Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘साहित्य व कलेतून चित्रपटनिर्मिती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘साहित्य आणि चित्रपट या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव होऊ शकत नाही. दोन्ही कला जीवनाची समग्रता वाढवतात. सर्व कला एकत्रीकरण समुच्चयाने चित्रपटाची निर्मिती केली जाते. दोन्ही कलाकृतीचा जगण्याचा शोध वेगळा आहे. साहित्य आणि चित्रपट या दोन्ही कला समान आहेत,’ असे मत मुक्तसंवादात व्यक्त करण्यात आले. पाचव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट (किफ्फ) महोत्सवांतर्गत साहित्य आणि चित्रपट या विषयावर मुक्तसंवाद झाला. राजर्षी शाहू स्मारक भवनात महोत्सव सुरू आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस, कृष्णात खोत यांच्याशी महोत्सवाचे समन्वयक चंद्रकांत जोशी यांनी मुक्तसंवाद साधला. डॉ. राजन गवस म्हणाले, ‘काहीजण कलाकृती म्हणून चित्रपटाकडे पाहतात. मात्र, चित्रपटातून संदेश पोहोचणे महत्त्वाचे आहे. त्याचे उत्तम उदाहरण जोगवा चित्रपट आहे. 'चौंडकं' आणि ‘भंडारभोग’ ही कांदबरी आणि चारूता सागर यांची 'दर्शन' ही कथा, अशा तीन साहित्यकृतींवर आधारित पटकथा झाली. त्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली. ‘जोगवा’ चित्रपटातून समाजातील वास्तव मांडले आहे. त्यातून सामाजिक स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले गेले. साहित्यातून निर्माण झालेल्या या चित्रपटाने सत्तर टक्के यश मिळविले. या चित्रपटानेच गुंतागुंतीचे जग कलाकृतीत आणले.’

ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे म्हणाल्या, ‘साहित्याला समाजात दर्जा मिळाला. लेखी स्वरूपात ही कला विकसित झाली. लेखक हा समाजजीवन वाचकांच्या डोळ्यासमोर ठेवतो. काही नामंवत लेखकांची नावे आणि त्याचे साहित्य आयुष्यभर आठवणीत राहते. वीस वर्षांनंतरही लेखकाचे साहित्य वाचनानंतर प्रगल्भता वाढते. मात्र, त्या तुलनेत चित्रपट ही लहान वयाची कला आहे. चित्रपटाला अभिजात दर्जा नाही. मात्र, चित्रपट ताकदीचे माध्यम आहे. जीवनाचा सर्वांगाने वेध घेतला जातो. काही दिग्दर्शकांचे चित्रपटही सामाजिक संदेश देतात. विधायक समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करतात.’

साहित्यिक कृष्णात खोत म्हणाले, ‘लेखक आणि दिग्दर्शक या दोघांचा सिनेमा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कथेशिवाय चित्रपटनिर्मिती शक्य नाही. साहित्य आणि चित्रपटाला वेगळे करता येणार नाही. अलीकडच्या काळातील काही कांदबऱ्यांवर सिनेमा शक्य नाही.

दरम्यान, मंगळवारी (ता. २७) भारतीय स्वातंत्र्यात चित्रपटांचे योगदान विषयावर संवाद होईल.

‘जिप्सी’ माहितीपट बुधवारी

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्येष्ठ लेखक ज्ञानेश्वर मुळे यांच्यावर आधारित जिप्सी या माहितीपटाला दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात स्पेशल ज्युरी अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. या माहितीपटाची निर्मिती युनिक अकादमीने केली असून त्याचे दिग्दर्शक धनंजय भावलेकर आहेत. या माहितीपटाचे प्रदर्शन बुधवार (ता. २८) सायंकाळी सहा वाजता केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet : @Uddhavg_MT

कोल्हापूर : सदरबाजार प्रभागात नगरसेविका स्मिता माने यांनी वर्षभरात पूर्वीच्या मंजूर कामांसाठी पाठपुरावा केला आहे. गतीने कामे मार्गी लावण्यासाठीही प्रयत्न केले. अंतर्गत रस्ते, पाण्यासाठी गरजेनुसार टाक्या बसवणे, महापालिकेच्या सभागृहांची डागडुजी अशी कामे झाली. नवीन कामांचे प्रस्ताव दाखल केले, मात्र, निधीअभावी प्रत्यक्ष कामांची प्रतीक्षा करावी लागत आहे. कत्तलखान्याच्या दूरवस्थेमुळे अस्वच्छता आणि भटक्या कुत्र्यांचा प्रश्नही प्रभागात गंभीर बनला आहे.

सदरबाजार प्रभागात कॉलनी आणि झोपडपट्टी असा संमिश्र परिसर आहे. प्रभागात महापालिकेची मराठी आणि उर्दू शाळा, दोन सभागृहे, पंचशील भवन आणि कत्तलखानाही आहे. यापूर्वीचे नगरसेवक महेश जाधव यांनी स्वनिधीसह आमदार निधी, खासदार निधीतून रस्ते, पाणी, पंचशील भवनची कामे केली. काही कमांना मंजुरीही मिळवली. कत्तलखान्याच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी प्रस्ताव सादर केला होता. आधीच्या मंजूर कामांमुळेच नगरसेविका स्मिता माने यांना निवडणुकीचा निकाल लागल्याच्या पहिल्या दिवसापासूनच काम करण्याची संधी मिळाली. यशवंतनगर ते संजय गांधी सोसायटी, दादासाहेब गायकवाड नगर ते पत्रकारनगर, भंडारे गल्ली ते पत्रकारनगर या रस्त्यांची कामे मार्गी लागली. नगरोत्थान योजनेतून ३० लाख रुपयांची रस्त्यांची कामे झाली, तर आमदार निधीतून संजय गांधी हाउसिंग सोसायटीमधील रस्त्याचेही काम पूर्ण झाले.

प्रभागात अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे मोडकळीस आल्याने त्यांचा वापर होत नव्हता. सभागृहांमधील स्वचछतागृहेही बंद होती. प्रभागातील स्वच्छतागृहांसाठी ३ लाखांचा खर्च केला, तर २० लाखांची स्वच्छतागृहांची कामे प्रस्तावित असल्याची माहिती नगरसेविका माने यांनी दिली.

निवडून आल्यानंतर माने यांनी नगरसेविका आपल्या दारी हा उपक्रम राहबवून किमान दोन महिन्यांतून एकदा प्रभागातील प्रत्येक घरात पोहोचण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मोफत आरोग्य शिबिरांमधून गरजू नागरिकांना आरोग्य सेवा पुरवली. वृक्षदिंडी काढून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. प्रभागातील मनपाच्या कर्मचाऱ्यांना मोफत गणवेश आणि साड्यांचे वाटप केले. प्रभागातील १५०० घरकुलांचा प्रस्तावही महापालिकेत सादर केला आहे. शिवाय नागरिकांची प्रॉपर्टी कार्डची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे माने यांनी सांगितले.

नगरसेविका माने यांनी निवडून येताच प्रभागात वैयक्तिक जनसंपर्क वाढवला आहे. नगरसेविका आपल्या दारी या उपक्रमातून लोकांशी संपर्क सुरू आहे. अपंगांसाठी केबिन्स, स्वच्छतागृहांसाठी अर्थसहाय्य, प्रॉपर्टी कार्डची कामे केली आहेत. मंथन फाउंडेशन मार्फत आरोग्य, योगा, फिटनेस शिबिरांचे आयोजन, स्पर्धांचे आयोजन, रक्तदान शिबिरांचे आयोजन, नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनसाठी ६५ हजार रुपयांची मदत खेळाडूंना मदत करण्याचेही काम माने यांनी केले.

सदरबाजार प्रभागात जुन्या कामांना गती मिळाली आहे. मात्र प्रस्तावित कामांची यादी मोठी आहे. प्रस्ताव मंजूर होणे आणि निधीची मंजुरी यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सार्वजनिक सभागृहांची दुरुस्ती, अपंगांसाठी रॅम्प, स्वच्छतागृहे, गटर्स आणि पॅसेज कॉँक्रिटीकरण, कबड्डी आणि हॉलीबॉल मैदान, स्पर्धांचे नियोजन, महिलांसाठी सांस्कृतिक हॉल, व्यायामशाळा बांधणे आदी कामे आहेत. निधी खेचून आणण्यासाठी नगरसेविका माने यांना कसरत करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त शिक्षकांचे त्वरित समायोजन करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

समायोजन न झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचा वेतन काढून त्याचे समायोजन त्वरीत करा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालया समोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले.

