Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोलापुरात भाजप–सेनेचा झेंडा

$
0
0

सोलापूर
सोलापुरातील ९ नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप – शिवसेनेने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन नगरपालिकांवर वर्चस्व सिद्ध केले असले, तरी काँग्रेसचे पुरते पानिपत झाले आहे. माजी मंत्री आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना अक्कलकोट व दुधनी या दोन्ही नगरपालिकांत भाजपने जबर धक्का दिला आहे. मैंदर्गीमध्ये केसूर – पाटील गटाने बाजी मारली आहे. करमाळा आणि मंगळवेढ्यात राष्ट्रवादीने सत्ता कायम राखली. पंढरपुरात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी काँग्रेसचा दारुण पराभव करीत परिचारक गटाचे वर्चस्व सिद्ध केले आहे. बार्शीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या सत्तेला माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सुरुंग लावला. तर, कुर्डूवाडीत शिवसेनेने सत्ता कायम राखली आहे. सांगोल्यात आमदार गणपतराव देशमुख व माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या महाआघाडीने बहुमत मिळवले असले, तरी नगराध्यक्षपद महायुतीकडे गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाची दमदार एंट्री

$
0
0



सूर्यकांत आसबे, सोलापूर

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने एकूण चार नगरपालिकांमध्ये दमदार एंट्री केली भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धूळ चारुन यश मिळविले. शिवसेनेने आपला गड शाबूत राखताना बार्शीचा राष्ट्रवादीच्या दहा वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भगवा फडकविला आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख एकूण चार नगरपालिकांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तर सहकारमंत्री सुभाष देशमुख या निवडणुकीत पुरते नापास झाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दुधनी नगरपालिकांमध्ये काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती. मात्र, विकास कामांबाबत स्वामी समर्थांची अक्कलकोट नगरी कायमच उपेक्षित राहिली होती. मागील निवडणुकीत २१ पैकी प्रत्येकी १० उमेदवार भाजप आणि काँग्रेसचे असताना सत्तेची चावी मात्र, एकमेव नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असायची ते ज्यांच्या पारड्यात आपले मत टाकायचे तो पक्ष सत्ता उपभोगायचा. काँग्रेसने येथे सर्वाधिक काळ सत्ता उपभोगली होती. भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी येथे नेहमी राष्ट्रवादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या राजकीय साठमारीत समर्थ नगरीचा विकास मात्र खुंटला. काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनीही आपल्या सोयीच्या राजकारणाला महत्व दिले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने नगरपालिका ताब्यात घेण्याच्या इर्षेने जोमाने प्रचार केला. नव्या दमाचा तालुकाध्यक्ष म्हणून सचिन कल्ल्याणशेट्टी यांची निवड केली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गल्लोगल्ली फिरुन भाजपचा प्रचार केला. मात्र, ऐनवेळी सिद्रामप्पा पाटील यांनी भाजपची साथ सोडली तरीही जनता मागे हटली नाही, भाजपच्या पारड्यात घसघशीत १५ जागा टाकत स्पष्ट बहुमत मिळवून दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथे जाहीर सभा झाली होती. भाजपच्या शोभा खेडगी नगराध्यक्ष झाल्या.

आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या दुधनीतही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी चमत्कार घडविला. तब्बल ५० वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावला इतकेच नव्हे तर नगराध्यक्षपदही खेचून आणले. तीन अपत्ये असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून निवडणूक जिंकण्याचा म्हेत्रे यांचा डाव मतदारांनी हाणून पाडला. भाजपचे भीमाशंकर इंगळे यांना नगराध्यक्ष केले. बहुमत काँग्रेसचे आणि नगराध्यक्ष भाजपचा अशी दुधणीची अवस्था आहे. म्हेत्रे यांना येथे जबरदस्त धक्का बसला आहे. मैंदर्गी नगरपालिकेवर नेहमी स्थानिक गटांचाच झेंडा राहिला आहे. मात्र, येथेही भाजपचे ४ नगरसेवक निवडून आणण्याची किमया देशमुख यांनी केली आहे.

पंढरपूरमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजपच्या मदतीने एकहाती सत्ता राखली आहे, त्यांनी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचा पराभव केला. पंढरीचा रखडलेला विकास आणि परिचारक यांनी भाजप सरकारकडून मंजूर करून आणलेला कोट्यवधींचा निधी हे परिचारक यांच्या विजयाचे महत्वाचे कारण ठरले. येथे अपक्ष नगरसेवकांनी बाजी मारली हे विशेष म्हणावे लागेल. येथे परिचारक गटाच्या साधना भोसले नगराध्यक्षाच्या खुर्चीत विराजमान झाल्या.

सांगोला नगरपालिकेत शेकाप आमदार गणपतराव देशमुख आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांना जास्तीच्या जागा मिळाल्या, परंतु शिवसेना भाजप आणि रिपाई महायुतीने नगराध्यक्षपद खेचून आणले. राणी माने यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली. आतापर्यंतच्या इतिहासात आमदार देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मंगळवेढा नगरपालिकेत आमदार भारत भालके यांची काँग्रेस, शहा गट आणि राष्ट्रवादीने सत्ता राखली आहे. राष्ट्रवादीच्या अरुणा माळी नगराध्यक्ष झाल्या. बार्शीत माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या १० वर्षांच्या सत्तेला शिवसेनेने सुरुंग लावला. ४० पैकी तब्बल २९ जागा जिंकून शिवसेनेने येथे भगवा फडकविला. सोपल यांचे सांगली येथील सभेत झालेले वाचाळ भाषण त्यांची सत्ता जाण्याचे प्रमुख कारण ठरले. तर आर्यन कारखान्याने त्यांना पुरते अडचणीत आणले. शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत येथे विजयाचे शिल्पकार ठरले. त्यांचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी झाला. भाजपचा मात्र येथे पराभव झाला. शिवसेनेचे असिफ तांबोळी नगराध्यक्ष झाले. करमाळा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐनवेळी आघाडी केली आणि नगरपालिकेची सत्ता राखली. माजी आमदार जयवंतराव जगताप आणि माजी आमदार श्यामल बागल यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. वैभवराजे जगताप नगराध्यक्ष झाले. भाजप शिवसेना आणि माजी नगराध्यक्ष कन्हैयालाल देवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. येथे करमाळ्याचे शिवसेना आमदार नारायण पाटील यांना पराभव पत्करावा लागला. कुर्डूवाडीत मात्र स्वाभिमानीची सत्ता आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष, अशी स्थिती आहे. समीर मुलाणी नगराध्यक्षपदी निवडून आले. येथे आमदार बबन शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांच्या स्वाभिमानी आणि रिपाई आघाडीने नऊ जागा जिंकल्या. शिवसेना आणि स्वाभिमानाला गड आला पण सिंह गेला, असे म्हणण्याची वेळ आली. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असलेल्या राष्ट्रवादीचा या निवडणुकीत पराभव झाला. अजित पवार यांच्याकडे या निवडणुकीची सूत्रे होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे नऊ पैकी अक्कलकोट, मैंदर्गी, दूधनी आणि पंढरपूर या चार नगरपालिकांची जबाबदारी होती. त्यापैकी मैंदर्गी वगळता तीन नगरपालिका त्यांनी ताब्यात घेतल्या. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे कुर्डुवाडी, बार्शी, सांगोला, करमाळा आणि मंगळवेढा या पाच नगरपालिकांची जबाबदारी होती. मात्र, त्यापैकी एकही नगरपालिका त्यांना ताब्यात घेता आली नाही. बार्शीत मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली आणि त्यांनी बार्शी दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, तेथे भाजपाची पुरती धूळधान उडाली. नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री पास तर सहकारमंत्री नापास झाले आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपचा कस लागणार आहे. त्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजप आणि शिवसेनेला रोखताना नाकी नऊ येणार हे मात्र, या नगरपरिषदा निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण

$
0
0

लेह, लडाखमधील कामगिरीनंतर कुणालगीर यांचे जम्मूमध्ये शौर्य

सुनील दिवाण, पंढरपूर

जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी दोन हात करताना पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणालगीर मुन्नागीर गोसावी मंगळवारी शहीद झाले. मंगळवारी सकाळी सैन्यदलाकडून कुणालच्या भावाला फोनवरून ही दुःखद बातमी कळताच, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

पंढरपूरमधील अत्यंत सधन कुटुंबातील धाकटा मुलगा असलेल्या कुणाल यांना सुरुवातीपासून सैन्यदलाची आवड. पंढरपूर येथील कवठेकर प्रशालेत शालेय शिक्षण आणि नंतर एमकॉम पदवी घेऊन सैन्यदलाचे प्रशिक्षण घेत ते नऊ वर्षांपूर्वी अधिकारीपदावर सैन्यात दाखल झाले. प्रारंभी लेह, लडाख, सागर, मणिपूर अशा विविध पोस्टिंगनंतर सध्या ते जम्मूमध्ये रुजू झाले होते. त्यानंतर २६ नोव्हेंबरलाच ते पत्नी उमा आणि ५ वर्षांची मुलगी उमंग हिला घेऊन पुन्हा जम्मूकडे रवाना झाले होते. मंगळवारी सकाळपासून टीव्हीवर चकमकीच्या बातम्या सुरू असल्याने गोसावी कुटुंब धास्तावले होते. यातच सकाळी कमांडंट अधिकाऱ्यांकडून मेजर कुणाल शहीद झाल्याचा फोन त्यांच्या भावाला आला.

फोन येताच त्यांचे दोन्ही भाऊ तातडीने जम्मूकडे रवाना झाले. ही बातमी पंढरपूर परिसरात समजताच पंढरपूरकरांनी गोसावी यांच्या घरापाशी गर्दी करण्यास सुरुवात केली. यातच जिल्हा प्रशासनाकडून मात्र या बातमीला पुष्टी मिळत नसल्याने कुटुंबीय कसातरी धीर ठेवून होते. दुर्दैवाने ही बातमी खरी असल्याचे समजताच परिसरावर शोककळा पसरली.
....................

लष्करी सेवा हेच होते संभाजी कदम यांचे ध्येय

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

नांदेड जिल्ह्यातील जानापुरी (ता. लोहा) येथील जवान संभाजी यशवंतराव कदम (३३) यांना जम्मू-काश्मिरमधील नगरोटा येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी, आईवडील, दोन बहिणी असा परिवार आहे. रत्नेश्वरी मातेच्या पायथ्याशी वाढलेला जिगरबाज कणखर कदम यांच्या वीरमरणाचे वृत्त समजताच जानापुरीवर शोककळा पसरली असून गावात चूलही पेटलेली नाही.

कदम हे डिसेंबर २००२मध्ये ५ मराठा लाइट इन्फ्रंट्रीमध्ये दाखल झाले. १४ वर्षे सेवा बजावल्यानंतर पुढील वर्षी ते निवृत्त होणार होते. कदम आईवडिलांना एकुलते एक पुत्र होते. त्यांचे वडील पुण्यात खासगी कंपनीत वॉचमन तर आई पुण्यात मजुरी करते. कदम यांची पत्नी व तीन वर्षांची मुलगीही पुण्यात वास्तव्यास आहेत.

कदम गौरीपूजनावेळी जानापुरीत आले होते. त्यावेळी ‘नोकरी करावी, तर सैन्यातच करावी, त्यासारखी देशसेवा दुसऱ्या कोणत्याही नोकरीत नाही. आपल्या नोकरीचा अभिमान वाटतो,’ असे त्यांनी गावातील तरुणांना आवर्जून सांगितल्याची आठवण शहाजी कदम तसेच पांडुरंग कदम या त्यांच्या मित्रांनी जागवली. कदम यांच्या रूपाने अतिशय धाडसी शूरवीर पुत्र नांदेड जिल्ह्याने गमावल्याची व्यक्त होत आहे. पालकमंत्री दिवाकर रावते, आमदार हेमंत पाटील यांनी कदम यांना श्रद्धांजली वाहिली.
......................

मुलाचा अभिमान

कुणाल यांना लहानपणी बबलू या टोपणनावाने हात मारली जात असे. आपला लाडका बबलू सैन्यदलात उच्चपदावर जावा ही कुटुंबाची इच्छा होती. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी आपला मुलगा दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाल्याचा अभिमान असल्याचे त्यांचे वडील मुन्नागीर गोसावी यांनी सांगितले. मेजर कुणाल यांच्यावर त्यांच्या वाखरी येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आज अंत्यसंस्कार

त्यांचे पार्थिव आज, बुधवारी जम्मू-काश्मीरहून विमानाने नांदेडला व त्यानंतर जानापुरी येथे आणले जाणार आहे. तेथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. लष्कर तसेच जिल्हा पोलिस दलातर्फे त्यांना मानवंदना दिली जाणार आहे. जिल्हा पोलिस दल, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींसह विविध यंत्रणा जानापुरी येथे पोहोचल्या आहेत. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार समन्वय साधत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर पालिकेत गोंधळ

$
0
0



सोलापूर

सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभेत शहरातील कचरा उचलण्याच्या २४ कोटींच्या विषयाला मंजुरी देऊ नये यासाठी कामगार संघटनांनी आंदोलन केले. परंतु, सत्ताधाऱ्यांनी मोठ्या पोलिस बंदोबस्तात हा मक्ता देण्याच्या विषयाला बहुमताने मंजुरी दिली.

सोलापूर शहरातील आठही विभागीय कार्यालयांतर्गत कचरा उचलण्याच्या कंत्राट यशश्री इंटरप्रायजेस आणि वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीला देण्याचा विषय गेल्या तीन आठवड्यांपासून तहकूब ठेवण्यात आला होता. स्थायी सभेत चर्चा झाल्यानंतर या विषयाला मंजुरी देण्यासाठी बुधवारी सभापती रियाज हुंडेकरी यांनी विशेष सभा बोलाविली होती. या विषयास विरोध करण्यासाठी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली सभापती रियाज हुंडेकरींना घेराव घातला. कचरा उचलण्याचा विषय सर्वसाधारण सभेकडे पाठवावा. या विषयाला स्थायीत मंजुरी देऊन सर्वसाधारण सभेचे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये. तूर्तास हा विषय स्थगित करावा, अशी मागणी नरेंद्र काळे यांनी केली. या विषयावर तासभर घेराव घालण्यात आला.

सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बहुमत असल्याने ते बहुमताने मंजुरी देण्यावर ठाम राहिले. विरोधी सदस्यांचा गोंधळ चालूच राहिल्याने स्थायी समिती सभेला पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आणि पोलिस बंदोबस्तात स्थायीचे कामकाज सुरू झाले. इकडे स्थायी समिती सभागृहाचा दरवाजा बंद करण्यावरून पोलिस आणि भाजप नगरसेवकात बाचाबाची झाली. शेवटी पोलिसांनी वातावरण शांत करीत सभेचे कामकाज सुरू झाले. विरोधकांचा आणि कामगारांचा विरोध असतानाही सत्ताधाऱ्यांनी तसेच सभापतींनी बहुमतने मंजुरी देत सभा तहकूब केली. दरम्यान, १ ते ४ विभागात कचरा उचलण्यासाठी यशश्री इंटरप्रायजेस यांना प्रति टन १६७० रुपये तर पाच ते आठ झोनसाठी वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीला १६८० रुपये दर देण्यात आला. १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून हा खर्च वेळेत करण्याचे गरजेचे असल्याने या विषयाला मंजुरी देण्याची आयुक्तांनीच विनंती केल्याने या विषयाला मंजुरी देण्यात आल्याचे सभापतींनी सांगितले.

विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे म्हणाले, कचरा उचलण्याच्या विषयात गौडबंगाल आहे. सत्ताधाऱ्यांनी मोठा आर्थिक वाटा घेत या विषयाला स्थायीत मंजुरी दिली आहे. या विषयात पालिकेचे हित पहिले नाही. या विषयावर सभेत चर्चा होण्याअगोदर भ्रष्ट सत्ताधाऱ्यांनी विषयाला मंजुरी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकमंगल’चा गोपाळराव देशमुखांना विशेष पुरस्कारसई परांजपे, प्रवीण बांदेकर, श्रीकांत देशमुखांचा होणार सन्मान

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

लोकमंगल वाचनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या लोकमंगल साहित्य पुरस्काराची घोषणा पुरस्कार समितीचे अध्यक्ष रोहन देशमुख आणि वाचनालयाचे अध्यक्ष दिनकर देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

सई परांजपे (आणि मग एक दिवस-अनुवाद मूळ पुस्तक-नसरुद्दीन शाह यांचे आत्मचरित्र), प्रवीण बांदेकर (उजव्या सोंडेच्या बाहुल्या-कादंबरी) आणि श्रीकांत देशमुख (पडझड वाऱ्याच्या भिंती-ललित लेखसंग्रह) यांना लोकमंगल साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या शिवाय जिल्ह्यातील इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ११ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शनिवार, १० डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात पत्रकार उदय निरगुडकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद कुणाल गोसावी यांना अखेरचा निरोप

$
0
0

सुनील दिवाण । पंढरपूर

जम्मू मधील नगरोटामध्ये अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या जिगरबाज मेजर कुणाल गोसावी यांच्यावर आज पंढरपूर जवळील वाखरी येथे लष्करी इतमामात हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आजोबांच्या कडेवर बसून चिमुरड्या उमंगने आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांनी 'अमर रहे... अमर रहे, शहीद कुणाल गोसावी अमर रहे', 'भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम', अशा घोषणा दिल्या.

आज सकाळी साडेदहा वाजता लष्कराच्या हेलिकॉप्टरने शहीद मेजर कुणाल यांचा मृतदेह पंढरपूर मध्ये आणण्यात आला. यावेळी हॅलिपॅडपासून त्यांच्या डाळे गल्लीतील निवासस्थानापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोकांनी जयजयकार करीत साश्रु नयनांनी सलामी दिली. सकाळी अकरा वाजल्यापासून गोसावी यांच्या निवासस्थानी हजारो स्त्री-पुरुषांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी वातावरण अतिशय भावनिक बनले होते.



दुपारी साडेबारा वाजता ठरल्याप्रमाणे सजविलेल्या ट्रकवर शहीद मेजर कुणाल यांचे पार्थिव ठेवण्यात आले. 'मेजर कुणाल अमर रहे'च्या घोषणात ही अंत्ययात्रा पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्ग , स्टेशन रोड , कॉलेज चौक मार्गे वाखरी येथे आणण्यात आली. यावेळी पंढरपुरातील नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करीत अंतिम दर्शन घेतले. शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला होता. शहरात ठिकठिकाणी अंत्ययात्रेच्या मार्गावर मेजर कुणाल यांचे मोठंमोठे फलक लावून सडा-रांगोळ्या काढून आणि फुले टाकून मार्ग सजविण्यात आला होता.

दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलीस व लष्करी जवानांनी शहिद मेजर कुणाल गोसावी यांना अखेरची मानवंदना दिली. त्यावेळी उपस्थित जवान, तसेच जनसमुदायाला भावना अनावर झाल्या. त्यानंतर शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या आई वृंदा गोसावी यांच्याकडे राष्ट्रीय ध्वज लष्कराच्या वतीने सुपूर्द करण्यात आला. लष्कराच्यावतीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून शहीद कुणाल गोसावी यांना अखेरची मानवंदना दिली. पोलीसांच्यावतीनेही शहीद कुणाल गोसावी याना अखेरची मानवंदना देण्यात आली. वडील मुन्नागीर आणि मेजर कुणाल यांची कन्या उमंग यांनी अग्नी देताच अवघा परिसर शोकाकूल झाला होता.



अंत्यसंस्कार होईपर्यंत धीर धरून बसलेल्या कुणालच्या वीरपत्नी उमा यांचा धीर खचल्याने त्यांना येथेच त्रास होऊ लागताच तातडीने वैद्यकीय मदत देऊन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले . आपल्या लाडक्या बबलूचे अंतिम दर्शन घेताना वीरमाता वृंदा यांनाही शोक अनावर झाला. विशेष म्हणजे आपल्या शहीद वडिलांना पोलीस आणि सैन्यदलाकडून अखेरची सलामी सुरु असताना ५ वर्षाची चिमुरडी उमंग देखील चौथऱ्याजवळ उभी राहून आपल्या वडिलांना सलामी देऊ लागताच उपस्थिताना आपल्या अश्रूचा बांध रोखणे अशक्य झाले होते .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखान्यांच्या प्रदूषणावर ऑनलाइन नियंत्रण

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

साखर कारखान्याच्या धुराड्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे होणारे प्रदूषण आणि रासायनिक घटक असलेल्या सांडपाण्यामुळे अनेकवेळा नदीतील मासे आणि जलचर मृत होण्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात, अशा प्रकाराला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने चाप लावली आहे. प्रदूषण मंडळाने सर्वच कारखान्यांना ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टिम बंधनकारक केल्याने प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने ही यंत्रणा कार्यान्वित करून दिल्लीच्या सर्व्हरला जोडून आघाडी घेतली आहे. कारखान्याच्या धुराड्यातील धुराचे परीक्षण या यंत्रणेच्या मदतीने होऊन यात असलेल्या सर्व घटक घटकांची सद्यस्थिती प्रदूषण मंडळाला या सर्व्हरमुळे समजू शकणार आहे. या पद्धतीने साखर कारखाना, आसवानी प्रकल्प आणि सहवीज निर्मिती प्रकल्पातून प्रक्रिये शिवाय बाहेर पडणारे घटक रसायनामधील सर्व घटकांचे परीक्षण देखील प्रदूषण मंडळाला करता येणार असल्याने सर्व सामान्य जनतेला या घटक प्रदूषणापासून होणार त्रास कायमचा बंद होणार आहे.

प्रदूषण शून्यावर आणले- सुधाकर परिचारक

केंद्रीय प्रदूषण मंडळाने वास्तविक हा हंगाम सुरू करण्यापूर्वीच अशी यंत्रणा बसविण्याचे आदेश सर्व साखर कारखान्यांना दिले होते. मात्र, सुरुवातीला या यंत्रणेची किंमत कोटभर रुपये सांगण्यात येत असल्याने अनेक कारखाने थांबले होते. आता ही यंत्रणा २० ते २२ लाखात मिळू लागल्याने इतर कारखाने देखील यंत्रणा बसविण्यास सुरुवात करतील. सोलापूर जिल्ह्यातील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने मात्र, तातडीने ही यंत्रणा बसवून सर्व्हर मार्फत दिल्लीला ऑनलाइन रिपोर्टिंग सुरू झाल्याने या कारखान्यातून होणारे प्रदूषण संपून शुन्यावर आल्याचा दावा कारखान्याचे संस्थापक सुधाकर परिचारक यांनी ‘मटा’ शी बोलताना केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएमच्या रांगेत कार घुसली; १० जखमी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

विजापूर मार्गावरील आतारनगर येथे इंडियन बँकेच्या एटीएमबाहेर पैशांसाठी रांग लावणाऱ्या लोकांवर अपघाताची आफत कोसळली आहे. या मार्गाने जाणारी एक भरधाव कार रांगेमध्ये घुसल्याने झालेल्या अपघातात १० जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कारचालक दारूच्या नशेत होता, अशी माहिती मिळाली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

आज सकाळी १० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर मद्यधुंद कारचालकाला संतप्त जमावाने बेदम चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले. हा कारचालक शहरातील एका राजकीय पुढाऱ्याकडे नोकरीला असल्याचीही माहिती मिळाली आहे.

दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयाला एक महिना पूर्ण झाला तरी अद्यापि पैशांची चणचण दूर झालेली नाही. त्यामुळेच ज्या एटीएममध्ये पैसे आहेत त्याबाहेर लांबच लांब रांगा आजही लागत आहेत. या स्थितीमुळेच सोलापुरात हा विचित्र अपघात घडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करमाळा तुरुंग फोडून तीन आरोपी पळालेपाच आरोपींची प्रयत्न; दोघांना जागीच अटक

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

पारधी समाजाच्या पाच आरोपींनी शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास करमाळ्यातील तुरुंग फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तावर असलेल्या गार्डनी दोन आरोपींना पकडले असले मात्र, उरलेले तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक विरेश प्रभू आणि इतर अधिकाऱ्यांनी जेलला भेट देऊन पाहणी केली. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना झाली आहेत. स्थानिक पोलिस परिसरातील उसाच्या फडात आरोपींचा शोध घेत आहेत.

तुरुंग तोडून पळून गेलेले तीनही आरोपी चोऱ्या आणि दरोड्याच्या प्रकरणातील असून, पोलिसांनी सर्वत्र सावधानतेचा इशारा दिला आहे. सोलापूर आणि नगर जिल्ह्यात अनेक दरोड्यांचा गुन्ह्यासंदर्भात या आरोपींकडून चौकशी सुरू होती. एक घरफोडी आणि एका दरोड्याच्या गुन्ह्यात हे तीनही आरोपी करमाळा येथील तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होते. सुनील शिवाजी काळे, राजा आकाश काळे आणि अनिल संभाजी काळे हे दरोडेखोर पळून गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमळाची कमाल; पृथ्वीराज चव्हाणांच्या विकासाला सलाम

$
0
0



राम जगताप, कराड

कराडकरांना विकास काय असतो, हे दाखवून देणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडीस २९ पैकी तब्बल १६ जागांवर विजयी करून कराडकरांनी त्यांच्या कामाचे योग्य मोजमाप केले. भाजपने अनपेक्षितपणे चार जागांसह नगराध्यक्ष पदावर विजय मिळवित कराडात कोमजलेले कमळ पुन्हा टवटवीत करण्यात यश मिळविले. शिवाय कराडकरांनी यंदा नगरपरिषदेत अनेक वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या आमदार बाळासाहेब पाटील यांना पराभूत केले. माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकरांनाही धूळ चारली.

कराड नगरपालिकेची यंदाची निवडणूक काहीशी वेगळ्या वळणांवर होती. येथील नेत्यांच्या पारंपरिक गटांमध्ये सत्तेचे अंतर्गत वाटप ठरवून या निवडणुका होत होत्या. त्यामुळे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व येथील राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांची असणारी युती यावेळी कायम राहून काँग्रेसचे माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व डॉ. अतुल भोसले या दोन कट्टर विरोधकांना शहराच्या राजकारणात येऊ द्यायचे नाही, यासाठी हे दोन्ही आमदार दोन्ही आमदारकीच्या सत्तेसाठी राजकीय खेळी करतील, असा अंदाज होता. मात्र तो खोटा ठरवत प्रत्यक्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या दोन्ही आमदारांनी स्वतंत्र आघाड्या स्थापन करीत निवडणुकीला सामोरे गेले. याचा जास्तीचा फायदा आमदार चव्हाण गटाला झाला तर आमदार पाटील गटाचे पुरते पानिपत झाले. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या राजकीय भांडणात अपेक्षितपणे चित्र बदलत जाऊन याचा फायदा तिसऱ्याला मिळाला. भाजपाचे चार नगरसवेक आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी होऊन कोमजलेले कमळ पुन्हा उमलले.

नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँगेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या जनशक्ती आघाडीनेच शहरातील सर्व प्रभागांत आपले उमेदवार उभे केले. तसेच शारदा जाधव या उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले होते. त्यामुळे बहुमताचा पहिला नारळ त्यांच्याच आघाडीने फोडला होता. याचबरोबर नगराध्यक्षपदाचा उमेदवारही त्यांच्याच आघाडीचा निवडून येईल, अशी शक्यता वाटत होती. त्यामुळे भाजपचा कोणी फारसा विचार करीत नसल्याचेच प्रारंभीचे चित्र होते. या उलट सत्ताधारी राष्ट्रवादी पुरस्कृत लोकशाही आघाडीची सत्ता पालिकेत वर्षानुवर्षे असतानाही त्यांना सर्वच्या सर्व जागांवर उमेदवारही मिळाले नसल्याने त्यांच्या पराभवाची चाहुल मतदारांना अगोदरचा लागली होती. या संधीचा फायदा उठविण्यासाठी व पक्षाने दोन महत्वाची पदे कराडात दिल्याने सामाजिक जाणीवेचे भान ठेवत देशात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपने अनिवार्य परिस्थितीत ही निवडणूक पक्षीय चिन्हावरच निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार चिन्हावर उभा करण्याबरोबरच चिन्हावर काही उमेदवारही उभे केले. तरीही त्यांना सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार का मिळाले नाहीत. त्यातच भाजपने गटबाजीचे दर्शन घडवत पक्षाऐवजी माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्याशी राजकीय सोयरिक करीत नागरी विकास आघाडीबरोबर युती केली. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही, विलासकाका पाटील-उंडाळकरांचा कराडातील राजकीय करिष्मा संपत चालला असल्याचेही या निकालाने अधोरेखित केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप ही लेबल असली तरी नेते मंडळी पारंपरिकच होती. मात्र, या निवडणुकीने एका वेगळ्या राजकीय अस्तित्वाची जाणीव कराडकरांना झाली आहे. एमआयएमने नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरत मुस्लिम-मागासवर्गीय ऐक्याचा प्रयोग करीत राजकीय वगनाट्याचा पहिला अंक सादर केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला नसला तरी दलित समाजातील भीमशक्तीच्या रुपाली लादे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत दलित-मुस्लिम ऐक्याचा कायमस्वरूपी राजकीय रंगमंच उभारण्यात ते काही अंशी का होईना यशस्वी झाले आहेत. या यशाकडे पाहूनच एमआयएमचे अध्यक्ष खासदार आसुद्दीन ओवेसी यांची येथे जाहीर सभा घेऊन येथील राजकारणाला वेगळी कलाटणी दिली आहे. या सभेत ओवीसींनी काँग्रेस-भाजपची भीती दाखवून दोघांनीही मुस्लिम मते मागणे बंद करा, असे ठणकावल्यामुळे मुस्लिमाची एकगठ्ठा मते एमआयएमकडे गेली. शिवाय भाजपाची पारंपरिक फिक्स मते मिळाल्याने व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी झाल्याने भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्याची जोरदार चर्चाही सुरू आहे. त्यातच भाजपनेही ओवेसींना लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार सभा घेऊन दाखविली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनीही राजकीय ढंगांत भाषण ठोकत मत द्या, विकास निधी देतो, असे सांगत मतदारांना निधीचे गाजर दाखविले. नगराध्यक्षपदाचे मत भाजपलाच द्या, असा प्रचार केला. त्यामुळेच जातींच्या मतांचे राजकारण होऊन प्रथमच कमळ फुलले. कराडमध्ये भाजप जिल्हाध्यक्षासह सहकार परिषदेचे अध्यक्ष, अशी पदे देऊन त्यांच्यावर नैतिक जबाबदारी टाकली. खाल्ल्या मिठाला जागण्यासाठी त्यांनीही इमाने-इतबारे काम करीत आपल्या अस्तित्वाची झलक पक्षश्रेष्ठींना दाखवून दिली. भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची कृष्णा उद्योग समूहाची राखीव फौज प्रचारात सहभागी झाल्याने त्यांच्या श्रेयाची पक्षाने दाद घेणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे भोसले हेही या विजयाचे शिल्पकार असल्याचे कराडकरांना वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रमसिंह पाटणकरांनी राखला गड

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले. या निकालाने एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील गटास सतरापैकी तीन जागा गमवाव्या लागल्या. पाटणचे विद्यमान शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या गटाला अवघ्या दोन प्रभागांत यश मिळाले तर भाजपने एक जागा मिळवित पाटणच्या राजकारणात चंचूप्रवेश केला आहे.

पाटण नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचे नेतृत्व मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी विरोधी उमेदवारांना धूळ चारत त्यांचे पानिपत केले. तरी या निवडणुकीत केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सभा घेऊन कार्यकर्त्यांना कानमंत्र देऊनही भाजपचा काही प्रभाव पडला नाही.

पाटण नगरपंचायतीत परिवर्तन घडवू पाहणाऱ्या पराभूत परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना मतदारांनी बाजूला सारले. या पॅनेलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर पाटणचेच असल्याने त्यांचा या तालुक्याच्या गावावर पहिल्यापासून राजकीय दबदबा आहे, तो मतदारांनी यावेळी ही कायम ठेवत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

पाटण ग्रामपंचायतीचे नुकतेच नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने व देसाई-पाटणकर गटांत राजकीय चुरस असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले होते. या पूर्वीच्या ग्रामपंचायतीवर पाटणकर गटाचे वर्चस्व होते. ते नेस्तनाबुत करण्यासाठी विरोधी देसाई गटाने जंग-जंग पछाडले, तरीही सत्ता कायम राखण्यात पाटणकर गटाला यश आले.

१९ उमेदवारांची अनामत जप्त

पाटण नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच मतदान झाल्याने राष्ट्रवादीचा पराभव होऊन सेना, भाजप ही नगरपंचायत ताब्यात घेणार, अशी चर्चा होती. त्यामुळे पाटणकर गटानेही गड राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. पाटणकर गटाच्या उमेदवारांना चांगली मते पडल्याने शिवसेनेच्या ६, भाजपच्या ४, परिवर्तन पॅनेलच्या ७, मनसे १, अपक्ष १ अशा एकूण १९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.


कराडची ‘जनशक्ती’ फुटीच्या उंबरठ्यावर


माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत स्पष्ट बहुमताचा कौल मिळवूनही नगराध्यक्षपद भाजपच्या पारड्यात गेल्याने निकाल लागून केवळ काही तास होण्याअगोदरच बहुमतातील यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडीमध्ये मोठी फूट पडण्याचे संकेत मिळू लागले आहेत. जनशक्ती आघाडीच्या नेत्यांनीच गद्दारी करून आघाडीचे महत्वाचा घटक असलेले राजेंद्र यादव यांना पराभूत केल्याचा यादव समर्थकांचा समज करून त्यांना मानणारे सर्व नगरसेवक आघाडीमधून बाजूला होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आगामी राजकारणासाठी महत्वपूर्ण ठरणारा हा गट एकसंघ राहण्यासाठी माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण काय राजकीय खेळी करणार याकडे कराडकरांचे लक्ष लागून आहे.

निवडणूक वादातून गोळीबार

पालिका निवडणूक निकाल जाहीर होऊन काही तास उलटत नाही तोच येथील परस्परविरोधी उमेदवार आणि शहरात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्यात भर म्हणून मंगळवारी रात्री नऊ वाजता सुपर मार्केटमध्ये वादावादी झाली. या वादावादी दरम्यान संशयितांनी एकाच्या दिशेने गोळीबार केल्याचे सांगण्यात आले. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र, गोळीबार झाला किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवकालीन खेळांच्या साक्षीनेशिवप्रतापदिन उत्साहात

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

हर हर महादेव.., जय शिवाजी, जय भवानी.., अशा घोषणा, पोवाडा, ढोल-ताशा-हालगी, तुताऱ्या, लेझीम यांचा गजरासोबतच शिवप्रतापाला वंदना म्हणून आकाशातून छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून केलेली पुष्पवृष्टी आणि रोमांच उभे करणारे शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिकांसह मंगळवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

सूर्योदयाच्या साक्षीने मंगलमय वातावरणात सुरुवात झालेल्या सोहळ्याने वातावरण भारुन गेले होते.

सकाळी प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोद यादव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सपत्नीक तसेच निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचारे पुजा बांधण्यात आली. भवानी मातेचे पुराणीक नरहर हडप गुरुजी आणि प्रभाकर सामक यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी यादव यांच्या हस्ते आई भवानीची आरती करण्यात आली.

भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीमच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.

