Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘लोकमंगल’चा गोपाळराव देशमुखांना विशेष पुरस्कारसई परांजपे, प्रवीण बांदेकर, श्रीकांत देशमुखांचा होणार सन्मान

0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

लोकमंगल वाचनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या लोकमंगल साहित्य पुरस्काराची घोषणा पुरस्कार समितीचे अध्यक्ष रोहन देशमुख आणि वाचनालयाचे अध्यक्ष दिनकर देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

सई परांजपे (आणि मग एक दिवस-अनुवाद मूळ पुस्तक-नसरुद्दीन शाह यांचे आत्मचरित्र), प्रवीण बांदेकर (उजव्या सोंडेच्या बाहुल्या-कादंबरी) आणि श्रीकांत देशमुख (पडझड वाऱ्याच्या भिंती-ललित लेखसंग्रह) यांना लोकमंगल साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या शिवाय जिल्ह्यातील इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ११ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शनिवार, १० डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात पत्रकार उदय निरगुडकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहीद कुणाल गोसावी यांना अखेरचा निरोप

0
0

सुनील दिवाण । पंढरपूर

जम्मू मधील नगरोटामध्ये अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या जिगरबाज मेजर कुणाल गोसावी यांच्यावर आज पंढरपूर जवळील वाखरी येथे लष्करी इतमामात हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आजोबांच्या कडेवर बसून चिमुरड्या उमंगने आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांनी 'अमर रहे... अमर रहे, शहीद कुणाल गोसावी अमर रहे', 'भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम', अशा घोषणा दिल्या.

आज सकाळी साडेदहा वाजता लष्कराच्या हेलिकॉप्टरने शहीद मेजर कुणाल यांचा मृतदेह पंढरपूर मध्ये आणण्यात आला. यावेळी हॅलिपॅडपासून त्यांच्या डाळे गल्लीतील निवासस्थानापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोकांनी जयजयकार करीत साश्रु नयनांनी सलामी दिली. सकाळी अकरा वाजल्यापासून गोसावी यांच्या निवासस्थानी हजारो स्त्री-पुरुषांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी वातावरण अतिशय भावनिक बनले होते.



दुपारी साडेबारा वाजता ठरल्याप्रमाणे सजविलेल्या ट्रकवर शहीद मेजर कुणाल यांचे पार्थिव ठेवण्यात आले. 'मेजर कुणाल अमर रहे'च्या घोषणात ही अंत्ययात्रा पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्ग , स्टेशन रोड , कॉलेज चौक मार्गे वाखरी येथे आणण्यात आली. यावेळी पंढरपुरातील नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करीत अंतिम दर्शन घेतले. शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला होता. शहरात ठिकठिकाणी अंत्ययात्रेच्या मार्गावर मेजर कुणाल यांचे मोठंमोठे फलक लावून सडा-रांगोळ्या काढून आणि फुले टाकून मार्ग सजविण्यात आला होता.

दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलीस व लष्करी जवानांनी शहिद मेजर कुणाल गोसावी यांना अखेरची मानवंदना दिली. त्यावेळी उपस्थित जवान, तसेच जनसमुदायाला भावना अनावर झाल्या. त्यानंतर शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या आई वृंदा गोसावी यांच्याकडे राष्ट्रीय ध्वज लष्कराच्या वतीने सुपूर्द करण्यात आला. लष्कराच्यावतीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून शहीद कुणाल गोसावी यांना अखेरची मानवंदना दिली. पोलीसांच्यावतीनेही शहीद कुणाल गोसावी याना अखेरची मानवंदना देण्यात आली. वडील मुन्नागीर आणि मेजर कुणाल यांची कन्या उमंग यांनी अग्नी देताच अवघा परिसर शोकाकूल झाला होता.



अंत्यसंस्कार होईपर्यंत धीर धरून बसलेल्या कुणालच्या वीरपत्नी उमा यांचा धीर खचल्याने त्यांना येथेच त्रास होऊ लागताच तातडीने वैद्यकीय मदत देऊन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले . आपल्या लाडक्या बबलूचे अंतिम दर्शन घेताना वीरमाता वृंदा यांनाही शोक अनावर झाला. विशेष म्हणजे आपल्या शहीद वडिलांना पोलीस आणि सैन्यदलाकडून अखेरची सलामी सुरु असताना ५ वर्षाची चिमुरडी उमंग देखील चौथऱ्याजवळ उभी राहून आपल्या वडिलांना सलामी देऊ लागताच उपस्थिताना आपल्या अश्रूचा बांध रोखणे अशक्य झाले होते .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखान्यांच्या प्रदूषणावर ऑनलाइन नियंत्रण

0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

साखर कारखान्याच्या धुराड्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे होणारे प्रदूषण आणि रासायनिक घटक असलेल्या सांडपाण्यामुळे अनेकवेळा नदीतील मासे आणि जलचर मृत होण्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात, अशा प्रकाराला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने चाप लावली आहे. प्रदूषण मंडळाने सर्वच कारखान्यांना ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टिम बंधनकारक केल्याने प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने ही यंत्रणा कार्यान्वित करून दिल्लीच्या सर्व्हरला जोडून आघाडी घेतली आहे. कारखान्याच्या धुराड्यातील धुराचे परीक्षण या यंत्रणेच्या मदतीने होऊन यात असलेल्या सर्व घटक घटकांची सद्यस्थिती प्रदूषण मंडळाला या सर्व्हरमुळे समजू शकणार आहे. या पद्धतीने साखर कारखाना, आसवानी प्रकल्प आणि सहवीज निर्मिती प्रकल्पातून प्रक्रिये शिवाय बाहेर पडणारे घटक रसायनामधील सर्व घटकांचे परीक्षण देखील प्रदूषण मंडळाला करता येणार असल्याने सर्व सामान्य जनतेला या घटक प्रदूषणापासून होणार त्रास कायमचा बंद होणार आहे.

प्रदूषण शून्यावर आणले- सुधाकर परिचारक

केंद्रीय प्रदूषण मंडळाने वास्तविक हा हंगाम सुरू करण्यापूर्वीच अशी यंत्रणा बसविण्याचे आदेश सर्व साखर कारखान्यांना दिले होते. मात्र, सुरुवातीला या यंत्रणेची किंमत कोटभर रुपये सांगण्यात येत असल्याने अनेक कारखाने थांबले होते. आता ही यंत्रणा २० ते २२ लाखात मिळू लागल्याने इतर कारखाने देखील यंत्रणा बसविण्यास सुरुवात करतील. सोलापूर जिल्ह्यातील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने मात्र, तातडीने ही यंत्रणा बसवून सर्व्हर मार्फत दिल्लीला ऑनलाइन रिपोर्टिंग सुरू झाल्याने या कारखान्यातून होणारे प्रदूषण संपून शुन्यावर आल्याचा दावा कारखान्याचे संस्थापक सुधाकर परिचारक यांनी ‘मटा’ शी बोलताना केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएमच्या रांगेत कार घुसली; १० जखमी

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

विजापूर मार्गावरील आतारनगर येथे इंडियन बँकेच्या एटीएमबाहेर पैशांसाठी रांग लावणाऱ्या लोकांवर अपघाताची आफत कोसळली आहे. या मार्गाने जाणारी एक भरधाव कार रांगेमध्ये घुसल्याने झालेल्या अपघातात १० जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कारचालक दारूच्या नशेत होता, अशी माहिती मिळाली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

आज सकाळी १० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर मद्यधुंद कारचालकाला संतप्त जमावाने बेदम चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले. हा कारचालक शहरातील एका राजकीय पुढाऱ्याकडे नोकरीला असल्याचीही माहिती मिळाली आहे.

दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयाला एक महिना पूर्ण झाला तरी अद्यापि पैशांची चणचण दूर झालेली नाही. त्यामुळेच ज्या एटीएममध्ये पैसे आहेत त्याबाहेर लांबच लांब रांगा आजही लागत आहेत. या स्थितीमुळेच सोलापुरात हा विचित्र अपघात घडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करमाळा तुरुंग फोडून तीन आरोपी पळालेपाच आरोपींची प्रयत्न; दोघांना जागीच अटक

0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

पारधी समाजाच्या पाच आरोपींनी शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास करमाळ्यातील तुरुंग फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तावर असलेल्या गार्डनी दोन आरोपींना पकडले असले मात्र, उरलेले तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक विरेश प्रभू आणि इतर अधिकाऱ्यांनी जेलला भेट देऊन पाहणी केली. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना झाली आहेत. स्थानिक पोलिस परिसरातील उसाच्या फडात आरोपींचा शोध घेत आहेत.

तुरुंग तोडून पळून गेलेले तीनही आरोपी चोऱ्या आणि दरोड्याच्या प्रकरणातील असून, पोलिसांनी सर्वत्र सावधानतेचा इशारा दिला आहे. सोलापूर आणि नगर जिल्ह्यात अनेक दरोड्यांचा गुन्ह्यासंदर्भात या आरोपींकडून चौकशी सुरू होती. एक घरफोडी आणि एका दरोड्याच्या गुन्ह्यात हे तीनही आरोपी करमाळा येथील तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होते. सुनील शिवाजी काळे, राजा आकाश काळे आणि अनिल संभाजी काळे हे दरोडेखोर पळून गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात तणावपूर्ण शांततानववाहितेच्या खुनानंतर साताऱ्यात बंद; ९३ जणांवर अॅट्रासिटीचा गुन्हा

0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

नवविवाहितेच्या खुनामुळे संतप्त जमावाने चिंचणेर वंदन (ता. सातारा) येथे मंगळवारी रात्री केलेल्या तुफानी तोडफोडप्रकरणी बुधवारी ९३ जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा सातारा ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, ३१ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ साताऱ्यात बंद पाळण्यात आला. बस वाहतूकही बंद पाडण्यात आली. सातारा आणि चिंचणेर येथे मोठा पोलिस बंदोबस्त असून, दोन्ही ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.

चिंचणेर वंदन गावातील पंचशीलनगरमधील ५० घरांचे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जमावाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. किराणा दुकान, व्यायामशाळेतही तोडफोड केली. परिसरातील चार चाकी गाड्या तसेच दुचाकी गाड्या पेट्रोल टाकून जाळल्या. घरातील गृहसाहित्य, दूरदर्शन संच, फ्रीज कपाटे, कम्प्युटर, लॅपटॉप आदी वस्तू फोडून जाळण्यात आल्या. हा प्रकार सुमारे तासभर सुरू होता. वस्तीवरील सर्व पुरुष मंडळी बाहेरगावी गेली होती. पहाटे गावातील एका युवकाने फोनवरून कळविल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त पाटवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

मंगळवारी रात्रीच्या प्रकाराची माहिती बुधवारी पहाटे साताऱ्यात समजताच मध्यवर्ती बसस्थानकावर काही संघटनांनी बस वाहतूक बंद पाडली. सकाळी दहा वाजता अनेक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमा झाले. तेथून पोलिस मुख्यालयासमोर जाऊन त्यांनी तेथे धरणे धरले. त्यानंतर मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. साताऱ्यातील व्यवहार दिवसभर ठप्प होते. बस वाहतूक बंद झाल्याने शाळा, महाविद्यालयेही बंद होती. खबरदारीचा उपाय म्हणून सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, खासदार उदयनराजे यांनी घटनेचा निषेध केला आहे. घटनेतील दोषी असणारे कुठल्याही समाजाचे असोत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. वकिलांनी समाजकंटकांचे वकीलपत्र घेऊ नये. कोणालाही पाठिशी न घालता प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


९३ जणांवर अॅट्रासिटीचा गुन्हा

या प्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात सनी रामभाऊ दणाणे (वय २८ रा. पंचशील नगर चिंचणेर वंदन) यांच्या फिर्यादीवरून चिंचणेर वंदन गावातील ३३ व इतर ठिकाणाहून आलेल्या ६० हल्लेखोरांवर पोलिसांनी तोडफोड, जाळपोळ व दहशत माजवणे, वस्तीवर हल्ला करून तोडफोड तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला आहे.


