Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

२४७५ लोकांनी एका दिवसात बांधले २१० बंधारे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून माण तालुक्यातील जनता एकवटली आहे. बिदाल गावात रविवारी २४७५ लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून एका दिवसात २१० दगडी बंधारे बांधले. या श्रमदानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली असून, त्यांनी या श्रमदानाची माहितीही मागविली आहे.
बिदाल गावाने वॉटर कप जिंकण्याबरोबरच पाणीदार गाव करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. ग्रामस्थांनी एका दिवसांत २१० दगडी बंधारे श्रमदानातून बांधून नवा विक्रम केला आहे.

असे केले नियोजन

प्रत्येक बंधाऱ्यासाठी दहा लोक आणि एक दगड जुळणारा एक अनुभवी कारागीर, असे नियोजन केले होते. ठरलेल्या वेळेला ग्रामस्थांबरोबरच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, फलटण येथील आयडीएलच्या संस्थापिका वैशाली शिंदे यांच्या ४५ जणांच्या ग्रुपसह माण मेडिकल डॉक्टर, वाघजाई गणेश मंडळ, वडगाव, खांडेवस्ती येथील ग्रामस्थांनीही उपस्थिती लावली होती. ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने श्रमदान करून २१० दगडी बंधारे बांधले. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास
मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

३२ गावांचा पाणीदार होण्याचा संकल्प

वॉटर कप स्पर्धेअंतर्गत माण तालुक्यातील ३२ गावांमध्ये कामे सुरू असून, या गावांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. बिदाल ग्रामस्थांनी एकी दाखवत पावसाचे पडणारे पाणी मुरवण्यासाठी बंधारे बांधण्यासाठी नियोजन केले आहे. ग्रामस्थ दररोज सकाळी सहा वाजल्यापासून श्रमदानासाठी कामाच्या ठिकाणी पायी तसेच वाहनांनी येतात. त्यांच्या पिण्याचे पाणी व सरबताचीही सोय ग्रामस्थांतर्फे केली जाते. गावाला जैन फाउंडेशनने एक, सरकारचे दोन, शेखर गोरेंचे एक जेसीबी मशिन मोफत तर अंकुश गोरे यांनी डिझेलवर एक मशीन पोकलेन दिली. तसेच ग्रामस्थांनी दोन पोकलेन, सहा जेसीबी भाड्याने घेतल्या आहेत. त्यातूनच रविवारच्या श्रमदानातून एका दिवसात २१० दगडी बंधारे बांधण्यात यश आले आहे.

बिदाल ग्रामस्थांच्या एकीमुळे दोन तासांमध्ये केलेले श्रमदान एक कोटी रकमेपेक्षा जास्त मोलाचे आहे. रविवारच्या श्रमदानामुळे अडीच कोटी लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा होऊ शकतो. ही एकजूटच बिदाल ग्रामस्थांना वॉटर कप स्पर्धा जिंकून देईल.
- भगवानराव जगदाळे, जिल्हा नियोजन अधिकारी, सातारा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...आणि पुरंदरे विठ्ठल दर्शनाविनाच परतले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, पंढरपूर

इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे याना मंदिर सुरक्षेसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे दर्शनाविनाच परतावे लागले. बाबासाहेब पुरंदरे विठुरायाच्या दर्शनासाठी आज दुपारी पंढरपूरला आले. मात्र मंदिर सुरक्षेला असलेल्या पोलिसांकडून त्यांना मंदिरात न सोडण्यात आल्याने महाराष्ट्र भूषण पुरंदरेंना दर्शनाशिवाय परत फिरावे लागले.

बाबासाहेब पुरंदरे येणार असल्याची माहिती मिळताच मंदिराचा एक कर्मचारी त्यांच्यासोबत त्यांना घ्यायला बाहेर आला. मात्र वयोमानानुसार बाबासाहेबांना सारखीच धाप लागू लागल्याने त्यांनी जवळ असलेल्या पश्चिम दरवाजाने मंदिरात जायची इच्छा व्यक्त केली. मंदिराचे कर्मचारी आणि बाबासाहेब यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या स्वीय सहाय्यकाने त्यापद्धतीने तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती केली. मात्र या दरवाजातून कोणालाही सोडता येणार नसल्याचे फर्मान येथील पोलिसांनी काढले. बाबासाहेब पुरंदरेंना रुक्मिणी दरवाजापर्यंत चालत जाणे अशक्य बनल्याने त्यांनी अखेर कोणताही बडेजाव न दाखवता दर्शनाविनाच परत जाणं पसंत केलं.

विठ्ठल मंदिराचा गलथान कारभार मात्र यामुळे पुन्हा एकदा समोर आला. कोणत्याही वृद्ध व्यक्तीला दर्शनाची सुलभ व्यवस्था करण्याची जबाबदारी मंदिराची आहे. पण सुरक्षेसाठी असलेले पोलीस महाराष्ट्र भूषण म्हणून गौरवलेले व्यक्तीला अशी वागणूक देतात तर सामन्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. याबाबत बाबासाहेबांनी मात्र कोणाच्याही विरोधात तक्रार केलेली नाही. विठ्ठल मंदिराला समितीच नसल्याने येथील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणाचेच बंधन उरलेले नाही. पण मुंबई उच्च न्यायालयाने ३० जूनपूर्वी मंदिर समिती अस्तित्वात आणण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. निदान आता तरी फडणवीस सरकारचे डोळे उघडतील एवढीच विठ्ठल भक्तांची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूर यात्रा पालखीतळासाठी ३० वर्षांचे नियोजन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

‘आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या शेकडो पालखी सोहळ्याच्या सुविधांसाठी पालखी तळ आणि रिंगण ठिकाण विकसित करण्यासाठी पुढील ३० वर्षांचे नियोजन करण्यात येत आहे. गरजेनुसार जागेचे अधिग्रहण करण्यास सुरुवात झाली आहे,’ अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.
जिल्हाधिकारी भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पालखीतळ आणि रिंगणस्थळांची पाहणी केली. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या प्रमुख पालखी सोहळ्यासह इतर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्याचे पालखी तळ अपुरे पडत असल्याच्या तक्रारी सोहळा प्रमुखांनी सरकारकडे केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
सध्या सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळे आल्यावर नातेपुते, पिराची कुरोली, भंडीशेगाव आणि वाखरी येथील पालखी तळाच्या मोठ्या समस्या असल्याच्या तक्रारी पालखी सोहळा प्रमुखांनी केल्या होत्या. त्यानुसार मानकऱ्यांच्या सूचनेनुसार पर्यायी जागा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. नातेपुते येथील सध्याची जागा देण्यास खासगी जागामालकांची अडचण असल्याने वारकरी सांप्रदायाने त्या ठिकाणची एका सहकारी कुकुटपालन संस्थेची जागा पसंत केली आहे. ही जागा जिल्हा बँकेत गहाण असून, त्याचा लवकरच लिलाव होणार आहे. बँकेच्या लिलावात उतरून प्रशासन ही जागा घेणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.
तसेच, खुडूस फाटा येथील रिंगणाच्या जागा शेतकरी स्वखुशीने देत असून, आता होणाऱ्या रस्ता रुंदीकरणात मात्र यातील बरीचशी जागा जाणार आहे. ती वाचवण्यासाठी रोडची रचना याठिकाणी बदलण्यात येणार आहे. ठाकूर बुवा रिंगण ठिकाणी दोन शेतकऱ्यांच्या जागा असून, यात थोडी अडचण येत असल्याने त्यांना त्याच गावात शिल्लक असलेली शेती महामंडळाची जमीन दिल्यास याचा वापर रिंगणासाठी करता येईल, अशी मानकऱ्यांची मागणी आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पिराची कुरोली येथे जागेची मोठी समस्या असल्याने येथेही गरजेनुसार अधिग्रहण करून वारकऱ्यांची कायमस्वरुपी सोय करण्यात येणार आहे. भंडी शेगाव आणि वाखरी येथे सर्वच पालख्या एकत्र येण्यास सुरुवात होत असल्याने येथे जागा अपुरी पडत असून, त्या ठिकाणी सोयीच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. यासाठी जमीन अधिग्रहण नवीन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी निधीची कोणतीही कमतरता नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, सध्या पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास प्रकल्प म्हणून घोषित करून मंत्रालयात सर्वच पालखी सोहळ्यासाठी वेगळा कक्ष स्थापन करण्याची वारकरी संप्रदायाची मागणी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने पालखी तळ विकासासाठी मोठा निधी दिलेला असला, तरी सध्या या विकासापेक्षा जागा अधिग्रहण महत्त्वाचे आहे. हे पैसे त्या जागेसाठी वापरल्यास पालखी सोहळ्यासोबत पायी चालत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना हक्काचे विश्रांती ठिकाण मिळेल, अशी मागणी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे मानकरी राजाभाऊ चोपदार यांनी केली.
तर, वारकऱ्यांच्या सुविधांसाठी निधीची अजिबात कमतरता नसून जिथे जागा अधिग्रहण शक्य आहे तिथे ती करून आणि जिथे अशक्य आहे तिथे कायदेशीर करार करून जागा ताब्यात घेतली जाणार आहे. आषाढीसाठी येणाऱ्या पालखी सोहळ्यांना कोणतीही असुविधा भासणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धेश्वर साखर कारखान्यातील वीजनिर्मिती केंद्राला आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापुरातील कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यातील वीजनिर्मिती प्रकल्पातील एका भागाला वेल्डिंगचे काम सुरू असताना लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.
कारखान्यात वीजनिर्मिती प्रकल्प असून, त्यातीलच काही भागात वेल्डिंगचे काम सुरू होते. या दरम्यान बगॅस वाहून नेणाऱ्या पट्टीवर त्याची ठिणगी पडली आणि बगॅस वाळलेले गवत आणि कामासाठी लागणारे किमती वायरींचे दहा ते बारा ड्रम वायर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. बघता बघता दागिने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात मोठी कसरत करावी लागली. मोठी आग असल्याने लांबपर्यंत त्याच्या ज्वाळा दिसून येत होत्या. दरम्यान बाजूलाच बगॅसचा मोठा साठा होता. त्याकडे चाललेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या कसरतीने पाणी मारून आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. ज्या टॉवरचे काम सुरू होते, त्याठिकाणी असणाऱ्या कामगारांना तत्काळ बाहेर काढण्यात आल्याने सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. आगीमध्ये वायरचे ड्रम तसेच काही यंत्रांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास पंधरा ते वीस कर्मचाऱ्यांनी दीड तासांत आग आटोक्यात आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वर@ अशांवर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

यंदाच्या उन्हाळ्यात महाबळेश्वर मुंबईपेक्षा जास्त उष्ण आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत महाबळेश्वरमधील तापमान आयएमडीने मुंबईत नोंदवलेल्या तापमानापेक्षा जास्त आहे. मुंबईतील कुलाबा आणि सांताक्रुझ वेधशाळेने तापमानाची नोंद केली आहे. मुंबईच्या किनारी भागापेक्षा महाबळेश्वरमधील पारा हा सामान्यतः कमी असतो.

महाबळेश्वरमध्ये बुधवारी, बारा एप्रिल रोजी ३५.२ अंश सेल्सिअस तापमान होते, तर मुंबईत ३४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी, महाबळेश्वरमध्ये तेरा एप्रिल रोजी ३५.९ अंश सेल्सिअस तापमान होते, तर मुंबईचा पारा ३४.८ अंश सेल्सिअसवर होता. गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये प्रत्यावर्त (अँटीसायक्लोन) मध्ये असलेल्या ईशान्येकडील उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे महाबळेश्वरमधील तापमान वाढल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पूर्वेकडील वारे ईशान्ये वाऱ्यात मिसळले आहेत. येत्या आठवड्यात हे वारे पुढे सरकल्यानंतर पुन्हा तापमान खालावेल, अशी माहिती आयएमडीने दिली आहे.

सौराष्ट्र आणि कच्छमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत तापमान ३५ अंशाच्या आसपास आहे. येत्या काही दिवसांत पारा दोन अंशांनी वाढण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटकाला पाणी देण्यास आमदारांचा विरोध

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्यास कृष्णा व कोयना नदी काठांच्या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई उद्भवणार आहे. त्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेत सातारा जिल्ह्यातील आमदारांनी पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.

या बाबत सातारा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आमदारांनी आपली पाणी सोडण्याविरोधी भूमिका मांडली.

दरम्यान, आमदारांचा वाढता विरोध लक्षात घेत विजय शिवतारे यांनी कोयना धरणातून पाणी सोडल्यास महाबळेश्वर, पाटण, व जावली तालुक्यातील किती गावांमध्ये टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचा अभ्यास करून २४ एप्रिलच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणीटंचाई आढाव बैठकीत जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, आनंदराव पाटील, मोहनराव कदम यांच्यासह जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी कर्नाटकाला कोयना धरणातून देण्यात येत असलेल्या २.६५ टीएमसी पाणी देण्याच्या सरकारच्या भूमिकेला विरोध केला आहे.

जॅकवेल उघडे पडणार?

मकरंद पाटील यांनी धरणालगत असलेल्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचे जॅकवेल उघडे पडणार आहेत. त्यामुळे तेथील गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यासाठी धरणातून कर्नाटकाला पाणी सोडण्यात येवू नये, अशी मागणी केली. पाटील यांच्या भूमिकेला शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील व शंभूराज देसाई यांच्यासह सर्वच आमदारांनी पाठींबा दिला.
सिंचन, वीजनिर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा

कोयनेचे अभियंता ज्ञानेश्वर बागडेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, कराड

‘कोयना धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा असून, कर्नाटकला दोन टीएमसी पाणी देऊनही जूनपर्यंत सिंचनासह वीजनिर्मितीला पाणी पुरून शिल्लक राहील इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे,’ अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

कर्नाटकसाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्याबाबत राज्य सरकारचा आदेश आल्यानंतर बुधवारी रात्रीपासून कोयना धरणाच्या रिव्हर स्लुईस गेटमधून ९०७ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

बागडे म्हणाले, ‘राज्यात भीषण पाणीटंचाई असताना कर्नाटकाला पाणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका होत आहे. मात्र, गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे १०५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. आज रोजी धरणात ३९ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. वीज निर्मितीला लागणारे पाणी तसेच सिंचन व पिण्याच्या पाण्याची गरज भागून यंदा पावसाळ्यापर्यंत काही पाणी धरणात शिल्लक राहणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा याच दिवशी १३ एप्रिल रोजी धरणात ४ टीएमसी जादा पाणी आहे. धरणातील एकूण पाण्यापैकी वर्षभरात सरासरी ६ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असते. या सर्व बाबींचा विचार करूनच हा निणय घेतला आहे, त्यामुळे येथील जनतेने या बाबत साशंकता बाळगू नये.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीषण अपघातात मिनी बसचा चुराडा; ६ ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

मिरज-पंढरपूर रस्त्यार शुक्रवारी पहाटे मिनी बसला झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं.

अपघातग्रस्त मिनी बसमधील प्रवासी कोल्हापूर जिल्ह्यातील माले गावचे असल्याचं समजतं. हे सगळेजण पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना आवळगाव फाटा इथं त्यांची मिनी बस रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर मागच्या बाजूने येऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, मिनी बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. त्यात सहा लोक जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन लहान मुलं, एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर चालक संदीप यादव फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मृतांची नावे:

नंदकुमार जयंत हेगडे (वय ३७)
रेणुका नंदकुमार हेगडे (३५)
आदित्य नंदकुमार हेगडे (१२)
लखन राजू संकाजी (३६)
विनायक मार्तंड लोंढे (४०)
गौरव राजू नरदे (७)

गंभीर जखमी

रेखा राजाराम देवकुळे (४०)
स्नेहल कृष्णात हेगडे (२०)
काजल कृष्णात हेगडे (१९)

जखमी

सावित्री बळवंत आवळे (५५)
शीतल सुनील हेगडे (४२)
सोनल कांबळे (३६)
कोमल हेगडे (२०)
कल्पना बाबर (४०)
अनमोल हेगडे (१२)
गौरी हेगडे (७)
शुभम कांबळे (१०)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंक्यतारा किल्ल्यावरून तरुणीची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीनं साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायली पवार असं या तरुणीचं नाव आहे.

रविवारी दुपारपासून सायली घरात नसल्याचं लक्षात येताच तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली होती. आसपासच्या परिसरात चौकशी केली असता, ती अजिंक्यतारा किल्ल्याच्या दिशेनं गेल्याचं काही जणांनी तिच्या वडिलांना सांगितलं होतं. त्यांनीही लगेचच त्या दिशेला धाव घेतली. पण सायली कुठेच सापडली नव्हती. अखेर, पोलिसांनी साताऱ्यातील सह्याद्री ट्रेकर्स ग्रूपच्या मदतीनं दरीत तिचा शोध घेतला. तेव्हा त्यांना तिचा मृतदेह सापडला. जीवन संपवण्याचं टोकाचं पाऊल सायलीनं का उचललं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धडपडणारी मुलं करणार दुष्काळाशी सामना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा

सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे गावं उजाड आणि टंचाईने ग्रस्त होत आहे. म्हणून या २० आणि २१ मे रोजी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर जवळच्या 'पवार वाडी'या गावात सानेगुरुजींची राष्ट्र सेवा दलातील धडपडणारी मुलं आणि कार्यकर्ते श्रमछावणी भरवून श्रमदान करणार आहेत.

सेवा दलाच्या श्रमसंस्कार चळवळीला अभिनेता आमिर खान यांनी पाणी फाउंडेशन मार्फत "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा"सुरू करून एक प्रकारे साद दिली आहे. त्याच पद्धतीने सेवा दलाचे कार्यकर्ते दोन दिवस पवार वाडीत जलसंधारण आणि दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु असलेल्या गावकऱ्यांच्या या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊन श्रमदान करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या २५ दुचाकी जळून खाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

पुणे - बेंगळुरू हायवेवर भरतगाववाडी (ता. सातारा) गावच्या हद्दीत दुचाकी घेऊन निघालेल्या कंटेनरला भरधाव वेगाने आलेल्या कारने पाठीमागून धडक दिल्यानंतर कंटेनरखाली अडकलेल्या कारने पेट घेतल्याने हायवेवर एकच थरार निर्माण झाला. भरतगाववाडीतील युवकांच्या प्रसंगावधानामुळे पेटत्या कारमध्ये अडकलेला पेटता कंटेनर बाजूला काढण्यात आला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कार, कंटेनर व त्यामधील २५ ते ३० नव्या दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास झालेल्या या ‘बर्निंग थरार’मुळे कराडकडील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून रात्री फोर्ड आयकॉर्न ही कार (एम. एच. ०२ – ए. जी. ९५९८) कोल्हापूरकडे निघाली होती. कारमध्ये चालकासह एक दाम्पत्य व लहान मुलगा असल्याचे समजते. गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असणारी कार हायवेवरील भरतगाववाडी येथे आली असता, ती पुढे असलेल्या नव्या दुचाकी घेऊन निघालेल्या कंटेनरला धडकली व कंटेनरमध्ये अडकली. याच स्थितीत दोन्ही वाहने ३०० ते ४०० फूट पुढे हेरंब मंगल कार्यालयासमोर जाऊन थांबली. अपघातानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले, तर इतर ग्रामस्थांनी कारमधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठवले. याच दरम्यान कारमध्ये शॉर्ट – सक्रिट होऊन कारने पेट घेतला. ग्रामस्थांनी तत्काळ याबाबत पोलिस व अग्निशमन यंत्रणेला माहिती दिली. एकीकडे जळत असलेली कार, दुसरीकडे दुचाक्यांसह कंटेनरने घेतलेला पेट तर या सर्व घटनांमुळे ट्रॅफिक जाम झाल्याने अग्निशमन दलाची गाडी वाहतूक कोंडीत अडकली. अखेर प्रथम अजिंक्यतारा कारखान्याची व नंतर सातारा नगरपालिकेची अग्निशमन गाडी आल्यावर आग आटोक्यात आणण्यात आली. तोपर्यंत कार संपूर्णपणे जळून खाक झाली होती तर कंटेनरमधील २५ – ३० नव्या दुचाकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, कारमधील प्रवाशांना सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. उशिरापर्यंत या अपघाताची नोंद झाली नसल्याने जखमींची नावे समजू शकली नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएसआयचे स्वप्न राहिले अधुरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहायक फौजदार अर्जुन यशवंत खोत (वय ५४, रा. मूळ गाव सावरवाडी, ता. करवीर, सध्या रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांचा गुरुवारी (ता. ११) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी मृत्यू झाला. खोत हे पोलिस मुख्यालयात जिल्हा विशेष शाखेत कार्यरत होते. खातेअंतर्गत दिलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत ते उतीर्ण झाले होते. पोलिस खात्यात ३० वर्षे पोलिस कॉन्स्टेबल ते सहायक फौजदार पदांवर काम केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक पदावर काम करण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरण्याआधीच काळाने घाला घातला.

खोत मुळचे करवीर तालुक्यातील सावरवाडी गावचे. २८ वर्षांपूर्वी ते कोल्हापूर पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. प्रचंड जनसंपर्क, पोलिस खात्यात असूनह कमालीची मवाळता आणि तपासातील हातोटीमुळे ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत भरत होते. गेल्या ३० वर्षांत त्यांनी शहरातील शाहुपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात काम केले. सध्या ते पोलिस अधीक्षक कार्यालयातील पासपोर्ट विभागात सेवा बजावत होते. पासपोर्ट शाखेत बदली झाल्यानंतर त्यांनी खातेअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक बनण्याचे ठरवले. मिळेल त्या वेळेत अभ्यास करून या परीक्षेत यश मिळवले. लवकरच ते पोलिस उपनिरीक्षक पदावर रुजू होणार होते, मात्र गुरुवारी सकाळी त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने हे स्वप्न अखेर अधुरेच राहिले.

गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडले. घरी आल्यानंतर आवराआवर सुरू असतानाच अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली. काही क्षणात ते खाली कोसळले. पत्नी आणि मुलांना हे लक्षात येताच त्यांनी अर्जुनचे भाऊ गणपती खोत यांना बोलवले. तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना सीपीआरमध्ये हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सीपीआर परिसरात पोलिसांची गर्दी झाली. पोलिस उपअधीक्षक सतीश माने, भारतकुमार राणे, पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड आदी पोलिस अधिकारी सीपीआरमध्ये दाखल झाले. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनीही सीपीआरमध्ये येऊन खोत यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. खोत यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी सावरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटेनेने पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात होती.

स्वप्न विरले

पोलिस खात्यातील सतत हसतमुख आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व म्हणून अर्जुन खोत यांची ओळख होती. खातेअंतर्गत परीक्षेतून त्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती. लवकरच या पदावर नियुक्ती होणार असल्याने त्यांनी ड्रेसही शिवायला दिला होता. नोकरीच्या अखेरच्या टप्प्यात पोलिस उपनिरीक्षक पदाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने ते आनंदात होते, मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे स्वप्न विरल्याची चर्चा पोलिस वर्तुळात सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाचरवाडी खुनातील आरोपीस जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पत्नीला शिवीगाळ व मारहाण केल्याचा जाब विचारण्यास गेलेले सूर्यदीप (दादासो) राजाराम पाटील (रा. भाचरवाडी, ता. पन्हाळा) याचा बंदुकीतून गोळी झाडून खून केल्याप्रकरणी पोपट श्रीपती गायकवाड (वय ३९, रा. भाचरवाडी, ता. पन्हाळा) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार दंड ठोठावला. गुरुवारी (ता. ११) झालेल्या सुनावणीत या खटल्याचा निकाल लागला.

फिर्यादी रामचंद्र ज्ञानू पाटील (रा. भाचरवाडी) यांची मुलगी अश्विनी हिचे लग्न त्याच गावातील सूर्यदीप पाटील याच्याशी ३० जुलै, २०१३ रोजी झाले होते. १२ जून, २०१४ रोजी पतीसह माहेरी आली होती. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास सूर्यदीप आणि अश्विनी हे दोघे परत घरी निघाले असता, वाटेत पोपट गायकवाड याने सूर्यदीप व अश्विनी यांना अडवून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर शिवीगाळीचा जाब विचारण्यासाठी सूर्यदीप, त्याचा मेहुणा आणि सासू हे तिघे पोपट गायकवाड याच्या घरी गेले. शाब्दिक वादानंतर पोपट गायकवाडने बारा बोअर बंदुकीतून गोळी झाडून सूर्यदीपला गंभीर जखमी केले. उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सूर्यदीप याला मृत घोषित केले. याबाबतची फिर्याद रामचंद्र पाटील यांनी पन्हाळा पोलिसात दिली होती. पन्हाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक यशवंत गवारे यांनी करून आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्यासमोर झाली. विशेष सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी १८ साक्षीदार तपासले. त्यापैकी फिर्यादी रामचंद्र जाधव यांची मुलगी अश्विनी, मुलगा अमोल, सहायक फौजदार हमीद शेख, साक्षीदार महादेव खोत, यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकील अशोक रणदिवे यांचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपी पोपट गायकवाड याला जन्मठेपेसह १० हजार रुपये दंड व भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत दोन वर्ष सक्तमजुरी याशिवाय दोन हजार रुपये दंडाचीही शिक्षा सुनावली. सरकर पक्षातर्फे अॅड. अशोक रणदिवे, अमित महाडिक, क्रांती पाटील यांनी काम पाहिले.

मित्राच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप

अर्जुनी (ता. कागल) येथील तरुणाच्या खूनप्रकरणी त्याचा मित्र तमन्ना मारुती घरबुडे (वय २६ रा. जैनापूर, ता. चिक्कोडी, ‌जि. बेळगाव) या तरुणास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बालाजी क्रशर येथील कामगार सिद्राम लक्ष्मण सोलापूरे याचा १६ ऑक्टोबर २०१५ रोजी आर्थिक वादातून खून झाला होता. याप्रकरणाची सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

अर्जुनी येथे अविनाश पोवार यांच्या मालकीच्या बालाजी क्रशरवर आरोपी तमन्ना घरबुडे, मयत सिद्राम सोलापूरे आणि त्यांचा मित्र गोपाळ दुंडाप्पा यादुगडे हे एकत्र काम करीत होते. सिद्राम हा १६ ऑक्टोबरला आपली साप्ताह‌िक सुटी संपवून पुन्हा कमावर आला. सिद्रामकडून तमन्ना याने १५ हजार रुपये उसने घेतले होते. सिद्रामने हे पैसे परत मागितल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादात तमन्ना याने सिद्रामच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याने सिद्राम जागीच ठार झाला होता. तमन्नाने सिद्रामचा मृतदेह पालापाचोळ्यात लपवून घडलेला प्रकार मित्र गोपाळ यादुगडे याला सांगितला. यादुगडे याने दुसऱ्या दिवशी घटनेची माहिती दिवाणजी श्रीकांत खोत आणि अनिल बुडके याना सांगितली. त्यानंतर दिवाणजी आणि बुडके यांनी मुरगूड पोलिसात फिर्याद दाखल केली.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये आरोपीने ज्याच्याजवळ खुनाची कबुली दिली होती, तो गोपाळ यादुगडे याचा जबाब महत्त्वाचा ठरला. गुन्ह्यातील जप्त केलेले शस्त्र, पंच, साक्षीदार बसवराज हिरेमठ, बालाजी क्रशरचे मालक डॉ. स्वप्निल माळवदे, यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील ॲड. मंजुषा पाटील यांचा युक्त‌िवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी तमन्ना घरबुडे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय अधिकारी अमरसिंह जाधव यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डिजिटल’ने अडवली पेन्शन

$
0
0

Maruti.Patil
@timesgroup.com

Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) १९९५ नुसार सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना आधार क्रमांक सक्तीचे केल्यानंतर हयातीच्या दाखल्याऐवजी डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली. प्रमाणपत्रासाठी भविष्य निर्वाह कार्यालय, महा-ई सेवा केंद्र किंवा बँकांमध्ये ३० एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती. मात्र, जिल्ह्यातील ८४ हजार ४०४ पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्रासाठी नोंदणी न केल्याने त्यांना पेन्शनपासून वंचित राहावे लागणार आहे. जिल्ह्यातील एकूण एक लाख ३१ हजार पेन्शनधारकांपैकी केवळ ५७ हजार पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्राची नोंदणी केली आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी प्रत्येकवर्षी नोव्हेंबरमध्ये हयातीचा दाखला सादर करावा लागत होता. २०१५ मध्ये हयातीच्या दाखल्याबरोबरच आधार क्रमांक देणे सक्तीचा केला होता. दरवर्षी हयातीचा दाखल सादर करावा लागत असल्याने पेन्शनधारकांमध्ये काहीसी नाराजी होती. त्यामुळे डिसेंबर २०१६ मध्ये पेन्शनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह विभागाने घेतला. हे प्रमाणपत्र आधार लिक्ड असल्याने ३० एप्रिलपर्यंत सर्वच पेन्शनधारकांना नोंदणी बंदनकारक केली होती. अशी नोंदणी न केलेल्या पेन्शनधारकांना पेन्शन अडविण्यात आली आहे.

जिल्ह्यात एकूण एक लाख ३१ हजार पेन्शनधारक आहेत. यापैकी केवळ ५७ हाजर पेन्शनधारकांनी पीएफ कार्यालय, महा-ई सेवा केंद्र, बँक येथे नोंदणी केली आहे. मात्र, अद्याप ८४ हजार पेन्शनधारकांनी नोंदणी केलेली नाही. हे पेन्शधारक जोपर्यंत नोंदणी करत नाहीत, तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळणार नाही. मात्र, नोंदणी केलेल्या पेन्शनधारकांना पुन्हा हयातीचा दाखला सादर करावा लागणार नाही. त्यानंतर दरवर्षी केवळ पीएफ कार्यालय, महा-ई सेवा केंद्र किंवा बँकेमध्ये थंम्ब इम्प्रेशन करावे लागणार आहे. पेन्शनधारकांना दरवर्षी हयातीच्या दाखल्यासाठी माराव्या लागणाऱ्या फेऱ्यांपासून सुटका होणार आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पेन्शनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी नोंदणी न केल्याने त्यांना पेन्शनपासून वंचित राहावे लागणार आहे. हे पेन्शनधारक जोपर्यंत डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी आधार क्रमांक देणार नाहीत, तोपर्यंत त्यांना पेन्शनचा लाभ मिळणार नाही.

डिजिटल जीवन प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत होती. दरवर्षी दाखल्याऐवजी प्रमाणपत्राची सुविधा दिली होती. ज्या अशाप्रकारे नोंदणी केली नाही, त्यांना पेन्शन मिळणार नाही. नोंदणी केल्यानंतरच पेन्शन सुरू होईल.

- सौरभ प्रसाद, विभागीय आयुक्त, भविष्य निर्वाह कार्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याभिषेक सोहळा लोकोत्सव व्हावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे ६ जून रोजी साजरा होणारा राज्याभिषेक दिन लोकोत्सव व्हावा यासाठी व्याख्यानमालेसह विविध उपक्रम आयोजित करणे आणि शिस्तबद्ध डॉल्बीमुक्त मिरवणूक काढण्याचा निर्णय गुरूवारी बैठकीत झाला. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात बैठक झाली.

