Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘माझे मंत्रिपद धनगर आरक्षणासाठी नाही’

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

‘बारामतीमध्ये धनगर समाजाने मते दिली असती, तर मी केंद्रात मंत्री झालो असतो. मला मराठा आणि ब्राह्मण समाजाने अधिक मतदान झाले आहे. धनगरबहुल भागांत मला कमी मते मिळाली. माझ्या पक्षाचा पहिला आमदार मराठा समाजाचा होता. मी धनगरांचा नेता किंवा धनगर आरक्षणासाठी मला मंत्री केलेले नाही,’ असे खळबळजनक वक्तव्य पशू व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. पंढरपूर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

जानकर म्हणाले, ‘माझ्या पक्षात सर्वच जातींची लोक आहेत. बैलगाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याला वाटत असते, आपल्यामुळेच बैलगाडी चालत्ये, अशी अवस्था सध्या काहींची झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यातील वाद असो किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील वाद असो, तो संपविण्यासाठी मी सगळ्यांच्या पाया पडण्यास तयार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ दहा एकर तुर जाळून टाकली

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

तुरीचे भाव पडल्यामुळे काढणी, मळणी आणि आडतीचा खर्चही निघत नसल्यामुळे अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांने तुरीच्या दहा एकर उभ्या पिकाला आग लावून तूर जाळून टाकली. ही दुर्दैवी बासलेगाव (ता. अक्कलकोट) येथे रविवारी घडली.

अक्कलकोट तालुक्‍यातील प्रयोगशील शेतकरी शशिकांत बिराजदार यांनी काढणी, मळणी, अडतीचा खर्च आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळ-मेळ बसत नसल्यामुळे पिकाची काढणी न करता उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. वर्षभर ज्या शेतीची निगा राखली तीच शेती पेटवण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यावर आली.

शशिकांत बिराजदार सधन शेतकरी आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातल्या बासलेगावच्या पंचक्रोशीत ते प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. दर वर्षी साधारण १५० ते २०० क्विंटल तूर उत्पादन ते घेतात. यंदा ही त्यांनी आपल्या शेतात २६ एकर तूर पेरली होती. त्यापैकी १६ एकराची रास करून उत्पादनही घेतले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी विक्रीला पाठवली. परंतु, अजूनपर्यंत तूर विकली गेली नाही. ३५०० ते ४२००पर्यंत त्यांच्या तुरीला मागणी होती. परंतु सरकारने ५१०० रुपये हमी दराने विकत घ्यायचे धोरण जाहीर केल्यामुळे त्यांनी तुरीची विक्री केली नाही. काढणीपासून विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेत होणारा खर्च याचा कुठेच ताळमेळ लागणार नाही याचा अंदाज आल्याने दहा एकराच्या तूर शेतीला त्यांनी आग लावली. यंदा केलेली तूर शेती त्यांच्या अंगलट आली आहे.

गेल्यावेळी मिळालेला तुरीचा चांगला भाव पाहून त्यांनी तूर लावली. पण हळूहळू तुरीचे दर कोसळत गेले त्यामुळे बिराजदार यांनी किमान पुढील पिकासाठी शेत तरी मोकळे होईल म्हणून उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. अक्कलकोट तालुक्‍यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगलेच नुकसान सहन करावे लागले आहे. हमीभाव देण्याच्या आणि तूर विकत घेण्याच्या सरकारी यंत्रणेवर आता शेतकऱ्यांचा विश्‍वास उडाल्याचेच या घटनेतून समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनी काठावर गाळपेरणी सुरू

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

उजनी जलाशयातील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. जलाशयातील पाण्याने व्यापलेल्या जमिनी आता उघड्या पडल्या असल्याने या जमिनीवर उन्हाळी पिके घेण्याची बळीराजांची लगबग सुरू झाली आहे. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोंढार चिंचोलीसह परिसरात असे चित्र दिसून येत आहे.

उजनी जलाशयामुळे लाखो सजीवांची पाण्याची गरज भागविली जात असतानाच जलाशयातील पाण्याच्या आधारावर हजारो शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. दरम्यान, जलाशयातील पाणी कमी फायद्या शेतकऱ्यांना होते आहे, पाणी घटत असताना उघड्या पडणाऱ्या जमिनीवर शेतकरी उन्हाळी पिकांचे उत्पादन घेतात. यंदाही सद्यस्थितीत उजनी काठावर अशा गाळपेरण्या सुरू आहेत. या पेरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या जमिनींची हलकीशी मशागत करताना शेतकरी दिसून येत असून या भागात आता कडवळ, मका, कांदा, भुईमुग, मुग, बाजरी या पिकांची पेरणी होणार आहे.
कसदार जमिनी ठरतायत फायदेशीर

उन्हाळ्यात जलाशयाच्या पाण्याबाहेर पडणाऱ्या या जमिनीत गाळाचे प्रमाण जास्त असल्याने त्या कसदार असतात. या शिवाय जलाशयाकाठच्या या जमिनीत ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने पाण्याची गरज नसते. एकदा पेरणी झाली की खत, पाण्याविना पिके बहारदार येतात. एकूणच अल्प कष्ट व खर्चात चांगले उत्पन्न मिळते. कोंढारचिंचोली, पारेवाडी, उमरड, पोमलवाडी, जिंती, टाकळी, कात्रजसह परिसरातील शेतकऱ्यांना असा अनुभव आहे.

वेगाने पाण्यात घट

यंदा उजनी ११० टक्के भरले होते. मात्र, सद्यस्थितीत पाण्याची घट वेगाने होऊ लागली आहे. मुख्यतः धरणातून खाली सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जलाशयातील पाणीसाठा पोटाच्या दिशेने खाली सरकत आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनात वाढ होत आहे, अशा स्थितीत जलाशयाने व्यापलेला जमिनीचा भाग उघडा पडण्याचा वेग आता वाढणार आहे. जमिनी उघड्या पडल्या की त्या ठिकाणी गाळपेरणी करण्याची लगबगही वाढणार आहे.
उजनीच्या पाण्याच्या नियोजनाची मागणी

उजनी जलाशयाने शंभरी ओलांडली तरी उन्हाळ्यात जलाशयाची पाणीपातळी वजा होऊन पाण्याची अडचण निर्माण होते. शेती पंपांची वीज कपात केली जाते. परिणामी धरणासाठी त्याग करणाऱ्या शेतकऱ्यांना पिके जगविणे अवघड होते, अशी स्थिती दर वर्षी आढळून येते. यंदा पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणेच वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंपदा मंत्री महाजन यांचीप्रतीकात्मक अंत्ययात्रा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी मागील पाच दिवसांपासून मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोरड्या उपोषणास सुरुवात केली आहे. सरकारी स्तरावर अद्याप आंदोलनाची दखल न घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून अंत्यविधी केला.

मागील सतरा वर्षांपूर्वी युती सरकारच्या काळात येथील १४ गावांच्या शेतकऱ्यासाठी आष्टी उपसा सिंचन योजना मंजूर झाली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गमावल्या मात्र, त्यांना मोबादला मिळाला ना पाणी. आजही येथील शेतकरी पाण्यावाचून वंचित आहेत. शेतीला पाणी मिळेल याकडे या आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची एक पिढी संपली आहे. सरकार अद्यापही चाल ढकल करीत असल्यामुळे सरकारला जाग अणण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मागील पाच दिवसांपासून ३० फूट खोल खड्यात बेमुदत आंदोलन सुरू आहे. यात आतापर्यंत प्रकृती खालावल्याने पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, सरकारी स्तरावर आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने शुक्रवारी जलसंपदा मंत्र्यांची यांची प्रेतयात्रा काढून अंत्यविधी करण्यात आला. सरकारने आताही दखल न घेतल्यास मंत्री महोदयाना खरोखरच कॅनॉलमध्ये गाढू, असा इशारा या वेळी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सहाय्यक आयुक्तांच्याकार्यालयाची झाडाझडती

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाकडील कर्मचारी संजय होटकर यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले सहायक आयुक्त अभिजित हराळे यांच्या कार्यालयाची शुक्रवारी दुपारी सोलापूर पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र, त्याना कोणतीही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली नाहीत.

संजय होटकर मनपाची वादग्रस्त ठरलेली कचरा टेंडरची फाइल सांभाळत होते. या पूर्वी बेकायदा काम करण्यासाठी दबाव टाकला म्हणून दोन नगरसेवकांच्या त्रासाला कंटाळून होटकर यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवसांतच म्हणजेच गुरुवारी त्यानी होटगी रस्ता परिसरात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या चिट्टीमध्ये सहायक आयुक्त हराळे यांच्यासह राजू सावंत, ए. के. आराधे यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. संबधितांनी भ्रष्टाचार केला असून, त्याची चौकशी करावी, असेही चिठीत लिहिले होते. त्यानंतर पोलिसांनी हराळे, सावंत आणि आराधे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पोलिसांनी होटकर यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेले हराळे तसेच अन्य दोघांची चौकशी करण्यासाठी महापालिका गाठली. हराळे यांच्या कार्यालयात जाऊन झाडाझडती घेतली मात्र. पोलिसांच्या हाताला काहीही लागले नाही. परंतु आत्महत्येचे नेमके कारण कचरा टेंडरची फाइल होती की, आणखी काय याची चौकशी सदर बाजार पोलिस करीत आहेत. अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खराब चेसीमुळे८७ बसची नोंदणी रद्दसोलापूर मनपाच्या बसेसवर आरटोओची कारवाई

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू शहरी विकास योजनेंतर्गत (जेएनएनयूआरएम) सोलापूर महानगरपालिकेला अशोक लेलेंड कंपनीमार्फत शंभर बसेसची चेसी पुरविण्यात आल्या होत्या. १०० पैकी तब्बल ८७ बसेसची चेसी खराब असल्याचे पुराव्यानिशी आढळून आले आहे. सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने या सर्व ८७ बसेसची नोंदणी रद्द केली आहे. आरटीओ बजरंग खरमाटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या बाबतची माहिती दिली. या कारवाईमुळे अशोक लेलेंड कंपनीला जबरदस्त दणका बसला आहे.

तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आपल्या प्रयत्नातून महापालिका परिवहन उपक्रमासाठी २०० बसेसची मागणी केली होती. त्यापैकी १९० बसेस मंजूरही करण्यात आल्या होत्या. त्यासाठी सरकार आणि मनपा यांचा हिस्सा भरण्याचे ठरले होते. त्यानुसार मनपाच्या ताफ्यात पहिल्या टप्यात शंभर बसेस आल्या. त्यांची नोंदणी करून त्या सर्व एसी आणि नॉन एसी बसेस रस्त्यावर धावत होत्या. परंतु २०१५ सालात तत्कालीन विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांनी अशोक लेलेंड कंपनीने पुरविलेल्या या बसेसची चेसी खराब असल्याची तक्रार सोलापूरचे आरटीओ बजरंग खरमाटे यांच्याकडे केली होती. त्यानुसार परिवहन अधिकाऱ्यांनी पहिल्या टप्यात ४७ बसेसची पाहणी आणि नंतर उर्वरित बसेसची पाहणी केली असता या सर्व ८७ बसेसची चेसी खराब असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार आरटीओने महापालिकेला या बसेस बंद ठेवण्यास सांगितले.

दरम्यान, मनपाने बस पुरविणाऱ्या कंपनीला खराब बसेसची चेसी बदलून देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. शिवाय पालकमंत्री विजयकुमार देशमुख, परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यासमवेत मुंबईत बैठकही घेण्यात आली होती, तेव्हाही कंपनीने चेसी बदलून देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आरटीओने आपली कारवाई सुरू केली. बस पुरविणारी कंपनी कोणत्याच हालचाली करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मनपाने आपल्या वाट्याची सुमारे २४ कोटींची रक्कम अडवून ठेवली आहे. साठ कोटींपैकी ३४ कोटी रक्कम कंपनीला देण्यात आली आहे.

...........

चेसी खराब असल्याचा अहवाल

बसेसची चेसी खराब असल्याबाबत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, पुणे आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे यांच्याकडूनही अहवाल आल्यानंतर सोलापूर आरटीओने बसेसची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र तत्काळ मनपा आयुक्तांना पाठवून देण्यात आले. गाड्यांची नोंदणी करताना आरटीओने दिलेले आरसी बुक, योग्यता प्रमाणपत्र, टॅक्स भरलेली कागदपत्रे तातडीने आरटीओ कार्यालयाकडे सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आरटीओ खरमाटे यांनी या वेळी बोलताना दिली.

सोमपासाठी मंजूर झालेल्या सुमारे १५६ कोटी खर्चाच्या १९० बसेसपैकी काही बसेस २०१४ सालापासून खरेदी करण्यास सुरुवात झाली. प्रथम सुमारे ६० कोटी रक्कम असलेल्या १०० बसेस खरेदी करण्यात आल्या. त्यामधील एक बस जळाली आहे. उर्वरित ९९ पैकी ८७ बसेसची नोंदणी आरटीओने रद्द केल्यामुळे आता या बसेस रस्त्यावर कधीच धावू शकणार नाहीत. उर्वरित १२ बसेस चांगल्या आहेत, भविष्यात जर त्यामध्येही काही त्रुटी निर्माण झाल्यास त्या बसेसवरही कारवाई करू, असा इशाराही आरटीओ खरमाटे यांनी दिला आहे.

अपिलासाठी ३० दिवसांची मुदत

आमच्या निर्णयाविरोधात मनपा किंवा कंपनीला अपील करायचे असेल तर त्यासाठी तीस दिवसांची मुदत आहे. अपील थेट परिवहन आयुक्तांकडे करावयाचे आहे. चेसी खराब असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याने कंपनी अपील करण्याचे धाडस कितपत दाखवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मोटार वाहन कायदा कलम ५५ (३) आणि ५५ (५), अन्वये आरटीओने बसेसची नोंदणी रद्द केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनीच्या कालव्यातसख्खे भाऊ बुडाले

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील उजनीच्या उजव्या कालव्यात मामासोबत पोहण्यासाठी गेलेली चार शाळकरी मुले वाहून गेली. त्यापैकी दोन मुलांना वाचवण्यात यश आले आहे. तर दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हे दोघे भाऊ मुंबई येथील रहिवाशी असून, श्रीपूर येथे उन्हाळी सुट्टीसाठी मामाच्या गावाला आले होते.

ओम सतीश लोणी (वय १३) व प्रसन्न सतीश लोणी (वय १०) अशी मृत भावांची नावे आहेत. तर विराज संतोष शिवनगी व विकी संतोष शिवनगी या दोघाना बोरगांव येथील रोहित साठे यांनी कालव्यात उडी टाकून वाचवले. बुडालेल्या दोन्ही सख्ख्या भावांच्या मृतदेहाचा अद्याप शोध सुरू आहे. या घटनेने श्रीपूर व बोरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरमध्ये मालगाडीचे डबे घसरले

$
0
0

सूर्यकांत आसबे । सोलापूर

सोलापूरमधील दुधणी स्थानकादरम्यान ब्रेक फेल झाल्याने इंजिनसहित मालगाडीचे काही डबे घसरले. त्यामुळे दक्षिण भारतातली वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाडीहून होटगीला मालगाडी जात असताना रूळाला तडे गेल्यानं हा अपघात झाला. या अपघतात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ही घटना समजताच रेल्वे पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊ रेल्वेरूळ दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु केलं आहे.