काय आहे मूळ घटना?

नवविवाहितेचे चिंचणेर वंदन येथील सिद्धार्थ उर्फ बारक्या दणाणे याच्याशी प्रेम सबंध होते. दोघे भिन्न समाजातील असल्यामुळे विवाहाला विरोध होण्याच्या भीतीने तरुणीने कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथील आपल्या मामाच्या मुलाशी ६ ऑक्टोबरला विवाह केला. तरीही ती व तिचा प्रियकर एकमेकांच्या संपर्कात होते. मैत्रिणीला भेटण्यासाठी साताऱ्याला जाते, असे सांगून नवविवाहिता २९ नोव्हेंबरला कोऱ्हाळे खुर्दहून साताऱ्यात आली. दणाणेच्या मोटारसायकलवरून दोघे ठोसेघर येथील पवन गावाजवळ निर्जनस्थळी गेले. तिथे वाद झाल्यानंतर संतापलेल्या दणाणेने सोबत आणलेल्या दांडक्याने तिच्यावर प्रहार केला. डोक्यावर घाव बसल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. नवविवाहितेच्या कुटुंबीयांनी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार केली. पोलिसांनी संशयित सिद्धार्थला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली व घटनास्थळी जाऊन नवविवाहितेचा मृतदेह दाखवला.

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, चिंचणेर वंदन घटनेप्रकरणी ३१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पीडितांना तत्काळ कायदेशीर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सदर घटनेची विसंगत महिती तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांची धरपकड करून कलम ३४ खाली गुन्हा दाखल करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिंचणेरमध्ये शांतता ठेवाः न्या. थूल

0
0



सातारा

चिंचणेर वंदनच्या ग्रामस्थांनी गावामध्ये शांतता ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी केले.

न्या. थूल यांनी रविवारी चिंचणेर वंदन येथील घटनास्थळास भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोद यादव, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त रवींद्र कदम-पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

थूल म्हणाले, ‘झालेल्या घटना अत्यंत दुर्देवी आहेत. नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत. जुन्या कायद्यानुसार तत्काळ मदत द्या व नवीन कायद्यानुसार नंतर फरक द्या. येथील लोकसंख्या पाहून रेशनिंगचे दुकान व पिठाची चक्की सुरू करावी. तसेच येथे पोलिस चौकीही सुरू करावी. ज्या लोकांच्या गाड्यांचे व घरांचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. दोषींवर योग्य ती कारवाई होईल. कसलीही भीती बाळगू नये. गावामध्ये शांतता ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलकापूर नगरपंचायत कॅशलेस

0
0

कराड : नोटाबंदीवर उपाय म्हणून मलकापूर नगरपंचायतीने (ता. कराड) कराड अर्बन बँकेच्या साह्याने करवसुलीसाठी स्वाइप मशिनचा वापर सुरू केला आहे. राज्यात स्वाइप मशिनने कर वसुली करणारी ही पहिलीच नगर पंचायत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या कॅशलेस कर प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला.
मलकापूरमधील आगाशिवनगर भागातील नूतन मराठी शाळेच्या आवारात आयोजित कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्याकडे स्वाइप मशिन सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी आमदार आनंदराव पाटील, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, नगराध्यक्षा कल्पना रैनाक, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बाळासाहेब कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, माजी आमदार भास्करराव शिंदे यांच्या प्रयत्नांतून मलकापूर नगरपंचायतीने नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. नगरपंचायतीने पहिल्यांदाच कॅशलेस कर प्रणालीचा उपक्रम सुरू केला आहे. याचा निश्चितपणे फायदा नागरिकांना होऊन नगरपंचायतीचेही उत्पन्न वाढेल.
जोशी म्हणाले, सध्या नोटाबंदीमुळे नागरिकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी आग्रह केला जात आहे. हा प्रयत्न भविष्याचा कानोसा घेऊन केला जात असून, मलकापूर नगरपंचायतीने राबवलेला उपक्रम हे त्याचेच एक उदाहरण आहे.
आनंदराव पाटील, मनोहर शिंदे, अजित पाटील-चिखलीकर यांचीही भाषणे झाली. मुख्याध्यापक ए. व्ही. पाटील यांनी स्वागत केले. ज्ञानदेव साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार आनंदराव सुतार यांनी मानले.

आनेवाडी टोलनाक्यावर
मशिनद्वारे टोलवसुली

पुणे-बेंगळुरू महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यावर सर्वच बूथवर स्वाइप मशिन ठेवण्यात आल्या आहेत. याद्वारे डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे टोल देण्याची सुविधा असून, त्यासोबतच पेटीएम अॅपद्वारेदेखील टोल घेण्यात येत आहे. या टोलनाक्यावरून दिवसाला साधारणत: सात ते आठ हजार वाहने ये-जा करतात. सुमारे एक हजार वाहनधारकांकडून कॅशलेस सुविधेचा वापर करीत आहेत.
यातून वेळेची बचतही होत आहे. तसेच सुट्या पैशांवरून सतत होणारे वादही कमी झाले आहेत. या सुविधेमुळे सुट्या पैशांची चणचणही थांबली आहे. या सुविधेची माहिती अधिकाधिक वाहनचालकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया टोल नाक्याचे व्यवस्थापन अधिकारी अविनाश फरांदे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बळीराजा संघटनेचा कराडजवळ रास्ता रोको

