Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पंचगंगेची पाणीपातळी दोन फुटाने उतरली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीचे पाणी धोका पातळी पेक्षा दोन फुटाने कमी होऊन इशारा पातळीकडे जात आहे. दिवसभरात पंचगंगेचे पाणी दोन फुटाने कमी झाले. शहरात दिवसभर कडकडीत ऊन पडले. नदीचे पाणी संथ गतीने कमी होत असले तरी शहरात पसरलेले पाणी ओसरलेले नाही. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंचगंगेचे पाणी ४१ फुटांवर आली. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून वीजगृहातून २२०० क्सुसेक्स विसर्ग सुरू आहे.

गेल्या आठवड्यात मुसळधार पडलेल्या पावसाने मंगळवारी पूर्ण विश्रांती घेतली. दिवसभर कडकडीत ऊन पडले. मुख्य रस्त्यावर साचलेले पाणी कमी झाले असले तरी शुक्रवार पेठ, दुधाळी, सुतारवाडा, सिद्धार्थनगर परिसरात पाण्याचा प्रवाह कायम आहे. जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला. पाणलोट क्षेत्रातही तुरळक पाऊस झाला. राधानगरी धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सोमवारपासून राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता होती. मात्र अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने पंचगंगेची पाणी पातळी वाढली नसली तरी स्थिर आहे. राधानगरीचा सहा क्रमाकांचा दरवाजा रात्री साडेबारा वाजता आणि तीन क्रमाकांचा दरवाजा पहाटे सहाच्या दरम्यान बंद झाला. पाणी संथगतीने कमी होत असल्याने जयंती पुलावर पाणी पातळी स्थिर आहे. अतिवृष्टीमुळे ८१२ गावे पूरबाधित झाली असून त्याचा ९९९४ जणांना फटका बसला आहे. आठ जणांचा मृत्यू झाला असून १७२९ घरांची पडझड झाली आहे. पूरबाधित गावांतील १७८८ जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वस्त्रनगरीत कामगारांचा एल्गार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी -

कामगार कायदे मोडीत काढणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात वस्त्रनगरी इचलकरंजीत विविध कामगार संघटनांनी जोरदार निदर्शने केला. 'मोदी सरकार चले जाव' आंदोलनात वस्त्रोद्योग क्षेत्रातील सर्वच कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले. ऑगस्ट क्रांती दिन कामगारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन क्रांतीचा दिवस ठरला.

देशपातळीवर कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी सर्वच क्षेत्रातील कामगारांनी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजीतही विविध कामगार संघटनांच्यावतीने केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणास विरोध दर्शवत नगरपालिका कर्मचारी, लाल बावटा सायझिंग वार्पिंग कामगार संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता जनरल कामगार युनियन, इचलकरंजी महाराष्ट्र बांधकाम व्यवसाय कामगार संघटना, कामगार संघटना संयुक्त कृती समिती यांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.

कामगार संघटना संयुक्त कृती समितीसह विविध अकरा संघटनांच्यावतीने प्रांत कार्यालयापासून कॉ. के. एल. मलाबादे चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर चौकामध्ये सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. शेतीखालोखाल वस्त्रोद्योगातून मोठा रोजगार मिळतो. त्यातून सरकारी खजिन्यात प्रचंड प्रमाणात आर्थिक फायदा मिळतो. मात्र या कामगारांकडे मात्र सरकार दुर्लक्ष करीत आहेत. कामगारांसाठी विविध योजना राबविण्याऐवजी कामगार विरोधी धोरण राबवित आहेत, हे निषेधार्ह आहे, अशा शब्दांत कामगार नेत्यांनी जोरदार टीका केली.

आंदोलनात कॉ. दत्ता माने, शामराव कुलकर्णी, सदा मलाबादे, भरमा कांबळे, परशराम आगम, हणमंत लोहार, आनंदराव चव्हाण, भाऊसाहेब कसबे, बंडोपंत सातपुते, मारुती आजगेकर यांच्यासह यंत्रमाग कामगार, कांडीवाले, जॉबर, दिवाणजी, बांधकाम, वहिफणी, सायझिंग, गारमेंट, प्रोसेस कामगार सहभागी झाले.

जनता जनरल कामगार युनियनच्यावतीने बशीर जमादार, नुरमहंमद बेळकुडे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रांत कार्यालयासमोर सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली. इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असल्यामुळे येथील असंघटीत क्षेत्रातील कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेतून मोफत घरकुले मिळावीत, या प्रमुख मागणीसह आधारकार्ड किंवा ओळखपत्र असणार्यांना घरकुलाचा अर्ज मिळावा, तातडीने सर्व्हेक्षण करण्यात यावे, घोषणेनुसार सर्व बेघरांना घरकुले मिळावीत, सर्वच कामगारांना पिवळी शिधापत्रिका आणि दरमहा ३५ किलो धान्य देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात उषा कांबळे, अंजना रेंदाळकर, जयश्री होगाडे, सोनाली हवालदार, रामचंद्र बंगाळे यांच्यासह कामगार सहभागी झाले.

नगरपरिषद विविध कर्मचारी संघटनांच्यावतीने नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर शिष्टमंडळाच्यावतीने नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतचे निवेदन नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना देण्यात आले. निवेदनात, पाच तारखेच्या आत पगार व पेन्शन मिळावी, सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी,२४ वर्षाची कालबध्द पदोन्नती मिळावी, अनियमित कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, कर्मचाऱ्यांच्या घरबांधणी कर्जासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी ए. बी. पाटील, अमरसिंह माने, के. के. कांबळे, नौशाद जावळे, संभाजी काटकर, सुनिल बेलेकर, हरी माळी, सुभाष मोरे यांच्यासह सर्व संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चौकट

बांधकाम कामगारांच्या मागण्या

इचलकरंजी महाराष्ट्र बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्यावतीनेही मोर्चाद्वारे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाने कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांसाठी २४ योजना सुरु आहेत. परंतु लाभदायक असलेल्या या योजनांचा वेळेवर लाभ मिळत नाही. डिसेंबर २०१५ मध्ये अर्ज केलेल्या कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती, लग्न, अंत्यविधी, बाळंतपण अशा योजनांचे अर्ज तातडीने मंजूर करावेत, बंद केलेली मेडीक्लेम योजना तातडीने सुरु करण्याची ग्वाही देऊनही चार महिने लोटले अद्याप योजना सुरु केलेली नाही. ती तातडीने सुरु करावी, फंड, विमा, पाच लाखाचे घरकुल, ६० वर्षांवरील कामगारांना पाच हजार रुपये पेन्शन सुरु करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी, शेती आणि घरांना फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन दिवस झालेल्या पावसामुळे एसटी महामंडळाला १२ लाखांचा फटका बसला आहे. शहरातील सुतारवाडा, सिद्धार्थनगर, जाधववाडी परिसरात पाणी आल्याने काही घरांतील नुकसान झाले. पंचगंगा, भोगावती नदीसह इतर नद्या, ओढे-नाल्यांच्या पुराच्या पाण्याखाली सुमारे ४२ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र गेले आहे.

पावसाचा जोर ओसरला असला तरी शहरातील काही भागांत पाणी कायम आहे. शाहुपूरीतील कुंभार गल्ली, लक्षतीर्थ वसाहत, जाधववाडी, लक्ष्मीपुरीतील गाडी अड्डा परिसरात पाणी आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील रहिवाशांना माशा आणि चिलटांचा त्रास सुरू झाला आहे. रंकाळा रोडवर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चिलटांचा त्रास वाहनधारकांना होत आहे. दोन दिवस दमदार पाऊस आणि कडक ऊन पुन्हा ढगाळ वातावरणामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. वातावरणामुळे रोगराईत वाढ झाली असून अनेकांना सर्दी, ताप खोकल्याने त्रस्त आहेत. ओल्या कचऱ्याचे ढीग साचले आहे. कचऱ्याचा उठाव वेळेवर केले जात नसल्याने दुर्गंधी पसरली आहे.

दमदार पावसाने पंचगंगा, भोगावती, कुंभी, कासारी, हिरण्यकेशी, घटप्रभा, वारणा या नद्यांच्या पात्राशेजारी असणारे ऊस, भात ही पिके पाण्याखाली गेली आहेत. उसाचे क्षेत्र पाण्याखाली गेले असल्याने पिकाला धोका निर्माण झाला आहे. धरणांतून विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदीची फूग कायम आहे. ऊस पुराच्या पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचा फटका आगामी साखर कारखान्यांच्या हंगामाला बसण्याची शक्यता आहे.

पावसामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला फटका बसला आहे. चार दिवसांत सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले आहे. सात राज्य मार्ग आणि नऊ प्रमुख जिल्हा मार्ग बंद आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. काही ठिकाणी पर्यायी मार्गे वाहतूक सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार महिन्यांत २० कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर्थिक वर्षारंभीच घरफाळा बिले उपलब्ध करून दिल्यामुळे एप्रिलपासून महापालिकेच्या तिजोरीत २० कोटी ७७ लाख रुपयांहून अधिक घरफाळा जमा झाला आहे. गेल्या चार महिन्याच्या जमा झालेल्या महसुलीवर नजर टाकली असता मिळकतधारकांनी थेट रक्कम भरण्याला प्राधान्यक्रम दिला आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून तीन लाख रुपये जमा झाले आहेत. या आर्थिक वर्षात महापालिकेला ४२ कोटी, ४९ लाख रुपयांच्या घरफाळा वसुलीचे उद्दिष्ट आहे.

महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी अॅक्सीस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन घरफाळा भरण्याची सुविधा केली आहे. महापालिकेच्या या www.kolhapurcorporation.gov.in वेबसाइटवर ऑनलाइन घरफाळा भरण्याची सुविधा आहे. महापालिकेततर्फे दरवर्षी घरफाळा बिलांच्या वाटपास​ विलंब होतो. त्याचा परिणाम थेट वसुलीवर होऊन अपेक्षित उत्पन्न जमा होत नाही. महापालिकेने या वर्षी स्पीड पोस्टद्वारे घरफाळा बिले पाठविली. शिवाय एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधीत घरफाळा बिलाचा भरणा करणाऱ्यांना सहा टक्के सवलत दिली. मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे कर निर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांनी सांगितले.

नागरी सुविधा केंद्र, बँकेतही भरणा

महापालिकेच्या पाचही नागरी सुविधा केंद्रात रोख, धनादेश आ​​णि डीडी स्वरुपात कर जमा करण्याची सुविधा करण्यात आली आहे. मिळकतधारकांनी या नागरी सुविधा केंद्रात २०,६१,६७, ४२४ रुपयांचा भरणा केला आहे. मिळकतधारकांना घरफाळा भरण्यासाठी तिष्ठत थांबायला लागू नये, याकरिता अॅक्सीस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेतही घरफाळा भरण्याची सोय केली आहे.

१लाख ४१,३५१

शहरातील एकूण मिळकती

४२ कोटी ४९ लाख रुपये

घरफाळा विभागाचे उद्दिष्ट

२०,६१,६७,४२४

नागरी सुविधा केंद्रात जमा रक्कम(एप्र‌िल ते ९ ऑगस्ट)

१२,५६,२०५

तीन बँकेत जमा घरफाळा

३,०८,२७५

ऑनलाइन जमा रक्कम

२०,७७,३३,९०४

एकूण

३२ मिळकतधारकांना नोटिसा लागू होणार

शहरातील ३२ मिळकतीची प्रत्येकी १५ लाख रुपयांहून अधिक थकबाकी आहे. महापालिकेकडून संबंधित मिळकतधारकांना थकीत घरफाळा भरण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र ३२ मिळकती संदर्भात थकीत घरफाळा भरण्यात आला नाही. या मिळकतधारकांना नोटिसा पाठवून आयुक्तांसमोर सुनावणी होणार आहे. महिनाभरात नोटिसा काढल्या जाणार आहेत. तसेच एका हॉटेलवर थकीत घरफाळा प्रकरणी बोजा चढविण्यात येणार आहे. या हॉटेल व्यावसायिकाकडे २० लाख रुपयांच्या आसपास घरफाळा आहे.


जादा घरफाळा लागू होणे, मिळकतींची नोंद व्यवस्थित न होणे अशा अनेक तक्रारी आहेत. मिळकतधारकांच्या शंका आणि तक्रारींचे निरसन करण्यासाठी वॉर्डनिहाय कॅम्प आयोजित केले जाणार आहेत. मिळकतधारकांच्या सर्व तक्रारींची सोडवणूक केली जाईल. शहरातील मिळकतींचा सर्व्हे सुरू असल्याने येत्या वर्षभरात तक्रारी राहणार नाहीत.

आयुक्त पी. शिवशंकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खानविलकर स्मृतीबुध्दीबळ स्पर्धेला प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना व कै. दिग्विजय खानविलकर मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने कै. दिग्विजय खानविलकर स्मृती खुल्या जलद बुद्भिबळ स्पर्धेला मंगळवारी येथे प्रारंभ झाला. स्पर्धेत राज्यातील विविध शहरांतून खेळाडू सहभागी झाले आहेत.

मंगळवारी झालेल्या तिसऱ्या फेरीअखेर अग्रमानांकित पुण्याच्या चिन्मय कुलकर्णी, द्वितीय मानांकित सांगलीचा समीर कठमाळे, तृतीय मानांकित उत्कर्ष लोमटे, मुदस्सर पटेल, रवींद्र निकम, श्रृती भोसले, सुमित जोशी, निहाल मुल्ला, जयेश मालपानी, अभिषेक पाटील, श्रीराज भोसले, संतोष रसाळ यांनी तीन पैकी तीन गुण मिळवून आघाडी घेतली आहे. नागाळा पार्कमधील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवनमध्ये स्विस लीग पद्धतीने ही स्पर्धा होत आहे.

तिसऱ्या फेरीत सांगलीचा रोहित मोकाशी, शैलेश नेर्लीकर आणि वरद आठल्ये हे तिघेजण अडीच गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. स्पर्धेचे उद् घाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते झाले. यावेळी महाडिक यांनी शालेय पातळीपासूनच मुलांसाठी बुद्भिबळचा समावेश करण्यासाठी आग्रही राहू, असे आश्वासन दिले. व्यासपीठावर राजलक्ष्मी खानविलकर, मधुरिमाराजे छत्रपती, जिल्हा बुद्भिबळ संघटनेचे अध्यक्ष विश्वविजय खानविलकर, सचिव भरत चौगुले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालक राजेंद्र मकोटे यांनी केले.

स्पर्धेला आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषदेचे ए. वाय. पाटील, जिल्हा दूध संघाचे अरुणकुमार डोंगळे यांनी सदिच्छा भेट दिली. स्पर्धेत पंच म्हणून भरत चौगुले, सुर्याजी भोसले, प्रतीम घोडके, जयश्री पाटील, अनिता पंडीतराव, दत्ता मोरे पंच म्हणून काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचाराविना होतेय फरफट

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

कोल्हापूर: गेल्या पाच महिन्यापासून सरकारकडून एकही रुपया निधी न मिळाल्याने कोल्हापुरात एड्स/ एचआयव्हीचे रुग्ण औषधाविना तडफडत आहेत. या रुग्णांवर उपचार तर सोडाच, नियंत्रणासाठीच कोणताच उपक्रम राबविता येत नाहीत. परिणामी ‌एड्स/ एचआयव्ही रुग्णांची संख्या वाढत आहे. स्वयंसेवी संस्थानाही अनुदानच न मिळाल्याने त्यांचेही काम बंद असून यामुळे २० हजारावर रुग्णांची फरफट होत आहे.

भारतात एकूण २१ लाखांपेक्षा अधिक एड्स/एचआयव्हीग्रस्त असून यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. आंध्र आ​णि तेलंगणात चार लाख तर महाराष्ट्रात तीन लाखावर रुग्ण आहेत. राज्यात ज्या प्रमुख पाच जिल्ह्यात याचे प्रमाण सर्वाधिक आहे, त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश आहे. इचलकरंजी, मिरज, कोल्हापूरात एचआयव्हीचे प्रमाण जास्त असल्याने या भागात एडस् नियंत्रणासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. यासाठी तब्बल दोन कोटी रुपये निधी सरकारकडून ​दिला जातो. महाराष्ट्र राज्य एडस कंट्रोल सोसायटी, एडस् नियंत्रण कक्षाबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून हे काम केले जाते. यामुळे कोल्हापूर आणि या परिसरातील एड्सचे प्रमाण कमी झाले.

गेल्या पाच महिन्यांपासून मात्र एडस् जनजागृतीसाठी जे सरकारी कार्यालय आणि स्वयंसेवी संस्था काम करतात, त्यांना एकही रुपयाही सरकारकडून मिळाला नाही. यामुळे उपक्रम तर दुरच रुग्णांना औषधे देखील देण्याचे बंद करण्यात आले आहे. ही औषधे महागडी असल्याने खासगी दुकानात घेणे परवडत नसल्याने सध्या हे रुग्ण औषधाविनाच तडफडत आहेत. शिवाय प्राथमिक टप्यात हा रोग असलेल्या रुग्णांनाही औषध नसल्याने त्यांच्यातील प्रमाण वाढत आहे. जाणीव जागृती उपक्रम नसल्याने एचआयव्ही रोखले जात नसल्याने हे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हे सत्य लपवून ठेवण्यासाठी अशा रुग्णांची आकडेवारी लपवण्याचा आदेशच देण्यात आला आहे.

कोल्हापूर, सातारा व सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी गतवर्षी दोन कोटींचा निधी आला होता. त्यामध्ये एड्स नियंत्रण कक्षाला केवळ चार लाख मिळाले. त्यापूर्वी या कार्यालयास बारा लाख मिळाले होते. मुळातच कमी असणारा निधी देखील मिळाला नाही. यामुळे एचआयव्ही तपासणी, उपचार, औषधे सर्वच बंद आहे. केवळ कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण राज्यात ही स्थिती आहे. निधी तातडीने मिळावा म्हणून स्वयंसेवी संस्था सतत मागणी करत आहेत, मात्र ते गांभीर्याने घेतले जात नसल्याने काही संस्थांनी कामच थांबवले आहे. कर्मचाऱ्यांना पगारच नसल्याने ते देखील काम टाळत आहेत. स्टेशनरी नसल्याने इतर कामही बंद आहे.

पाच महिन्यापासून निधी नसल्याने सर्व उपक्रम ठप्प आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दीड लाखाचा निधी दिला असला तरी तांत्रिक मंजुरी नसल्याने तो वापरणे अवघड झाले आहे. रुग्णांना किमान दरमहा औषधे देण्यासाठी तातडीने निधीची गरज आहे.

दीपा शिपूरकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी

गेल्या पाच महिन्यापासून सरकारकडून निधी आला नाही. तो लवकरात लवकर प्राप्त होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. स्वयंसेवी संस्थाना तातडीने ​अनुदान देण्यात येईल.

रमेश वर्धन ,विभागीय कार्यक्रम अधिकारी

राज्यात तीन लाखावर लोकांना एचआयव्ही

एप्रिलपासून निधीच नाही

सामाजिक संस्थांचा सहभाग

कोल्हापुरात वीस हजार एडसधारक

२१०० लोकांना विविध उपक्रम

१८ महिन्यापासून अतिशय कमी निधी


चौकट २

भारतातील एडसग्रस्त: २१ लाख

आंध्र व तेलगंणा : ४ लाख

महाराष्ट्र : ३ लाख

कर्नाटक : २ लाख

गु​जरात : १ लाख ६६ हजार

बिहार: १ लाख ५१ हजार

उत्तर प्रदेश: १ लाख ५० हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षण मेळाव्यात गोंधळ

$
0
0

म.टा.वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील मराठा आरक्षण मेळाव्यात इतिहास संशोधक इंद्रजित सांवत यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ केल्याने मेळाव्यात गोंधळ उडाला. त्यामुळे मेळाव्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळातच व्यासपीठावर फरशी भिरकावण्याचा प्रकार घडला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

इचलकरंजी मराठा आरक्षण समितीच्यावतीने येथील श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी आपल्या भाषणात एका घटनेचा उल्लेख करताना संभाजी भिडे यांचा उल्लेख करीत ते चुकीचा इतिहास सांगून युवकांची माथी भडकावण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे वक्तव्य केले. सावंत यांच्या या वक्तव्याला मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत व्यासपीठाच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या गोंधळातच व्यासपीठाच्या दिशेने फरशी भिरकावण्यात आली. तर नाट्यगृहाच्या आवारात ठेवलेला प्रोजेक्टरही जमावाने फोडला. त्यामुळे मेळाव्यात सुमारे अर्ध्या तास व्यत्यय निर्माण झाला. संयोजक व व्यासपीठावर नेते मंडळींनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर गावभाग पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वादावर पडदा पडला.

मेळाव्याच्या ठिकाणी ग्रामीण विभागाचे पोलिस उपाधिक्षक विनायक नरळे, पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मेळावा संपल्यानंतर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी इंद्रजित सावंत यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्या: तावडेच्या ताब्यास टाळाटाळ

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

कोल्हापूर: सीबीआयच्या अटकेतील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला कॉम्रेड पानसरे हत्येच्या तपासासाठी ताब्यात घेण्याची मागणी दीड महिन्यांपूर्वीच एसआयटीने सीबीआय कोर्टाकडे केली होती. याला परवानगीही मिळाली, मात्र प्रत्येकवेळी नवे कारण समोर करून तावडेचा ताबा घेण्यास एसआयटीने टाळाटाळ केली आहे. तपासातील दिरंगाईवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढूनही तावडेला ताब्यात घेतले नाही. याबाबत लवकरच पानसरे कुटुंबीय तपास अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने सानातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला १० जून रोजी अटक केली. तावडेचे कोल्हापुरातील दीर्घकाल वास्तव्य आणि साक्षीदार संजय साडविलकर याने दिलेल्या साक्षीवरून तावडेची कॉम्रेड पानसरे हत्येतील सहभागाची शंका वाढली आहे. या पार्श्वभूमीवर तावडेचा ताबा मिळावा, असा अर्ज एसआयटीने २० जूनला सीबीआय कोर्टाकडे केला होता. कोर्टाने याला तातडीने परवानगीही दिली. परवानगी मिळून दीड महिना उलटला, मात्र अजूनही एसआयटीने तावडेचा ताबा घेतलेला नाही. २० जूनपासून हाय कोर्टातील सुनावणीदरम्यान तीन वेळा खुद्द हाय कोर्टानेच तपास यंत्रणांच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यानही हाय कोर्टाने तपास यंत्रणांना खडे बोल सुनावले आहेत. फरार आरोपींच्या पाठीमागे धावण्यापेक्षा जे संशयित ताब्यात आहेत, त्यांची चौकशी का केली जात नाही? असाही सवाल कोर्टाने उपस्थित केला होता. यानंतरही एसआयटीकडूनही तावडेचा ताबा घेण्याच्या हालचाली गत‌िमान झालेल्या नाहीत हे विशेष.

कॉम्रेड पानसरे हत्येचे तपास अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस तावडेचा ताबा घेणे टाळले. तपास अधिकारी सुहेल शर्मा यांच्या उपस्थितीनंतर त्यांना पूर्वतयारीसाठी वेळ आवश्यक असल्याचे कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. यानंतर एसआयटी प्रमुख देशाबाहेर असल्याने ताबा पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली होती, त्यामुळेही तावडेचा ताबा घेण्यास एसआयटी अनुत्सुक होती. आता तपास अधिकारीही उपस्थित आहेत आणि पूर्वतयारीला पुरेसा अवधीही मिळाला आहे. दहा दिवासांपूर्वीच एसआयटी प्रमुख संजय कुमार यांनीही कोल्हापुरात येऊन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. चार ऑगस्टला हायकोर्टात झालेल्या सुनावणीत पुन्हा यावरून कानउघडणी झाली, मात्र अजूनही तावडेचा ताबा घेण्याच्या हालचाली सुरू नाहीत. यामुळे एसआयटीच्या भूमिकेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असून, पानसरे कुटुंबीयांनी नाराजीही व्यक्त केली आहे. लवकरच तपास अधिकाऱ्यांना भेटून तपासाबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले.

दबाव की दक्षता?

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वीच कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचा कट रचला गेला होता, अशी माहिती सीबीआयच्या तपासात उघडकीस आली आहे. या पार्श्वभूमीवर एसआयटीसाठी तावडेची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे. या चौकशीतून काही नवे खुलासेही समोर येऊ शकतात. तावडेचे कोल्हापूर कनेक्शन पाहता तावडेची चौकशी करण्यात पोलिसांवर दबाव आहे की पोलिस अतिदक्षता घेत आहेत? याबाबत स्पष्टता नाही.


गेल्या दीड महिन्यांत हायकोर्टाने तपासाबाबत पोलिसांना धारेवर धरले आहे. सध्याच्या तपासावरून हायकोर्टाचे समाधान झालेले नाही. सामाजिक आणि न्यायालयाच्या दबावानंतरही तपास पुढे सरकत नाही हे दुर्दैवी आहे. याबाबत लवकरच आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत.

मेघा पानसरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार वेतनवाढदर्जा दिला वेतनवाढ नाहीअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मत

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'आमदारांना फक्त इतर राज्यांतील आमदारांप्रमाणे दर्जा दिला आहे, वेतन वाढ दिली नाही. देशातील इतर राज्यांनी आमदारांच्या वेतनात वाढ केल्यानंतर आपल्या आमदारांनीही वेतनवाढीची मागणी केली होती, त्यानुसार ही वाढ झाली आहे, मात्र, वेतनवाढ कधी लागू करायची या बाबत अजून ठरलेले नाही,' अशी महिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अर्थमंत्री सहकुटुंब विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते.

मुनगंटीवार म्हणाले, आमदारांच्या वेतनवाढीचा किती बोजा पडेल, ते अजून पहिले नाही. मात्र, आमदारांच्या वेतनवाढीचा भार हजारो कोटींचा नाही. इतर क्षेत्रांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतल्यावर शेकडो, हजारो कोटींचा भार सरकारच्या तिजोरीवर पडतो.'

विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्न कायम

विना अनुदानित शिक्षकांच्या वेतनाबाबत अर्थमंत्री म्हणाले, 'विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्न शिक्षणमंत्री विनोद तावडे हाताळत आहेत. हा प्रश्न आमदारांच्या वेतनवाढीशी जोडणे योग्य होणार नाही.'

सूडबुद्धीने वागणे योग्य नाही

बाळगंगा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावरील कारवाईबाबत घुमजाव करीत एका राजकीय पक्षाने दुसऱ्या राजकीय पक्षाशी सूडबुद्धीने वागणे योग्य नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. कायदा आपल्या बाजूने काम करीत असून, त्यात हस्तक्षेप करणे योग्य होणार नाही. भुजबळ यांच्या विरोधात सबळ पुरावे होते म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली. सबळ पुरावे गोळा झाल्याशिवाय कारवाई करणे योग्य नसल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. वेगळ्या विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत भूमिका मंडली आहे, तीच भूमिका असल्याचेही सांगत अधिक भाष्य करणे टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्मिळ कलिंदरचीचार पिल्ले सापडली

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

मल्हारपेठ येथील भेळ आंबा नावाच्या शिवारातल्या एक झाडाच्या मोडलेल्या एका पोकळ फांदीतून खाली पडलेल्या कलिंदरच्या चार पिल्लांना मल्हारपेठ येथील प्राणिमित्र सुरज भिसे याने जीवदान देत त्यांना वन्यजीव विभागाच्या स्वाधीन केले.

मल्हारपेठ येथील प्राणिमित्र सुरज भिसे यांना गावातील आंबा नावाच्या शेत शिवारात कलिंदरची पिल्ले झाडाच्या खाली पडली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरज भिसे यांनी प्रसंगावधान राखत व पावसाची रिपरिप पाहून त्या पिल्लांना घरी सुरक्षित ठेवून वन विभागाला या बाबतची माहिती दिली. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरज भिसे यांच्याशी संपर्क साधत कलिंदरची पिल्ले ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवले.

अशी आहेत पिल्ले

साधारण एक फूट लांबी असलेली ही पिल्ले दुर्मिळ कलिंदर या जातीची आहेत. हा प्राणी रात्री आपल्या अन्नाच्या व भक्षाच्या शोधात फिरताना दिसतो. हा पोकळ झाडांच्या बुंध्यात. वास्तव्यास असतो. हुंबर, पिंपळ, पिंपरण या झाडांची फळे खातो. हा पूर्णत: शाकाहारी वन्यप्राणी आहे. हा प्राणी शक्यतो जंगलात आढळतो. साधारण कलिंदरची मादी अंदाजे तीन फूट लांबीची असते. झाडावरच वास्तव्य असल्याने झाडावरून चढण्याची व उतरण्यासाठी अत्यंत चपळाई या प्राण्यात आढळून येते, अशी माहिती वन परिमंडळाचे वनाधिकारी ए. पी. जाधव यानी दिली.

वनविभागाच्या ताब्यात दिल्यानंतर वनाधिकारी जाधव, वनरक्षक महादेव कदम. रमेश कदम यानी या पिलांना भेळांबा या शिवारातल्या या झाडाच्या एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. पिल्ले केवळ आठ दिवसांची असल्याने त्यांची आई त्यांना भेटणे गरजेचे असल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या पिल्लांना ज्या ठिकाणी मादीचा वावर आहे, त्याच ठिकाणी सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेतून विसर्ग बंद

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी (दि. ७) तीन फुटांवर उचलण्यात आलेले कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे चौथ्या दिवशी बुधवारी पहाटे पाच वाजता बंद करण्यात आले. तसेच पायथा वीजगृहातून होणारा पाण्याचा विसर्गही बंद करण्यात आला आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कायम असून, धरणात ३७ हजार ५१३ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे, तर जलाशयात सध्या ९१.२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कोयना, नवजा, महाबळेश्वर या ठिकाणी एक हजार मिलीमीटर जादा पाऊस पडला असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने बुधवारी सायंकाळी दिली.

दरम्यान, कोयनेतून एकूण ४.०५ टीएमसी इतका पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातील आवकही झपाट्याने वाढली होती. त्यामुळे धरणातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी धरणातून विसर्ग सुरू होता. कोयना, नवजा व महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असल्याने कोयना, केरा, काजळी, काफना, वासना नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली होती. त्यामुळे संगमनगर (धक्का) येथील कोयना नदीवरील जुना पूल व निसरे येथील फरशी पूल पाण्याखाली गेले होते. तसेच नदीकाठावरील शेतीही पाण्याखाली गेली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कन्यागत’ची जय्यत तयारी

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नृसिंहवाडीत कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्री दत्त मंदिरापासून शुक्लतीर्थापर्यंत पालखी मार्गावर मंडप, भगव्या पताका तसेच ठिकठिकाणी श्री दत्त महाजारांचा जयघोष करणारे फलक लावण्यात आले आहेत. तसेच स्वागत कमानी व विद्युत रोषणाईने परिसर उजळून गेला आहे.

