काळम्मावाडी (ता राधानगरी) येथील दूधगंगा जलाशयाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांना भगदाडे पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. लिंगाचीवाडी येथील डाव्या कालव्यास भगदाड पडून कालव्याच्या भरावा नदीपात्रात वाहून गेला आहे. पाटबंधारे विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने अशा घटना सतत घडत असून विषयी शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे .
काळम्मावाडी येथील दूधगंगा जलाशय (राजर्षी शाहू सागर) या आंतरराज्य जल प्रकल्पाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. या कालव्यातून शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाते. परंतु या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कालवा फुटून शेतातील पिके वाहून जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सोमवारी (ता.३१) सायंकाळी लिंगाचीवाडी येथील डाव्या कालव्यास मोठे भगदाड पडले. कालव्यातून सुरु असलेला पाण्याचा मोठा प्रवाह दुधगंगा नदीपात्रात वाहून गेला. या घटनेची माहिती पाटबंधारे विभागास समजताच ताबोडतोब पाणी कालव्यातून बंद करण्यात आले.कालवा फुटीच्या प्रकारामुळे कालव्याशेजारील पिके केंव्हा वाहून जातील याची खात्री नाही. शेती सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी या कालव्यांच्या उपयोग होतो. सध्या या कालव्यातून पाणी पुरवठा खंडित केल्यामुळे या कालव्यावरील शेती पिके धोक्यात आली आहेत .ऊस,नाचणी,आदी पिका बरोबर रब्बीची लागण खोळंबणार आहे. या कालव्याचे नव्याने अस्तरीकरण करावे अशी मागणी या भागातील नागरिकांच्यामधून जोर धरू लागली आहे. कालव्याला भगदाड पडल्याची घटना घडल्यानंतर या विभागाचे शाखा अभियंता, कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
दरम्यान, काळम्मावाडी प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांचे काम निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. कालवे फुटून पिके वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत. या कालव्यामध्ये झाडे झुडपे वाढली आहेत. कोणत्याही प्रकारची देखभाल केली जात नाही .या कालव्यांचे अस्तरीकरण करण्यात यावे अन्यथा कालवा पाणी बंद आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार सूर्यवंशी यांनी दिला आहे . आणि शहर वाहतूक शाखाने फॅन्सी नंबरप्लेट, विना परवाना वाहन चालवण्यासंदर्भात कारवाई केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट