सायकलवरून गस्त घालण्याचा निर्णय आयजी विश्वास नांगरे-पाटील आणि पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी घेतला.

शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा या पोलिस ठाण्यांसह शहरालगतचे शिरोली एमआयडीसी, गांधीनगर आणि गोकुळ शिरगाव या सात पोलिस ठाण्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यांसाठी पाच सायकल देण्यात आल्या असून, त्यावरून रोज गस्त घातली जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात सोमवारी सकाळी दसरा चौक येथे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी गस्ती पथकाला हिरवा झेंडा दाखवून केली. त्यानंतर गस्ती पथकाने शहरात सुभाष रोड, उमा टॉकीज, कॉमर्स कॉलेज, बिंदू चौक, शिवाजी चौक मार्गे भवानी मंडपापर्यंत सायकल रॅली काढली. यावेळी पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, सर्व पोलिस ठाण्यांचे निरीक्षक आणि पोलिस मोठ्या संखेने उपस्थित होते.

उपयुक्ततेबाबत साशंकता

पोलिसांनी मोठ्या उत्साहात सायकल गस्तीचा उपक्रम सुरू केला असला तरी, याच्या उपयुक्ततेबाबत मात्र नागरिकांमधून उलटसुलट चर्चाही सुरू झाली आहे. चोरटे गतीमान झाले असताना पोलिसांची सायकल गस्त हा हास्यास्पद प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सायकलऐवजी पोलिस ठाण्यातील गस्तीच्या दुचाकी सुस्थितीत ठेवून त्यांचा वापर वाढवावा अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इकोफ्रेंडली उपक्रम

सायकलीवरून गस्त या उपक्रमातून इंधन बचत होईल. त्याचबरोबर पोलिसांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठीही याची मदत हईल. पोलिसांचे अनुकरण नागरिकांकडूनही सुरू झाल्यास याचा पर्यावरणासाठी नक्कीच फायदा होईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ‘उपक्रम सुरू करण्याआधीच त्यावर टीका करण्यापेक्षा याचा रिझर्ल्ट येण्यासाठी काही वेळ देण्याची गरज आहे’ असे पोलिस अधीक्षक संजय मोहिते म्हणाले.

इचलकरंजीतही सायकल गस्त

सायकलवरून गस्त घालणे शहरातील पोलिस ठाण्यांसाठी सोयीचे आहे. या तुलनेत ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यांसाठी हा उपक्रम शक्य नसल्याने कोल्हापूर शहरासह इचलकरंजीतही याची सुरुवात होणार आहे. सध्या प्रत्येक पोलिस ठाण्यांना पाच सायकल दिल्या आहेत. लवकरच ही संख्या दहापर्यंत वाढवली जाईल. यासाठी निधीचीही स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्री, रेनकोट खरेदीसाठी गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरासह जिल्ह्यातील सर्वच प्रमुख बाजारपेठांत पावसाळी साहित्य खरेदीसाठी सोमवारी गर्दी झाली. मान्सूनचे आगमन वेळेत झाल्याने साहित्य खरेदीवर जोर आला आहे. ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच दुकानदारांनी आपली दुकाने सजवली आहेत. यंदा सर्वच वस्तूंच्या किंमतीमध्ये सरासरी दहा टक्के वाढ झाली आहे. काही ग्राहकांनी आठवडा बाजार आणि फिरस्त्या विक्रेत्यांकडून साहित्य खरेदीवर भर दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेनकोट, छत्री घेऊनच नागरीक बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. याशिवाय नविन साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली आहे. शहरातील महाव्दार रोड, राजारामपुरी, शाहुपूरी, लक्ष्मीपुरी, पापाची तिकटी, शिवाजी रोड, मटन मार्केट, स्टेशन रोड, गांधीनगर येथील दुकानांत ग्राहकांची गर्दी दिसत आहे. डकबॅक, अॅकमे, टॉप इन टाऊन, रियल यांसह विविध ब्रँडेड कंपन्यांचे रेनकोट बाजारपेठेत आहेत. त्याच्या किंमती ६०० ते ३००० रुपयांपर्यंत आहेत. शॉर्टस् व फुल साइज, आकर्षक डिझाइन्समध्ये जॅकेट्स उपलब्ध आहेत. लहान मुले, मुली, सर्व वयोगटील स्त्री, पुरुषांसाठी रेनकोट आहेत. तरुणांकडून मात्र हिवाळ्यातही वापरता येईल अशा जॅकेटच्या खरेदीला पसंती दिली जात आहेत.

शालेय मुले, मुली, महिला, पुरूषांसाठी सप्तरंगी, नवरंगी छत्र्या उपलब्ध आहेत. त्यांचे दर २५० ते ७५० रुपयांपर्यंत आहेत. हरीण, ससा, पंतग नावाने ओळखणाऱ्या आकर्षक लूकच्या छत्र्याही बाजारात आहेत. ताडपत्री, पत्रे अशा वस्तूंनाही मागणी वाढली आहे. हत्तीमहल रोड परिसरातील दुकानांत प्लास्टिक कागदाचा दर ४० ते ८० रुपये मीटर आहे. साधा प्लास्टिकचा कागद २० रुपयांस विकला जात आहे. दुकानांसह मॉल्समध्ये साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसते.

पाऊस सुरू झाल्याने छत्री, रेनकोट खरेदीसाठी दोन दिवसांपासून गर्दी वाढली. गेल्यावर्षीपेक्षा यंदा काही प्रमाणात साहित्याचे दर वाढले आहेत. मात्र ग्राहकांचाही खरेदीवर जोर दिसून येत आहे. छत्री, रेनकोटमध्ये आकर्षक व्हयारटी उपलब्ध आहेत.

