Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मी बांगड्या भरलेल्या नाहीत: उदयनराजेंचा संताप

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर सातारा व परिसरात तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी उदयनराजे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. 'भांडणं करून काही मिळणार नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांनी शांत राहावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मात्र, 'आम्ही बांगड्या भरल्या नाहीत,' असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानावेळी उदयनराजे जावळी तालुक्यातील खुर्शी मुरा गावी भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वसंत मानकुमरे यांनी ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. तर, मानकुमरे यांनीही उदयनराजे यांच्याविरोधात मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उदयनराजेंच्या समर्थकांनी मला आणि माझ्या पत्नीला धक्काबुक्की केली. त्यामुळंच चिडलेल्या जमावानं उदयनराजे भोसलेंच्या ताफ्यावर दगडफेक केली, असं मानकुमरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

भोसले बंधू आमने-सामने

या घटनेच्या निमित्तानं उदयनराजे व शिवेंद्रराजे हे दोन भोसले बंधू आमनेसामने आले आहेत. 'आमच्या ताफ्यावरील दडगफेकीत शिवेंद्रराजेंचाच हात असल्याचा दावा उदयनराजे यांनी केला आहे. तर, साताऱ्याचे खासदार हे दहशत माजवण्यासाठी जावळीत आले होते आणि त्यामुळंच लोकांनी राग व्यक्त केला,' असं प्रत्युत्तर शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चुरस...ईर्षा आणि गर्दी

$
0
0

कोल्हापूर ः प्रचंड चुरशीमुळे मतदारांना घरापासून केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड, दुपारी बारानंतर मतदारांच्या रांगा, शेवटच्या क्षणापर्यंत हात जोडून नमस्कार करणारे उमेदवार, असे चित्र गडमुडशिंगी जिल्हा प‌रिषद मतदारसंघात राहिले. काँग्रेसेचे आमदार सतेज पाटील आणि भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी येथे राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे या दोन नेत्यांचे कार्यकर्ते ईर्षेने मतदारांना केंद्रापर्यत आणताना दिसत होते.

शहरापासून जवळ असलेल्या मुडशिंगी जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसकडून वंदना पाटील, भाजपकडून रूपाली पाटील, शिवसेनेकडून अश्विनी वळीवडे रिंगणात आहेत. दोन्ही पंचायत समिती मतदारारसंघात प्रदीप झांबरे (काँग्रेस), संजय चौगुले (स्वाभिमानी), पोपट दांगट (शिवसेना), शोभा राजमाने (काँग्रेस), संगीता कुंभार (भाजप), वनिता व्हनबट्टे (शिवसेना) रिंगणात आहेत. काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांत चुरशीने लढत होत आहे.

मुडशिंगी, वसगडे, सांगवडे या मोठ्या गावात केंद्राबाहेर मंडप उभारून बूथ उभारले होते. तेथे मतदारांना यादीवरील नाव पाहून कोणत्या केंद्रातील कोणत्या खोलीत मतदान आहे, हे सांगितले जात होते. निवडणूक प्रशासनही स्वतंत्रपणे केंद्र सुरू करून यादीतील नावे शोधून देण्यास मदत करत होते. उमेदवार वंदना पाटील, रूपाली पाटील, अश्विनी वळीवडे या प्रत्येक केंद्रावर काही वेळ थांबून मतदारांना आवाहन करीत राहिल्या. पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार मात्र मुडशिंगी, वसगडे या दोन केंद्रावरच ठाण मांडून राहिले. दुपारी बारा वाजता शिवसेनेचे पदाधिकारी संजय पवार, शिवाजीराव जाधव, सुजीत चव्हाण, हर्षल सुर्वे यांनी केंद्रांना भेटी दिल्या. एक वाजता आमदार अमल महाडिक यांनी भेट दिली. काँग्रेसचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब माळी हेही केंद्रावर दिवसभर थांबून होते.

दरम्यान, नोकरदार मंडळी, उद्योजक सकाळी दहापूर्वीच मतदान करून बाहेर पडताना दिसले. शेतकरी, महिलांची गर्दी बारानंतर राहिली. चुरस असल्याने मुडशिंगी, वसगडे, सांगवडे मतदान केंद्रावर जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपनगर, शेतातील वस्तीत राहणाऱ्या मतदारांना आणण्यासाठी रिक्षा, ट्रॅक्स, सुमो अशा वाहनांची सोय मोठ्या प्रमाणात केली होती. काही कार्यकर्ते दुचाकीवरूनही मतदारांना आणत होते. बाहेरगावच्या मतदारांनाही केंद्रापर्यंत आणून सोडले जात होते. दुपारी दीडपर्यंत सर्वच केंद्रावर २० ते ३० टक्क्याच्या दरम्यान मतदान झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस मतदानाच्या संशयातून महेत मारामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महे (ता. करवीर) येथे बोगस मतदान केल्याच्या संशयातून दोन गटात जोरदार मारामारी झाली. या घटनेत राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सागर कांबळे यांच्यासह सातजण जखमी झाले आहेत. मंगळवारी (ता. २१) दुपारी हा प्रकार घडला. मारहाण करणाऱ्या आठ ते दहा जणांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

महेत बोगस मतदानानाची चर्चा सुरू होती. याची खात्री करण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते मतदान केंद्रात जमा झाले. वादावादीनंतर प्रकरण मारामारीवर गेले. दोन्ही गटातील कार्यकर्ते पोलिसांसमोरच भिडले. यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे करवीर तालुका मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष सागर कांबळे यांना मारहाण झाली. करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मतदान केंद्राच्या आवारात मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. या घटनेनंतर गावात प्रचंड तणाव होता. मोठ्या बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली.

दरम्यान, सागर कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘बोगस मतदानास अटकाव केल्यामुळे सरदार माने, नितीन इंगवले, गोरखनाथ माने, महादेव पाटील व आबासाहेब पाटील यांनी आपल्यावर हल्ला केला. यामध्ये माझ्यासह तानाजी कांबळे, समीर कांबळे, संदीप कांबळे, युवराज कांबळे, शहाजी कांबळे, संतोष कांबळे हे जखमी झाले. ज्यांनी हल्ला केला, त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देत आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काोल्हापुरात मतदानाचा टक्का वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी अत्यंत चुरशीने ७८ टक्के उत्स्फूर्तपणे मतदान झाले. २०१२ च्या निवडणुकीत ही टक्केवारी ७५. २४ टक्के होती. यावेळी सर्वाधिक मतदान गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यात ८६ टक्के झाले. तर सर्वांत कमी चंदगडमध्ये, ६९.३५ टक्के झाले. गुरूवारी (ता. २३) सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल. जिल्हा परिषदेच्या ६७ गटांसाठी ३२२ आणि पंचायत समितीच्या १३४ गणांसाठी ५८३ उमेदवार रिंगणात आहेत.

बानगे (ता. कागल) येथे पोलिसांचा सौम्य लाठीमार, कुशिरे तर्फे ठाणे (ता. पन्हाळा) येथे पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण आणि कोगे येथे केंद्रप्रमुखाला मारहाणीचा प्रकार घडला. मतदार यादीत नाव नसल्याने अनेक ठिकाणी गोंधळ उडाला तर नानीबाई चिखली (ता. कागल) जिल्हा परिषद मतदारसंघातील शिंदेवाडी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

महिला मतदारांचा सक्रिय सहभाग, गटातटाच्या राजकारणाची गणित मांडणारी कार्यकर्त्यांची फौज, उमेदवारांचे आश्वासन आणि पक्ष जाहीरनाम्यावर रंगलेली मतमतांतरे आणि निकालाचा कौल कुणाकडे झुकणार याची शिगेला पोहोचलेली उत्सुकता, अशा वातावरणात मतदान झाले. मंगळवारी सकाळी सातपासूनच मतदान केंद्रावर रांगा लागल्या. प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाडण्यासाठी एकेक मतदान मिळविण्यासाठी सर्मथकांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मतदान केंद्रावर गटागटाने मतदानासाठी गर्दी झाली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६०. ३४ टक्के मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजता जिल्ह्यातील काही केंद्राच्या खोलीत २०० ते २५० मतदार रांगेत होते. त्यामुळे मतदान प्रक्रिया रात्री साडेसातपर्यंत सुरू राहिली. २१ लाख ३८ हजार ८० मतदारांपैकी सायंकाळी चार वाजेपर्यंत १२ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.


बारा पोलिसांना विषबाधा

निवडणूक कामासाठी तैनात असलेल्या राज्य राखीव दलाच्या १२ जवानांना विषबाधा झाली. त्यांना सोमवारी रात्रीपासून त्रास सुरू झाला. उपचारासाठी त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांपैकी सहा जवानांवर उपचार करण्यात आले.


कॉन्स्टेबलला मारहाण

कुशिरे तर्फे ठाणे (ता. पन्हाळा) येथे मतदान केंद्रावर रांगेत जाण्याच्या कारणावरून कोडोली पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल अभिजित शिपुगडे यांना मारहाण करण्यात आली. मारहाणीत शिपुगडे जखमी झाले. या प्रकरणी कुशिरेचे सरपंच विष्णू पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकारामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला.


पोलिसांचा लाठीमार

बानगे (ता. कागल) येथे मतदान केंद्रात सायंकाळी साडेपाचनंतर प्रवेश दिला नसल्याच्या कारणावरून मंडलिक आणि मुश्रीफ गटांत वाद झाला. सायंकाळी पाचनंतर मुश्रीफ गटाच्या मतदारांना प्रवेश दिला नसल्याच्या कारणावरून गोंधळ सुरू झाला. त्यावेळी दोन्ही गटाच्या समर्थकांत वादावादी सुरू झाली. डीवायएसपी भारतकुमार राणे यांनी जमावावर सौम्य लाठीमार करण्याचा आदेश दिला. त्यानंतर जमाव पांगला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’ कार पुण्यात सापडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची चोरीला गेलेली कार अखेर पोलिसांना सापडली. तळवडे (जि. पुणे) येथील गॅरेजमधून पोलिसांनी कार जप्त केली असून, गॅरेजमालक जुबेर रज्जाक सय्यद (वय ३७, रा. तळवडे, ता. हवेल, जि. पुणे) याला अटक केली आहे. कार चोरणारा मनजितसिंग जोगिंदरसिंग मारवा हा साथीदारासह फरारी आहे. सय्यदच्या गॅरेजमधून आणखी एक कार पोलिसांनी जप्त केली. या घटनेत चोरीव्यतिरिक्त अन्य कोणताही हेतू नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अज्ञात चोरट्यांनी १६ फेब्रुवारी रोजी पहाटे रुईकर कॉलनीत एन. डी. पाटील यांची घरासमोर पार्क केलेली कार (एमएच ०९ बीएक्स ६९२९) लंपास केली होती. पोलिसांची तीन पथके कारचा शोध घेत होती. किणी आणि आणेवाडी टोल नाक्यावरून कार पुण्याकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील संशयितांकडे तपास सुरू केला. महामार्गावरील तळवडे परिसरात जुन्या कारच्या कागदपत्रांवर चोरीच्या कार विक्री केल्या जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सय्यदच्या गॅरेजची झडती घेतली. चौकशीत, सय्यद हा स्क्रॅप वाहनांच्या कागदपत्रांचा वापर करून चोरीच्या कार विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मूळचा दिल्लीतील मनजितसिंग मारवा हा साथीदारासह कारची चोरी करून तो सय्यदच्या गॅरेजमध्ये आणून देत होता. एन. डी. पाटील यांच्या कारचोरीची कबुली सय्यदने दिली. सय्यद आणि मारवा हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

या चोरीसाठी चोरट्यांनी वापरलेली कारही (एमएच १२ डीवाय ७३७९) पोलिसांनी जप्त केली आहे. त्या कारची नंबरप्लेट बदलल्याने तीही चोरीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने चार कार चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. सय्यदच्या गॅरेजसह गोडाउनमध्ये विक्रीसाठी ठेवलेले वाहनांचे सुटे पार्टही चोरीच्या वाहनांचे असल्याचा पोलिसांना अंदाज आहे. सय्यदला जिल्हा कोर्टात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तपासात वाहनचोरीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी व्यक्त केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनकर मोहिते, उपनिरीक्षक शरद माळी, सचिन पंडित, राजेंद्र सानप, राजेश आडसूळकर, श्रीकांत पाटील आदींनी कारवाईत भाग घेतला. या कामगिरीबद्दल अधीक्षकांनी पथकाला रोख बक्षीसही जाहीर केले.

स्क्रॅपच्या नावे चोरीची कार

गॅरेजमालक सय्यद याच्याकडून होणाऱ्या मागणीनुसार मनजितसिंग मारवा हा महागड्या कारची चोरी करायचा. स्क्रॅपसाठीच्या वाहनांची कागदपत्रे चोरीच्या कारसाठी वापरली जायची. कारच्या रंगातही तसाच बदल केला जायचा. एन. डी. पाटील यांची कारही सय्यदने विक्रीसाठी ठेवली होती. ग्राहक न मिळाल्यास कारचे पार्ट्स काढून विकण्याची तयारी त्यांची होती. कारचोरीचा सूत्रधार मनजितसिंग मारवा आहे. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

चर्चेला पूर्णविराम

एन. डी. पाटील यांच्या कारची चोरी झाल्यानंतर तर्कवितर्कांना ऊत आला होता. पोलिस तपासात या घटनेत चोरट्यांचा अन्य कोणताही उद्देश नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे उलटसुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपेक्षा विकासाची...

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

‘कचरा उठाव, सार्वजनिक स्वच्छता, पाण्याची मुबलकता, पाइपलाइनची देखभाल व दुरूस्ती, गटर्स स्वच्छता, सांडपाणी निचरा, रस्ते डागडुजी असे दैनंदिन जीवनातील किमान प्रश्न मार्गी लावणारा लोकप्रतिनिधी अपेक्षित आहे. मतदान करण्यासाठी बाहेर पडताना हाच विचार करून मतदान केंद्रावर आलो आहोत....’

वडगणे, शिये, मुडशिंगी, वाशी, पाचगाव, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी यासह प्रत्येक मतदान केंद्रावरील महिला व युवतींच्या प्रतिक्रियांतून हाच मुद्दा पुढे आला. दरम्यान मंगळवारी सर्व केंद्रांवर मतदानासाठी महिला व युवतींचा लक्षणीय सहभाग दिसला.

पाचगावमधील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रासमोर असलेल्या रांगेत दुपारी बाराच्या सुमारास सलग ७० ते ७३ महिलाच होत्या. त्यांच्याशी संवाद साधला असता पाण्याचा गंभीर प्रश्न समोर आला. आठवडाभर पाणी नसल्यामुळे महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो. प्रचारात पाण्याच्या मुद्द्यावर उमेदवारांनी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडवणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या निवडीसाठी मतदानाला पाचगावात महिलांचा प्रतिसाद दिसून आला. उजळाईवाडीतील प्राथमिक शाळा केंद्रातही मतदानासाठी महिलांची मोठी रांग होती. गटागटाने मतदानासाठी येणाऱ्या महिला, केंद्रात मतदानासाठी जाण्यापूर्वी सुरू असलेली महिलांची चर्चा असे चित्र मतदान केंद्राबाहेर लक्ष वेधून घेत होते.

महिला उमेदवारांच्या मतदारसंघात महिलांची गर्दी जास्त

जिल्हा परिषद अणि पंचायत समितीच्या ज्या मतदार संघात महिला उमेदवार रिंगणात आहेत ​तेथे महिला मतदारांची संख्या तुलनेने जास्त असल्याचे चित्र दिसून आले. महिला उमेदवारांनी घर ते घर प्रचार केल्याचा परिणाम महिला मतदारांची गर्दी वाढण्यावर झाल्याचे दिसून आले. तसेच महिला उमेदवारांसाठी मतदानाची यंत्रणा राबवण्याचे काम करण्यातही महिला कार्यकर्त्या सक्रिय होत्या.


तरुणाईचे प्रतिनिधी

वडणगे येथे आजच सकाळी डिस्चार्ज मिळालेल्या वंदना तांबेकर ही पाच दिवसांची बाळंतीण दवाखान्यातून थेट मतदानासाठी आली. तर अर्धांगवायू झालेल्या सोनाबाई खापे या नातवासोबत मुडशिंगी मतदान केंद्रावर आल्या. आजीबाई मतदारांनी नातीचे बोट धरून मतदानाचा हक्क बजावला. बारावीच्या परीक्षेच्या अभ्यासातून ब्रेक घेत दीपाली सोनटक्के, अपूर्वा कांबळे, सुनेत्रा माने या मैत्रिणींनी मतदान करत तरूणाईचे प्रतिनिधीत्व केले. उजळाईवाडी येथे सुप्रिय आणि सु​चित्रा माने या बहिणींनी मतदान केल्यानंतर अशिक्षित महिलांना मतदान कसे करायचे याची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वस्तू शंभरची, खरेदी हजाराला

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com
Tweet:@Appasaheb_MT

कोल्हापूर : महापालिकेचा वर्कशॉप विभाग म्हणजे ‘हम करे सो कायदा’ या पध्दतीने काम करणाऱ्या तत्कालीन अधिक्षक एम. डी. सावंत यांनी आपल्या कार्यकाळात शंभर रुपयांची वस्तू एक हजार रुपयांना खरे​दी केल्याचा प्रकार चौकशी अहवालात उघड झाला आहे. ५६ कंटेनरची दुरुस्ती एस्टीमेट न करता त्यावर १ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च केला आहे. सावंत यांच्याबाबतचा १९ तक्रारींची तांत्रिक तपासणी करुन त्यांच्यावर तीन लाख २७ हजार ७५५ रुपयांची वसुली निश्चित केली आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसह स्थायी समितीच्या सभेत वर्कशॉप विभागातील गैरकारभाराचा पंचनामा करण्यात आला. तत्कालिन अधिक्षक एम. डी. सावंत यांच्या चौकशीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला लक्ष्य केले होते. सभागृहाच्या भावना विचारात घेत आयुक्त पी. शिवशंकर यांनी सावंत यांच्या चौकशीचा निर्णय घेतला. सावंत यांच्यासंबंधी विविध प्रकारच्या तक्रारी झाल्या. त्यामुळे त्यांच्या कारभाराची दोन टप्प्यांत चौकशी झाली. शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागामार्फत तां​​त्रिक चौकशीही करण्यात आली. महापालिकेच्या लेखा परीक्षण विभागामार्फत सावंत यांच्या कालावधीत झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारांसह दुरुस्तीचा हिशेब मांडण्यात आला. चौकशी अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला.

विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाच्या तां​त्रिक चौकशी अहवालात विशिष्ट बाबींवर प्रकाशझोत टाकला आहे. त्यात वर्कशॉपसाठीच्या मटेरिअलची बाजारभावानुसार १०० रुपये किंमत असताना १००० रुपये दराने खरेदी दाखविली आहे. महत्वाचे म्हणजे एखाद्या कंपनीकडून वस्तूंची खरेदी अत्यावश्यक असताना मर्जीतील पार्टीकडून वस्तू घेतल्या आहेत. ५६ कंटेनर दुरुस्तीचा खर्चही अवाजवी दाखवला आहे. इस्टीमेट न करता आणि वरिष्ठांच्या मान्यतेशिवाय दुरुस्ती प्रक्रिया राबविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कंटेनर दुरुस्तीवर १ लाख ६९ हजार ९३१ रुपयांचा खर्च दाखवला आहे. खर्च रक्कमेच्या चाळीस टक्क्यांत संपूर्ण वाहनांची दुरुस्ती अपेक्षित होती. चेस दुरुस्तीच्या हिशोबातही तफावत आहे.

गरज नसताना गिअर बदलला

महापालिकेकडील बूम गाडीचा गिअर सुस्थितीत असताना तो खराब दाखविण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. मर्जीतील पार्टीकडून गिअर तयार करुन घेतला असे चौकशी अहवालात म्हटले आहे. यासाठी ६५ हजार रुपये खर्च पडले आहेत. गरज नसताना गिअर दुरुस्तीचा खटाटोप झाला. याप्रकरणी ४५ हजार रुपयांची वसुली निश्चित करण्यात आली आहे. जेसीबीसाठी नवीन टायर, स्पेअर पार्टस खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या सर्व टायर, स्पेअर पार्टसच्या नोंदी वर्कशॉपकडे नाहीत असे आढळले आहे. याप्रकरणी ३२ हजार ८५० रुपये वसूल केले जाणार आहे.

४६ हजारांची सीटकव्हर खरेदी

महापालिकेच्या एका पदाधिकाऱ्याच्या मोटारीतील सीटकव्हर बदलण्याचा विषय गाजला होता. नव्याच वाहनांतील सीट कव्हर बदलण्यासाठी ४५ हजार ९९९ रुपये खर्च झाल्याचे दाखवले. सीट कव्हर बदलात गोलमाल झाल्याचा आरोप सभागृहात झाला होता. दोन वर्षांपूर्वी फिरते शौचालय दुरुस्तीसाठीही लाखो रुपयांचा खर्च दाखविण्यात आला. मात्र याची कागदोपत्री नोंद नाही. आरसी वाहनांसाठी आवश्यक हायड्रोलिक मोटारची किंमत सात ते आठ हजार रुपये असताना जादा दराने त्याचीही खरेदी केल्याचे चौकशीत पुढे आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उचगावात मतदारांची दमछाक

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

उचगावमधील कन्या कुमार विद्यालय. मतदान केंद्राच्या सर्वाधिक अकरा खोल्या असलेले मुख्य केंद्र. तेथील मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर मतदाराला नेमक्या कोणत्या खोलीत जायचे हेच सापडत नव्हते. त्यामुळे एकेक करत तेथील दोन तीन केंद्राच्या मतदार याद्या तपासायच्या. त्यातही नाव सापडत नसल्याने शेवटी वैतागून ‘कशाला हे मतदान?’ म्हणत अनेक मतदार केंद्रावरुन मागे फिरायचे. ज्यांना मतदान करायचे आहे, ते चिकाटीने नाव शोधत होते. त्यासाठी गावातील एका मतदान केंद्रावरुन दुसऱ्या केंद्रावर हेलपाटे मारावे लागत. या हेलपाट्यांमुळे रणरणत्या उन्हात मतदारांना प्रचंड त्रास करावा लागल्याचे चित्र होते. या केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची मोठी फौज होती. पण, अनेकदा तेही नाव शोधण्यासाठी हतबल झाल्याचे पहायला मिळत होते.

पाटील व महाडिक गटाच्या राजकारणामुळे संवदेनशील असलेले व त्यातच शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने चुरशीच्या बनलेल्या उचगाव जिल्हा परिषद मतदार संघातील उचगाव हे मोठ्या मतदार संख्येचे गाव असल्याने नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांनी कन्या-कुमार विद्यालयाच्या मतदान केंद्रांवरच लक्ष केंद्रीत केले होते. उचगावच्या मुख्य रस्त्यावर कार्यकर्त्यांनी बूथ लावले होते. तिथे मतदार यादीत नावे शोधून चिठ्ठ्या दिल्या जात होत्या. पण, त्यावर यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमणिका क्रमांक टाकला जात होता. पण, संबंधित मतदान नेमके कुठे आहे हे सांगितले जात नव्हते. त्यामुळे शाळेत मतदान आहे असे समजून येणाऱ्या मतदारांना तिथून ग्रामपंचायत कार्यालयातील मतदान केंद्रात जावे लागत होते. काही मतदारांना तर ग्रामपंचायतीत जाऊन तिथे नाव नाही, असे ऐकून परत उचगाव शाळेतच यावे लागत होते. या प्रकारामुळे धडधाकट नागरिक वैतागून जात होते. महिला व ज्येष्ठ नागरिक नको या फेऱ्या, असे म्हणत देवालयासमोरील झाडांखाली बसून नाव शोधायला कार्यकर्त्यांना पाठवल्याचे चित्र पहायला मिळत होते.

नावे शोधून देण्यासाठी सरकारी यंत्रणा होती. पण तिथेही हा भाग या टेबलवर नाही, त्या टेबलवर असे सांगत तेथील वेगवेगळी टेबल मतदारांना फिरायला लागत होती. राजकीय कार्यकर्त्यांनी कोणती मतदार यादी कोणत्या मतदान केंद्रावर आहे याची माहिती घेतली नसल्याने त्यांना सरकारी यंत्रणेवर अवलंबून रहावे लागत होते. त्यामुळे मतदारांच्या पदरात हेलपाटेच येत होते. त्यामुळे केंद्राच्या आवारात मतदान शोधणारे मतदार मोठ्या प्रमाणावर होते. मणेर मळा, निगडेवाडी, गांधीनगर, सरनोबतवाडी केंद्रांवर मात्र असे प्रकार फार झाले नाहीत. कन्या-कुमार विद्या मंदिरात मतदानाची संख्या मोठी असल्याने मंगेश्वर देवालयाचा चौक दिवसभर गजबजून गेला होता. मतदारांना ने आण करण्यासाठी वाहन व्यवस्था केली होती. त्यामुळे केंद्र परिसरात वाहनांची संख्या मोठी होती. त्यापाठोपाठ मणेर मळा येथील केंद्रावर चांगली गर्दी होती. मतदारांपेक्षा बुथवर असलेल्या कार्यकर्त्यांची संख्याच जास्त होती. केंद्र एकाबाजूला व वस्ती दूरवर असल्याने मतदारांना आणण्यासाठी रिक्षांचा वापर केला जात होता. गांधीनगरमध्ये निगडेवाडीसह तीन शाळा अशी चार मतदान केंद्र होती. पण तिथे मतदारांची रांग असलेले चित्र फारच कमी पहायला मिळत होते.

आमदारांची फिरती व नगरसेवकांचा ठिय्या

शहरालगतचे व दक्षिण मतदार संघातील महत्त्वाचे गाव असल्याने उचगावमध्ये आमदारांनी फिरती केलीच. शिवाय महापालिकेतील पाटील, महाडिक गटांचे नगरसेवक व कार्यकर्ते गावातील मतदार केंद्रांवर थांबून होते. दिवसभरात येथे आमदार सतेज पाटील व आमदार अमल महाडिक यांनी भेटी दिल्या. सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हेही उचगावमधील केंद्रांबरोबर इतर केंद्रांवर सतत फेरी मारत होते. पाटील गटाचे महापालिकेतील उपमहापौर अर्जुन माने, सभागृह नेते प्रविण केसरकर, नगरसेवक प्रताप जाधव, बनसोडे यांना उचगावच्या केंद्रावरच थांबण्यास सांगितले होते. तर महाडिक गटाचे नगरसेवक सत्यजीत कदम तसेच राजारामपुरीतील कार्यकर्ते रहीम सनदी उपस्थित होते. शिवाय गावातील दोन्ही गटाचे स्थानिक नेत्यांची मतदारांना आणण्यासाठी धडपड होती.

शिवसेनेचेही बारीक लक्ष

दक्षिणमधील मतदार संघांमध्ये ज्याप्रमाणे काँग्रेस व भाजपची यंत्रणा राबत होती. त्याप्रमाणे शिवसेनेनेही चांगली फिल्डींग लावली होती. ​जिल्हाप्रमुख संजय पवार, सुजीत चव्हाण यांनी शिवसैनिकांचे गट करुन विविध मतदार संघातील केंद्रांची जबाबदारी दिली होती. त्यानुसार हे गट संबंधित केंद्रांवर जाऊन आढावा घेत होते. कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत होते. स्वतः पवार व चव्हाण हे फिरताना दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कागलमध्ये कमालीची चुरस

$
0
0

कागल

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने ८२ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात दहा वाजेपर्यंत तालुक्यात वीस ते पंचवीस टक्के मतदान झाले होते. नंतर मतदनाचा टक्का वाढत गेला. परंतु सिध्दनेर्ली, बोरवडे, सांगाव वगळता कासारी परिसर आणि नानीबाई चिखली मतदार संघात येणाऱ्या मुरगूड परिसरात मतदारांमध्ये तसेच कार्यकर्त्यांध्ये उत्साह दिसून आला नाही. एकंदरीत ज्या गावातील उमेदवार, त्या गावात मतदानाची इर्षा अधिक होती. तालुक्यातील संवेदनशील मतदार केंद्रांवर आमदार हसन मुश्रीफ, प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, समरजीतसिंह घाटगे, रणजीत पाटील यांनी भेटी दिल्या. शिंदेवाडी शाहूनगर येथे ४९२ मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. समरजीतसिंह घाटगे यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर येथील मतदारांनी मतदान केले होते.

तालुक्यातील सिध्दनेर्ली जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचंड ईर्षा दिसून आली. कार्यकर्ते एकेक मत वेचून मतदानासाठी आणत होते. हे मतदान आपल्याच बाजूला मिळण्यासाठी धडपड सुरु होती. यासाठी चारचाकी वाहनांचा प्रचंड वापर झाल्या. गावात प्रवेश करतानाच बाहेगावाहून आलेल्या मतदारांना तसेच गावातील मतदारांना उमेदवाराची माहिती देवून चिन्हाचा ‘अर्थ‘ स्पष्ट केला जात होता. बोरवडे मतदार संघात पांडुरंग धोंडीराम चव्हाण (वय ८७) या वृध्दाने खुर्चीतून बसून येवून मतदान केले. या ठिकाणी मुरगूड पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज फराकटे हे ठाण मांडून बसले होते, तर शिवसेनेचे उमेदवार विरेंद्र मंडलिक व अपक्ष भूषण पाटील यांनी मतदान केंद्राची पहाणी केली. कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचलेला होता. महिला व युवती मोठ्याप्रमाणात ग्रुपने मतदानासाठी बाहेर पडल्या होत्या.

सेनापती कापशी मतदार संघाच्या परिसरात माद्याळ आणि कापशीच्या उत्तर भागात प्रचंड ईर्षा दिसून येत होती. एकेक मतासाठी कार्यकर्ते पळापळ करताना दिसत होते. परंतु कासारी, हसूर परिसरात म्हणावी तशी ईर्षा दिसलीच नाही. कासारीच्या केंद्रावर तर सकाळी ११ वाजता पूर्णपणे शुकशुकाट होता.

कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदार संघात सकाळपासून मतदान शांततेत सुरु होते. सकाळी साडेआकरा पर्यंत मतदारांनी उत्साहात मतदान केले. सकाळी बारापर्यंत सुमारे चाळीस टक्के मतदान झाले होते. दुपारच्या सत्रात मतदारांचा थोडा उत्साह कमी जाणवला. नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदारसंघात शांततेत मतदान झाले.

------------------

चौकट

बहिष्कारानंतर मतदान

शिंदेवाडी येथील शाहूनगर येथील ४९२ मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. यमगे मतदारसंघातील या परिसरात गटार, पाण्याची टाकी, रस्ते, स्मशानभूमी आदी कोणत्याच सुविधा नाहीत. शंभर टक्के द्रारिद्रयेरेषेखाली शाहूनगरमधील नागरिकांची द्रारिद्येरेषेखालील यादीत नोंद नाही. म्हणून या नागरिकांनी काळा झेंडा दाखवत मतदानावर बहिष्कार टाकला होता. दुपारी अडीच तीनच्या सुमारास विजय पाटील, सुनिल शेलार, राजू दरेकर, संजय वड्ड, नामदेव वंदूरे, प्रशांत कांबळे, शिवाजी भिके, रामा नरके, विलास चौगुले यांच्याशी समरजीतसिंह घाटगे यांनी चर्चा केली. ‘तुम्ही मतदान कुणालाही करा, पण मतदानाचा हक्क बजावा,’ असे आवाहन घाटगे यांनी नागरिकांना केले. यानंतर येथील नागरिकांनी मतदान केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकरमान्यांमुळे चंदगडमध्ये टक्का वाढला

$
0
0

चंदगड

चंदगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चुरशीने आणि शांततेत मतदान झाले. मतदार राजाने सकाळच्या सत्रात मतदानासाठी गर्दी केली होती. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी दोन वाजेपर्यंत चंदगड तालुक्यात पन्नास टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. माणगाव व तुडये जिल्हा परिषद मतदारसंघात कमालीची चुरस असल्याने या ठिकाणी एकेका मतासाठी धावपळ दिसत होती. या निवडणुकीमध्ये मतदारांच्यामध्ये उत्साह होता.

चंदगड तालुक्यात १८६ मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. मतदाराला आणण्यासाठी उमेदवारांनी दुचाकी व चारचाकी गाड्यांची व्यवस्था केली होती. निवडणुकीला उभारलेले उमेदवार स्वत: प्रत्येक मतदाराची आवर्जून चौकशी करत होती. सकाळच्या सत्रात शक्य तेवढ्या मतदारांच्या घरी जावून उमेदवार आवर्जून मतदान करण्यासाठी सांगत होते. स्मार्टफोनच्या युगात अनेकाकडे स्मार्टफोन आला आहे. या गोष्टीचा विचार करुन सरकारच्या वतीने मतदान यादीतील नाव बघण्यासाठी ‘ट्रू व्होटर’ या मोबाईल ॲपची सोय केली होती. त्यामुळे मतदारयादीतील नाव शोधण्यासाठीचा वेळ वाचला. दिवसभर मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी भ्रमणध्वनीवरुन नियोजन करत होते. प्रत्येक तासाला मतदार यादी तपासून त्यामध्ये कोण राहिले आहे का, याची खात्री केली जात होती. राहिलेल्यांना प्रत्यक्ष भेटून व मोबाईलवरुन संपर्क करुन मतदान करण्यासाठी सांगितले जात होते.

चंदगड शहरातील सर्वांत जास्त उमेदवार असल्यामुळे चंदगडमध्ये मतदानावेळी चढाओढ दिसून आली. जि. प. साठी काँग्रेसमधून सचिन बल्लाळ, दौलत विकास आघाडीतून आनंदा हळदणकर, शेकापमधून आशीष कुतिन्हो व भारीपमधून श्रीकांत कांबळे तर पंचायत समितीसाठी युवक क्रांती आघाडीतून दयानंद काणेकर, शिवसेना फिरोज मुल्ला, काँग्रेस प्रविण वाटंगी यांच्यासह अन्य उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवार मतदान केंद्रावर दिवसभर फेऱ्या मारताना दिसत होते.

