Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मंगळवेढ्याजवळ एसटी उलटलीनऊ प्रवासी जखमी; दोघे गंभीर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

एसटी बस वेगात असताना वळणावर चालकाचे स्टीअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटल्याची दुर्घटना मंगळवेढ्याजवळ सोमवारी घडली. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले, तर दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सांगोला आणि सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जंगलगी गावाजवळ हा अपघात घडला.

लवंगी येथील रात्रीचा मुक्काम आटोपून राज्य परिवहन महामंडळाची बस सकाळी मंगळवेढा गावाकडे निघाली होती. जंगलगी गावाजवळ रस्त्यातील मोठ्या वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. बस वेगात असल्याने ती उलटून थेट बाजूच्या खड्ड्यात उलटली. बसमध्ये एकूण २५ प्रवासी प्रवास होते.

हातापायाला मार लागल्यामुळे चालक गंभीर जखमी झाला, तर अन्य नऊ प्रवासीही जखमी झाले. एसटी बस उलटल्याचे समजताच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी धाव घेऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून त्यांना सांगोला आरोग्य केंद्र, तसेच सोलापूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांना माहिती मिळताच तातडीने ते घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळपर्यंत क्रेनच्या मदतीने बस रस्त्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बैलगाडींच्या टायरमधील हवा सोडलीकराडमध्ये स्वाभिमानी रस्त्यावर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कोल्हापूरमध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, साखर कारखानदार व विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत एफआरपी अधिक १७५ रुपये दर देण्याबाबत तोडगा निघाला आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी दर जाहीर न करता कारखाने सुरू केले आहेत. कारखान्यांच्या कृतीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत, कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथे ऊस वाहतूक करणारी वाहने जवळपास दोन तास रोखली. या वेळी आंदोलकांनी ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडींच्या टायरमधील हवा सोडली.

दरम्यान, प्रशासनाने त्वरीत यावर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारपर्यंत ऊस दराबाबत तोडगा न काढल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्याचा इशारा दिला होता. या बाबतचे निवेदन कराडच्या तहसीलदारांना देण्यात आले होते. कराड तालुक्यातील साखर कारखान्यांचा २०१६-१७चा गळीत हंगाम गेल्या ५ नोव्हेबरपासून सुरू झालेला आहे. परंतु, तालुक्यातील एकाही साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केला नाही.
.....

दर जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड घेऊ नये

कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखान्यांनी उसाची पहिली उचल (एफआरपी अधिक १७५) जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करू नये. तसेच साखर कारखान्यांनीही उसाचा पहिला हप्ता जाहीर केल्यानंतरच ऊस गाळप करावे अन्यथा ऊस वाहतूक बंद पाडण्याबरोबर तीव्र आंदोलनही करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला आहे.
....
साताऱ्यातही

‘एफआरपी+ १७५’

कृष्णा सहकारी साखर कारखाना, जयवंत शुगर्स व ग्रीन पावर शुगर्स या कारखान्यांनी एफआरपी अधिक १७५ अशा फॉर्म्युल्याप्रमाणे पहिली उचल देणार असल्याची घोषणा केली आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व ग्रीन पॉवर शुगर्सचे चेअरमन संग्रामसिंह देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

सातारा जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाला किती दर मिळणार याची उत्सुकता होती. सातारा जिल्ह्यात कोणत्याही साखर कारखान्याने ऊस दर जाहीर न केल्याने शेतकरी वर्ग संभ्रमावस्थेत होता.

कोल्हापुरात एफआरपीसह प्रति टनास १७५ रुपये जास्त देण्याचा तोडगा काढण्यात आला होता. तो कोल्हापूर येथील सर्वांना मान्य झाला आहे. या नंतर सांगली येथील बैठकीतही कोल्हापूरप्रमाणे एफआरपीसह प्रति टनास १७५ रुपये पहिली उचल देण्याचा तोडगा काढण्यात आला होता. कोल्हापूर व सांगली जिल्हातील ऊस दराचा फॉर्म्युला सातारा जिल्ह्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना, जयवंत शुगर्स व ग्रीन पॉवर शुगर्स स्वीकारणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या टाकीचे राजकारण शिगेला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

गेले सात वर्षे चर्चेत असणाऱ्या कसबा बावडा येथील अपूर्ण पाण्याच्या टाकीसंर्दभात शिवसेनेने आज (ता.७) निर्दशने करून रास्ता रोको केला. भगवा चौक येथील शिवसेना कार्यालयापासून राजर्षी शाहू चौकापर्यंत महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्ते आले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रभारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना येत्या आठ दिवसामध्ये स्थानिक नगरसेवक आणि शिवसेना आघाडीच्या सर्व नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक बोलविण्याची सूचना केली.

यावेळी क्षीरसागर म्हणाले, ‘लोकांच्या जिवाशी प्रशासनाने खेळ करू नये, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच टाकीचे काम रखडले आहे.’ यावेळी ‘ठेकेदाराचे काम थांबवताना साहित्याचा पंचनामा का केला नाही’ असे विचारले असता तत्कालिन अधिकाऱ्यांनी केलेला नाही मी अल‌िकडेच हजर झालो आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

यावेळी केलेल्या रास्ता रोकोमुळे अर्धातास रस्त्याच्या दक्षिण बाजूस भगवा चौकपर्यत तर उत्तर बाजूस पिंजार गल्लीपर्यत वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी शाहूपुरी पोलिसांनी आमदार क्षीसागर यांच्यासह कार्यकर्त्याना ताब्यात घेऊन दुपारी सोडून दिले.

यावेळी सुनील जाधव, विद्यानंद थोरवत, संजय लाड, प्रकाश कोळी, रवींद्र माने, सचिन पाटील, सचिन रोकडे, दयानंद गुरव, राजू काझी, शाहिन काझी, शारदा भांदिगरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पाच दिवसांपूर्वी शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक अशोक जाधव यांनी रविवारी घाईगडबडीने उद्‍घाटन उरकले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूपुरीतून तीस तोळ्यांचे दागिने लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी प्रमोद दिगंबर जमदग्नी (वय ५१, रा. जीवन झोका बंगला, शाहूपुरी ४ थी गल्ली) यांच्या बंगल्यातील तीस तोळ्यांचे दागिने लंपास केले. शनिवारी पहाटेपासून ते सोमवार पहाटेपर्यंत दोन दिवसात चोरट्यांनी हे कृत्य केले असून, सोमवारी (ता. ७) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या मुलाच्या आर्थिक तरतुदीसाठी दिगंबर जमदग्नी यांनी बँकेतील लॉकरमधून दागिने घरी आणले होते. दागिने गहान ठेवून ते मुलाच्या शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था करणार होते, यापूर्वीच चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारल्याने जमदग्नी कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

प्रमोद जमदग्नी हे शाहूपुरीतील चौथ्या गल्लीतील जीवन झोका बंगल्यातील पहिल्या मजल्यावर त्यांची पत्नी आणि मुलासह राहतात. बंगल्याच्या खालच्या मजल्यावर त्यांच्या मालकीची स्फुर्ती शॉपी आहे. मुलगा सात्विक हा अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे. मुलगा शिक्षणासाठी परदेशी जाणार असल्याने जमदग्नी यांनी काही दिवसांपूर्वी बँकेच्या लॉकरमधील तीस तोळ्यांचे सोन्या-चांदीचे

दागिने, तसेच काही रोकड घरात आणून ठेवली होती. यामध्ये नेकलेस, पाटल्या, चेन, सोन्याची वळी, आंगठ्या, रिंगा आदी सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे ताट, निरंजन आदींचा समावेश होता. चार दिवसांपूर्वी ते बाहेरगावी कौटुंबिक कार्यक्रमासाठी नातेवाइकांकडे गेले होते. सोमवारी सकाळी ते घरी परत आले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटल्याचे दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिल्यानंतर पहिल्या मजल्यावरील दोन्ही कपाटांमधील साहित्य विस्कटल्याचे दिसले. कपाटातील लॉकर उचकटून तीस तोळे दागिने आणि रोकड अज्ञातांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले.