गुरूवार (ता.११) पासून कन्यागत महापर्वकाळ सोहळा सुरू होत आहे. कृष्णा नदीच्यापुरामुळे श्री दत्त मंदिर पाण्याखाली असल्यामुळे श्रींची उत्सवमुर्ती नारायणस्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे. या मंदिरापासून गुरूवारी दुपारी पालखी मिरवणुकीस सुरूवात होईल. प्रमुख मार्गावरून मिरवणूक ओतवाडी परिसरातील कृष्णा नदीकाठच्या शुक्लतीर्थावर जाणार आहे. शुक्रवार (ता.१२) हा स्नानाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी सुर्योदयाला शुक्लतीर्थावर श्रींच्या मुर्तीस पवित्र स्नान घालण्यात येणार आहे.

शुक्लतीर्थावर स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे याठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. मात्र शुक्लतीर्थ घाटावर कृष्णेचे पुराचे पाणी आल्याने घाट अद्याप पाण्याखाली आहे. घाट परिसरात शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लगबग सुरू आहे. कन्यागत सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडीतील मिठाईची दुकानेही सज्ज झाली आहेत.

नृसिंहवाडीप्रमाणेच शिरोळ तालुक्यात गणेशवाडी, शिरोळ, औरवाड, मजरेवाडी येथेही सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. गणेशवाडी येथेही पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून शुक्रवारी सुर्योदयाला कृष्णानदीकाठी श्रींच्या मुर्तीला स्नान घालण्यात येईल.

शिरोळ येथील श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिरात कन्यागत महापर्वकाल महोत्सवानिमित्त ११ व १२ ऑगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी सायंकाळी साडेचार वाजता श्रींची पालखी मिरवणूक शिरोळ येथून नृसिंहवाडीकडे निघणार आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी नृसिंहवाडी येथे शिरोळच्या मानाच्या जय भवानी तोफेच्या पाच सलामीने कन्यागत महापर्वकाळास प्रारंभ होईल.

शिरोळ येथील दत्तगुरु भोजनपात्र मंदिरात गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता काकड आरती व पुजा, दुपारी सव्वा बारा वाजता महापूजा, सायंकाळी चार वाजता धूप आरती होईल. यानंतर सायंकाळी साडेचार वाजता श्रींच्या पालखी मिरवणुकीचे नृसिंहवाडीकडे प्रयाण होणार आहे. या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यवृंदासह हत्ती, घोडे, उंट यासह जयभवानी तोफ असे आकर्षण असणार आहेत़

चौकट

विसर्ग कमी करण्याबाबत प्रयत्न

शिरोळ तालुक्यात अद्याप पूरस्थिती कायम आहे. श्री दत्त मंदिर तसेच शुक्लतीर्थ घाट पाण्याखाली आहे. ११ ते १४ ऑगस्ट या काळात नदीपत्रात पाणी कमी राहील यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची बैठकही झाली आहे. कोयनेतून होणारा विसर्गही कमी करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. तर आपत्तीच्या काळात मदतीसाठी एनडीआरएफच्या २० तज्ज्ञ जवानांचे पथक तीन बोटींसह तैनात ठेवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपींकडून हॉटेलची मोडतोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हॉटेलमध्ये वेळेत जेवण न दिल्याच्या रागातून चौघा फाळकूटदादांनी हॉटेल मालकाला धमकावत हॉटेलची मोडतोड केली. बुधवारी (ता. १०) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मिरजकर तिकटी येथील कृष्णा हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. हॉटेल मालक धनाजी मारुती जाधव यांनी जुना राजवाडा पोलिसांत याची फिर्याद दिली.

जाधव यांचे मिरजकर तिकटी येथे कृष्णा हॉटेल आहे. त्यांनी हॉटेल सुंदर आणि सतीश शेट्टी यांनी चालविण्यासाठी दिले आहे. बुधवारी दुपारी हॉटेलच्या पिछाडीस रोहन चव्हाण, बाबू, प्रवीण, विकी हे चौघे मद्यप्राशन व नशापान करत बसले होते.

रोहनने हॉटेलमधील वेटरकडे जेवणाची मागणी केली. वेटरने त्यांना पुलाव नेऊन दिला. त्यानंतर दोनदा त्यांनी वेटरकडे जेवणाची मागणी केली. वेटरने जेवण देण्यास नकार दिल्याने मद्यधुंद अवस्थेतील रोहन, बाबू, प्रवीण आणि विकी यांनी हॉटेलचालक सुंदर शेट्टी यांच्या शर्टची कॉलर पकडून धमकावले. त्यांना मारहाण करीत हॉटेलमधील काचा, बरण्या फोडण्यात आल्या. मात्र हॉटेलमध्ये गर्दी जमा झाल्याने चौघांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

दरम्यान, हॉटेलची मोडतोड करताना हल्लेखोरांपैकी एकजण जखमी झाला. त्याच्यावर परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुना राजवाडा पोलिसात याबाबत मालक धनाजी जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे.

नशाबाजांची परिसरात दहशत

मिरजकर तिकटी परिसरातील काही हॉटेल्सच्या पिछाडीस दारू आणि गांजा ओढण्याचा अड्डाच आहे. दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच या परिसरात पडलेला असतो. फाळकूट दादांची दहशत असल्याने कोणीच त्यांच्या विरोधात तक्रार करीत नाही. काहींनी याबाबत पोलिस ठाण्यात माहिती दिली. मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, त्यामुळे परिसरात फाळकूट दादांची दहशत वाढली आहे. हॉटेलच्या तोडफोडीनंतर प्रत्यक्षदर्शींनी संशयितांची नावे सांगण्यासही नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर ओसरण्याची गती संथच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीच्या पुराची पातळी कमी होत असून बुधवारी पाणी पातळी इशारा पातळीच्याही खाली गेली. यामुळे बहुतांश रस्ते खुले झाले असून एसटी तसेच अन्य वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान, दिवसभर पावसाने चांगली उघडीप दिली असली तरी सकाळी तसेच सायंकाळी काही काळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सहा दिवसानंतर बुधवारी सायंकाळनंतर शिवाजी पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्ववत झाली.