रशीद सय्यद, विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अप्पी पाटील यांच्या घरावर मोर्चा

$
0
0

गडहिंग्लज

हलकर्णी येथील दौलत साखर कारखान्याची उस उत्पादक शेतकऱ्यांची बिले व कामगारांच्या पगारासंदर्भात सोमवारी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष व कारखान्याचे संचालक विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्या महागाव (ता.गडहिंग्लज) येथील निवासस्थानावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. अॅड.संतोष मळवीकर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दीड तास आंदोलकानी मुसळधार पावसात ठिय्या आंदोलन केले. दौलत प्रशासनाने सोमवारी तीन कोटी तर मंगळवारी पाच कोटी रुपये बँकेत भरतो, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी माघार घेतली.

न्युट्रियन्स कंपनीने उस उत्पादक शेतकऱ्यांची बिले व कामगारांचे पगार थकीत ठेवले आहेत. यासंदर्भात आंदोलकांनी दुपारी एक वाजेपर्यंत बँकेत पैसे जमा करण्याची डेडलाईन दिली होती. मात्र बँकेत पैसे जमा न झाल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देवणे, अॅड.मळवीकर, सहसंपर्कप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे, संघटक संग्राम कुपेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो उसउत्पादक शेतकरी व कामगारांनी मोर्चात सहभागी होऊन निषेध नोंदवला. चंदगड येथील हलकर्णी फाट्यापासून मोटरसायकलने मोठ्या संख्येने आंदोलक महागाव येथे दाखल झाले. त्यानंतर पायी चालत त्यांनी अप्पी पाटील यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळविला. त्याचवेळी अप्पी पाटील समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे परिसरात तणाव जाणवत होता. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी आंदोलकांना घरापासून दोनशे मीटर अंतरावरच अडवून ठेवले. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली. तब्बल दीड तास आंदोलक भर पावसात रस्त्यावर बसून होते.

कंपनीकडून ऊसबिल व कामगारांचे पगार असे वीस कोटी रुपयांचे देणे आहेत. यापैकी आजअखेर कंपनीने बारा कोटी रुपये भरले आहेत तर उर्वरित आठ कोटी रुपये तत्काळ भरावेत यासाठी आंदोलनकरते आग्रही होते. यावर कारखाना प्रशासनाने तीन कोटी रुपये आज तर उर्वरित पाच कोटी रुपये उद्या भरू, असे आश्वासन दिले. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण, पोलीस उपअधीक्षक रमेश पाटील, पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस (गडहिंग्लज), महावीर सकळे (चंदगड) यांनी तडजोडीसाठी विशेष प्रयत्न केले.

यापूर्वी कामगारांना गेल्या महिन्यापासून ले-ऑफची नोटीस बजाविण्यात आली होती यामुळे संतप्त कामगारांनी कारखान्याचे गेट उघडून ठिय्या आंदोलन केले होते. कामगारांचे पाच महिन्यांचे पगार थकले आहेत. यावेळी कामगारांच्या मागण्यांसंदर्भात चार दिवसात कारखानास्थळावर आयुक्तांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असेही कारखाना प्रशासनामार्फत सांगण्यात आले. आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, महादेव गावडे, अशोक मानवाडकर, जि.प.सदस्य कल्लाप्पा भोगण, दयानंद देवण आदींसह उसउत्पादक शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विस्तारले करिअरचे क्षितिज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विविध क्षेत्रातील संधी आणि करिअर निवडीच्या पर्यायांचे दालन खुले करणाऱ्या ‘मटा एज्युफेस्ट २०१७’ या शैक्षणिक प्रदर्शनाचा समारोप बुधवारी (ता. १३ जून) होणार आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून या प्रदर्शनात करिअरसंधीच्या पर्यायांसोबत वि​विध क्षेत्रांतील करिअर करण्या​विषयी देण्यात आलेल्या मार्गदर्शनपर व्याख्यानांची मालिका समारोपदिनीही सुरूच राहणार आहे. दरम्यान, मंगळवारी पाऊस असूनही मार्गदर्शनपर व्याख्यानांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संध्याकाळच्या सत्रात राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संचालिका प्रा. सुषमा कुलकर्णी यांनी ‘इं​जिनीअरिंग एज्युकेशनमधील ट्रेंड्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर युनिक अॅकॅडमीचे संचालक शशिकांत बोराळकर यांनी ‘बारावीनंतर स्पर्धा परीक्षेतील करिअर’ या विषयी संवाद साधला.

नाविन्यासह कल्पकता हाच इंजिनीअरिंगचा श्वास

‘इंजिनीअरिंग हे क्षेत्र आणि या क्षेत्रातील तंत्रज्ञान हे दिवसागणिक बदलणारे आहे. जशा समाजाच्या राहणीमानानुसार गरजा वाढतील तशा इंजिनीअरिंगमधून बाहेर पडणाऱ्या उत्पादनाचा चेहरा बदलत असतो. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना नाविन्य आणि कल्पकता याची जोड तंत्रज्ञानाला देण्यासाठी झोकून देण्याची तयारी असली पाहिजे. भविष्यात हाच ट्रेंड इंजिनीअरिंगचा श्वास असेल’ असे प्रतिपादन राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संचालिका प्रा. सुषमा कुलकर्णी यांनी केला. ‘मटा एज्युफेस्ट’अंतर्गत ‘इंजिनीअरिंगमधील ट्रेंड्स’ या विषयावर त्या बोलत होत्या.