या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्वानाने जमदग्नी यांच्या घरच्या बाजूच्या बोळातून पाचव्या गल्लीच्या मुख्य रस्त्यापर्यंत माग काढला. मुलाला शिक्षणासाठी परदेशी पाठवायला पैसे हवे असल्याने काही दागिने बँकेत ठेवून कर्ज काढण्याच्या उद्देशाने जमदग्नी यांनी दागिने घरी आणून ठेवले होते. मात्र चोरट्यांनी एका रात्रीत त्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याने त्यांची आयुष्यभराची कमाई लंपास झाली. या चोरीमुळे जमदग्नी कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाभाऊ खोतांच्या घरासमोर आंदोलन

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

उसाला ३५०० रुपये भाव मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी सकल शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी इस्लामपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घराच्या दारात आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना सदाभाऊंच्या घरापासून २०० मीटर अंतरावर रोखले. त्या परिसरातही बसायला मज्जाव केल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. घरासमोर आंदोलक आणि घराभोवती मंत्र्‍यांच्या समर्थकांचा गराडा, अशी स्थिती असल्याने तणावाचे वातावरण होते.

‘खासदार राजू शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत यांनी एफआरपी अधिक १७५ रुपयांचा दर मान्य केला आहे. ते सरकारमध्ये असल्याने मॅनेज झाले आहेत,’ असा आरोप करून बळीराजा शेतकरी संघटनेने रविवारी सांगली बैठकीनंतर आंदोलन केले होते. आमदार उल्हास पाटील यांनी सकल ऊस परिषद घेऊन मंत्री आणि खासदारांनी केलेली ही सेटलमेंट मान्य नसल्याचे सांगून आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार सकाळी शिरोळहून सकलच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या इस्लामपूरमध्ये दाखल झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ते सदाभाऊंच्या घराकडे गेले. प्रचंड घोषणाबाजी करून ते सदाभाऊंच्या घराच्या दिशेने आले. खोत यांच्या घरापासून पुढे पेठ-सांगली रस्त्यावरच पोलिसांनी आंदोलकांना अडवले. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेऊन घराकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांपेक्षा संख्येने जास्त असलेल्या पोलिसांनी त्यांना घरापासून २०० मीटर अंतरावर रोखले. आंदोलकांनी आंदोलकांनी भजने गात बैठक मारली. दुपारी एकच्या सुमारास बसलेल्या ठिकाणीच सोबत आणलेली खर्डा भाकरी खाऊन ‘स्वाभिमानी स्टाइल’ आंदोलन केले.

सकल शेतकरी संघटनेच्या या आंदोलनाला बळीराजा शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केला होता. सोमवारी प्रत्यक्ष हे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. सकल शेतकरी संघटनेचे यशवंत पाटील, मुकुंद गावडे, पांडुरंग माने, विकास पाटील तर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर, अविनाश पाटील, जयदीप पाटील, उमेश शेवाळेंबरोबर बळीराजा संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील सहभागी झाले होते. आचारसंहिता सुरू असल्याने आणि जमावबंदीचा आदेश लागू असल्याने दोनच्या सुमारास पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आंदोलकांना ताब्यात घेतले. सकलच्या कार्यकर्त्यांनी थेट स्वाभिमानीच्या स्टाईलने आंदोलन केल्याने कृषी मंत्र्‍यांच्या दारातील आंदोलनाची चांगलीच चर्चा सुरू आहे.

खोत शेतकऱ्यांचे नेते राहिले नाहीत

आंदोलनानंतर बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी. जी. पाटील म्हणाले, ‘राज्यमंत्री सदाभाऊ खोत आता शेतकऱ्यांचे नेते राहीले नाहीत. शेतकऱ्यांची पोरं त्यांच्या दारात आंदोलन करण्यासाठी गेल्यावर त्यांच स्वागत राहू दे. किमान त्यांना सामोरे जाऊन निवेदन तरी स्वीकारायला हवे होते. त्या उलट आंदोलकांना कचऱ्याच्या ढिगावर बसवून पोलिसांकडून आंदोलन चिरडून टाकले. तरुण शेतकरी पोरांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे पातक त्यांनी केले. गेल्या तीन वर्षांत एफआरपीमध्ये फक्त ०.४५७ टक्के इतकी नगण्य वाढ झाली. सत्तेत गेल्यावर यांना हे कळायचे बंद झाले का? खोत स्वतः आंदोलन करताना सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज असतो, असे म्हणायचे म्हणजे आता यांनाही सत्तेचा माज चढला आहे काय?, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. आम्ही आमच्या ३५०० रुपयांच्या मागणीसाठी आमच्या पद्धतीने आंदोलन करीत राहू, असेही पाटील म्हणाले.

....
जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश असताना त्या आदेशाचे पालन केले नाही. म्हणून १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करणार असल्याचे पत्र दिल्यावर पोलिसांनीही त्यांना नोटीसा बजावल्या होत्या. तरीही त्यांनी जमावबंदीचा भंग करून आंदोलन केल्याने कारवाई करण्यात आली.

प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक, इस्लामपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाहू’ गळीत हंगामास प्रारंभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

‘एफआरपी एकरकमी द्यायला आणि ७०:३० च्या फॉर्म्युल्यानुसार दर देण्यास बांधील असल्याचे बैठकीपूर्वी सांगणारा शाहू हा पहिला कारखाना आहे. आमच्या संस्कृतीत दराचे आकडे अगोदरच सांगण्याची प्रथा नाही.परंतु काटेकोर नियोजन पहाता एफआरपी व १७५ रुपये एकरकमी देवूनच शिवाय सगळ्यांच्या मनातला दरही देवू,’ असा विश्वास छत्रपती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला. मागील वर्षी शंभर टक्के ऊस पुरवठा केल्यावर टनाला ७५ रुपये जादा दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

शाहू साखर कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगामप्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत उपस्थित होते. काटा पूजन संचालक मारूती पाटील, पी.डी.चौगुले तर गव्हाण पूजा वीरकुमार पाटील या सर्वांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आल्या.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘एकीकडे उसाची कमी उपलब्धता, साखरेचे दर अशा अडचणी असतानाही शाहू कारखान्यासमोर ८० कोटींच्या विस्तारीकरणाचेही मोठे आव्हान आहे. दोन टप्प्यात होणाऱ्या या विस्तारीकरणात क्रशिंग पाच हजारावरुन सहा हजार ,स्टिमचा वापर २८ ते ३४ टक्क्यांपर्यत खाली आणणे आणि इथेनॉल प्रकल्प १५ डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करण्याचा मानस आहे. समूहातील व्यक्तींची कामे होवून समूहदेखील वाढला पाहीजे. तसेच यापुढेही ठिबक सिंचनलाच प्राधान्य राहील.’

‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे म्हणाले, ‘समरजित घाटगेंच्या पुढाकाराने प्रथमच पालकमंत्री ऊस दराच्या चर्चेत सहभागी झाले. त्यामुळेच दराची अडचण संपली आहे. ’

यावेळी कार्यकारी संचालक विजय औताडे, टी.ए.कांबळे, बॉबी माने, उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, भूपाल पाटील, रुक्मिणी पाटील,मारुती निगवे,राजेंद्र जाधव,शिवाजी गाडेकर यांमयासह सर्व संचालक,कार्यकर्ते,सभासद आणि कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

-----------------------------------------------------------

चौकट

‘शाहू’ ग्रुप शहीद जवानाला मदत करणार

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले पंजाबचे गुरुसेवक सिंग आणि कार्वे (ता.चंदगड) येथील राजेंद्र तुपारे यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. ‘केवळ शब्दरुपी पाठबळ देण्यापेक्षा सर्वच शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भरीव मदत करावी. यामध्ये माझी स्वत:ची मदत घालून शहीद तुपारे यांना देवू आणि शाहूंचा विचार कृतीतूनच जोपासू,’ असे आवाहनही घाटगे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद तुपारेंवर आज अंत्यसंस्कार

$
0
0

चंदगड

मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील राजेंद्र नारायण तुपारे (वय ३४) हे जवान पाकीस्तानशी लढताना रविवारी शहीद झाले. त्यांच्यावर मंगळवारी (ता.८) सकाळी अकरा वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली आहे. शहीद तुपारे यांच्या वीरमरणाबाबत त्यांचे कुटुंबिय मात्र अद्याप अनिभज्ञ आहेत. कुटुंबियांना ते चकमकीत जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. सोमवारी दिवसभर त्यांचे नातेवाईक व अन्य कोणालाही त्यांच्या घरी जाण्यास मज्जाव करण्यात आला.

जम्मू काश्मीर येथील पुंछ जिल्ह्यात लाईन ऑफ कंट्रोलनजीक कृष्णा घाटी सेक्टर येथे झालेल्या पाकिस्तानी हल्यात राजेंद्र तुपारे लढताना शहीद झाले. त्यांच्या वीरमरणाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली आहे. तालुक्यासह जिल्ह्यात निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पाकिस्तानच्या विरोधात लोकांच्यातून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

शहीद तुपारे यांचे पार्थिव पुंछ येथून जम्मूला, तेथून विमानाने दिल्ली येथे त्यानंतर विमानाने सांबरे येथील विमानतळावर आणण्यात आले. रविवारी सायंकाळी पार्थिव बेळगाव येथील मराठा लाईट इनफंट्रीमध्ये आणण्यात आले. मंगळवारी सकाळी नऊ वाजता पार्थिव लष्कराच्या वाहनातून कार्वे येथे आणण्यात येणार आहे. घरी धार्मिक विधी करुन गावातून अत्यंयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर कार्वे येथील महात्मा फुले विद्यालयाच्या पटांगणात मानवंदना देण्यात येणार आहे. यासाठी विद्यालयाच्या समोर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांनी चौथरा उभा केला आहे. याची तयारी सोमवार सकाळपासूनच सुरु होती. ग्रामस्थांसह तालुक्यातील विविध स्तरातील मंडळीनींही येथे उपस्थित राहून या कार्याला हातभार लावला. दिवसभरात प्रांताधिकारी संगीता चौगुले, तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, पोलिस निरिक्षक महावीर सकळे, सभापती ज्योती पाटील, गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली व सूचना दिल्या. तुपारे यांचे पार्थिव सकाळी नऊ वाजता कार्वे येथे येणार असल्याने ग्रामस्थांनी रस्त्याची दुरुस्ती केली आहे. बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील खुल्या मैदानावर पार्कीगची व्यवस्था केली आहे. गावातील महिला व ग्रामस्थांनी साफसफाई करुन संपूर्ण गावात सडा-रांगोळी घातली आहे. गल्लीत दोन्ही बाजूंनी पताका लावून सजविण्यात आले आहे. सोमवारी सकाळपासूनच गावातील अबालवृध्द कामात व्यस्त आहेत. २२ मराठा इंन्फट्री बेळगावचे अधिकारी फारुक, सदाशिव इंगवले, अमृत पाटील, सुनिल शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. गावात ठिकठिकाणी ‘शहीद जवान अमर रहे’ चे डीजिटल फलकही लावण्यात आले आहेत.

शहीद तुपारे यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतर कोल्हापूर येथे त्यांनी आय. टी. आयचे शिक्षण घेतले. त्यानंतर गावातीलच महाविद्यालयात अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले. आय. टी. आयचे शिक्षण घेतल्यानंतर काही दिवस त्यांनी शिनोळी येथील ॲटलास कंपनीमध्ये काम केले. त्यांना सैन्यात दाखल होण्याची खूप इच्छा होती. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नही केले. बारावीनंतर ते आय. टी. आयच्या ट्रेडवर ते २००२ साली सैन्यात भरती झाले. तरीही त्यांनी शिक्षण पुढे सुरू ठेवले. सैन्यात सेवा बजावत असताना दुरशिक्षण विभागाअंतर्गत त्यांनी बी. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तुपारे यांचा मोठा मुलगा आदित्य हा सध्या तिसरीमध्ये तर वैभव हा बालवाडीमध्ये शिक्षण घेत आहे.

बातमीपासून घरचे अनभिज्ञ

राजेंद्र तुपारे यांना वीरमरण आले नसून ते केवळ जखमी झाले असल्याचे माहीती त्यांच्या कुटुंबियांना व पत्नीला दिलेली आहे. नातेवाईक, मित्रमंडळी व प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनीधी हे घराकडे जावू नयेत यासाठी मज्जाव केला जात आहे.

'‘राजेंद्र हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. दहावीपर्यंत त्यांच्यासोबत असताना अनेक गोष्टी आम्ही शेअर करत होते. सैन्यात भरती झाल्यानंतरही ते सुटीवर आल्यानंतर मित्रांच्यामध्ये असत. देशासाठी त्यांनी वीरमरण पत्करले याचा आम्हाला अभिमान आहे.'' - नितीन पवार, वर्गमित्र

'‘कार्वे गावातील चौदा जवान सैन्यात कार्यरत आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. आम्ही निवृत्त झालो असलो तरी पाकीस्तानकडून होणारे हल्ले पाहता आमचेही रक्त अजूनही खवळत आहे. गरज पडल्यास आम्हीही सीमेवर लढण्यात तयार आहे. तुपारे हे शहीद झाले ही गर्वाची गोष्ट आहे. मात्र कुटुंबियांचा आधार गेल्याने मोठे दु:ख झाले आहे. दोन मुले पोरकी झाली आहेत.'' - उत्तम हारकारे, निवृत्त सैनिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शोले’ तील बच्चनचा टॉस माझ्याकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

‘शोले’ सिनेमातील अमिताभ बच्चनचा टॉसचा रूपया माझ्याकडे दिला आहे. तो टॉस कधीही उडवला तरी कोणत्याही वेळी छापाच पडतो. म्हणूनच जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक म्हणेल तसे घडते आणि प्रत्येकाचा हिशोब चुकता होतो. अनेकांचे पैरे फेडलेत. आता कागलमधून संजय घाटगेंना साथ देणार आहे आणि तिथलाही हिशोब चुकता करणार आहे. दिलेला शब्द महाडिक बदलत नाही. म्हणूनच आजरा कारखान्यालाही सर्वस्तरीय ताकद पुरवू. अशोकराव, फक्त सत्तेबरोबर रहा,’ अशी टोलबाजी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी करत आगामी कागल विधानसभेच्या रणांगणातील आपली भूमिकाही स्पष्ट केली.

