Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नियोजनासाठी तरुणाई एकवटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी तरुणाई पुढे सरसावली आहे. कोण स्वयंसेवकाची जबाबदारी पार पाडत आहे. तर कोण कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करत आहेत. विद्यार्थी, विद्यार्थिनींची खास पथके तयार केली आहेत. रोज सकाळपासून सायंकाळपर्यंत पायाला भिंगरी बांधल्यासारखे कॉलेज पिंजून काढत आहेत. मराठा आरक्षण, समाजाच्या मागण्यांचे महत्त्व पटवून देत मोर्चात सामील होण्याचे आवाहन करत आहेत. मावळा आणि रणरागिणी बनून हे तरूण, तरुणी मोर्चाच्या नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत. मराठा क्रांती मोर्चासाठी विविध संघटनेतील तरुण, तरुणी एकत्र आले आहेत. साथी हाथ बढानाची साद घालत पुढचं पाऊल टाकले आहे.

मराठा क्रांती मोर्चासाठी विविध विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. पक्ष, संघटना बाजूला ठेवून साऱ्यांनी मोर्चासाठी वज्रमूठ आवळली आहे. युवक टीम, मावळा व रणरा​​गिणी पथक तयार केले आहेत. हे युवा मराठा शिलेदार स्वत:हून जबाबदारी स्वीकारून मोर्चासाठी योगदान देत आहेत. युवा टीम प्रत्येक कॉलेजवर जाऊन मुला, मुलींचे प्रबोधन करत आहेत. सकाळी कॉलेजला भेट द्यायची, प्राचार्यांची परवानगी घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा असा त्यांचा नित्यक्रम बनला आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये मराठा क्रांती मोर्चा आयोजनामागील उद्देश सांगितला जातो. माहितीपत्रकांचे वाटप केले जाते.

कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी दहा जणांचे पथकाची निर्मिती केली आहे. यामध्ये पाच तरूण आणि पाच तरुणी आहेत. काही जण कॉलेज शिक्षण घेत आहेत. कुणी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. एरव्ही विविध संघटनेत कार्यरत असणारी ही तरुणाई मराठा क्रांती मोर्चासाठी एकवटली आहे. कोल्हापूर शहरातील बहुतांश कॉलेजमधील विद्यार्थ्यापर्यंत हे तरूण शिलेदार पोहचले आहेत. कुडित्रे, गडहिंग्लज, आजरा या ठिकाणी जाऊन कॉलेज विद्यार्थ्याना मराठा क्रांती मोर्चात सामील होण्यासाठी साद घालत आहेत.

दहा हजार तरुण, तरुणी बनणार स्वयंसेवक

मराठा क्रांती मोर्चा ​दिनी सात हजार तरुण व तीन हजार तरुणी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. मोर्चा संदर्भातील आचारसंहिता, पाळावयाची शिस्त आणि मोर्चा दरम्यान कुणी गैरकृत्य करताना निदर्शनास आल्यावर तातडीने त्यासंदर्भात करावयाची कार्यवाही विषयी प्रशिक्षण दिले आहे. आतापर्यंत दोन वेळेच्या प्रशिक्षणात सहा हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. बारा ऑक्टोबर रोजी आणखी एक प्रशिक्षण सत्र होणार आहे. संदीप पाटील व उमेश पोवार हे पथक प्रमुख आहेत.

युवक टीममधील सहभागी

हर्षल सुर्वे, अवधूत अपराध, संदीप पाटील, अवधूत पाटील, साक्षी पन्हाळकर, कपिल चव्हाण, जयदीप खराडे, ऋषीकेश पाटील, सागर जाधव, मंदार पाटील, निलेश यादव, दीपक थोरात, कपिल सरनाईक, कोमल मिठारी, प्राजक्ता बागल, अंकिता मोरे, शिवानी सासने, स्नेहल दुर्गुळे आदींचा युवक टीममध्ये समावेश आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रॅलीतून केली जनजागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी विविध भागात काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलींमुळे शहरात १५ ऑक्टोबरच्या मोर्चाची झलकच पहायला मिळाली. सी व डी वॉर्डच्यावतीने तसेच राजारामपुरी व शाहूपुरीतील सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी दुचाकी रॅली काढण्यात आली​.

सी व डी वॉर्डच्यावतीने शहरात मोठी दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये विविध मंडळांचे, तालमींचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तोरस्कर चौकातून सुरुवात झाली व शिवाजी पुतळा येथे पुष्पहार अर्पण करुन पुन्हा बुधवार पेठेत रॅलीची सांगता झाली. यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर, बाळासाहेब घाटगे, अॅड. महादेवराव आडगुळे, दिगंबर फराकटे, संदीप देसाई, नंदकुमार मोरे, धनंजय सावंत, नागेश घोरपडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.

राजारामपुरीतील नऊ नंबर शाळेच्या पटांगणावर सर्व दुचाकीस्वार जमले होते. दोन युवतींच्या हस्ते उद्‍घाटन करून रॅलीला सुरुवात झाली. अगदी शिस्तबद्धरित्या १५ किलोमीटरपर्यंत रॅली काढण्यात आली. यामध्ये मुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. भाजी मंडई, शास्त्रीनगर, प्रतिभानगर, हुतात्मा स्मारक, सुभाषनगर, शिवाजी चौक, एसएससी बोर्ड, इंगळेनगर, सम्राटनगर, प्रतिभानगर, तीनबत्ती चौक, जगदाळे शाळा, सायबर चौक, मंडलिक पार्क, ​खांडेकर पुतळा, साईक्स एक्स्टेंशन, शहाजी लॉ कॉलेज, शाहूपुरी गवत मंडई, बागल चौक, जनता बजार चौक, बस रुट, माऊली चौक, मारुती मंदिरकडून पुन्हा नऊ नंबर शाळेच्या पटांगणावर आली. कोणत्याही घोषणा अथवा गोंधळाविना झालेल्या या रॅलीने आगामी १५ ऑक्टोबरच्या मोर्चाची झलकच पहायला मिळाली. मुक्त सैनिक वसाहत, जाधववाडी, पाटोळेवाडी परिसरातील नागरिकांच्यावतीने सैनिक उद्यानातील त्र्यंबोली मंदिरात बैठक घेण्यात आली. यावेळी मोर्चाच्या आचारसंहितेची माहिती देण्यात आली. स्नेहल दुगुळे, सलोनी कदम या मुलींनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक राजसिंह शेळके, उत्तम जाधव, प्रा. विजय पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

मराठा मावळा म्हणून सहभागी

राज्यातील अन्य ठिकाणच्या चार ते पाच मोर्चांमध्ये सहभागी होण्याचा मान मला मिळाला. कोल्हापूरच्या मोर्चामध्ये एक मराठा मावळा म्हणून सर्वसामान्य जनतेच्या मागे राहून सहभागी होणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी भूमिका स्पष्ट केली. या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या साऱ्यांनी शिस्तबद्धरित्या सहभागी व्हावे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, कचरा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रांत सरचिटणीस लालासाहेब गायकवाड, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बराले, शहराध्यक्ष जय​दिप शेळके, आण्णा पोतदार, शिवाजीराव ससे, हिंदुराव शेळके आदी उपस्थित होते.

तर रजा काढून होणार सहभागी

शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाच्या सर्व सभासदांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत विद्यापीठ प्रशानसाला कळवले आहे. त्यासाठी सेवकांनी सुटीच्या दिवशी केलेल्या कामाची सुटी देण्याबाबत प्रशासनाला कळवले आहे. विद्यापीठ प्रशासनाने मागणी अमान्य केल्यास एक दिवसाची रजा काढून मोर्चा सहभागी होण्याचा निर्धार सभासदांनी केला आहे. तसेच सभासदांनी आपल्या जवळच्या भागातील मोर्चाच्या ठिकाणी हजर राहण्यास संघटनेने सांगितले आहे.

जनरल प्रॅक्टिशनर्स असो​सिएशनचा पाठिंबा

कोल्हापुरातील जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा पाठिंबा जाहीर केला आहे. जास्तीत जास्त डॉक्टरांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शिवराज देसाई यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूरमध्ये घराचं छत कोसळून चार ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी गावात घराचं छत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत एका मजूर कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती, पत्नीसह दोन मुलांचा समावेश आहे.


आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही बाब शेजारच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बशीर शेख (वय २७), नफीसा शेख (वय २२), साहिल शेख (वय ८), आलिशा शेख (वय ६) अशी मृतांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखन काळजाला भिडणारे असावेराजन खान यांचे मत

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

जाती-पातींमध्ये आज समाजातील माणूस हरवला आहे. जात, धर्म यांनी देशाचे वाटोळे केले असून जात, पात, धर्म आणि कर्मकांडांनी आपला देश सडविला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये माणसाला जन्मापासून स्मशानभूमीपर्यंत धर्म लागू पडतो. समाज जो जगतो त्याचे प्रतिनिधीक साहित्यातून पुढे येत असते. लेखक, साहित्यिक हे काळजीने लिहितात त्यामुळे लेखकांच्या उदासिनतेची भीती कोणीही बाळगू नये, मात्र लेखकांनी आज राजकारणावर न बोलता त्यांनी माणसांच्या वेदनावर लिहिले पाहिजे. यासाठी आपल्या लेखणीतून माणसाच्या काळजाला भिडणारे लेखन निर्माण करावे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी केले.

पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची पाटण शाखा व पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त पाटण येथील शाहू, फुले, आंबेडकर नगरीत आयोजित केलेल्या विभागीय साहित्य संमेलनात अभिव्यक्ती स्वांतत्र्य व साहित्यिकांची उदासिनता या परिसंवादात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

राजन खान म्हणाले, ‘इतिहासामध्ये लेखकांनी जे आपले विचार मांडले त्यात त्यावेळचे प्रतिबिंब उठलेले दिसून येतात. लेखकांनी समाजातील वास्तव आपल्या साहित्यातून लिहिणे व त्याची अभिवृत्ती करण्याची गरज आहे. भारताच्या संसदेत तब्बल २६३ खासदार गुन्हेगार आहेत. कारण आपल्या देशात जात, धर्म, नोटा, कोंबड्या, दारू बघूनच मतदान केले जाते. राजकारणात एखादा नालायकपणा असेल तर त्याचे खापर लेखकांवर फोडले जाते. या देशात तुकोबा, ज्ञानोबा यांना देखील समाजाने छळले आहे. लेखकांना हाल भोगावे लागले. त्यामुळे विनोद करून देश पुढे जाणार नाही. दाढी आणि केसांमध्ये येथे धर्म व जात शोधली जाते ही दुर्दैवी बाब आहे. आम्ही जाती धर्माचे विरोधक आहे, माणसाचा व माणुसकीचा विरोधक नाही. सैन्यामध्ये जावून राष्ट्रप्रेम दाखवा. केवळ फेसबुकवर राष्ट्रप्रेम उफाळून दाखवू नका. एकमेकांचे द्वेष टोकाला गेलेला हा देश आहे. संविधान हेच साहित्य असून, ते देशाला अभिप्रेत आहे. शाहू, फुले,आंबेडकर हे सर्वांचेच होते. शिवाजी महाराज बुद्धीने लढणारे होते हे ध्यानात ठेवा.’


कथाकथनाला प्रतिसाद

संमेलनाच्या कथाकथन सत्रात रवींद्र कोकरे, जयवंत आवटे, बाबा परीट यांच्या रसाळ आणि सुमधूर कथांना श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत पोटभरून हसविले. कथाकथन सत्रात प्रथमता कथाकार रवींद्र कोकरे यांनी आपली दैना ही कथा मांडली. या कथेत मुलापेक्षा मुलगी बरी. ही कथा रसिकांच्या मनाला भिडली. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून या कथेला दाद दिली.

जयवंत आवटे यांनी लग्न झालेल्या नवीन दाम्पत्याच्या मनात एकमेकांच्याविषयी असणारे आकर्षण, ओढ, प्रेम, मातृप्रेम हे कथेतून मांडले. बाबा परीट यांनी शिकार ही कथा सादर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा ‌दिवसांत २२ लाख भाविक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मांगल्यपूर्ण वातावरणात सुरू झालेल्या नवरात्राची सांगता खंडेनवमीने सोमवारी झाली. सोमवारीही मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. नवरात्रोत्सवाच्या काळात तब्बल २२ लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा एक लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी आल्याची नोंद पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे झाली आहे.

अष्टमीच्या जागरानिमित्त रविवारी नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर मध्यरात्री एकनंतर श्री अंबाबाई मंदिरात नवचंडी होम झाला. त्यामुळे सोमवारी सकाळी नऊ वाजता मंदिर खुले झाले. अनेक परगावच्या भाविकांना त्याची माहिती नसल्यामुळे पहाटे पाचपासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी सात वाजता पुरुषांची दर्शन रांग मेन राजाराम हायस्कूल पर्यंत पोहचली होती. तर महिलांची रांग भवानी मंडप येथील शेतकरी बझारपर्यंत आली होती. दिवसभर ही गर्दी कायम राहिली. दुपारी साडेतीननंतर आलेल्या पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली. सतत दीड तास सुरू असलेल्या पावसामुळे सायंकाळनंतर गर्दी ओसरल्याचे दिसून येत होते. दरम्यान दिवसभरात सुमारे दीड लाख भाविकांनी दर्शन घेतले. तर यंदाच्या नवरात्रोत्सवात २२ लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे, तर गेल्या वर्षी २१ लाख ६ हजार ६५३ भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद आहे.

दरम्यान खंडेनवमी निमित्त घरोघरी, जुन्या तालीम, रिक्षा, इंडस्ट्रीजमध्ये शस्त्रांचे पूजन करण्यात आले. नवरात्रोत्सवाच्या दहाव्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी गायत्री रुपात पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा संजीव मुनिश्वर, आशुतोष जोशी व सुशील कुलकर्णी यांनी ही पूजा बांधली. तर भवानी मंडप येथील छत्रपती संस्थानच्या तुळजाभवानी मंदिरातील तुळजाभवानीची अंबारीतील गजारुढ रुपात पूजा बांधण्यात आली. तुळजाभवानीची पूजा पुजारी बाळकृष्ण दादर्णे, अमर जुगर, सारंग दादर्णे, आदिनाथ चिखलगर, चंद्रकांत जाधव, विजय बनकर यांनी बांधली.

....................

दहा दिवसांची सायंकाळी ६ पर्यंतची भाविकांची संख्या

१ ऑक्टोंबर - १ लाख ८६ हजार १४

२ ऑक्टोंबर - २ लाख ५६ हजार ०८

३ ऑक्टोंबर - १ लाख ०३ हजार ७३०

४ ऑक्टोंबर - १ लाख ८३ हजार ४३८

५ ऑक्टोंबर - २ लाख ०९ हजार १३०

६ ऑक्टोंबर - २ लाख ५८ हजार ७२७

७ ऑक्टोंबर - २ लाख ८१ हजार ६४१

८ ऑक्टोंबर - २ लाख १४ हजार ३३९

९ ऑक्टोंबर - ३ लाख १९ हजार ०३८

१० ऑक्टोंबर - १ लाख ३४ हजार ६५४

...........................

आजचे सांस्कृतिक कार्यक्रम -

वीरशैव महिला मंडळ: सकाळी ९

​शिवगणेश भजनी मंडळ: सकाळी ११

निलांबिका संगीत मंडळ: दुपारी १

गायत्री भजनी मंडळ: दुपारी ३

नुपूर रावळ नृत्य :सायंकाळी ५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्याविरोधात समीरची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड याने कळंबा करागृहातील सहायक अधीक्षक चंद्रकांत आवळे यांच्याविरोधत कोर्टात तक्रार केली. आ‍वळे हे अपमानास्पद वागणूक देतात, त्याचबरोबर वारंवार धमाकवतात, अशी तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, हायकोर्टातील कामकाज होऊ न शकल्याने सोमवारी (ता. १९) जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत पुढील कामकाजाची तारीख २५ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी दोन दिवासांपूर्वीच कळंबा करागृहात जाऊन सुरक्षेची पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान समीर गाकवाडने सहायक कारागृह अधीक्षक चंद्रकांत आवळे यांच्याविरोधात तक्रार केली होती. आ‍वळे हे वारंवार धमकावतात आणि अपमानास्पद वागणूक देतात अशी तोंडी तक्रार समीरने न्यायाधीश बिले यांच्याकडे केली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीत समीर गायकवाडचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी चंद्रकांच आवळे यांच्याविरोधात कोर्टात लेखी तक्रार दिली. याबाबत सविस्तर माहिती घेऊन पुढील कारवाई करू, अशी माहिती न्यायाधीश बिले यांनी दिली. दरम्यान, कॉम्रेड पानसरे हत्येसंदर्भातील मुंबई हायकोर्टातील सुनावणीचे काम शुक्रवारी (ता. ७) होऊ शकले नाही, जिल्हा व सत्र न्यायालयातही समीरच्या जामिनाबाबत कामकाज झाले नाही. न्यायाधीश बिले यांनी पुढील कामकाजासाठी २५ ऑक्टोबर ही तारीख दिली. संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या वतीने अॅड. समीर पटवर्धन यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे अॅड. चंद्रकांत बुधले यांनी कामकाज पाहिले. यावेळी पोलिसांनी संशयित समीरला कडेकोट बंदोबस्तात कोर्टात हजर केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने अर्धा तास झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेले चार दिवस उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना सोमवारी संध्याकाळी आलेल्या प्रचंड पावसाने दिलासा मिळाला. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने शहराला झोडपून काढले. अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. मैदानांना तळ्याचे स्वरुप आले. गेले काही दिवस कोरडा असलेल्या जयंती नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली.

सोमवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. त्यातच प्रचंड उष्मा वाढला. सायंकाळी साडेचारच्या दरम्यान प्रचंड पाऊस सुरू झाला. सुमारे पाऊण तास झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडविली. प्रमुख रस्त्यावर पाणीच पाणी झाले. सायबर चौक ते एनसीसी भवन रोडवर सुमारे चार फूट पाणी साचले. संभाजीनगरातील निर्माण चौक, देवकर पाणंद येथील चौकातही तीन फुटावर पाणी साचले. परिख पुलाखालून सुमारे अर्धा तास पाण्याचे लोट वाहू लागले. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आणि बागल चौक परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणत पाणी साचले. अचानक आलेल्या पावसाने वाहनधारकांनी जागा मिळेल तेथे आसरा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडवळवाडीजवळ १० वाहनांचा विचित्र अपघात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पडवळवाडी ते नलवडे बंगल्यादरम्यान असलेल्या पाराच्या ओढ्यावर १० वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले, तर सहा जण जखमी झाले. अपघातामुळे सोमवारी(ता. १०) दिवसभर या मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर क्रेनच्या सहायाने वाहने हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. करवीर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर रविवारी रात्री अज्ञात वाहनाने बोलेरो आणि एका दुचाकीला दोरदार धडक दिली होती. या अपघातात ओढ्यात कोसळलेली कार पाहण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. वाहनधारकांसह परिसरातील गावांमधील नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केल्याने पुन्हा अपघात झाला. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास जयगड बंदरहून कोल्हापूच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचालकाने नागमोडी वळणावर गर्दी पाहून ट्रकची गती कमी केली. यावेळी पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकची धडक पुढच्या ट्रकला बसली. पाठीमागून आलेल्या तिसऱ्या ट्रकने ओव्हरटेक करताना कोल्हापूरच्या दिशेने आलेल्या स्विफ्ट कारला धडक दिली. यावेळी कार चालक आणि ट्रक चालकाचा वाद सुरू असतानाच पाठीमागून आलेल्या चौथ्या ट्रकने विनाचालक ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत विनाचालक ट्रक २०० फूट पढे गेल्याने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकी ट्रकखाली सापडल्या. ओढ्याच्या संरक्षक कठड्यामुळे ट्रक थांबला. यावेळी विना चालक ट्रक समोरून येत असल्याचे पाहून काही दुचाकीस्वारांनी दुचाकी सोडून पळ काढला. या धावपळीत तिघे जखमी झाले, तर कारमधील तीन प्रवाशी जखमी झाले. पडवळवाडीचे माजी उपसरपंच पंडित नलवडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. विचित्र अपघातामुळे १० वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी मात्र झाली नाही.

