Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘शाहू’ चा पहिला हप्ता २५०० रूपये

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

‘प्रत्येक गळीत हंगाम वेगळी आव्हाने घेवून येत असतो. त्यातच यावर्षी पाऊस कमी पडल्याने उसाची कमतरता भासणार आहे. कर्नाटकातील कारखाने लवकर सुरु होत आहेत. त्यामुळे तेथेही ऊस जाण्याची शक्यता आहे. कारखाने आणि शेतकरी संघटना हे दोघेही शेतकऱ्याचेच हित पहातात. ते पहाता किमान चांगले कारखाने तरी संघटनेमुळे थांबता कामा नयेत. आम्ही २५०० रुपये निघालेली एफआरपी पहिल्या टप्प्यातच देणार आहोत,’अशी घोषणा शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी केली. महाराष्ट्र ऊस दर निश्चिती अधिनियमानुसार ७० ३० सूत्रानुसार ऊर्वरित रक्कम देण्यासही ‘शाहू’ बांधील असल्याचेही घाटगे यांनी यावेळी सांगितले.

ते शाहू कारखान्याच्या ३७ व्या बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सुहासिनीदेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमापूर्वी नवोदिता घाटगे आणि समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदिपन करण्यात आले.

घाटगे म्हणाले,‘मागील वर्षी आम्ही सर्व योजना यशस्वी राबवून उशीरा उसाचे अनुदान व व्हरायटी अनुदानही पोहच केले आहे. त्यामुळे चांगले कारखाने सुरु व्हायलाच पाहीजेत. यावर्षी आमचे सात लाख टनाचे उद्दिष्ट आहे. त्यातच खोडव्याची नोंद जास्त असल्याने टनेज कमी येणार आहे. याशिवाय कापशी खोऱ्यातील दरवर्षीप्रमाणे उसाच्या अडचणी आहेत. म्हणून गेटकेनचे करार वाढवल्याशिवाय पर्यायच नाही. येणाऱ्या दोन वर्षात ८० कोटी रुपये कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी खर्च होणार आहेत. हे देखील आव्हान आपल्याला या कठीण परिस्थितीत पेलायचे आहे.’

कार्यकारी संचालक विजय औताडे म्हणाले,‘ सात नोव्हेंबरला हंगाम सुरु करुन १५ मार्चपर्यंत संपवायचा असे आपले धोरण आहे. १४० ते १४५ दिवसांचा हंगाम चालेल. मागील वर्षी ऊस लागणच कमी झाल्याने यावर्षी उसाची कमतरता आहे. त्यामुळे उशीरा ऊस गेल्याची तक्रार यंदा येणार नाही. देशाच्या ३५ टक्के साखर महाराष्ट्रात उत्पादित होते. परंतु तेदेखील यावर्षी घटणार आहे.’

यावेळी ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, उपनराध्यक्षा उषाताई सोनुले, नगरसेविका नम्रता कुलकर्णी, वसंतराव पाटील, संजय पाटील, प.सं. सदस्या उल्का तेलवेकर, डी.एस.पाटील यांच्यासह संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------

चौकट

कारखान्याकडे दुर्लक्ष नाही

‘शाहू कारखाना आणि त्याच्या सभासदांमुळेच आपल्याला मान मिळाला आहे. त्यामुळे राजकारणात कितीही व्यस्त असलो तरी कारखाना केंद्रबिंदू मानूनच काम करणार आहे. कारखान्याचे काम सुरळीत रहाण्यासाठी प्रसंगी रात्री बारा वाजताही अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवू. परंतु कोणतेही काम थांबता कामा नये,’ असेही चेअरमन समरजितसिंह घाटगे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोकाट कुत्र्यांमुळे शहरात वावरताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहराबरोबरच ज‌िल्ह्यात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून लहान मुलांपासून ते वाहनचालक जखमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. तीन दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सात वर्षांचा मुलाचा मृत्यू झाल्यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या प्रशासन याबाबत कोणतीही उपायोजना करत नसल्यामुळे नागरिकांनीच सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. सीपीआर रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध असून कुत्र्याने चावा घेतल्यास ही लस तातडीने टोचून घेणे आवश्यक आहे.

शहरात कुत्र्यांची गणना झालेली नसली तरी अंदाजे २५ हजार मोकाट कुत्री आहेत. जिल्ह्यातही विविध गावांमध्ये हे प्रमाण मोठे आहे. मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे सीपीआरमध्ये महिन्याला सुमारे एक हजाराहून अधिक रुग्णांना रेबीजची लस दिली जात आहे. सध्या सीपीआरमध्ये दीड हजार रुग्णांवर देता येईल इतका रेबीज लसीची उपलब्धता असून काही दिवसांत आणखी एक हजार रेबीज लसचा पुरवठा केला जाणार आहे.

मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांपासून धोका अधिक आहे. झुंडीने राहणाऱ्या कुत्र्यात पिसाळण्याची शक्यता अधिक असते. अस्वछ खाणे, अस्वच्छ वातावरणासह काही अन्य कारणांमुळे रेबीजचे विषाणू कुत्र्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात. हे विषाणू त्याच्या लाळेत असतात. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर लाळेचा संसर्ग इतरांना झाल्यास रेबीजची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो. रेबीज लागण झाल्यास तो रुग्ण वाचू शकत नसल्यामुळे जे लोक कुत्री पाळतात त्यांनी कुत्रे चावण्यापूर्वी आणि नंतर रेबीज लस घेणे आवश्यक आहे. रेबीज हा कुत्र्यापासून माणसाला होणार अत्यंत प्राणघातक रोग असून एकदा हा रोग झाला तर मृत्यूचा धोका आहे. त्यामुळे हा रोग होऊ नये म्हणून योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (कुत्रा, ससा, माकड, मांजर इ.) चावल्यानंतर होणारा रोग आहे. कुत्रा चावल्यावर या आजाराची लक्षणे ९० ते १४७ दिवसांत दिसतात.

कचरा कोंडाळ्यासह मटण, चिकनची दुकाने, चायनीजची दुकाने, कत्तलखाने परिसरात कुत्र्यांच्या झुंडी कायम आहेत. चायनीजच्या गाड्यावरील कचरा कोंडाळा किंवा अनेकदा गटारीच्या कडेला टाकतात. त्यामुळे अशा परिसरात कुत्र्यांचा वावर वाढला आहे.

सीपीआरमध्ये लसीचा पुरेसा पुरवठा असून गेल्या काही महिन्यांत कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र यावर उपचार करण्यासाठी आवश्यक तेवढी औषधांचा साठा उपलब्ध आहे.

- डॉ. शिशिर निरगुंडे,वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर

लक्षणे -

रेबीज झालेल्या रुग्णाला साधारणपणे ताप आणि तापाची लक्षणे, मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची भीती वाटते. त्याचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो व तो बोलण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो.


उपचार -

कुत्रे चावल्याने जखम झाल्यावर लवकर ती स्वच्छ करावी, त्यामुळे रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबीजवर अॅन्टी रेबीज व्हॅक्स लस उपलब्ध आहे. रुग्णाने रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस घेतले पाहिजे. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात, चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत.


कुत्रे चावल्यावर उपाय -

जखम स्वच्छ साबणाने धुवून काढावी

जखमेवर जंतूनाशक लावावे

जास्त रक्तस्त्राव होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत


हे टाळा -

जखमेवर चुना, हळद, माती, तंबाखू, चहा पावडर, लिंबू असे पदार्थ लावू नये

जखमेला पट्टी बांधू नये

जखमेला टाके घालू नयेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसाज पार्लरवर छापा : महिलेसह दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला मिळालेल्या माहितीनुसार दाभोळकर कॉर्नर येथील रॉयल प्लाझामधील अयोध्या स्पा अँड ब्युट‌िकेअर मसाज पार्लरमध्ये कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांची सुटका केली, तर एका ग्राहकास ताब्यात घेतले. पार्लर चालवणाऱ्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (ता. २४) दुपारी करण्यात आली.

शहरातील मसाज पार्लरमध्ये छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले. स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेने सोमवारी (ता. २४) दाभोळकर कॉर्नर येथील रॉयल प्लाझामधील प्लॉट नं. एफ-१ मध्ये छापा टाकला. भाड्याने घेतलेल्या या फ्लॅटमध्ये अयोध्या स्पा अँड ब्युटिकेअर या नावाने मसाज पार्लर सुरू केले होते. या छाप्यात पोलिसांना दोन पीडित महिलांसह एक ग्राहक सापडला. याबाबत अधिक चौकशी केली असता, प्रियांका विनायक यादव (वय २६, रा. कणेरकर नगर) आणि गणेश महादेव माने (२८, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) हे दोघे भागीदारीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ नुसार कारवाई सुरू केली आहे. यावेळी पार्लरमधील दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली, तर एका ग्राहकास ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील, फौजदार पांडुरंग दोरुगडे, प्रवीण काळे, माधवी घोडके, शीतल लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईने शहराच्या मध्यवर्ती भागातील मसाज पार्लरमधील अवैध धंद्यांची वस्तुस्थिती उघडकीस आल्याने मसाज पार्लरच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तरच मराठा आरक्षणाची मागणी करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अॅट्रॉसीटी कायदा कडक करावा, अशी मराठा समाजाने मागणी करावी. आम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी करतो, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाइं) राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी मंगळवारी केले.

गुंडू गोविंद देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट व रिपाइंतर्फे आयोजित सामाजिक सलोखा परिषद व रत्न‌गुंज समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला.

डॉ. गवई म्हणाले, ‘अॅट्रॉसीटी कायदा कडक करावा, यासह विविध मागण्यांसाठी १२ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. राजकीय हेव्यादाव्यातून अॅट्रॉसीटीचा गैरवापर करण्यास भाग पाडले जाते, हे वास्तव आहे. मात्र रिपाइंने कधीही या कायद्याचा चुकीचा वापर केलेला नाही. दलित बांधवांना चांगल्या वकिलांची फी परवडत नसल्याने या कायद्यातर्गंत दाखल होणारे गुन्हे सिद्ध होत नाहीत. या कायद्याचे खटले चालवण्यासाठी सरकारकडून मोफत चांगले वकील मिळावेत. जातीजातीमध्ये अंतर निर्माण होईल, अशी सध्याची परिस्थिती आहे. अशावेळी राज्यभर आम्ही सलोखा परिषद भरवत आहोत.’

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, जातीजातीमधील दरी वाढण्यासाठी एक प्रवृत्ती राज्यात काम करत आहे. अशावेळी सामाजिक सालोख्यासाठी उपक्रम राबवणे काळाची गरज आहे. त्यासाठी डॉ. गवईंनी पुढाकार घेतला आहे. राजकारणातून अॅट्रॉसीटी कायद्याचा गैरवापर होतो, असल्याचेही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.’

यावेळी रणजित माजगावकर, डॉ. रेश्मा पवार, पी. एस. कांबळे, भाऊ काळे, ए. डी. पाटील, प्रा. ए. आर. पाटील, मधुकर सावंत, राजेंद्र पाटील, डी. ए. पाटील, उदय भोसले आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, आनंद देशमुख आदी उपस्थित होते. विश्वास देशमुख यांनी स्वागत केले. पी. एन. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. ताज मुल्लाणी यांनी सूत्रसंचालन केले. अशोक देशमुख यांनी आभार मानले.

पहिले तुम...

माजी आमदार पाटील आणि डॉ. गवई दोघांत पहिल्यांदा कोण बोलणार, यावरून व्यासपीठावर जणू काही वेळ स्पर्धाच रंगली. मी पहिला बोलल्यानंतर तुम्हाला सोपे जाईल, असे पाटील म्हणत होते. याउलट मी पहिल्यांदा बोलल्यानंतर तुम्हाला कठीण जाईल, असे डॉ. गवई म्हणत होते. शेवटी पाटील माघार घेतले. डॉ. गवई यांचे पहिल्यांदा भाषण झाले. भाषणात त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे चिमटे काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीत राजकीय धमाके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने ऐन दिवाळी​त राजकीय फटाके जोरात वाजणार आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे फटाके वाजवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना व काँग्रेसचे नेते सध्या थंड असले तरी सध्या ते बार भरत असल्याचे समजते. यामुळे या दिवाळीत राजकीय फटाक्यांचा आवाज चांगलाच कडाडण्याची चिन्हे आहेत.

सध्या जिल्ह्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. येत्या २७ नोव्हेंबरला नगरपालिकेसाठी मतदान होत आहे. नऊ नगरपालिका असल्या तरी सध्या कोणत्याच नगरपालिकेत एकतर्फी सत्ता येईल असे कोणत्याही पक्षात वातावरण नाही. दोन्ही काँग्रेसमधील गटबाजी आणि भाजपमध्ये वाढलेली आवक या पार्श्वभूमीवर सर्वच नगरपालिकांत चुरशीच्या लढती होणार आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाने घेतलेल्या नव्या भूमिकेने पन्हाळा, मलकापूर, पेठवडगाव या नगरपालिकांची राजकीय समीकरणे बदलली आहेत. या सर्व ठिकाणी जनसुराज्य व राष्ट्रवादी यांची आघाडी होती. आता मात्र ही आघाडी राहणार नाही. मलकापुरात राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत घेण्याचे ठरवले आहे. पेठवडगाव आणि पन्हाळा येथे मात्र हा पक्ष एकाकी पडला आहे.

