Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ग्राहक निघाले राष्ट्रीयीकृत बँकांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहकारी बँकांमध्ये ठणठणाट असताना राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखेत पैसे दिले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाती उघडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा कोंडीमध्ये जिल्हा बँकेबरोबर इतर सहकारी बँकांसमोर खातेधारकांना आपल्यासोबत ठेवण्याचे आव्हान पेलावे लागत आहेत. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही पैसे मिळत नसल्याने तिकडे खाती उघडून काय साध्य होणार असे खातेधारकांना समजावण्यात येत आहे.

महिना होत आलेला असताना सहकारी बँकांना पैसे दिले जात नाहीत. जिल्हा बँकेलाही अतिशय तुटपुंजी रक्कम देण्यात आली. त्यातून शाखांना पैसे देण्याचे रोटेशन करण्यात आले. यातूनही दोन ते चार लाखापेक्षा मोठी रक्कम काही मोजक्याच मोठ्या शाखांना मिळाली. अशा परिस्थितीत राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते असलेल्यांना सहकारी बँकांच्या तुलनेत जादा पैसे मिळत असल्याचे चित्र होते. यावरुन अनेक ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडा व सहकारी बँकेतील रक्कम त्या खात्यावर वर्ग करा असे सांगितले जात होते. त्यानुसार पैसे मिळतील अशी आशा होती. मात्र गेल्या आठवड्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडीलही पैसे संपत आले. अनेक ठिकाणी एकावेळी जास्तीत जास्त पाच हजार रुपयेच देण्यात आले.

आरबीआयकडून जिल्ह्यात पैसेच येत नसल्याने राष्ट्रीयीकृत असो वा सहकारी बँकांची परिस्थिती सारखीच झाली आहे. पण या प्रकारातून जास्तीत जास्त खाती राष्ट्रीयीकृत बँकेकडे वर्ग करण्याचा प्रकार सुरू आहे. दर दहा​ दिवसांनी शेतकऱ्यांना करोडो रुपये देणाऱ्या गोकुळ सारख्या संघानेही राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याचे आवाहन केले. या खात्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांचे नियम पाळावे लागत असल्याने बॅलेन्सची मर्यादा आहे. हा प्रकार लक्षात येताच सहकारी बँकांनी खातेधारकांची समजूत काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा बँकेने तर राष्ट्रीयीकृत बँकेकडे निधीची कमतरता आहे, सहकारी संस्था व खातेधारकांनी अन्यत्र खाती उघडू नयेत असे जाहीर आवाहनच केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक कोरवी अखेर निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस कोठडीत ४८ तास राहिल्याने सरकारी नियमानुसार आर्दाळ (ता. आजरा) येथील शिक्षक सदाशिव कोरवीला निलंबित करण्यात आले. बुधवारपासून त्याची दप्तर तपासणी होणार आहे. त्याला म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. विभागीय चौकशीत खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास त्याला दिलेला आदर्श शिक्षक पुरस्कार परत घेतला जाईल, ही माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली.

नोकरी लावतो म्हणून पंधरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी सदाशिव कोरवीला ३ ड़िसेंबरच्या रात्री ताब्यात घेतले होते. त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. सरकारी नियमानुसार ४८ तास पोलिस कोठडीत राहिल्याने जिल्हा परिषदेने त्याला सेवेतून निलंबित केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून मंगळवारी रात्री उशीरा हा अहवाल सीईओ खेमनार यांच्याकडे आला. त्यांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निलंबनाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. त्याची इतर विभागीय चौकशीला बुधवार पासून सुरूवात केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणानगरला शुक्रवारपासून कृषी प्रदर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

वारणानगर (ता. पन्हाळा ) येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा विभाग शेतीपूरक व शेती प्रशिक्षण सहकारी संस्था आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने तात्यासाहेब कोरे यांच्या २२ व्या पुण्यस्मरणार्थ वारणा कृषी प्रदर्शनाचे ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत आयोजन केल्याची माहिती वारणा समूहाचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वारणानगर येथील वारणा कारखान्यासमोरील खुल्या पटांगणावर ९ ते १३ डिसेंबर या कालावाधीत आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात खते, बी-बियाणे, अवजारे यांच्या स्टॉलबरोबरच यावर्षी राज्यभरातून आदर्श पशुधन देखील ठेवण्यात येणार आहे. यामध्ये गाय, म्हैस, शेळ्या, बोकड, घोडे, कोंबडे, कुत्रे यांचा समावेश होणार आहे. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे कृषिविषयक सुमारे २५० स्टॉल उभारण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी खेळणी व खाद्य जत्रादेखील आयोजित केली जाणार आहे. शेतकऱ्यांना डेबिट व एटीएम कार्डद्वारे खरेदी करता यावी यासाठी पाच एटीएम मशिन बसविण्यात येणार आहे. मुबलक सुट्या पैशाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पाच शेतकऱ्यांना कृषिभूषण, तर पाच महिलांना कृषी लक्ष्मीभूषण पुरस्कार तसेच नावीन्यपूर्ण शेती तंत्राचा आधार घेऊन उत्तम शेती करण्याचा कृषी तंत्र पुरस्कार देण्यात येणार आहे.

यावेळी व्ही. एस. कोले, आर. बी. कुंभार, आर. वाय. खोत, हिंदुराव तेली, प्रकाश मोरे, सुभाष पाटील, रावसाहेब पाटील, प्रमोद पाटील, विक्रम जगताप, मुरलीधर शिंदे, विकास गायकवाड, सचिन मगदूम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध संघटनांतर्फे बाबासाहेबांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विविध राजकीय पक्ष, संघटनांसह शाळा-महाविद्यालयांत विविध कार्यक्रम, उपक्रमांतून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील बिंदू चौकात मंगळवारी दिवसभर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची रांग लागली होती.

बिंदू चौकातील डॉ. आंबेडकर यांचा पुतळा त्यांच्या हयातीतच उभारण्यात आला होता. त्यामुळे आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या जनतेचे या पुतळ्याबाबत भावनिक ऋणानुबंध आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी सकाळपासून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणाऱ्या नागरिकांची रिघ लागली होती. दिवसभर भजन, गाणी, पोवाडे, भाषणांद्वारे त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.

लोकजनशक्ती पार्टी : कार्यकर्त्यांनी बिंदू चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. समाज जागृती भजनी मंडळ, जयभीम गायन पार्टीच्यावतीने बाबासाहेबांच्या जीवनावरील गाणी गाण्यात आली. महालक्ष्मी नेत्रालयातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर झाले. डॉ. सुजाता पाटील व डॉ. संतोष कुरणावळ यांनी शिबिराचे संयोजन केले. पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे, सहाय्यक समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे, शहर पोलिस उपाधिक्षक भारतकुमार राणे, जात पडताळणी समितीचे सचिव विजयकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, गणी आजरेकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, कार्याध्यक्ष सुशीलकुमार कोल्हटकर आदी उपस्थित होते. सायंकाळी प्रा. डॉ. अमर कांबळे यांचे व्याख्यान झाले.

जिल्हा काँग्रेस कमिटी : स्टेशन रोडवरील जिल्हा काँग्रेस कमिटीत शहराध्यक्ष, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदराजंली वाहिली. नगरसेवक तौफीक मुल्लाणी, माजी प्रदेश सरचिटणीस अॅड. सुरेश कुऱ्हाडे, राजीवजी सूतगिरणी चेअरमन राहुल पाटील, जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी, जी. टी. पाटील, महादेव जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यू हायस्कूल : ‘डॉ. आंबेडकर यांनी दलितांच्या उद्धारांसाठी व त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले. भारताला समताधिष्ठित लोकशाही राष्ट्र बनवण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले’ असे प्रतिपादन शाळेचे पर्यवेक्षक डी. के. गुरव यांनी व्यक्त केले. मुख्याध्यापक के. ई. पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. उपमुख्याध्यापक एम. सी. जयकर, जिमखानाप्रमुख एच. बी. खानविलकर, ग्रंथपाल मोहन भांडवले उ​पस्थित होते. एस. आर. आलासे यांनी स्वागत केले. एस. एस. मेटल यांनी आभार मानले.

तवनाप्पा पाटणे हायस्कूल : राजारामपुरीत तवनाप्पा पाटणे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक एस. बी. सुतार यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. पार्थ कुलकर्णी, विवेक घोडके, समृद्धी पाटील, वेदिका कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षिका ए. ए. कोटीभास्कर यांनी आंबेडकरांच्या कार्याची माहिती दिली. पर्यवेक्षक बी. बी. पाटील, जिमखानाप्रमुख डी. एस. गिरगावकर उपस्थित होते. गौरी वाडकर हिने सूत्रसंचालन केले. ऋतुजा काळे हिने आभार मानले.

बालसंकुल : जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना बालसंकुलमध्ये मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. अधीक्षक कांचन हेबाळकर, पी. के. डवरी, शोभा सुतारा, नजिरा नदाफ, शिक्षिका पद्मजा गारे, टी. एम. कदम आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्ष पश्चिम महाराष्ट्र कार्यालय : ‘डॉ. आंबेडकर यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मिळावा म्हणून आयुष्य वेचले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून कार्यवाही केली असून समाज व्यवस्था बदलत आहे. तरीही बाबासाहेबांच्या विचारधारेवर काम करण्याची गरज आहे’ असे मत विभागीय अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांनी व्यक्त केले. कार्यालयात प्रतिमापूजन झाले. संजय जिरगे, सुखदेव बुद्ध्याळकर, अविनाश अंबपकर, गुलाब शिके, बाजीराव जैत्याळकर, दिलीप कोथळीकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

भटके विमुक्त जमाती विचार मंच : भटके विमुक्त जमाती विचारमंचाच्या कार्यालयात दलितमित्र व्यंकाप्पा भोसले यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. आर. बी. कोसंबी, तानाजी नंदिवाले, अनिल कुचकोरवी, श्रीधर माळगे, अनमोल माने आदींसह नागरिक उपस्थित होते.

वूमन्स अँड सोशल मुव्हमेंटस् : ‘सध्या समाज श्रद्धा-अंधश्रद्धांनी पोखरलेला आहे. या विरोधात महिलांनी बंड करून उठले पाहिजे’, असे प्रतिपादन वूमन्स अँड सोशल मुव्हमेंटच्या संस्थापिका वंदना कांबळे यांनी केले. संस्थेच्यावतीने बिंदू चौकात डॉ. आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. संगिता पाटील, सविता पोवार, वहिदा गोलंदाज, यल्लव्वा मोरे, सुनिता लोकरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३ ठिकाणची ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बंद

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

वाहतूक शिस्तीसाठी महापालिकेने शहरात २४ ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा सुरू केली होती. मात्र यातील केवळ ११ सिग्नल सुरू आहेत, तर १३ सिग्नल बंद आहेत. सुरू असलेले सिग्नलही वेळेच्या नियोजनानुसार नसल्याने शहरात वाहतूक कोंडी वाढत आहे. विशेष म्हणजे खुद्द पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन सिग्नल यंत्रणा सक्षम करण्याचे आदेश देऊनही महापालिकेसह वाहतूक पोलिसांचेही या कामाकडे दुर्लक्ष आहे. सिग्नल दुरुस्तीसाठी असलेली उदासीनता नागरिक आणि वाहनधारकांसाठी धोक्याची ठरत आहे.

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन २० नोव्हेंबरला पोलिस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. वाहतूक आराखडाही मांडण्यात आला. तातडीने करण्याची कामे १५ दिवसात मार्गी लावण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले, पण बैठकीनंतर १५ दिवस उलटल्यानंतरही शहरातील बंद अवस्थेतील सिग्नल सुरू झालेले नाहीत. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिका, वाहतूक नियंत्रण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून तीन टप्प्यात कामे पूर्ण करण्याचे बैठकीत ठरले. वाहतूक पोलिसांनी शहरातील बंद सिग्नल आणि रस्त्यांवरील पट्ट्यांची तक्रार केल्यानंतर तातडीने ही कामे मार्गी लावण्याचे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले. बैठकीतील आवेशामुळे आठवड्याभरातच ही कामे पूर्ण होतील, असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात १५ दिवस उलटल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

रस्ते विकास प्रकल्पानंतर शहरात २४ ठिकाणी सिग्नल उभारले. ‘नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीप्रमाणे अवघे काही दिवसच सिग्नलचे दिवे लुकलुकले. त्यानंतर मात्र सिग्नल आहेत याची आठवण महापालिकेसह पोलिसांनाही राहिली नसल्याची स्थिती आहे. कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, सीपीआर चौक, माळकर स्विट चौक, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीज आणि राजारामपुरी या ठिकाणचे ट्रॅफिक सिग्नल सुरू असतात. उर्वरित १३ सिग्नल बंद अवस्थेत आहेत, तर हॉकी स्टेडियम, गोखले कॉलेज, लिशां हॉटेल, वटेश्वर मंदिर परिसरातील सिग्नल अधूनमधून चालूबंद अवस्थेत असतात. सिग्नल यंत्रणेत वेळेचे योग्य नियोजन नसल्याने समन्वयाचा अभाव आहे, यामुळे काही सिग्नल सुरू असूनही यातून वाहतुकीला शिस्त लागत नाही. सध्या सुरू असलेल्या सिग्नलमुळे केवळ वाहने अडवून ठेवणे आणि सोडणे यापेक्षा अधिक काहीच होत नाही. अनेकदा वर्दळीच्या ठिकाणी असलेले सिग्नल अचानक बंद पडतात. अशावेळी वाहतूक पोलिसही पुरेसे नसतात. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते.

चौकट – हे सिग्नल बंद

क्रशर चौक

ध्यानचंद हॉकी स्टेडियम चौक

मिलन चौक

गंगावेश चौक

कोंडा ओळ चौक

स्वयंभू गणेश चौक

पंचशील हॉटेल चौक

न्यू मलबार हॉटेल चौक

शहाजी लॉ कॉलेज चौक

टाकाळा चौक

आईचा पुतळा चौक

सायबर चौक

इंदिरासागर चौक

०००००००


केवळ आरोप प्रत्यारोप

महापालिका आणि वाहतूक नियंत्रण पोलिस विभागाकडून एकमेकांच्या उणिवा सांगत आपली जबाबदारी टाळली जाते. सिग्नल दुरुस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिकेकडून सिग्नल दुरुस्ती केली जात नाही, त्यामुळेच वाहतुकीला शिस्त लावण्यात अडचण येत असल्याची तक्रार पोलिस करतात, तर पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यानेच त्यांनीच सिग्नल बंद ठेवले आहेत, असे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस बिलाच्या १९८ कोटीची कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हंगाम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांमध्ये गाळप झालेल्या उसाच्या बिलापोटी शेतकऱ्यांना १९८ कोटी ३२ लाख रुपये कारखान्यांना द्यावे लागणार आहेत. त्यातील काही कारखान्यांकडून ही बिले बँकांकडे जमा केली जात असली तरी त्याच्या रकमा शेतकऱ्यांच्या हातात पडत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पैसे जमा होऊनसुद्धा ते हातात कसे मिळणार याबाबतची कोंडी कायम आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात ८ लाख ७ हजार १६५ मेट्रिक टन ऊस गाळप झाला आहे. या कारखान्यांत बिद्री कारखान्याची एफआरपी रक्कम २६९९ रुपये इतकी सर्वाधिक आहे. सांगली ​जिल्ह्यात सर्वाधिक एफआरपी २७१९ रुपये हुतात्मा किसन अहिर कारखान्याची आहे. सांगली जिल्ह्यात ५० कोटी ३७ लाख रुपये ऊस बिलापोटी द्यावे लागणार आहेत.