संचमान्यतेनुसार पटसंख्या कमी झाल्याने माध्यमिक व प्राथमिक शातील शेकडो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. अशा सर्व अतिरिक्त शिक्षकांची प्रशासनस्तरावर समायोजन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण यांनी ऑनलाईन समायोजन प्रक्रियेमार्फत शाळानिश्चिती करून संबंधित अतिरिक्त शिक्षकांना शाळेमध्ये हजर होण्याचे लेखी आदेश दिले आहेत.

मात्र, प्राथमिक विभागातील एक आणि माध्यमिक विभागातील ११८ अतिरिक्त शिक्षकांना संस्था तसेच शाळांनी हजर करून घेतलेले नाही. त्यामुळे संबंधित अतिरिक्त शिक्षकांसमोर बँका, पतसंस्थांचे कर्ज हप्ते, महिन्याचा घरखर्च कसा चालवायचा? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता ज्या

संस्था अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेत नाहीत, अशांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. समायोजन होईपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून ऑनलाइन अदा करण्याचा आदेश त्वरीत व्हावा अशी

मागणी करण्यात आली. जोपर्यंत वेतनाचा आदेश होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी स्पष्ट केले.

आंदोलनात आनंदा डाकरे, आर.व्ही. पाटील, विनय शिंदे, मारुती कांबळे, बाळकृष्ण पाटील, संजय कुंभार, एन. आर. शाणेदिवाण, एस. बी. मासाळ, एस. डी. मरळकर, एम. के. पाटील, के. ए. पाटील, एस. एन. पाटील, आर. जे. चौगुले, एस. आर. थोरात, के. एस. पोवार, व्ही. डी. कांबळे, बी.बी.सुतार, संपत चव्हाण, परशराम चव्हाण, पांडुरंग शिंदे सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी खर्च करा, अन्यथा कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यास सर्वसाधारण योजनेसाठी मंजूर केलेला निधी वेळीच खर्च करण्याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी. यात हयगय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. जिल्हा नियोजन सभेत त्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विकास निधीचा आढावा घेतला. याच सभेत आगामी २०१७-२०१८ या वर्षासाठी ३०१ कोटी ६५ लाख रुपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री सडक योजनेसाठी ३४ कोटी २५ लाख ५५ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नियोजन मंडळाचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या योजनांचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेमध्ये ११३ कोटी ६४ लाखांचा निधी खर्च केला आहे. खर्चाची ही टक्केवारी ६६.७२ टक्के झाली आहे. यंदा नावीन्यपूर्ण योजनेसाठी सात कोटी ९२ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी पाच कोटी ४२ लाख ६२ हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये अंगणवाड्यांना इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, निवृत्तिवेतन आदेशाचे डिजिटायजेशन, पोलिस दलास आवाजमापन यंत्रे, शहरातील विविध बागांमध्ये ओपन जीम, जलयुक्त शिवारसाठी दोन एक्सॅव्हेटर व दोन टिप्पर मशिन खरेदी, सात-बारा संगणकीकरणासाठी तसेच जिल्ह्यातील ४७६ तलाठ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप आणि प्रिंटर्स, अंबाबाई मंदिरावर कायमस्वरूपी रोषणाई, ज्वेलरी प्रशिक्षण केंद्रासाठी निधी देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देता यावा, यासाठी स्वतंत्र बजेट निर्माण करून घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.

असा असेल नववर्षाचा आराखडा

कृषी व संलग्न सेवेसाठी - ४१ कोटी आठ लाख

ग्राम विकासासाठी - २१ कोटी,

पाटबंधारे व पूरनियंत्रणांसाठी - आठ कोटी ७५ लाख

ऊर्जा विभागासाठी - नऊ कोटी ५० लाख

उद्योग व खाणकाम विभागासाठी - एक कोटी ९१ लाख

रस्ते व पुलांसाठी - ८० कोटी

सामान्य आर्थिक सेवा - नऊ कोटी

सामाजिक व सामूहिक सेवांसाठी - ७९ कोटी

सामान्य सेवांसाठी - सहा कोटी

नियोजन - ११ कोटी ४२ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली जिल्हा बँकेवर प्राप्तिकर खात्याचा छापा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयावर सोमवारी दुपारी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या सात जणांच्या पथकाने बँकेत प्रवेश करताच आत कोणालाही सोडायचे नाही, असे बजावत विश्रामबाग पोलिसांशी संपर्क साधून पोलिस बंदोबस्त मागवून घेतला.

नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी होत असल्याचे समोर येत असून, अधिकाऱ्यांनी महत्वांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. दुपारी पावणेदोन वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत पथक तेथेच तळ ठोकून बसल्याने बँकेची नाकेबंदीसारखी स्थिती झाली होती.

राज्यातील अन्य जिल्हा बँकांवर छापे पडत असल्याचे समोर येत असतानाच सोमवारी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दुपारी दीड वाजता बँकेत दाखल झाले. तिसऱ्या मजल्यावर पोहचलेल्या पथकाने पुढील पाच मिनिटांत कार्यालयाचा ताबा घेतला. लिफ्ट बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तिसऱ्या मजल्यावर कोणाला येऊ देऊ नका, असे बजावताना प्राप्तिकरचे दोन अधिकारी स्वतः बाहेर थांबले. त्यांच्यासोबत बंदुकधारी सुरक्षारक्षक होते. अन्य अधिकाऱ्यांनी विविध विभागांचा ताबा घेऊन कागदपत्रांची, संगणकावरील नोंदींची तपासणी सुरू केली. सांगली रोड शाखेचा (पहिला मजला) दरवाजाही बंद करण्यात आला. पथकाने काही महत्वाच्या नोंदी ताब्यात घेतल्याचे समजते.

केंद्र सरकारने नोटबंदी जाहीर केल्यानंतर पुढील चार दिवसांत सांगलीच्या जिल्हा बँकेत ३१७ कोटींच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जमा झाल्या. नंतर नोटा जमा करून घेण्यास बंदी घालण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या धोरणाविरुद्ध राज्यभर या बँकांनी आवाज उठवला. मोर्चेही काढले. तरीही धोरणात बदल झाला नाही. उलट बँकांमागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. पाचशे, हजार रुपयांच्या नोटांच्या रुपाने जमा झालेल्या रक्कमा नेमक्या कुणाच्या याची चौकशी गतीने सुरू झाली.

नाबार्डने यापूर्वी बँकेच्या सहा शाखा आणि नंतर सात शाखांची तपासणी केली. त्यात काही आढळले नसल्याचे बँकेने जाहीर केले. मात्र, ३१७ कोटी आले कुठून या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्राप्तिकर विभागाचा प्रयत्न आहे. पहिल्यांदा दोन लाखांहून अधिक रक्कम जमा करणाऱ्यांची नावे कळवा, अशी नोटीस जिल्हा बँकेला काढण्यात आली होती. दोन लाखांवर रक्कम जमा करणारे व्यक्तिगत खातेदार नाहीत, असे बँकेने सांगितले, मात्र संस्थांच्या ठेवी चर्चेत आल्या. विशेषतः पतसंस्थांच्या ठेवी मोठ्या संख्येने असल्याचे समोर आले. त्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये नेमक्या त्याचाच शोध सुरू असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तिसऱ्या मजल्यावरच कारभार

जिल्हा बँकेच्या तिसऱ्या मजल्यावर सध्या प्रभारी व्यवस्थापकीय संचालक, व्यवस्थापक, कृषी विभाग, इतर कर्ज विभाग, प्रशासन विभागाचे कक्ष आहेत. ते यापूर्वी दुसऱ्या मजल्यावर होते. नूतनीकरणाच्या प्रक्रियेत अधिकाऱ्यांचे कक्ष वगळता अन्य विभाग कायमस्वरुपी तिसऱ्या मजल्यावर स्थलांतरित झाले. याच ठिकाणी कागदपत्रे, संगणकीय माहिती उपलब्ध असल्याने तेथेच तपासणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांनीच जाहीर केली निवडणूक!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील दहा महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाचवेळी होणार आहेत. या निवडणुका १५ ते २१ फेब्रुवारी दरम्यान चार टप्प्यांत होणार असून त्यासाठी ७ जानेवारीला आचारसंहिता लागू होणार आहे. सोमवारी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीची माहिती दिली. दरम्यान, ‘मतदानाची तारीख जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा असल्याचे सांगत आयोगच याबाबत अधिकृत घोषणा करेल, आपण फक्त अंदाज व्यक्त केला’ असा खुलासाही महसूलमंत्री तथा पालकमंत्री पाटील यांनी केला.

राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांची मुदत मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होणार असल्याची चर्चा होती. त्याला आता अधिकृत दुजोरा मिळाला आहे. जिल्हा परिषदेबरोबरच राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकाही फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. नगरपालिका निवडणुकीत भाजपला राज्यात अतिशय चांगले यश मिळाले आहे. यामुळे जिल्हा परिषदेवरही झेंडा फडकवण्यासाठी पक्ष सक्रीय झाला आहे. ग्रामीण भागात दोन्ही काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे या पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे.

‘जिल्हा परिषदेसाठी यापूर्वी एकाच दिवशी मतदान घेतले जात होते. यावेळी मात्र, चार टप्यांत मतदान होणार आहे. यासाठी ७ जानेवारीला आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुजोरा दिला. १५ ते २१ फेब्रुवारी यांदरम्यान राज्यात जिल्हा परिषदेसाठी मतदान होईल. सात जानेवारीला आचारसंहिता लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वीस फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वी जिल्हा ​परिषदेसाठीचे मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाची तारीख निश्चीत झाल्याने राज्यातील राजकीय हालचालींना आता गती येणार आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन्ही काँग्रेसनी स्वबळाचा नारा दिला आहे. याउलट भाजप, शिवसेना, जनसुराज्य व स्वाभिमानी आघाडी यांची महायुती होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सध्या चर्चेला सुरूवात झाली आहे.

दरम्यान, गेल्या आठवडाभरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. आगामी काळात शिवसेनेकडूनही बैठका सुरू होतील. आचारसंहितेपूर्वीच्या कामांची धांदल सध्या सुरू आहे.

पालकमंत्री सावरले

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीविषयीची माहिती देताना मंत्री पाटील यांनी निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर अचानक त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यामुळे त्यांनी तातडीने त्यात सुधारणा करत, ‘हा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. सरकार आणि निवडणूक आयोगात चर्चा झाली आहे. त्यानुसार मतदानाच्या तारखा निश्चित होण्याची शक्यता आहे’ असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अट्रॉसिटी’च्या समीक्षेसाठी फडणवीसांकडून समितीवामन मेश्राम यांचा घणाघाती आरोप

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

‘मराठा समाजाचे मोर्चे निघण्याच्या मागे फडणवीस सरकारच आहे. या शिवाय अॅट्रॉसिटी कायद्याची समीक्षा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विधिमंडळातील आमदारांची एक कमिटी तयार केली असून, फडणवीस आपले संरक्षण काढून घेत आहेत,’ असा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला.

सोलापुरात मंगळवारी विविध मागण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मेश्राम बोलत होते.

कायदा रद्दचे तर सोडाच परंतु यातील काना, मात्रा आणि वेलांटी जरी बदलली तरी त्याचे सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतीलस असा इशाराही मेश्राम यांनी दिला. घटनात्मक पद्धतीने आपल्याला परिवर्तन घडवायचे आहे, त्यामुळे मोर्चे शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मुस्लिम पर्सनल लॉ कायद्यात बदल करू नये. खासगी क्षेत्रात आरक्षण मिळावे. बाबासाहेब पुरंदरे यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार काढून घेण्यात यावा. ओबीसींची जातवार जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी आणि संविधानाच्या सन्मानार्थ सोलापुरात मंगळवारी विराट बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. लाखो समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. निर्विघ्नपणे हा मोर्चा पार पडला.

सकाळी अकरा वाजता सम्राट चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. सुरुवातीला गर्दी कमी होती. मात्र भीमसैनिकांचे जथेच्या जथे मोर्चाच्या दिशेने मार्गस्थ झाले. गर्दी झाल्यानंतर दुपारी बारा वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात अग्रभागी संविधानाचे आणि मोठा तिरंगा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मोर्चेकऱ्यांच्या हातात भगवा, निळा, पिवळा, हिरवा आदी समाजाचे झेंडे सामाजिक ऐक्य ऐक्याचा संदेश देत होते. पांढऱ्या साड्या परिधान केलेल्या महिलांची गर्दी मोठी होती. विद्यार्थिनींनीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शिवाजी चौक, नवी वेस, सरस्वती चौक, चार हुतात्मा चौकमार्गे मोर्चा दुपारी दीड वाजता इंदिरा गांधी स्टेडियमवर आला. देश हमारा, राज तुम्हारा, नही चलेगा, नही चलेगा, एकच पर्व बहुजन सर्व, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, शाहू महाराज, राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो, तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. इंदिरा गांधी स्टेडियम आणि मैदान गर्दीने भरून गेले होते. तर रस्त्यावरही अलोट गर्दी होती. मोर्चा ज्या मार्गावरून निघणार आहे, त्या मार्गावरील दुकाने बंद होती. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

व्यासपीठावर माजी आमदार लक्ष्मण माने, बामसेफचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वामन मेश्राम, राजा इंगळे, प्रमोद गायकवाड, जयदीप कवाडे, संजीव सदाफुले, राजेंद्र दीक्षित, शंकर लिंगे, रवी गायकवाड, राहुल सरवदे, श्रीशैल गायकवाड, बबलू गायकवाड, अयूब कुरेशी, युवराज पवार, कमल ढसाळ, रॉकी बंगाळे, बाळासाहेब गायकवाड, कुणाल बाबरे, प्रवीण निकाळजे, मिलिंद प्रक्षाळे, विजय कांबळे, भारत परळकर, देवेन्द्र भंडारे, फादर योहान आदी मान्यवर उपस्थित होते. गायक आनंद शिंदे यांचे चिरंजीव उत्कर्ष शिंदे यांनी मोर्च्यात सहभाग नोंदवून उत्साह वाढविला. तत्पूर्वी राजन दीक्षित, अनिल माने, सविता मस्के, विध्यार्थी प्रतिनिधी शीतल किर्ते, विजय पोटफोडे, डॉ. सायली शेंडगे आणि खालिक मन्सूर यांनी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांना निवेदन दिले. त्यानंतर झालेल्या सभेत प्रत्येक समाजघटकांमधील प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केली.

.......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा पोलिसांना पोलिस कोठडी

$
0
0




म. टा. वृत्तसेवा, कराड

करमाळा येथील सराफ व्यावसायिक रावसाहेब जाधव यांचे पोलिसांनी अपहरण करून त्यांच्या खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या शहर पोलिस ठाण्याच्या दोन अधिकारी व दहा कर्मचाऱ्यांपैकी एक अधिकारी हणमंत काकंडकी व नऊ पोलिस कर्मचारी मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मंगळवारी दुपारी येथील प्रथमवर्ग न्यायालयात शरण आले. या सर्वांना सीआयडीने अटक केली. त्यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, यातील मुख्य संशयित आरोपी विकास धस यांने फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीलाच आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केल्याने या याचिकेवरील निर्णयानंतरच त्यांच्या बाबतचा निर्णय होणार आहे, या प्रकरणातील अन्य एक संशयित पोलिस कर्मचारी खाडे याला यापूर्वीच सीआयडी पथकाने अटक केली होती. सध्या तो जामिनावर आहे.