जिल्ह्यातील राजकीय संदर्भ बदलल्याने यंदाच्या दिवाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अधिक झडणार आहेत. वीस वर्षांची आमदार हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांची राजकीय मैत्री तुटली आहे. पन्हाळा नगरपालिकेतील राजकारण व दत्त आसुर्ले कारखाना यामुळे या मैत्रीत दरार आला आहे. एकमेकांविषयी गौरवोद्गगार काढणारे हे नेते आता काय बोलणार याची उत्सुकता आहे. कोरे आणि समरजितसिंह घाटगे यांना सोबत घेऊन भाजपने मुश्रीफांना चक्रव्यूहात अडकवले आहे. त्यांचा ​अभिमन्यू झाल्याने त्यांनी आता चक्रव्यूह भेदण्यासाठी राजकीय फटाके वाजवण्यास सुरुवात केली आहे. कमळाला चिखलातच घालणार, नोकरी व देणगीसाठी भेटू नये, असा फलक मी लावलेला नाही, अशा शब्दांत मुश्रीफांचे फटाके वाजत आहेत. दिवाळीपूर्वीची ही एक झलक आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेदेखील यात मागे राहिले नाहीत. दोन्ही काँग्रेसमध्ये काही शिल्लक ठेवणार नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

इचलकरंजीत काँग्रेस अर्थात आवाडेंविरोधात इतर सर्वजण एकत्र आले आहेत. शहर विकास आघाडीच्या नावाखाली एकत्र आणण्यात भाजपने पुढाकार घेतला आहे. अशोक स्वामी भाजपमध्ये आल्याने आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपसोबतच राहण्याची शक्यता असल्याने इचलकरंजी पालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादी आणि जनता दल एकत्र येण्याची शक्यता आहे; पण राष्ट्रवादीशी चर्चा न करताच स्वाती कोरी यांची उमेदवारी जाहीर केल्याने राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे; पण दुसरा पर्याय नसल्याने सध्या जनता दलाशी जुळवून घेण्याचीच शक्यता आहे. कुरुंदवाडमध्ये पाच नगरसेवकांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढली असली तरी जयसिंगपुरात मात्र मोठे आव्हान उभे आहे.

नऊ नगरपालिकांसाठी सर्वच पक्ष रिंगणात उतरणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी थेट लढत आहे. यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची परीक्षा आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे प्रचारात उतरणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार मुश्रीफ सक्रिय झालेलेच आहेत. खासदार धनंजय महाडिक, निवेदिता माने सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी​, माजी मंत्री विनय कोरे, सेनेचे विजय देवणे या निवडणुकीच्या नियोजनात आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नऊ नगराध्यक्ष भाजपचे असतील असे सांगून आपला इरादा स्पष्ट केला आहे. आता मुश्रीफ आणि पाटील यांनी तोफा डागण्यास सुरुवात केली आहे. आणखी काही नेते प्रचारात उतरण्याच्या तयारीत आहेत. अर्ज भरण्याची आणि माघारीची मुदत संपताच राजकीय फटाके मोठ्या प्रमाणात कडाडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निर्वाण लाडू’ने दिवाळीस प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जैन समाज प्रथेनुसार भगवान महावीर यांच्या चरणी निर्वाण लाडू अर्पण करून यंदाही दिवाळीला प्रारंभ करणार आहे. ‌या पार्श्वभूमीवर घराघरांत निर्वाण लाडू तयार करण्याची धांदल सुरू आहे. ३० ऑक्टोबरला भगवान महावीर यांना निर्वाण लाडू अर्पण केल्यानंतर मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाणार आहे. भारतीय जैन समाज संघटनेच्या पुढाकाराने वंचित, गरीब लोकांना दिवाळीसाठी फराळाचे साहित्य देण्याचे नियोजन केले आहे.

प्रत्येक समाजाचे दिवाळी साजरी करण्यामध्ये काहीतरी वेगळेपण असते. प्रथा, परंपरा वेगळ्या असतात. जैन समाजाचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या निर्वाणदिनाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे सर्व जैनबांधव ३० ऑक्टोबरला निर्वाण लाडू जवळच्या मंदिरातील भगवान महावीरांच्या चरणी अर्पण करतील. त्यासाठी बाहुबली व अन्य भगवान महावीरांच्या मंदिरात प्रचंड गर्दी होणार आहे. पहाटे पाचपासून निर्वाण लाडू अर्पण करण्यासाठी जैन बांधव येतील. ‌निर्वाण लाडू अर्पण केल्यानंतरच घरात केलेला फराळ खाण्याला सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर खरी दिवाळी सुरू होईल.

शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश जैन समाज व्यापार, उद्योगात आहे. गेल्या आठ दिवसांपासून दुकान, कारखान्यांत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. लक्ष्मीपूजनादिवशी पूजा, सजावट केली जाते. वहीपूजनानंतर जुन्या वहीतील व्यवहाराच्या नोंदी नव्या वहीत घेतल्या जातात. शेती, व्यवसायांमधील नव्या कामांचा मुहूर्त केला जातो. कौटुंबिक पातळीवर भाऊ‌बीज साजरी केली जाते. जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना भेटून शुभेच्छा दिल्या जातात. स्नेहबंध वाढविण्यासाठी भेटवस्तू दिली जाते. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि पुढील वर्षभरातील महत्त्वाच्या नियो‌जित कामांवर चर्चा केली जाते. एखाद्या दिवशी सहकुटुंब जवळच्या एका पर्यटन किंवा धार्मिकस्थळाला भेट दिली जाते.

शहरातील जैन समाजातील महिलांचे सं‌गिनी फोरम आहे. या फोरमतर्फे २३ ऑक्टोबरला महापालिकेच्या टाकाळा विद्यामंदिर शाळेत आकाश कंदील व डिजिटल पेंटिंग शिकवण्याचे वर्ग घेण्यात आले. फोरमच्या महिलांनी गेल्या रक्षाबंधनदिवशी सीमेवर जाऊन ‌जवानांना राख्या बांधल्या. वर्षभर महिलांसंबंधित विविध उपक्रम साजरे केले जातात. जैन सोशल ग्रुपतर्फे वंचितांना फराळ मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस स्फोटातीलमुलीचाही मृत्यू

$
0
0

इचलकरंजी

गॅस स्फोटात जखमी झालेल्या पूजा आवळकर हिचा मंगळवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. वडील पांडुरंग आवळकर यांच्या पाठोपाठ मुलीचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सात दिवसापूर्वी येथील सुतारमळा परिसरात राहणाऱ्या पांडुरंग आवळकर यांच्या घरी गॅस गळती होऊन मोठा स्फोट उडाला होता. त्यामध्ये पांडुरग आवळकर यांच्यासह पत्नी गीता, मुलगी पूजा व मुलगा गौतम असे चौघेजण गंभीर जखमी झाले होते. या सर्वांवर सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी पांडुरंग आवळकर यांचा मृत्यू झाला. त्याला चोवीस तासाचा अवधी उलटण्यापूर्वीच मुलगी पूजाचाही मृत्यू झाला. वडीलांपाठोपाठ मुलीचाही मृत्यू झाल्याने आवळकर कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशभक्ती महाराष्ट्राच्या रक्तातच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी यांनी स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा दिली. राजर्षी शाहू महाराजांनी राजा लोकांसाठी असतो असा मार्ग दाखवला. देशभक्ती व संस्कार हे महाराष्ट्राच्या रक्तातच असून देशातील अन्य राज्यांनी महाराष्ट्राकडून शिकवण घेतली पाहिजे,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय दहशतवादविरोधी संघटनेचे अध्यक्ष मनिंदरजितसिंग बिट्टा यांनी केले. कोल्हापूर वुई केअर आयोजित ‘एनजीओ कॉम्पेशन २४’ कार्यक्रमात ते बोलत होते.

बिट्टा यांच्या उपस्थितीत १२०० विद्यार्थ्यांचे पालकत्व व शहीद जवानांच्या वीरपत्नी, नातेवाईक व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, युवराज्ञी संयोगीताराजे, लेखा मिणचेकर व सचिन शहा प्रमुख उपस्थित होते.

बिट्टा म्हणाले, ‘पाकिस्तानने खलिस्तान चळवळीला पाठिंबा दिला होता. यावेळी जनतेचा आवाज उठवण्यासाठी अँटी टेरिरिस्ट ऑर्गनायझेशनच्यावतीने हजारो तरुणांसमवेत रस्त्यावर उतरलो. जीवघेणे हल्ले झाले. गंभीर जखमी झालो, पण देशभक्ती रक्तात भिनली असल्याने चळवळ सोडली नाही. इतर राज्याच्या तुलनेत देशभक्ती व संस्कृती महाराष्ट्रात जास्त दिसली. त्यामुळे महाराष्ट्र कमजोर झाला तर देश कमजोर होईल. देशाच्या सीमेवर सैन्य लढत असताना पुरावा मागणाऱ्यांची किव येते. अंतर्गत सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी. ’

खासदार महाडिक म्हणाले, ‘कोल्हापूर वुई केअरने सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या सामाजिक प्रश्नांवर चर्चा करताना जिल्ह्यातील १२०० मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. शहीद जवानांच्या कुटुंबांना मदतीचा हात पुढे केला जाईल.’

संयोगीताराजे म्हणाल्या, ‘जवानांच्या कुटुंबाचे रक्षण करणे व त्यांना मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याचबरोबर मुलींवर अन्याय होऊ नये यासाठी घरातूनच मुलांवर व तरुणांवर संस्कार घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.’ सचिन शहा यांनीही मत मांडले. कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऊसदरासाठी ५ नोव्हेंबर डेडलाईन

$
0
0

जयसिंगपूर

मागील गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३०० रूपये दुसरा हप्ता द्यावा, यावर्षीच्या हंगामात प्रतिटन विनाकपात, एकरकमी ३२०० रूपये पहिली उचल द्यावी, अशा मागणीचा ठराव जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पंधराव्या ऊस परिषदेत करण्यात आला. सरकारने ऊस दराच्या प्रश्नात शेतकरी व कारखानदार यांच्यात मध्यस्थी करून ५ नोव्हेंबरपर्यंत तोडगा काढावा. यंदा उसाला सोन्याचा भाव मिळणार आहे, यामुळे कारखादारांनी ऊसदर जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांनी उसाला कोयता लावू देऊ नये, असे आवाहन संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केले.

येथील झेले चित्रमंदिरलगतच्या मैदानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १५ वी ऊस परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक होते. परिषदेला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, डॉ. जालंदर पाटील, हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, मालेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, कर्नाटक रयत परिषदेचे अध्यक्ष हुडीहळ्ळी चंद्रशेखर आदी प्रमुख उपस्थित होते.

खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘गेल्या वर्षीची साखर देशभरात शिल्लक नाही. त्यामुळे या वर्षी उत्पादित होणाऱ्या साखरेला दर चांगला मिळणार आहे. त्यातच सरकारने परदेशातून आयात होणाऱ्या साखरेवर ४० टक्के आयात कर बसविला आहे. त्यामुळे फारशी साखर आयात होण्याची शक्यता नाही. यंदा ऊस मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. परदेशातून साखर आयात केल्यास दर ५४ रुपयांवर पोहचतील. साखरेचे दर भविष्यात कमी होणार नाहीत. यामुळे कष्टाने पिकविलेल्या उसाला सोन्याचा भाव मिळविला पाहिजे. ऊस परिषदेतील निरोप सरकारने कारखानदारांपर्यंत पोचवावा व पाच नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्यावा. आम्ही चर्चेचे दरवाजे खुले ठेवले आहेत. कोणत्याही दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांनी उसाच्या तोडी घेऊ नयेत. साखरेच्या कणाकणाचा हिशेब आपण मिळवून देऊ.’

शेट्टी पुढे म्हणाले,‘ सगळेच साखर कारखानदार एकसारखे नाहीत. काही कारखानदार एफआरपीपेक्षाही जास्त दर देतात. मग इथेनॉल, स्पिरीट, वीज, मोलॅसिस अशी इतर उत्पादने घेणाऱ्या कारखानदारांना एफआरपी देणे का जमत नाही? आम्ही सहकारी क्षेत्र बुडविण्यासाठी आंदोलने करतो, असा आरोप होतो. पण राज्यातील सर्व खासगी कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे व्हावेत, असे आमचे धोरण आहे. कारखाने सहकारी असताना आजारी पडतात. पण तेच कारखाने खासगी कारखानदारांनी विकत घेतल्यानंतर उत्तम चालतात. हे कसे काय? जे कारखाने कवडीमोल दराने विकले गेले, त्यांच्याविरोधात पोलिसांसह उच्च न्यायालयातही दाद मागणार आहे.’

विरोधकांचा समाचार घेताना खासदार शेट्टी म्हणाले, ‘आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक गुन्हे अंगावर घेतले. पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. आता शेतकऱ्यांचा कळवळा वाटणाऱ्यांनी किती गुन्हे अंगावर घेतले, हे स्पष्ट करावे. अजित पवार हे राज्यातील मोठ्या पक्षाचे नेते आहेत. बळीराजा त्यांच्याकडेही आशेने पहात आहे. त्यांनीही आपल्या कारखान्यांना उच्चांकी दर द्यायला सांगावे.’

विरोधकांवर टीकेची झोड उठविताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ‘गेल्या पंधरा वर्षांत ऊसदराचा प्रश्न त्यांनी सोडविला नाही. ते काम आम्ही केले. शिक्षणसंस्था काढायला, घोटाळे करायला, धरणे गिळायला आम्हाला जमले नसेल. मात्र, आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून तुरुंगात गेलो. हाच त्यांच्यात व आमच्यात फरक आहे. गेल्या वर्षी साखरेचे दर घसरले असताना आम्ही एफआरपीचा आग्रह धरला. ८०-२० चा फॉर्म्युला मान्य केला. यामुळे ९७.५ टक्के शेतकऱ्यांना एफआरपी मिळाली. माझ्यासारखा फाटका माणूस मंत्री झाल्याने काहीजणांच्या पोटात दुखत आहे. आम्हाला केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करायचे आहे. त्यानुसार बाजारपेठेतील दलालांची मक्तेदारी मोडीत काढून शेतीमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली. संत सावता माळी यांच्या नावाने अभियान सुरू केले.’

खोत म्हणाले, ‘ मी भ्रष्टाचारासाठी नव्हे, तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री झालो आहे. विरोधक ऊस, दूध या प्रश्नांवर आंदोलने करीत नाहीत. केवळ पुतळे जाळतात. त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये. आम्ही कारखानदारांचे दुश्मन नाही. हुतात्मा कारखान्याने २७७५, तर रंजन तावरे यांच्या कारखान्याने २८०० रुपये दर दिला. हे सरकार व चळवळ चांगल्या कारखानदारांच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री आमच्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे ते कारखानदारांना वठणीवर आणतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांची घालमेल वाढली

$
0
0

इचलकरंजी

नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन होण्याबरोबरच विविध तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. तर ऐनवेळची उपाययोजना म्हणून प्रशासनाने छापील हस्तलिखित अर्ज तयार ठेवले असून त्याची विक्री सुरु आहे. मात्र हस्तलिखित अर्जासंदर्भात निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्यातरी ऑनलाईन भरलेले अर्जच स्विकारले जात असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल झालेला नाही. तर जागा वाढपाचा तिढा सुटत नसल्याने इच्छुकांमध्ये घालमेल वाढली आहे.

इचलकरंजी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाचे असल्याने आधीच संभ्रमात असलेल्या इच्छुकांसह विद्यमान सदस्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आयोगाने दोन वेबसाईट दिल्या आहेत. मात्र सोमवारपासून सर्व्हर डाऊनची समस्या वारंवार निर्माण होत आहे. शिवाय अर्ज भरल्यास प्रिंट काढल्यानंतर त्यातील एखादा रकाना रिकामाच राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. तर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर तो सबमिट वर क्लिक करतानाही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे इच्छुकांमधून ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत नाराजीचा सूर दिसून येत आहे.

दरम्यान, राजकीय पक्षांतील जागा वाटपातील तिढा अद्यापही कायम राहिल्याने इच्छुकांची घालमेल वाढत चालली आहे. भाजपप्रणित शहर विकास आघाडीशी मँचेस्टर आघाडीने हातमिळवणी केल्याने त्यांच्यातील जागा वाटपाची समस्या दूर झाली असली तरी उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे. तर सलग तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय व राष्ट्रवादी काँग्रेस मदन कारंडे गट यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. आवाडे आणि कारंडे यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरु असल्यातरी कोणती जागा राष्ट्रवादीला जाणार याबाबत उत्सुकता कायम आहे

...

चौकट

अखेरच्या दिवसांत होणार गर्दी

गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशीदेखील एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता चौगुले व सहायक निवडणूक अधिकारी तानाजी नरळे यांनी दिली. २९ ऑक्टोबर रोजी अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी असून शेवटच्या तीन दिवसात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज भरण्याच्या पद्धतीचा बारकाईने अभ्यास करताना दिसत आहेत. परिणामी सर्वच कागदपत्रांच्या जुळवाजुळवीत ते गुंतले आहेत. निवडणूक आयोगाने आपली यंत्रणा सज्ज ठेवली असून पालिका कार्यालयात अर्ज भरण्यासह उमेदवारांना मदत व्हावी यासाठी ‘हेल्पडेस्क’ ची व्यवस्था केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसाला एकरकमी ३२०० द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

‘यंदाच्या हंगामात प्रतिटन विनाकपात, एकरकमी ३२०० रूपये पहिली उचल द्यावी’, या मागणीचा ठराव मंगळवारी जयसिंगपूर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पंधराव्या ऊस परिषदेत करण्यात आला. सरकारने ऊसदराच्या प्रश्नात शेतकरी आणि कारखानदारांमध्ये मध्यस्थी करून ५ नोव्हेंबरपर्यंत तोडगा काढावा. ‘यंदा उसाला सोन्याचा भाव मिळणार आहे. त्यामुळे कारखादारांनी दर जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांनी उसाला कोयता लावू देऊ नका’, असे आवाहन संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी केले.

झेले चित्रमंदिरलगतच्या मैदानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १५ वी ऊस परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक होते. परिषदेला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर आदी प्रमुख उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘देशभरात गेल्यावर्षीची साखर शिल्लक नाही. त्यामुळे यंदाच्या साखरेला चांगला दर मिळेल. सरकारने साखर आयातीवर ४० टक्के कर बसविला आहे. त्यामुळे फारशी आयात होणार नाही. यंदा ऊस मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आम्ही चर्चेचे दरवाजे खुले ठेवले आहेत. दबावाला बळी पडू नका. साखरेच्या कणाकणाचा हिशेब मिळवून देऊ.’ ‘अजित पवार हे राज्यातील मोठ्या पक्षाचे नेते आहेत. बळीराजा त्यांच्याकडेही आशेने पहात आहे. त्यांनीही कारखान्यांना उच्चांकी दर द्यायला सांगावे’ असा टोलाही त्यांनी लगावला.

विरोधकांवर टीकेची झोड उठविताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ‘गेल्या पंधरा वर्षांत ऊसदराचा प्रश्न त्यांनी सोडविला नाही. ते काम आम्ही केले. शिक्षणसंस्था काढायला, घोटाळे करायला, धरणे गिळायला आम्हाला जमले नाही. मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री झालो आहे. विरोधक ऊस, दूध या प्रश्नांवर आंदोलने करीत नाहीत. केवळ पुतळे जाळतात. त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये. आम्ही कारखानदारांचे दुश्मन नाही. मुख्यमंत्री कारखानदारांना वठणीवर आणतील.’

उरी हल्ल्यात हुतात्मा झालेले जवान, ऊस आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. ऊस परिषदेवर दु:खाचे सावट असल्याने सत्कारांना फाटा देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीआयपी दर्शनप्रकरणी ७ नोव्हेंबरला सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शारदीय नवरात्रोत्सव काळात श्री अंबाबाई मंदिरात‌ व्हीआयपी दर्शन देऊन न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मंगळवारी दिवाणी न्यायाधीश ए. ए. यादव यादव यांच्यासमोर सुनावणी झाली. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली असून याप्रकरणी पुढील सुनावणी ७ नोव्हेंबरला होणार आहे.

श्री अंबाबाई मंदिरात दर्शन रांग सोडून अन्य कोणत्याही मार्गाने कोणालाही दर्शन देऊ नये, असा आदेश १५ ऑक्टोंबर, २०१२ रोजी तिसरे दिवाणी न्यायाधीश एस. एस. जगताप यांनी दिला होता. तसेच जिथून व्हीआयपी दर्शन दिले जाते तेथे न्यायालयाच्या सूचनेचा फलकही लावण्यात आलेला आहे. तरीही यंदा नवरात्रोत्सवात सर्रास व्हीआयपी दर्शन दिले जात असल्यामुळे श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी १९ ऑक्टोंबरला याचिका दाखल केली. याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष व जिल्हाधिकारी अमित सैनी व पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. मंगळवारी कसबा बावडा येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या वक‌िलांनी बाजू मांडण्यासाठी मुदत मागितली असून पुढील सुनावणी सात नोव्हेंबरला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजित पवार पुन्हा घसरले, पवारांशी केली तुलना

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। सोलापूर

आपल्या रोखठोक बोलण्यामुळे अडचणीत सापडणारे आणि वाद ओढवून घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपली तुलना थेट शरद पवार यांच्याशीच केली आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, 'शरद पवार चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र तरीही बारामतीमध्ये प्रादेशिक वाहतूक कार्यालय येऊ शकले नाही. मात्र मी उपमुख्यमंत्री होताच बारामतीमध्ये प्रादेशिक वाहतूक कार्यालय आले.'