आजरा साखर कारखान्याच्या २० व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे प्रमुख उपस्थित होते. आमदार सुरेश हाळवणकर अध्यक्षस्थानी होते. महादेवराव महाडिक म्हणाले, ‘यावर्षीचा गळीत संपूर्ण राज्यासाठीच अडचणींचा आहे. कोल्हापूर व विशेषत: आजरा-चंदगडचा पट्टा वगळता अन्यत्र ऊसाचे उत्पादन खूप कमी आहे. अशा स्थितीत नियोजनबध्द तोडणी करून हा गाळप हंगाम पूर्ण केल्यास कर्जमुक्त होण्याची आजरा कारखान्यास संधी आहे. मतभेद विसरून कामाला लागा. लागेल ती रसद पुरवू.’

आमदार हाळवणकर म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिकांसारख्यांचे नेतृत्वच येथील दूध व साखर कारखानदारीस पूरक ठरले. म्हणून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्नही वाढले. साखर कारखानदारीसाठी नियोजन करून साखर, इथेनॉल, डिस्टीलरी व सहविद्युतसाठी २५ टक्केप्रमाणे लक्ष दिले पाहिजे. ‘आजरा’चा डिस्टीलरी प्रोजेक्ट दिल्ली दरबारी आहे. राज्यात येताच त्याची तत्काळ पूर्तता करू. याशिवाय येथील गाळप क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव तातडीने द्या. पंधरा दिवसात मंजूरी देऊ. ऊस उत्पादन वाढीसाठी येथील सिंचन प्रकल्पही तातडीने पूर्ण करू.’

आमदार आबिटकर यांचेही यावेळी भाषण झाले. उपाध्यक्षा सुनीता रेडेकर यांनी स्वागत केले. अध्यक्ष अशोक चराटी यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक पी. एल. हरेर यांनी आभार मानले. ‘गोकुळ’चे रविंद्र आपटे, स्वाभिमानी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यान्नावर, श्रीपतराव देसाई, सरपंच संजीवनी सावंत आदींसह संचालक व सभासद उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मलकापुरात शिवसेना राष्ट्रवादी आघाडीचा प्रचार प्रारंभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

मलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी समविचारींना बरोबर घेत एकत्र आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने सोमवारी सकाळी विठ्ठल मंदिरा समोर प्रचाराचा प्रारंभ केला. यावेळी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, आघाडीचे नेते आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर, ‘शेकाप’चे भाई भारत पाटील, माजी नगराध्यक्ष राजू भोपळे, माजी जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, पं. स. माजी उपसभापती नामदेवराव पाटील सावेकर यांच्यासह आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

तर भाजप-जनसुराज्य आघाडीने उमेदवारी डावलल्याने नाराज झालेले ‘जनसुराज्य’चे कार्यकर्ते माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने यांनी आपली अपक्ष उमेदवारी पाठीमागे घेत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला पाठींबा व्यक्त केल्याबद्दल आघाडीच्या नेत्यांनी त्यांचा सत्कार केला. प्रचार प्रारंभाच्या निमित्ताने या आघाडीने कोणतीही घोषणा अथवा भाषणबाजी करण्याचे कटाक्षाने टाळत उपस्थितांसमोर आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची ओळख परेड घेतली.

आघाडीचे प्रभागनिहाय अधिकृत उमेदवार असे :-प्रभाग क्र. १ अ :- कु. प्रियांका राजू भोपळे , ब :- संजय बळवंत मोरे, प्रभाग क्र. २ अ :- शौकत महम्मद कळेकर , ब :- पद्मजा दिलीप गुरव, प्रभाग क्र. ३ अ :- नंदकुमार नागवेकर , ब :- नीता सु. पवार, प्रभाग क्र. ४ अ :- माया पाटील ब :- अमर खटावकर, प्रभाग क्र. ५ अ :- शुभांगी कोकरे-देसाई ब :- बाबासो तातोबा पाटील (विद्यमान नगराध्यक्ष), प्रभाग क्र. ६ अ :- प्रल्हाद ब :- संगीता सुधाकर पाटील, प्रभाग क्र. ७ अ :- बाबूराव चांदणे ब :- प्रिया विजय कुंभार, प्रभाग क्र. ८ अ :- शालन वि. सोनावळे ब :- संगीता विष्णू कुंभार, प्रभाग क्र. ८ क :- सुहास सुरेश पाटील.

नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून ओळख परेडच्या अखेरीस आघाडीने अपेक्षेप्रमाणे प्रकाश तातोबा पाटील यांच्या नावाची घोषणा केली. सर्वच उमेदवारांनी उपस्थितांना अभिवादन केले. यानंतर लगेचच आघाडीचे सर्व उमेदवार आपआपल्या प्रभागातील मतदारांच्या गाटीभेटीसाठी प्रचारात सक्रीय झाले.

......

चौकट

आघाडीत एकाच घरातील तिघांना स्थान

यावेळी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करताना मलकापूर पालिकेत दीर्घकाळ पदाधिकारी किंवा सत्तेत राहिलेले राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील यांना या आघाडीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार पसंती देतानाच त्यांचे बंधू विद्यमान नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील व सुहास सुरेश पाटील या दोघांना अनुक्रमे प्रभाग क्र. ५’ब’ व ८’क’ मधून नगरसेवकपदाची उमेदवारी दिली आहे.

...

अपक्षांची मनधरणी

दरम्यान, निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी कायम ठेवणाऱ्या उमेदवारांची दोन्हीकडून मनधरणी सुरु असून उमेदवारी मागे घेण्यासाठी यातील काही उमेदवार ‘स्वीकृत’ साठीचा शब्द घेण्याबरोबरच अन्यही मागण्या पुढे करत आहेत. माघारीला अद्याप चार दिवसांचा अवधी असल्याने अपक्ष व बंडखोरांचे रुसवे-फुगवे दूर करताना दोन्ही आघाडी प्रमुखांसह नेत्यांची तारांबळ उडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी पाच मुले उपचारासाठी दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शित्तूर पैकी मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील आधार आश्रमशाळेतील आणखी पाच मुलांना सोमवारी (ता. ७) उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर भाजून जखमी झालेल्या मुलीलाही खासगी रुग्णालयातून सीपीआरमध्ये हलवले आहे. गेल्या तीन दिवसात आधार आश्रमशाळेतील १३ मुले उपचारासाठी दाखल करण्यात आली आहेत. यातील दोघांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. दरम्यान, सोमवारी (ता. ७) सीपीआरच्या वैद्यकीय पथकासह जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही आधार आश्रमशाळेची पाहणी केली असून, संस्थेची मान्यता रद्द करण्यासह फौजदारीही दाखल होणार आहे.