प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, ‘माणसाच्या दैनंदिन वापरातील प्रत्येक गोष्ट इंजिनीअरने बनवलेली असल्याने हे क्षेत्र प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या आयुष्याशी निगडीत आहे. इंजिनीअर होण्यासाठी काही मुलभूत कौशल्ये असणे आवश्यक आहे. यामध्ये शास्त्रीय संकल्पनांविषयी जिज्ञासा, एखादी समस्या जाणून घेण्याची आणि तिचे विश्लेषण करण्याची तयारी, त्यावर उपाय शोधण्याची विचारक्षमता, शोधकवृत्ती यांचा समावेश आहे. तर ज्या पाल्यांना इंजिनीअरिंग करण्यात स्वारस्य आहे अशा मुलांच्या पालकांनीही आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. मुलांचा कल कुठे आहे हा विचार महत्त्वाचा आहे. इंजिनीअर का व्हायचे आहे हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे, त्यातून मिळणाऱ्या उत्तरावरच या क्षेत्रातील करिअरचा आलेख महत्त्वाचा ठरतो. ज्या अभ्यासक्रमातून इंजिनीअर व्हायचे आहे त्या विषयातील कौशल्ये अवगत असणे आणि त्याविषयी उत्सुकता असेल तर इंजिनीअरिंगमधील नव्या ट्रेंडशी जुळवून घेता येणे शक्य आहे.’

टीमवर्कसह सातत्य हवे

‘इंजिनीअरिंग पुस्तकात किंवा वर्गात बसून शिकण्याचे शास्त्र नसून प्रात्यक्षिकांवर भर देणारे शास्त्र असल्यामुळे टीमवर्क आणि सातत्य यासाठी प्रयत्नशील असण्याची गरज आहे. नव्या ट्रेंडनुसार इंजिनीअरिंगमधील वाटा विस्तारत आहेत. त्यामुळे शिक्षणानंतर नोकरीसाठी शहराची, राज्याची, देशाची वेस ओलांडण्याची तयारी मुलांनी आणि पालकांनी ठेवली पाहिजे. त्यासाठी परदेशी भाषा, परदेशी संस्कृती यांच्याशी जुळवून घेता येणे हे कौशल्यही विकसित करणे ही भविष्यातील इं​जिनीअर्सची गरज राहणार आहे’ असे प्रा. सुषमा कुलकर्णी यांनी सांगितले.

स्पर्धा परीक्षेत गुणवत्तेला पर्याय नाही

‘पारंपरिक करिअर किंवा व्यावसायिक शिक्षण यांच्याबरोबरीने आज स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन प्रशासकीय यंत्रणेत करिअर करण्याचे स्वप्न अनेकांच्या आवाक्यात आले आहे. मात्र स्पर्धा परीक्षेतून यश मिळवण्यामागे खूप कष्ट आहेत. या क्षेत्रात यायचे असेल तर गुणवत्तेला आणि कष्टाला पर्याय नाही’ असे प्रतिपादन युनिक अॅकॅडमीचे संचालक शशिकांत बोराळकर यांनी केले. ‘मटा एज्युफेस्ट’ अंतर्गत ‘बारावीनंतर स्पर्धा परीक्षेतील करिअर’ या विषयावर ते बोलत होते.

बोराळकर म्हणाले, ‘स्पर्धा परीक्षेतून करिअर करण्याची इच्छा असलेल्या मुलांमध्ये विविध आकर्षणे असतात. स्पर्धा परीक्षेतून जेव्हा यश मिळते तेव्हा मिळणारे पद मोठे असते. चांगल्या पदावर काम करण्याची संधी हे क्षेत्र देते हे जरी खरे असले तरी त्यासाठी दहावी किंवा बारावीपासूनच तयारीला सुरूवात केली तर यश सोपे होते. बारावी किंवा पदवीनंतर स्टाफ सिलेक्शनद्वारे या संधी खुल्या होतात. साहजिकच शिफारस किंवा शॉर्टकट हे शब्द या सरावात नसतात. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, झोकून अभ्यास करण्याची तयारी आहे त्यांच्यासाठीच स्पर्धा परीक्षेतून करिअर करण्याची संधी आहे. महत्त्वाचे म्हणजे हजारांच्या जागांसाठी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत असतात. त्यामुळे अनेक पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न डोकावतो की स्पर्धा परीक्षा कशासाठी द्यायच्या? अनेक विद्यार्थ्यांची उमेदीची वर्षे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करण्यामध्ये जातात. अशापरिस्थिती पालक किंवा कुटुंबीय, नातेवाईक यांच्याकडून दबाव येऊ शकतो. पण या क्षेत्रातील करिअर तुमचे आयुष्य घडवू शकते.’

बोराळकर म्हणाले, ‘ज्यांना महाविद्यालयीन जीवनातील तीन ते चार वर्षे कष्ट करायचे आहेत आणि उर्वरित आयुष्य समाधानाने जगायचे आहे त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेतून मिळणाऱ्या पदाचे खूप महत्त्व आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आपण सामान्य जगातून अधिकारवाणीच्या जगात येतो. यंत्रणा बदलण्याची इच्छा असलेल्यांसाठी प्रत्यक्ष यंत्रणेत येऊन काम करण्याची संधी देणारे हे क्षेत्र आहे. कोणत्याही शाखेतून स्पर्धा परीक्षा देण्याचे स्वातंत्र्य असले तरी करिअरचे अन्य पर्याय खुले ठेवण्यासाठी शास्त्र किंवा वाणिज्य शाखा निवडावी. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे एक तंत्र आहे, ते समजून घेतले तर या क्षेत्रात यशस्वी होणे अवघड नाही.’