मतदानासाठी सकाळच्या सत्रात महिलांनी गर्दी केली होती. मतदानानंतर महिला वर्ग शेतीच्या कामासाठी जात होता. सर्व सरकारी कार्यालये बंद असल्यामुळे व लोक मतदानामध्ये गुंतल्याने चंदगड बाजारापेठेत शुकशुकाट होता. मतदान केंद्राच्या नियंत्रण रेषेबाहेर उमेदवारांचे प्रतिनीधी व कार्यकर्ते ग्रुपने चर्चा करताना दिसत होते. कोवाड परिसरात सकाळ व दुपारच्या सत्रात मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. त्यामुळे येथे लांबच-लांब रांगा दिसत होत्या. पहिल्यांदाचा मतदानाचा हक्क बजावणारे नवखे मतदार ग्रुपने मतदानासाठी जात होते. मतदान केल्यानंतर मतदान प्रक्रियेबाबत ग्रुपमध्ये चर्चा रंगत होती.

...

चौकट

यात्रांनंतर लगेच मतदान

तालुक्यात सध्या यात्रांचा हंगाम जोरात सुरु आहे. या यात्रांना कामानिमित्त परगावी असलेले चाकरमानी हमखास गावाकडे येतात. यात्रेनंतर मात्र दोन दिवसात ते पुन्हा कामावर रवाना होतात. यावेळी मात्र यात्रेनंतर लगेचच जि. प. व पं. स. निवडणुका आल्याने अनेकांनी आपली सुटी वाढवून घेत पहिल्या टप्यात मतदानाचा हक्क बजावून कामावर निघून गेले. त्यामुळे यावेळी मतदानाचा टक्का वाढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर झेडपी राष्ट्रवादीकडेभाजपची जोरदार मुसंडी

$
0
0



सुनील दिवाण, पंढरपूर

सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्ता राखताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची दमछाक झाली. आता राष्ट्रवादीला काँग्रेस आणि शेकापच्या कुबड्या घेऊन काठावरच्या बहुमतावर पाच वर्षे कारभार करावा लागणार आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून एकट्याच्या जीवावर सोलापूर जिल्हा परिषदेच्या सत्ता आणणाऱ्या राष्ट्रवादीला यंदा केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसचे ७ आणि शेकापचे ३ यांची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापनेसाठीचा ३५चा जादुई आकडा गाठता येणार नाही. गेल्यावेळी एकही जागा नसलेल्या भाजपने सोलापूर जिल्हा परिषदेत जोरदार मुसंडी मारीत आपल्या मित्रांसह १९ जागा मिळविल्या. शिवसेनेने आपल्या मित्रांसह दहा जागांचा टप्पा गाठला. पक्षीय बलाबल राष्ट्रवादी आघाडीला सत्ता मिळवून देणारे दिसत असले तरी राष्ट्रवादीतील मोहिते पाटील आणि बबन शिंदे यांच्यातील गटबाजीतच अध्यक्षपदावरून एकमत न झाल्यास भाजप आघाडीला अलगत सोलापूर जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चाव्या मिळणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सध्या विरोधात असलेले आणि बबन शिंदे यांचे भाऊ संजय शिंदे मोठे दावेदार मानले जात असून, यास मोहिते पाटील गटाचा विरोध असल्याने आजची आकडेवारी अध्यक्षपदाच्या निवडीपर्यंत उलटी पलटी झालेली दिसणार आहे. याची सुरुवात आजच्या निकालापासूनच सुरू झाली असून, संजय शिंदे यांनी अध्यक्षपदासाठी जुळवाजुळविला सुरुवात केली आहे. या नवस फार विरोध झाल्यास आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांचे नाव पुढे करण्याची तयारी आताच सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरस आणि माढा तालुक्यात पक्षाने भरघोस यश मिळविले असून, मोहिते-पाटील यांनी ११ पैकी ८ तर आमदार बबनदादा शिंदे यांनी सर्व सात जागांवर आपली ताकद दाखवून दिली आहे. माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे यांच्या घराणेशाहीबाबत आरोप होऊनही मोहिते पाटील यांच्या घरातील सर्व चार आणि शिंदे यांच्या घरातील देखील सर्व चारही उमेदवारांना जनतेने भरघोस मताने विजयी केले आहे. मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीला महाडिकांच्या भीमा परिवाराने आव्हान देत निम्म्या जागा पटकावला आहेत. माळशिरस पंचायत समितीवर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीची सत्ता आणली आहे. माढा पंचायत समितीमधील सर्व १४ जागा राष्ट्रवादी जिंकून एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे माढा पंचायत समितीमध्ये आता विरोधकच असणार नाही.

सांगोल्यात शेकापचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी ७ पैकी ५ जागा जिंकत शिवसेनेला रोखले आहे . सांगोला पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांनी १४ पैकी १२ जागा जिंकत आपली सत्ता अबाधित ठेवली आहे . करमाळ्यात मात्र शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी आपल्या झंझावातात राष्ट्रवादीचे पानिपत करून ५ पैकी ४ जागी जिंकल्या आहेत. करमाळा पंचायत समितीवर देखील आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली १० पैकी ८ जागा जिंकत भगवा फडकला आहे.

पंढरपूरमध्ये झेडपीच्या ८ पैकी ७ जागा जिंकत कार्यकर्त्यांनी पुन्हा परिचारकांवर आपला विश्वास व्यक्त केला आहे. पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ यांचा कासेगाव गटातून निसटता पराभव झाल्याने येथे एकही जागा न मिळाल्याची नामुष्की भालकेंवर आली. पंढरपूर पंचायत समितीवर देखील भाजपाची सत्ता आली असून १६ पैकी १२ जागांवर भाजपाला भरघोस यश मिळाले आहे.

बार्शी तालुक्यातील सेनेच्या राजा राऊत यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथील मतदान फारच चुरशीची झाले होते. मात्र राऊत यांनी बार्शीतून भाजपच्या तीन जागा जिंकत पंचायत समितीवर भाजपची सत्ता आणली. अक्कलकोटमध्ये लढतीत काँग्रेसने सहापैकी तीन जागा पटकाविल्या, मात्र, पंचायत समितीमध्ये काँग्रेस सहा भाजप चार आणि अपक्षांना दोन जागा मिळाल्याने सत्तेसाठी घोडेबाजार वाढणार आहे. मंगळवेढ्यात काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके आणि भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक याना मतदारांनी जोरदार दणका देत शिवसेना पुरस्कृत समाधान आवताडे गटाला चार पैकी तीन जागी विजयी केले आहे. मंगळवेढा पंचायत समितीवर देखील आवताडे यांच्या आघाडीला आठपैकी पाच जागी विजय मिळाल्याने दामाजी साखर कारखान्या पाठोपाठ आवताडे यांची पंचायत समितीवर देखील सत्ता आली आहे.

...........

सोलापूर जिल्हा परिषद ( एकूण जागा ६८ )

राष्ट्रवादी- २५

भाजप+आघाड्या-१९

शिवसेना - +आघाड्या-१०

शेकाप-३

भीमा परिवार-३

कॉँग्रेस-७

अपक्ष-१


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​साताऱ्यात पुन्हा राष्ट्रवादी

$
0
0



अतुल देशपांडे, कराड

सातारा जिल्हा परिषदेच्या ६४ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागांवर विजय मिळवित पुन्हा आपली हुकुमत प्रस्थापित केली आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात या वेळी भाजपने सहा जागांवर विजय मिळवित चंचूप्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपच्या या मुसंडीचा भविष्यातील राजकीय उलथापालथीची नांदी झाल्याचे मानले जावू लागले आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण ६४ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ४१, काँग्रेस ७, भाजप ६, सातारा विकास आघाडी ३ अपक्ष २, पाटण विकास आघाडी १, कराड विकास आघाडी १ व अन्य ३, असे पक्षीय बलाबल झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा एकदा जि. प. वर आपला झेंडा फडकविला आहे. मात्र, या वेळी केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची करीत जि. प. व पं. स. साठी पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. पश्चिम महाराष्ट्र आणि भाजपा-सेना, असे व्यस्त राजकीय समीकरण असतानाही या वेळी भाजपाने सर्व पर्यायांचा वापर करीत पक्षाची बीजे रोवण्याचा चांगला प्रयत्न केला. त्यामुळेच जि. प. मध्ये तब्बल सहा जागांवर विजय मिळवित स्थानिक स्वराज्य संस्थांतील आपले स्थान भक्कम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडत प्रस्थापितांना धक्का दिला आहे.

सातारा जिल्हा परिषद बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस- ४१

काँग्रेस- ७

भाजप- ६

सातारा विकास आघाडी ३

अपक्ष २

पाटण विकास आघाडी १

कराड विकास आघाडी १

अपक्ष ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावंतांची खातेनिहाय चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या वर्कशॉप विभागातील तत्कालीन अ​धीक्षक एम. डी. सावंत चार प्रकरणांत दोषी आढळले आहेत. त्यांनी केलेल्या गैरकारभाराची पुन्हा खातेनिहाय चौकशी करुन चौकशी अहवालानुसार निश्चित केलेली रक्कम वसूल करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्थायी समिती सभेत स्पष्ट केले. तर स्थायी सदस्यांनी, सावंत यांच्या गैरकारभाराचे वाभाडे काढताना त्यांना निलंबित करण्याची सूचना केली. स्थायी सभापती संदीप नेजदार यांनी सावंत यांच्या संदर्भातील अन्य मुद्यांची फेरचौकशी करण्याचे आदेश दिले.

सावंत यांच्या कारकीर्दीत वर्कशॉप विभागात मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याच्या तक्रारी आहेत. नगरसेवकांनी सभागृहात हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी सावंत यांच्या चौकशीचे आदेश दिले. लेखापरीक्षण विभाग व शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागातर्फे दोन टप्प्यात चौकशी झाली. तक्रारीच्या १९ मुद्यांपैकी चार प्रकरणात सावंत दोषी आढळले आहेत. जादा दराने स्पेअर पार्टसची खरेदी, दरात तफावत, निविदा प्रक्रिया न राबविता वस्तूंची खरेदी केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याकडून तीन लाख २७ हजार ७५५ रुपये रक्कम वसूल करावी, असे चौकशी अहवालात म्हटले आहे.

बुधवारी झालेल्या स्थायी सभेत सदस्यांनी सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई का केली नाही अशी विचारणा केली. वर्कशॉपमधील कामावरुन स्थायी समितीत अनेक मुद्दे उपस्थित केले होते. दोषी असणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. चेतन शिंदेवर कारवाई केली, मग सावंत यांच्यावर कारवाई का नाही? बिसुरे यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी नगरसेवकांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठाच्या मंजुरीची जबाबदारी सरकारचीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘देशातील दमनशक्तीसमोरही लोकशाही आणि जनेतची सनदशीर लढाई यशस्वी ठरली आहे. खंडपीठ आंदोलन हीसुद्धा न्यायासाठी प्रदीर्घ काळ चाललेली लढाईच आहे. कोल्हापुरातील खंडपीठाला (सर्किट बेंच) मंजुरी देणे ही सरकारचीच जबाबदारी आहे. दमनशक्तीचा वापर करून जबाबदारी टाळता येणार नाही’, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी केले. खंडपीठासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणात ते बोलत होते. बुधवारी (ता. २२) सर्वपक्षीय कृती समितीने उपोषण करून खंडपीठाचा नारा दिला.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू होईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कोल्हापुरातील जाहीर सभेत दिले होते. या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने खंडपीठ कृती समितीने १ नोव्हेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलनात सहभागी होत बुधवारी उपोषण केले. सायंकाळी उपोषणाची सांगता ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

एन. डी. पाटील म्हणाले, ‘लोकशाहीमध्ये मोर्चे, आंदोलने हा मार्ग सनदशीर आहे. खंडपीठासाठी आंदोलन का करता? अशी विचारणा करणे म्हणजे आंदोलन दडपण्याचाच प्रकार आहे. दमनशक्तीला अहिंसक लढ्याने उत्तर देऊन राज्यकर्त्यांच्या खुर्चीला कंप भरवण्याची ताकत आंदोलकांकडे आहे. २६ तारखेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. खंडपीठ मंजूर करण्याची जबाबदारी सरकारचीच असल्याने ही जबाबदारी ते टाळू शकणार नाहीत.’

महापौर हसीना फरास म्हणाल्या, ‘खंडपीठासाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महानगरपालिकेने स्वीकारली आहे. यासाठी पाठपुरावादेखील सुरू आहे. वेळ पडल्यास मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचीही महापालिकेची तयारी आहे.’

सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी उपस्थितांना आंदोलनाची पुढील दिशा सांगितली. खासदार धनंजय महाडिक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन खंडपीठासाठी केंद्रात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, महापौर हसीना फरास, भाजपचे शहर अध्यक्ष संदीप देसाई, निवास साळोखे, बाबा पार्टे, माजी महापौर वंदना बुचडे, प्रतिभा नाईकनवरे, चंद्रकांत यादव, लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे सुभाष जाधव, सिटिझन फोरमचे प्रसाद जाधव आदींनी उपोषणात सहभाग घेतला. खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. प्रकाश मोरे, उपाध्यक्ष अरुण पाटील, सचिव सर्जेराव खोत, महादेवराव आडगुळे, विवेक घाटगे, आदी वकील उपस्थित होते.

रविवारी पालकमंत्र्यांसोबत बैठक

रविवारी (ता. २६) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सर्वपक्षीय कृती समितीची बैठक होणार आहे. शासकीय विश्रामगृहाता दुपारी १२ वाजता ही बैठक होईल. खंडपीठासाठी सरकारची भूमिका नेमकी काय आहे, याबाबत पालकमंत्र्यंना विचारणा केली जाईल. केवळ कोल्हापुरातील खंडपीठासाठीचा निर्दोष ठराव, मुख्यमंत्र्यांची भेट आणि आर्थिक तरतूद याचा आग्रह बैठकीत धरला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईत कर्मचाऱ्यांचे तोडपाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू समाधीस्थळाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी १ कोटी आठ लाख रुपयांच्या कामांला स्थायी समितीच्या सभेत बुधवारी मंजुरी दिली. मात्र, समाधीस्थळाच्या इस्टीमेटमध्ये फौंडेशनचा खर्च वाढला आहे. समाधीस्थळाच्या वाढीव रकमेस कन्सल्टंटना जबाबदार धरून रक्कम वसूल करावी अशा सूचना सदस्यांनी केल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती डॉ. संदीप नेजदार होते. सभेत कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर कारवाई करताना काही आरोग्य कर्मचारी दुकानदारांना जादा दंड सांगतात आणि तोडपाणी करुन परस्पर प्रकरणे मिटवतात असा आरोप सदस्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करुन कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश प्रशासनाने दिले.

स्थायी समिती सभेत शाहू समाधीस्थळाचा विषय गाजला. समाधीचे काम जलदगतीने पूर्ण झाले पाहिजे ही सर्वांची भावना असताना दोन वर्षांनी वाढीव खर्चाचा विषय का आणला? मुळात कोणाच्या अधिकारात वाढीव कामास मंजुरी दिली? प्रकल्प अंमलबजावणीत कन्सल्टंटची चूक होत असेल तर कन्सल्टंट पद्धत बंद करा. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कामे करुन घ्या अशा भावना यावेळी सदस्यांनी मांडल्या.

दरम्यान, ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरावर पूर्ण बंदी असताना उत्पादन व विक्री करणाऱ्यावर फौजदारी दाखल करा. प्लास्टिक पिशव्या जप्तीच्या नावाखाली हप्ता वसुली सुरू आहे. लक्ष्मीपुरीतील संबंधित दुकानदाराकडे सीसीटीव्ही फुटेज असल्याचा आरोप सदस्यांनी केला. याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी, प्लास्टिक पिशवी वापरास बंदी करण्याबाबत महासभेला प्रस्ताव सादर केला जाईल. दुकानदारांकडून पैसे घेतल्याच्या प्रकरणाची चौकशी करुन कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे उत्तर दिले. चर्चेत सत्यजित कदम, अफजल पिरजादे, प्रतिज्ञा निल्ले, उमा इंगळे, राहुल माने, निलेश देसाई, निलोफर आजरेकर, आशिष ढवळे यांनी सहभाग घेतला.

पाटबंधारेची मान्यता नाही

थेट पाइपलाइन योजनेसाठी ज्या भागात कामाला मान्यता मिळाली आहे, तेथे काम सुरू आहे. मात्र पाटबंधारे विभागाकडून अजूनही ११ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनच्या मान्यता मिळाली नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले. फेब्रुवारी २०१७ अखेर पाइपलाइन योजनेचे काम पूर्ण करायचे होते. मुदतीत काम पूर्ण होणार नसल्यामुळे ठेकेदार जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने वाढीव मुदत मागितली आहे. योजनेचे केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले आहे असे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा परिषदेच्या निकालाची उत्सुकता आज संपणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाची उत्सुकता आज (गुरुवारी) संपणार आहे. मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या या निवडणुकांच्या निकालाकडे अवघय जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांची गेले महिनाभर सुरू असलेली धडपड, अटीतटीच्या लढती आणि राजकीय वारसदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निकालानंतर जिल्हा परिषदेच्या नव्या सभागृहात ६७ सदस्य आणि पंचायत समिती १३४ गणांमध्ये नवे सदस्य विराजमान होणार आहेत. राजकीय पक्षांची एकहाती सत्ता, त्रिशंकू की नव्या समीकरणाचे चित्र गुरूवारी स्पष्ट होणार आहे. सभागृहाला नवे चेहरे मिळणार असून, पराभव झाल्यास अनेकांचे राजकीय भवितव्य संपण्याची शक्यता आहे.