रविवारी मध्यरात्री १२:३० वाजता ही घटना घडली. दुधनीनजीक रुळांना तडे गेल्याने मालगाडीच्या इंजिनसह ५ वॅगन घसरले, त्यामुळे दक्षिण भारतात जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून दक्षिण भारताचा संपर्क तुटला आहे. वाडी जंक्शन वरुन होटगी स्थानकाकडे ही मालगाडी येत होती. सिमेंटसाठी लागणारा कच्चा माल घेऊन ही मालगाडी येत होती. दरम्यान रुळ दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती उप रेल्वे प्रबंधक राजेंद्र शर्मा यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​सातारा झेडपीचेअध्यक्ष संजीवराजे?

$
0
0



सातारा

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेची रंगीत तालिम सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडले. दोन तासांच्या राजकीय खलबतानंतर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले. उपाध्यक्ष निवडीसाठी पाटण तालुक्यातून माजी आमदार विक्रमसिह पाटणकर यांचे समर्थक राजेंद्र पवार व खटाव तालुक्यातून सुरेंद्र गुदगे यांच्या प्रत्येकी सव्वा वर्षे मुदत देण्याच्या चर्चा रंगल्या. या निवडी जवळपास निश्चित असून मंगळवारी प्रत्यक्ष सभेपूर्वी शरद पवार यांच्याकडून निवड जाहीर करणारा दूरध्वनी केला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार उदयनराजेंवर मारहाण, खंडणीचा गुन्हा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील संघर्षातून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन गटांतील संघर्ष पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे.

सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराजवळ सोना अलाईज कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे, तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्व रामराजे निंबाळकर हे करतात. कंपनी रामराजेंच्या संघटनेला झुकतं माप देते तसेच त्यांना अधिक काम देते, असा उदयनराजे यांचा आरोप होता. त्यामुळे १८ फेब्रुवारीला त्यांनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतले होते.

सातारा विश्रामगृहात आल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडे असलेला ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे यांचे समर्थक अशोक सावंत, रणजीत माने, सुकुमार रासकर, धनाजी धायगुडे, राजकुमार गायकवाड, अविनाश सोनवले, ज्ञानेश्वर कांबळे आणि योगेश बांदल अशा ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अफजलखानाच्या कबरीभोवतीच्या१९ अवैध खोल्या पाडण्याचे आदेश

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

किल्ले प्रतापगड येथील अफझलखानाच्या कबरीभोवती वन खात्याच्या भूमीवर बेकायदा बांधण्यात आलेल्या १९ खोल्यांचे बांधकाम काढून टाकण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३० मार्च रोजी वनखाते आणि सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाला दिला आहे.

विधानभवनातील सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात दुपारी तीन वाजता श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुनगंटीवार यांची भेट घेतली. चर्चेनंतर त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा आदेश दिला.

या बैठकीला वन विभागाचे सचिव खारगे, मुख्य वनसंरक्षक पाटील, विभागीय वनअधिकारी अंजनकर, श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि सांगलीचे माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे प्रितिनिधी उपस्थित होते.

अफझलखान कबर परिसरातील वनखात्याच्या भूमीवर केलेले बेकायदा बांधकाम त्वरित हटवण्यात यावे, असा आदेश मुंबई हायकोर्टाने सरकारला दोन वेळा दिला आहे. तरीही सरकारने बांधकामे हटविली नाहीत. या पूर्वीच्या सरकारने या विषयी काहीच कृती केलेली नाही. सरकारने संबधित बांधकामे हटवावीत, अशी मागणी नितीन शिंदे यांनी मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्यांना अवैध बांधकामांची छायाचित्रेही दाखवली.

मुनगंटीवार म्हणाले, ‘वन खात्याच्या जमिनीवरील बेकायदा १९ खोल्यांचे बांधकाम हटवण्यात येईल; मात्र वनखात्याची जमीन सोडून अन्य ठिकाणी असलेले बांधकाम आम्हाला पाडता येणार नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वर बंदला प्रतिसाद

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

जंगलात चोरून सुरू असलेल्या गोहत्येच्या निषेधार्थ तालुक्यातील ११० गावांनी पुकारलेल्या तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिसांच्या असमाधानकारक तपासाच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. तेथेच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले

गोहत्या व धोंडीबा आखाडे यांच्या खुनाचा तपास सीआयडी मार्फत करण्याची मागणी तहसीलदार रमेश शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली

गोहत्या बंदी असतानाही महाबळेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागात जंगलात गोहत्या केली जात आहे. तसेच देवळी गावातील वृद्ध शेतकरी धोंडीबा आखाडे यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त करून या दोन्ही घटनांचा परस्पर संबधित आहेत. मात्र, पोलिस या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासात दिरंगाई करीत आहेत. २५ दिवसांत पोलिस काहीच प्रगती करू शकले नाहीत, त्यामुळे तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांच्या अशा कामगिरीच्या निषेधार्थ तालुक्यातील ११० गावातील जनतेने आज तालुका बंदची हाक दिली होती. या बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. महाबळेश्वर बंद ठेवून तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने येथीय छ. शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. तेथे छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून मार्चाला प्रारंभ करण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्ष संतोष आखाडे, गणेश उतेकर आदींनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात पाऊस

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा

पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाने अंगाची लाही लाही होत होती. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अखेर रात्री सात वाजण्याच्या सुमारास सातारा शहरासह परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उन्हाची चाहूल जाणवू लागली होती. त्यात मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तर उन्हाने अंगाची लाहीलाही होत होती. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर वगळता सर्वत्र पारा ४० अंशावर गेला होता. मात्र, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता अचानक ढगाळ वातावरण झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने गवत, काडी, लाकुड फाटा झाकून ठेवण्याची धांदल उडाली. रात्री सातच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि पावसाने सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. शाहुपुरी अंजली कॉलनी येथे जोरदार वाऱ्याने वडाचे झाड कोसळले. वीजवाहक तारा तुटल्याने शाहुपुरी करंजे सदर बझार बोगदा-पोवई नाका तसेच प्रतापगंज पेठ येथे सुमारे पाऊण तास वीज गायब झाली होती. संध्याकाळच्या वळीवाने वातावरणात काहीकाळ गारवा निर्माण झाला मात्र, पुन्हा अंगाची काहिली सातारकरांना सहन करावी लागली.

औंध परिसरात पावसाचा शिडकावा

शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास औंध परिसरात वादळी वारे, मेघगर्जनेसह काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

औंधच्या उत्तरेकडील जायगाव येथे सुमारे वीस मिनिटे पाऊस पडला. भोसरे, चौकीचा आंबा, वरूड, औंध व अन्य भागात पावसाचा काही प्रमाणात शिडकावा झाला. आकाश काळवंडून आल्याने जोरदार पाऊस होईल व हवेत गारवा निर्माण होईल, अशी आशा नागरिक, शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे पावसाने हुलकावणी दिली. रात्री उशीरा हवेत पुन्हा कमालीचा उष्मा निर्माण झाला होता, तसेच ढगाळ वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ डॉ. अशोक चौसाळकरांनामहर्षी शिंदे पुरस्कार जाहीर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा २१वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांना जाहीर झाला आहे. १९८० नंतरच्या काळात मराठी भाषेतील वैचारिक साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका डॉ. चौसाळकर यांनी बजावली आहे. प्रतिष्ठानचे ज्येष्ठ विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते, दलितमित्र संभाजीराव पाटणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या पुरस्काराचे वितरण रा. ना. चव्हाण यांच्या २४व्या स्मृतिदिनी, दहा एप्रिल रोजी ब्राह्म समाज रविवार पेठ, वाई येथे सकाळी साडेनऊ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

दलितमित्र रा. ना. चव्हाण यांनी ज्यांच्या प्रेरणेने आपले प्रबोधनपर साहित्य समृद्ध व समर्थ केले त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात, संशोधन क्षेत्रात व साहित्यिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दर वर्षी सन्मानपूर्वक दिला जातो. स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

समाजप्रबोधन पत्रिकेचे संपादक असलेले प्रा. डॉ. अशोक चौसाळकर राज्यशास्त्राचे नामवंत प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जातात. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. एक निष्णात राजकीय, सामाजिक विश्लेषक म्हणून ते सतत सक्रिय राहिले असून, त्यांनी संशोधनाच्या व वैचारिक लेखनाच्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून विपुल, अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली आहे. १९व्या शतकातील सामाजिक आणि धर्मविचार हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वर@ अशांवर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

यंदाच्या उन्हाळ्यात महाबळेश्वर मुंबईपेक्षा जास्त उष्ण आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत महाबळेश्वरमधील तापमान आयएमडीने मुंबईत नोंदवलेल्या तापमानापेक्षा जास्त आहे. मुंबईतील कुलाबा आणि सांताक्रुझ वेधशाळेने तापमानाची नोंद केली आहे. मुंबईच्या किनारी भागापेक्षा महाबळेश्वरमधील पारा हा सामान्यतः कमी असतो.

महाबळेश्वरमध्ये बुधवारी, बारा एप्रिल रोजी ३५.२ अंश सेल्सिअस तापमान होते, तर मुंबईत ३४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी, महाबळेश्वरमध्ये तेरा एप्रिल रोजी ३५.९ अंश सेल्सिअस तापमान होते, तर मुंबईचा पारा ३४.८ अंश सेल्सिअसवर होता. गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये प्रत्यावर्त (अँटीसायक्लोन) मध्ये असलेल्या ईशान्येकडील उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे महाबळेश्वरमधील तापमान वाढल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पूर्वेकडील वारे ईशान्ये वाऱ्यात मिसळले आहेत. येत्या आठवड्यात हे वारे पुढे सरकल्यानंतर पुन्हा तापमान खालावेल, अशी माहिती आयएमडीने दिली आहे.

सौराष्ट्र आणि कच्छमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत तापमान ३५ अंशाच्या आसपास आहे. येत्या काही दिवसांत पारा दोन अंशांनी वाढण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्नाटकाला पाणी देण्यास आमदारांचा विरोध

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्यास कृष्णा व कोयना नदी काठांच्या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई उद्भवणार आहे. त्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेत सातारा जिल्ह्यातील आमदारांनी पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.

या बाबत सातारा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आमदारांनी आपली पाणी सोडण्याविरोधी भूमिका मांडली.