बारावीपासूनच तयारी हवी

आयुष्यात डॉक्टर, इंजिनीअर, उद्योजकांना एका विशिष्ट पदापर्यंत पोहोचण्यासाठी वयाची किंवा कार्यक्षेत्राची वीस ते पंचवीस वर्षे खर्ची घालावी लागतात. मात्र स्पर्धा परीक्षेतून करिअर करण्याची संधी मिळालेल्या मुलांच्या आयुष्यात ही वेळ पदावर रूजू झाल्यापासून पाच ते सहा वर्षात येते. त्यामुळे या क्षेत्रात करिअरचा विचार करणाऱ्यांनी बारावीपासूनच अभ्यासाची तयारी करावी’ असे शशिकांत बोराळकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतीक्षेनतर दमदार पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या बुधवारपासून मृग नक्षत्राला सुरुवात झालेली असली, तरी अद्याप जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. मात्र, सोमवारी सायंकाळनंतर दमदार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशीरांपर्यंत पावसाचा दमदार सरी बरसत होत्या. धरणक्षेत्रात तर पावसाचा जोर शहरापेक्षा जास्त होता. दमदार पावसाला सुरुवात झाल्याने पेरणींच्या कामांनी वेग घेतला असून येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले, तरी पावसाने हुलकावणी दिली होती. अधून मधून हलकासा शिडकावा झाला होता. सोमवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. दुपारच्या सत्रात थोडी विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. दुपारी साडेतीन वाजता पावसाची मोठी सर आल्याने फेरीवाल्यांची चांगलीच धावपळ उडाली. अर्ध्यातासानंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले.

या पावसामुळे उगवणी चांगली होणार असून शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने एक लाख आठ हजार हेक्टरवर भाताखालील तर ५८ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकांची लागण होणे अपेक्ष‌ित आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून आतापर्यंत २० हजार हेक्टरवर भाताची धूळवाफ पेरणी झाली आहे. उर्वरीत क्षेत्रावर लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाळे ठोकनंतर दिव्यांगांच्या केबिनचा ड्रॉ काढण्याचा निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिव्यांगांसाठी योग्य ठिकाणी केबीन्स दिल्या जात नाहीत. तसेच प्रशासनाच्यावतीने टाळाटाळ करण्यात येत असल्याने वैतागलेल्या दिव्यांगांनी सोमवारी दुपारी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारांना कुलूप ठोकले. तसेच आंदोलकांवर अरेरावी करणाऱ्या इस्टेट अधिकारी प्रमोद बराले यांची कॉलर पकडल्याने तणाव निर्माण झाला. अर्धा तास आंदोलन केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.

दरम्यान, सायंकाळी महापौर हसीना फरास, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये १५ जूनपर्यंत ७८ दिव्यांगांचे पुर्नवसन करण्याचा निर्णय झाला. तसेच सर्वांना प्रशासनाने तातडीने केबीन ताब्यात देताना काँक्रीट करुन द्याव्यात, असे महापौर फरास यांनी सांगितले. केबीन्सच्या जागांमध्ये बदल करण्याबाबत आयुक्तांनी स्पष्ट नकार दिला. तसेच नियमानुसार जे निश्चित केले आहे, त्याप्रमाणे कामकाज होईल, असे सांगितले.

महापालिकेच्या बजेटमधील तीन टक्के रक्कम दिव्यांगांच्या विविध कामांसाठी खर्च करायचे आहेत. तीन वर्षांपासून दिव्यांगांच्या केबीन्ससाठी प्रयत्न सुरू आहेत. ९४ केबीन्सची कब्जेपट्टी दिली असली तरी अनेक ठिकाणच्या जागा योग्य नसल्याचे कारण सांगत दिव्यांगांनी जागा बदलून मागितल्या आहेत. त्यासाठी प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. सोमवारी आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन इस्टेट अधिकाऱ्यांनी दिल्याने चर्चेसाठी आलेल्या दिव्यांगांना तीन तास प्रतिक्षा करुनही चर्चा होणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांना कुलुप ठोकले. तसेच वाहनानिशी प्रवेशद्वारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांची समजूत काढण्यासाठी अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्तांसमवेत आलेले इस्टेट अधिकारी प्रमोद बराले यांनी खुद्द आयुक्तांनी महावीर उद्यानाजवळ केबीन्ससाठी जागा देण्यास नकार दिला असल्याने तिथे जागा देता येणार नाही, असे मोठ्या आवाजात सांगितले. त्यावरुन एका महिलेने बराले यांची कॉलर पकडली. माजी नगरसेवक आदिल फरास व नगरसेवक राहुल चव्हाण यांनी बराले यांची सुटका केली. त्यानंतर आयुक्तांशी फोनवरुन चर्चा केल्यानंतर सायंकाळी बैठक घेण्यात येईल असे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बैठकीत आयुक्त चौधरी यांनी एखाद्या जागेवर निश्चित केबीन्स पैकी जास्त मागणी अर्ज आल्यास त्या ठिकाणी ड्रॉद्वारे केबीनचे वितरण केले जाईल असे सांगितले. तसेच महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच केबीन्स दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. खेळाडूंना मानधन देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपत्तीसाठी आईवर आठ वार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आई-वडील इस्टेट नावावर करून देत नाहीत आणि खर्चाला पैसे देत नाहीत या रागापोटी मुलानेच आईचा गळा चिरून तिच्यावर चाकूने आठ वार केल्याची धक्कादायक घटना आर. के. नगर येथे सोमवारी (ता. १२) सकाळी घडली. ज्योती अमरसिंह माने (वय ७५, रा. द्वारकानंद कॉलनी, आर. के. नगर) असे जखमी वृद्धेचे नाव असून, त्यांना उपचारासाठी सीपीआरमधील अतिदक्षता विभागात दाखल केले आहे, तर हल्लेखोर मुलगा पृथ्वीराज अमरसिंह माने (४७) याला करवीर पोलिसांनी अटक केले.

याबाबत घटनास्थळ आणि करवीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमरसिंह माने (वय ७८) हे मूळचे मंगळवार पेठेतील असून, एका नामांकित बिस्किट कंपनीत ते जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. आर. के. नगरातील द्वारकानंद कॉलनीत दुमजली बंगला बांधल्यानंतर ते पत्नीसह या बंगल्यात राहू लागले. त्यांना दोन मुले असून, मोठा पृथ्वीराज हा त्याची पत्नी आणि दोन मुलींसह अमरसिंह यांच्या बंगल्यात वरच्या मजल्यावर राहतो, तर दुसरा देवेंद्र (४०) हा अविवाहित आहे. वडिलांनी पृथ्वीराजला अनेकदा उद्योगधंद्यांसाठी आर्थिक मदत केली, मात्र उधळपट्टी आणि व्यसनामुळे पृथ्वीराजला कोणत्याच उद्योगात यश आले नाही. अखेर वडिलांनी त्याला घरातच एक दुकान काढून दिले, मात्र यातही त्याने लक्ष न घातल्याने दुकान चालले नाही. मुलगा कोणतेच काम लक्ष घालून करीत नसल्याने त्याच्या नावे इस्टेट देण्याची इच्छा वडील अमरसिंह आणि आई ज्योती यांची नव्हती. तो अनेकदा पैशांची मागणी करून इस्टेटीतील वाटा मागत होता.

सोमवारी सकाळी याच मुद्यावरून पृथ्वीराजचा वडिलांशी वाद झाला. दोघांमधील वादानंतर पृथ्वीराज वरच्या मजल्यावर गेला, तर वडील आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले असता आईवरच चाकू चालवून गळा चिरला आणि पोटात, छातीवर, कंबरेवर चाकूने आठ वार केले. आईने आरडाओरडा केल्यानंतर पृथ्वीराज पळून गेला.

वडिलांवरील राग आईवर काढला

वडिलांना मारून संपत्ती आपल्या नावावर करून घेण्याचा विचार पृथ्वीराजचा होता. वडिलांकडून संपत्ती नावावर करून देण्यास टाळाटाळ सुरू असल्याने त्यांच्याविरोधात पृथ्वीराजच्या मनात राग होता. सोमवारी सकाळी वाद झाल्यानंतर वडिलांना संपवण्याच्या हेतूनेच तो चाकू घेऊन आला, मात्र आई समोर दिसल्याने त्याने आधी आईवरच जीवघेणा हल्ला केला, अशी कबुली पृथ्वीराजनेच दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'आर्ची' रिंकू राजगुरूला दहावीत 'फर्स्ट क्लास'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'सैराट' चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू दहावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. तिला ६६.४० टक्के गुण मिळालेत.

'मराठीत सांगितलेलं कळतं ना?, का इंग्लिशमध्ये सांगू?', असा 'डायलॉग' सतत मारणाऱ्या आर्चीला इंग्रजीत किती गुण मिळतात, याचीही अनेकांना उत्सुकता होती. तिथेही ती 'फर्स्ट क्लास'जवळ पोहोचली आहे. तिला इंग्रजीत ५९ गुण मिळाले आहेत.

गेल्या वर्षी नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'नं सिनेसृष्टीला 'याड' लावलं होतं. बॉक्स ऑफिसवर 'झिंगाट' कामगिरी करत हा सिनेमा शंभर कोटींच्या क्लबमध्ये जाणारा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. त्यातील आर्ची आणि परश्याची जोडी तर 'सुपरडुपर हिट' झाली होती. आर्चीनं तरुणाईला घायाळ केलं होतं. ती जिथे जाईल, तिथे चाहत्यांची झुंबड उडत होती. अशा परिस्थितीत तिला रोज शाळेत जाणं शक्यच होत नव्हतं. त्यामुळे दहावीची परीक्षा बाहेरून देण्याचा निर्णय तिनं घेतला होता.

नववीच्या परीक्षेत रिंकूला ८१.६० टक्के गुण मिळाले होते. या घवघवीत यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. स्वाभाविकच, तिच्या दहावीच्या निकालाबद्दलही प्रचंड उत्सुकता होती. त्यावरून सोशल मीडियावर जोकही व्हायरल झाले होते.

अखेर, 'आर्ची'नं दहावीच्या परीक्षेत 'फर्स्ट क्लास' यश मिळवलं आहे. कन्नड सैराटचं शूटिंग सांभाळून रिंकूनं दहावीचा अभ्यास केला होता. त्यामुळे तिचं हे यश नक्कीच उल्लेखनीय, प्रशंसनीय आहे, अशी शाबासकीची थाप तिच्या शाळेतील शिक्षकांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीत कोल्हापूरची हॅट्‍ट्रिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सलग तिसऱ्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्याने विभागात पहिला क्रमांक मिळवून हॅट्‍ट्रिक साधली. परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला. सातारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला. राज्यात सलग पाचव्यावर्षी कोल्हापूर विभागाने दुसरा क्रमांक मिळवला. जिल्ह्याचा निकाल ९४.९१ टक्के लागला. कोल्हापूर विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष एम. के. गोंधळी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली.