पाच नोव्हेंबरपासून हंगाम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील २१ साखर कारखाने सुरू झाले. गाळप झालेल्या उसाची बिले १५ दिवसात देणे गरजेचे आहे. त्यानुसार कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची एफआरपीप्रमाणे बिले तयार करण्यास सुरुवात केली. ३० नोव्हेंबरपर्यंतच्या गाळपाची बिले कारखान्यांनी बँकांत जमा करण्यास सुरुवात केली आहेत. काही कारखान्यांची बिले अजूनही बँकेत जमा होत आहेत. मात्र त्या बिलांची रक्कम भागवण्यासाठी बँकांकडे रोकड नसल्याने त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. जिल्ह्यातील २१ कारखान्यांमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत ८ लाख ७ हजार १६५ मेट्रिक टन गाळप झाले आहे. सांगलीतील १८ कारखान्यांमधून २ लाख ७ हजार २६० मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आला आहे.

वारणा कारखान्याला २९ कोटी २४ लाख रुपये बिल द्यावे लागणार असून त्यापैकी ३ कोटी ७१ लाख रुपये दिले आहेत. त्यापाठोपाठ जवाहर कारखान्यानाला २० कोटी ९७ लाखांची बिले द्यावी लागणार आहेत. सांगली जिल्ह्यात हुतात्मा कारखान्याला १० कोटी ८७ लाख रुपयांचे बिल द्यावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात ऊस गाळप होण्यास सुरुवात झाली असली तरी नवीन लावण करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. बिले जमा होत असली तरी बँकेतून ते पैसे मिळत नसल्याने लावणीच्या खर्चाचे गणित कसे सोडवायचे या चिंतेत शेतकरी आहेत. काहींनी राष्ट्रीयीकृत बँकांकडे पैसे वर्ग करण्यास सुरुवात केली असली तरी तिथेही कमी पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या त्रासात भरच पडली आहे. ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली तर शेतीच्या पुढील कामांना वेग येणार आहे.

सध्याची सर्वाधिक बिले

वारणा कारखाना २९ कोटी २४ लाख

जवाहर २० कोटी ९७ लाख

दत्त शिरोळ १३ कोटी ७२ लाख

दालमिया १२ कोटी ५३ लाख

कुंभी ११ कोटी

पंचगंगा १० कोटी ५६ लाख

डी. वाय. पाटील ११ कोटी ३९ लाख

गुरुदत्त शुगर्स ११ कोटी ३ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: रेल्वे जाळण्याचा प्रयत्न

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि निकालाची तारीख पुढे गेल्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात थांबलेली महाराष्ट्र-गोंदिया एक्स्प्रेस जाळण्याचा प्रयत्न आंदोलकांनी बुधवारी केला.

आंदोलकांनी रेल्वेच्या बोगीसमोरच कागदपत्रे टाकून जाळपोळ केली. रेल्वेच्या डब्यातही रॉकेल ओतण्यात आले. रॉकेलने ओले केलेले गोळेही बोगीत टाकले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल आणि शाहुपूरी पोलिसांची तारांबळ उडाली. रेल्वे पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन जवळ रेल्वेच्या डब्यांची स्वच्छता केली जाते. संध्याकाळी सहाच्या सुमारास दहा ते बारा आंदोलक या ठिकाणी जमले. त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या कागदपत्रे कोल्हापूर-गोंदिया रेल्वेच्या डब्यासमोर टाकून जाळपोळ केली. त्या वेळी आंदोलकांतील दोन ते तीन कार्यकर्त्यांनी पार्किंगसाठी थांबलेल्या रेल्वे डब्यात रॉकेल ओतण्यास सुरुवात केली. दोन आंदोलक रेल्वेच्या डब्यात घुसले. त्यांनी रेल्वेच्या सीटवर रॉकेल ओतले. रॉकेलमध्ये बुडविलेले कापडही फेकण्यात आले.

या प्रकारामुळे गाडीजवळ थांबलेल्या डब्यातील प्रवासी घाबरून गेले. आंदोलकांनी गाडी पेटविण्याचा प्रकार करीत असल्याचे रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे प्रशासनाला कळाले. त्या वेळी स्टेशनचे व्यवस्थापक सुग्रीव मीना यांच्यासह रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी दाखल झाले. हाकेच्या अंतरावर असलेले शाहुपूरी पोलिसही ठाण्यातून दहा ते बारा पोलिस कर्मचारी दाखल झाले. त्या वेळी आंदोलक येथून पसार झालेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डफळापूर पाणीटंचाई मुक्तलोकसहभागातून एकवीस दिवसांत पाण्याचा प्रश्न मार्गी

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

कायमचा दुष्काळ आणि वर्षांनुवर्षे तीव्र पाणी टंचाईला तोंड देणाऱ्या जत तालुक्यातील डफळापूरच्या ग्रामस्थांनी एक आगळा वेगळा आदर्श घालून देत लोकसहभागातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. गावकऱ्यांची पाण्यासाठी होत असलेली ओढाताण पाहून सदैव पाण्याने भरलेल्या विहिरीचे मालक पाणी द्यायला तयार झाले अन् व्यापाऱ्यांपासून अनेकांचे हात मदतीला धावले. ७ नोव्हेंबरला बैठक झाली आणि पाच किलोमीटरच्या पाइपलाइनमधून प्रवास करीत २८ नोव्हेंबरला पाण्याची गंगा डफळापूरात अवतरली.

दुष्काळ पाचवीलाच पुजलेल्या जत तालुक्याची आवस्था पुन्हा कथन करण्याची आवश्यकता नाही. अशा तालुक्यातील डफळापूर हे गाव गेली आठ ते नऊ वर्ष तीव्र पाणी टंचाईला तोंड देत होते. ऐन पावसाळ्याच्या म्हणजे सप्टेंबर महिन्यापासूनच गावाला पाणी पाणी करीत भटकंती करण्याची वेळ आली. सरकारी नळाला पंधरा ते वीस दिवसांतून पाणी दिसायचे. तेही पुरेसे नसायचे. त्यामुळे गावाने पाणी विकत घ्यायला सुरुवात केली. आपल्या गावकऱ्यांची पाण्यासाठीची धावपळ पाहून प्रा. रणजित चव्हाण यांनी मित्र आणि गावकऱ्यांसमोर जनकल्याण पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव ठेवला. गावापासून पाच किलोमीटरवर असलेल्या आपल्या शेतातील विहिरीला मुबलक पाणी आहे. ते देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. एक एक करीत अनेकांनी ही संकल्पना उचलून धरली. नोटबंदीच्या निर्णयामुळे अडचणी आल्या. तरीही अनेकांनी सढळ हाताने मदत केली. काहींनी पुढचा वायदा देऊन मदत जाहीर केली. कामाला सुरुवात झाली. जेसीबीच्या माध्यमातून पाच किलोमीटरची चर काढून त्यातून पाइपलाइन केली. पाइपमधून धावत आलेले पाणी सरकारी नळपाणी योजनेच्या टाकीत धो-धो पडायला लागताच गाव आनंदाने नाचायला लागला.