0
0



कराड : नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना बसलेल्या फटक्याकडे लक्ष वेधण्यासाठी बळीराजा संघटनेच्या वतीने सोमवारी दुपारी मलकापूर येथे ढेबेवाडी फाट्यावर केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मोफत भाजीपाला वाटून निषेध व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अघोषित आर्थिक आणीबाणी लागू केली आहे. सर्वसामान्य जनता व शेतकरी, शेतमजूर वेठीस धरला जात असून, सरकारने यावर तातडीने योग्य तो निर्णय न घेतल्यास बळीराजा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा पाटील यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांसमोर बोलताना दिला. शहर पोलिसांनी १२ आंदोलकांना अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले.
आंदोलनस्थळावर शेतकऱ्यांसमोर बोलताना पंजाबराव पाटील म्हणाले, नोटाबंदीमुळे शेतमालाचे बाजारभाव पूर्ण ढासळले आहेत. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारने घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान भरून द्यावे व शेतीसाठी घेतलेले कर्ज संपूर्ण माफ करावे. सरकारने शेतीमाल योग्य किमतीला खरेदी करावा, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत, असे पंजाबराव पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी रास्ता रोको करीत महामार्गाजवळ परिसरातील नागरिकांना मोफत भाजीपाला वाटप केले. या आंदोलनामुळे कराड-ढेबेवाडी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. चंद्रकांत यादव, विश्वासराव जाधव, साजिद मुल्ला, विक्रम थोरात, दीपक पाटील आदी आंदोलनात सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विजय दिवस’ला दिमाखदार प्रारंभ

0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

भारताच्या १९७१च्या पाकिस्तानवरील विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या १९व्या विजय दिवस समारोहाला बुधवारी शोभा यात्रेने मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. या शोभा यात्रेमध्ये विविध शाळांच्या चित्ररथांनी आबालवृद्धांचे लक्ष वेधले.

१९७१ला भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून येथे गेल्या १९ वर्षांपासून विजय दिवस समारोह साजरा केला जातो. समारोहास बुधवारी सकाळी येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेने प्रारंभ झाला. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या हस्ते त्यास प्रारंभ झाला. यावेळी वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, डॉ. अशोकराव गुजर, उद्योजक रवळनाथ शेंडे, शंकराप्पा संसुद्दी, अॅड. संभाजीराव मोहिते, अरुण जाधव, विनायक विभुते आदी मान्यवर उपस्थित होते.

शोभायात्रेत येथील पालिका शाळा क्रमांक नऊने शहीद जवान, पालिका शाळा क्रमांक सात आणि शिवाजी विद्यालयाने पर्यावरण विषय जनजागृतीपर, विठामाता विद्यालयाने वीर जवान, अॅग्लो उर्दु स्कुलने स्त्री सक्षमीकरण, शाहीन विद्यालयाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र हायस्कूलने पर्यावरण काळाची गरज, संत तुकाराम हायस्कूलने संतदर्शन आदी चिरत्रथ सहभागी झाले होते. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा आदी व्यक्तीरेखाही कलाकारांनी साकारल्या.

शोभायात्रेचे नेटके नियोजन अॅड. परवेज सुतार, रत्नाकर शानभाग, चंद्रकांत जाधव, सागर जाधव, शंकरराव डांगे, गणपतराव कणसे, अॅड. संभाजीराव मोहिते, विलासराव जाधव,संभाजी कणसे आदींनी केले.

शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आकर्षण

विजय दिवस समारोहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनात भारतीय व परदेशी बनावटीची शस्त्रे ठेवण्यात आली असून, यामध्ये रडार, हवेत मारा करणारी बंदुकीसह विविध प्रकारच्या बंदुकांचा समावेश आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी, नागरिकांची गर्दी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिंचणेर-वंदन प्रकरण३२ जणांचीजामिनावर मुक्तता

0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

चिंचणेर-वंदन येथील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या ३२ जणांची गुरुवारी सातारा येथील विशेष न्यायालयाने अटी-शर्तींवर जामिनावर मुक्तता केली.

चिंचणेर-वंदन (ता. सातारा) येथील माहेरवासिण नवविवाहितेच्या खूनप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी त्याच गावात राहणाऱ्या सिद्धार्थ उर्फ बारक्या दयानंद दणाणे (वय २४) या युवकाला अटक केली होती. दणाणे याने गावातील नवविवाहितेचा खून केल्याची माहिती मिळाल्यानंतर सहा डिंसेबरच्या रात्री जमावाने सिद्धार्थ दणाणे व त्याच्या नातेवाईकांच्या घरावर दगडफेक करीत परिसरातील वाहने जाळली होती. या बाबतची तक्रार अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार दाखल झाल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी चिंचणेर-वंदन येथील ३४ जणांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्यांपैकी २ अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली तर उर्वरित ३२ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुरुवातीला सर्वांना पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर ३२ जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या त्या ३२ जणांनी जामीन मिळण्यासाठी सातारा येथील विशेष न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. महेश कुलकर्णी यांनी म्हणणे सादर केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजय दिवस समारोहाचीदिमाखदार सांगता

0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

भारताने बांगलादेश मुक्तीच्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ कराडमध्ये विजय दिवस समारोह थरारक कसरतींसह लष्करातील जवानांच्या मर्दानी खेळांनी दिमाखात साजरा करण्यात आला.देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात साजऱ्या झालेल्या या समारोहास कराडकरांनी चांगलीच दाद दिली.

निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून कराडला विजय दिवस समारोह दर वर्षी दिमाखात साजरा केला जातो. शिवाजी स्डेडीयमवर झालेल्या यंदाच्या १९व्या विजय दिवस समारोहास मेजर जनरल राजविजेंद्र सिंग, ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य प्रमुख पाहुणे होते. या सांगता सोहळ्याला हजारोंची उपस्थिती होती. दुपारी समारोहाच्या मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. विजय ज्योत स्टेडियममध्ये आल्यानंतर लष्करी जवान आणि पोलिसांच्या संचलनाने प्रारंभ झाला.

बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी लेझीमची प्रात्यक्षिके सादर केली. ती सुरू असतानाच सुमारे दोन हजार फूट उंचीवरुन पॅरामोटर ड्रायव्हिंग करणारे जवान स्टेडियमच्या दिशेने झेपावले आणि उपस्थित आबालवृद्धांनी दिलेल्या वंदे मातरम, भारत माता की जय, जय शिवाजी-जय भवानींच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.