मात्र, आपण स्वत:ची तुलना शरद पवार यांच्याशी करत आहोत हे अजित पवार यांच्या तात्काळ लक्षात आले आणि त्यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ' शरद पवारांचे लक्ष राज्यात होते, देशात होते. म्हणूनच त्यांना बारामतीमध्ये प्रादेशिक कार्यालय आणणे शक्य झाले नसेल. नाहीतर उद्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर अजित पवार घसरले अशी हेडलाइन येईल', असे म्हणत त्यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ‘प्रत्येक सभेच्या सुरूवातीला मी नीट बोलायचे ठरवतो’, अशा शब्दांत त्यांनी स्वत:वर मिश्किल कोटी करत वातावरण हलकेफुलके करण्याचा प्रयत्न केला.

अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

आपल्या रोखठोक आणि मिश्किल शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवार यांनी वादग्रस्त विधाने करून अनेकदा वाद ओढवून घेतला आहे. आपल्या वक्तव्यांची राज्यभर उलटसुलट चर्चा झाल्यानंतर त्यांनी यापुढे जपून बोलण्याचा निश्चय केला होता. सोलापुरातील एका कार्यक्रमात चारच महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना 'जपून बोला' असा सल्ला दिला होता. तर जूनमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जपून बोलण्याचा सल्ला देताना ते म्हणाले होते, ‘दुधाने तोंड पोळल्यामुळे माझ्यावर आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिभेवर नियंत्रण ठेवा आणि काळजीपूर्वक बोला. कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्या’.

शिवसेना-मनेसवरही टीका

अजित पवार यांनी अकलूज येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेना आणि मनसेचाही समाचार घेतला. 'पाकिस्तानी कलाकारांच्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांनी काय ५ कोटींत तोडपाणी केली काय?, असा थेट सवाल उपस्थित करत या पक्षांचे अस्तित्व आता संपत चालल्याचे म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानी खेळाडूंना खेळू न देण्याचा इशारा दिल्या नंतर ते असे पर्यंत पाकिस्तानी खेळाडूंना मुंबईत खेळू दिले नव्हते याची आठवणही त्यांनी करून दिली.

राज्याच्या मंत्र्यांवरही हल्लाबोल

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी मोबाईल बंद ठेवण्याचे निरोप त्यांच्या सचिवांकडून दिले जातात आणि हे मंत्री गप्प बसून ते ऐकून घेतात. असे हे मंत्री काय विकास करणार, असे म्हणत, हे सरकार सहकारी आणि शिक्षण संस्था मोडीत काढू लागले असून काही मंत्रीच आता खाजगी जागा घेऊन बाजार समित्या काढू लागले आहेत. आता शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी केला .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुद्दा आहे जग बदलण्याचा’चे प्रकाशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘प्रस्थापित व्यवस्थेला नकार देत, पर्यायी व्यवस्था कशी निर्माण केली पाहिजे, चळवळीतील संघर्ष कसा लढायला हवा याची दिशा देणारे ‘मुद्दा आहे जग बदलण्याचा’ या पुस्तकातून होत असल्याचा विचार तरुणांनी मांडला. शाहू स्मारक भवनातील मिनी सभागृह येथे ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर लिखित ‘मुद्दा आहे जग बदलण्याचा’ पुस्तक प्रकाशन समारंभ चळवळीतील कृतिशिल तरुणांच्या हस्ते करण्यात आला. चिंतामणी कांबळे, सुधीर नलवडे, समीर कोळी, मैत्रयी कमल, वैभव कांबळे, प्रा. डॉ. अमर कांबळे, कॉ. संपत देसाई व रणजित कांबळे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.

चिंतामणी कांबळे म्हणाले, ‘जातीयव्यवस्था मोडीत काढण्यासाठी आंतरजातीय विवाह अशा गोष्टींना पुढाकार देण्याची गरज आहे, मात्र आजही समाजातील जातीयव्यवस्था नष्ट झालेली नाही हे दुर्देव आहे. शोषितांनी संघटीत होऊन संघर्ष केला पाहिजे.’

सुधीर नलवडे म्हणाले, ‘गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून काम सुरू आहे, मात्र ते दिशाहीन पद्धतीने सुरु होते. ‘मुद्दा आहे जग बदलण्याचा’ या पुस्तकामुळे खऱ्या अ‌र्थाने युवकांना दिशा मिळाली आहे. जातीयव्यवस्था मोडण्यासाठी, पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे याची उत्तरं या पुस्तकातून मिळतात.’

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानंतर प्रा. डॉ. अमर कांबळे, कॉ. संपत देसाई व रणजित कांबळे यांनी पाटणकरांची प्रकट मुलाखत घेतली. विचारांची माणसं घडविण्यासाठी आणि चळवळीच्या माध्यमातून शोषण व्यवस्थेविरोधात संर्घष करण्याचा प्रवास पाटणकर यांनी मांडला.

निर्मिती विचारमंचचे अनिल म्हमाने यांनी प्रास्ताविक केले. सुनील कांबळे व मच्छिंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. तर अमोल महापुरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंत पाटील गटाला खिंडारकट्टर समर्थक निशिकांत पाटील शेट्टींच्या गळाला

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी इस्लामपुरात आमदार जयंत पाटील गटाला अखेर खिंडार पाडले. जयंत पाटील यांचे खंदे समर्थक निशिकांत पाटील यांनी बुधवारी शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय विकास आघाडीत प्रवेश केला. विकास आघाडीच्या वतीने निशिकांत पाटील यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित करण्यात आले आहे. निशिकांत पाटील यांच्या प्रवेशामुळे इस्लामपूर शहर आणि ऊरुण परिसरातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

मागील २०-२२ वर्षांपासून निशिकांत पाटील जयंत पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय समर्थक म्हणून ओळख आहे. त्यांनी प्रकाश शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आयुर्वेदीक मेडीकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज चालवले आहे. यंदा त्यांनी एमबीबीएस कॉलेज सुरू केले आहे. वीज कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर काम केले आहे. एक अत्यंत शांत, संयमी आणि उत्तम संघटन कौशल्य असलेला कार्यकर्ता विकास आघाडीत गेल्यामुळे जयंत पाटील गटाला हा मोठा हादरा बसला आहे. तर विकास आघाडीला नगराध्यक्षपदाचा तुल्यबळ उमेदवार मिळाल्यामुळे आघाडीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, नानासाहेब महाडीक म्हणाले, यापूर्वी आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वजण लढत होता. आता आमच्या सोबत राष्ट्रवादीचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे आता आम्ही सर्वपक्षीय एकत्र आलो आहोत. आजच्या बैठकीला शिवसेनेचे आनंदराव पवार उपस्थित राहिले नाहीत. त्यांची नितीन बानुगडे पाटील यांच्यासोबत बैठक होती. रमाडा हॉटेलमध्ये शिवसेनेची बैठक सुरू होती.

या वेळी वनश्री नानासाहेब महाडीक, विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील, जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, राहुल महाडीक, विजय कुंभार यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडीक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, अरुण कांबळे, बाबा सूर्यवंशी, सनी खराडे, वैभव पवार, विजय पवार, एल. एन. शहा उपस्थित होते.

परिवर्तन नक्कीः सदाभाऊ खोत

येथील हॉटेल रमाडामध्ये बुधवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ‘केंद्रात आणि राज्यात आता आमच सरकार आहे. कुणी अस समजू नये की, निधी फक्त आम्हीच आणू शकतो. नगरपालिकेत यांनी ३१ वर्षे सत्ता भोगली. यांनी ३१ वर्षांत जेवढा निधी आणला नाही, तेवढा आम्ही एक वर्षात आणू. इस्लामपूर शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहोत. शैक्षणिक सुविधां बरोबरच औद्योगीक, आरोग्य आणि नागरिकांना उच्च दर्जाच्या प्राथमिक सुविधा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध राहू. नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशी व्यवस्था करू. आपली मालमत्ता सुरक्षित आहे का हे पाहण्यासाठी त्यांना प्रत्येक महिन्याला उतारा काढून बघण्याची गरज राहणार नाही. आघाडीसाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री पतंगराव कदम, रामदास आठवले, खासदार राजू शेट्टी या सर्व नेत्यांशी चर्चा केली आहे. नक्की परिवर्तन घडेल.’

निधीचा नीट वापर झाला नाहीः पाटील

निशिकांत पाटील म्हणाले, ‘मी गेल्या २२ वर्षांपासून जयंत पाटील यांच्यावर निष्ठा ठेवली. जयंत पाटील यांनी शहरासाठी खूप निधी आणला मात्र, त्यांच्या येथील कारभाऱ्यांनी त्याचा वापर नीट केला नाही. आलेल्या निधीचा वापर जनतेसाठी झाला असता तर खूप काम उभे राहिले असते. याची खंत शहरातील जनतेला आहे. इस्लामपूर शहर मॉडेल म्हणून विकसित करुया. सत्ताधारी मंडळींनी गेल्या ३१ वर्षांत सध्या मुलभूत सुविधाही दिल्या नाहीत. यापुढे पाच वर्षांत विकास काय असतो ते शहराला दाखवून देऊ.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘निष्ठा, कामाला किंमत नाही, पैसाच श्रेष्ठ’दिलीप पाटील यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ

$
0
0

‘निष्ठा, कामाला किंमत नाही, पैसाच श्रेष्ठ’

दिलीप पाटील यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

‘राजकारणात निष्ठा, काम व चारित्र्यला किंमत नाही. शेवटी पैसा श्रेष्ठ आहे, हे मला चाळीस वर्षांनी समजले. दरोडे घालून, भ्रष्टाचार करून वाम मार्गाने पैसे मिळवा, राजकारणी नेते तुम्हाला पायघड्या घालतील,’ अशी पोस्ट फेसबुकवर टाकून दिलीप पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे. सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते असलेले दिलीप पाटील सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून इच्छुक होते. त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दिलीप पाटील म्हणाले, ‘उमेदवारी देताना पैशाचे मेरीट लावले जाते. चांगुलपणा, पक्षनिष्ठेला किंमत राहिली नाही. पैशाचे मेरीट लावून उमेदवारी दिली तर आम्हाला दरोडेच घालावे लागतील. पक्षाच्या या धोरणाने आमचा सनदशीर राजकारणावरील विश्वास उडाला आहे.’

सांगली-सातारा विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी पाटील यांनी पक्षाकडे रीतसर उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील माण-खटावचे शेखर गोरे यांना उमेदवारी दिल्याने पाटील नाराज झाले आहेत. पक्ष आणि पवार कुटुंबावर त्यांची निष्ठा होती. मात्र, गेल्या ४०वर्षांपासून पवार साहेबांच्या आदेशानुसार आमदार जयंत पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले आहे. पक्ष वाढीसाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात योगदान दिले आहे. वस्त्रोद्योग महासंघाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर आपली वगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्हा बॅँकेत काम करताना वर्षभरातच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. तरीही उमेदवारी डावलल्याने त्यांनी थेट नाराजी जाहीर केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मण सभा करवीरतर्फे पाठांतर स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ब्राह्मण सभा करवीरतर्फे अ. र. लाटकर यांच्या स्मरणार्थ बालवाडी पाठांतर स्पर्धा झाली. स्पर्धेत साडेपाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. छोट्या गटात वैभव क‌िणेकर आणि मोठ्या गटात प्रांजल कुराडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

स्पर्धेचा बक्षिस समारंभ संस्थेच्या मंगलधाम हॉलमध्ये झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. रघुनाथ लाटकर होते. पंचगंगा बँकेचे अध्यक्ष विकास परांजपे, गिरीधर जोशी, श्रीपाद कुलकर्णी, हरिश्चंद्र अष्टेकर उपस्थित होते. विजेत्यांना रोख बक्षिस, सहभागींना प्रशस्तीपत्रक व पुस्तके भेट देण्यात आली. संचालक नंदकुमार मराठे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष डॉ. उदय कुलकर्णी यांनी स्वागत केले. श्रीकांत लिमये यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका वृषाली कुलकर्णी यांनी आभार मानले. श्रीराम धर्माधिकारी, संतोष कोडोलीकर, संचालक अॅड. विवेक शुक्ल, अशोक कुलकर्णी, किरण धर्माधिकारी, सतीश कुलकर्णी, रामचंद्र टोपकर, अनुराधा गोसावी उपस्थित होते.

निकाल : छोटा गट - वैभवी किणेकर, प्रथमेश ओगले, पार्थ सुतार, आदिश कुलकर्णी, अनन्या रायरीकर. उत्तेजनार्थ राजवीर माने, सोहम पाटील, स्वराज पाटील. मोठा गट - प्रांजल कुराडे, रत्नदीप पुंडपळ, अमेय पाटील, चैत्राली कुलकर्णी, श्रेया गुरसाळे. उत्तेजनार्थ स्निहती वडेर, अर्णव पटवर्धन, जान्हवी कुरुंदवाडे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढील हंगामासाठी एफआरपीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय कृषीमूल्य आयोगाने पुढील ऊस हंगामासाठी एफआरपीत वाढ सुचवली आहे. मात्र ही वाढ सुचवत असताना रिकव्हरीचा पहिला स्लॅब साडेनऊ टक्क्याऐवजी साडेदहा करण्याचे प्रयत्न आहेत. यामुळे भविष्यात तीव्र संघर्ष होऊ शकतो, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. याबाबत शेट्टी यांनी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष विजय पॉल शर्मा बुधवारी भेट घेऊन चर्चा केली.

गेल्या दोन वर्षांपासून एफआरपी वाढवलेली नाही. महागाई वाढत असताना एफआरपी वाढली नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत होता. पुढील हंगामाची एफआरपी यंदाचा हंगाम सुरू असताना जाहीर केली जाते. त्यासाठी गेल्या आर्थिक वर्षातील साखर दराचा विचार केला जातो. यानुसार सध्या सुरू असलेल्या हंगामातील साखरेचा दर चांगला आहे. त्यामुळे पुढील हंगामातील एफआरपी वाढलेली असणार हे स्पष्ट होते. त्यानुसार आयोगानेही वाढ सुचवली आहे. ही शिफारस मंत्रीमंडळाकडे पाठवण्यात आली आहे. त्यावर तिथे निर्णय होईल.