असे आहे खून प्रकरण

८० लाखांच्या सोने चोरी प्रकरणाचा तपास करण्याच्या नावाखाली करमाळा (जि. सोलापूर) येथील रावसाहेब जाधव व त्यांचे मेव्हुणे अनिल डिकोळे यांना कराड शहर पोलिसांनी जूनमध्ये बेकायदा ताब्यात घेतले होते. पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतल्याची कोणतीच नोंद कराड अथवा करमाळा पोलिस ठाण्यात करण्यात आली नव्हती. तसेच करमाळा-कराड प्रवासादरम्यान व कराडमध्येही आणल्यानंतर चौकशीवेळी पोलिसांच्या ताब्यातील संशयित रावसाहेब जाधव यांना पोलिसांनी जबर मारहाण केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद त्यांच्यासोबत पोलिसांच्या ताब्यात असलेले अनिल डिकोळे यांनी दिली आहे. तसा जबाबही त्यांनी पोलिसांना दिला आहे. वडार समाजाने आंदोलन करून खून प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार साताऱ्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

आरोपी पोलिस कर्मचारी

पोलीस निरीक्षक विकास धस, सहाय्यक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह दिलीप मारुती क्षिरसागर, सुधीर सुभाष जाधव, राजकुमार भीमाशंकर कोळी, अतुल संपतराव देशमुख, सुमित विजय मोहिते, शरद सोमाजी माने, संजय तानाजी काटे, अमोल अर्जुन पवार व नितीन चंद्रकांत कदम यांच्यासह पो. कॉ. खाडे या बारा पोलिस कर्मचाऱ्याविरूद्ध पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास धस सोडून सर्व मंगळवारी कोर्टात हजर झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२७ लाखांचा ऐवज जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

मलकापूर येथील सराफ व्यावसायिकाकडून रोख रकमेसह सत्तावीस लाखांचा बेहिशेबी ऐवज जप्त करण्यात आला आहे. रमेश बापूराव पोतदार असे या सराफाचे नाव आहे. कारवाईत जुन्या पाचशे रुपयाच्या चारशे नोटा आणि १७ किलो ४८३ ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. सोमवारी (ता.२६) रात्री शाहूवाडी पोलिसांकडून छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या बेहिशेबी संपत्तीबाबत पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांनी दिली. सुमारे चार तास ही कारवाई सुरू होती.

गाडे यांनी सांगितले की, सोमवार (ता.२६) रोजी शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव यांना खबऱ्याकडून मलकापूर बाजारपेठेतील किरकोळ सोन्या-चांदीचे व्यापारी रमेश पोतदार यांनी राहत्या घरी बेहिशेबी सोन्या-चांदीचा ऐवज तसेच जुन्या-नव्या चलनी नोटांचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला असल्याची माहिती मिळाली होती. तसेच रात्रीत हा बेहिशेबी साठा अन्यत्र हलविला जाणार असल्याची माहितीही खबऱ्याकडून गुरव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शाहूवाडी पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. संबंधित सराफावर पळत ठेवण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे साध्या वेशातील सहकारी पोलिसांना पोतदार याच्या दुकान आणि घरावरील पाळतीसाठी तैनात केले. यादरम्यान पोलिसांना या ज्वेलर्स दुकानदाराच्या हालचाली संशयास्पद आढळल्या.

रात्री ८ वाजता स्वतः डीवायएसपी गुरव, निरीक्षक अनिल गाडे यांनी सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दोन पंचांसमक्ष पोतदार यांच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना धान्य साठविण्याच्या लोखंडी पेटीला कुलूप असल्याचे आढळले. इतरत्र काहीही हाती लागले नसताना या पेटीचे कुलूप काढण्यास बजावूनही पोतदारने टाळाटाळ केल्यानंतर उपस्थित पंचांसमक्ष पोलिसांनी हे कुलूप तोडून सर्व ऐवज ताब्यात घेतला.

सोमवारी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गाडे यांच्यासह हवालदार एम. वाय. पाटील, धनाजी सराटे, राहुल मस्के, शैलेश पोरे, भरत मोळके, महिला पोलिस अंमलदार वराळे आदींनी कारवाईत भाग घेतला.

पाचशेच्या नोटांचे चाळीस बंडल्स

कारवाईवेळी पेटीत आढळलेल्या तीन लाल कापडी पिशव्यांपैकी दोन पिशव्यांत जुन्या पाचशेच्या नोटांचे चाळीस बंडल्स (वीस लाख रुपये) तर एका पिशवीत १७ किलो ४८३ ग्रॅम चांदीच्या लगडी (बाजारभावाप्रमाणे मूल्य ६,९९,३२० रुपये) सापडल्या. छापासत्रात पोलिसांना आढळलेल्या एकूण २६ लाख ९९ हजार ३२० रुपये मुद्देमालाचे आयकर किंवा तत्सम विवरण देण्यास पोतदार असमर्थ ठरल्याने हा ऐवज ताब्यात घेतला. याबाबतच्या चौकशीसाठी आयकर विभागाला पत्र दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषीजीवनातील अस्वस्थताच लेखनबिंदू

$
0
0

म. टा. प्रतिनधी, कोल्हापूर

‘माझे संपूर्ण जीवन शेती आणि ग्रामीण भागात व्यतीत झाले आहे. त्यामुळे ग्रामीण जीवनाशी नेहमीच समरस झालो आहे, त्यामुळेच कृषी जीवनाच्या दूरवस्थेचे आणि अस्वस्थतेचे चित्रण हा माझ्या कथेचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशीव यांनी मंगळवारी केले. ते शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभाग आणि साहित्य अकादमीच्यावतीने आयोजित ‘कथासंधी’ कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. राजन गवस होते.

विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर सभागृहात झालेल्या कथासंधी उपक्रमांतंर्गत चंदनशीव यांनी श्रोत्यांशी मुक्त संवाद साधला. चंदनशीव यांनी आपल्या ‘लाल चिखल’ या कथेची निर्मिती प्रक्रिया उलगडून दाखविली. ते म्हणाले, ‘लाल चिखल या कथेतील ‘बापू’ हे पात्र माझ्या जीवनाशी निगडीत आहे. मात्र, त्यात पूर्णपणे मी उतरलेलो नाही. कथेत काही भाग वास्तवाचा असतो आणि काही भाग कल्पनेने पण वास्तवाशी जुळणारा असावा लागतो. ‘बापू’ हे पात्र त्यापद्धतीचे आहे. कृषी जीवनाच्या दूरवस्थेने मला, माझ्यातील कथालेखकाला नेहमीच अस्वस्थ केले. लाल चिखल या कथेच्या शेवटी कथानायक आगतिक होऊन आक्रोश करतो. ही आगतिकता आपल्या व्यस्थेतून आली आहे. ती अधिक परखडपणे त्यातून व्यक्त होते. त्या अस्वस्थतेचा हुंकार माझ्या लेखनात स्वाभाविकपणे प्रकटला आहे. महात्मा फुले, महर्षी वि. रा. शिंदे, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा प्रभाव माझ्या लेखनावर आहेच, त्याचबरोबर शेतीसंस्कृतीची परखड चिकित्साही माझ्या कथालेखनाचा केंद्रबिंदू आहे. १९७२ चा दुष्काळ मी जवळून अनुभवल्याने माझ्या प्रत्येक कथेत दुष्काळाचे अनेक कंगोरे चित्रित केले आहेत. अस्सल जीवनानुभवच कथा जिवंत करतात. जांभूळढव्ह आणि अन्य कथांची सलग कादंबरी झाली असती असेही काहींसे वाटते. पण लेखकाला व्यक्त होण्यासाठी योग्य माध्यम सापडले की, तो अधिक प्रखर आणि प्रभावीपणे व्यक्त होतो.’