.........

रयत मिल्ट्री सायन्स

अभ्यासक्रम सुरू करणार

रयत शिक्षण संस्थेमार्फत कर्जत येथे पुढील वर्षापासून मिल्ट्री सायन्स अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना मिल्ट्रीच्या कक्षा खुल्या होतील, अशी घोषणा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी विजय दिवस कार्यक्रमात केली.

समितीच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, कराड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार तर पालिकेच्या वतीने मेजर जनरल राजविजेंद्र सिंग यांना मानपत्र देण्यात आले. परमवीरचक्र विजेते कर्नल बाणासिंग, योगेंद्र सिंग, आदर्श विद्यार्थी प्रणव गुरव, सुनिता पाटील, काजल पाटील, मुग्धा पाटील, प्रणय सपकाळ, वीरमाता निर्मला बाबर, वीरपत्नी श्रीमती गलांडे यांना सन्मानीत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडकोटांवरील माती, जलकुंभांची मिरवणूक

0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

मुंबई येथील अरबी समुद्रात साकारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी सातारा जिल्ह्यातील २५ गडकोट किल्ल्यांवरील शिवराय दुर्गभ्रमण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या पवित्र मृत्तिका व जलकुंभाची पालखीतून सोमवारी कराड शहरातून शाही मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानी, अशा जयघोषाने कराड नगरी दुमदुमून गेली होती.

मुंबई येथील अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक उभारले जाणार आहे. या शिवस्मारकाचे भूमिपूजन येत्या शनिवारी, २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्यासाठी पवित्र मृत्तिका व जलकुंभ नेण्यात येणार आहेत. सोमवारी सकाळी आकरा वाजता पांढरीचा मारुती मंदिरापासून शोभा यात्रेला दिमाखात सुरुवात झाली. यावेळी सजविण्यात आलेल्या पालखीमध्ये पवित्र मृत्तिका व जलकुंभ ठेवण्यात आले होते. शोभा यात्रेच्या प्रारंभी मर्दानी खेळांचे व दांडपट्ट्याच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण झाले. त्यापाठोपाठ छत्रपती शाहू महाराज यांच्यासह मावळ्यांची वेशभूषा परिधान केलेले युवक होते. घोड्यांवर छत्रपती शिवरायाची व मावळ्यांची वेशभूषा साकारलेले शिवभक्त होते. अत्यंत भारवलेल्या वातावरणात निघालेल्या या शोभायात्रेने कराडवासियांची मने जिंकली. शोभायात्रा कन्या प्रशाला, चावडी चौक, नेहरू चौक, आझाद चौक, गजानन चौक व दत्त चौक, अशी काढण्यात आली. शिवरायांवरील गीताने, पोवाड्याने व छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. चौका-चौकांत फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. दत्त चौकात मिरवणुकीचा समारोप झाला. चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ जिल्ह्यातील गडकोट किल्ल्यांवरील पवित्र मृत्तिका व जलकुंभ आणण्यासाठी योगदान देणाऱ्या शिवभक्तांचा प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला. त्यानंतर दिवसभर पालखी दत्त चौकात नागरिकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० टक्के कारागिरांचा परतीचा प्रवास

0
0

Maruti.Patil@timesgroup.com

Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : नोटाबंदीच्या निर्णयानंतर सोने-चांदी व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. दररोज कोट्यवधी रुपयांची होणारी उलाढाल लाखांवर आली आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कारागिरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कलाकुसरीचे मेहनतीचे काम करणारे ३० टक्के कारागिर आपापल्या गावांकडे परतले आहेत. सरत्या वर्षात दोनदा अशी स्थिती निर्माण झाल्याने कारगिरांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

सोने-चांदी व्यवसायाची कोल्हापूर हे प्रमुख बाजारपेठ आहे. दागिन्यांवर केल्या जात असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसरीमुळे येथील दागिन्यांना चांगलीच मागणी असते. त्यामुळे दररोज सराफ व्यवसायात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. गेल्या वर्षभरापासून मंदीच्या झळा बसत असल्या तरी, सराफ व्यावसायिक तग धरून होते. दोन लाखांपेक्षा अधिकच्या खरेदीला पॅनकार्ड सक्ती व कर प्रणालीमध्ये केलेल्या बदलांना विरोध करण्यासाठी सराफ व्यावसायिकांनी मध्यंतरी बेमुदत आंदोलन केले. ४५ दिवस चाललेल्या आंदोलनामुळे अनेक कारागीर आपापल्या गावी परतले होते. ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा हे कारागीर कोल्हापुरात दाखल झाले. नंतर दसरा, दिवाळी आणि विवाह मुहूर्तांमुळे पुन्हा सोने-चांदी व्यवसायाला उभारी येऊ लागली होती.

मात्र आठ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाने पुन्हा सराफ व्यवसायातील उलाढाल कमी झाली आहे. त्याचा फटका कारागिरांना बसला आहे. सराफांकडून कलाकुसरीचे काम करण्याच्या ऑर्डरच येत नसल्याने त्यांना बसून राहावे लागत आहे. काम नसताना केवळ बसुन दिवस काढणे, दिवसभराचा खर्च परवडत नसल्याने अनेकांनी आपल्या गावी परत जाणे पसंत केले. त्यामुळे गुजरी व परिसरात सुरू असणारा कलाकुसरीचा व्यवसाय निम्म्यावर आला आहे.

कोल्हापुरात पश्चिम बंगाल आणि कारवार येथील कलाकुसर करणाऱ्या कारागिरांबरोबच सोने-चांदीवर कलाकुसर करणाऱ्या कारागिरांची मोठी वस्ती आहे. शहराच्या गावनठाण भागात, उत्तरेश्वर पेठ आणि उपनगरात सानेगुरुजी वसाहत येथे मोठ्या संख्येने कारागिर राहतात. सोने दरातील घसरण आणि नोटाबंदीमुळे स्थानिक कारागिरांनाही चांगलाच फटका बसला आहे. केवळ ओळखीच्या जोरावर कलाकुसरीच्या ऑर्डर मिळत असल्याने त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. अन्यथा, या कारागिरांच्याही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असता.

नोटाबंदी निर्णयानंतर हौसेने सोने खरेदी करण्यामध्ये ग्राहकांमध्ये उत्साह नाही, त्यामुळे कलाकुसर करण्यासाठी ऑर्डरच मिळत नसल्याने बाहेरील राज्यातील ३० टक्के कारागिरांनी आपल्या गावी जाणे पसंत केले आहे. विवाह किंवा अन्य समारंभासाठी लागणारे दागिन्यावर स्थानिक कारागीर कालकुसर करत आहेत. पण त्याचेही प्रमाण अत्यंत कमी आहे.

शैलेश कित्तुर, स्थानिक कारागिर


मार्च, एप्रिलमध्ये झालेल्या बेमुदत आंदोलनानंतर कारागीर आपल्या गावी गेले होते. त्यानंतर दिवाळीनंतर पुन्हा सोने-चांदी बाजाराला तेजी येवू लागली होती. पण नोटाबंदी निर्णयानंतर पुन्हा मंदीचा झटका बसला आहे. दररोज कोट्यवधींची होणारी उलाढाल केवळ लाखांवर आली आहे. त्याचा परिणाम सराफ व्यावसायिकांबरोबर कारागिरांवरही झाला आहे.

अमोल ढणाल, अध्यक्ष जिल्हा सुवर्ण व सराफ असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरची सुनावणी लांबणीवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी एसआयटीने अटक केलेला पहिला संशियित आरोपी समीर विष्णू गायकवाड याच्या जामिनाबाबतची सुनावणी पुन्हा लंबणीवर पडली. उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलल्याने जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणी तीन जानेवारीला होणार आहे, तर दुसरा संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्या सह्या वकिलपत्रावर घेणे आवश्यक असल्याने त्याला २२ डिसेंबरला कोर्टात हजर करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिले. सोमवारी (ता. १९) जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील संशयित समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होती. उच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलल्याने जिल्हा व सत्र न्यायालयातील सुनावणीही तीन जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येतील साम्य शोधण्यासाठी तपास यंत्रणांनी गुन्ह्यातील गोळ्या आणि पुंगळ्या तपासणीसाठी स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडे पाठवल्या आहेत. या तपासणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, त्यामुळे समीरच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयातही सुनावणी होऊ शकलेली नाही.

दरम्यान, कॉम्रेड पनसरे हत्येतील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्यावर एसआयटीने आरोपपत्र दाखल केले असून, त्याला कोर्टात हजर करण्याचे आदेश जिल्हा कोर्टाने दिले होते. मागील तारखेला तांत्रिक अडचणींमुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीचे काम झाले. तावडेला कोर्टात हजर न केल्याने वकिलपत्रावर त्याची स्वाक्षरी घेण्याचे काम राहिल्याने त्याला कोर्टात हजर करण्याची विनंती तावडेचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी अर्जाद्वारे कोर्टाकडे केली होती. न्यायाधीश साळुंखे यांनी अर्जाची दखल घेऊन तावडेला २२ डिसेंबरला जिल्हा कोर्टात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. संशयित तावडे याच्यावतीने अॅड. समीर पटवर्धन यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षाच्या वतीने मात्र वकील उपस्थित नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. सुधीर कुंबळे न्यायालयीन कोठडीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बनावट नोटा छापून खपवण्याचा प्रयत्न करणारा डॉ. सुधीर रावसाहेब कुंबळे (वय ३३, रा. एव्हरग्रीन होम्स, नागाळा पार्क) याला कोर्टात हजर केले असता, कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिस कोठडी संपल्याने लक्ष्मीपुरी पलिसांनी त्याला सोमवारी (ता. १९) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, पोलिसांनी राजारामपुरी येथील प्रिंटर विक्रेत्याचा जबाब नोंदवला.

क्लिनिकमध्येच प्रिंटर आणि स्कॅनरच्या मदतीने बनावट नोटा छापून खपवण्याचा प्रयत्न करणारा डॉ. सुधीर कुंबळे पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यानंतर डॉक्टरचा छापखाना उघडकीस आला होता. पोलिसांनी त्याला शुक्रवारी (ता. १६) अटक केल्यानंतर कोर्टाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी डॉ. कुंबळे याला सोमवारी कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. दरम्यान, पोलिसांनी सोमवारी राजारामपुरीतील महालक्ष्मी कॉम्प्युटर शॉपीच्या मालकांचा जबाबा नोंदवला. डॉ. कुंबळे यांनी दोन वर्षांपूर्वी प्रिंटर आणि स्कॅनर मशीन खरेदी केल्याची माहिती विक्रेत्याने पोलिसांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढच्या वेळी कोल्हापुरात कुस्ती खेळेन: आमीर

0
0

रुस्तुम ए हिंद दादू चौगलेंच्या हस्ते आमिर खानचा सत्कार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कुस्ती हा अतिशय अवघड आणि अंग मेहनतीचा खेळ आहे. या खेळातली रोमहर्षकता मला अधिक भावते’ असे मत प्रसिद्ध अभिनेते आमीर खान यांनी व्यक्त केले. ‘मी मन लावून अभिनय करतो. त्यामुळे मिस्टर परफेक्शनिस्ट अशी माझी ओळख झाली असावी. पण, जगात कोणीही परफेक्शनिस्ट असत नाही. माझेही तसेच आहे’ असेही त्यांनी प्रांजळपणे कबुल केले.