अपघातानंतर बघ्यांची गर्दी वाढल्याने सोमवारी दिवसभर या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. करवीर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून क्रेनच्या सहायाने वाहने हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन पोलिस अधिकारी कोर्टाला शरणएक जण अद्याप फरारकोठडीतील आत्महत्या प्रकरण

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

उमदी पोलिस ठाण्यातील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे आणि पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद रोडे रविवारी न्यायालयाला शरण आले. तिसरा संशयित पोलिस उपनिरीक्षक राजाराम चिंचोळकर यांना फरारी घोषित करण्यात आले आहे. न्यायालयाने अटक वॉरंट काढून तीस दिवसांच्या आत हजर न झाल्यास फरारी घोषित करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. सध्या ते दोघे न्यायालयीन कोठडीत असून, बुधवारी त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

असे आहे आत्महत्या प्रकरण

जत तालुक्यातील उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा अज्ञातांनी खून केला होता. त्या खूनाचा तपास करताना उमदी पोलिसांनी राजशेखर नंदगौड या कर्नाटकातील तरुणाला ताब्यात घेतले होते. चार जून रोजी त्याला पोलिस ठाण्यात आणले. त्याला अटक न करता केवळ ताब्यात ठेवून गुन्हा कबुल करवून घेण्यासाठी सलग दोन दिवस मारहाण केली. पोलिसांचा मार सहन होण्यापलीकडे जाऊ लागल्याने त्या तरुणाने सहा जून रोजी पोलिस ठाण्यातील शौचालयात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली होती.

पसार अधिकाऱ्यांची कोर्टात धावाधाव

या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे गेला. प्राथमिक तपास आणि संबधित तरुणाच्या वैद्यकीय अहवालावरुन साआयडीने उमदीचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक राजाराम चिंचोळकर, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद रोडे या तिघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच तिघेही आजारी रजेचे अर्ज करून पसार झाले होते.

सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी तिघांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू करताच तिघांनीही सांगलीच्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. जिल्हा कोर्टाने अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. त्या ठिकाणीही त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी त्या तिघांना फरारी घोषित करून पकड वॉरंट काढण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने तीस दिवसांच्या आत न्यायालयासमोर हजर रहावे, अन्यथा फरारी घोषित करण्यात येईल, असे जाहीर केले होते. तरीही या तिघांनी पुन्हा एकदा वकील बदलून जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. दोन दिवसांपूर्वी सीआयडीच्या कोल्हापूर विभागाच्या अधीक्षकांनी संबधित पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन आणि भत्ते रोखण्याचे पत्र दिले होते. सर्व बाजूनी कोंडी झाल्याने अखेर सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमोडे आणि पोलिस प्रमोद रोडे हे रविवारी जत येथील न्यायालयाला शरण आले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. बुधवारी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात येणार असल्याचे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखाने नोव्हेंबरमध्येच सुरू करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘सरकारचा एक डिसेंबरनंतर गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय चुकीचा आहे. शेजारील कर्नाटकातही ऊस कमी आहे, पण तिथे नोव्हेंबरपासून हंगाम सुरू होत आहे. परिणामी येथील उसाची पळवापळवी होण्याची शक्यता असल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात हंगाम सुरू करुन चूक सुधारावी,’ असे मत डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशनच्यावतीने मांडले आहे. ‘सरकारने निर्णय बदलला नाही तर जो काही दंड भरायचा तो भरु, पण कारखाने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होतील,’ असे मत असोसिएशनचे अध्यक्ष मानसिंगराव जाधव यांनी व्यक्त केले.

हंगामाबाबत असोसिएशनच्या तज्ज्ञांनी एकत्रित चर्चा केली. विविध मुद्द्यांमधून शेतकऱ्यांपासून मजुरांपर्यंत व कारखान्यांपर्यंत बसणारा फटका हा त्या चर्चेतील मुख्य विषय होता. याबाबत अध्यक्ष मानसिंगराव जाधव, उपाध्यक्ष बी. डी. पवार, ‘उगार शुगर्स’ चे राजाभाऊ शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत हंगामाबाबतची मते व्यक्त केली.

जाधव म्हणाले,‘ १ डिसेंबरपासून हंगाम सुरू झाल्यास पुढील हंगामासाठीच्या उपलब्ध होणाऱ्या खोडव्याच्या वाढीसाठी सरासरी एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्याची उत्पादकता व पक्वता कमी होईल. पूर्वहंगामी उसाची तोडणी फेब्रुवारीनंतर झाल्यास खोडवा वाढीवर शास्त्रीयदृष्ट्या अनिष्ट परिणाम होईल. आडसाली उसाची तोड १८ महिन्यानंतर होईल. पण ते क्षेत्र संपण्यासाठी काही ठिकाणी ते २० ते २२ महिन्यांवर जाईल. त्यातून उत्पादकता व साखर उतारा घटण्याची शक्यता आहे. हा परिणाम पूर्वहंगामी व सध्याच्या उसावरही होईल. तोडणी उशिरा झाल्यास रब्बी हंगामासाठी पोषक हवामान नसल्याने पीक घेतील याबाबत शंका आहे. इतर राज्यात कारखाने लवकर सुरू झाल्यास महाराष्ट्रातील ऊस त्या राज्यांमध्ये जाणे साहजिकच आहे. त्यामुळे येथील कारखाने लवकर बंद पडतील. त्याचबरोबर पावसामुळे ऊस वाढल्यास हंगाम लांबेल. त्यातून साखर उतारा घटून उत्पादनावर परिणाम होईल.’

उपाध्यक्ष बी. डी. पवार म्हणाले, ‘राज्यातील मजूर इतर राज्यात तोडणीसाठी जातात. काही राज्यात कारखाने सुरु झालेत व लवकरच काही सुरू होतील. महाराष्ट्रातील कारखान्यांनी केलेल्या कराराप्रमाणे नोव्हेंबरपासून कारखाना सुरू न झाल्यास त्यांच्या एक महिन्याच्या मजुरीचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे ते इतर राज्यात स्थलांतरित होतील. कारखान्यांचा कोट्यवधींचा अॅडव्हान्स बुडण्याची शक्यता आहे. तसेच पूर्ण क्षमतेने चालणारही नाहीत. त्यातून कारखान्याचे नुकसान होईल. शेतकऱ्यांनाही बिले उशिरा मिळण्याने कर्जाचे हप्ते उशिरा जातील, तोडणी बिले अॅडव्हान्स उशिरा जमा होतील. स्थानिक गुऱ्हाळांमध्ये ऊस गाळप होण्याची शक्यता असून कारखान्यांना कमी ऊस मिळेल.’