दरम्यान, आमदारांचा वाढता विरोध लक्षात घेत विजय शिवतारे यांनी कोयना धरणातून पाणी सोडल्यास महाबळेश्वर, पाटण, व जावली तालुक्यातील किती गावांमध्ये टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचा अभ्यास करून २४ एप्रिलच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणीटंचाई आढाव बैठकीत जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, आनंदराव पाटील, मोहनराव कदम यांच्यासह जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी कर्नाटकाला कोयना धरणातून देण्यात येत असलेल्या २.६५ टीएमसी पाणी देण्याच्या सरकारच्या भूमिकेला विरोध केला आहे.

जॅकवेल उघडे पडणार?

मकरंद पाटील यांनी धरणालगत असलेल्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचे जॅकवेल उघडे पडणार आहेत. त्यामुळे तेथील गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यासाठी धरणातून कर्नाटकाला पाणी सोडण्यात येवू नये, अशी मागणी केली. पाटील यांच्या भूमिकेला शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील व शंभूराज देसाई यांच्यासह सर्वच आमदारांनी पाठींबा दिला.
सिंचन, वीजनिर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा

कोयनेचे अभियंता ज्ञानेश्वर बागडेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, कराड

‘कोयना धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा असून, कर्नाटकला दोन टीएमसी पाणी देऊनही जूनपर्यंत सिंचनासह वीजनिर्मितीला पाणी पुरून शिल्लक राहील इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे,’ अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

कर्नाटकसाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्याबाबत राज्य सरकारचा आदेश आल्यानंतर बुधवारी रात्रीपासून कोयना धरणाच्या रिव्हर स्लुईस गेटमधून ९०७ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

बागडे म्हणाले, ‘राज्यात भीषण पाणीटंचाई असताना कर्नाटकाला पाणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका होत आहे. मात्र, गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे १०५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. आज रोजी धरणात ३९ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. वीज निर्मितीला लागणारे पाणी तसेच सिंचन व पिण्याच्या पाण्याची गरज भागून यंदा पावसाळ्यापर्यंत काही पाणी धरणात शिल्लक राहणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा याच दिवशी १३ एप्रिल रोजी धरणात ४ टीएमसी जादा पाणी आहे. धरणातील एकूण पाण्यापैकी वर्षभरात सरासरी ६ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असते. या सर्व बाबींचा विचार करूनच हा निणय घेतला आहे, त्यामुळे येथील जनतेने या बाबत साशंकता बाळगू नये.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीषण अपघातात मिनी बसचा चुराडा; ६ ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

मिरज-पंढरपूर रस्त्यार शुक्रवारी पहाटे मिनी बसला झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं.

अपघातग्रस्त मिनी बसमधील प्रवासी कोल्हापूर जिल्ह्यातील माले गावचे असल्याचं समजतं. हे सगळेजण पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना आवळगाव फाटा इथं त्यांची मिनी बस रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर मागच्या बाजूने येऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, मिनी बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. त्यात सहा लोक जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन लहान मुलं, एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर चालक संदीप यादव फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मृतांची नावे:

नंदकुमार जयंत हेगडे (वय ३७)
रेणुका नंदकुमार हेगडे (३५)
आदित्य नंदकुमार हेगडे (१२)
लखन राजू संकाजी (३६)
विनायक मार्तंड लोंढे (४०)
गौरव राजू नरदे (७)

गंभीर जखमी

रेखा राजाराम देवकुळे (४०)
स्नेहल कृष्णात हेगडे (२०)
काजल कृष्णात हेगडे (१९)

जखमी

सावित्री बळवंत आवळे (५५)
शीतल सुनील हेगडे (४२)
सोनल कांबळे (३६)
कोमल हेगडे (२०)
कल्पना बाबर (४०)
अनमोल हेगडे (१२)
गौरी हेगडे (७)
शुभम कांबळे (१०)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गांवर स्वच्छतागृहांचे डर्टी पिक्चर

$
0
0

Janhavi.Sarate@ timesgroup.com

Tweet : @MTjanhavisarate

कोल्हापूर : कोल्हापूर ते पुणे महामार्गावर प्रवास करताना महिलांना स्वच्छतागृहांअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मुळात स्वच्छतागृहांची संख्या खूप कमी असून जी स्वच्छतागृहे आहेत, त्यात पाण्याचा अभाव, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे वापराअभावी पडून आहेत. स्वच्छतागृहांअभावी महिलांना युरिन इन्फेक्शनच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कोल्हापूर ते बेळगावचा प्रवासादरम्यान दोन किलोमीटर अंतरावर महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा केलेली दिसून येते. त्याच महामार्गावर कोल्हापूर ते पुण्याचा प्रवास केला तर साधारण ६५ ते ७० किलो मीटरशिवाय एकही स्वच्छतागृह दिसत नाही. इतक्या अंतरावर असलेले स्वच्छगृहाची अवस्था ही खूप वाईट आहे. दहा महिन्यांपूर्वी सरकारने राज्यमार्गावरील स्वच्छतागृहासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या सुविधा महिलांना अद्याप मिळालेल्या नाहीत. कोल्हापुरातील अनेक युवती, महिला पुणे किंवा मुंबईला नोकरी किंवा काही कामानिमित्त प्रवास करतात. मुंबई, पुण्यामध्ये नोकरीनिमित्त, ट्रेनिंगसाठी, मिटींगसाठी, नातेवाईकांकडे जाणाऱ्या महिलांची संख्या खूप मोठी आहे. ही संख्या लक्षात न आल्याने या महामार्गावर महिला स्वच्छतागृहे उभारण्यातच आलेली नाही.

रेल्वेचे बुकिंग मिळत नसल्यामुळे अनेक महिला एसटीच्या विना थांबा बसचा पर्याय निवडतात. ही एसटी तीन ते चार तासांनी कराड किंवा सातारा स्टँडवर थांबते. त्या परिसरातील स्वच्छतागृहे प्रचंड अस्वच्छ आहेत. त्यामुळे महिला स्वच्छतागृहात जाण्यास टाळतात. मात्र त्याचा शारिरीक परिणाम होत असल्याचे पुढे आले आहे. ज्या महिलांना मूतखड्याचा आजार आहे, त्यांना दोन तासांनी लघवीला जावे लागते, मात्र अशा ठिकाणी युरिनला गेल्यामुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. टोल नाका परिसरात असलेल्या स्वच्छतागृहांची परिस्थिती त्याहूनही भयानक आहे.

खासगी आराम बसेस ही कमी थांबे घेत लवकर त्या पोहचण्यासाठी बसेस नेतात. महिलांनी विनंती करुनही अनेक वेळा लवकर बसेस थांबवल्या जात नाहीत. त्यामुळे महिलांची कुचंबना होते.

एसटीचा महसुलावर पाणी

एकीकडे एसटीच्या संख्या वाढवून खासगी बसेसशी बरोबरी करणाऱ्या राज्य परिवहन मंडळाचा महसूल वाढण्यासाठी प्रथम योग्य ठिकाणी थांबे निवडण्याची आवश्यकता आहे. केवळ परिवहन मंडळाचे एस. टी थांबे असलेल्या ठिकाणी स्वच्छतागृहांची दुरावस्था असल्यामुळे अनेक महिला-युवती एसटी बसने प्रवास करण्याऐवजी खासगी आराम बसेसना पसंती देत आहेत. मात्र खासगी बसेचचालकही बसेस थांबवत नसल्याने समस्या वाढली आहे.


महिलांना त्रास

काही महिलांना दोन-दोन तासांनी लघवीला जावे लागते. लघवी तटविल्यामुळे त्याचा गर्भाशयावर ताण पडतो. तसेच मूत्रपिंड निकामी होणे, मूतखडा, मासिक पाळी दरम्यान महिलांना त्रास होतात. यासंदर्भात राष्ट्रीय आरोग्य संघटनेतर्फे सर्व्हेक्षण करण्यात आले असून, तीन महिलांमागे एका महिलेला जंतूसंर्गाचा त्रास होत असल्याची माहिती पुढे आली आहे. तीन तासातून एक लिटर पाणी पिणे शरीराला आवश्यक आहे. मात्र घराबाहेर पडल्यावर युरिनला जायला लागूच नये, म्हणून महिला पाणी पिणेच टाळत असल्याने त्याचे आरोग्याच्यादृष्टिने विपरित परिणाम होतात.

दृष्ट‌िक्षेप

महामार्गावरील बस थांब्यावर स्वच्छतागृहे अस्वच्छ

राज्य मार्गांवर स्वच्छतागृहाची सोयच नाही

स्वच्छतगृहांमध्ये पाणी, स्वच्छतेचा अभाव

प्रवासानंतर जंतूसंसर्गाचा त्रास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली गुन्हे अन्वेषणच्या आणखी चौघांवर संशय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

वारणानगरमधील कोट्यवधीच्या चोरी प्रकरणातील संशयित पोलिसांपैकी चौघांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांच्यासमोर शरण येण्याशिवाय पर्याय उरलेला दिसत नाही. काहींनी तपास अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न चालविल्याने एक-दोन दिवसांत ते सीआयडीसमोर शरण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही पोलिसांचा समावेश असल्याची चर्चा आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सध्या कार्यरत असलेल्यांपैकी चौघांबद्दल संशय व्यक्त होत आहे. त्यांची यापूर्वी व्यक्तिगत पातळीवर चौकशीही झाली आहे. विशेष म्हणजे संबधितांनी वारणेत जाऊन नव्हे तर मुख्य चोरटा मैनुद्दीन मुल्ला याच्या बेथेलहेमनगरमधील घरातील रकमेतीलच मोठा वाटा लांबवण्याची ‘कामगिरी’ केली असल्याची चर्चा आहे.

वारणानगरातील ९ कोटी १८ लाख रुपयाच्या नोटा पोत्यात भरुन आणल्याप्रकरणी सीआयडीकडून तपास सुरु आहे. या प्रकरणातील सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील आणि पोलिस नाईक रविंद्र पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज शनिवारी कोल्हापूर कोर्टाने फेटाळला आहे. सीआयडीने तपासात अधिक लक्ष घातल्यास पोलिस संशयितांची संख्या निश्चित वाढेल, असा दावा केला जात आहे.