यावेळी चंदनशीव यांनी त्यांचा एकूण लेखन प्रवास, त्यामधील टप्पे व लेखन प्रेरणा याविषयी श्रोत्यांशी संवाद साधला. कार्यक्रमास डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. सी. ए. लंगरे, कथाकार आप्पासाहेब खोत, किरण गुरव, मेघा पानसरे आदी उपस्थित होते. विभागप्रमुख डॉ. राजन गवस यांनी चंदनशीव यांच्या ‘लाल चिखल’ कथेचे वाचन केले. साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुने यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्चस्वासाठीच काँग्रेसमध्ये ठिणगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा वर्चस्वासाठी गटबाजी उफाळण्याची शक्यता आहे. पक्षाची सूत्रे कुणाच्या हातात हे ठरवण्यासाठीच आता दोन नेत्यांत लढाई जुंपणार आहे. पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्यात अंतर्गत वाद उघड होण्याची चिन्हे असल्याने या संघर्षाने काँग्रेसचा हात आणखी खिळखिळा होण्याचीच शक्यता आहे. गटबाजीचा फायदा घेण्याची मोहीमच भाजपने उघडली असताना दोन्ही काँग्रेसचे नेते मात्र त्याला दोन पाटलांनी आयती संधी उपलब्ध करून दिल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे.

गेल्या काही वर्षांत काँग्रेस पक्ष गटबाजीने पोखरून निघाला आहे. त्याचा फटका पक्षाला बसत असताना कोणत्याच नेत्याला त्याचे सोयरसूतक नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. पक्षाचे काहीही होवो, आपला गट, आपले अस्तित्व आणि आपले राजकारण महत्त्वाचे मानत प्रत्येकांनी सोयीची भूमिका घेतली. यामुळे गेल्या काही वर्षांत महापालिका, विधानपरिषद निवडणूक वगळता कोणत्याच निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले नाही. लोकसभेत पक्षाचे नेते कल्लाप्पाणा आवाडे मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले. विधानसभेत पक्षाला एकही जागा मिळाली नाही. जिल्हा बँक, बाजार समितीत पक्षाची सत्ता आली नाही. आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषद आणि महापालिका निवडणूक एकहाती जिंकली. महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्या दोस्तीने गोकुळची सत्ता अबाधित राखली. हे यश वगळता पक्षाच्या हाती फारसे काही पडले नाही. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत पक्षाची मोठी वाताहात झाली.

जिल्ह्यात आज काँग्रेस पक्षाची अवस्था अतिशय बिकट आहे. कागल, चंदगड, गडहिंग्लज, पन्हाळा, शाहूवाडी अशा अनेक तालुक्यात पक्षाचे अस्तित्व शोधावे लागणार आहे. करवीर, हातकणंगले तालुक्यात पक्ष बळकट असला तरी राधानगरी, शिरोळ व भुदरगड तालुक्यात पक्षाचे नेते सोयीने काम करत असल्याने येथे पक्ष बळकट आहे असे म्हणू शकत नाही. पक्षात आतापर्यंत गटबाजीची परंपरा कायम आहे. पी. एन. पाटील आणि सतेज पाटील यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुप्त संघर्ष आहे. दोघे एकमेकांच्या विरोधात उघड बोलत नसले तरी एकमेकांना अडवण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौऱ्यात झालेले राजकारण दोघातील संघर्ष आणखी वाढण्यात कारणीभूत ठरले आहे.

पक्षात एकहाती सत्ता मिळवण्याचा पी.एन. पाटील आणि सतेज पाटील यांचा प्रयत्न आहे. जिल्हाध्यक्ष होण्यासाठी आवाडे व या दोन पाटील यांच्यात चुरस आहे. पी.एन. यांची मुदत संपल्याने त्यांना बदलण्यासाठी गेले दोन तीन वर्षे प्रयत्न सुरू आहेत. विधानपरिषद निवडणुकीनंतर सतेज अथवा आवाडे यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडेल अशी अपेक्षा होती, पण तसे न होता जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत पी. एन यांनाच मुदतवाढ देण्यात आली. महापालिका निवडणूक सतेज यांनी एकहाती जिंकून त्याचे श्रेय घेतले. नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील एकही नेता सक्रीय झाला नाही. जिल्हाध्यक्ष असलेले पी. एन. पाटील देखील शांत राहिले. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. या अपयशाच्या पार्श्वभूमीवर आता पक्ष जिल्हा परिषदेला सामोरे जात आहे. या निवडणुकीची सर्व सूत्रे पी. एन. यांना एकहाती सांभाळायची आहेत. सतेज पाटील हे जिल्हाभर गट तयार करत पक्षात त्यांना आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाडिक आणि सतेज यांच्यातील दुरावा पी. एन. यांना फायद्याचा आहे. हा दुरावा त्यांनी आणखी घट्ट करण्यासाठीच महाडिक आणि पाटील यांच्या संभाव्य सलगीची गुगली टाकली. त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले आहेत. राजकारणापेक्षा वैरत्व महत्त्वाचे असल्याचे सांगत दोघांनीही आपल‌ी भूमिका स्पष्ट केली आहे.

काँग्रेसला गळती रोखण्याचे आव्हान

पाच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्यात पी. एन. यांचा वाटा होता. तोच कित्ता त्यांना पुन्हा गिरवायचा आहे. पण आता परिस्थिती कठीण आहे. भाजप, शिवसेना आता अधिक भक्कम झाले आहेत. काँग्रेसचे अनेक नेते पक्षाला रामराम करून इतर पक्षात गेले आहेत. अशावेळी पक्षाची सत्ता आणणे कठीण आहे. अशा स्थितीत काँग्रेसमध्ये गटबाजी कमी होण्याची अपेक्षा होती, पण त्याला सुरूंग लागला आहे. वर्चस्ववादामुळेच हे घडले आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक हिशोब चुकता करण्यासाठी सक्रीय झाले आहेत. अशावेळी दोन्ही पाटील एकत्र येऊन पक्ष भक्कम करण्याची अपेक्षा असताना दोघांतील वाद उघड्यावर आला आहे. आगामी काळात आवाडे आणि आवळे यांच्यात देखील हीच परंपरा जपली जाण्याची शक्यता आहे. यामुळे असलेली सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान या पक्षासमोर राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक-कर्मचारी वाद विकोपाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेचे विभागीय आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना शिवीगाळ व मारहाणीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा महापालिकेत नगरसेवक विरुद्ध कर्मचारी असा संघर्ष विकोपाला गेला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन करत मारहाणीच्या घटनेचा निषेध केला. नगरसेवक राजू ​दिंडोर्ले, त्यांचा भाऊ विशाल आ​णि चालक बाजीराव यांच्यावर कारवाईसाठी कर्मचाऱ्यांनी महापालिका चौकात ठिय्या मारला. नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्याकडून दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्याने कर्मचारीही संतप्त झाले.

मार्च २०१६ ते आजअखेर कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या तीन घटना घडल्या असून असे प्रकार वारंवार उद्‍भवू नयेत यासाठी संबंधितावर कारवाईची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. नगरसेवकांच्या अरेरावीमुळे कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन केल्यामुळे विविध कामानिमित्त महापालिकेत आलेल्या नागरिकांचे हाल झाले.

विभागीय आरोग्य निरीक्षक पवार यांच्या तक्रारीनुसार आपटेनगर प्रभागातील नगरसेवक दिंडोर्ले यांचे भाऊ विशाल यांनी सकाळी ८.२० मिनिटाच्या सुमारास फोनवरून नगरसेवकांनी बोलावले असल्याचे सांगितले. त्यानुसार पवार व आरोग्य निरीक्षक अमर कांबळे हे त्यांच्या घराकडे जात असताना रावजी मंगल कार्यालयसमोर त्यांची व नगरसेवकांची भेट झाली. यावेळी नगरसेवक दिंडोर्ले यांनी ‘माझ्या प्रभागात सफाई कामासाठी रोज १५ कर्मचारी पाहिजेत. १५ कर्मचारी दिले नाहीस तर महापालिकेतील नोकरी सोडायला लावीन,’ अशी धमकी दिली. यावेळी पवार यांनी सध्या तीन कर्मचारी रजेवर आहेत, ११ कर्मचाऱ्याकरवी सफाई करण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र नगरसेवक दिंडोर्ले, त्यांचा भाऊ विशाल यांनी पवार यांचे काही ऐकून न घेता अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. अंगावर धावून आले. नगरसेवकांकडून शिवीगाळ सुरू असताना त्यांचा चालक बाजीरावने मागून येऊन मारहाण केल्याचे पवार यांनी सांगितले.