त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरू झाली. शाहीर शरद यादव आणि सहकाऱ्यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला. छावा युवा मंचचे अध्यक्ष उदय यादव यांनी विद्यार्थ्यांसह लाठी चालवणे, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी, अग्निचक्र, गनिमीकावा आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली. महाराजांच्या अश्वारुढ पुतळयावर बी. जी. शिर्के अण्ड कंपनीच्या हेलिकॉप्टरमधून अवकाशातून तीन वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आंबेडकर विश्वरत्नडॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादनमातोश्री भीमाबाई पुरस्कार मुक्ता मनोहर यांना प्रदान

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ भारतरत्न नाहीत तर ते विश्वरत्न आहेत. त्यांना संकुचित करू नका,’ असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई यांच्या नावाचा १९ वा पुरस्कार पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या जनरल सेक्रेटरी कॉम्रेड मुक्ता मनोहर यांना डॉ. सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी सबनीस बोलत होते. यावेळी प्राचार्य आण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे आदी उपस्थित होते.

डॉ. सबनीस म्हणाले, ‘डॉ. आंबेडकर, मार्क्स, गांधी या महामानवांच्या विचारांचा समन्वयाने संवादी सूर न ठेवल्याने महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळ फसली आहे. डॉ. आंबेडकरांचा उदारमतवाद हेच शिकवतो. मार्क्स हिंसेचे समर्थन करीत नाही. सर्वांनी त्या बाबत चुकीचा समज करून घेतलेला आहे. डाव्या पक्ष, संघटनांनी भारतातील जात वास्तवाकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. नोटाबंदीद्वारे देशातील भ्रष्टाचार संपविण्याचा मोठा प्रयत्न आहे. मात्र, शोषित दलित वर्गाचे खच्चीकरण करण्याची बदमाशी वरिष्ठ तीन वर्गांनी केली आहे. हा सांस्कृतीक भ्रष्टाचार आणि विचाराचे घोटाळे कसे संपवणार. फुले, आंबेडकर विचाराने स्वातंत्र्य, समता दिली आहे. त्याच्याशी प्रामाणिक राहून आपल्यातील जातीनिष्ठा, ब्राह्मणास तिलांजली दिल्याशिवाय जातीअंत होणार नाही, जातीव्यवस्था कोण जोपासतो, संघर्ष कोणाशी व कशासाठी याचे भान ठेवण्याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.’

सत्काराला उत्तर देताना मुक्ता मनोहर म्हणाल्या, ‘बाबासाहेबांच्या आईंच्या नावाने मिळणाऱ्या पुरस्काराने माझ्या कामाला बळ मिळाले आहे. समाजात तीव्र स्वरुपाचा संघर्ष सुरू आहे. शोषण, विषमता, सांस्कृतिक हल्ला वाढतो आहे. त्याविरूद्ध भूमिका घ्यावी लागेल.’ प्रा. अण्णासाहेब होवाळे यांनी प्रास्तविक केले. दिनकर झिंब्रे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अनिल बनसोडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अॅड. हौसेराव धुमाळ यांनी केले. या वेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, किशोर बेडकीहाळ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात तणावपूर्ण शांततानववाहितेच्या खुनानंतर साताऱ्यात बंद; ९३ जणांवर अॅट्रासिटीचा गुन्हा

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

नवविवाहितेच्या खुनामुळे संतप्त जमावाने चिंचणेर वंदन (ता. सातारा) येथे मंगळवारी रात्री केलेल्या तुफानी तोडफोडप्रकरणी बुधवारी ९३ जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा सातारा ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, ३१ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ साताऱ्यात बंद पाळण्यात आला. बस वाहतूकही बंद पाडण्यात आली. सातारा आणि चिंचणेर येथे मोठा पोलिस बंदोबस्त असून, दोन्ही ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.

चिंचणेर वंदन गावातील पंचशीलनगरमधील ५० घरांचे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जमावाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. किराणा दुकान, व्यायामशाळेतही तोडफोड केली. परिसरातील चार चाकी गाड्या तसेच दुचाकी गाड्या पेट्रोल टाकून जाळल्या. घरातील गृहसाहित्य, दूरदर्शन संच, फ्रीज कपाटे, कम्प्युटर, लॅपटॉप आदी वस्तू फोडून जाळण्यात आल्या. हा प्रकार सुमारे तासभर सुरू होता. वस्तीवरील सर्व पुरुष मंडळी बाहेरगावी गेली होती. पहाटे गावातील एका युवकाने फोनवरून कळविल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त पाटवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

मंगळवारी रात्रीच्या प्रकाराची माहिती बुधवारी पहाटे साताऱ्यात समजताच मध्यवर्ती बसस्थानकावर काही संघटनांनी बस वाहतूक बंद पाडली. सकाळी दहा वाजता अनेक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमा झाले. तेथून पोलिस मुख्यालयासमोर जाऊन त्यांनी तेथे धरणे धरले. त्यानंतर मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. साताऱ्यातील व्यवहार दिवसभर ठप्प होते. बस वाहतूक बंद झाल्याने शाळा, महाविद्यालयेही बंद होती. खबरदारीचा उपाय म्हणून सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, खासदार उदयनराजे यांनी घटनेचा निषेध केला आहे. घटनेतील दोषी असणारे कुठल्याही समाजाचे असोत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. वकिलांनी समाजकंटकांचे वकीलपत्र घेऊ नये. कोणालाही पाठिशी न घालता प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


९३ जणांवर अॅट्रासिटीचा गुन्हा

या प्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात सनी रामभाऊ दणाणे (वय २८ रा. पंचशील नगर चिंचणेर वंदन) यांच्या फिर्यादीवरून चिंचणेर वंदन गावातील ३३ व इतर ठिकाणाहून आलेल्या ६० हल्लेखोरांवर पोलिसांनी तोडफोड, जाळपोळ व दहशत माजवणे, वस्तीवर हल्ला करून तोडफोड तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला आहे.


काय आहे मूळ घटना?

नवविवाहितेचे चिंचणेर वंदन येथील सिद्धार्थ उर्फ बारक्या दणाणे याच्याशी प्रेम सबंध होते. दोघे भिन्न समाजातील असल्यामुळे विवाहाला विरोध होण्याच्या भीतीने तरुणीने कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथील आपल्या मामाच्या मुलाशी ६ ऑक्टोबरला विवाह केला. तरीही ती व तिचा प्रियकर एकमेकांच्या संपर्कात होते. मैत्रिणीला भेटण्यासाठी साताऱ्याला जाते, असे सांगून नवविवाहिता २९ नोव्हेंबरला कोऱ्हाळे खुर्दहून साताऱ्यात आली. दणाणेच्या मोटारसायकलवरून दोघे ठोसेघर येथील पवन गावाजवळ निर्जनस्थळी गेले. तिथे वाद झाल्यानंतर संतापलेल्या दणाणेने सोबत आणलेल्या दांडक्याने तिच्यावर प्रहार केला. डोक्यावर घाव बसल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. नवविवाहितेच्या कुटुंबीयांनी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार केली. पोलिसांनी संशयित सिद्धार्थला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली व घटनास्थळी जाऊन नवविवाहितेचा मृतदेह दाखवला.

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, चिंचणेर वंदन घटनेप्रकरणी ३१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पीडितांना तत्काळ कायदेशीर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सदर घटनेची विसंगत महिती तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांची धरपकड करून कलम ३४ खाली गुन्हा दाखल करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिंचणेरमध्ये शांतता ठेवाः न्या. थूल

$
0
0



सातारा

चिंचणेर वंदनच्या ग्रामस्थांनी गावामध्ये शांतता ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी केले.