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले, ‘गेल्या बारा वर्षापासून तिथी, तारीखेचा घोळ न करता ६ जून रोजी राज्याभिषेक दिन साजरा केला जातो. यानिमित्त शहरातून नाविन्यपूर्ण मिरवणूक काढली जाते. गडकोटांच्या संवर्धनासाठी ५ हजार कोटींची निधी मिळावा, असा फलक पाच वर्षांपूर्वी मिरवणुकीत होता. त्याची दखल सरकारी पातळीवर घेतली. गेल्यावर्षी रायगडसाठी ६०० कोटींची घोषणा झाली. कोल्हापुरातून सुरू झालेला राज्याभिषेक सोहळा राज्यात, परदेशातही साजरा होत आहे. विविध वक्त्यांच्या सहभागाने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावरील व्याख्यानमाला आयोजित केली जाईल.’

इतिहास संशोधक इंदजित सावंत म्हणाले, ‘कोल्हापुरातून सुरू केलेला शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभर साजरा केला जातो. रायगडावरील सोहळ्याचे श्रेय कोल्हापूरकारांनाच जाते. रायगडावर एक संस्था सुवर्णसिंहासन उभारणार आहे. त्याला कोल्हापुरकारांनीही मदत करावी.’

नगरसेविका रुपाराणी निकम आणि शिरीष देशपांडे यांनी ‘मिरवणुकीत फलकांद्वारे शहरातील अपूर्ण कामांकडे लक्ष वेधावे’ अशी मागणी केली. मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी होतील असे निकम यांनी सांगितले. ‍

फारूक कुरेशी म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मिरवणुकीत मुस्लिम बांधव उपस्थित राहतील.’

आनंद म्हाळुंगेकर यांनी मिरवणुकीत पर्यावण, पाणी वाचवाचा जागर करावा, असे सांगितले. डॉ. संदीप पाटील यांनी आरोग्य, अपघाताविषयी फलकाद्वारे जागर केला जाईल असे सांगितले. सोमनाथ घोडेराव, मोहन जाधव, रमेश आपटे, शैलजा भोसले, विजय तळेकर, विजयसिंह पाटील, सतिश कोळसे-पाटील, अरूण कांबळे, सीमा पाटील यांची भाषणे झाली. शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. बबन रानगे यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय तंत्रनिकेतनचे छायाचित्र प्रदर्शन सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फोटोग्राफीच्या आवडीतून केलेल्या तीन महिन्यांच्या अभ्यासात फोटो कसे काढायचे याचे धडे वर्गात बसून गिरवलेल्या विद्यार्थ्यांचा हाच वर्गातला अभ्यास गुरुवारी प्रदर्शनात ‘क्लिक’ झाला. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातर्फे केंद्रशासित प्रमाणित ‘कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रू पॉलिटेक्निक’ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या फोटोग्राफी कोर्समधील विद्यार्थ्यांच्या ‘फोटोग्राफी एक्झिबिशन २०१७’ या छायाचित्रांचे प्रदर्शनाला गुरूवारपासून सुरूवात झाली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील बाबूराव पेंढारकर कलादालन येथे १२ मे पर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे.

गुरुवारी सकळी ११ वाजता वन्यजीव छायाचित्रकार रमण कुलकर्णी यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून प्रदर्शनाचे उदघाटन झाले. यावेळी कोर्सचे मार्गदर्शक रविराज सुतार, नामवंत छायाचित्रकार, विद्यार्थी उपस्थित होते. प्रदर्शनात कोर्समधील ३० विद्यार्थ्यांची

१०१ छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. यामध्ये कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

अभ्यासक्रमात फोटोग्राफीचे शिक्षण घेत असताना पक्षीजगत, दैनंदिन मानवी जीवन, ग्रामीण जीवन, स्थापत्यशैली, लँडस्केप्स आदी विषयांची टिपलेली छायाचित्रे प्रदर्शनात आहेत. तेजस्विनी मधाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तुषार साळगावकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्कायवॉक अधांतरी, उड्डाणपूल ‘हवेत’

$
0
0

कोल्हापूर : शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारणीचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यात लक्ष घातल्याने उड्डाणपूल उभारणीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मात्र वाहतूक कोंडी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून यापूर्वीही उड्डाणपूल, स्कायवॉक आणि सब वे तयार करण्याच्या घोषणा झाल्या. महापालिकेच्या काही योजनांसाठी अंदाजपत्रकात तरतूद केली. आमदार फंडातून निधी मिळवून पादचाऱ्यांसाठी पूल उभारण्याचे ठरले. पण नियोजन व पाठपुराव्याचा अभाव, महापालिकेची कमकुवत आर्थिक स्थिती, निधीचा घोळ यामुळे शाहू खासबाग मैदान चौक, गंगावेश, विक्रमनगर या परिसरातील उड्डाणपुलांचे प्रस्ताव अधांतरीच लटकले. सिद्धाळा गार्डन परिसरात विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या स्कायवॉक उभारणीसाठी निविदा काढण्यात आली. चार कोटी ३० लाखांचा हा प्रोजेक्ट निधीअभावी थांबला आहे.

शाहू खासबाग मैदान परिसर हा गजबजलेला परिसर आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, परिसरात नामवंत शाळा, खाऊगल्ली, बँका, हॉटेल, व्यापारी संकुले, केएमटी बसथांबा यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. दररोज सकाळी व संध्याकाळी शाळा, कार्यालये सुरू होताना आणि बंद होताना विद्यार्थी, नागरिकांची गर्दी असते. यावेळी सुरू असलेल्या वाहतुकीमुळे कोंडी होते. विद्यार्थ्यांसाठी ही स्थिती धोकादायक असते. त्यामुळे परिसरातील संघटनांनी आंदोलन केले. त्यानंतर विद्यार्थी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चौकात स्कायवॉक उभारण्याचे ठरले. तत्कालिन स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी अंदाजपत्रकात दीड कोटी रुपयांची तरतूद केली. दीड कोटी रुपये बीओटी तत्वावर उभारुन स्कायवॉक तयार करण्याचे निश्चित झाले. पण महापालिकेची आर्थिक स्थिती आणि बीओटी तत्वावर प्रकल्प राबविण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे पुढे काहीच झाले नाही. स्कायवॉकचा पत्ता नाही, खाऊ गल्लीतील अस्ताव्यस्त पार्किंग आणि मोठ्या प्रमाणातील वाहतूक यामुळे सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत हा मार्ग जीवघेणा ठरला आहे. गंगावेश, रंकाळा स्टँन्ड ते जाऊळाचा बाल गणेश मंदिरपर्यंत उड्डाणपूल प्रस्तावित आहे. मात्र, निधीअभावी या कामालाही सुरुवात झाली नाही.

