Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

साताऱ्यात २० प्रभागांतून २३८ उमेदवार रिंगणात

$
0
0



सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल असलेल्या उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी झाली. छाननीत दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून, उर्वरित २३८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर, नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, प्रभाग क्रमांक १५ अ मधील भाजपच्या उमेदवार आशा पंडित यांनी ‘साविआ’ व ‘नविआ’च्या दोन्ही उमेदवारांवर घेतलेल्या हरकती निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख यांनी फेटाळून लावल्या.
बुधवारी स्वाती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जांची छाननी झाली. या वेळी तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण उपस्थित होते. छाननीत प्रभाग क्रमांक २ ब मधील निर्मला पाटील आणि प्रभाग क्रमांक ३ अ मधील भारती सोळंकी यांचे अर्ज अवैध ठरले. सोळंकी यांचा एक अर्ज अवैध ठरविण्यात आला असला, तरी त्यांचा दुसरा अर्ज वैध ठरविण्यात आल्याने त्यांची उमेदवारी कायम आहे. आता नगरसेवक पदासाठी २३८ तर नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीर्थक्षेत्र आराखड्याची तांत्रिक तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील ७२ कोटींच्या विकासकामांना गती येऊ लागली आहे. फोर्ट्रेस कंपनीने तयार केलेला एकूण २५५ कोटी रुपयांचा हा सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुरीसाठी पुणे विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला. आता त्याची पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनच्या माध्यमातून तांत्रिक तपासणी सुरु आहे. आठ दिवसांत ही तपासणी पर्ण होईल. त्यानंतर तो विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजूरीसाठी सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर लगेच टेंडर प्रक्रिया होईल.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे तीर्थक्षेत्र म्हणून विकासासाठी २00८ साली राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. या तीर्थक्षेत्र प्रारूप आराखड्याचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश २0१५ साली नगरविकास विभागाने दिले होते. २0१३ साली तत्कालीन जिल्हा दरसूचीप्रमाणे १९0 कोटी रुपयांचा हा आराखडा २0१४-१५ साली २५५ कोटींवर पोहोचला. सुधारित आराखडा २५ ऑगस्ट २0१६ राजी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला.

सध्या पुण्यात शासकीय तंत्रनिकेतनच्या माध्यमातून या आराखड्याची तांत्रिक तपासणी करण्याचे काम सुरु आहे. तपासणीनंतर अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर होईल. आराखड्यातील पहिल्या टप्प्यात पुरातन वास्तू संवर्धन, दर्शन मंडप, भक्तनिवास, पार्किंग, डिझास्टर मॅनेजमेंट यांसारखे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. मूळ मंदिरामध्येही सिमेंट पॉयटिंग, वॉटरप्रुफिंग, दरवाजांचे सुशोभीकरण, मणकर्णिका कुंड तलाव बांधणी यांसारखी कामे केली जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यातील कामे

पहिला टप्प्यात मंदिर पुरातत्व वास्तू संवर्धनांतर्गत होणाऱ्या कामांमध्ये मूळ वास्तूचे संवर्धन, दरवाजे, नगारखाना, देवस्थान समिती कार्यालय, गरुड मंडप, दीप माळ, अंबाबाई मंदिरातील बागेचे सुशोभिकरण, कारंजा आणि स्वच्छतागृहासाठी ७ कोटींची तरतूद केली आहे. भवानी मंडप परिसराचे सुशोभिकरण ४ कोटी, जुना राजवाड्याच्या वापरात नसलेल्या जागेचे सुशोभिकरण करुन तेथे विशेष दालन उभारणीसाठी १.५ कोटी, आपत्कालीन व्यवस्थापनात फायर इंजिन, फायर हाउस व अन्य सुविधांसाठी १ कोटी, हेल्थ अँड केअर सेंटरसाठी ५० लाख आणि सुरक्षा यंत्रणेसाठी ५ कोटी, सरस्वती चित्रपटगृह, व्हीनस कॉर्नर, बिंदू चौक येथे पार्किंगच्या सुविधेसाठी ५० कोटी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ३.५ कोटी, युटीलिटी शिफ्टींग १० कोटी असा आराखडा करण्यात आला आहे.


तीर्थक्षेत्र आराखड्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडून शासकीय तंत्रनिकेतनकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. हे काम आठ दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर पुन्हा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर केला जाईल. त्यानंतर सरकारची मंजूरी मिळेल. त्यानंतर त्वरीत कामे सुरू होतील.

नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंती नाल्यातील सांडपाणी रोखणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जयंती नाल्यातील सांडपाणी नदीत मिसळू नये म्हणून नव्यानेच उभारण्यात आलेल्या फायबर गेटचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शनिवारी फायबर गेटचे काम पूर्ण होणार आहे. शहरातील १२ नाल्यांपैकी जयंती नाला सर्वांत मोठा आहे. या नाल्याचा उगम कळंबा तलावाच्या सांडव्यापासून होतो. या नाल्यातून सर्वांत जास्त सांडपाणी वाहत असल्याने ते पंचगंगा नदीत मिसळू नये म्हणून त्रिकोणी बाग व शहाजी कॉलेजच्या मागे सांडवा बांधण्यात आला आहे. या सांडव्याला पूर्वी पारंपरिक पद्धतीने दोन्ही बाजूला लाकडी फळ्या मारून त्यामध्ये माती भरली जात होती.

महापालिकेने शाम सोसायटी नाल्याजवळील सांडव्याला दोन वर्षापूर्वी फायबर गेट बसवले होते. फायबर गेटचा अनुभव चांगला लक्षात घेऊन जयंती नाल्यावरही फायबर गेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. जयंती नाल्यावरील आठ दरवाजावर फायबरचे दरवाजे बसवण्याचे काम सुरू आहे. फायबर दरवाजे टिकावू असून दरवाजे बसवताना व काढताना फक्त दोन ते तीन तासाचा अवधी लागतो. पारंपरिक बरगे घालताना दोन ते ​तीन दिवसाचा अवधी लागतो. फायबर शीट टिकाऊ असल्याने पाणी गळतीचे प्रमाणही कमी राहते. तसेच तटलेले सांडपाणी उपसा करून थेट कसबा बावडा येथील एसटीपी प्लँट येथे नेता येते.

जयंती नाल्यातील सांडपाणी नदीत मिसळू नये यासाठी फायबरचे दरवाजे बसवण्यात आले असले तरी काही वेळा सांडपाणी थेट सांडव्यावरून वाहू शकते. तुंबवलेले सांडपाणी एसटीपी प्लँटला नेण्यात येते. पण सांडपाण्याची क्षमता वाढल्याने जादा क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कार्यालय त्रिकोणी बागेजवळील शंकरराव सावंत सभागृहाच्या तळमजल्यावर नेण्यात आले आहे. सध्या पंपिंग स्टेशनसाठी लागणारी यंत्रणा, ट्रान्सफार्मर, जनरेटर रूम तयार करण्यासाठी उपसा पंपाजवळील मोकळ्या जागेत बांधकाम सुरू करण्यात आले. बांधकाम एक महिन्यात पूर्ण होणार असून दोन महिन्यात पाणी उपसा पंपाची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच पंपिंग स्टेशनमधील कामगारांचे साहित्य ठेवण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या इमारतीचा उपयोग करण्यात येणार आहे.

०००००

शाम सोसायटी नाल्याच्या धर्तीवर जयंती नाल्यावरही फायबर गेट बसवण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी किंवा शनिवारी सकाळपर्यंत काम पूर्ण होणार आहे. तसेच पंपिंग स्टेशनसाठी जनरेट रूम व ट्रान्सफार्मर बसवण्यासाठी इमारत उभारण्यात येत आहे.