चौकट

यंदा ५५० लाख टन उत्पन्न

राजाभाऊ शिरगावकर म्हणाले, ‘कर्नाटकातील आमचा कारखाना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करणार आहोत. यंदा परतीचा पाऊस चांगला झाल्याने महाराष्ट्रातील उसाचे उत्पादन ४४५ लाख टनांऐवजी ५५० लाख टन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील हंगामही नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरू व्हावा. उशिरा हंगाम सुरू होण्याने जर १५ एप्रिलनंतर हंगाम लांबला तर टनेज, रिकव्हरी, तोडणी मजुरीत घट असे परिणाम होतील. मजूर दुसरीकडे जाऊ नये म्हणून एक महिन्याच्या कालावधीसाठी पैसे द्यावे लागतील. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न राहणार आहेच. हे सारे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी सरकारने नोव्हेंबरच्या पंधरवड्यात कारखाने सुरू करावेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी मार्कलिस्टवर जन्मगावाचा उल्लेख

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दहावीच्या मार्कलिस्टवर जन्मतारखेबरोबरच यापुढे जन्मठिकाणाचा उल्लेख होणार आहे. या निर्णयाचा फायदा विदयार्थ्यांना पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसनसह नोकरी व प्रवेश प्रकियेसाठी होणार आहे.

दहावीच्या मार्कलिस्टवर सध्या जन्मतारखेचा उल्लेख अनिवार्य केल्याने विद्यार्थ्यांच्या वयाचा ठोस पुरावा समजून येतो. पण, विद्यार्थ्यांना पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, डोमेसाइल सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र काढण्यासाठी जन्मदिनांक व जन्मठिकाणांची खातरजमा केली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या (स्कूल लिव्हिंग सर्टीफिकेट) मूळ प्रतीची मागणी सरकारी अधिकाऱ्यांकडून केली जाते.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी अकरावी किंवा अन्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. प्रवेश घेताना शाळेतील विद्यार्थ्याचा मूळ दाखला जमा करावा लागतो. जमा केलेला दाखला विद्यार्थ्यांना परत मिळत नाही. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी सरकारी किंवा खासगी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. यावेळी त्या संस्थाकडून जन्मदिनांक, जन्मस्थळाचा पुरावा असलेल्या कागदपत्रांची मागणी केली जाते. ही कागदपत्रे विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसल्यास अनेक विद्यार्थी शाळेचा डुप्लिकेट दाखला काढण्यासाठी शाळेकडे परवानगी मागतात. त्यासाठी अनेक विद्यार्थी शाळा सोडल्याचा दाखला हरवल्याची तक्रार करून तहसीलदाराच्या सहीने अॅफिडिटिव्ह (शपथपत्र) करून घेतात. शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत विद्यार्थ्यांना विशिष्ट कालावधीत देताना शाळा प्रशासनासमोरही अडचण येते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने दहावीच्या मार्कलिस्टवर जन्मदिनांकाबरोबर जन्मस्थळाचा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे.

दहावीची परीक्षा फेब्रुवारी व मार्च २०१७ मध्ये होणार आहे. परीक्षा झाल्यावर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मार्कलिस्टवर जन्मठिकाणाचा उल्लेख होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही या आदेशाची अंमलबजावणी करण्याची तयारी केली आहे. या निर्णयामुळे नोकरी, प्रवेश प्रक्रिया, पासपोर्ट काढण्यासाठी तसेच ड्रायव्हिंग लायसनसाठी ठोस पुरावा मिळणार आहे. अॅफिडेव्हिट करण्यासाठी सरकारी कार्यालयात उंबरे झिजवण्याची वेळ लागणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतीच्या पावसाने झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

परतीच्या पावसाने सोमवारी जिल्ह्याला झोडपले. दुपारी अचानकपणे विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. सलग दीड ते दोन तास पडलेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले.

....

इचलकरंजीत पाणीच पाणी

इचलकरंजी

शहराला दुपारी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने चांगलेच झोपडून काढले. सकाळपासून अति उकाड्याने हैराण नागरिकांना दुपारनंतर गारवा लाभला. लहान मुलांसह सर्वांनीच पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटला. तर पावसामुळे फुले, ऊस साहित्य विक्रेत्यांची तारांबळ उडाली.

दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवू लागला होता. तर सकाळपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. दुपारच्या सुमारास रिमझिम बरसण्यास सुरुवात केलेल्या पावसाने तीननंतर जोरदार हजेरी लावली. सुमारे पाऊणतास बरसणाऱ्या पावसाने विविध भागात रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. तर रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत होती.

......

हातकणंगलेत जोरदार पाऊस

हातकणंगले

तालुक्यात सोमवारी दुपारी परतीच्या पावसाने विजेच्या कडकडासह तासभर झोडपले. मोठ्या प्रमाणात झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणीच झाले. गेले दोन दिवस उष्म्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी या पावसाने समाधान व्यक्त केले. हातकणंगले तालुक्यांतील पेठ वडगांव, वाठार, हेरले, हातकणंगले, कुंभोज, हुपरी, पट्टणकोडोली या परिसरात दुपारी तीननंतर जोरदार पावसास सुरुवात झाली. सुमारे तास ते दीडतास अखंडपणे विजेच्या कडकडासह पाऊस सुरू होता. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

...

व्यावसायिकांची तारांबळ

गडहिंग्लज

गडहिंग्लज शहर व परिसरात सोमवारी पहाटेपासून पावसाने चांगली हजेरी लावली. नवरात्रीनिमित्त संपूर्ण बाजार झेंडूच्या फुलांसह पूजा साहित्यांनी भरला होता. मात्र पावसामुळे या व्यावसायिकांची तारांबळ उडाली. दुपारनंतर मात्र पावसाने उसंत घेतली. त्यामुळे दुपारनंतर बाजारात वर्दळ पाहायला मिळाली. शेतीसाठी पावसाची आवश्यकता असून पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंट्रोल रुममधून मोर्चाचे नियोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा मोर्चा नियोजनसाठी १६५ सीसीटीव्ही असलेल्या पोलिस कंट्रोल रूममधून संयोजक आणि पोलिस समन्वयाने नियोजन करणार आहेत. एकाच वेळी शहरातील सर्व ठिकाणांवर लक्ष ठेवणे शक्य असल्याने कंट्रोल रुममधून सूचना देण्यात येणार आहेत. कंट्रोल रुमचा वापर करण्यास पोलिस प्रशासनाने परवानगी दिली आहे, अशी माहिती मोर्चाच्या संयोजकांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली. मोर्चात लाखो लोक येणार असल्याने वैद्यकीय व्यवस्था चोख राहण्यासाठी संयोजन समितीतील २०० डॉक्टरांचे पथक व सीपीआर हॉस्पिटलमधील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयाला सज्ज राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