शित्तूर येथील आधार आश्रमशाळेतील मतिमंद मुलाचा कुपोषणाने मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे. प्रशासनासह लोकप्रतिनधींनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, सलग दुसऱ्या दिवशी प्रशासनाने आश्रमशाळेची झाडाझडती घेतली. सीपीआरमधील वैद्यकीय पथकासह जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी दिवसभर आधार आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीत बहुतांश मतिमंद मुलांना रक्तक्षय असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय मुलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यल्प आहे. ज्या मुलांना तातडीने उपचाराची गरज आहे, अशा पाच मुलांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मोनिश भीमाप्पा (वय १६), गगनदीप राजकुमार (१२), राजनंदिनी केवत (१२), छोटी गीता (१२) आणि मंगल (१४) या पाच जणांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, आठवड्यापूर्वी फटाक्यांमुळे भाजलेल्या फातिमा या मुलीस खासगी रुग्णालयातून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शनिवारी दाखल केलेले खुशी आणि कार्तिक या दोघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

सोमवारी दिवसभरात जिल्हा आरोग्य अधिकारी, शाहूवाडी तालुका अधिकारी बी. के. सरूडकर, सीपीआरमधील बालरोग तज्ज्ञ आणि जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने शित्तूर येथील आधार आश्रमशाळेची तपासणी केली. या तपासणीत अनेक अनियमित बाबी निदर्शनास आल्या आहेत. या पाहणीचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार आणि जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे पाठवला जाणार आहे. यानंतर आधार आश्रम शाळेवर कारवाई होईल. या घटनेमुळे जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील भयावह वास्तव समोर आले असून, दर तीन महिन्यांनी होणाऱ्या शासकीय तपासणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

...

चौकट

आश्रमशाळेत अधिकाऱ्यांचा ठिय्या

सोमवारी दिवसभर आश्रमशाळेत अधिकारी ठिय्या मारून होते. संस्थापक पंचरत्न पांडुरंग राजपाल यांच्याकडून आश्रमशाळेची माहिती घेऊन धर्मादाय आयुक्तालयाकडून घेतलेल्या संस्थेच्या परवानग्याही तपासण्यात आल्या. याशिवाय संस्थेला मिळालेल्या देणग्या आणि प्रत्यक्षात आश्रमशाळेतील मतिमंद मुलांवर होणाऱ्या खर्चाचा तपशीलही अधिकाऱ्यांनी तपासला. मुलांना अतिशय कमी प्रमाणात आणि निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.

....

चौकट

संस्थेची मान्यता रद्द करा

आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी सीपीआरमध्ये जाऊन उपचारासाठी दाखल केलेल्या मतिमंद मुलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मतिमंद बालकांची हेळसांड करणाऱ्या संबंधित संस्थेवर फौजदारी दाखल करून ही संस्था कायमस्वरुपी बंद व्हावी यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे, अशी माहिती आमदार क्षीरसागर यानी दिली. उपचारासाठी दाखल केलेल्या सर्व मतिमंद मुलांच्या उपचारात कोणतीही हयगय होऊ नये, अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजेंद्र तुपारे पंचत्वात विलीन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात शहीद झालेले जवान राजेंद्र नारायण तुपारे यांच्यावर आज त्यांच्या कोल्हापुरातील मूळ गावी अत्यंत शोकाकुल वातावरणात, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तुपारे यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो गावकरी तुपारे मजरे कार्वे गावात दाखल झाले होते.

बेळगाव मिलिटरी हॉस्पिटलमधून राजेंद्र तुपारे यांचे पार्थिव आज सकाळी चंदगड तालुक्यातील मजरे कार्वे गावी आणण्यात आले. तिथे काहीवेळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेला मोठा शोकसागर उसळला होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुपारे यांच्या मोठा मुलाने पार्थिवाला अग्नी दिला.

जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी राजेंद्र तुपारे यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.



दरम्यान, पूंछ जिल्ह्यातील साब्जिया सेक्टरमध्ये रविवार ६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याशी लढताना राजेंद्र तुपार यांना वीरमरण आले होते. शहीद तुपारे मराठा लाइट इंन्फंट्री-२२चे जवान होते.

सैन्यात जायचे आधीच ठरवले होते

शहीद तुपारे यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतर कोल्हापूर येथे त्यांनी आय. टी. आयचे शिक्षण घेतले. त्यानंतर गावातीलच महाविद्यालयात अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले. आय. टी. आयचे शिक्षण घेतल्यानंतर काही दिवस त्यांनी शिनोळी येथील अॅटलास कंपनीमध्ये काम केले. त्यांना सैन्यात दाखल होण्याची खूप इच्छा होती. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नही केले. बारावीनंतर ते आय. टी. आयच्या ट्रेडवर ते २००२ साली सैन्यात भरती झाले. तरीही त्यांनी शिक्षण पुढे सुरू ठेवले. सैन्यात सेवा बजावत असताना दुरशिक्षण विभागाअंतर्गत त्यांनी बी. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तुपारे यांचा मोठा मुलगा आदित्य हा सध्या तिसरीमध्ये तर वैभव हा बालवाडीमध्ये शिक्षण घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप नगरसेवकावरसहा वर्षे निवडणूक बंदीबनावट जातीचा दाखल दिल्यामुळे जगदीश पाटील यांच्यावर कारवाई

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेतील भाजपचे अभ्यासू आणि ज्येष्ठ नगरसेवक जगदीश पाटील यांच्यावर २०१२च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत बनावट जातीचा दाखल दिल्याचे प्रकरण चांगलेच अंगलट आले आहे. पाटील यांचे नगरसेवक रद्द करण्याबरोबरच त्याच्यावर पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी मंगळवारी या संदर्भातील आदेश काढला. या आदेशामुळे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

नगरसेवक जगदीश पाटील यांनी २०१२च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४मधून ओबीसी गटातून तेली समाजाचा दाखल घेऊन निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अनिल गवळी यांचा पराभव केला होता. मात्र. छाननीवेळी गवळी यांनी हरकत घेऊन पाटील यांनी निवडणूक लढविताना कागदपत्रांसोबत जोडलेला दाखल बनावट असल्याची तक्रार केली होती. गवळी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानुसार जात प्रमाणपत्राची तपासणी होऊन पाटील यांचा जातीचा दाखलाही रद्द करण्यात आला होता. त्याला अनुसरून तत्कालीन मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी २ डिसेंबर २०१४ रोजी पाटील यांचे नागरसेवकपद रद्द केले होते. पाटील यांनी गुडेवार यांनी केलेल्या कारवाईबाबत पुन्हा हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने गुडेवार यांचाच निर्णय कायम ठेवला होता. जगदीश पाटील यांनी मुदत मागून कोर्टात केलेला अर्जही फेटाळून लावल्यानंतर आयुक्त काळम-पाटील यांनी अखेर पाटील यांच्यावरील आदेश काढला.

मुंबई हायकोर्टाचे न्या. रणजित मोरे आणि अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने पाटील यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा आदेश दिला होता. उशिराने का होईना आपल्याला न्यायदेवतेने न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्ते अनिल गवळी यांनी दिली. जगदीश पाटील यांनी नगरसेवक म्हणून आतापर्यंत घेतलेले मानधनही महापालिकेचे नगरसचिव वसूल करणार आहेत. जगदीश पाटील यांच्यावर १ डिसेंबर २०२०पर्यंत निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठ्यांचा बेमुदत काम बंदचा इशाराकराड तालुका तलाठी संघाचे धरणे आंदोलन

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी व सरकारच्या धोरणामुळे जनता, शेतकरी व तलाठी वर्गामध्ये निर्माण होणारे संघर्षाचे वातावरण टाळ्यासाठी, संगणकीकरणाच्या कामाला गती मिळावी यासाठी सहकार्याची मागणी करूनही सरकारकडून अपेक्षीत प्रतिसाद मिळत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य तलाठी पटवारी मंडलाधिकारी महासंघाच्या सूचनेनुसार कराड तालुका संघटनेने सोमवारी येथील कराड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

सरकारने संघटनेच्या मागण्यांचा तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा येत्या १६ नोव्हेबरपासून तलाठी, मंडलाधिकारी व तलाठी संवर्गातील अव्वल कारकून कामबंद आंदोलन करण्यात असल्याचा इशारा तलाठी संघाचे राज्य अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांनी दिला.