गेल्यावर्षी विभागाचा निकाल ९३. ८९ टक्के लागला होता. यंदा ९३. ५९ टक्के लागला. गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.३० टक्क्यांनी निकाल घटला. दरम्यान, संबंधित विद्यार्थी आणि पालकांनी मंडळाची वेबसाइट आणि मोबाइलवरून निकाल घेतला.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून १ लाख ४५ हजार ४२६ ‌विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यांपैकी १ लाख ४५ हजार १३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १ लाख ३५ हजार ८२७ विद्यार्थी उत्तीर्ण ‌झाले. उत्तीर्ण होण्यात यंदाही मुलींची संख्या जास्त आहे. विभागात ८१ हजार ९३० मुलांनी परीक्षा ‌दिली. त्यातील ७५ हजार ४२३ उत्तीर्ण झाले. ६२ हजार २०६ मुलींनी परीक्षा दिली. त्यांपैकी ६० हजार ४०४ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या निकालाची टक्केवारी ९२.०६ तर मुलींची ९५. ५७ टक्के आहे.


६५१ शाळांचा निकाल शंभर टक्के

परीक्षा दिलेले आणि कंसात उत्तीर्ण झालेले विद्या‌र्थी असे ः कोल्हापूर ५७८२३ (५४८७९), सांगली ४२९१० (३९६५३), सातारा ४४४०३ (४१२९५). शिवाय तिन्ही जिल्ह्यातील ६५१ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.


फेरपरीक्षा १८ जुलैपासून

नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ११ जुलैपासून सुरू होईल. यासंबंधी अधिक माहिती शाळांमध्ये मिळेल. गुणपडताळणीसाठी १४ ते २३ जूनअखेर मंडळाकडे अर्ज करण्याची मुदत आहे. दरम्यान, शाळांमध्ये गुणपत्रिका कधी मिळणार याची तारीख मंडळाने जाहीर केली नाही. ती पुढील दोन ते तीन दिवसांत जाहीर केली जाईल, असे गोंधळी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शालेय साहित्याने सजली दुकाने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या पंधरा दिवसात शहरातील सीबीएससी पॅटर्नच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी मराठी आणि इंग्रजी माध्यमातील बहूतांश शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग सुरू आहे. मुलांसाठी शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे. युनिफॉर्म, दप्तर, वह्या पुस्तकांबरोबर टिफिन बॉक्स, वॉटर बॅग्ज खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे.

स्कूल बॅग

मुलांना फरच्या टेडी बॅग, फॅन्सी बॅगचे आकर्षण टिकून आहे. अगदी २५० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंतच्या बॅग बाजारात उपलब्ध असल्यामुळे खरेदीसाठी गर्दी होत आहे. बाजारात कोड मेटिंग, नायलॉन, फर, कमी वजनाच्या आणि टिकाऊ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग लक्ष वेधून घेत आहेत. निंजा, छोटा भीम, मंकी, बार्बी या स्कूलबॅगची मोठ्या प्रमाणात चलती आहे. पावसात न भिजणारी, लवकर न फाटणारी, टिकाऊ आणि प्रत्येक मोसमात वापरता येतील अशा बॅगही विक्रेत्यांनी उपलब्ध केल्या आहेत.

स्कूल ड्रेस

शहरातील इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांचे ड्रेस सध्या बाजारातील ठराविक दुकानांमध्ये, शो-रूम्समध्ये झळकत आहेत. इंग्रजी शाळांकडे वाढता कल लक्षात घेऊन त्यांच्या ड्रेसकोडचे अनुकरण येथील मराठी शाळांनीही केले. अनेक शाळांचे रंगबेरंगी शर्ट, पँटचे सेट तयार आहेत. शहरातील सेंट झेवियर्स हायस्कूल, होलीक्रॉस स्कूल, विद्यापीठ हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, ड्रेएमएलजीसह अन्य शाळांचेही ड्रेसकोड बाजारात आहेत. काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी यादिवशी टी-शर्ट हा ड्रेसकोड केला आहे. ड्रेसकोडमध्ये बेल्ट, स्वेटरचाही समावेश आहे. अनेक शाळांच्या ड्रेसमध्ये निळ्या स्वेटरचा समावेश असतो. स्वेटर आणि शर्टवर शाळेचा लोगोही असतो. मात्र काही शाळांचे ड्रेस ठराविक दुकानांमध्येच उपलब्ध आहेत.

कंपास कीट

मुलांसाठी लागणारे पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, स्केल असे एकत्रित साहित्याचे कीट अनेक दुकानांमध्ये, मॉलमध्ये ‌‌दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी अशा कीटला अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. अर्धा डझन पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, प्लास्टिक पट्टी अशा साहित्याचे बेसिक कीट सर्वत्र उपलब्ध आहे. यातही वेगळेपण आणण्याचा प्रयत्न विक्रेत्यांनी केला आहे. काही कीटमध्ये गडद रंगाच्या पेन्सिल असतात. तर काही कीटमध्ये सर्व साहित्य टेबलवर ठेवण्यासाठी विविध आकारातील स्टँडही सोबत असते. काही कंपन्यांनी अशी कीट बाजारात आणली आहे. या कीटची किंमत ५० पासून साडेतीनशे रूपयापर्यंत आहे.

गेल्या आठवड्यापासून शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी स्टेशनरीच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी होत आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय वस्तूंमध्ये अनेक व्हरायटी आल्या आहेत. आकर्षक कंपास कीट, बॅग मुलांच्या पसंतीला उतरत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ५ ते १० टक्के दरवाढ झाली आहे.

राजेश पटील, स्टेशनरी विक्रेता

बदलत्या काळानुसार खाकी गणवेष मागे पडला आहे. सध्या आधुनिक लूकच्या गणवेषांना शाळांकडून अधिक मागणी आहे. चांगल्या दर्जाच्या कापडासाठी पालकांचा आग्रह असतो. अनेक शाळा तीन ते पाच वर्षांनी ड्रेस बदलतात. त्यामुळे मागणी टिकून आहे.

अशोक रोकडे, व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ लाखांच्या फसवणूकप्रकरणी सुतारला अटक

$
0
0

इचलकरंजी

फुड प्रोसेसिंग प्रोजेक्ट उभारणीचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रदीप बंडू सुतार (रा. महावीर कॉलनी) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सुतार हा पोलिस उपअधिक्षक विनायक नरळे यांच्या मर्जीतील असल्याची तक्रार यापूर्वी तक्रारदार राजू दीपक सवाईराम (रा. आयजीएम रोड) यांनी मुख्यमंत्री आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रादार राजू सवाईराम हे वायरमनचे काम करतात. एका कामातून सवाईराम यांची सुतार याच्याशी ओळख झाली. त्यातून सन २०१३ मध्ये सुतार याने सवाईराम यांना भागीदारीमध्ये फुड प्रोसेसिंग प्रोजेक्ट सुरु करण्याचे सांगून तसेच मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी सवाईराम यांच्याकडून त्याने वेळोवेळी २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर प्रोजेक्ट संदर्भात सुतार याच्याकडे चौकशी करता त्याने प्रोजेक्टसाठी २५ लाख रुपयांचे अनुदान सरकारकडून आले असून कागलमधील एचडीएफसी बँकेच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे सांगितले. मात्र प्रोजेक्ट संदर्भात कोणताही समाधानकारक खुलासा सुतार याच्याकडून केला जात नसल्याने आपली फसगत झाल्याचे सवाईराम यांच्या लक्षात आले. त्यामुळे सवाईराम यांनी सुतार याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. वारंवारच्या तगाद्यानंतर सुतार याने सवाईराम यांना दोन धनादेश दिले. त्यापैकी एक धनादेश वटला. तर दुसरा धनादेश परत आला. त्यानंतर सुतार हा तगादा चुकविण्यासाठी बेपत्ता झाला होता. तक्रारदारानेच त्याला शोधून आणून शिवाजीनगर पोलिसात हजर केले. पण पोलिसांनी फसवणूक प्रकरणी चौकशीनंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल अशी भूमिका घेतली. त्यानुसार सोमवारी सुतार याला ताब्यात घेऊन दिवसभर कसून चौकशी केली. तक्रारदार व सुतार यांच्यातील चौकशीमध्ये फसवणूक झालेल्या रकमेचा घोळ मात्र कायम राहिला. सुतार याने काही रक्कम घेतल्याचे कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदगावमधील शाळेच्या दोन खोल्या कोसळल्या

$
0
0

जयसिंगपूर

उदगाव (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या देसाई विद्यामंदिर या मराठी शाळेच्या इमारतीच्या दोन वर्गखोल्या सोमवारी रात्री कोसळल्या. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, येत्या १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना कोठे बसवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, उदगाव येथे माळभागात देसाई विद्यामंदिराची मराठी शाळा आहे. १९३२ साली या शाळेची १० खोल्यांची इमारत बांधण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडून या इमारतीची डागडुजी केली जाते. १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने शाळेस रंगरंगोटी करण्यात आली आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शाळेच्या इमारतीतील खोली क्र. ८ व ९ मधील भिंत तसेच छत कोसळले. यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी या घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी एस. के. जाधव, गटशिक्षण अधिकारी ए. बी. वांदरे, शिरोळ पंचायत समितीचे सभापती मल्लाप्पा चौगुले, उपसभापती कविता चौगुले, सरपंच स्वाती पाटील, ग्रामविकास अधिकारी भाग्यश्री केदारी, पंचायत समिती सदस्य मीनाज जमादार, मन्सूर मुलाणी, सुरेश कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा जयश्री पाटोळे, उपसरपंच शिवाजी कोळी, मुख्याध्यापक विजयकुमार कोळी यांनी भेट देऊन पाहणी केली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

१५ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर ही घटना घडली असती, तर मोठी जीवितहानी झाली असती. तब्बल ८५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या शाळेच्या दगडी भिंतींना तडे गेले आहेत. इमारत धोकादायक बनल्याने १५ जूनपासून या ठिकाणी शाळेचे वर्ग न भरविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे आता शाळेसाठी नवी इमारत शोधण्याची वेळ शाळा व्यवस्थापन समितीसमोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंटरनेटच्या मदतीने आयआयटी प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘मुलगा इंटरनेटच्या आहारी गेलाय, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर दिवस वाया घालवतंय...’ पालकांकडून सध्या अशा तक्रारी वाढत आहेत. पण, अगणित माहितीचा खजिना असलेल्या इंटरनेटचा चांगला वापर करून काय करता येऊ शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण कोल्हापूरच्या एका तरुणाने दिले आहे. अमेय जोशी असे या तरुणाचे नाव असून, जेईई अडव्हान्स परीक्षा पास होऊ आयआयटीमध्ये प्रवेशासाठी तो पात्र ठरला आहे. आयआयटीतील प्रवेशासाठी राजस्थानच्या कोटा आणि पुण्यातील कोचिंग इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन दोन-दोन वर्षे राहणाऱ्या मुलांसाठी आणि पालकांसाठी अमेयचे हे यश डोळ्यात अंजन घालणारे आहे.

अमेयने दहावीपर्यंत स. म. लोहिया हायस्कूलमध्ये सेमी इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण घेतले. अकरावीला विवेकानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या अमेयचे धेय्य निश्चित नव्हते. मॉडर्न फिजिक्समध्ये जगभरात सुरू असलेल्या वेगवेगळ्या संशोधनाच्या बातम्या त्याच्या कानावर पडत होत्या. त्यातूनच फिजिक्समध्ये काहीतरी संशोधन करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यासाठी त्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅन्ड रिसर्च (आयसर) या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी त्याने धडपड सुरू केली.