संयोजन समितीने जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाचा मार्ग, पार्किंग यांची माहिती दिली. तसेच काही सूचनाही संयोजकांकडून करण्यात आल्या. मोर्चा १५ ऑक्टोबरला असल्याने संयोजकांनी १३ तारखेपर्यंत सर्व तयारी पूर्ण केली जाईल. १४ तारखेला मोर्चाचा मार्ग व पार्किंगचा आढावा घेऊन त्रुटी दूर केल्या जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मोर्चात वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी ३०० डॉक्टरांचे पथक मोर्चा मार्गात सेवा बजावणार आहेत. तसेच पार्किंगच्या ठिकाणी ५० डॉक्टर कार्यरत राहणार असल्याचे संयोजन समितीतील डॉ. प्रल्हाद केळवकर यांनी सांगितले. मोर्चात एकाद्या व्यक्तीला त्रास झाल्यास त्याला सीपीआरमध्ये न आणता मोर्चाच्या मार्गावरील हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत. परगावचे रुग्ण कोल्हापुरात येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय ते सीपीआर हॉस्पिटल हा रस्ता राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच भवानी मंडप ते सीपीआर हा रस्ता रुग्णवाहिकेसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. शहरात फक्त रुग्णवाहिकेला प्रवेश देण्यात येणार आहे. आपत्कालिन परिस्थिती म्हणून शहराच्या जवळील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची संख्या वाढवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

मोर्चाच्या मार्गावरील बंद पडलेली वाहने हलवावीत अशी सूचना करण्यात आली. मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने शहरातील सर्व हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंग, मंगल कार्यालये यांची स्वच्छतागृहे खुली ठेवण्यात येणार आहेत. मोर्चाच्या मार्गावर ३२ टॉवर व २०० स्पीकर्स उभारण्यात येणार असून ही जबाबदारी मंडप डेकोरेशन संघटनेने घेतली आहे. स्पीकरवरून मोर्चासंबधी माहिती देण्यात येणार आहे. दसरा चौक, गांधी मैदान, शिवाजी विद्यापीठ या परिसरात स्टेज घालण्यात येणार आहे. शहरात एकही एसटी येणार नसून एसटी बसेस पार्किंगच्या ठिकाणीच थांबतील, असे पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.

मोर्चादिवशी ड्राय डे

मोर्चाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे जाहीर केला. मोर्चाच्यादिवशी शहरातील सर्व देशी दारू, वाइन शॉप, बिअर बार, परमिट रूम बंद राहणार आहे. चोरून दारू विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले.

गहहिंग्लज आगारात ४२ एसटीचे बुकिंग

मोर्चात सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने येणार आहेत. गडहिंग्लज आगारात ४२ एसटी बसेसचे बुकिंग झाले आहेत. तसेच राधानगरी, चंदगड, आजरा, शाहूवाडी येथेही बुकिंग झाले आहे. सीमाभागातूनही मोठ्या प्रमाणावर लोक येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात भवानी तलवारीचे पूजन

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

साताऱ्यात मंगळवारी शाही दसरा उत्साहात साजरा झाला. पोवईनाका येथे ऐतिहासिक भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. तसेच सार्वजनिक मंडळांच्या देवींचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी जलमंदिरात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, चिरंजीव युवराज वीरप्रतापसिंहराजे भोसले यांनी राजघराण्याच्या भवानी तलवारीचे पूजन केले. या वेळी राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले, छत्रपती दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्ष विजय बडेकर, माजी जि. प. शिक्षण सभापती सुनील काटकर आदी उपस्थित होते.

तलवारीचे पूजन केल्यावर भवानी तलवार फुलांनी सजवलेल्या पारंपरिक लाकडी पालखीत ठेवून मिरवणुकीने पोवई नाका येथील पूजनाच्या ठिकाणापर्यंत आणण्यात आली. गाववेशीच्या बाहेर सीमोल्लंघन करण्यात आले. मिरवणुकीच्या अग्रभागी सनई-चौघडा, शिंग-तुताऱ्यांचा समूह, राजघराण्यातील मानकरी, नऊवारी साडी नेसलेल्या मुली, तसेच फेटाधारी युवक होते. राजपथावरून ही मिरवणूक पोवईनाक्यावर आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या तलवारीचे पंचोपचारपूजन उदयनराजे भोसले व वीरप्रतापसिंह राजे भोसले यांनी केले. वेदमूर्ती उपेंद्रशास्त्री धांदरफळे यांनी पौरोहित्य केले. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळांच्या देवींचे विसर्जन कृत्रिम तळ्यात करण्यात आले. अनेक मुख्य रस्ते मिरवणुकीमुळे बंद करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनाशकाले विपरीत बुद्धीमंत्री जानकरांच्या वक्तव्याचा अजित पवारांकडून समाचार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

‘मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आपल्याबाबत अत्यंत घाणेरडी भाषा वापरत आहेत. भाषा वापरताना आम्ही तारतम्य ठेवले आहे. मात्र, या सरकारमधील मंत्री तोंड सोडून बोलत आहेत. वैचारीक लढाई वैचारीक पद्धतीने झाली पाहिजे. मंत्री महादेव जानकरांनी वापरलेली भाषा म्हणजे, विनाशकाले विपरीत बुद्धी आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीने कायदा हातात घेऊ नये असे, आवाहनही पवार यांनी केले. सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, ‘कोण काय बोलावे आणि कोण काय बोलू नये, हा ज्याच्या-त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मी फुकटचा सल्ला कोणालाही देणार नाही.’ पंकजा मुढेंबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, ‘त्यांच्याबाबत त्यांचा पक्ष, पक्षाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री निर्णय घेतील. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांवर दगडक करीत आहेत. भगवानगडावर झालेल्या दगडफेकीत अनेक पोलिस जखमी झाले आहेत तर शिक्षकांचा मोर्चा शांततेने सुरू असताना त्यांच्यावरही लाठीचार्ज करून त्यांना जखमी केले जात आहे. एकूणच महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.’

मराठा आरक्षणाबाबत चालढकल

केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे भाजपाचे सरकार असतानाही मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घेता येत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. एससी, एनटीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. राज्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सर्वप्रथम घेतली. कोपर्डी प्रकरणी चार्जशिट दाखल करण्यासाठी ८१ दिवस लागतातच कशाला, असे सवाल करीत पवारांनी भाजप सरकारवर तोफ डागली.

फडणवीस सरकार अपयशी

धरणातील पाण्याचे नियोजन सरकारला करता आले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यातही फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. एकूणच दोन वर्षात राज्य सरकारचा कारभार हा अपयशी आहे. केंद्र आणि राज्य सरकारबाबत तर शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असल्याचे सांगत आपण सत्ताधरी पक्षात आहोत, हे अजूनही सरकारला लक्षात येत नाही ही खेदजनक बाब असल्याचेही पवार म्हणाले. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत नाही. मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी सरकारने हजारो कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. झोपेचे सोंग घेतलेले हे सरकार असल्याचेही ते म्हणाले.