अनोखी जनकल्याण पाणी पुरवठा योजना पाणी घेऊन आल्यानंतर गावकऱ्यांनी सोमवारी उद्घाटनाचा सोहळा घेतला. पाणी घेऊन येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव सडारांगोळ्यांनी वाट सजवून हसत मुखाने सज्ज होता. प्रांताधिकारी अशोक पाटील, भाजपचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य मकरंद देशपांडे आणि योजनेचे जनक प्रा. चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होताच दारातल्या नळाचे पाणी वाजू लागले. यावेळी माजी सभापती मन्सूर खतीब, अभिजित चव्हाण, दिग्विजय चव्हाण, मराठा सेवा संघाचे महादेव साळुंखे, पंचायत समितीच्या सदस्या देवयानी गावडे, सरपंच राजश्री शिंदे आदी उपस्थित होते.

गाव करील ते राव करील काय?

दररोज आठ तास पाणी देणारी ही योजना खऱ्या अर्थाने जनकल्याण करणारी ठरली आहे. सरकारी योजना पूर्ण होईपर्यंत डोळे पांढरे होण्याची वेळ येते. त्यामुळेच गाव करील ते राव करील काय? या म्हणीचा प्रत्यय आणून देणाऱ्या या योजनेने अवघ्या एकवीस दिवसांत गावचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. या संकल्पनेचे आणि उपक्रमाचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी कौतुक करून योजनेचे जनक प्रा. चव्हाण यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार्ड स्वाइप करा अन् पान खा

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

पाचशे, हजारच्या नोटाबंद होऊन चलनात आलेल्या दोन हजारांच्या नोटेमुळे सुट्ट्या पैशाची अडचण निर्माण झाली आहे. बँका आणि एटीएम समोरच्या रांगा हटायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर अडचणीतून मार्ग काढण्यासाठी व्यावसायिकांकडून आता स्वाइप मशीन हा उत्तम पर्याय निवडण्यास सुरुवात झाली आहे. सांगलीतील कॉलेज कॉर्नरनजीकच्या आर्या पान शॉपने स्वाइप मशीन उपलब्ध केल्याने पान खाणारांची आणि सुट्टे कुठून आणू, असा सवाल करणाऱ्या पानपट्टीचालकाची समस्या सुटली आहे. स्वाइप मशिनची सेवा उपलब्ध करून देणारी ही राज्यातील पहिलीच पानपट्टी असल्याचा दावा मालक विजय पाटील यांनी केला आहे.

चलनात आलेली नवी दोन हजाराची नोट आणि शंभर, पन्नासच्या नोटांच्या तुटवड्यांमुळे सुट्ट्या पैशाची अडचण सर्वच पातळीवर निर्माण झाली आहे. हजार, पाचशेची खरेदी असेल तर चेक देऊन गरज भागविली जावू शकते. परंतु, पान खान्यापासून ते शंभर, दोनशेच्या वस्तू खरेदी करणाऱ्यांनी काय करायचे? असा सवाल उपस्थित होत आहे. या समस्येवर आर्या पानशॉपने स्वाइप मशीनचा उपाय केला आहे. त्यामुळे पानाची चटक असणाऱ्यांनी खुशाल पान खावे, पानाचा स्वाद घेत घेत कार्ड स्वाइप करावे. जेवढे पानाचे पैसे तेवढेच पैसे कार्डवरुन थेट पानशॉप संचालकाच्या खात्यावर जमा होतात. त्यामुळे मोठी नोट देऊन सुट्टे मिळेपर्यंत वाट बघत बसावी लागत नाही. स्वाइप मशीन म्हणजे मोठ्या व्यावसायिकांचे काम असल्याचा समज या उपक्रमाने दूर केला आहे. पानशॉपमध्ये स्वाइप मशीनमुळे व्यवहार सुरळीत होत असतील तर किराणा मालाच्या दुकानांपासून ते अन्य दैनंदिन गरजेसाठी केल्या जाणाऱ्या खरेदीच्या ठिकाणी स्वाइप मशीनद्वारे व्यवहार रुळावर यायला काहीच हरकत नाही. प्रिपेड कार्ड, पेटीएम या पर्याचाही वापर काही ठिकाणी होऊ लागला आहे. अशा प्रकारे कॅशलेस व्यवहाराच्या दिशेने जनतेची पावले पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्वाइप मशिनची मागणीही वाढायला लागली आहे.

स्वाइप मशिनचा वापर सुरू केल्यानंतरचा अनुभव कथन करताना विजय पाटील आणि अंकुश पाटील म्हणाले, ‘व्यवसाय छोटा अगर मोठा असो. ज्यांनी पारदर्शी व्यवहाराचा मार्ग निवडला आहे. त्यांच्यासाठी स्वाइप मशिन हे एक वरदान मानले पाहिजे. पैसे सुट्टे नसल्याच्या कारणावरुन उधारी वाढू शकते किंवा एखाद्याने मोठी नोट दिली तर त्यांनी घेतलेल्या पानांचा हिशोब ठेवावा लागतो. या दोन्ही गोष्टींवर स्वाइप मशिनमुळे मात करणे शक्य झाले आहे. काही ग्राहक उधारीची रक्कमही कार्डद्वारे जमा करीत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हा पर्याय उत्तम आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरसोयींनी पोळले ग्राहक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वेळेवर व हवी तितकी रक्कम काढण्याची सोय, कर्ज मंजूर करण्याबरोबरच ती हातात लवकरात लवकर देण्यासाठी बँकांमध्ये असलेली स्पर्धा, खातेधारकांनी बँकांमध्ये न येता त्यांना बँकिंगचा लाभ देण्यासाठी केलेल्या सुविधांमधून ग्राहकाला गेल्या काही वर्षांपासून ‘राजा’ म्हणून वागणूक देण्यास सुरुवात केलेल्या राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकांमध्ये गेल्या महिनाभरात नोटाबंदीनंतर ‘हीच का ती बँक’ अशी ग्राहकांची परिस्थिती झाली आहे.

पैसे भरण्यापासून काढण्यासाठी ​उन्हामध्ये रांगेत उभे राहण्याबरोबरच त्यानंतरही पुरसे ​पैसे मिळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे आवश्यक खर्चाइतके पैसे मिळवण्यासाठी आठवडाभरात दोन ते तीनदा बँकेच्या पायऱ्या चढून त्रास सहन करावा लागत आहे. पेन्शनधारकांसाठी हा कालावधी आणखीनच त्रासदायक असल्याचे चित्र आहे.

बँकांमध्ये ठेवी ठेवण्याबरोबरच विश्वासू कर्जदार शोधण्यासाठी गेल्या महिन्यापूर्वी बँकेतील यंत्रणा सतर्क असायची. एखादा मोठा ठेवीदार मिळाल्यास त्याच्यासाठी साऱ्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जायच्या. कर्जदारांसाठीही हीच परिस्थिती असायची. मोठे कर्ज घेण्यासाठी कुणी नागरिक समोर आला तर त्याला व्यवस्थित वागणूक देण्याबरोबरच तो आपल्या बँकेतूनच कर्ज कसे घेईल यासाठी आटापीटा केला जात होता. सामान्य ग्राहकांसाठीही अनेक बँक अशा प्रकारची तत्पर सेवा देत होत्या. यापूर्वी ग्राहकांना पैसे मुबलक उपलब्ध करुन दिले जायचे. मोठ्या ग्राहकांना बँकेत येऊन वेळ घालवण्यापेक्षा त्यांना जास्त सुविधा दिल्या जात होत्या.

बँकांकडून ग्राहकांना विनंती

गेल्या महिनाभरात हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. सहकारी बँकांमध्ये तर पैसे नसल्याने येणाऱ्या ग्राहकांची समजूत काढून उपलब्ध पैशांमध्ये भागवण्याची विनंती केली जात आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. आवश्यक खर्चासाठी लागणारे पैसे उभे करण्यासाठी अनेक बँकांमध्ये जाऊन रांगेत उभे रहावे लागत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते असले तरी तिथेही असलेल्या रांगांमध्ये उभे राहून वेळ घालवावा लागत आहे. पेन्शनरांनाही हा मोठा त्रास आहे. रांगेची लांबी वाढली व पेन्शनरांना अधिक काळ रांगेत उभे रहावे लागले आहे.

नागरिक कामे सोडून रांगेत

ज्येष्ठ नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यापेक्षा अनेक नोकरदार व व्यावसायिकांचा वेळही रांगेत वाया जात आहे. घरातील महत्वाचे काम असल्यास त्या आठवड्यातील मर्यादित रक्कम कशी मिळेल याची चिंता नागरिकांना सतावत आहे. एटीएममध्येही दोन हजार रुपयांचीच नोट मिळत असल्याने पैसे खर्च करण्याची चिंता वेगळीच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिवाळी अधिवेशनानंतर खंडपीठासाठी बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करावे या मागणीसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदारांनी वज्रमूठ बांधली. आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खंडपीठाची एकमुखी मागणी करून सरकारवर दबाव आणला. मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनानंतर खंडपीठ प्रश्नावर व्यापक बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री म्हणाले की, खंडपीठाचा निर्णय मुंबई हायकोर्टात प्रलंबित असून सरकारची भूमिका सकारात्मक आहे. याबाबतचा अहवाल हायकोर्टाला लवकर सादर करण्यात येईल. अधिवेशन संपल्यानंतर सर्व घटकांची व्यापक बैठक आयोजित केली जाईल.

खंडपीठाच्या मागणीसाठी गेली तीस वर्षे सहा जिल्ह्यातील वकील लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासंबधी हालचाली सुरू झाल्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने कोल्हापुरात खंडपीठ स्थापन करण्याचा मंत्रिमंडळाचा ठराव हायकोर्टाला पाठवला आहे. हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनीही अहवालात कोल्हापुरात खंडपीठ स्थापण्यास हिरवा कंदील दाखवला आहे, पण हायकोर्टाने खंडपीठ स्थापनेबाबत पावले उचलली नसल्याने खंडपीठ कृती समितीने पुन्हा सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू केली आहे.

एक डिसेंबरपासून जिल्हा कोर्टाच्या आवारात वकिलांचे साखळी उपोषणास सुरूवात केली आहे. या उपोषणास जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष व संघटनांचा पाठिंबा मिळू लागला आहे. खंडपीठाची मागणी सरकारीदरबारी रेटण्यासाठी सहा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बुधवारी एकत्र आले. नागपूर अधिवेशनात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी खंडपीठाच्या मागणीसाठी विधानसभेबाहेर निदर्शने केली. निदर्शनात तीन जिल्ह्यातील प्रतिनिधींसह राज्यमंत्री सदाभाऊ खोतही सहभागी झाले होते.

त्यानंतर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. खंडपीठ मागणीचे निवेदन दिले. खंडपीठाच्या मागणीसाठी सहा जिल्ह्यातील जनता, पक्षकार, वकील, लोकप्रतिनिधी मागणी करत आहेत. मुंबईत खटल्यासाठी सहा जिल्ह्यातील पक्षकारांना त्रास होत आहे. मुंबई हायकोर्टात खटले प्रलंबित असल्याने अनेकजणांना न्याय लवकर मिळत नाही. कोल्हापुरात खंडपीठ लवकरात लवकर निर्माण व्हावे यासाठी सरकारने सकारात्मक प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली.

माजी मुख्यमंत्री, आमदार झाले एकत्र

शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार राजेश क्षीरसागर, सतेज पाटील, पंतगराव कदम, शिवाजीराव नाईक, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, डॉ सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक, भारत भालके, हनुमंत डोळस, बबनराव शिंदे, दिलीप सोपल, राजन साळवी, वैभव नाईक, निलेश राणे, आनंदराव पाटील, सुरेश हाळवणकर, संध्यादेवी कुपेकर, अनिल बाबर, सुमन पाटील, शंभूराजे पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० टक्के पर्यटक घटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोटाबंदीमुळे गेल्या महिनाभरात ५० टक्के पर्यटक घटले आहेत. त्यामुळे शहरातील पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. नोटांची उपलब्धता जसजसे होईल, तसतसे पर्यटक वाढतील अशी आशा व्यावसायिक बाळगून आहेत.

नोटाबंदीचा निर्णय आठ नोव्हेंबरला जाहीर होण्यापूर्वी आठ दिवस अगोदर कोल्हापूर शहर पर्यटकांनी फुलले होते. दीपावलीच्या सुट्ट्या १४ नोव्हेंबरपर्यंत होत्या. त्यामुळे पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन व्यावसायिकांनी तयारी केली होती. हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंग बूक झाली होती. पण ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद झाल्याने पर्यटकांनी शहराकडे पाठ फिरवली. अनेक पर्यटकांनी बुकींग रद्द केले. त्यामुळे हॉटेल, लॉजिंग बोर्डिंग व यात्री निवासांना मोठा फटका बसला. जुन्या नोटा स्वीकारत नसल्याने व्यवहार करताना अडचणी जाणवणार असल्याने भाविक व पर्यटक येण्याचे बंद झाले आहेत.

पर्यटक कोल्हापुरात अंबाबाई, जोतिबाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. शुक्रवारी अंबाबाईला गर्दी असते पण त्यामध्ये स्थानिक भाविकांची मोठी संख्या असते. मुंबई व पुण्याचे पर्यटक शनिवारी व रविवारी येतात. ही मंडळी ऑनलाईन व कॅशलेस व्यवहार करत असल्याने पर्यटकांचा थोडा फार वावर दिसत आहे. पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, दाजीपूरकडे जाणाऱ्या पर्यटकांचाही ओघ घटला आहे. सर्वसामान्य गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील भाविक व पर्यटक कॅशलेस व्यवहारापेक्षा चलनातील व्यवहार करतात. अशा पर्यटकांची संख्या ६० ते ७० टक्के असते. अशा पर्यटकांची संख्या १० ते २० टक्के इतकी कोल्हापुरात देवीच्या दर्शनाला येत आहे. त्यामध्ये विवाह समारंभानंतर अंबाबाई व जोतिबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नवदांपत्य व त्यांच्या नातलगांची संख्या जास्त आहे.

दोन हजार रुपयाचे सुट्टे पैसे मिळत नसल्याने खरेदीवर मोठा मर्यादा आल्या आहेत. महाव्दार रोडवरील व्यवसाय ५० ते ६० टक्क्यांनी घटला आहे. चप्पल लाईनवरही हीच परिस्थिती आहे. पैशाचे व्यवहार करताना पर्यटकांना १०० रूपयांच्या नोटावर अवलंबून रहावे लागते. प्रवासास येताना १०० रूपयांचे बंडल हाताळण्यास अवघड असल्याने पर्यटक येत नाहीत अशी माहिती काही व्यावसायिकांनी दिली.