आयसरसाठी त्याने केव्हीपीवाय परीक्षा दिली. बेळगावमध्ये परीक्षेचे केव्हीपीवाय परीक्षेचे सेंटर होते. नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या परीक्षेत उत्तरे येत असूनही अपेक्षित स्कोअर झाला नाही. निराश झालेल्या अमेयने जेईई अडव्हान्सच्या माध्यमातून आयसरला प्रवेश मिळविण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी कॉलेजमधील प्राध्यापक आणि सीईटीचा क्लास लावलेल्या शिक्षकांची मदत घेणे सुरू केले. इंटरनेटवरून बरीच पुस्तके खरेदी केली, तर यू-ट्यूबवर लेक्चर्स पाहू लागला. याचा फायदा अभ्यास करतानाच दिसत होता, असे अमेय सांगतो. इंटरनेटवर माहिती मिळत असली, तरी शिक्षकांची मदतही मोठी असल्याचे अमेय सांगतो. विवेकानंद कॉलेजमधील संजय पाटणकर, नागनूर, थोरात या सरांनी, तर सीईटीच्या क्लासमधील किल्लेदार आणि जमदाडे सरांनी वेळोवेळी अनेक शंका दूर केल्यामुळे यश मिळाल्याचे अमेय सांगतो.

अशी केली तयारी

कोणत्याही प्रकारच्या टेस्ट दिल्या नसल्याने केव्हीपीवाय परीक्षेत अपयश आल्याचे अमेयने सांगितले. तो म्हणाला, ‘जेईई मेन्ससाठी ऑनलाइन ऑप्शन निवडला. केव्हीपीवायतील अपयशाचा अनुभव आल्याने त्यापूर्वी ऑनलाइन टेस्ट सिरीज दिल्या. जेवढा अभ्यास केला, त्याच्या ऑनलाइन टेस्ट दिल्या. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. अभ्यासाबरोबरच या टेस्ट सिरीजही निर्णायक ठरल्या. अॅडव्हान्सचा पॅटर्न वेगळा आहे. पण, त्याची तयारी जास्त केल्याने मेन्सपेक्षा ती परीक्षा मला जास्त सोपी गेली. शाळेपासून सेमी इंग्लिश मीडियम असल्याचाही फायदा झाला.’

कोचिंग नसल्याची खंत

इंटरनेटचा पुरेपूर वापर करून घेतलेल्या अमेयला शास्त्रज्ञांची आवड आहे. नॅशनल जिओग्राफी चॅनेलवर अल्बर्ट आइनस्टाइन यांच्याबाबतचा प्रोग्रॅम अमेय कधीही चुकवत नाही. केव्हीपीवायसारख्या परीक्षेसाठी कोल्हापुरात कोचिंग नसल्याची खंत अमेय व्यक्त करतो. विवेकानंद कॉलेजच्या लायब्ररीत तासन् तास बसून अमेयनं अभ्यास केला. जेईई मेन्सला बसलेल्या १२ लाख विद्यार्थ्यांमधून, अॅडव्हान्ससाठीच्या दोन लाख विद्यार्थ्यांमध्ये त्याची निवड झाली होती. त्यातून आयआयटी प्रवेश मिळणाऱ्या दहा हजार मुलांमध्ये त्याचा पाच हजार ५६वा क्रमांक आहे. इतक्या मोठ्या टॅलेंट स्पर्धेतून यशस्वी होणारा अमेय तितकाच नम्र आहे.


आयसर आणि आयआयटी या दोन्ही संस्थांमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरलो. संस्था महत्त्वाची नाही, दोन्ही संस्थांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच निर्णय घेईन. आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश घेतला, तर एमएस एन फिजिक्स हा त्यांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. पुढे रिअल सायन्समध्ये पार्टिकल्स (कण) आणि रिलेटिव्हिटी थिअरी (सापेक्षता सिद्धांत) या विषयांत संशोधन करण्याची इच्छा आहे.

- अमेय जोशी, यशस्वी विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोव्यात आजपासून हिंदू अधिवेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोवा येथे आज (बुधवार)पासून सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होणार आहे. १७ जूनपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाला भारतातील २१ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथील १५० हून अधिक हिंदू संघटनांचे चारशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील. यात कोल्हापूर जिल्ह्यातून दोन प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी सामायिक कृती आराखड्यांतर्गत वर्षभरातील उपक्रम आणि आंदोलनांची दिशा निश्चित करणार आहेत. हिंदू जनजागृती समितीचे किरण दुसे आणि सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

किरण दुसे म्हणाले की, हिंदुत्वनिष्ठ पक्ष सत्तेत असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, कलम ३७० रद्द करणे, गोवंश हत्या बंदी, राममंदिराचे पुनर्निर्माण आदी विषयांवर सरकारने ठोस भूमिका घेतलेली नाही. गेल्या ५ राष्ट्रीय अधिवेशनांत निश्चित झाल्यानुसार कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरातील काशी कुंडाची स्वच्छता करून ते भाविकांसाठी खुले करावे, पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन देवस्थान समितीने सामाजिक कार्यासाठी २ कोटी रुपयांचा मंजूर केलेला निधी रद्द करावा, शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी विद्यापीठ नामकरण करण्यात यावे आदी विषयांवर आंदोलने करण्यात आली. या अधिवेशनात उद्योजक आनंद पाटील आणि सुधाकर सुतार हेही सहभागी होणार आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images