न्या. थूल यांनी रविवारी चिंचणेर वंदन येथील घटनास्थळास भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोद यादव, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त रवींद्र कदम-पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

थूल म्हणाले, ‘झालेल्या घटना अत्यंत दुर्देवी आहेत. नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत. जुन्या कायद्यानुसार तत्काळ मदत द्या व नवीन कायद्यानुसार नंतर फरक द्या. येथील लोकसंख्या पाहून रेशनिंगचे दुकान व पिठाची चक्की सुरू करावी. तसेच येथे पोलिस चौकीही सुरू करावी. ज्या लोकांच्या गाड्यांचे व घरांचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. दोषींवर योग्य ती कारवाई होईल. कसलीही भीती बाळगू नये. गावामध्ये शांतता ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मलकापूर नगरपंचायत कॅशलेस

$
0
0

कराड : नोटाबंदीवर उपाय म्हणून मलकापूर नगरपंचायतीने (ता. कराड) कराड अर्बन बँकेच्या साह्याने करवसुलीसाठी स्वाइप मशिनचा वापर सुरू केला आहे. राज्यात स्वाइप मशिनने कर वसुली करणारी ही पहिलीच नगर पंचायत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या कॅशलेस कर प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला.
मलकापूरमधील आगाशिवनगर भागातील नूतन मराठी शाळेच्या आवारात आयोजित कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्याकडे स्वाइप मशिन सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी आमदार आनंदराव पाटील, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, नगराध्यक्षा कल्पना रैनाक, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बाळासाहेब कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, माजी आमदार भास्करराव शिंदे यांच्या प्रयत्नांतून मलकापूर नगरपंचायतीने नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. नगरपंचायतीने पहिल्यांदाच कॅशलेस कर प्रणालीचा उपक्रम सुरू केला आहे. याचा निश्चितपणे फायदा नागरिकांना होऊन नगरपंचायतीचेही उत्पन्न वाढेल.
जोशी म्हणाले, सध्या नोटाबंदीमुळे नागरिकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी आग्रह केला जात आहे. हा प्रयत्न भविष्याचा कानोसा घेऊन केला जात असून, मलकापूर नगरपंचायतीने राबवलेला उपक्रम हे त्याचेच एक उदाहरण आहे.
आनंदराव पाटील, मनोहर शिंदे, अजित पाटील-चिखलीकर यांचीही भाषणे झाली. मुख्याध्यापक ए. व्ही. पाटील यांनी स्वागत केले. ज्ञानदेव साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार आनंदराव सुतार यांनी मानले.

आनेवाडी टोलनाक्यावर
मशिनद्वारे टोलवसुली

पुणे-बेंगळुरू महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यावर सर्वच बूथवर स्वाइप मशिन ठेवण्यात आल्या आहेत. याद्वारे डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे टोल देण्याची सुविधा असून, त्यासोबतच पेटीएम अॅपद्वारेदेखील टोल घेण्यात येत आहे. या टोलनाक्यावरून दिवसाला साधारणत: सात ते आठ हजार वाहने ये-जा करतात. सुमारे एक हजार वाहनधारकांकडून कॅशलेस सुविधेचा वापर करीत आहेत.
यातून वेळेची बचतही होत आहे. तसेच सुट्या पैशांवरून सतत होणारे वादही कमी झाले आहेत. या सुविधेमुळे सुट्या पैशांची चणचणही थांबली आहे. या सुविधेची माहिती अधिकाधिक वाहनचालकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया टोल नाक्याचे व्यवस्थापन अधिकारी अविनाश फरांदे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजा संघटनेचा कराडजवळ रास्ता रोको

$
0
0



कराड : नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना बसलेल्या फटक्याकडे लक्ष वेधण्यासाठी बळीराजा संघटनेच्या वतीने सोमवारी दुपारी मलकापूर येथे ढेबेवाडी फाट्यावर केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मोफत भाजीपाला वाटून निषेध व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अघोषित आर्थिक आणीबाणी लागू केली आहे. सर्वसामान्य जनता व शेतकरी, शेतमजूर वेठीस धरला जात असून, सरकारने यावर तातडीने योग्य तो निर्णय न घेतल्यास बळीराजा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा पाटील यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांसमोर बोलताना दिला. शहर पोलिसांनी १२ आंदोलकांना अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले.
आंदोलनस्थळावर शेतकऱ्यांसमोर बोलताना पंजाबराव पाटील म्हणाले, नोटाबंदीमुळे शेतमालाचे बाजारभाव पूर्ण ढासळले आहेत. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारने घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान भरून द्यावे व शेतीसाठी घेतलेले कर्ज संपूर्ण माफ करावे. सरकारने शेतीमाल योग्य किमतीला खरेदी करावा, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत, असे पंजाबराव पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी रास्ता रोको करीत महामार्गाजवळ परिसरातील नागरिकांना मोफत भाजीपाला वाटप केले. या आंदोलनामुळे कराड-ढेबेवाडी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. चंद्रकांत यादव, विश्वासराव जाधव, साजिद मुल्ला, विक्रम थोरात, दीपक पाटील आदी आंदोलनात सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी बँकांची रोजची २५० कोटींची उलाढाल ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करन्सी चेस्ट असलेल्या बँकांनी व्यवहारासाठी पैसे दिले जात नाहीत. ज्या जुन्या नोटा स्वीकारुन करन्सी चेस्टकडे पाठवल्या त्याच्या बदल्यात तीन आठवड्यानंतर रक्कम मिळणार असे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे खातेधारकांच्या हातात दोन हजारापेक्षा जास्त पैसे पडत नाहीत. तर विविध कर्जाची मागणी असूनही कर्जदारांना देण्यास पैसे नसल्याने कर्जाची प्रकरणे ठप्प आहेत. त्यातूनही उत्पन्नाला फटका बसत असल्याने जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांमध्ये व्यवहार थंडावले आहेत. जिल्ह्यातील ४७ बँकांमधून रोज विविध व्यहारातून होत असलेली तब्बल २५० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.

नोटा बंदीच्या निर्णयानंतर महिना होऊन गेल्यानंतर परिस्थितीत फरक पडलेला नाही. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांना ज्या प्रमाणे बँकिंग लायसन्स दिले जाते, त्याप्रमाणे नागरी सहकारी बँकांनाही लायसन्स मिळते. बहुतांश नोकरदार, सरकारी कर्मचारी, अधिकारी, बडे उद्योगपती, व्यावसायिकांची खाती राष्ट्रीयीकृत अथवा खासगी बँकेत असतात, पण या नागरी सहकारी बँकांमध्ये सामान्य नागरिक, छोटे दुकानदार, किरकोळ व्यावसायिक, शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात खाती आहेत. जिल्ह्यातील १५ लाख ग्राहक या बँकांशी जोडले गेले आहेत. सभासदांमधून निवडून दिले जाणारे संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष असल्याने अनेक सभासद आपल्या समस्या तसेच मागण्या हक्काने जाऊन मांडत असल्याचे चित्र या बँकांमधून पाहायला मिळते. त्यावर तत्काळ तोडगाही निघत असल्याने या बँक म्हणजे सामान्य नागरिकांना मोठा आधार वाटतात. गेल्या महिनाभरापासून मात्र हा आधार हिरावला गेल्याचे पाहायला मिळत आहे.