दरम्यान, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी या आंदोलनास भेट देऊन या मागण्यांबाबत नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, राज्यातील तलाठी व मंडलाधिकारी सामूहिक रजेवर जाणार आहेत. १० नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रत्येक तालुक्यात तलाठी व मंडलाधिकारी धरणे आंदालेन करणार आहे. त्या कालावधीत सरकारी यंत्रणेला जाग न आल्यास १६ नोव्हेबरपासून सामुदायिक रजा आंदोलन पुकारणार असल्याचा इशाराही डुबल यांनी दिला आहे.

कराड तहसील कार्यालयासमोरील तलाठी संघटनेच्या धरणे आंदोलनात संघटनेचे राज्याध्यक्ष ज्ञानदेव डुबल, चंद्रकांत पारवे, महेश पाटील, नागेश निकम, पद्मभूषण जाधव आदींसह संघटनेचे पदाधिकारी, तलाठी, मंडलाधिकारी व तलाठी संवर्गातील अव्वल कारकून सहभागी झाले होते.

या आहेत मागण्या

१४ वर्षांत तलाठ्याना तातडीने लॅपटॉप पुरवावेत

तलाठी सजांची पुनर्रचना करून संख्या वाढवावी

मंडलाधिकाऱ्यांना प्रत्येक मंडलात कार्यालये बांधून द्यावीत

तलाठी, मंडलाधिकाऱ्यांना प्रशिक्षण व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या मंडलाधिकाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी देण्यात यावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरे अभियांत्रिकी, केआयटीला नॅकचे ‘अ’ मानांकन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च आणि तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयास यूजीसीच्या नॅशनल अॅसेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिलकडून (नॅक) ‘अ’ मानांकन प्राप्त झाले आहे. केआयटीच्या अभियांत्रिकीपाठोपाठ व्यवस्थापन व संशोधन संस्थेच्या गौरवाने शिक्षण क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.

केआयटीच्या मॅनेजमेंट आणि रिसर्च सेंटरच्या मूल्यांकनासाठी सप्टेंबरमध्ये नॅक समितीने भेट देऊन परीक्षण केले होते. कॉलेजची प्रशस्त इमारत, अत्याधुनिक क्लासरूम, कम्प्युटर लॅब, सेमिनार हॉल, सुसज्ज ग्रंथालय, आदी सुविधांमुळे संस्थेला नॅक ‘अ’ मानांकन मिळाले आहे. सेवा, उद्योग आणि संगणक क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना कॉलेजच्यावतीने दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. संस्थेच्या यशात चेअरमन सचिन मेनन, व्हाइस चेअरमन भरत पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, आयएमइआरचे संचालक डॉ. एस. एम. खाडीलकर, नॅक समन्वयक प्रा. एम. यू. मकानदार, आदींनी विशेष परीश्रम घेतले.

तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅक ‘अ’ मानांकन मिळण्यासाठी जानेवारी २०१६ मध्ये प्रस्ताव सादर केला होता. समिती अध्यक्षा प्रा. ब्रजबंधू प्रधान, प्रा. डॉ. राज कमल, डॉ. व्ही. व्यंकटकृष्णा या मूल्यांकन समितीने सहा सप्टेंबरला महाविद्यालयास भेट दिली होती. समितीने कॉलेजचे व्यवस्थापनाचा सकारात्मक सहभाग, पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, आयटी सुविधा, प्लेसमेंट, प्राध्यापकांचे शैक्षणिक नैपुण्य आणि संस्थेने राबवलेल्या समाजोपयोगी कामाचा आढावा घेऊन नॅक ‘अ’ मानांकन दिले आहे. संस्थेला २००४ व २०११ मध्ये राष्ट्रीय मानांकन संस्थेकडून दोनवेळा मानांकन प्राप्त झाले असून विद्यापीठात उच्चांकी गुणांकासह ‘ए’ ग्रेड मिळवून गुणवत्ता सिद्ध केली आहे. नॅक मूल्यांकनासाठी संस्थेचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, डॉ. एस. एस. जोशी, नॅक समन्वय प्रा. बी. व्ही. बिराजदार, प्रा. व्ही. आर. गंभिरे, डी. एस. ठोंबरे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार विनय कोरे व सचिव जी. डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीप्रकरणी दोन महिलांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूपुरी येथे सोमवारी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा शाहूपुरी पोलिसांनी २४ तासांत लावून दोन महिलांना अटक केली. या महिलांकडून पोलिसांनी ८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. लता बापू पाटोळे (वय ४०) आणि बायडी सागर रसाळ (वय ३०, दोघीही रा. राजेंद्रनगर) यांना अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शाहूपुरीतील चौथ्या गल्लीमध्ये राहणारे प्रमोद दिगंबर जमदग्नी (वय ५१, रा. जीवन झोका बंगला, शाहूपुरी ४ थी गल्ली) हे परिवारासह चार दिवसांपूर्वी पुणे येथील नातेवाईकांकडे समारंभासाठी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी जमदग्नी यांच्या बंगल्याचा कडी कोयंडा उचकटून ३० तोळे लंपास केले होते. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली होती.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, महिलांनी चोरी केल्याचा संशय बळावला. यानुसार पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी गुन्हे शोध पथकास सूचना दिल्या. गुन्हे शोध पथकाचे समीर मुल्ला यांना गोपनीय बातमीदाराकडून लता पाटोळे आणि बायडी रसाळ यांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यांनी राजेंद्रनगर परिसरात सापळा रचून या दोघींना अटक केली. पोलिसांनी या दोघींकडून चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाइपलाइनची दुरुस्तीचा सावळा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कामकाजाचा सावळागोंधळ सोमवारी पुन्हा एकदा उघडकीस आला. नव्या पाइपलाइनची दुरुस्ती करण्याऐवजी गेली पाच वर्षे बंद असलेल्या जुन्या पाइपलाइन दुरुस्तीचे काम विभागाने केले. विभागातील अधिकाऱ्यांच्या पाइपलाइनविषयक अज्ञानामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी पुरवठा विभागाने मंगळवारी नव्या पाइपलाइनची दुरुस्ती हाती घेतल्यामुळे बुधवारी दिवसभर शहरातील विविध भागांना पाणी पुरवठा होणार नाही. गुरुवारी अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

सोमवारपासून अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने बुधवारी पाणी टंचाईची तीव्रता वाढणार आहे. राजारामपुरी सायबर चौक येथील शिंगणापूर योजनेवरील पाइपलाइनला क्रॉस कनेक्शन करणे व पाइपलाइन गळती काढण्याचे काम सोमवारी हाती घेतले. पुईखडी येथील स्लुईश व्हॉल्व दुरुस्तीचे काम पूर्ण केले. पण नवीन पाइपलाइनऐवजी जुनी पाइपलाइन दुरुस्त केल्याची चूक मंगळवारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. विभागाने त्यावर सारवासारव तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने बुधवारी विविध भागात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे म्हटले आहे.

या भागात पाणी पुरवठा बंद राहणार

बुधवारी राजारामपुरी, बागल चौक, उद्यमनगर, शास्त्रीनगर, सागरमाळ, राजेंद्रनगर वैभव सोसायटी, दौलत नगर, शाहूनगर, माळी कॉलनी, टाकाळा, वड्डवाडी, सम्राटनगर, इंगळेनगर, काटकर माळ, जाधववाडी, कदमवाडी, मुक्त सैनिक वसाहत, रुईकर कॉलनी, मार्केट यार्ड, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, शाहूपुरी परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. या भागासाठी महापालिकेच्या आठ टँकरद्वारे पाणी वाटपाचे नियोजन असल्याचे प्रभारी जल अभियंता एस. के. कुलकर्णी यांनी सांगितले.