पर्यटनावर अवलंबून असलेल्या हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंग, यात्री निवास, उपाहारगृहे व व्यापाऱ्यांच्यावर परिणाम झाला आहे. १४ नोव्हेंबरला सुट्ट्या संपल्यानंतर तीन आठवडे पर्यटन व्यवसायात चांगलीच मंदी आली आहे. ख्रिसमसच्या काळात दर वर्षी पर्यटक मोठ्या संख्येने शहरात येतात. ख्रिसमसच्या सुटट्यात पर्यटक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यापारी व विक्रेत्यांनी स्वाईप मशिन बसवण्यास सुरूवात केली आहे. स्वाईप मशिन व सुट्या नोटांच्या उपलब्धतेवर पर्यटन व्यवसायाला वर्षाअखेरीस ‘अच्छे दिन’ येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहलीदरम्यान अपघातास प्राचार्य, शिक्षक जबाबदार

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet : @sachinyadavMT

शिक्षण विभागाने सहलींसाठी घ्यावयाची खबरदारी आणि नियमांचे परिपत्रक काढले आहे. शाळांना शंभरच्या स्टँपवर हमीपत्र घेऊनच सहलींसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. शैक्षणिक संस्थेने सहलीसाठी कोणत्याही विद्यार्थ्यांना सक्ती करू नये. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला महत्त्व दिले असून प्रत्येक शाळेवर हे नियम बंधनकारक राहणार आहेत. त्याबाबत हेळसांड झाल्यास शिक्षक आणि मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. विभागीयय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने या नियमावलीच्या काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने नोव्हेंबर महिन्यात सहलींच्या नियमावलींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने डिसेंबरमध्ये ही नियमावली लागू केली. मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांत शैक्षणिक सहलीची तयारी पूर्ण झाली आहे. काही शाळांनी पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सहलीसाठी ठिकाणे निवडली आहेत. मात्र सहलीसाठी नियमावली असल्याने शाळांची कोंडी झाली असली तरी हमीपत्र घ्यावेच लागणार आहे.

समुद्र किनारे, अतिजोखमीची पर्वतावरील ठिकाणे, नदी, तलाव, विहिरी आदी ठिकाणी शैक्षणिक सहली नेऊ नयेत, अशा सूचना आहेत. त्यामुळे या ठिकाणी सहलींचे नियोजन केलेल्या शाळांची पंचाईत झाली आहे. नियमावलीतील अटी पाहून काही शाळांचे सहलीचे नियोजन कोलमडले आहे. समुद्र किनारे निवडलेली ठिकाणे बदलली आहेत. त्यासाठी शाळांनी एसटीकडे ठिकाणे बदलण्यासाठी विचारणा केली आहे. खासगी बसेसमधून सहली काढणाऱ्यांची मात्र पंचाईत झाली आहे. सहलीसाठी कोणते वाहने घेऊन जाणार आहे, त्याचा क्रमांक आणि वाहनाचा प्रकारही स्टँप पेपरमध्ये नोंद करावा लागणार आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी सहलीसाठी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण प्रमुख, शिक्षण उपसंचालकांची लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे. सहलीच्या सर्व बाबी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी कळवाव्या लागणार आहेत. शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्थेचे संबंधित पदाधिकारी या सर्वांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. शाळा सहलीची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याने तपासणीत हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावरही गंभीर कारवाई केली जाणार आहे.

००००

सहलीसाठी स्टँप पेपरवर हमीपत्राची मागणी अयोग्य आहे. या नियमावलीत काही अटी जाचक आहेत. अटींची सक्ती केल्यास शाळांत शैक्षणिक सहलीचे भवितव्य राहणार नाही.

आर. वाय. पाटील, मुख्याध्यापक, आदर्श प्रशाला

०००

नियमानुसार शाळांनी सहलीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याबाबत कोणत्याही संस्थेने हयगय केल्यास संबधितांच्यावर कारवाई केली जाणार आहे. शैक्षणिक सहली विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू नयेत, याची गांभीर्याने दखल घ्यावी.

मकरंद गोंधळी, शिक्षण उपसंचालक

०००

सहलींसाठी नियमावली

सहली नेण्यापूर्वी दोन प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहल आणि आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास बचावासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्या.

प्रथमोपचार पेटीसह सहलीच्या ठिकाणच्या सरकारी रूग्णालये आणि डॉक्टरांचे संपर्क क्रमांक ठेवा

सहलीचा आराखडा पालकांपर्यंत देऊन सूचनांची दखल घ्या. गरज भासल्यास पालकांचा एक प्रतिनिधी घ्या.

सहलीपूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र बंधनकारक

सहलीच्या ठिकाणी असलेली भौगोलिक परिस्थिती, वातावरणानुसार घ्यावयाच्या काळजीचे मार्गदर्शन

सहलींसाठी एसटी बस किंवा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या बस वापरा.

दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक सहलीबरोबर पाठवावा. सहलीला आलेल्या विद्यार्थिनींना एकटे फिरण्यास सोडू नये.

शिक्षकांनी तंबाखू, गुटखा आणि अन्य मादक पदार्थांचे सेवन करू नये.

विद्यार्थ्यांना मोबाईल फोन वापरण्याची सवलत देऊन पालकांच्या संपर्कात राहण्याची सूचना करावी

माध्यमिक विद्यार्थ्यांना ट्रेकिंग, पोहण्यासाठी परवानगी देऊ नये.

विद्यार्थ्यांना सहलीला येण्याची सक्ती संस्थेने करू नये.

शैक्षणिक सहलीसाठी जादा वर्गणी, जादा शुल्क घेऊ नये.

शैक्षणिक सहलीच्या मुक्कामाचा कालावधी एक मुक्कामापेक्षा अधिक नसावा.

राज्याबाहेर सहल काढण्यास शिक्षण विभागाकडून परवानगी मिळणार नाही.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक आणि सहलीतील सर्व शिक्षकांची राहील.

विद्यार्थिनींनी असल्यास एक महिला शिक्षिका आणि एक महिला पालक प्रतिनिधी बंधनकारक

विद्यार्थी, विद्यार्थिनींबरोबर कोणतेही गैरवर्तन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

प्राथमिकच्या सहली परिसर भेट किंवा सायंकाळी परत येतील, असे नियोजन करावे.

साहसी खेळ, वॉटर पार्क, अॅडव्हेंचर पार्कच्या ठिकाणी सहली काढू नयेत.

रेल्वे क्रॉसिंगवरून बस नेताना शिक्षकांनी सावधगिरी बाळगावी.

००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्टर-मोटारसायकल अपघातात एक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले. कागल तालुक्यातील काळम्मा बेलेवाडी येथे आज सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. संजय बचाराम यादव (वय ४२, रा. बाळेघोल, ता. कागल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला कृषी विभागात काम करत होते.

संजय यादव हे घोरपडे कारखान्याला कृषी विभागात काम करत होते. ते नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेपाच वाजता ड्युटी संपवून ते मोटारसायकलवरून (एमएच ०९ सीएच ४६६५) घरी परतत होते. भारती विद्यापीठ प्रशालेजवळ ओव्हरटेक करताना समोरून ऊस घेऊन घोरपडे कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरशी (एमएच ०९ सीजे २८१) त्यांच्या मोटारसायकलची धडक झाली. ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघातावेळी रस्त्यावरुन बाजूला गेल्याने ट्रॅक्टर मोरी पुलावरून खाली कोसळला, तर चालकाने उडी घेतल्याने तो जखमी झाला. मात्र, तो पळून गेला. त्याचे नाव समजू शकले नाही. ट्रॅक्टरवर येवती असे गावाचे नाव व मोबाइल क्रमांक लिहिलेला आढळला. यामध्ये ट्रॅक्टरचेही नुकसान झाल, तर ऊस विस्कटून पडला.

संजय यादव यांना दोन मुली आहेत. एक सहावीत व दुसरी मुलगी तिसरीत शिकते. अपघातस्थळी भीषण स्थिती होती. नागरिकांच्या गर्दीमुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. घोरपडे कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली. यावेळी भरधाव ट्रॅक्टर वाहतुकीबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेटबँकिंगचा वाढला टक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॅशलेस व्यवस्थेला पर्याय म्हणून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या सुविधांचा लाभ केवळ वीस टक्के ग्राहकांनी घेतला आहे. बँकाच्या काऊंटरवरील आणि एटीएमच्या रांगा कमी होण्या साठी सर्वच बँकांनी कॅशलेश सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र या कॅशलेस व्यवहारावर अनेक मर्यांदा आल्या.

अनेक ग्राहकांच्याकडे मोबाइल उपलब्ध नाही. अत्याधुनिक सुविधांचा उपयोग कररण्यासाठी काही ग्राहकांच्याकडे तांत्रिक ज्ञान उपलब्ध नसल्याने कॅशलेसकडे अनेकांनी पाठ फिरविली. एटीएमच्या जोडीला पीओएस (पाँइट ऑफ सेल) मशीन उपलब्ध करून देण्यात आली. मात्र व्यापाऱ्यांनी केलेली मागणी लक्षात घेता राष्ट्रीयकृत बँकाकडे ही मशीन्स उपलब्ध नाहीत. आठ दिवसांत मशीन देण्याची हमी दिली असली तरी प्रत्यक्षात महिनाभराने मशीन्स उपलब्ध होत असल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या व्यवहारावर परिणाम झाला. रोख पैशांऐवजी चेकने व्यवहार करण्यासाठी आग्रह करण्यात आला. मात्र अनेक ग्राहकांकडे चेकबुक नाहीत. मासिक हप्ते आणि अन्य व्यवहार वेळेत पूर्ण करण्यासाठी तातडीने चेक वटले नाहीत. त्यामुळे बहुतांशी बँकावर चेकद्वारे व्यवहाराचाही ताण आला. अनेक कंपन्यानी वॉलेट सेवा सुरू केली. मात्र या सेवेवरही मर्यांदा आल्या. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (एनईएफटी) आणि आरटीजीएससह आयएमपीएस, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेसचा (ईसीएस) काही ग्राहकांना वापर केला.

सहकारी बँकांना नव्या नोटा मिळत नसताना, पतसंस्थांना नव्या नोटा मिळणे शक्यच नव्हते. त्यामुळे पतसंस्थांमध्ये बचत खात्यावर ठेवलेल्या रकमेसाठी दररोजचे हेलपाटे मारावे लागत आहेत. नवीन नोटा मिळत नसल्याने पिग्मी एजंटाकडून होणाऱ्या कलेक्शनच्या जोरावर पतसंस्थांचे व्यवहार सुरू असून खातेदारांना केवळ ५०० ते हजार रुपये दिले जात आहेत. तसेच काही पतसंस्थांची राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असलेल्या खात्यातून आठवड्याला २५ हजार रुपये मिळत आहे, या रकमेतून खातेदारांची बोळवण केली जात आहे. पतसंस्थांचे रोखीचे व्यवहार ठप्प असले, तरी कर्जाचे वितरण नियमित होत असल्याचे पतसंस्था फेडरेशनच्यावतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयजीएम’ जानेवारीत हस्तांतर करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

इचलकरंजी पालिकेच्या मालकीचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) हस्तांतरणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय प्रलंबित असून, पुढे कोणतीच कारवाई न करणाऱ्या सरकारच्या भूमिकेवर हायकोर्टाने कडक शब्दांत ठणकावले. त्याचबरोबर पालिकेच्या भूमिकेवरही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत फटकारले. हॉस्पिटल जानेवारी २०१७ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हस्तांतरित करून त्याचा अंतिम अहवाल सादर करा, असा आदेश आदेश मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर व न्या. एम एस. सोनक यांच्या खंडपीठाने सरकारला दिले आहेत. त्यामुळे हॉस्पिटल हस्तांतरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आयजीएमसंदर्भात उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांच्यावतीने अॅड. धैर्यशील सुतार यांनी म्हणणे मांडताना, जून २०१६ मध्ये राज्य सरकारने आयजीएम हस्तांतरित करून घेण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या अनुषंगाने पुढे कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे सांगून राज्य सरकारच्या निर्णयानंतर नगरपरिषद प्रशासनसुद्धा हॉस्पिटलकडे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना उपचार मिळत नसल्याने त्रास सोसावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर बाजू मांडताना पालिकेचे वकील तेजपाल इंगळे यांनी, यासंदर्भात नगरपरिषद प्रशासन व राज्य सरकार यांच्यात बैठका झाल्या असून, सरकारने मार्च २०१७ पर्यंत हस्तांतरणासंदर्भात मुदतवाढ मागितली असल्याची माहिती दिली. मात्र, या उत्तरावर मुख्य न्यायाधीशांनी नगरपालिका तसेच सरकारला हॉस्पिटल हस्तांतरणाच्या उदासीनतेबाबत फैलावर घेतले. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सरकारने हॉस्पिटल रितसर ताब्यात घेऊन त्याचा अंतिम अहवाल सादर करावा. त्यासाठी आता कोणताही पर्याय देणार नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकोलकर व पवारने पानसरेंवर गोळ्या झाडल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर सारंग अकोलकर-कुलकर्णी व विनय बाबूराव पवार या दोघांनी गोळ्या झाडल्याचा सबळ पुरावा असल्याचा दावा पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने केला आहे. पानसरे हत्येच्या खटल्यातील पुरवणी आरोपपत्रात पोलिसांनी हा आरोप केला आहे. हल्ल्यातील मुख्य साक्षीदार पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांनीही पोलिसांना तसा जबाब दिला आहे. उमा पानसरेही या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या होत्या. अकोलकर व पवार हे दोघेही फरारी आहेत. सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांच्या कोर्टात अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी २९ नोव्हेंबरला हे आरोपपत्र दाखल केले आहे.

पुरवणी आरोपपत्रात पोलिसांनी विनय पवार व सारंग अकोलकर या दोघांवर हत्येचा आरोप केला आहे. गुन्ह्यातील प्रमुख आरोपी, सनातन संस्थेचा मुख्य साधक समीर गायकवाड, हिंदू जनजागृती समितीचा डॉ. विरेंद्रसिह तावडे, पवार व अकोलकर हे आरोपी हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी संघटन करत असल्याचे निष्पन्न झाले असल्याचा दावा आरोपपत्रात केला आहे.