आगामी ‘दंगल’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता आमीर खान सोमवारी कोल्हापुरात आला होता. यावेळी त्याने चाहते आणि पत्रकारांशी अस्खलीत मराठीत संवाद साधला. रुस्तम- ए- हिंद, महान भारत केसरी विजेते पैलवान दादू चौगले आणि त्यांचा मुलगा, महाराष्ट्र केसरी विनोद चौगले यांच्या हस्ते आमीर खानचा सत्कार करण्यात आला. अंबाबाई मंदिरानजीकच्या चौगले यांच्या निवासस्थानी झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात आमीर खानच्या हस्ते पैलवान विनोद चौगले स्पोर्टस् फाउंडेशनचेही उद‍्घाटन झाले. ‘महाराष्ट्रात कोल्हापुरी कुस्तीला ऐतिहासिक परंपरा आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

‘कुस्ती खेळताना दर सेकंदाला डावपेच आखावे लागतात. शरीर आणि बुद्धीचा एकाचवेळी वापर करावा लागतो’ असे सांगून आमीर, ‘प्रत्येक मुलगा किंवा मुलगी लहानपणी कुस्ती खेळतच असतो. त्याप्रमाणे मीही खेळलो होतो. प्रतिस्पर्ध्यावर जखमी न करता त्याच्यावर मात करणे, त्याला घायाळ करून हरवणे अशी रोमहर्षकता कुस्तीत असते. तीच मला भावते. ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाच्यानिमित्ताने मला कुस्तीविषयी अधिक माहिती मिळाली. दिग्दर्शक नितीश तिवारी यांनी या विषयावर कथा लिहिली. त्याचा अभ्यास केला. त्यानंतर मी कुस्तीमधील डाव समजून घेतले. नामवंत प्रशिक्षकांकडून त्याचे प्रशिक्षण घेतले.’

आमीर म्हणाला, ‘दिग्दर्शक नवनवीन कथानक घेऊन माझ्याकडे येतात. त्यानंतर चित्रपटात भूमिका कशी असेल तशी शरीरयष्टी तयार करत असतो. पैलवानाची ‌भूमिका करावी लागणार असल्याने पाच महिन्यांत २७ किलो वजन वाढवले. नंतर तरुणाची भूमिका करण्यासाठी पुन्हा तितकेच वजन कमी केले. सध्याचा ‘लूक’ही पुढील चित्रपटातील भूमिकेसाठीच आहे. कोणीच परफेक्शनिस्ट नसतो. पण चांगला अभिनय करण्याचा मी प्रयत्न करत राहतो. दिग्दर्शक, सहकलाकारांमुळे काही प्रमाणात यशही मिळते.

यावेळी दिग्दर्शक नितीश तिवारी, कलाकार फातिमा शेख, सानिया मल्होत्रा यांच्यासह चौगले कुटुंबीय उपस्थित होते.

नोटाबंदीचा निर्णय चांगला

‘काळा पैसा घालवण्याच्या प्रयत्नासाठी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यास माझा पाठिंबा आहे’ असे आमीर खान एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाला. ‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वांना काही प्रमाणात त्रास होत आहे. त्याप्रमाणे मलाही त्रास होत असला तरी, त्याची काही हरकत नाही’ असे त्याने सांगितले.

दुष्काळमुक्तीला हातभार

आपल्या सामाजिक उपक्रमांविषयी आमीर खान म्हणाला, ‘सत्यमेव जयते या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून माझे काम चालते. संस्थेच्या माध्यमातून ‘पाणी’ या विषयावर काम करत आहे. आगामी काळात राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी हातभार लावणार आहे.’

कुस्ती पुढच्या वेळी खेळेन

‘तुम्ही आखाड्यात उतरून कुस्ती खेळणार का?’ या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ‘कोल्हापुरी कुस्तीची वैभवशाली परंपरा आहे’ असे आमीर खान म्हणाला. ‘कुस्तीवरील चित्रपटात काम करताना कोल्हापुरात येण्याची संधी दादू चौगले यांच्यामुळे मिळाली. यापूर्वी मी दोन वेळा अन्य चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कोल्हापूरमध्ये आलो होतो. आता पैलवान दादू चौगले यांच्या सत्कारानिमित्त मला कोल्हापुरात येण्याची पुन्हा संधी मिळाली. कुस्तीसाठी प्रचंड सराव लागतो. हा खेळ सोपा नाही. त्यामुळे पुढीलवेळी मी दादू चौगले यांच्याकडून धडे घेऊन आखाड्यात उतरेन. कुस्ती खेळेन’ असे आमीर म्हणाला.

मोतीबागला भेट रद्द

आमीर खान मोतीबाग तालमीला भेट देणार होता. त्याप्रमाणे नियोजनही झाले. तेथे पोलिस बंदोबस्तही होता. आमदार सतेज पाटील, महापौर हसीना फरास यांच्यासह कुस्ती शौकीन, प्र‌शिक्षणार्थी मल्ल आमीर खानची प्रतीक्षा करत थांबले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत प्रतीक्षा करूनही आमीर तिथे आला नाही. प‌रिणामी शौकिनांची निराशा झाली.

गर्दीमुळे गोंधळ

आमीर खानला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तो आल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना चाहत्यांनी त्याला गराडा घातला. त्यामुळे खासगी सुरक्षारक्षक व पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली. सत्काराच्या ठिकाणीही व्यासपीठासमोर काही हौशी फोटोग्राफर, सेल्फी घेणाऱ्या उत्साही तरुणांनी त्यांना गराडा घातला. शेवटी आमीरनेच माइक घेऊन ‘खाली बसा’ असे म्हणत गर्दीला शांत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरार चव्हाणचे पर्यटन सुरूच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटा बंदीच्या निर्णयानंतर नियमबाह्य पद्धतीने ६ लाख ९२ हजार रुपयांच्या नोटा बदलून देणारा स्टेट बँकेतील कर्मचारी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. पत्नीसह पर्यटनासाठी बाहेर गेलेला संशयित चंद्रकांत मल्लू चव्हाण याचा मोबाइल बंद आहे, तर पोलिसांनी सोमवारी (ता. १९) बँकेतील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली.