दिवसभरात ५० फेऱ्या

जवाहरनगर, सुभाषनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, शाहू मिल चौक, यादवनगर, राजारामपुरी, कदमवाडी, राजेंद्रनगर या भागाला मंगळवारी पाणी पुरवठा झाला नाही. कळंबा​ फिल्टर हाऊस व कसबा बावडा फिल्टर हाऊस येथून पाणी पुरवठा विभागाच्या टँकरमधून संबंधित भागांना पाणी पुरवठा करण्यात आला. मंगळवारी टँकरच्या ५० हून अधिक फेऱ्या झाल्या. बावडा फिल्टर हाऊसमधून ३०, कळंबा फिल्टर हाऊस येथून २० टँकर पाणी वाटप झाले.

अधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना त्रास

शिंगणापूर योजनेंतर्गत सायबर चौक ते कळंबा अशी जुनी पाइपलाइन आहे. पाच वर्षापासून ही पाइपलाइन वापरात नाही. याच मार्गावर नवीन पाइपलाइन टाकली आहे. या पाइपलाइनला गळती काढण्याऐवजी पाणी पुरवठा विभागाने जुनी पाइपलाइन दुरुस्त केले. त्याला क्रॉस कनेक्शन जोडले. पण वापरात नसल्यामुळे पाणी पुरवठा होऊ शकत नाही. अधिकाऱ्यांच्या अशा अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. बुधवारपर्यंत नव्या पाइपलाइनची दुरुस्ती झाली नाही तर सायबर चौकात अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक सुरेश ढोणुक्षे यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटका अड्ड्यांवर कॉलेज तरुण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरासह आसपासची उपनगरे आणि शहरालगत असलेल्या गावांमध्ये राजरोस सुरू असलेल्या मटका अड्ड्यांमुळे मटका संस्कृती फोफावत आहे. शहरातील मटका ‘सम्राट’ याला कारणीभूत असून, पोलिसांनाही मॅनेज करण्याची त्याची धमक असल्याने कारवाया होत नाहीत. खुलेआम सुरू असलेल्या मटका अड्ड्यांमुळे कॉलेज तरुणही मटक्याकडे वळल्याने बुकींना नवा ग्राहकवर्ग मिळाला आहे, तर करवीरसह गांधीनगर हे मटक्यासाठी हॉट स्पॉट ठरत आहेत.

शहरालगतच्या काही गावांसह समृद्ध गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटक्यासह गावठी दारू आणि तीनपानी जुगाराचा खेळ नित्याचाच ठरत आहे. गेल्या काही महिन्यात छुप्या पद्धतीने चालणारे अड्डे आता थेट वर्दळीच्या ठिकाणी सुरू आहेत. नवीन वाशी नाक्यावर उघडपणे मटक्याची खोकी सुरु आहेत. शिंगणापूर, नागदेववाडी, बालिंगा, बोंद्रेनगर यासह वडणगे, आंबेवाडी या गावांमध्येही मटका जोरात आहे. मुख्य रस्ते, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी ठाण माडून बसलेले मटकावाले नवा गाहकवर्ग तयार करीत आहे. विशेषतः महाविद्यालये, कारखाने, एमआयडीसी या परिसरात अड्डे सुरू करून सर्वसामान्यांच्या खिशाला सुरूंग लावण्याचा उद्योग सुरू आहे. महाविद्यालयीन तरुणांच्या समोरच अड्डे सुरू असल्याने कुतूहलातून अनेकजण मटक्याच्या नादी लागले आहेत. घरातून शिक्षणासाठी घेतलेले पैसे मटक्यावर खर्च होत आहेत. यानंतर मित्रांकडून हातउसने पैसे घेऊनही मटका लावण्यासाठी तरुणांची वर्दळ अड्ड्यांवर दिसते. यातून तरुण पिढी वाममार्गाला लागली असून, सामाजिक स्वास्थही धोक्यात येत आहे.

कोल्हापूर शहराला लागून असलेली गांधीनगर बाजारपेठ जितकी कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे, तितकीच ती मटक्यासाठीही प्रसिद्ध आहे. जिल्हाभर मटका बंद असला तरीही गांधीनगरात तो सुरूच असतो. इथली खासियत म्हणजे थेट घरातूनही मटका अड्डे चालवले जातात. महिलाही चिठ्ठ्या देण्यासाठी अड्ड्यांवर असतात. गांधीनगर बाजारपेठेतील रोजचा ताजा पैसा ‘कॅश’ करण्यासाठी अनेक मटका किंग आणि अवैध धंदेवाल्यांमध्ये चढाओढ असते. बंदी असलेला गुटखा विकण्यापासून ते अंमली पदार्थ, जुगार, मटका, बनावट मद्याची विक्री, बेटिंग असे अनेक अवैध धंदे गांधीनगरात सुरू आहेत. या परिसरातील अर्धीअधिक तरुण पिढी अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकली आहे.

कोल्हापूर शहरासह आसपासही मटका अड्ड्यांवर अधिराज्य गाजवणारा मटका सम्राट पोलिसांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरत आहे. दर महिन्याला लाखोंची वरकमाई देण्यासह काही ठराविक पोलिसांचे हात ओले करणारा मटका सम्राट पोलिसांच्या आश्रयानेच अवैध धंदे चालवत आहे. याच्या वरदहस्तामुळे मटका अड्ड्यांवर कारवाया होत नाहीत. कारवाई झालीच, तर ती केवळ कागदोपत्रीच असते. विशेष म्हणजे कारवाई करण्याआधीच संबंधिताला कारवाईची माहिती पोहोचते. कारवाईच्या टिप्स देण्यासाठीही काही पोलिस बुकींची धुलाई करतात. कारवाईचा प्रकार म्हणजे केवळ फार्सच ठरत असल्याने मटका संस्कृतीविषयी सर्वसामान्यांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. (समाप्त)

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रतिमा आहे. या धडाडीच्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातच खुलेआम मटका अड्डे सुरू आहेत. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनीही अवैध धंद्यांविरोधात सलग आठवडाभर मोहीम सुरू करून कारवाया केलेल्या नाहीत. त्यामुळे अवैध धंदे रोखण्याची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्व काही अलबेल असल्याचे वाटत आहे, की त्यांचे याकडे दुर्लक्ष आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. तावडेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने अटक केलेला दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्या न्यायालयीन कोठडीत १३ दिवसांची वाढ करण्यात आली. पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे. मंगळवारी (ता. ८) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी एसआयटीने समीर गायकवाड या संशयिताला अटक केल्यानंतर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे या दुसऱ्या संशयिताला अटक केली होती. डॉ. तावडे याला यापूर्वीच सीबीआयने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी अटक केली होती. एसआयटीने त्याला आपल्या ताब्यात घेऊन त्याच्याकडे कॉम्रेड पानसरे खुनासंदर्भात कसून चौकशी केली आहे. पनवेल येथील सनातन संस्थेचा आश्रम आणि तावडे याच्या घराचीही पोलिसांनी झडती घेऊन काही संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तावडे याच्या वकिलांकडून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र तपासाच्या कारणामुळे डॉ. तावडे याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होत आहे. मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर झालेल्या सुनावणीतही डॉ. तावडे याला पुन्हा १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवून देण्यात आली. पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. चंद्रकांत बुधले यांनी काम पाहिले. दरम्यान, डॉ. तावडे यांच्या वकिलांमार्फत दाखल केलेल्या अवमान याचिकेवर १६ नोव्हेंबरच्या सुनावणीत निकाल होण्याची शक्यता आहे, तर संशयित समीर गायकवाड याच्यावरील आरोपनिश्चितीबाबत १५ नोव्हेंबरला जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्रमशाळा संस्थापक अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शित्तूर तर्फ मलकापूर येथील आधार आश्रमशाळेतील मतिमंद मुलांच्या आरोग्याची हेळसांड करून तीन मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला संस्थापक अध्यक्ष पंचरत्न पांडुरंग राजपाल (वय ४५, रा. शित्तूर तर्फ मलकापूर, ता. शाहूवाडी) याला शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी (ता. ८) संध्याकाळी अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, संस्थेचे इतर पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांवरही लवकरच कारवाई होणार आहे. दरम्यान, आश्रमशाळेतील उर्वरित २१ मुलांना उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सरकारी परवानगीची मुदत संपलेल्या आधार आश्रमशाळेतील मतिमंद मुलांच्या मृत्यूची जिल्हा प्रशासनासह पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. संस्थेच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर समाज कल्याण अधिकारी प्रदीप मुरलीधर भोगले यांनी मंगळवारी संध्याकाळी शाहूपुरी पोलिस ठाण्यात प्रेरणा मागासवर्गीय शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पंचरत्न राजपाल याच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पंचरत्न राजपाल याने अटक टाळण्यासाठी शित्तूर येथून पळ काढला. एका कारमधून तो कोल्हापूरच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच शाहूवाडी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याला कळवून अटकेची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह लक्ष्मीपुरी पोलिसांनी राजपाल याला ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी त्याला शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांच्याकडे सोपवले.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आश्रमशाळेतील उर्वरित सर्व २१ विद्यार्थ्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. यातील बहुतांश मुले कुपोषित आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसाठी तातडीने पोषक आहारासह औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. सीपीआरचे डीन जयप्रकाश रामानंद यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक वसंत पाटील, बालरोगतज्ज्ञ विश्वजित पाटील आदींनी मुलांची वैद्यकीय तपासणी केली. आश्रमशाळेतील सर्व मुलांच्या वैद्यकीय तपासणीचा आहवाल तयार झाला असून, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील हे बुधवारी हा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे सादर करणार आहेत.

तीन मुले दगावली

आधार आश्रमशाळेत गेल्या तीन महिन्यांत तीन मतिमंद मुले दगावली आहेत. जेबी (वय १५, बिल्ला नं. ७८) याचा मृत्यू ३ ऑगस्टला झाला. प्रेरणा (१९) या मुलीचा मृत्यू १९ ऑगस्टला झाला, तर गांधी (१५, बिल्ला नंबर १५०) या मुलाचा मृत्यू ५ नोव्हेंबरला झाला. या तिन्ही मुलांचा मृत्यू कुपोषण आणि निमोनियाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आठ दिवसात सर्व आश्रमशाळांची तपासणी

शित्तूर तर्फ मलकापूर येथील आश्रमशाळेचे भयावह वास्तव उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यानंतर जिल्ह्यातील अन्य मतिमंद, मूकबधिर, दिव्यांग शाळांमधील सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्ह्यात अनुदानित १५, तर विनाअनुदानित १६ मतिमंद मुलांच्या शाळा आहेत. येत्या आठ दिवसात या सर्व शाळांची काटेकोर तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले आहेत. या तपासणीतही आश्रमशाळांमधील विदारक स्थिती समोर येण्याची शक्यता आहे.

शित्तूर येथील आश्रमशाळेच्या संस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरूच राहील. याशिवाय संस्थेतील इतर पदाधिकाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. शाळेतील सर्व मुलांना योग्य उपचारानंतर इतर शाळांमध्ये हलवण्याचा विचार सुरू आहे. बुधवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होईल.

डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाला निधीची प्र‌तीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची जाहीर केले होते. विद्यापीठ प्रशासनाने तब्बल ३० ते ३५ वेळा पत्रव्यवहार करुन केवळ सव्वा तीन कोटी रुपयांना निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वर्धापनदिनापर्यंत यातील काही रकम मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील नीती आयोगाचे अधिकारी, अर्थ आणि शिक्षण खात्याची एकत्र‌ित बैठक घेणार असल्याचे विद्यापीठाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

१८ नोव्हेंबर, १९६२ रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. स्थापनेवेळी ३४ कॉलेज व विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १४०० होती. २७१ कॉलेज आणि दोन ते अडीच लाख विद्यार्थी संख्येमुळे सध्या विद्यापीठाचा मोठा विस्तार होत आहे. दक्षिण महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्यामध्ये विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. काळानुरुप बदल करत शिवाजी विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यापीठाचा प्रगतीचा आढावा आणि सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मंत्र्यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमादरम्यान माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी ५० निधी देण्याचे जाहीर केले होते. यानंतर विद्यापीठाने विविध विकासकामांचा आणि साहित्य खरेदीचा आराखडाही सादर केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अडीच कोटीचा निधीही प्राप्त झाला, मात्र त्यानंतर विद्यापीठ निधीसाठी सातत्याने पत्रव्यवहार करत आहे.

विद्यापीठात राबवण्यात येत असलेल्या रुसातंर्गत ‘ग्यान’ प्रकल्पाचे उद्‍घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये बीसीयूडी डॉ. डी. आर. मोरे यांनी सुवर्णमहोत्सवी निधीचा आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला होता. डॉ. मोरे यांच्या भाषणाचा संदर्भ घेत पालकमंत्री पाटील यांनी निधी देण्याची घोषणा केली होता. त्यानंतर पुन्हा विद्यापीठ प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू केला. पालकमंत्री यांनी भेटीदरम्यान एकाचवेळी निधी मिळणार नसल्याने टप्प्याटप्प्याने निधी देण्याचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार विद्यापीठाने तयारी करुन त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पालकमंत्री व्यस्त असल्याने पुन्हा ही प्रक्रिया रखडली आहे. पण निधीचा प्रश्न निकालात काढण्यसाठी निती आयोग, अर्थ व शिक्षण खात्याची एकत्रीत बैठक घेण्याचे नियोजन करत आहेत. यासाठी स्वत: बीसीयूडी डॉ. मोरे प्रयत्न करत आहेत.

म्युझियम कॉम्पलेक्स स्वनिधीतून

निधीची उपलब्धता वेळेत होत नसल्याने म्युझियम कॉम्पलेक्स, राजर्षी रिसर्च सेंटर, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट व अध्यासन केंद्र, स्कूल ऑफ नॅनो सायन्स केंद्राची कामे विद्यापीठ स्वनिधीतून करण्यास सुरुवात केली आहे.

सुवर्णमहोत्सवी निधी मिळण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. सरकारकडून येणारा निधी एकदम मिळणार नसला, तरी टप्प्याटप्प्याने निधी देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यासाठी पुढील आठवड्यात अर्थ, शिक्षण व नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांची एकत्रीत बैठक होणार आहे.

डॉ. डी. आर. मोरे, बीसीयूडी

असा मिळणार होता निधी

२०१२-१३ : पाच कोटी

२०१३-१४ : १८ कोटी ६३ लाख

२०१४-१५ : १८ कोटी ७० लाख


असा मिळाला निधी

२०१२-१३ : २ कोटी ४० लाख

२०१३-१४ : ३९ लाख ९९ हजार पैकी २१ लाख विद्यापीठ फंडात वर्ग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images