सुरेश कुलकर्णी, उपजल अभियंता, ड्रेनेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाजप-ताराराणी’ची चमत्कारासाठी फिल्डिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडविण्यासाठी भाजप, ताराराणी आघाडीने फिल्डिंग लावली आहे. पक्षांतंर्गत कायद्यामुळे चमत्कार घडण्याची आशा फार कमी असल्याचा दावा सत्ताधारी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून केला जात आहे. मात्र जातीच्या दाखल्यांच्या निकालानंतर पक्षीय बलाबल बदलणार असल्याचा दावा विरोधी आघाडीकडून केला जात आहे.

महापौरपदाचा कार्यकाल अडीच वर्षाचा असला तरी सत्ताधारी काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने एक वर्षाचा फॉर्म्यूला अवलंबला आहे. त्यानुसार विद्यमान महापौर अश्विनी रामाणे १५ नोव्हेंबरपूर्वी राजीनामा देणार असल्याचे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पुढील आठवड्यात तहकूब सभेत महापौर राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे. राजीनाम्यानंतर आठ दिवसानंतर नव्या महापौरांची निवड होईल.

आता महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार असल्याने माधवी गवंडी, हसिना फरास व अनुराधा खेडकर यांची नावे चर्चेत आहेत. गेल्यावेळच्या सभागृहात माधवी यांचे पती प्रकाश गवंडी नगरसेवक होते. पण त्यांना कोणतेही पद मिळाले नव्हते. त्यामुळे आपला दावा प्रबळ असल्याचे गवंडी यांचे म्हणणे आहे. हसिना फरास यांचा मुलगा अदिल यांना स्थायी समिती सभापतीपद तर अनुराधा खेडकर यांचे पती सचिन यांना उपमहापौरपद मिळाले होते. स्थायी सभापतीपदावरून राजीनामा देताना फरास यांनी विलंब लावला होता. गवंडी व फरास यांचे समाधान करण्यासाठी महापौरपदाची प्रत्येकी सहा महिन्यांची विभागणी होईल अशी शक्यता आहे.

जातीच्या दाखल्यांचा अडसर

दरम्यान, जातीच्या दाखल्याप्रकरणी सहा नगरसेवकांचा निकाल महापौर निवडणुकीपूर्वी लागण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या वृषाली कदम यांचा दाखला वैध ठरला आहे. पण सहा नगरसेवकांच्या दाखल्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे चार तर भाजप ताराराणीचे दोन नगरसेवक आहेत. दाखल्याचे निर्णय विरोधात गेले तर महापौर निवडणुकीत मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. साम, दंड, भेद, निती वापरून महापौरपद भाजपाला मिळवण्यासाठी ‘कारभारी’ मंडळी सज्ज झाली आहेत.

भाजप-ताराराणीचे ‘गणित’

काँग्रेस व राष्ट्रवादीकडे ४४ नगरसेवकांचे बहुमत असले तरी भाजप-ताराराणी आघाडी पूर्ण ताकदीने महापौर पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गेल्यावर्षीच्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चमत्कार घडण्याचा दावा केला होता. पण काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी भक्कम राहिली. भाजपाचे १४ तर ताराराणी आघाडीचे १९ असे ३३ नगरसेवक आहेत. निवडणुकीत शिवसेनेचे चार नगरसेवक तटस्थ राहिले होते. पण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना व भाजप युती एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री पाटील यांच्याशी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जुळवून घेतले आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीत शिवसेना-भाजप ताराराणी आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या चार नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यास ३७ चा आकडा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऊसाला ३७०० रुपये दर द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वामिनाथन कमिटीच्या शिफारशींप्रमाणे चालू गळीत हंगामातील ऊसाला प्रतीटन ३७०० रुपये दर मिळावा, अन्यथा हिवाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढू, असा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेने दिला आहे. याबाबत गुरुवारी साखर सहसंचालक सचिन रावळ यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, उत्पादकांना परवडेल असा ऊस दराचा तोडगा निघालेला नाही. एफआरपीप्रमाणे दर जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूकच करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना लुटण्यासाठीच एफआरपीचा बेस ९ वरुन साडेनऊ केला आहे. कारखानदार रंगराजन समितीची शिफारसही पायदळी तुडवत आहेत. नियमांपेक्षा अधिक खर्च दाखवला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीतील प्रचारात स्वामिनाथन ‌समितीच्या शिफारसीनुसार कृषीमालाला भाव दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ‌किसान सभेने सुरुवातीपासून स्वामिनाथन स‌मितीच्या शिफारसी लागू करण्याचा मागणी केली आहे. मराठा मोर्चातही ही मागणी पुढे आली आहे. त्यामुळे सरकारने या समितीच्या शिफारसीनुसार उत्पादन खर्च अधिक ५० टक्के म्हणजे उसाला प्रतीटन ३ हजार ७०० रूपये दर मिळणे आवश्यक आहे.

निवेदन देताना किसान सभेचे सरचिटणीस नामदेव गावडे, संजय पाटील, महादेव आवटे, सतीशचंद्र कांबळे, नामदेव पाटील, स्नेहल कांबळे, शुभांगी पाटील, सम्राट मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली जिल्ह्यात ४५६ अर्ज अवैध

$
0
0


सांगली : जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी झाली. त्यात ४५६ जणांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात ९१८ उमेदवार आहेत. नगराध्यक्षपदाचेही ३० अर्ज बाद झाले. आता ४९ जण लढतीत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर खरे चित्र स्पष्ट होईल.
जिल्ह्यातील इस्लामपूर, आष्टा, विटा, तासगाव, या नगरपालिका आणि पलूस, कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ या नवस्थापित नगरपंचायती यांची निवडणूक होत आहे. शिराळा येथे नागपंचमी सणासंदर्भात मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.
सर्वाधिक अपात्र अर्ज विटा येथे १०५ व तासगावला १०७ असे ठरले. निवडणूक रिंगणात सर्वाधिक उमेदवार कवठेमहांकाळला १६७, आष्टा-१४२, इस्लामपूर-१२४ असे राहिले आहेत. अर्ज माघारीची मुदत शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी आहे. चिन्ह वाटप शनिवार १२ नोव्हेंबरला होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चायनिज फटाक्यामुळे फुटला डोळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चायनिज फटाक्यांमधील पिस्तुलातून उडवलेले रॉकेट डोळ्यावर लागल्याने रितेश राहुल शेटे (वय ११, रा. हरिपूजापूरम, एचआर २, फ्लॅट नं. ६०६) या मुलाचा उजवा डोळा फुटला. रविवारी (ता. ३०) संध्याकाळी ही घटना घडली. फटाक्यापासून इजा झाल्याने रितेशच्या डोळ्यासमोर अंधार दाटला होता. डोळ्यावर ऑपरेशन झाले असून, आता महिन्याभराच्या उपचारानंतरच रितेशच्या डोळ्याचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. या घटनेने चायनिज फटाक्यांपसून होणारा धोका अधोरेखित झाला आहे.