केंद्र सरकारच्या नोटा बंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बदलताना काळा पैसा बँकांमध्ये जमा होऊ नये, यासाठी बँकेतील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचे ओळखपत्र घेऊनच त्यांच्या नोटा बदलून द्याव्यात अशा सूनचा रिझर्व्ह बँकेने दिल्या होत्या. शहरातील मार्केट यार्ड परिसरातील स्टेट बँकेतील कर्मचारी चंद्रकांत चव्हाण याने मात्र सात कर्मचाऱ्यांची केवायसी न करताच त्यांना सहा लाख ९२ हजार रुपायांची रक्कम बदलून दिली. हा प्रकार बँक मॅनेजर धनंजय अभ्यंकर याच्या लक्षात येताच त्यांनी चव्हाण याच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनंतरही चव्हाण गेली सहा दिवस फरार आहे. पोलिसांनी त्याच्या उचगाव येथील घराची झडती घेतली असून, त्याच्या नातेवाकांकडेही चौकशी केली. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक तृप्ती देशमुख यांनी फिर्याद दाखल झाल्यानंतर पाच दिवसांनी बँकेतील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. या चौकशीत त्यांनी कर्मचाऱ्यांनी वितरित केलेल्या रकमांची माहिती घेतली असून, चव्हाण याच्याकडील व्यवहारांचीही माहिती घेतली. चव्हाण याच्या अटकेसाठी प्रयत्न सरू असून, त्याला अटक केल्यानंतरच नव्या नोटा नेमक्या कणाला दिल्या ते स्पष्ट होणार आहे, अशी माहिती तपास अधिकारी तृप्ती देशमुख यांनी दिली. दरम्यान, संशयित चव्हाण याचे पर्यटन अजूनही सुरू असून, तो घरी परतलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भू विकास’च्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवृत्त झाल्यानंतर उत्पन्नाचा स्त्रोत नाही. त्यामुळे आयुष्यभर नोकरी केलेल्या ठिकाणी जमा झालेली हक्काची रक्कम हीच पुंजी. पण ती पुंजीही अजून मिळत नाही. त्यातून जीवन जगण्यास अडचणी येत आहेत. काही कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या हालअपेष्टा वाढल्या. भूविकास बँकेतील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियांची ही अवस्था आहे. आयुष्यभराची पुंजी सरकारने ताबडतोब द्यावी, यासाठी सेवानिवृत्तांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयानंतर या कर्मचाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. बँकेतील २०० कर्मचारी निवृत्त असून त्यांना देय असलेली रक्कम १२ कोटी रुपये इतकी आहे. त्यामध्ये १३२ कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची रक्कम तीन कोटी ५० लाख, नियमित सेवानिवृत्त ४५ कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी व रजेचा पगार रक्कम तीन कोटी २५ लाख,२३ स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांची नुकसान भरपाईसह असलेल्या ५ कोटी २५ लाख रुपये रकमेचा समावेश आहे. स्वेच्छानिवृत्ती देत असताना प्रथम नुकसानभरपाईची रक्कम द्यावी असा सरकारचा आदेश आहे. पण १३ कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये देण्यात आले आहेत. ही परिस्थिती फारच दयनीय आहे. याबाबत सातत्याने आवाज उठवूनही बँकेने काहीही दखल घेतलेली नाही. बँकेच्या जिल्ह्यातील दोन मालमत्ता विक्रीची मान्यता मिळाली आहे. पण दोन महिने अंमलबजावणी झालेली नाही. त्यातून थकीत रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांच्यावतीने मांडण्यात आली.

या रकमा न मिळाल्याने आजारपण, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न खर्च, प्रापंचिक खर्च करण्यास अडचण येत असल्याने देय रकमा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. यामध्ये संजय साळोखे, श्रीकांत कदम, बी. बी. कांबळे, एम. जी. शेख, आर. पी. चौगले, बी. बी. महाजन, डी. जी. हिर्डेकर, एस. डी. कदम, कमल पोवार, उज्वला पाटील, सुमन भालेकर, सुनीता गवसे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारक आंदोलनाच्या पवित्र्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महानगरपालिका मार्केटमधील दुकानगाळ्यांना केलेल्या भाडेवाढीच्याविरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अन्यायी भाडेवाढ रद्द करावी ही गाळेधारकांनी केलेली मागणी महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी धुडकावून लावल्यावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील गाळेधारकांच्या शनिवारी (ता. २४) होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

महानगरपालिकेची शहरात अनेक मार्केट असून २०९५ गाळे भाड्याने दिले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार गाळेधारकांना दुकानगाळ्यांना रेडिरेकनरनुसार भाडेवाढ केली आहे. भाडेवाढीच्या नोटिसा पाठविल्यावर व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे. काही भाडेकऱ्यांना तिप्पट तर काहींना शंभरपट भाडेवाढ आकारण्यात आली. भाडेवाढीच्या विरोधात सोमवारी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली भाडेधारकांनी महानगरपालिका आयुक्त शिवशंकर यांची भेट घेऊन भाडेवाढ मागणीच्या नोटिसा मागे घेण्याचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, ‘महानगरपालिकेच्या मार्केटमधील दुकानगाळ्यात अनेक भाडेकरू ५० वर्षे व्यवसाय करत आहेत. कोणत्याही सुविधा नसताना पदरमोड करून व आर्थिक झळ सोसून व्यापारी व्यवसाय करत आहेत.’ तीन डिसेंबर रोजी महानगरपालिकेने भाडेवाढीच्या नोटीस पाठवल्या असून काही ठिकाणी भाडेवाढ तिप्पट, शंभरपट, दोनशे पट, तीनशे पट व हजारपट आली आहे. ही भाडेवाढ अन्यायकारक असून पूर्वीचे भाडेवाढ भरून घ्यावी, अशी मागणी केली. या संदर्भात शनिवारी (ता. २४) निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आल्याचे सुनीलकुमार सरनाईक यांनी सांगितले. शिष्टमंडळात दुकानदार संघटनेचे अध्यक्ष मधूकर हरेल, संभाजीराव जगदाळे, बबनराव महाजन, संदीप वीर, अस्लम बागवान यांच्यासह गाळेधारकांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images