पुरवणी आरोपपत्रात म्हटले आहे की, पानसरे पुरोगामी विचारसरणीचे तर डॉ. नरेंद्र दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सक्रीय होते. दोघांविरोधात सनानत संस्थेने कोर्टात दावे दाखल केले आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर पानसरे यांनी सनातन संस्थेविरूद्ध सातत्याने जनमत तयार करण्याचे प्रयत्न सुरू केल्याने पानसरे हे चौघा आरोपींच्यादृष्टीने दुर्जन होते. ३० डिसेंबरला पानसरे यांनी ‘हू किल्ड किरकिरे?’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता. तसेच सनातनविरूद्ध राज्यात १५० कार्यक्रमही आयोजित केले होते. पानसरे यांच्या हत्येसाठी डॉ. तावडे दीड महिने कोल्हापुरात वास्तव्यास होता. एप्रिल २०१३ मध्ये खटल्यातील साक्षीदाराची तावडेने कोल्हापुरात भेट घेतली होती. डॉ. तावडेने सारंग अकोलकरला साक्षीदाराला कोल्हापुरात ​भेटण्यास पाठवले होते. अकोलकरने साक्षीदाराला रिव्हॉल्व्हर दाखवून अशा प्रकारची हत्यारे तयार करण्यास सांगितले होते. त्यानंतर पानसरे यांच्या दिनचर्येची माहिती घेण्यासाठी डॉ. तावडेने अकोलकर व व विनय पवार यांना कोल्हापूरला पाठवले होते. हत्येच्या आदल्या दिवशी, १५ फेब्रुवारीला अकोलकर व पवार हे रेकी करत होते. दोघांनीही पानसरे दाम्पत्यावर गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. उमा पानसरे यांनीही अकोलकर व पवार यांची छायाचित्रे ओळखली आहेत, पोलिसांना तसा जबाब दिला आहे. या चौघांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३०७, १२० (ब), ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३ (१)/२५(१ब) (अ),५।२७ प्रमाणे दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: महापौरपदी NCPच्या हसीना फरास

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसीना बाबू फरास यांची आज बहुमताने निवड झाली तर उपमहापौरपदी अर्जुन आनंद माने निवडून आले. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा मुस्लिम महिला महापौर झाल्या. फरास यांना ४४ तर ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांना ३३ मते मिळाली. शिवसेनेच्या चार सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.

महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक झाली. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीने नगरसेवकांना व्हिप लागू केला होता. भाजप, ताराराणी आघाडीने महापौर निवडीच्या पूर्वसंध्येला बुधवारी नगरसेवकांची बैठक घेऊन निवडणूक लढविण्याचे ठरवले. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेविका हसीना फरास यांचा महापौरपदी निवडीचा मार्ग सुकर झाला.

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अर्जुन आनंद माने यांनी भाजपच्या विजयसिंह खाडे- पाटील यांचा ४४ विरुध्द ३३ मतांनी पराभव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएमच्या रांगेत कार घुसली; १० जखमी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

विजापूर मार्गावरील आतारनगर येथे इंडियन बँकेच्या एटीएमबाहेर पैशांसाठी रांग लावणाऱ्या लोकांवर अपघाताची आफत कोसळली आहे. या मार्गाने जाणारी एक भरधाव कार रांगेमध्ये घुसल्याने झालेल्या अपघातात १० जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कारचालक दारूच्या नशेत होता, अशी माहिती मिळाली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

आज सकाळी १० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर मद्यधुंद कारचालकाला संतप्त जमावाने बेदम चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले. हा कारचालक शहरातील एका राजकीय पुढाऱ्याकडे नोकरीला असल्याचीही माहिती मिळाली आहे.

दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयाला एक महिना पूर्ण झाला तरी अद्यापि पैशांची चणचण दूर झालेली नाही. त्यामुळेच ज्या एटीएममध्ये पैसे आहेत त्याबाहेर लांबच लांब रांगा आजही लागत आहेत. या स्थितीमुळेच सोलापुरात हा विचित्र अपघात घडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापार पद्धती बदलावी लागेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जीएसटीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत केवळ बदल घडणार नाहीत, तर क्रांती होणार आहे. या क्रांतीशी जुळवून घेऊन पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला आपल्या व्यापार पद्धतीमध्ये प्रचंड बदल करावे लागणार आहेत, असे मत जीएसटी तज्ज्ञ सीए चेतन ओसवाल यांनी व्यक्त केले.

दि कोल्हापूर जिल्हा उद्योजक व व्यापारी महासंघाने जीएसटी आणि टॅली संदर्भात आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या कार्यशाळेला उद्योजक व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या वेळी टॅलीचे प्रचारक, प्रसारक संजीव शिवापूरकर आणि अतुल गोखले प्रमुख, महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर प्रमुख उपस्थित होते. जीएसटी करप्रणाली येत्या काही दिवसांतील प्रत्येक व्यापाऱ्यासाठी महत्त्वाची बाब असणार असल्याने या करप्रणालीचे बारकावे समजून घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती.

जीएसटीसाठी व्यापार पद्धतीत बदल अतिशय गरजेचे असल्याचे अधोरेखीत करून सीए ओसवाल म्हणाले, ‘आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जीएसटीमुळे अमुलाग्र बदल होणार आहेत. व्यापाऱ्यांनी कर भरणा करताना किंवा नोंदी ठेवताना कोणताही गाफीलपणा करून चालणार नाही. अन्यथा मोठ्या दंडाला समोरे जावे लागणार आहे. जीएसटीशी मिळते जुळते घेण्यासाठी व्यापारी, उद्योजकांना डॉक्युमेंटेशनची पद्धत बदलावी लागेल. जमा-खर्च त्याचा ताळेबंद अतिशय बिनचूक ठेवावा लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाचीही तरतूद करावी लागेल. नोंदणीनुसार हवा असणारा कर वेळोवेळी भरावा लागणार आहे.’

चांगल्या आणि सक्षम अर्थव्यवस्थेसाठी व्यापाऱ्यांना जीएसटी कर प्रणालीला स्वीकारावे लागेल, असे सांगून ओसवाल म्हणाले, ‘व्यापाऱ्यांना जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतर तंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आतापासूनच तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे. त्याच बरोबर मोठ्या बिझनेस लिडर्सचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्या पद्धतीने व्यापार, व्यवहार करावा लागेल.’ बदल स्वीकारणाराच नव्या प्रवाहात टिकू शकतो, आशयाच्या चार्ल्स डार्विनच्या सिद्धांतावर ओसवाल यांनी मार्गदर्शनाचा समारोप केला.

त्यानंतर टॅली संदर्भात शिवापूरकर आणि गोखले यांनी टॅली संदर्भात व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. अमर क्षीरसागर यांनी स्वागत केले. महासंघाचे अध्यक्ष कोरगावकर यांनी प्रस्ताविक केले. व्यासपीठावर राजेश चाळके, प्रकाश पुणेकर, संजय रामचंदानी, अमोल नष्टे, सचिन शहा, दिनेश ओमकार उपस्थित होते.

जीएसटीमध्ये महत्त्वाचे काय?

- महिन्याला तीन वेळा, वर्षातून ३७ वेळा रिटर्न भरावा लागणार

- काटेकोरपणे वेळेत रिटर्न्स भरावा लागणार

- शेतकऱ्यांना जीएसटीमधून पूर्णपणे वगळले

- निर्यातीवर जीएसटी नाही, पण त्यासाठीच्या खरेदीवर कर लागू

- कस्टम ऑफिसर्स प्रमाणे गोदाम, ट्रान्सपोर्टमधील ट्रकवर छाप्याचे अधिकार

- करचुकवेगिरी आढळल्यास १०० टक्के दंडाची तरतूद

- पन्नास हजार रुपयांवरील मालाची वाहतूक करताना त्याचे डॉक्युमेंटेशन गरजेचे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images