बारा तालुक्याच्या ठिकाणी सकाळी दहा वाजता मतमोजणीची सुरूवात होणार आहे. करवीरची मतमोजणी रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे. एका गटाची मोजणी पंधरा मिनिटांत पूर्ण होणार आहे. तर पंचायत समितीच्या दोन गणांची मतमोजणीही पंधरा मिनिटांच्या कालावधीत होणार आहे. साडेपाच तासांत निवडणुकीचा सर्व निकाल जाहीर होईल, या पद्धतीने निवडणूक विभागाने सज्जता ठेवली आहे.

निवडणुकीसाठी मंगळवारी अत्यंत चुरशीने ७६.८३ टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या ६७ गटांसाठी ३२२ आणि पंचायत समितीच्या १३४ गणांसाठी ५८३ उमेदवार रिंगणात आहेत. एकेक मतदान मिळ‍विण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवसरात्र एक करून महिनाभर जोडण्या सुरू केल्या. जिल्हा परिषेदच्या चाव्या एकहाती आपल्याकडेच रहाव्यात, यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार प्रयत्न केले. सत्तेसाठी अनेक ठिकाणी स्थानिक आघाडीला सोबत घेऊन जागा जिंकण्याचे स्वप्न ठेवले आहे. दोन्ही काँग्रेसने एकमेकांना साथ देत अनेक ठिकाणी मदतीचा हात दिला आहे. तर भाजपने दोन्ही काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपप्रणित आघाडी केली. यामध्ये अनेक स्थानिक आघाड्यांना सोबत घेत व्यूहरचना केली. शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहे. यानिमित्ताने गेले महिनाभार प्रचाराची राळ उडाली होती.

दरम्यान, आघाड्या आणि अनेक ठिकाणी मर्यादित ताकद या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत एकाच पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याने निकालानंतर सत्तेसाठी गोळाबेरजेलाही वेग येणार आहे. सत्ता स्थापण्यासाठी कमी पडलेले सदस्य मिळविण्यासाठी शिवसेना आणि स्वाभिमानी पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीक्षान्त समारंभासाठी केएमटीची विशेष सेवा

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएमटी प्रशासनाच्यावतीने महा​शिवरात्रीनिमित्त शुक्रवार (ता.२४) ते रविवार (ता.२६) अखेर कणेरी मठ येथे विशेष बस सेवा असणार आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभासाठी शुक्रवारी (ता.२४) सकाळी ६.३० वाजल्यापासून शुगर मिल व शिवाजी चौक येथून बससेवा असणार आहे.

दीक्षान्त समारंभाकरिता छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे फाटक, राजारामपुरी, सम्राटनगर शिवाजी विद्यापीठ या मार्गाने बस सेवा असणार आहे. शिवाजी चौक ते विद्यापीठसाठी तिकीट दर ११ रुपये इतके आहे. त्याचप्रमाणे साळोखेनगर, आपटेनगर, कागल, कणेरी मठ या बसेस शिवाजी विद्यापीठमार्गे धावतील. बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे फाटक नंबर एक येथून सकाळी सात वाजल्यापासून प्रत्येकी दहा मिनिटाच्या अंतराने विद्यापीठाकडे जाण्यासाठी बस सेवा असणार आहे.

महाशिवरात्रीचे औचित्य साधून शुक्रवार ते रविवार या कालावधीत कणेरी मठ, वडणगेसाठी बससेवेची सुविधा उपलब्ध केली आहे. कणेरी मठासाठी गंगावेस, रेल्वे फाटक, राजारामपुरी, सायबर, शिवाजी विद्यापीठमार्गे कणेरी मठ अशी सेवा असणार आहे. गंगावेश ते कणेरी मठ अशी जादा बस सेवा उपलब्ध असून मध्यवर्ती बस स्थानक परिसर, कावळा नाका, ओपल हॉटेलमार्गे बससेवा असणार आहे. वडणगे येथील यात्रेसाठी शुक्रवारी (ता.२४) गंगावेश ते वडणगे अशी सेवा सुरु असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३४ प्लससाठी गोळाबेरीज

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet : @sachinyadavMT

कोल्हापूर ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता स्थापना करण्यासाठी निकालाच्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू आहे. ३४ प्लसचा आकडा गाठून सत्तेच्या चाव्या मिळविण्यासाठी कुणालाही सोबत घेण्याची तयारी मोठ्या राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. सर्वांत मोठा पक्ष आमचाच होईल, असे भाष्य करणाऱ्या राजकीय पक्षांना घटक पक्षांची मदत घ्यावीच लागेल, असे चित्र आहे. काँग्रेसला बहुमतासाठी चार ते पाच जागा कमी पडत असल्यास शिवसेना किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. भाजप जादा जागा जिंकल्यास शिवसेनेसह अन्य आघाडीची युती करून सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्रिशंकू संख्या झाल्यास घटक पक्षांचा वजन वाढण्याची शक्यता आहे. मातोश्रीवरून आदेश आल्यानंतर शिवसेना सत्तेची गणिते निश्चित करणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद नव्या राजकीय समीकरणाचे संकेतही मांडली जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या जादूई आकडण्याची चर्चा रंगली आहे.

जिल्हा परिषदेच्या ६७ आणि पंचायत समितीच्या १३४ गणांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी ९०५ उमेदवार रिंगणात आहेत. २०१२ मध्ये जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात होती. काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षाला सोबत घेऊन सत्ता मिळविली. २०१७ च्या निवडणुकीत भाजपप्रणित आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करीत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ३४ प्लस जागा मिळाल्यास दोन्ही काँग्रेसची सत्ता स्थापन करू शकतात. या दोन्ही काँग्रेस ३२ जागा जिंकल्यास आवाडे गटाची युती करून सत्तेची गोळाबेरीज करू शकतात. ३४ च्यापुढे जागा मिळाल्यास दोन्ही काँग्रेसला घटक पक्षाच्या मदतीची गरज भासणार नाही. काँग्रेससोबत राष्ट्रवादीला बरोबरीने सत्तेची संधी मिळू शकते. कोल्हापूर महापालिकेप्रमाणे काँग्रेसला राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यास एकहाती सत्ता येणे शक्य आहे. त्यासाठी जिंकून येणाऱ्या जागेची गणिते नेत्यांकडून मांडली जात आहेत. गेल्यावेळी सभागृहात काँग्रेसला ३२ जागा मिळाल्या होत्या. या निकालात २० जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीला गेल्यावेळच्या सभागृहात १६ जागा मिळाल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीला १३ जागा मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला गतवेळी एकमेव जागा मिळाली होती. यावेळी भाजपला चिन्हावर ८ जागा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपप्रणित आघाडीत ताराराणी पक्ष, युवक क्रांती आघाडीसह स्थानिक आघाडी मिळून सत्ता स्थापनेची गणित मांडली जात आहेत. स्वाभिमान पक्षातही फूट पडल्याने स्वाभिमानीच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळच्या सभागृहात स्वाभिमानीच्या पाच जागा होत्या. शिवसेनेला गतवेळेच्या सभागृहात ६ जागा होत्या. यावेळी दहा ते बारा जागांपर्यंत शिवसेना मजल मारू शकेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. जनसुराज्य शक्ती आणि स्थानिक आघाडीची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. स्थानिक आघाडीला सहा ते आठ ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसला १९, राष्ट्रवादीला ११ आणि आवाडे गटाच्या २ जागा घेऊन काँग्रेस ३२ जागांपर्यंत पोहोचू शकते. शिवसेना १४, भाजप ८ आणि जनसुराज्य ८ जागा घेऊन २८ पर्यंत बलाबल होईल, अशी शक्यता आहे. ३४ प्लसचा आकडा गाठण्यासाठी अन्य आघाडीसह स्वाभिमानी, ताराराणी आघाडी, हत्तरकी गट, अप्पी पाटील, आबीटकर, युवक क्रांती आघाडीचे उमेदवार निवडून आल्यास सत्ता स्थापनेचा दावा मांडला जात आहे. भाजप, जनसुराज्य, ताराराणीला शिवसेनेने मदत केल्यास सत्तेचा दावा करू शकतात. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक सत्तेसाठी मोट बांधण्याची शक्यता आहे. भाजप १५, जनसुराज्य ८, ताराराणी आघाडी ४, आमदार कुपेकर गट १, धैर्यशील माने गट १ असे एकूण २९ जागांची गणिते मांडली जात आहेत. यामध्ये स्वाभिमानी, शिवसेनेची भूमिकाही निर्णायक ठरू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. उमा कुलकर्णी यांचे ‘इंप्रेशन’ रविवारपासून

$
0
0

कोल्हापूर : कन्नड-मराठी साहित्याचा सेतू मजबूत करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका आणि अनुवादिका डॉ. उमा कुलकर्णी यांच्या ‘इंप्रेशन’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारीला प्रसिद्ध वास्तूविशारद शिरीष बेरी यांच्याहस्ते सकाळी १०:३० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. १ मार्चअखेर या प्रदर्शनातील कलाकृतींचा आस्वाद कलारसिकांना घेता येणार आहे.