रितेश ताराबाई पार्कातील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये सहावीत शिकतो. वडील राहुल शेटे व्हिडिओकॉन कंपनीत मॅनेजर आहेत, तर आई कविता गृहिणी आहे. लक्ष्मीपूजनादिवशी संध्याकाळी रितेश मित्रांसोबत खेळत होता. यावेळी शुभ प्रशांत मेहता (वय १०) हा चायनिज पिस्तुलाने मिसाइल (फटाके) उडवत होता. रितेशच्या दिशेने पिस्तूल रोखून शुभने मिसाईल उडवले. ते थेट रितेशच्या उजव्या डोळ्यावर फुटले. मोठा जाळ आणि आवाज झाल्याने रितेशला समोरचे काहीच दिसेनासे झाले. प्रचंड वेदना सुरू झाल्या, पाणी गळू लागल्याने आईला हा प्रकार सांगितला. जखम पाहून हबकलेले आईवडिल उपचारासाठी रितेशला घेऊन बाहेर पडले. पण, त्या दिवशी एकही रुग्णालय सुरू नव्हते. सोमवारी डॉ. चंद्रशेखर खानवेलकर यांच्या शाहूपुरीतील संजिवनी हॉस्पिटलमध्ये रितेशला अॅडमिट केले. फटाक्याने बुबुळाच्या आतील पडद्याला (रेटिना) इजा पोहोचल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन करणे भाग असल्याचे सांगितले. मंगळवारी ऑपरेशन झाले. महिन्याभराच्या उपचारानंतर ऑपरेशनचा निर्णय घेतला जाणार असल्याचे डॉक्टरांनी रितेशच्या आई-वडिलांना सांगितले.

दिवाळीच्या सुट्टीत मित्र-मेत्रिणींसोबत खेळण्याऐ‍जी रितेशला डोळ्यावर पट्टी बांधून घरात बसावे लागत आहे. ऑपरेशनमुळे दोन्ही डोळ्यातून सतत पाण्याच्या धारा सुरू आहेत. ऑपरेशनसाठी ४० हजार रुपये खर्च झाले. अजूनही उपचार सुरूच राहणार आहेत. शिवाय रितेशचा अभ्यासही थांबला. या घटनेनंतर ऐन दिवाळीत रितेशचे सर्व कुटुंब अस्वस्थ झाले आहे. सलग तीन दिवस रितेशचे आईवडील झोपू शकले नाहीत. यातच ज्या मुलाच्या चायनिज पिस्तुलातून रितेशला इजा झाली, त्याच्या पालकांनी रितेशची विचारपूसही केली नाही. झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐ‍वजी प्रशांत मेहता कुटुंबासह बाहेरगावी गेले आहेत. शुभ मेहता या मुलाच्या पालकांच्या दुर्लक्षामुळे आणि धोकादायक चायनिज फटाक्यांमुळेच रितेश जखमी झाल्याचा आरोप राहुल शेटे यांनी केला आहे.

चौकट

दृष्टी अधू झाली

डोळ्यात खोलवर झालेल्या जखमेमुळे रितेशला दृष्टिदोष निर्माण झाला आहे. इजा झाल्यानंतर दोन दिवसात डोळ्यातील पाणी वाहून गेले होते. डोळा निकामी होण्याचा धोकाही वाढला होता. काहीच दिसत नव्हते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी जखमेने तयार झालेला मोतिबिंदू काढून रेटिना सुरक्षित केला. उपचारानंतर ७० टक्के सुधारणा झाली आहे. दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा मोतिबिंदूचे ऑपरेशन करावे लागेल. सहा महिन्यानंतर बुबुळ बदलण्याचा विचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बंद रुग्णालयांचा फटका

दिवाळी सुट्ट्यामुळे बहुतांश रुग्णालये बंद होती. त्यामुळे रितेशला वेळेत उपचार मिळाले नाहीत. रविवारी संध्याकाळी पालकांनी आख्खे शहर पालथे घातले. पण एकही नेत्रोपचार तज्ज्ञ उपस्थित नव्हते. रविवारी रात्रभर घरगुती उपाय केल्यानंतर सोमवारी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन रितेशला रुग्णालयात अॅडमिट करावे लागले. सुट्ट्यांमुळे रुग्णालये बंद असल्याने उपचारास विलंब झाल्याचे रितेशच्या पालकांनी सांगितले.

==

रितेशला उपचारासाठी दाखल केले तेव्हा त्याच्या डोळ्याची स्थिती फारच गंभीर होती. जखमेमुळे डोळा काढून टाकावा लागेल, अशी भीती वाटत होती. सुदैवाने वेळेत उपचार झाल्याने रितेशचा डोळा वाचवू शकलो. १०० टक्के दृष्टी परत येण्यासाठी रितेशचे बुबूळ बदलावे लागणार आहे.

डॉ. चंद्रशेखर खानवेलवकर, संजिवनी हॉस्पिटल, शाहूपुरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठही उमेदवारांचे अर्ज वैध

$
0
0



सांगली : विधान परिषदेच्या सांगली -सातारा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील आठही उमेदवारांचे अर्ज छाननीनंतर वैध ठरल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी गुरुवारी दिली.

सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जांची छाननी करण्यात आली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मोहनराव कदम (सांगली), शेखर गोरे (राष्ट्रवादी काँग्रेस, सातारा), युवराज बावडेकर (भारतीय जनता पक्ष, सांगली ), अरुण गणपती लाड (अपक्ष, सांगली), मोहनराव गुलाबराव कदम (अपक्ष, देवूर, जि. सातारा), किशोर धुमाळ (अपक्ष, सातारा), प्रभाकर घार्गे (अपक्ष, सातारा) शेखर विश्वास माने (अपक्ष, सांगली) आदी अर्ज दाखल केलेल्या सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्ह्यांची यादी दिली असली तरी एका गुन्ह्याचा उल्लेख केलेला नाही, तसेच ते भागीदार असलेल्या फर्मला थकीत कराची नोटीस बजावण्यात आल्याबद्दल काँग्रेस उमेदवाराच्या वकिलांनी हरकत घेतली, परंतु गोरे यांच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेसची हरकत फेटाळून लावली.
अर्जांच्या छाननीनंतर आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शनिवारी, ५ नोव्हेंबरला दुपारपर्यंत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गळीत हंगाम यंदा लवकर संपणार

$
0
0

सांगली : यंदा जिल्ह्यात केवळ ८० ते ८५ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस उपलब्ध होणार आहे. यामुळे साखर कारखान्यांचे गळीत हंगाम लवकर संपतील, असा अंदाज आहे. ५ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू होत आहे.
सलग दोन वर्षे दुष्काळी परिस्थिती आणि नंतरची उघडीप यामुळे या हंगामासाठी उसाची टंचाई जाणवणार आहे. चालू हंगामासाठी जिल्ह्यात अवघ्या ८५ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस उपलब्ध होणार आहे. एकरी ४० टन या हिशेबाने सुमारे ८५ लाख टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यापैकी २५ टक्क्यांहून अधिक ऊस आधीच बियाणासाठी वापरला जातो.
गेल्या हंगामात जिल्ह्यात ७० लाख ८८ हजार ८४४ टनापर्यंत उसाचे गाळप झाले होते. तर ८४ लाख ६६ हजार ३१२ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले होते. जिल्ह्यात सरासरी साखर उतारा ११.७६ टक्के इतकाच होता.
मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे अपेक्षित प्रमाणात ऊस लागवड झालेली नव्हती. ऊसाचे क्षेत्र कमालीचे घटले. त्यामुळे मोजकेच कारखाने यंदाच्या गळीत हंगामात ऊसासाठी स्वयंपूर्ण राहतील अन्य कारखान्यांना उसासाठी पळपळ करावी लागणार आहे. साखर कारखान्यांवरील कर्जाचा बोजा, एफआरपी देणे, साखरेचे दर या बाबींचा विचार करता साखर कारखान्यांपुढील अडचणी वाढू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपटगृहांतील राष्ट्रगीत पॅकअपच्या वाटेवर

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

कोल्हापूर : राष्ट्रगीताविषयी आदर निर्माण व्हावा यासाठी चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्याच्या नियमाचे कोल्हापुरातील बहुतांशी चित्रपटगृहात पॅकअप होत आहे. दोन मल्टिप्लेक्स थिएटर व्यतिरिक्त सध्यातरी एकाही चित्रपटगृहात राष्ट्रगीताची सलामी दिली जात नाही. अडीच ते तीन तास सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना राष्ट्रगीत म्हणण्यासाठी लागणारा ५२ सेकंदांचाही वेळ देण्याची तयारी नसल्याचा परिणाम चित्रपटगृहातील राष्ट्रगीत म्हणण्याचा नियम धाब्यावर बसवण्यावर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रत्येक चित्रपटगृहात सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावावे आणि उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी उठून उभे राहून राष्ट्रगीताचा मान राखावा असा नियम राज्य सरकारने सन २००३ साली केला. गेल्या १५ वर्षापासून हा नियम आहे, मात्र कोल्हापुरातील चित्रपटगृहांमध्ये या नियमाचे सातत्य राखले जात नसल्याचे चित्र आहे. शहरातील आठ एकपडदा चित्रपटगृहात दररोज प्रत्येक खेळाआधी राष्ट्रगीत वाजवले जातेच असे नाही. मात्र शहरातील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावून सिनेमा सुरू करण्याचा नियम पाळला जातो.

यासंदर्भात शहरातील एकपडदा चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांमार्फत माहिती घेतली असता त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जेव्हा हा नियम केला त्यावेळी सुरूवातीच्या एक ते दोन महिन्यात प्रत्येक खेळाआधी राष्ट्रगीत लावले जात होते. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षात राष्ट्रगीत लावण्यामध्ये सातत्य नाही. अनेकदा प्रेक्षक राष्ट्रगीतासाठी उभे राहत नाहीत. महाविद्यालयीन तरुणांकडूनही राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याला प्रतिसाद दिला जात नाही. याचाही परिणाम राष्ट्रगीत न लावण्यावर होत आहे. दरम्यान, प्रेक्षकांची संख्या किती आहे हे पाहून काहीवेळा राष्ट्रगीत लावले जात असल्याची माहिती शहरातील एका एकपडदा चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी दिली. मात्र हे प्रमाण अतिशय नगण्य असल्याचीही पुष्टी त्यांनी जोडली. हा नियम असला तरी तो चित्रपटगृह चालकांसोबत प्रेक्षकांनीही पाळण्याची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन किंवा राष्ट्रपुरूषांच्या जयंती किंवा पुण्यतिथीच्या औचित्याने राष्ट्रगीत लावण्याचा नियम पाळण्यावर आम्ही भर देत असल्याचे एकपडदा चित्रपटगृहाच्यावतीने सांगण्यात आले.

प्रेक्षकांकडूनही हवा प्रतिसाद

राज्य सरकारने चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावून चित्रपट सुरू करण्याचा नियम केला असला तरी या नियमाची अंमलबजावणी होण्यासाठी प्रेक्षकांचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरतो. मध्यंतरी मुंबईत एका हिंदी सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात आले. मात्र एका कुटुंबाने राष्ट्रगीतावेळी उभे राहण्यास नकार दिल्याने चित्रपटगृहात गोंधळ झाला. अशा घटना घडल्यामुळे सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे राष्ट्रगीत लावण्याची जबाबदारी जितकी चित्रपटगृह संचालकांची आहे तितकीच त्याचा मान राखण्याची जबाबदारी प्रेक्षक म्हणून चित्रपटगृहात येणाऱ्या नागरिकांचीही आहे.

कोट

प्रेक्षक प्रतिसाद देत नाहीत म्हणून नियम डावलणे योग्य नाही. राष्ट्रगीत सुरू झाल्यावर उभे राहून त्याचा मान राखणे हे कर्तव्य आहे. चित्रपटगृहात सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत सातत्याने लावले तर प्रेक्षकांना ती सवय लागेल. प्रेक्षकांचा प्रतिसाद नाही म्हणून या नियमाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. तसेच सध्या तरी एकाही एकपडदा चित्रपटगृहात हा नियम पाळला जात नाही.

महेंद्र पाटील, प्रेक्षक

कोल्हापुरातील सर्व चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्याचा नियम पाळला जात नसेल तर चित्रपटगृह संचालकांना सूचना दिल्या जातील. त्यासाठी चित्रपटगृह संचालकांशी संपर्क साधून या नियमाची अंमलबजावणी सातत्याने केली जावी याबाबत सांगितले जाईल. तसेच प्रेक्षकांच्या संख्येवर हा नियम पाळायचा की नाही अशाप्रकारची भूमिका घेऊ नये असे वाटते.

सूर्यकांत पाटील, अध्यक्ष, जिल्हा चित्रपटगृह मालक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खालिद मुच्छालेचा पोलिसांकडून खून’

$
0
0

सोलापूर : आपला मुलगा खालिद मुच्छाले याचा पोलिसांनी कट रचून खून केला आहे. त्याबद्दल मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज मुच्छालेची आई मेहमूदा यांनी सोलापुरातील एमआयडीसी पोलिसांकडे केला आहे.
भोपाळ पोलिसांनी खालिदला चकमकीत मारलेले नाही. कट रचून त्याचा खून केला आहे. त्यामुळे त्या राज्याचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह, विशेष पोलिस महानिरीक्षक योगेश चौधरी, पोलिस महासंचालक ऋषीकुमार शुक्ला, पोलिस अधीक्षक अरविंद सक्सेना, कारागृग अधीक्षक अभिषेक तोमर, दहशथवादविरोधी पथकाचे प्रमुख संजीव शामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मेहमूदा यांनी अर्जात केली आहे. भोपाळला जाऊन तक्रार देणे शक्य नसल्याने सोलापुरात तक्रार दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
‘खालिदवरील खटला सध्या प्रलंबित आहे. त्याच्याविरोधात गोळीबार करणे, सिमी या बंदी घातलेल्या संघटनेशी लागेबांधे असणे आदी आरोप आहेत. या खटल्याचे अर्धे काम पूर्ण झाले आहे. काही महिन्यात त्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. खालिद याला काही दिवसांत जामीन मिळणार असतानाच त्यांना चकमकीत मारण्यात आले,’ असे मेहमूदा यांचे वकील तेवरखान पठाण यांनी पत्रकारांना सांगितले.
भोपाळ येथील तुरुंगातून रविवारी रात्री मुच्छालेसह सहा संशयित दहशतवादी तुरुंग रक्षकाचा खून करून पळून गेले होते. मात्र, भोपाळ पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी सकाळी भोपाळजवळील एका गावात आठही जणांना चकमकीत ठार मारले. त्यांच्याकडे हत्यारे सापडल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, या चकमकीवर संशय व्यक्त केला जात आहे.

खालिद मुच्छाले याचा मृत्यू भोपाळ येथे झाला आहे. त्यामुळे मेहमूदा यांची तक्रार आम्ही भोपाळ पोलिसांकडे पाठवून देणार आहोत.