शेतीमालाबाबत हस्तक्षेप चुकीचा

शेतीमालाचे भाव पडले की त्याकडे कोणी बघत नाही. मात्र, भाव वाढले की सरकारचा हस्तक्षेप होतो. तो हस्तक्षेप शेतकऱ्यांसाठी मारक आहे. युती सरकारने शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, असेही पवार म्हणाले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कृषीनिष्ठ शेतकरी व कृषीमित्र पुरस्काराचे वितरण पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी पवार बोलत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिशवी येथे किरकोळकारणातून एकाचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

पिशवी (ता. शाहूवाडी) येथे सोमवारी (ता.१०) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून केलेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोन जखमी झाले आहेत. घटनेची वर्दी मिळाल्यानंतर गुन्ह्यातील सर्व चार आरोपींना मंगळवारी सकाळी शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शाहूवाडी पोलीसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, पिशवी (ता. शाहूवाडी) येथे सहा महिन्यांपूर्वी महिलांमध्ये नळाच्या पाण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे निमित्त करून सोमवारी रात्री बाबासो बापू जाधव याने सर्जेराव सुगंधा जाधव याला डोक्यात काठीने मारहाण करून जखमी केले. भावाला जखमी केल्याचा जाब विचारण्यासाठी केशव व यशवंत सुगंधा जाधव हे बाबासो जाधव याच्या घरी गेले असता बाबासो जाधव याच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर लाथाबुक्क्यांसह काठीने पुन्हा हल्ला केला. मुख्य आरोपी बाबासो जाधव याने चाकूने हल्ला केल्याने सर्जेराव जाधव आणि यशवंत जाधव हे गंभीर जखमी झाले. बंडूबाई जाधव ही महिला किरकोळ जखमी झाली. गंभीर जखमींना उपचारांसाठी तातडीने मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता छातीत डाव्या बाजूला वर्मी घाव लागल्यामुळे यशवंत जाधव मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. केशव जाधव यांनी मंगळवारी सकाळी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूवाडी पोलिसांनी गुन्ह्यातील मुख्य आरोपी बाबासो जाधव, ब्रम्हदेव जाधव, सोनाबाई जाधव, मनीषा जाधव यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, शाहूवाडीचे पोलिस उपविभागीय अधिकारी सूरज गुरव यांनी घटनास्थळाला भेट देवून पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिशवी येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अनिल गाडे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड वर्षात वीस लाचखोरांना शिक्षा

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet : @Uddhavg_MT

कोल्हापूर : एखादे काम वेळेत होण्यासाठी किंवा न होण्यासाठी जाणीवपूर्वक आमिष दाखवून वरकमाई करण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार असा अलिखित नियमच बनला आहे, त्यामुळेच भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारीही वाढल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांत ८७ लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या (एसीबी) जाळ्यात सापडले आहेत. यातील वीस लाचखोरांना शिक्षा झाली असून, शिक्षा होण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे.

सरकारी कार्यालयातील कामकाजाचा अनुभव असणाऱ्यांना किमान एकदा तरी लाचेची मागणी झालेलीच असते. अन्यथा सरकारी गतीने काम होण्याची वाट पाहावी लागते. लाच मागण्याऱ्यांना देणारेही काही कमी नाहीत. किंबहुना देणाऱ्यांचीच संख्या मोठी असल्याने घेणारे सोकावले आहेत. यातूनच भ्रष्टाचार शिष्टाचार बनल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापुरात तर शहराच्या प्रथम नागरिकापासून ते विविध कार्यालयातील शिपायांपर्यंत अनेकांनी हे खरे करून दाखवले आहे. लाचखोरांच्या या अवगुणाला एसीबीच्या कार्यालयाने काही प्रमाणात आळा घालण्याचे काम केले. पोलिस अधीक्षक उदय आफळे यांनी मार्च २०१४ पासून ८७ लाचखोरांना रंगेहात पकडले. लाचखोरांचे गुन्हे कोर्टात सिद्ध व्हावेत आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठीही त्यांच्या कार्यालयाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या दीड वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील २० लाचखोरांना कोर्टाने शिक्षा सुनावली. शंभर रुपयांपासून लाखो रुपयांची लाच घेऊन नागरिकांची अडवणूक करणाऱ्या लोकसेवकांना एसीबीने जरब बसवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३० कारवायांमध्ये लाचखोरांना अटक होत आहे. चालू वर्षात केवळ नऊ महिन्यांत २४ लाचखोरांवर कारवाई झाली. गेल्या दीड वर्षांत झालेल्या ८७ कारवाया या कोल्हापूर कार्यालयातील आजवरच्या अधिकाऱ्यांमध्ये विक्रमी कारवाया आहेत.

यापूर्वी तक्रारदारांना एसीबीच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. आता मात्र केवळ एक फोन केल्यानंतर एसीबीचे अधिकारी आणि कर्मचारीच तक्रारदाच्या घरी पोहोचतात. घरात जाऊन तक्रार नोंद करून घेतली जाते. तक्रारीची खात्री होताच सापळा रचून कारवाई होते. कारवाईत कोणतीही उणीव राहू नये, यासाठी तक्रारदार आणि लाचखोरांचे आवाजाचे नमुने, परिस्थितीजन्य पुरावे काटेकोरपणे जमवले जातात. एका कारवाईचा पंचनामा तयार करण्यासठी आठ तासांचा वेळ घेऊन बिनचूक पंचनामा तयार केला जातो. अचूक पंचनाम्यासह साक्षीची तयारी करून घेतली जाते.

लाच देणारा पहिल्यांदाच जाळ्यात

यापूर्वी लाच घेणारेच एसीबीच्या जाळ्यात सापडले होते. गुरूवारी (ता. ७) पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याला लाच देणारा वकील एसीबीच्या जाळ्यात अडकला. या घटनेमुळे लाच देणाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते हे नागरिकांच्या लक्षात आले. यामुळे लाच देणाऱ्यांवरही वचक निर्माण झाला आहे. लाचेचा मोह टाळल्यास लाच न घेणारे नागरिकांसाठी आदर्श ठरू शकतात.

स्वतंत्र न्यायाधीश

एसीबीचे खटले कोर्टात गतीने चालावेत आणि दोषींना तातडीने शिक्षा व्हावी यासाठी स्वतंत्र न्यायधीशांची तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर कार्यालयाने एसीबीच्या महासंचालकांकडे स्वतंत्र न्यायाधीशांची मागणी केली होती, त्यानुसार २०१५ पासून एसीबीचे सर्व खटले न्यायाधीश के. डी. बोचे यांच्याकडे चालतात. स्वतंत्र न्यायाधीशांमुळे खटल्यांचे कामकाज गतीने सुरू झाले असून, खटले निकाली निघण्याचे प्रमाणही वाढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने दाम्पत्याचा मृत्यू

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

दानोळी (ता.शिरोळ) येथे विजेच्या धक्क्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला. दसऱ्यादिवशी सकाळी सुनेला वाचवण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली. बाळासो लक्ष्मण घाटगे (वय ५०) व अंजना बाळासो घाटगे (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत. सून सरिता दीपक घाटगे (वय २५) या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सरिता या अंगणातील कपडे वाळत घालण्याच्या तारेवर धुतलेले बारदान (पोते) वाळत घालत होत्या. यावेळी त्यांना विजेचा धक्का बसला. जवळच असणारे सासू सासरे हे दोघे सरिता यांच्या मदतीला धावले. त्यांनी सुनेला धक्का देऊन बाजूला केले. दरम्यान तारेवरच्या ओल्या बारदानाला स्पर्श झाल्याने अंजना यांना विजेचा धक्का बसला. यावेळी पत्नीस वाचविण्याच्या प्रयत्नात बाळासो यांनाही विजेचा धक्का बसला. बाळासो व अंजना हे दाम्पत्य बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घाटगे यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान, घटनास्थळी तहसीलदार किरण काकडे, तलाठी ए.आर.पतंगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी पाहणी केली. महावितरणचे शाखा अभियंता सूर्यवंशी यांनीही भेट दिली. विद्युत अभियंता एफ. एम. मुल्ला यांनी पंचनामा केला.