ओव्हरब्रिजची केवळ चर्चाच

तावडे हॉटेल ते कावळा नाका या मार्गावर सतत वर्दळ असते. शहरात प्रवेशासाठी शिरोली पुलापासूनचा हा प्रमुख मार्ग आहे. रस्त्याला जोडणारा सर्व्हीस मार्ग हा अरुंद आहे. यासाठी या मार्गावरून थेट प्रवेश करता यावा यासाठी शिरोली पुलापासून मुख्य रस्त्यापर्यंत उड्डाणपूल बांधून थेट स्वागत कमानीपर्यंत येण्याची सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. २०१५-१६ मधील अंदाजपत्रकात शिरोली पूल येथून शहरात प्रवेशासाठी ओव्हरबीज बांधण्यासाठी तरतूद करण्यात आली. पण अधिकारी बदलले, पदाधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट झाला आणि जुन्या योजना बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्या.

न्यू महाव्दार रोडवरील सिद्धाळा गार्डनसमोरील मार्गावर खास विद्यार्थ्यांसाठी उड्डाणपूल उभारणीचा प्रस्ताव आहे. माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांचा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. स. म. लोहिया, न्यू हायस्कूल, पदमाराजे गर्ल्सस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, रा. ना. सामाणी विद्यालय येथे असल्याने या मार्गावर विद्यार्थ्यांची वर्दळ असते. या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करुन उड्डाणपूल उभारणीचा आराखडा तयार केला. जवळपास तीन कोटी ४० लाख रुपयांचा हा आराखडा आहे. साठ लाखांच्या कामाची निविदा प्रक्रिया राबवली. मात्र नंतर या प्रकल्पात अडचणी निर्माण होत गेल्या. या भागातील प्रस्तावित स्कायवॉकचे काम रखडले. या भागातील स्कायवॉकसाठी पुन्हा एकदा महापालिकेत हालचाली सुरू आहेत. या भागात स्कायवॉक झाला तर न्यू महाद्वार रोड, सिद्धाळा गार्डन, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ परिसरातील नागरिकांना गर्दीपासून थोड्या फार प्रमाणात दिलासा मिळू शकेल. या भागातील वर्दळ लक्षात घेता आणखी सुधारणांची गरज आहे. महापालिकेने या भागाचा विचार करून वाहतूक सुधारणांसाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.

शाहू मैदान चौकात सब-वे होणे अत्यावश्यक आहे. वाहतुकीची समस्या तीव्र बनली आहे. यासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर ही योजना मांडली आहे. पालकमंत्र्यांनी प्राथमिक टप्प्यात निधी देण्याचे मान्य केले आहे. या भागात सब वे झाल्यास वाहतूक कोंडी सुटेल.

- आदिल फरास, माजी नगरसेवक

सिद्धाळा गार्डनसमोरील स्कायवॉकसाठी कागदपत्रांची पूर्तता, प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. येत्या काही दिवसांत पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात होईल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- सचिन चव्हाण, माजी नगरसेवक

शहरातील वाहतूक कोंडीची १९ ठिकाणे निश्चित केली आहेत. कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वाधिक रहदारीच्या रस्त्यांवर उड्डाणपूल उभारणीचे नियोजन आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर काही रस्त्यांवरील उड्डाणपुलांबाबत सादरीकरण केले आहे. निधीअभावी मोठे प्रकल्प उभारण्यात महापालिकेसमोर अडचणी आहेत.

- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवेंच्या पुतळ्यास काळे फासले

$
0
0

कोल्हापूर : शेतकऱ्यांविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्य़क्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास गुरुवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना काळे फासले. मिरजकर तिकटी येथे झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी पुतळा जाळण्याच्या प्रयत्न केला. पण, पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा काढून घेतला.

दुपारी बाराच्या सुमारास शिवसेनेचे कार्यकर्ते मिरजकर तिकटी येथे जमा झाले. रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याविषयी रोष व्यक्त होत होता. दानवेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. त्याचवेळी दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करण्यात आला त्यानंतर पुतळ्यावरील दानवेंच्या फोटोला शिवसेना नेत्यांनी काळे फासले. कार्यकर्त्यांनी पुतळ्याला चपलांनी हाणले, तसेच लाथाही मारल्या. त्यानंतर कार्यकर्ते पुतळा पेटविण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तो काढून घेतला.

दानवेंच्या निषेधार्थ प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी याच दानवेंना शेतकऱ्याविषयी प्रेम वाटत होते. त्यांचे प्रेम हे पुतना मावशीचे दिसून येते. अजित पवार यांनीही अशीच वक्तव्ये केली होती. त्यांच्या पक्षाची काय अवस्था झाली हे महाराष्ट्र पाहतो आहे. दानवेंना याचा विसर पडला असावा. शेतकऱ्यांच्या परिस्थितीची टर उडविण्याचा अधिकार दानवेंना आहे का?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, उपजिल्हा प्रमुख सुजीत चव्हाण, हर्षल सुर्वे, रवी चौगुले, अवधूत साळोखे, शरद चौगुले, डॉ. अनिल पाटील, दिलीप देसाई, कमलाकर जगदाळे, दत्ताजी टिपुगडे, कमलाताई पाटील, जयश्री खोत, सुजाता सोहोनी, शुभांगी पोवार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जनतेच्या मागणीनुसार थेट पाइपलाइन योजना मंजूर झाली आहे. त्यात कुणाला पक्षीय राजकारण करायचे ते करू द्या. पण शहरवासियांसाठी आवश्यक असलेल्या या योजनेचे काम त्वरीत सुरू न झाल्यास महापालिकेच्या आयुक्त, उपायुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू दिले जाणार नाही, असा इशारा कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला. योजना कुणी मोडण्याचा प्रयत्न कोल्हापूरकर खपवून घेणार नाहीत, असेही सुनवण्यात आले.

महाराणा प्रताप चौकातील बैठकीनंतर कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत महापालिकेवर मोर्चा काढला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बंद झालेल्या योजनेतील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा, भ्रष्टाचार प्रकरणी फौजदारी दाखल करा, अशा घोषणा देण्यात आल्या. महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त विजय खोराटे यांच्यासह समितीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली.