अ‍ॅक्रॅलिक, जलरंग आणि तैलरंग अशा माध्यमातील चित्रांत डॉ. कुलकर्णी यांची ‘अभिव्यक्ती’ स्वतंत्र शैलीत पाहायला मिळेल. शब्द आणि चित्र यातून निर्माण झालेली ‘इंप्रेशन्स’ अवकाशबद्ध केलेली दिसून येतील.

डॉ. कुलकर्णी या आघाडीच्या अनुवादिका आहे. कन्नड साहित्यातील महत्त्वाच्या कलाकृती त्यांनी मराठीत अनुवादित केल्या आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा, गिरीश कर्नाड, डॉ. पूर्णचंद्र तेजस्वी, डॉ. शिवराम कारंथ अशा अनेक कथा-कादंबरी-साहित्य मराठी रसिक वाचकांना आनंद दिला. सुमारे ५५ हून अधिक अनुवादित ग्रंथ संपदा असलेल्या उमा कुलकर्णी यांनी सोनियाचा उंबरा, मंथन या टी.व्ही. मालिकांचे पटकथा संवाद लेखन केले.

तथापि, त्यांचा मूळ पिंड सृजनशील चित्रकर्तीचा आहे. एसएनडीतून आर्ट अ‍ॅण्ड पेंटिंगमध्ये त्यांनी एमए केले असून ‘द्रविड देवालये’ या विषयावर त्यांनी पीएचडीसाठी संशोधन केले आहे. अशा बहुआयामी चित्रकर्तीच्या चित्रे अनुभवण्याची संधी या प्रदर्शनाच्या निमित्ताने आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत कमळ फुललेकॉँग्रेस, राष्ट्रवादीचा धुव्वा

$
0
0



हरीश यमगर, सांगली

काँग्रेसचा धुव्वा उडवत, राष्ट्रवादीला धक्का देत भारतीय जनता पक्षाने सांगली जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेची वाट जवळ केली. केवळ जिल्हा परिषदेतच नाहीतर जिल्ह्यातल्या दहा पैकी चार पंचायत समित्यांवर निर्विवाद कब्जा केला. राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत दुसऱ्या क्रमांकावर येत, तीन पंचायत समित्यांमध्ये बहुमत पटकाविले आहे. शिवसेने खानापूरची पंचायत समिती ताब्यात ठेवताना जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील तीनही जागावर विजय मिळवला. भाजपने सर्वाधिक २४ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी चौदा तर सत्तेवर दावा करणाऱ्या काँग्रेसला अवघ्या दहा जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना तीन, स्वाभिमानी विकास आघाडी दोन आणि स्वाभिमानी संघटना एक, रयत विकास आघाडी चार आणि अपक्ष दोन, असे सांगली जिल्हा परिषदेतील बलाबल आहे.

राजेंद्र देशमुखांचा प्रवेश भाजपच्या पथ्यावर

आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्याचा भाजपला चांगलाच फायदा झाला. या तालुक्यातील चारही जागा भाजपने जिंकल्या असून, या ठिकाणी भाजप-सेना, अशी काट्याची टक्कर झाली. विजयी उमेदवार आटपाडी- अरुण दत्तू बालटे (भाजप, १०१९८) यांनी नानासो माळी या अपक्ष उमेदवाराचा पराभव केला. दिघंची- मोहन रणदिवे (भाजप, ७८१४) यांनी सेनेचे उमेदावार श्रावण रणदिवे यांचा पराभव केला. खरसुंडी - ब्रम्हदेव पडळकर ( अपक्ष ६२७६) यांनी काँग्रेसचे जयदीप भोसले यांचा पराभव केला. करगणी- वंदना गायकवाड (भाजप, ९१२६) यांनी शिवसेनेच्या उमेदवार माजी सभापती मनीषा तानाजी पाटील यांचा पराभव केला.

-------

खासदार पाटील यांना दणका

तासगाव तालुक्यात खासदार संजय पाटील आणि राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई आर. आर. पाटील यांच्यात लढत झाली. या ठिकाणी खासदारांनी भाजपचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरविले होते. राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या गड शाबूत ठेवत सहा पैकी चार जागा जिंकल्या. मणेराजुरी - सतीश बाबुराव पवार ( राष्ट्रवादी, ९६५७) यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार शशिकांत जमदाडे (मते ८४८२) यांचा पराभव केला. येळावी- संजय दत्तू पाटील (राष्ट्रवादी, ९६७५) यांनी भाजप पुरस्कृत आबासाहेब तांदळे (मते ८५३३) यांचा पराभव केला. विसापूर - अर्जुन जनार्दन माने-पाटील (राष्ट्रवादी, १०७६४) यांनी भाजप पुरस्कृत सुनील पाटील (मते-१०३०२) यांचा पराभव केला. मांजर्डे- प्रमोद शिवाजी शेंडगे ( भाजप पुरस्कृत- ९००२) यांनी अपक्ष कृष्णदेव पाटील ( ६८२५) यांचा पराभव केला. चिंचणी - डी. के. पाटील ( भाजप, ११२५४) यांनी राष्ट्रवादीचे सिराज दस्तगीर मुजावर (मते ८९८९) यांचा पराभव केला.

खानापूरमध्ये फडकला सेनेचा भगवा

खानापूर तालुक्यावरील वर्चस्व कायम ठेवताना शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी जिल्हा परिषदेच्या तीनही जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. नागेवाडी- सुहास अनिल बाबर (शिवसेना, १३४९२) यांनी स्थानिक परिवर्तन आघाडीचे वैभवकुमार माने (मते ६९९३) यांचा पराभव केला. लेंगरे - निलम नंदकुमार सकटे (शिवसेना, १०८२७) यांनी परिवर्तनच्या शोभा खिलारे (मते ८९१५) यांचा पराभव केला. भाळवणी- सुलभा शशिकांत अदाटे (शिवसेना - १०६८२) यांनी परिवर्तनच्या वंदना गोतपागर ( मते ७८९६) यांचा पराभव केला.


कवठेमहांकाळमध्ये आर-आर-पाटील घोरपडे गटाची सत्ता

कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या स्वाभिमानी आघाडी बरोबर निवडणुकीला सामोरे जाण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले. याही ठिकाणी भाजपचे खासदार संजय पाटील यांनी काही ठिकाणी चिन्हावर तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांच्या मागे भाजपची ताकद लावली होती. जिल्हा परिषदेच्या ढालगाव- भगवान वाघमारे (राष्ट्रवादी, ८२७७), यांनी विकास आघाडीचे भाजप पुरस्कृत रमेश साबळे (मते ६८५८) यांचा पराभव केला. कुची- आशाराणी पाटील (राष्ट्रवादी, ७१३४) यांनी तेजस्वी पवार (मते ६१४४) यांचा पराभव केला. देशिंग- संगीता नलावडे (स्वाभिमानी विकास आघाडी, ८८०३) यांनी अपक्ष सुरेखा कोळेकर (मते ६७८८) यांचा तर रांजणी - आशा पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी, ९५६९) यांनी सारिका प्रशांत शेजाळ (७४३३) यांचा पराभव केला.


कॉँग्रेसचा धुव्वा

सांगली जिल्ह्याला बालेकिल्ला समजून आपल्याच तालात सर्वकाही आबादी आबाद असल्याच्या अविर्भावात वागणाख्या काँग्रेसला जनतेने जबरदस्त चपराक दिल्याचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. आघाडीसाठी राष्ट्रवादी मागे लागली असतानाही काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्याकडे ढुंकूनही बघितले नाही. यासह अनेक गोष्टीचा फटका सहन करावा लागलेल्या काँग्रेसला जिल्ह्यातील दहापैकी एकही पंचायत समिती जिंकता आली नाही. भाजपने जिल्हा परिषदेवरील सत्तेकडे वाटचाल करताना दहापैकी चार पंचायत समितींवर कब्जा केला आहे. राष्ट्रवादीने तीन, शिवसेनेने एक पंचायत समिती काबीज केली आहे. मिरजेच्या पंचायत समितीत त्रिशंकू आवस्थेत समोर आली आहे.

भाजपने कडेगाव, आटपाडी, पलूस आणि जतच्या पंचायत समित्या जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीने तासगाव, कवठेमहांकाळ, वाळवा आदी तीन तर शिवसेनेने खानापूर पंचायत समिती आपल्याकडे ठेवल्या आहेत. शिराळ्याची पंचायत समिती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे रहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images