करन्सी चेस्टकडून पैसे मिळत नाहीत व जुन्या नोटा स्वीकारल्यानंतर त्याबदल्यात नवीन नोटा मिळत नाहीत, त्यामुळे ग्राहकांना मागणीप्रमाणे नव्हे, गरजेप्रमाणेही पैसे देणे या बँकांना शक्य झालेले नाही. आतापर्यंत सहकारी बँकेतून ६५० कोटींच्या जुन्या नोटा चेस्टकडे पाठवल्या आहेत. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांमधून आठवड्याला दहा हजार ते २४ हजारपर्यंत पैसे देण्याची मर्यादा केली असताना सहकारी बँकांकडे पैसे नसल्याने त्यांनी स्वतःच २२०० रुपयापर्यंतची मर्यादा घालून स्वयंनियोजन सुरु केले आहे. त्यामुळे पैसे उपलब्ध होत नसल्याने घरातील अनेक महत्त्वाची कामे, समारंभ पुढे ढकलण्यात येत आहे.

या बँकांमध्ये सामान्य कर्जदारांची संख्या जास्त आहे. शेतीकामासाठी सरकारी नियमाप्रमाणे मिळणारे कर्ज पुरेसे होत नसल्याने दरवर्षी सहकारी बँकांमधून तारण, गहाण, जामीनकी, एफडीवर, सेव्हिंग्ज सर्टिफिकेटवर कर्ज घेण्याची पद्धत आहे. १२ ते १४ टक्के व्याज दराने असले तरी आवश्यक कर्ज मिळत असल्याने हे व्याज भरले जाते. दरवर्षी अशा प्रकारचे ६०० कोटींचे कर्ज वाटप होते. हा कर्ज वाटपाचा हंगाम असताना या बंदीमुळे कर्ज देण्यात अडचणी येत आहेत. इचलकरंजी परिसरातील टेक्सटाइल व्यवसायावरही या बँकांतील कमी झालेल्या उलाढालीचा परिणाम झाला आहे. अनेक व्यावसायिकांची खाती सहकारी बँकेत असून त्यांना योग्य प्रमाणात पैसे मिळत नसल्याने अडचण झाली आहे.

.................

सामान्य ग्राहकवर्ग असलेल्या सहकारी बँकांची अवस्था कमालीची बिकट झाली आहे. सामान्यांचे व्यवहार थांबले आहेत. त्याचा परिणाम बँकांवर होत आहे. बँकेचे उत्पन्न घटत असल्याने ग्राहकांना भविष्यात नवीन सुविधा देण्यात उशिर होऊ शकतो. करन्सी चेस्टकडून बँकांना पैसे मिळत नसल्याने स्वतःच्या पातळीवर नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही हजारात पैसे देण्याची वेळ आली आहे. त्याचा परिणाम सर्वत्र जाणवत आहे.

शंकर मांगलेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, नागरी सहकारी बँक असोसिएशन

...............................

सहकारी बँका दृष्टीपथात

बँक ४७

मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक १

शेड्युल्ड बँक १

शाखा ४२५

एटीएम ७५

सभासद ६ लाख ७५ हजार

ग्राहक १५ लाख

कर्मचारी ३५००

दररोजची उलाढाल २५० कोटी रुपये

ठेवी ८५०० कोटी रुपये

कर्जे ४९०० कोटी रुपये

भागभांडवल ३११ कोटी रुपये

स्वनिधी ६३६ कोटी रुपये

वार्षिक व्यवसाय १३ हजार कोटी रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटकांना एमटीडीसी ‘गाइड’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पर्यटन क्षेत्रांचा खजिना मांडण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) अंबाबाई मंदिराजवळ पर्यटन माहिती केंद्र सुरू केले आहे. कोल्हापुरातील पर्यटन वाढीला चालना मिळावी म्हणून नवरात्रोत्सवाचा मुहूर्त साधत प्रशासनाने कोल्हापूरचे पर्यटन लोकांपर्यंत पोहचण्यासाठी श्री अंबाबाई मंदिर परिसरात एमटीडीसीच्या माहिती केंद्राचा फायदा होत आहे. आतापर्यंत हजारो भाविकांनी केंद्राचा फायदा घेतला आहे.

दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद‍्घाटन झाले. कोल्हापुरातील पर्यटनस्थळांची माहिती मिळावी आणि जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी अंबाबाई मंदिर परिसरातील पर्यटन विभागाचे माहिती व आरक्षण केंद्र उपयुक्त ठरत आहे. श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. कर्नाटकसह इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेत केवळ देवीचे दर्शन घेऊन भाविक कोकणात किंवा गोव्याला न जाता कोल्हापूरच्या पर्यटनाची अनुभूती घ्यावी यासाठी केंद्रामार्फत पर्यटनस्थळांची माहिती दिली जात आहे.

यात कोल्हापुरातील आसपासच्या पर्यटनस्थळांना भेट द्यावी, याबाबत माहिती मिळावी, यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरत आहे. नवरोत्रात्सव, डिसेंबर आणि मे महिन्यातील पर्यटक भाविकांची संख्या लाखोच्या घरात असते म्हणून येणाऱ्या भाविकांना रंकाळा, न्यू पॅलेस, पन्हाळा, टाऊन हॉल, कणेरी मठ, शालिनी पॅलेस, जोतिबा, नृसिंहवाडी, आंबा, दाजीपूर, राधानगरी, गगनबावडा हे ठिकाण किती अंतरावर आहे, प्रवासाची कोणती सुविधा परिसरात उपलब्ध आहे, राहण्याची सुविधा याबाबतची सर्व माहिती या केंद्रामार्फत दिली जात आहे. शिवाय एक दिवसासाठी कोल्हापुरात कोणते पर्यटन पाहण्यासाठी आहे, मंदिरापासून स्टेशन किती अंतरावर आहे, वाहतूक व्यवस्था याबाबतची चौकशी केली जात आहे.

पर्यटनवाढीसाठी जानेवारी महिन्यात पर्यटन महोत्सवही घेण्यात येणार असून लवकरच रेल्वे स्टेशन आणि मध्यवर्ती बस स्थानक परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्लील चित्रफित प्रकरणातीलमुख्य संशयित जेरबंद

$
0
0

म.टा.वृत्तसेवा, इचलकरंजी

महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार करुन त्याची अश्लील चित्रफित बनविणाऱ्या मुबारक बशीर पकाली (वय ३८, रा. कारंडे मळा) याला शहापूर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

कारंडे मळा परिसरातील मुबारक पकाली या खासगी कार्डभिशी चालकाने भागातीलच एका विवाहितेला ५० हजार रुपये देण्याचे आमिष दाखविले होते. तसेच जयसिंगपूर येथील एका हॉटेलात नेऊन तिच्यावर बलात्कार करुन तिची अश्लील चित्रफित बनविली होती. त्यानंतर मुबारक याचा मित्र फिरोज याने या चित्रफिती माझ्याकडे सुरक्षित ठेवतो असे सांगून घेतल्या होत्या. दोन दिवसांपासून परिसरात ही चित्रफित व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. त्यातूनच संतप्त जमावाने पकाली याच्या घर, दुकान व यंत्रमाग कारखान्यावर दगडफेक करुन नुकसान केले. तर पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन शहापूर पोलिसांत पकाली व नदाफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य संशयित पकाली याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी त्याला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. तर दुसरा संशयित नदाफ हा अद्याप फरारी आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images