बुधवारी शिवसेनेने थेट पाइपलाइन योजनेचे काम बंद पाडले. तरीही प्रशासनाने काहीच खुलासा न केल्याने सर्वपक्षीय ​कृती समितीची बैठक झाली. महापौर फरास अध्यक्षस्थानी होत्या. निमंत्रक आर. के. पोवार यांनी, कुणाच्या पाठिंब्यासाठी नव्हे तर जनतेला चांगले पाणी लवकर मिळावे यासाठी योजनेचे काम सुरू होण्यासाठी बैठक बोलवल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर म्हणाले, ‘योजनेचे काम बंद पडता कामा नये. प्रत्येकाने राजकारण करावे. पण दूषित, अपुरा पाणीप्रश्न संपवण्यासाठी योजना आवश्यक आहे. राजकारणापलिकडे जाऊन एकत्र आले पाहिजे. महापौरांनी, आयुक्त तसेच अ​न्य अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करावा. जाब विचारावा.

चांगले काम केले तर अधिकारी तातडीने श्रेय घेतात. मग आरोपांचा खुलासा का होत नाही. आठ दिवसांत काय केले हे सांगत नाहीत. पुलासाठी प्रचंड पैसे खर्च करण्यासह पाइपलाइनखाली बेस केलेला नाही. त्याबाबतही प्रशासनाने स्पष्ट करावे.’

काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण म्हणाले, ‘आंदोलने जरूर करा, पण ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कडक कारवाई करा. योजनेचे काम तातडीने सुरू व्हवे ही मागणी आहे.’

शिवसेनेचे किशोर घाटगे यांनी, ‘श्रेयवादासाठी योजनेत आडकाठी आणून कोल्हापूरकरांचे पाणी पळवण्यात येत असेल तर गप्प राहणार नाही. योजनेचे श्रेय सर्व घटकांचे आहे. योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर, संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे’, अशी मागणी केली. भाजपचे सुरेश जरग यांनीही काम बंद राहू नये असे मत मांडले. भाकपचे सतिशचंद्र कांबळे, बाबा पार्टे, सुभाष देसाई, लालासाहेब गायकवाड यांची भाषणे झाली. निरंजन कदम यांनी आभार मानले. स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार, आदिल फरास, दिलीप पवार, नामदेव गावडे, जहीदा मुजावर, अनिल कदम, अशोक पवार, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिली प्रवेश सातव्या वर्षीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यानुसार (आरटीई) इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ५ वर्षे ४ महिने या वयोगटाऐवजी सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच पहिलीला प्रवेश द्यावा, असा आदेश राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे सहा वर्षाच्या आतील बालकांना पहिलाला प्रवेश मिळणार नाही. नियम डावलून प्रवे‌श दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत शाळांवर कारवाई होऊ शकते.

राज्यभरात शहरे, उपनगरांसह ग्रामीण भागातील छोट्या- मोठ्या गावांत इंग्रजी माध्यमाच्या शाळा मोठ्या संख्येने सुरू झाल्या आहेत. अशा शाळांमध्ये मुलांना प्ले ग्रुपपासून प्रवेश दिला जातो. आपल्या मुलांना शाळेत बसण्याची सवय लागावी यासाठी पालक अडीच ते तीन वर्ष झाल्यानंतर प्ले ग्रुपला त्या बालकास दाखल करतात. सद्यस्थितीत पहिलीपूर्व शिक्षण देणाऱ्या शाळांना परवानगी घेण्याची सक्ती नाही. त्यामुळे शिक्षण विभागाचेही त्यावर नियंत्रण नसते. त्यामुळे अनेक ठिकाणी प्ले ग्रुप, ज्युनीअर केजी, सीनिअर केजीचे शिक्षण देणाऱ्या शाळांची, संस्थांची दुकानदारी सुरू आहे.

राज्य सरकारने यापूर्वी २ जानेवारी २०१६ रोजी एका अध्यादेशाद्वारे इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ५ वर्षे ४ महिने असे वय निश्चित केले होते. त्यानुसार शाळांकडून प्रवेश दिला जात होता. मात्र ‘आरटीई’च्या २५ टक्के मोफत प्रवेशाच्या निकषासाठी इयत्ता पहिली प्रवेशाच्या कमाल वयोमर्यादेचा प्रश्न समोर आला. त्यामुळे शिक्षण विभागाचे संचालक गोविंद नांदडे यांनी १७ फेब्रुवारी २०१७ मध्ये पहिली प्रवेषासाठी किमान सहा वर्षे वयाची अट नव्या आदेशाद्वारे लागू केली आहे. या अटीनुसार ‘आरटीई’च्या प्रवेशासाठी वेबसाइटवरही वयोगट अपलोड केला आहे. त्यामुळे ‘आरटीई’साठी सहापेक्षा कमी वय असलेल्या मुलाचा अर्ज अपलोडच होत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात गव्याचा हल्ल्यात दोन ठार

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुक्यातील आकुर्डे गावात भैरुचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात रान गव्याच्या हल्ल्यात एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले गारगोटीचे बी न्यूजचे प्रतिनिधिही गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आकुर्डे येथील तीन तरुण वैरण म्हणून ऊसाचा पाला काढण्यासाठी ऊसाच्या शेतात गेले होते. यावेळी गव्याच्या कळपातून चुकलेल्या भल्या मोठ्या गव्याने तिघांपैकी अनिल पोवार या तरुणावर हल्ला केला. पोटात गव्याचे शिंगे घुसून रक्तस्त्राव झाल्याने अनिल पोवार हा तरुण शेतकरी जागीच ठार झाला. जीव वाचवत पळालेल्या दोघांनी ग्रामस्थांना या दुर्घटनेची माहिती दिली. हे वृत्त कळताच बी न्यूजचे रघुनाथ शिंदेही घटनास्थळी येऊन शूटिंग करत होते. बांधावर उभे राहून गव्याचे शूटिंग करत असताना मागे फिरून गव्याने शिंदे यांना थेट धडक दिली. यामुळे ते १०-१२ फूटवर दूरवर फेकले गेले. शिंदे यांच्या पोटात एक शिंग घुसले. तर दूसरे शिंग मांडीत घुसले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांना गारगोटी येथे प्रथमोपचार करून तातडीने कोल्हापुरला हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images