पवार यांनी नगरसेवक व त्यांच्या नातेवाईकाच्या विरोधात सकाळी दहा वाजता जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महापालिका कर्मचारी संघाकडेही तक्रार केली. महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचे समजताच दुपारी एक वाजल्यापासून विविध विभागातील कर्मचारी महापालिका चौकात जमले. महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई, उपाध्यक्ष विजय चरापले, अजित तिवले, विजय वणकुद्रे, रमेश पोवार, पंडित पोवार, संजय भोसले आदींच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महापालिका चौकात निषेध सभा झाली. कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रकार निषेधार्थ आहे. त्याला विरोध करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याचे त्यांनी तिवले यांनी घोषित केले. स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, माजी नगरसेवक आदिल फरास यांनी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधीशी चर्चा केली.


नगरसेवक व कर्मचाऱ्यांतील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी येत्या दोन दिवसांत संयुक्त बैठक घेण्यात येईल. पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी संघाचे प्रतिनिधींची बैठक होईल. अशा घटना पुन्हा घडू नयेत या संदर्भात तोडगा काढण्यात येईल.

महापौर हसीना फरास


विभागीय आरोग्य निरीक्षकांना मारहाणीचा प्रकार घडलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेवरून अधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद झाला. विकासकामांचा धडाका लावल्यामुळे काम टाळण्यासाठी काही अधिकारी आरोप करून मला बदनाम करत आहेत. कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी पिस्तुल संदर्भात केलेला आरोप चुकीचा आहे.

राजू दिंडोर्ले, नगरसेवक

मारहाणीच्या विरोधात ‘इंटक’चे उपोषण

कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी युनियनने (इंटक) च्या बैठकीत कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटनेचा निषेध केला. कार्याध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, सुवर्णा जाधव, रमेश कांबळे, भगवान शिंगाडे, संजय पन्हाळकर बैठकीस उपस्थित होते. भविष्यात मारहाणीचे प्रकार घडू नयेत याकरिता तोडगा काढावा म्हणून इंटकचे प्रतिनिधी महपालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उपोषण करणार असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले.

तर एक दिवसाचे वेतन कपात

कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन नये, अशी सूचना केली होती. मंगळवारी ज्या कर्मचाऱ्यांनी हजेरी नोंद झाली नाही त्यांच्या पगारातून एक दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे. बायामेट्रिक हजेरी तपासण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाचविलेल्या महिलेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कौटुंबिक वादातून रंकाळ्यात उडी घेऊन आत्महत्या करताना जीवदान मिळाल्यानंतर शालन पोपट भंडारे (वय ४५, रा. कुपवाड, जि. सांगली) या महिलेने काही तासातच रंकाळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वेदगंगा इमारतीतून पळून जाऊन तिने आत्महत्या केली. या घटनेने सीपीआरमधील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मूळच्या सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील शालन भंडारी यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या इचलकरंजी येथील मुलीकडे राहतात. मुलगी आणि जावयाशी वारंवार होणाऱ्या वादांमुळे ती सोमवारी दुपारी घरातून बाहेर पडली. कोल्हापुरात आल्यानंतर ती रंकाळा तलावावर गेली. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तिने रंकाळ्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याचवेळी रंकाळा चौपाटीवर फेरफटका मारण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे जवान भगवान शिंगाडे यांनी प्रसंगावधान राखून पाण्यात उडी घेऊन शालन भंडारी यांना पाण्याबाहेर काढले. भंडारी यांना वाचवताना जवान शिंगाडे हेदेखील अत्यवस्थ झाले होते. या दोघांनाही उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारानंतर शिंडागे यांना डिस्चार्ज मिळाला, तर शालन भंडारी यांना वेदगंगा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील आपत्कालीन स्त्री विभागात दाखल केले होते.

रात्री साडेबाराच्या सुमारास शालन भंडारी सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून आपत्कालीन कक्षातून बाहेर पडल्या. रंकाळा तलावावर जाऊन त्यांनी चौपाटीवरील मधल्या घाटावरून पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. पहाटे सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना पाण्यावर तरंगणारा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी जुना राजवाडा पोलिसांना कळवले. पोलिस कॉन्स्टेबल सुतार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआरमध्ये पाठवल्यानंतर शालन भंडारी यांचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट झाल्याने सीपीआरमधील कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. यानंतर भंडारी सीपीआरमधून पळून गेल्याची नोंद करण्यात आली.

सीपीआरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

सीपीआरमधील ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेची अनेकदा उलटसुलट चर्चा असते. प्रत्येक वॉर्डमध्ये नर्स, वॉर्डबॉयसह सुरक्षा रक्षकही तैनात असतात, तरीही रुग्ण पळून जातात हे धक्कादायक आहे. सीपीआरच्या वॉर्डमध्येच रुग्णांसह त्यांचे नातेवाईकह मोठ्या संखेने थांबतात. रुग्ण कोण आणि नातेवाईक कोण हेदेखील लक्षात येत नाही. काही वॉर्डमधून जुनी उपकरणेही लंपास झाली आहेत, त्यामुळे सीपीआरमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल मालकाचा खून कामगाराकडूनच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निपाणी

निपाणीतील हॉटेल व्यावसायिक रमेश चौगुले यांचा आपणच खून केल्याची कबुली याच हॉटेलचे फर्निचरचे काम करणारा अमर लक्ष्मण सुतार (वय ३९, रा. निपाणी) याने दिली आहे.कामाच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या रक्कमेत कपात करून वारंवार ठार मारण्याची धमकी दिल्यानेच आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याला संकेश्वर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची १४ दिवसांसाठी हिंडलगा येथील कारागृहात रवानगी केली.

दररोज रात्री उशिरापर्यंत व्यावसायिक चौगुले हा हॉटेल कामाच्या ठिकाणी थांबत असल्याची संधी साधून २१ डिसेंबर रोजी रात्री अमरने रमेशला गाठले. त्यावेळी दोघांनीही एकत्रित बसून मद्यप्राशन केले. त्यानंतर अमरने चौगुलेकडे दीड लाखाची आपली मजुरी असून आपणाला गरज असून देण्याची विनंती केली. यावेळी रमेशने अमरला शिविगाळ केली. त्यामुळे अमर हा घरी जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडला. आणखी मद्यप्राशन करून फर्निचरचे खिळे काढण्याची कटावणी घेऊन पुन्हा रमेश असलेल्या ठिकाणी पोहोचला. तेथे पुन्हा पैशावरून वादावादी होताच अमरने कटावणीने रमेशच्या डोक्यात गंभीर घाव घातला. त्यात रमेश जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू पावला.

भांडण सोडविण्यासाठी वॉचमन आकाश कुलकर्णी आल्यानंतर त्याचवरही अमरने घाव घातले. त्यात आकाशही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. दोघेही मृत झाल्याचे समजून अमर पळून गेला आणि नेहमीप्रमाणे पुन्हा कामावर आला. नागरिक जमा झाल्यानंतर आपल्यावर कुणी संशय घेवू नये म्हणून जखमी आकाशला रुग्णवाहिकेतून घेऊन तो कोल्हापूरकडे रवाना झाला. त्याला सलग पाच दिवस चौकशी करून पोलिसांनी घरी सोडून दिले होते. त्याच्या हालचालींवर नजर ठेवून मंगळवारी त्याला अटक केली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याला घटनास्थळी फिरवून घडलेली माहिती पोलिसांनी जाणून घेतली. -----------------------------------------------------------

चौकट

म्हणूनच काढला काटा......

खून झालेले हॉटेल व्यावसायिक रमेश चौगुले यांच्याकडे आरोपी अमर सुतार हा बऱ्याच वर्षापासून काम करत होता. त्यामुळे चौगुले हे हॉटेलसाठी लागणाऱ्या फर्निचरचे काम अमरकडूनच करून घेत होते. पण मजुरीचे पैसे देताना मात्र टाळाटाळ करुन बऱ्याचदा मागणी केल्यानंतर किरकोळ रक्कम देवून बोळवण करीत होते. त्यामुळे कंटाळून सुतारने त्यांचे फर्निचरचे काम बंद केले.त्यावर चौगुले यांनी कामाला नाही आल्यास ठार मारेन, अशी धमकी देवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली. त्यामुळेच सुतारने चौगुलेचा काटा काढण्याचा कट रचला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगार संघटना कृती समितीचा मोर्चा

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,इचलकरंजी -

यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र संरक्षण मंडळ स्थापन करुन १०० कोटी तर यंत्रमाग महामंडळासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद करावी, किमान वेतनप्रश्नी सकारात्मक भूमिका घेऊन त्याचा निर्णय करावा, यंत्रमाग कामगारांना दरमहा १८ हजार रुपये किमान वेतन निश्चित करावे, यासह विविध मागण्यांसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

शहर आणि परिसरात मिळून एक लाखापेक्षा अधिक यंत्रमाग असून ५० हजार कामगार त्यावर अवलंबून आहेत. कामगारांना किमान वेतन मिळविण्यासाठी आठ तास काम करावे लागते यासाठी अनेक आंदोलने कामगारांनी केली मात्र ही सर्व आंदोलने सर्वच सरकारने मोडीत काढली. या उद्योगात कामगारांना कोणतेही संरक्षण नसल्यामुळे नवीन कामगार येत नाहीत. त्यामुळे कामगार नसल्याने कारखाने बंद आहेत. हा उद्योग चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी या व्यवसायाबरोबर कामगारांना त्यांचा न्याय हक्क मिळावा यासाठी या मोर्चाचे आयोजन केले होते. गांधी पुतळा येथून सुरु झालेला मोर्चा प्रमुख मार्गावरुन प्रांत कार्यालय येथे आला. त्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यंत्रमाग कामगारांसाठी राफय सरकारने खास पॅकेज तयार करुन त्यामध्ये यंत्रमाग महामंडळासाठी १००० कोटी आणि कामगार कल्याण मंडळासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करून द्यावी आणि त्याची अंमलबजावणी करावी. तसेच प्रॉव्हीडंड फंड, इएसआय सारखे सर्व कायदे लागू करावे. २०१३ सालातील कराराप्रमाणे दोन महागाई भत्ते एकत्र करून त्याची मजुरीमध्ये वर्कआउट करून त्याची घोषणा करावी, यंत्रमाग कामगारांचे किमान वेतन दरमहा १८ हजार रुपये निश्चित करून महागाई भत्ता लागू करावा, यंत्रमाग धंद्यातील कामगारांचे किमान वेतनाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असून त्यामध्ये सरकारने आणि मालक प्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेऊन तो निकाली काढावा आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी कॉ. दत्ता माने, शामराव कुलकर्णी, आनंदा गुरव, संपत कांबळे, सुनिल बारवाडे, परशराम आगम, राजेंद्र निकम, शिवाजी भोसले आदींसह यंत्रमाग कामगार सहभागी झाले होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चंदगड तालुक्यात तीन दिवस ब्रॉडबँड सेवा ठप्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

तातडीची सेवा म्हणून इंटरनेट सेवेकडे बघितले जाते. मात्र गेल्या तीन दिवसापासून ओ. एफ. सी. केबल तुटल्याने भारत संचार निगम लिमिटेडची येथील इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. रविवारी दुपारनंतर बी. एस. एन. एल. ची ब्रॉडबँड सेवा ठप्प झाल्याने नेट कॅफे, खासगी व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदारांसह ऑनलाईनची सर्व कामे ठप्प झाल्याने ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

चंदगड तालुक्यामध्ये इंटरनेट सेवा पुरविणारी बी. एस. एन. एल. ही एकमेव कंपनी आहे. त्यामुळे मोबाइलच्या युगात लँडलाईन बंद होत असताना केवळ ब्रॉडबँड कनेक्शनमुळे अनेकांनी लँडलाईन सेवा घेतली आहे. ज्या कारणासाठी लँडलाईन सेवा घेतली आहे. तो हेतू पूर्ण होत नसल्याने ग्राहकांच्यातून नाराजी आहे. याला पर्यायी दुसरी कोणतीही सेवा नसल्याने नालाईजास्तव ग्राहकांना बी. एस. एन. एल. वर अबलंबून रहावे लागत आहे. अन्य खासगी कंपन्यांनी चंदगड तालुक्यामध्ये थ्री-जी सेवा सुरु केली आहे. मात्र ती फार खर्चिक व अपुरी असल्यामुळे अनेकांनी बी. एस. एन. एल. ची भरवशाची सेवा म्हणून ब्रॉडबँड सेवा घेतली आहे. मात्र रविवारपासून ही इंटरनेट सेवा बंद असल्याने ग्राहकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सरकारचे सर्व विभाग झपाट्याने ऑनलाईन होत असल्याने इंटरनेटची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या कॅशलेश व्यवहारासाठी इंटरनेट अत्यावश्यक बनले आहे. त्यातच बी. एस. एन. एल. ची सेवा गेल्या तीन दिवसापासून खंडीत झाल्याने ग्राहकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांच्यातून नाराजी असून ब्रॉडबँड सेवा त्वरीत सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.

...

चौकट

केबल तुटण्याचे प्रकार ...

चंदगड ते कानूर खुर्द दरम्यानच्या मार्गावर असे केबल तुटण्याचे वारंवार प्रकार होत आहे. त्यामुळे या विभागातील दूरध्वनी व ब्रॉडबँड सेवा अनेकदा खंडीत होते. यासाठी ग्राहकांनी चंदगडच्या तालुका मुख्य कार्यालायात अनेकदा तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्ष आहे. कानूर विभागाला याचा वारंवार अनुभव येत असल्याने ग्राहक वैतागले आहे.

...

कोट

‘नेसरी ते नागनवाडी दरम्यान ओ.एफ. सी. केबल तुटल्याने इंटरनेट सेवा बंद आहे. तुटलेली केबल जोडण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या मार्गावर रात्रीच्या वेळी जे. सी. बी.ने खोदाई केली जात असल्याने केबल तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. लवकरच सेवा सुरळीत होईल.

ए. पी. खोराटे, उपमंडल अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य निरीक्षकाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नगरसेवक आणि प्रशासनातील संघर्ष ताजा असतानाच मंगळवारी पुन्हा नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकाकडून कर्मचाऱ्यावर अरेरावीचा प्रकार घडला. ‘मनसे’चे शहराध्यक्ष व अपक्ष नगरसेवक राजू दिंडोर्ले, भाऊ विशाल यांनी विभागीय आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना प्रभागातील सफाई कामगार का कमी केले, अशी विचारणा करीत अर्वाच्च ​शिवीगाळ केली तसेच त्यांचा चालक बाजीराव दिंडोर्लेने पवार यांना मारहाण केली. याप्रकरणी ​पवार यांनी नगरसेवकासह अन्य दोघांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या मारहाणीचे संतप्त पडसाद महापालिकेत उमटले. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारत दिंडोर्ले व इतरांचा निषेध केला. नगरसेवक दिंडोर्ले व त्यांच्या नातेवाईकांविरोधात यापूर्वीही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाणीच्या तक्रारी आहेत. चालक बाजीराव नगरसेवक दिंडोर्लेंचा चुलतभाऊ आहे. दिंडोर्ले यांनी मंगळवारी सकाळी प्रभागात सफाई कामगार कमी का केले? अशी विचारणा करत निरीक्षक पवार यांना रावजी मंगल कार्यालय येथे शिवीगाळ केली. तसेच चालक बाजीरावने पवार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

आयुक्तांकडून नोटीस

पवार यांना झालेल्या मारहाणीची आयुक्त पी. शिवशंकर यांनी गंभीर दखल घेतली. कर्मचारी संघाच्या तक्रारीनंतर आयुक्तांनी नगरसेवक दिंडोर्ले यांना नगरसेवकपद रद्दसारखी कारवाई का करू नये, अशी नोटीस काढली असून, सात दिवसात खुलासा मा​गविला आहे. दिंडोर्ले यांना यापूर्वी एकदा सूचना दिली होती. आता पुन्हा त्यांच्याकडून शिवीगाळ व धमकावण्याचा प्रकार घडल्याने प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