वाढसुचवली जात असताना रिकव्हरीचा स्लॅब साडेनऊ टक्क्यांऐवजी साडेदहा टक्के करण्याचा प्रयत्न सुरू होता. हा स्लॅब वाढवल्यास रिकव्हरीच्या पुढील टक्केवारीचा गॅप कमी होईल व त्यातून ऊस दर कमी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी दबाव आणला जात असल्याची कुणकुण लागताच याबाबतचा निर्णय घेतल्यास भविष्यात शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला. मात्र अध्यक्ष शर्मा यांनी तशी शिफारस केली नसल्याचे स्पष्ट केले. याबरोबरच केवळ हमीभाव देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्याचे निर्णय घेण्याची अपेक्षा आयोगाकडे व्यक्त केल्या. शेतकऱ्याला प्राप्तीकर नाही. पण शेती माल प्रक्रिया, अॅग्रो प्रोड्युसर्स कंपन्यांना प्राप्तीकर लावला जात असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. या संस्थांमध्ये नफा घ्यायची स्पर्धा लावल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना लाभांशाच्या रुपातून होणार आहे. ही स्पर्धा होण्यासाठी प्राप्तीकरापासून सवलत मिळावी अशी अपेक्षा आयोगाकडे व्यक्त केल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्कशॉप कर्मचाऱ्याकडून लाखोंचा गैरव्यवहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेचा बुधवारी स्थायी समितीच्या सभेत वर्कशॉप विभाग पुन्हा रक्कमेच्या गैरवापरावरून टार्गेट ठरला. स्टोअरचा कर्मचारी अमरकुमार बिसुरे यांनी आठ लाखांच्या तसलमातपैकी चार लाख पन्नास पन्नास हजार रुपयांचा हिशोब दिला नाही. याबाबत बिसुरे यांना निलंबित करून चौकशी सुरू करावी यासाठी सदस्य आक्रमक झाल्यानंतर संबंधिताकडून व्याजासह रक्कम भरून घेऊ अशी ग्वाही प्रशासनाने दिली. अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव होते.

बिसुरे यांनी वर्कशॉपमधील रक्कम खासगी कामासाठी वापरल्याची कबुली देऊनही प्रशासनाने कारवाई का केली नाही? अशी विचारणा नगरसेवक सत्यजित कदम, अजित ठाणेकर, जयश्री चव्हाण यांनी केली. पहिल्या चार लाख तसलमातीचा हिशोब बाकी असताना पुन्हा साडेचार लाख रुपये का दिले? आम्ही सभेत विचारल्यावर अधिकारी जागे होणार का ? अशी विचारणा सदस्यांनी केली.

बिसुरे यांना जादा तसलमात दिल्याचे मुख्य लेखापाल संजय सरनाईक व सहायक आयुक्त सचिन खाडे यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर खाडे यांनी बिसुरे यांना बुधवारी आयुक्तांसमोर चौकशीसाठी उभे केले. बिसुरे यांनी खासगी कामासाठी रक्कम वापरल्याची कबुली दिली. तरीही त्याच्यावर अद्याप कारवाई का नाही अशी विचारणा करत सदस्यांनी सभेत अधिकाऱ्यांची कोंडी केली. यावर अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी, महापालिकेची वाहने आरटीओ विभागाकडून पासिंग करण्यासाठी बिसुरे यांना चार लाखांची तसलमात दिली होती. त्याचा हिशोब मिळाला आहे. त्याचवेळी त्यांनी आणखी साडेचार लाखांची तसलमात उचलली. हे पैसे खासगी कामासाठी वापरल्याचे लेखी पत्र दिल्याचे सांगितले. बिसुरे यांच्यावर तसलमात गैरवापरप्रकरणी कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केल्याचे यावेळी सांगण्यात आले. बिसुरे यांनी बुधवारपर्यंत (ता.२६) रक्कम न भरल्यास व्याजासह पैसे वसूल करू असे प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, उपायुक्त विजय खोराटे रजेवर होते.

सुभेदार, आजरेकरांमध्ये स्थायीत जुंपले

ट्रेजरी ऑफीस प्रभागातील महापालिकेच्या मालकीचे सभागृह म्हेत्तर समाजाला उपलब्ध करून देण्याचा सदस्य ठराव नगरसेविका निलोफर आजरेकर यांनी मांडला होता. यावर त्या प्रभागाच्या नगरसेविका मेहजबीन सुभेदार यांनी, ‘आजरेकर यांच्या ठरावावरून माझ्या प्रभागात तुमची ढवळाढवळ कशासाठी? तुम्ही यापूर्वी दोनदा माझ्या प्रभागातील विकासकामांचे परस्पर उदघाटन कसे केले?’ अशी विचारणा केली. यावरून वाद चिघळला. आजरेकर यांनी ‘ठराव तुमच्या नावे मांडायला माझी हरकत नाही’ असे सांगत जास्त बोलणे टाळले.

शौचालयासाठी निधीचा प्रस्ताव

कॉमर्स कॉलेज प्रभागातील सुलभ शौचालय बांधकामाला प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला. यासाठी १५ लाख रुपयांची तरतूद केली. प्रस्ताव तयार असल्याचेही सांगितले. निलोफर आजरेकर यांनी याकडे लक्ष वेधले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरे भाजपप्रणीत महायुतीत

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात अस्तित्व असलेला जनसुराज्य पक्ष, भाजपप्रणित महायुतीत सामील झाला. आगामी नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका महायुतीसोबत लढविण्याची घोषणा जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री विनय कोरे यांनी बुधवारी केली.

विनय कोरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली आणि महायुतीत सामिल होण्याबाबत चर्चां केली. त्यानंतर जनसुराज्य पक्ष हा भाजपप्रणित महायुतीत सामील होत असल्याचे त्यांनी जाहीर केले. ‘महायुतीत सामिल होताना जनसुराज्य पक्षाकडून कोणत्याही अटी घातलेल्या नाहीत. कृषी क्षेत्रासंदर्भात राज्य सरकार केंद्राच्या अनेक योजना राबवत आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे’, असेही विनय कोरे यांनी सांगितले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते.

कोरे यांचा जनसुराज्य पक्ष यापूर्वीं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सामील झाले होते. आघाडी सरकारमध्ये कोरे स्वतः कॅबिनेट मंत्री होते. तेव्हा जनसुराज्य पक्षाचे चार आमदार निवडून आले होते. त्यानंतर दोन आमदार निवडून आले. मात्र दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे पक्ष बॅकफूटवर गेला होता. कोरे यांच्या पक्षाचे कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात अस्तित्व आहे. याच भागातील खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना ही भाजपप्रणित महायुतीत आहे. कोरे यांनी यापूर्वी राज ठाकरे यांच्या ‘मनसे’सोबत जाण्याचीही बोलणी केली होती. प्रत्यक्षात त्यांची युती झाली नव्हती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून छोट्या पक्षांना महायुतीत सामावून घेण्याची रणनिती भाजपने आखली आहे.

जनसुराज्य आमच्या सोबत आल्याने महाआघाडीची ताकद वाढली आहे. आम्ही सहा मित्रपक्षांबरोबर आघाडी करून यापुढील सर्व निवडणुका लढवू.

रावसाहेब दानवे, अध्यक्ष भाजप


जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि विकासाचे धोरण राबवण्यात सत्तेत सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही महाआघाडीत सहभागी झालो आहोत. यासाठी कोणतीही अट घातलेली नाही. अपेक्षाही व्यक्त केलेली नाही.

विनय कोरे, माजी मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images