- रवींद्र सेनगावकर, पोलिस आयुक्त, सोलापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराड, पाटणला भाताची सुगी

$
0
0


कराड : कराडसह शेजारील पाटण तालुक्यात सध्या भाताची सुगी सुरू झाली आहे. भात कापणी व झोडपणीच्या कामात शेतकरी गढून गेल्याचे दित्र दोन्ही तालुक्यांच्या ग्रामीण भागात दिसत आहे.

कराड, पाटण परिसरात भात कापणी व झोडपणी अंतिम टप्प्यात आहे. या भागातील शेतकरी ऐन दिवाळीतही भात कापणी व झोडपणीच्या कामात मग्न होते. पाटणसह कराड तालुक्याच्या दक्षिणेकडील कार्वे, वडगाव, रेठरे बुद्रुक, वाठार, उंडाळे, येळगाव, येणपे हा परिसर घाटमाथा म्हणून ओळखला जातो. या भागात जमिनी लाल मातीच्या व मुरबाड असल्याने येथील शेतकरी भात, नाचणी, वरी ही पिके घेतात. या परिसरात हळव, इंद्रायणी व महान या प्रजातींचा भात होतो. हळव भाताची काढणी दसऱ्याला पूर्ण झाली. महान भाताची कापणी व झोडणी सुरू आहे. यात इंद्रायणी, सोन पनवेल, कोळंबा, गजनी, इगतपुरी, कोलम, सोनम ही पिके घेतली जातात. भाताची कापणी करून त्याच्या पेंड्या बांधून लोखंडी कॉट अथवा बॅरलवर झोडणारे शेतकरी असे चित्र गावोगावी दिसत आहे. भात इतरत्र पडू नये, यासाठी तिन्ही बाजूला कापडी घरे केली जातात.

भात कापणीसह सुगीच्या कामांसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. भाताची कापणी करून गवत व भात दोन दिवस गुंडाळून वाळवत ठेवून लगेच भात झोडणी केल्यामुळे मनुष्यबळ कमी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मजूर मिळत नसल्याने संपूर्ण कुटुंबच शेतात सुगीच्या कामात व्यस्त राहून शेतकऱ्यांचा दिवाळी सण व्यग्रतेतच गेला. भाताची कापणी व झोडपणी आणखी आठ-दहा दिवस सुरू राहणार आहे. दसऱ्यानंतर काही दिवस पावसाचा शिडकावा झाल्याने यंदा भाताच्या उत्पादनात ३० टक्के घट झाल्याची माहितीही शेतकऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर‘ शिवनेरी’ बंद

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet : @sachinyadavMT

कोल्हापूर : खासगी व्होल्वोपेक्षा जादा दरामुळे प्रवाशांच्या कमी मिळालेल्या प्रतिसादामुळे अखेर कोल्हापूर ते मुंबई शिवनेरी सेवा दोन नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली. कोल्हापूर विभागाने ही शिवनेरी मुंबई विभागाच्या ताफ्यात सुपूर्द केली. एक ऑक्टोबरला सुरू झालेल्या ही बससेवा प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे बंद करावी लागली. त्यामुळे कोल्हापूर एसटीच्या ताफ्यात आता एसी बस हद्दपार झाली आहे. महिन्याभरात केवळ ३४१ प्रवाशांच्या कोल्हापूर ते मुंबईचा प्रवास केला आहे. कोल्हापूर ते पुणे मार्गावरील शिवनेरी यापूर्वीच बंद झाली आहे.

शिवनेरीत ४५ आरामदायी आसनक्षमता होती. मात्र या शिवनेरीचा तिकीट दर अधिक असल्याने प्रवाशांनीही कमी प्रतिसाद दिला. कोल्हापूर ते मुंबई पर्यंत धावणारी शिवनेरीला जाता-येता प्रवासी मिळाले नाहीत. ३३ दिवसांतच ही सेवा बंद करावी लागली. मुंबई सेंट्रल डेपोतून रात्री अकरा वाजता आणि कोल्हापूरातून रात्री अकरा वाजता मुंबईकडे धावत होती. ३३ दिवसांत केवळ १ लाख ९९ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शिवनेरीपेक्षा साधी बससेवेतून दररोज एका फेरीत कोल्हापूर आगाराला १६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे प्रत्येक दिवशी सरासरी पाच प्रवासी मिळत असल्याने एसटीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने शिवनेरी सेवा कोल्हापूरला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही शिवनेरी आता पुणे आगाराला दिली आहे. पुणे ते दादर मार्गावर या शिवनेरी धावणार आहे. खासगी गाड्यांशी स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागाचे मुंबई कार्यालयाला साकडे घातले होते. १०४३ रुपये आकारला जाणारा तिकीट दर ७५० रुपये करण्याची मागणी केली होती. मात्र शिवनेरीत दिल्या जात असणाऱ्या सुविधांनुसार दर कमी करता येणार नसल्याचे मुंबई विभागीय कार्यालयाकडून कोल्हापूर आगाराला सांगण्यात आले. मुंबई सेंट्रल मार्गांवरुन सर्वांत उशीरा सुटणारी ही बससेवा होती. महालक्ष्मी एक्सप्रेसपेक्षा काही तास अगोदर ही मुंबईत पोहोचत होती. प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई सेंट्रलपासून क्रॉफर्ड मार्केट किंवा मंत्रालयापर्यंत फेरी वाढविण्याचा विचार सुरु होता. मात्र ही सेवा बंद झाल्याने पुन्हा निराशच निर्माण झाली आहे.


दरामुळे निराशा

खासगी आराम बसची एसटीसोबत असलेली स्पर्धा, बसस्थानकाच्या आवारात फिरणारे एजंट, जादा फेऱ्या, प्रवासी संख्या यांच्यासह दरातील तफावतमुळे शिवनेरीला कमी प्रतिसाद मिळाला आहे. खासगी व्होल्वो कोल्हापूर ते मुंबईसाठी ५०० ते ७०० रुपये दर आकारतात. त्या तुलनेत एसटीच्या शिवनेरी व्होल्वोचा तिकीट दर १०४३ रुपये होता. हा दर अधिक असल्याने महिन्याभरात जाता आणि येताना केवळ पाचच प्रवासी मिळाले.


शिवनेरीचा दर कमी करण्याची मागणी प्रवाशांच्याकडून सातत्याने केली जात होती. त्याची दखल घेऊन कोल्हापूर विभागाने मुंबई विभागीय कार्यालयाकडे प्रस्ताव दिला होता. मात्र शिवनेरी मुंबईत परत पाठविण्याचे आदेश मिळाले आहेत.

अभय कदम, स्थानकप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीतील ऊस दराचे काय?

$
0
0


सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यातून ऊस दरावर तोडगाही निघाला. परंतु, सांगलीचे पालकमंत्री कोण, हेच अद्याप स्पष्ट नसल्याने सांगलीतील ऊस दराचे काय होणार? याकडे कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
सांगली आणि कोल्हापुरातील साखर उतारा जवळपास सारखाच असला, तरी साखरेला मिळणारा सध्याचा दर, ऊस वाहतुकीच्या खर्चातील तफावत आणि ‘एफआरपी’पेक्षा जादा दर दिला, तर त्यावर तीन टक्के आयकर भरण्याची नोटीस काढली जाते. त्यामुळे सरकारने अगोदर कारखान्यांच्या विरोधातील धोरणांत बदल केला पाहिजे. असे झाले, तर ‘एफआरपी’च काय त्यापेक्षा चांगला दर देण्यासाठी आम्हाला सरकारने सांगायचीही गरज नाही, असा सांगली जिल्ह्यातील कारखानदारांचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी पुढाकार घेऊन रविवारी, ६ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता कारखानदार आणि संघटनांची बैठक बोलावली असून, या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याने ऊस दरावर तोडगा काढण्यात आघाडी घेतली आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत. राजू शेट्टी यांच्या रूपाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतृत्वही कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहे. कारखानदारांनीही चर्चेत रस दाखविल्याने सारे काही जुळून आले आणि ‘एफआरपी’पेक्षा १७५ रुपये जादा रक्कम द्यायची, असा तोडगा निघाला. परंतु, या बैठकीस सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना बोलावलेले नसल्याने या कारखानदारांनी कोल्हापूरचा ‘फॉर्म्युला’ मान्य नसल्याचे स्पष्ट केले.
जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे उत्पादन घटले आहे. यंदा सुमारे ७० हजार हेक्टरवरीलच ऊस गाळपायोग्य आहे. कारखाने सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना ऊस दराचे काय होणार याबाबत उत्पादकांमध्ये चर्चा सुरू आहे. कोल्हापुरात एफआरपी शिवाय टनास १७५ रुपये घेण्यास तूर्त मान्यता दिली आहे. तर, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी कोल्हापूरएवढा दर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
----
सर्व संघटनांना निमंत्रण

जिल्हा बँकेत रविवारी ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांना निमंत्रण दिले जाणार असल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार शेट्टी, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा, शरद जोशी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष संजय कोले तसेच बळीराजा संघटनेचे बी. जी. पाटील यांना बोलाविण्यात आले आहे. साखरेवर ९० टक्के कारखानदारांना उचल दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------
कोल्हापुरातील बैठकीतील निर्णय आम्हाला मान्य नाही. शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला पाहिजे, ही आमची भावना आहे. पण त्यासाठी सरकारने धोरणातील दुटप्पीपणा अगोदर बंद केला पाहिजे.
अरुण लाड, अध्यक्ष, क्रांती साखर कारखाना
------
पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांची एकत्र बैठक घ्यायला हवी होती. सर्वत्र साखरेच्या किमती सारख्याच आहेत. असे असताना वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन दर निश्चित करण्याची पद्धत कशाला हवी?
वैभव नायकवडी, अध्यक्ष, हुतात्मा कारखाना
----- ----
ऊस दराबाबत घेण्यात आलेला निर्णय कोल्हापूर जिल्ह्यासाठी मर्यादित असून, तो सांगलीसाठी लागू नाही. येथील शेतकऱ्यांना परवडेल, एवढा दर आम्ही देण्यास तयार आहोत.
पी. आर. पाटील, अध्यक्ष, राजारामबापू साखर कारखाना
--------

सांगली जिल्ह्यातील कारखान्यांची एफआरपी रक्कम
हुतात्मा वाळवा …………... ३२१४
राजारामबापू साखराळे …………... ३१२२
राजारामबापू वाटेगाव …………... ३११०
सर्वोदय कारंडवाडी …………... ३१४७
क्रांती कुंडल …………... ३०२६
सोनहिरा वांगी …………... ३०३९
विश्वास चिखली …………... २८४४
केनअ‍ॅग्रो डोंगराई …………... २८०८
महांकाली कवठेमहांकाळ …………... २६२१
दालमिया (निनाई) …………... २९८९
माणगंगा आटपाडी …………... २४८३
मोहनराव शिंदे, म्हैसाळ …………... २९०९
जत कारखाना …………... २६१९
श्री श्री राजेवाडी …………... २६६५
उदगिरी शुगर …………... २८४६
वसंतदादा सांगली …………... २६००
यशवंत नागेवाडी …………... २६०९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरणोत्सावतील अडथळे काढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव नऊ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर नगररचना विभागाने नियुक्त केलेल्या किरणोत्सव अडथळा अभ्यास समितीने पाहणी करुन किरणोत्सव मार्गातील भौतिक अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दोन ते तीन दिवसांत हे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

अंबाबाई मंदिराच्या अनेक वैशिष्ट्यांमधील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून दोनदा होणारा किरणोत्सव सोहळा. सूर्याच्या दक्षिणायनातील किरणोत्सव बुधवारपासून सुरू होत आहे. नोव्हेंबर व जानेवारीमध्ये असा दोनवेळा अंबाबाईचा किरणोत्सव सोहळा होतो. ९, १० व ११ नोव्हेंबर रोजी किरणोत्सव सोहळा होत आहे. गेल्या काही वर्षांपासून किरणोत्सव मार्गात वाढलेल्या इमारती, अतिक्रमण, फलक, पाण्याची टाकी, झाडे, पत्र्याचे शेड यामुळे देवीच्या किरणोत्सवात अडथळा निर्माण होत असल्याचे गुरुवारी झालेल्या पाहणी स्पष्ट झाले आहे.

किरणोत्सव मार्ग मोकळा करण्यासाठी सरकारच्या नगररचना विभागाने अभ्यास समितीची गेल्या वर्षी स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत, अभ्यासक उदय गायकवाड, आर्किटेक्ट सूरत जाधव व जीवन बोडके, प्रा. के. जी. हिरासकर आहेत.

राज्यसरकारने किरणोत्सव मार्ग निश्चित करून बांधकाम नियमावली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मार्गावरील इमारतीची उंची किती असावी त्यानुसार बांधकाम परवानगी दिली जाणार आहे. यासाठी या समितीने या मार्गावरील फोटो काढून नकाशा तयार केला आहे. भविष्यातील भौतिक अडथळे निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात असून समितीने गुरुवारी केलेल्या पाहणी अडथळ्यांबाबतचा आढावा घेऊन महापालिका व देवस्थान समितीला सूचनाही करण्यात आल्या.

सरकारच्या नगररचना विभागाने नियुक्त केलेल्या किरणोत्सव अडथळा अभ्यास समितीने किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांची पाहणी केली. या पाहणीत काही बिल्ड‌िंग, झाड, घराचे पुढे आलेले पत्र्यांचे शेड, फलक, पाण्याची टाकी असे भौतिक अडथळे दिसून आले आहेत. हे अडथळे दूर करण्याच्या सूचना महापालिका व देवस्थान समितीला देण्यात आल्या आहेत.


अडथळा कमी होण्याची शक्यता

महाद्वार रोड परिसरात काही बिल्ड‌िंग गणेशोत्सवापूर्वी सुरक्षेच्या कारणात्सव महापालिकेने काही जुन्या इमारती उतरवल्या होत्या. त्यामुळे यंदा किरणोत्सवातील काही अडथळा कमी झाला असण्याची शक्यता अभ्यासक व्यक्त करत आहेत.


समितीच्या सूचना

श्री अंबाबाईच्या किरणोत्सव सोहळ्याचा गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यासक पाहणी करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या किरणोत्सवाच्या मार्गावरील भौतिक अडथळे आहेत ते प्राधान्याने दूर करण्याची आवश्यकता आहे. हे अडथळे दूर केल्यानंतर किरणोत्सव चांगल्या प्रकार होऊ शकतो. त्यामुळे यंदाही समितीने हे भौतिक अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीला चाप

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

केंद्र सरकारच्यावतीने वस्तू आणि सेवाकराची (जीएसटी) आकारणी चार टप्यात करण्यात येणार असल्याचे गुरूवारी निश्चित झाले आहे. आता कोणत्या वस्तूचे काय दर राहतील, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. करमुक्त केल्याने ‌जीवनावश्यक वस्तू व अन्न, धान्यांच्या दरवाढीला मात्र चाप बसणार आहे. दरम्यान, करप्रणालीसंबंधी स्पष्टता नसल्याने व्यापारी, उद्योजक, ग्राहकांत मात्र अद्याप संभ्रम आहे. करप्रणाली एकसारखी असल्याने विविध राज्यातील उत्पादने बाजारात येतील. स्पर्धेमुळे ती ग्राहकांना कमी दरात मिळतील, असे काही व्यापारी, उद्योजकांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना सांगितले.

जीएसटी परिषदेने ५, १२, १८, २८ असे कर आकारणीचे चार टप्पे निश्चित केले आहेत. या करातून अन्नधान्य, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू मुक्त केल्या आहेत. यामुळे प्र‌ाथमिक टप्प्यात जीएसटीमुळे काय महागणार, कोणत्या वस्तूचे दर स्थिर राहणार, त्याचा अंदाज आला आहे. अद्याप सवि‌स्तर माहिती सं‌बंधित घटकांपर्यंत आलेली नाही. त्यामुळे दिवसभर व्यापारी, उद्योजक आणि जिज्ञासू ग्राहक इंटरनेटच्या माध्यमातून नव्या करप्रणालीचा तपशील शोधत राहिले.

धान्यावर कर लागू केलेला नसला तरी सध्याचे दर कमी होणार नाहीत. भाववाढ होणार नाही, असे सांगण्यात आले आहे. उत्पादन व वाहतूक खर्च कमी होणार नसल्याने दर ‌स्थिर राहतील, असे धान्य व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जीएसटीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची करप्रणाली राहणार की नाही, याबद्दल स्पष्टता नाही. उद्योग क्षेत्राकडून जीएसटीचे स्वागत करण्यात आले आहे. प्रचलित करप्रणातील किचकटपणातून सुटका होईल, असे उद्योजकांना वाटते. प्रत्येक राज्यात वेगळा कर भरावा लागणार नसल्याने उद्योजकांना या करप्रणालीचा फायदा होणार आहे. ग्राहकांना विविध कंपन्यांच्या वस्तू बाजारात उपलब्ध होतील. ‌तीव्र स्पर्धा निर्माण होईल. त्यातून ग्राहकांच्या बजेटमध्ये दर्जेदार वस्तू मिळणार आहेत.

चारचाकी वाहनांच्या उत्पादित किमतीवर सध्या सरासरी ४३ टक्के कर आहे. जीएसटीमध्ये तो २८ टक्के केला आहे. रोड टॅक्स व अन्य कराच्या रूपाने वाढ न करता २८ टक्केच ठेवल्यास पूर्वीपेक्षा कमी किमतीने ग्राहकांना वाहने मिळतील, असे वाहन विक्री क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

............


सर्व व्यवहार रेकॉर्डवर

जीएसटीमुळे व्यापारी, उद्योजकांना महिन्याला तीन ‌रिटर्न ऑनलाईन भरावे लागणार आहेत. खरेदी, विक्री व्यवहारांचे तपशील ठेवावे लागणार आहेत. यामुळे सर्व व्यवहार रेकॉर्डवर येतील. कर चुकवेगिरीला आळा बसणार आहे. लहान उद्योजकांनाही परवाना घ्यावा लागणार आहे.

........


जीएसटी पुरोगामी करदरप्रणाली वाटतो. तिचे स्वागत केले पाहिजे. जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होणार नाही. काही प्रमाणात कमीही होईल. सामान्य, गरिबांच्या हिताचा विचार करणारी जीएसटी करप्रणाली वाटते. केंद्राने निश्चित केलेल्या कराचे स्लॅबच आधारभूत राहणार आहेत. त्यामध्ये त्या त्या राज्यांची करवाढ पुन्हा असणार नाही.

जे. एफ. पाटील, जेष्ठ अर्थतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंतदादा कारखान्याच्या मालमत्तेवर सरकारचे नाव

$
0
0


मिरज : येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांचे देणे असलेली ५२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी कारखान्याच्या मालमत्तेवर सरकारच्या नावाच्या नोंदी चढवाव्यात, असा आदेश तहसीलदार शरद पाटील यांनी दिला आहे.

सन २०१३-१४ वर्षात वसंतदादा साखर कारखान्याने ऊस उत्पादकांचे ४६. ३९ कोटी रुपयांचे ऊस बिलाचे तसेच इतर देणी थकीत ठेवली होती. साखर आयुक्तांनी थकित बिल वसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता जप्ती आणि विक्रीद्वारे देणी भागविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार महसूल वसुली प्रक्रिया सुरू करून कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आला आहे.

मालमत्ता जप्तीच्या तीन नोटिस कारखान्याला बजावूनही थकबाकी वसुली झाली नाही. त्यामुळे थकीत ५२ कोटी रुपये वसुलीसाठी कारखान्याची इमारत वगळता इतर मालमत्ता लिलावाद्वारे विकण्यासाठी महसूल विभागाने २६ ऑक्टोबर रोजी लिलाव आयोजित केला होता.

मात्र, लिलावाला खरेदीदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून कारखाना मालमत्तेच्या सातबारा उताऱ्यावर मालक म्हणून सरकारच्या नावाची नोंद करण्यासाठी तहसीलदार शरद पाटील यांनी मंडल अधिकाऱ्यांना आदेश

दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळ्यातील ‘चोरी’ उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अधिकारी व कर्मचाऱ्यांना खूष करून घरमालकांनी घरफाळा कमी केल्याचा बनाव रुईकर कॉलनीतील काही घरमालकांनी उघड करून दाखवला. घरमालकांनी निनावी पत्राद्वारे तक्रार केल्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्वतः रुईकर कॉलनीतील अपार्टमेंटना भेटी देऊन घरफाळ्यातील घोटाळ्याचा पर्दापाश केला. कर चुकवणाऱ्यांना जादा कर लावून लावून घरफाळा वसूल करण्याचे आदेश आयुक्त शिवशंकर यांनी दिल्याने घरफाळा विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

घरफाळा कमी करण्यात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यात मिलीभगत आहे. एक वर्षांपूर्वी घरफाळा विभागातील घोटाळा उघड झाल्यावर दोषी कर्मचाऱ्यांची पगारवाढ रोखली होती. तरीही घरफाळा कमी करण्याचे प्रकार वाढले आहेत. रुईकर कॉलनी येथील स्वामी बंगला, गौरीशंकर अपार्टमेंट व विद्या कॉलनीतील घरमालकांनी आयुक्तांना काही फ्लॅटधारकांना घरफाळा कमी दाखवला जात असल्याचा अर्ज दिला होता.

गुरुनाथ रेसिडन्सी, सावित्री अपार्टमेंट, प्रथमेश बंगला (दिनेश शर्मा), प्रथम रेसिडन्सी, राधाकृष्ण अपार्टमेंट, गौरीशंकर अपार्टमेंट या ठिकाणी भाडेकरू राहत आहेत. पण महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाडेकरू न दाखवता घरफाळा आकारला जात आहे. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे नुकसान होत असून प्रामाणिक घरफाळा भरत असलेल्या घरमालक व भाडेकरूवर अन्याय होत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी अर्जाद्वारे केली आहे. प्रामाणिक फ्लॅटधारकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी, महापौर, कावळा नाका कर निर्धारक, लाचलुचपत विभागाला प्रत पाठवली होती.