दिंडोर्लेंकडून पिस्तूलचा धाक

नगरसेवक दिंडोर्ले, भाऊ विशाल व ड्रायव्हर बाजीराव यांच्यावर कारवाईची मागणी महापालिका कर्मचारी संघाने आयुक्तांकडे केली आहे. दिंडोर्ले यांच्याकडून यापूर्वीही आरोग्य निरीक्षक संजय गेंजगे यांना मारहाण झाली आहे. दिंडोर्ले कर्मचाऱ्यांना वारंवार शिवीगाळ करतात. शिवाय कर्मचाऱ्यांना पिस्तूल दाखवून दम देतात. त्यामुळे दिंडोर्ले व त्यांच्या नातेवाईकांवर कारवाई करावी, अशी मागणी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार महिन्यांचा पगार थकलासोलापूर मनपाच्या परिवहन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महापालिकेच्या परिवहन विभागाकडील कर्मचारी गेल्या चार महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. अनेकदा पगाराची मागणी करूनही पगार मिळत नसल्याने अखेर सात रस्ता डेपोतील कार्यशाळेकडील १३५ कामगारांनी बुधवारी सकाळी आंदोलनाचे हत्यार उपसले ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. मात्र, मनपा उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक श्रीकांत मायकलवार आणि परिवहन सभापती राजन जाधव यांनी एक जानेवारीपर्यंत पगार करण्याचे आणि त्यानंतरही पगार न झाल्यास कामगारांसोबत इंद्रभुवनसमोर उपोषणाला बसण्याची ग्वाही दिल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले.

महापालिकेच्या तिजोरीतच खडखडाट असल्याने परिवहन कामगारांचे पगार गेल्या चार महिन्यांपासून करण्यात आले नाहीत. त्यामुळे कामगारांची झोकून काम करण्याची मानसिक स्थिती राहिलेली नाही. घर चालविताना अडचणी येत असल्याने आणि बाहेरची उधारी तटल्याने घरी जानेसुद्धा मुश्कील बनले आहे. मनपा प्रशासनाकडून सातत्याने परिवहन विभागाला सापत्नपणाची वागणूक देण्यात येत असल्याने आणि वेळोवेळी मागणी करूनही आर्थिक मदत मिळत नसल्याने परिवहन बरोबरच त्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावरही गंडांतर आले आहे. सप्टेंबरपासून पगार मिळत नसल्याने कर्मचारी खचले आहेत. घर चालविताना तर अडचणी येतातच परंतु, मुलांच्या शिक्षणाचीही आबाळ होत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी आता हात टेकले आहेत. शिवाय कुटुंबातील सदस्याचा दवाखान्याचा खर्च करतानाही इतरांकडे हात पसरावे लागत असल्याने कामगार पुरते हतबल झाले आहेत. त्यामुळे सातत्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला लागत आहे. त्यातच कामगार कमी आणि कामाचा ताण अशी अवस्था असल्याने या नव्या समस्येलाच त्यांना सामोरे जावे लागत आहे. आम्ही जगायचे कसे, घर चालवायचे कसे, आमची एकदा यातून सुटका तरी करा, मनपा कामगारांचा वेळेवर पगार होतो आमचा का होत नाही, आम्ही कामगार नाहीत काय, काय ते एकदाच सांगा म्हणजे आम्ही जगायचे की मरायचे ते ठरवू, अशा शब्दात कामगारांनी आपल्या भावना अधिकारी आणि सभापतींसमोर मांडल्या.

परिवहन विभागाची अवस्था

एकूण २०३ बसेस पैकी ८७ बसेस चेसी खराब असल्याने धूळ खात पडल्या आहेत. एक बस जळाली आहे तर ६० बसेस दुरुस्तीसाठी धक्क्याला लागल्या आहेत. ३५ बसेस मार्गावर काढण्यासाठी ३२ लाख निधीची मागणी करण्यात आली आहे. केवळ ५५ ते ५६ बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.

उत्पन्न कमी; खर्च जास्त

परिवहनकडे कायम, बदली आणि रोजंदारी असे मिळून एकूण १ हजार १० कामगार असून, त्यांच्या पगारावर महिन्याकाठी १ कोटी २० लाख रुपये खर्च होतो. महिन्याकाठी एक कोटी उत्पन्न मिळते. खर्च मात्र दोन कोटींच्या घरात जातो. म्हणजेच परिवहनला महिन्याकाठी सुमारे ८० लाखांचा तोटाच सहन करावा लागतो. दररोज तीन ते साडेतीन लाख रुपये मिळत असले तरी बसेसची संख्या वाढली की उत्पन्न वाढण्यास मदत होईल. सध्यातरी उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशीच परिवहनची अवस्था आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडमध्ये ‘लाल चिखल’वांगी पाच रुपये किलो, टोमॅटो फुकट

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

नोटाबंदीच्या निर्णयाचा भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दोन महिन्यांपासून भाजीपाला कवडीमोल दराने जात आहे. भाजी मंडईत वांग्याला पाच रूपये प्रती किलो तर टोमॅटो अक्षरश: ग्राहकांना फुकटात वाटली जात असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. भाजीपाल्यांचे दर केव्हा वाढणार या चिंतेत शेतकरी आहे. नोटाबंदी करून सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढविणार काय, असा संतप्त सवाल बळीराजा शेतकरी संघटनेने केला आहे.

नोटाबंदीनंतर शेतमालाच्या किंमती गडगडल्या आहेत. मात्र काही दिवसांतच शंभर, पन्नास, वीस, दहा रूपयांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील व शेती मालाचे दर पुन्हा वाढतील, या अपेक्षेवर शेतकरी होते. मात्र, शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले असून, दरात कोणतीही सुधारणा तर झाली नाहीच, उलट तोटा सहन करून भाजीपाला विकावा लागत आहे. काही शेतकरी तर भाजीपाल्यांचे दर गडगडल्याने वांगी, टोमॅटो, भेंडी, गोवरी आदी भाजीपाल्यांच्या पिकांची रोपे उपटून काढून टाकत आहेत.

सध्या येथील भाजी बाजारात वांगी पाच रुपये किलो एवढ्या नगण्य किंमतीत तर टोमॅटो अक्षरश: फुकट वाटली जात आहे. तरीही ग्राहक मिळत नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. भाजीपाल्याची शेती केवळ दरामुळे तोट्यात जाऊ लागली आहे. शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री कवडीमोल दराने करावी लागत असल्याचे विदारक दृश्य येथील बाजारपेठेत दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवागिरी महाराजांचा रथोत्सव साजरा

$
0
0



सातारा

पुसेगाव येथील प. पू. श्री. सेवागिरी महाराजांच्या ६९व्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथसोहळा साजरा झाला.

पुसेगावचे मठाधिपती प. पू. सुंदरगिरी महाराज यांच्या समवेत पशुसवंर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर, आमदार शशिकांत शिंदे, मोहनराव कदम तसेच जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी नऊ वाजता रथपूजन करण्यात आले. त्यानंतर सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुका ठेवलेला, फुलांनी सजविलेल्या व नोटांच्या माळांनी झाकोळलेला रथ पुसेगावातून प्रदक्षिणेसाठी निघाला. या मिरवणुकीत पुसेगाव व परिसरातील नामवंत झांज पथक, बँजो पथक, बँडपथक सहभागी झाले होते. रत्थोत्सवादिवशी देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना बुंदीचा प्रसाद मोफत वाटप करण्यात आला. श्री. सेवागिरी मंदिर, नारायणगिरी सभागृह व स्वागत कमानीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

यात्रेसाठी पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने विविध उपाययोजनांची जय्यत तयारी केली होती. यात्रेकरूंना शुद्ध पाणी व २४ तास वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मंदिर व यात्रा स्थानावर वैद्यकीय मदत केंद्रांची उभारणी केली होती. यात्रा काळात जिल्हा पोलिस अधीक्षक व कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस यंत्रणा सज्ज असून, कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची जादा फौज तैनात करण्यात आली आहे. भाविकांसाठी रथाच्या डाव्या बाजूने पुढे व उजव्या बाजूने मागे जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रथोत्सवानिमित्त पुसेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थ व यात्रेकरूंना मुबलक पाण्याची सोय करण्यात आली होती, अशी माहिती उपसरपंच रणधीर जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images