फिर्यादीनेच केला चोरीच्या रकमेचा पाठलाग

वारणानगरमधील शिक्षक कॉलनीतील रक्कम चोरीला गेल्याची माहिती मिळाल्यानंतरही त्यावेळी फिर्यादी लवकर पोलिसांसमोर आला नसल्याची चर्चा आहे. नोटांच्या बंडलावर असलेले शिक्के पाहता ती रक्कम वारणा परिसरातीलच असल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु नेमके कशाचे पैसे दाखवायचे आणि किती होते म्हणून सांगायचे, याची अडचणी होती. त्यानंतर रकमेची मालकी सांगून फिर्याद दिल्यानंतर फिर्यादिंनी पोलिसांनी जप्त केलेली रक्कम कोर्टातून मिळवली आहे. त्यानंतर अधिक रक्कम गेल्याचे समजल्यानंतर मात्र फिर्यादीने स्वतःच रकमेचा पाठलाग करुन संशयित पोलिस अधिकाऱ्यांच्या गावांपर्यंत जाऊन त्यांच्या बँक खात्यांचा शोध घेतला. त्यानंतर फिर्याद दाखल केली, अशीही चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्ट अधिकाऱ्यांना केवळ लाल शेरा

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर ः पाणलोट व्यवस्थापन योजनेत गैरव्यवहाराचा ठपका असलेल्या ४७ ‌कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करताना मूळ सेवापुस्तकात कर्तव्यात कसूर केल्याचा केवळ लाल शाईचा शेरा मारून कारवाईचा फार्स केल्याचा प्रकार उघड झाला आहे. तीस कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात जिल्हा ‌कृषि अधीक्षकांनी ही मर्यादित कारवाई केली. संबंधित अधिकारी दोषी आढळल्यानंतर एक वर्षानंतर अशी किरकोळ दखल घेत प्रकरण गुंडाळण्याचाच प्रकार सुरू आहे. भ्रष्टाचार कोटींचा, नोंद लाल शाईची, असा हास्यास्पद पराक्रम अधिकाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, तारेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे धोबीघाट कामावर मंजूर तरतूदींपेक्षा जादा खर्च केल्याप्रकरणी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी जी. ए. डोईफोडे यांच्याकडून केवळ २० हजारांची वसूली करण्यात आली. केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यस्थापन (वसुंधरा पाणलोट) योजनेत ३० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वर्षापूर्वी राज्य अधिवेशनात झाली. त्यानुसार जिल्ह्यातील तक्रार झालेल्या २३ गावांतील कामांची चौकशी स्वतंत्र समितीने केली. तीत ४७ अधिकाऱ्यांवर गैरव्यवहार, गैरकारभार, कर्तव्यात कसूर असे ठपके ठेवले. दोषींवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे अहवाल ‌देण्यात आला. मात्र तो अहवाल कारवाईविना दाबून ठेवण्यात आला. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. खासदार राजू शेट्टी यांनीही यातील दोषींवर कारवाईची मागणी सातत्याने केली होती.

००००००

मोठ्या भ्रष्टाचाराची कबुली

जिल्हा ‌कृषि अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी कारवाईसाठी कृषी सहसंचालकांना पत्र दिले आहे. पाणलोट कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. यातील दोषी ४७ अधिकाऱ्यांच्या मूळ सेवा पुस्तकात कर्तव्यात कसूर केल्याची नोंद केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पत्रात भ्रष्टाचार झाल्याची अप्रत्यक्ष कबुलीच मास्तोळी यांनी दिल्याचे स्पष्ट होते. तरीही केवळ शेऱ्यापुरतीच कारवाई मर्यादित का ठेवली, त्याचे कोडे मात्र उलगडलेले नाही.

……….

४७ जणांवर शेरा

लाल शाईची नोंद असलेल्यांची नावे अशी ः तालुका कृषि अधिकारी आर. एम. राजमाने, एस. जी. निकम, पी. पी. पाटील, बी. डी. पाटील, मंडल कृषी अधिकारी डी. वाय. कांबळे, एस. एस. नांगरे, डी. ई. कांबळे, आर. के. उरणे, जी. एस. गोरे, डी. ए. गरगडे, एन. एम. पाटील, आर. पी. कामत, एन. एम. पाटील, एम. जी. कोरे, कृषी पर्यवेक्षक डी. व्ही. भांडवले, एस. व्ही. सानप, बी. ए. शिंदे, व्ही. बी. पाटील, एम. ए. आगा, ए. के. पाटील, सी. डी. सरदेसाई, डी. जे. कातकर, आर. व्ही. पाटील, एस. बी. बिरांजे, एम. आर. गावडे, डी. एम. बरकाळे, एस. एम. लाड, एल. एन. चौगुले, कृषी सहायक आर. बी. पाटील, पी. एन. खोपडे, एस. एस. गावडे, आर. बी. पाटील, आर. ए. होनगेकर, एम. डी. पाटील, एस. बी. पोवार, एस. एस. शेटे, एस. पी. कुंभार, बी. आर. जाधव, एम. एम. गायकवाड, एस. एम. डवरी, डी. जी. कुंभार, एस. आर. नाईक, बी. आर. पाटील, एम. टी. नलवडे, के. एम. लटके, के. जी. तामकर, एल. बी. हासुरे.

……………

पाणलोट योजनेत कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यातील दोषी अधिकाऱ्यांना पाठिशी घातले जात आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करणार आहे.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images