२० ऑक्टोबर रोजी प्रामाणिक फ्लॅटधारकांनी पत्र पाठवले होते. या पत्राची दखल घेऊन आयुक्त शिवशंकर, कर निर्धारक दिवाकर कारंडे यांनी रुईकर कॉलनी, महाडिक माळ येथील अपार्टमेंट व रेसिडन्सीमध्ये अचानक भेट देऊन राहत असलेल्या फ्लॅटमधील कुळांची व मालकांची माहिती घेतली. काही मिळकतीमध्ये भाडेकरू असताना मालक वापर करत आहे, असे दाखवून कमी घरफाळा लावून जमा केला जात असल्याचे निदर्शनास आले. अशा भाडेकरूवर जादा कर लावून घरफाळा वसूल करावा, असे आदेश दिले.

आयुक्तांच्या भेटीनंतर घरफाळा विभागात खळबळ उडाली आहे. ई वॉर्डात घरफाळा कमी करण्यारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची टोळी आहे. या टोळीकडे घरफाळ्याचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत आहेत अशी चर्चा सुरू आहे.

भाडेकरार अद्यायवत करा

शहरातील सर्व मिळकतधारकांनी भाडेकराराची माहिती अद्यायावत करावी. अन्यथा दंड लावून घरफाळा वसूल करण्यात येईल. तसेच घरफाळासंबधातील तक्रारी अथवा चुकवेगिरीची तक्रार कर निर्धारकांकडे करावी, असे आवाहनही आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रथम ‘गोकुळ’ च्या कारभाराचे ऑडीट करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना समर्थ आहे. दिलीप पाटील यांनी अगोदर स्वत:च्या कारकिर्दीतील गोकुळ दूध संघाच्या कारभाराचे ऑडिट करावे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य पै. विठ्ठल मोरे, युवा आघाडी उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करून खासदार राजू शेट्टी यांनी एफआरपी अधिक १७५ रू. मान्य केले आहे. शेतकरी कोणाच्या बाजूने आहेत हे ऊस परिषदेत झालेल्या गर्दीवरून दिसून येते, त्यामुळे सैरभैर ते झाले आहेत. शेतकऱ्यांचा पुळका असल्याचा आव दिलीप पाटील यांनी आणू नये. खरंच शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर स्वत:च्या जीवावर आंदोलन करून यापेक्षा जादा दर दिल्यास त्यांचेही स्वागतच करू.

खासदार राजू शेट्टी यांच्यामुळेच आजवर शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. स्वयंघोषित ऊसकरी नेत्यांनी चांगला दर देणाऱ्या साखर कारखान्यांना ऊस घालू, आमचा ऊस कुणी अडवायचा नाही, अशी प्रथम भूमिका मांडलेली होती. त्यामुळे त्यांचेही पितळ उघडे पडले आहे. वैफल्यग्रस्त होऊन काहीजण स्वाभिमानीवर टीका करत आहेत. तुमच्या आघाडीत काही कारखानदार देखील सामील आहेत. त्यांनीच ३५०० रूपयांची उचल जाहीर केल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळेल. ज्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करते, त्यावेळी हेच तथाकथित नेते आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते अशी टीका करत होते. आज आंदोलन न करता दराचा प्रश्न निकाली काढल्यावर यांचे मनाचे संतुलन बिघडले आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

६५ वर्षाच्या कारकिर्दीत दिलीप पाटील यांना आज शेतकऱ्यांचा कळवळा आला हे चांगलेच झाले. अवास्तव मागणी करून राजू शेट्टी साखर कारखानदारी मोडीत काढीत आहेत, अशी टीका केली होती. मग ३५०० रू. हिशेव कसा काढला याची माहिती प्रथम द्यावी, असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे. पत्रकावर विठ्ठल मोरे, सचिन शिंदे, अविनाश पाटील, प्रकाश गावडे, शहाजी गावडे, राजू पाटील यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेशन रोडची कोंडी फुटेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दाभोळकर कॉर्नर ते गोकुळ हॉटेलपर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी, चारचाकी वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे होत असलेली कोंडी अद्याप फुटलेली नाही. कोंडीमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. फुटपाथवरही अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांनाही अडथळ्यांची शर्यत पार करत जावे लागत आहे. वाहतूक पोलिस बघ्याच्या भूमिकेत राहिल्याने पार्किंगला शिस्त कोण लावणार असा सवाल उपस्थित होत आहे.

राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापुरात प्रवेश केल्यानंतर महालक्ष्मी मंदिर व कोकणात जाणारी सर्व वाहने स्टेशन रोडवरून जातात. सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत या रस्यावर सर्व प्रकारच्या वाहनांची गर्दी असते. दाभोळकर कॉर्नर ते गोकुळ हॉटेलदरम्यान रेल्वेस्थानक, शाहूपुरी पोलिस ठाणे, चारचाकी वाहनांच्या टायर्स विक्रीची दुकाने, केएमटी बसस्टॉप आहे. रेल्वे स्टेशन आणि शहरातील मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर पादचारी आणि वाहनांची प्रचंड गर्दी असते. गतिरोधक नसल्यामुळे वाहनेही वेगात असतात.

काँग्रेस कमिटी कार्यालय ते रेल्वे स्थानकपर्यंत दोन्ही बाजूला असलेल्या टायर्सच्या दुकानासमोर टायर्स बदलण्यासाठी आलेली चारचाकी वाहने थांबलेली असतात. रेल्वेस्थानकात प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्यांची वाहनेही पार्किंग केलेले असतात. यामुळे रस्त्यावरून वाहने जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. सासने मैदानाकडून या रस्त्याला जोडणारा रस्ता कोंडीचे कारण होत आहे. या जोडरस्त्यावरून दाभोळकर कॉर्नरकडे न जाता वाहने जुन्या पोलिस स्टेशनच्या इमारतीकडे वळतात. चुकीच्या दिशेने वाहने जात असल्याने अनेकदा अपघात होतात.

रेल्वेस्थानक आणि गोकुळ हॉटेलसमोर रस्ता ओलांडण्याचा चौक आहे. त्या चौकात रस्ता ओलांडतानाही वाहनचालक घाई करत असल्याचे दिसते. काही वेळ थांबून जाण्याची तसदी घेतली जात नाही. कोणी आधी जायचे यावरून अनेकवेळा वाद, विवादाचे प्रकार घडत असतात. मागून स्पीडने अवजड वाहन येत असताना समोरचे वाहन चौकात रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना अपघात होतात. दोन्ही बाजूला रिक्षा, वडाप थांबून प्रवाशी घेत जातात. पार्किंग आणि प्रवाशी घेण्यासाठी थांबलेले वडाप, बसमुळे वाहतुकीची कोंडी होते.


पोलिसांचे वसुलीकडे लक्ष

दाभोळकर कॉर्नर सिग्नलजवळ रोज वाहतूक पो‌लिस थांबलेले असतात. त्यांना या मार्गावरील ‌बेशिस्त पार्किंग दिसत असते. वाहतुकीला अडथळा होईल, अशी थांबवलेली वाहने निदर्शनास पडतात. पण त्यांचे लक्ष पर जिल्हा, राज्यातील वाहने अडवून पैसे वसुली करण्यावर अधिक असते. पार्किंग, वाहतुकीच्या कोंडीकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळत नाही.

काँग्रेस कमिटी ते गोकुळ हॉटेलपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांचे बेशिस्त पार्किंग केलेले असते. वाहतुकीची कोंडी होते. अपघाताच्या घटनाही घडत असतात. फुटपाथही मोकळे नसतात. पादचाऱ्यांना जाणेही मुश्किल होत असते.

नितीन मोहिते, वाहन चालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images