चौकट

आक्रोश अन् हळहळ

ऐन दसऱ्यादिवशी विजेच्या धक्क्याने अंजना व बाळासो घाटगे या दाम्पत्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर घाटगे कुटुंबिय व नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दानोळी ग्रामस्थांतून या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागलचा उरूस३१ ऑक्टोबरपासून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,कागल

कागलचे ग्रामदैवत गहिनीनाथ हजरत गैबी पीर ऊरूस ३१ ऑक्टोबर ते पाच नोहेंबरअखेर साजरा होत आहे. यानिमित्त धार्मिक विधींबरोबर अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत एक व्यापक बैठक येथील शाहूनगर वाचनालय येथे पार पडली.

बैठकीत ऊरूस काळात कायदा आणि सुव्यवस्था रहावी, कोणतेही डीजिटल फलक लावण्यात येऊ नयेत, परगावाहून येणाऱ्या व्यापाऱ्यांना कमी किमतीत जागा उपलब्ध करून द्यावी, परगावाहून येणाऱ्या व्यापारी, विक्रेते, दुकानदार यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी कागलकरांनी घ्यावयाची आहे. तसेच चालूवर्षीचा ऊरूस हा नगरपालिकेच्या निवडणूक काळात येत असल्याने उत्सवावर आचारसंहितेचे सावट राहाणार आहे. त्यामुळे सर्व कार्यक्रम आचारसंहितेच्या अधीन राहून करावे, आदी सूचना करण्यात आल्या.

बैठकीत रमेश माळी, प्रकाश गाडेकर, संजय सुतार, पोलिस निरीक्षक यशवंत गवारी, संजय चितारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्षा संगीता गाडेकर, उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, बाळ पाटील, बंडोपंत वाळवेकर, बाळासाहेब बरकाळे, किरण मुळीक, सुभाष पोवार, सर्व नगरसेवक, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर मुलींना मदत करून लेकीच्या स्मृतींचे जतन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्त्यावरच्या लाइट दुरूस्तीचे काम झाल्यानंतर वायर उघड्यावर टाकून गेलेल्या वीजकर्मचाऱ्यांच्या अवकृपेने १२ वर्षाच्या साक्षीला विजेचा धक्का लागला आणि ती कायमची गेली. अवखळ वय... नुकतच आयुष्य तरूणाईच्या कवेत आलेलं... पण मृत्यूने तिला गाठलं आणि साक्षीचा पिता अस्वस्थ झाला. या घटनेला तीन वर्षे झाली. पानपट्टीच्या व्यवसायातून दिवसाकाठी मिळणारे जेमतेम उत्पन्न. त्यातून हा माणूस रोज शंभर रूपये वेगळे काढतो... कशासाठी? तर दरवर्षी साक्षीच्या स्मृतीदिनी साक्षीएवढ्या वयाच्या शंभर मुलींना शाळेचे साहित्य देतो.... माझी लेक तर गेली... पण या लेकींमध्ये कुठेतरी साक्षी असेल का या भाबड्या आशेने या पित्याचे काळीज समाधान पावते. मुलीचा भ्रूण आहे का बायकोच्या गर्भात? असं विचारून लेकीचा जीव घेणाऱ्या श्रीमंत बापांच्या गर्दीत विजय लांडगे हा सामान्य पिता मला जास्त श्रीमंत ठरतो.

उचगाव येथे पानपट्टी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या विजय लांडगे यांची कन्या साक्षीचे तीन वर्षापूर्वी वीजेचा धक्का लागून निधन झाले. इंदुमती हायस्कूलमध्ये शिकणारी साक्षी चुणचुणीत आणि हुशार होती. नवरात्रीचे दिवस होते. घराजवळील चौकात दांडिया खेळायला जाण्यासाठी बाहेर पडलेली साक्षी चप्पल विसरली म्हणून पुन्हा घरी आली. सायंकाळचे साडेसात वाजले होते. त्यादिवशी घरालगत असलेल्या वीजेच्या खांबावर वीजवायर दुरूस्तीचे काम करून वीज कर्मचारी निघून गेले होते. मात्र, त्यांनी वीजप्रवाह सुरू असलेल्या वायर उघड्यावर टाकल्या होत्या. लांडगे यांचे घर खांबाशेजारीच असल्यामुळे त्यांच्या घरातील वीज प्रवाह धोकादायक बनला होता. संध्याकाळी दिवा लावण्यासाठी साक्षीच्या आजीने बटन ओढले आणि त्यांना शॉक बसला. त्यांना वाचवण्यासाठी साक्षीच्या आई गेल्या असता त्यांनाही झटका लागला. आई आणि आजीला मागे ओढण्यासाठी साक्षी पुढे गेली आणि तिला मात्र नियतीने आपल्या जाळ्यात ओढले. काही क्षणातच साक्षी कोसळली आणि निपचित पडली. दांडिया खेळायला जाते म्हणून सांगणारी साक्षी जगच सोडून गेली.

तीन वर्षांपूर्वीच्या या घटनेने लांडगे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. काहीही चूक नसताना साक्षीचा जीव गेला ही गोष्ट तिच्या वडिलांच्या मनाला अस्वस्थ करत होती. तिच्या आठवणींनी त्यांचे डोळे भरून यायचे. पहिल्या स्मृतिदिनी वडीलांनी ठरवलं की साक्षीचे श्राद्ध वेगळ्या पद्धतीने करायचे. जेमतेम परिस्थिती असलेल्या कुटुंबातील दहा - बारा वर्षाच्या मुलींना शालेय साहित्याची मदत करायची. त्यांच्या साक्षीला पहायचे. आई आणि पत्नीनेही विजय यांना साथ दिली. गेल्या तीन वर्षापासून साक्षीच्या स्मृतिदिनी शंभर मुलींच्या शिक्षणाची वाट सुकर करणारी मदत विजय यांनी केली आहे. लेकीच्या स्मृतिदिनी शंभर मुलींना शालेय साहित्याची मदत देत आठवणी जपणारा एक पिता मुलगीच नको म्हणणाऱ्या बापांच्या गर्दीत समाजातील संवेदनशीलतेचा कोपरा हळवा करून जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images