तीन ते चार दिवसांपासून पाऊस एकदम कमी झाला असला तरी बुधवारी सकाळी जोरदार सरी कोसळल्या. यामुळे पुन्हा पावसाला सुरूवात होईल का अशी आशंका होती. पण दिवसभर उघडिप दिली. रविवारपासून कमी झाले असले तरी धोका पातळीवर पोहचलेली पंचगंगा नदीच्या पुराची पातळी मात्र अतिशय संथ पद्धतीने कमी होत होती. मंगळवारी दिवसभरात पाणी पातळी धोका पातळीवरुन ४० फुटापर्यंत खाली आली होती. तरीही ३९ फुटाच्या इशारा पातळीवर पाणी असल्याने पुराचा धोका पुर्णपणे कमी झाला असे समजण्यात येत नव्हते. बुधवारी सकाळीही पाणी पातळी ३९ फूट ७ इंचावर होती. त्यानंतर मात्र दिवसभरात ​तीन फुटाने पाणी पातळी कमी झाली.

सध्या ४३ बंधाऱ्यावर अजूनही पुराचे पाणी आहे. नृसिंहवाडी परिसरातील पुराची पातळीही बुधवारी सकाळीच इशारा पातळीच्याही खाली गेली आहे. शहरातील पूर कमी झालेल्या सुतार वाडा, गायकवाड पुतळा परिसर , शुक्रवार पेठ या परिसरात महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिमेबरोबरच औषध फवारणी सुरू केली आहे. जयंती नाल्याचे पाणीही भरपूर कमी झाले असून या परिसरात मात्र प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवप्रतिष्ठानवर गुन्हे दाखल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इचलकरंजीत मराठा आरक्षण मेळाव्यात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्यावर हल्ला करणाऱ्या शिवप्रतिष्ठान संघटनेवर कारवाई करावी. त्याचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी हे कार्यकर्त्यांच्या मनात जातीयवादी विष पेरून त्यांना हिंसक कारवाया करण्यास प्रवृत्त करीत आहेत. भिडे गुरुजी, त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सर्व मराठा बहुजन संघटनांनी केली आहे. संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना निवेदन दिले.

मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, क्षत्रिय मराठा, स्वाभिमान संघटना, मल्हार सेना, छत्रपती शिवाजी विद्यार्थी सत्यशोधक वाचनालय, फुले, शाहू, आंबेडकर स्टडी सर्कल या संघटनांनी इचलकरंजीतील प्रकाराचा निषेध केला आहे.

याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संशोधनात्मक लेखनातून व साहित्यातून मांडला आहे. शिवरायांच्या दुसऱ्या मुद्रेचे संशोधन त्यांनी केले आहे. 'राजर्षी शाहू महाराजांचे चित्रमय चरित्र', 'शोध भवानी तलवारीचा', 'शिवरायांच्या समाधीचा शोध आणि बोध', 'प्रतापगडची जीवनगाथा' हे संशोधनात्मक ग्रंथ सावंत यांनी लिहिले आहेत. शिवगर्जना आणि नरशार्दुल संभाजी या दोन नाटकांची निर्मिती करून सावंत यांनी खरा इतिहास जनतेसमोर आणला आहे. त्यांच्या लिखाणामुळे त्यांच्यावर जातीयवादी संघटनांचा रोष आहे. आठ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे संयोजक, स्वाभिमानी संघटनचे सचिन तोडकर यांच्या मोबाइलवर सावंत यांना धमकी आली होती. भिडे गुरुजी आणि बाबासाहेब पुरंदरेंबाबत भाष्य केले तर सभा उधळून लावू. त्यांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली गेली. मराठा आरक्षण मेळाव्यात इंद्रजित सावंत हे शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे ऐतिहासिक संदर्भ देत असताना, प्रेक्षकांतून भिडे गुरुजी, बाबासाहेब पुरंदरे यांच्या विजयाच्या घोषणा देत १०० ते १५० जणांचा जमाव स्टेजवर आला. सावंत यांच्या दिशेने त्यांनी फरशी फेकली. सभा सपंल्यानंतर सावंत यांच्यावर हल्ला केला. मात्र पोलिस आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा बचाव केला. सावंत यांच्या चारचाकी वाहनाचे जमावाने नुकसान केले. या घटनेमुळे सावंत यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तरुणांचे माथे भडकवणारे भिडे गुरुजी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करावी.

शिष्टमंडळात अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, प्रा. सुभाष देसाई, दिलीप पाटील, सचिन तोडकर, दिलीप देसाई, सुरेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाना पाटीलनगरात अनधिकृत केबीन हटविल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

क्रांतीसिंह नाना पाटीलनगर परिसरातील १०० फुटी रस्ता व रिंगरोडवरील विना परवाना केबीन थाटल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. प्रशासनाने, या भागातील बेकायदेशीर केबीन आ​णि पत्र्याचे शेड काढून घेण्याच्य नोटिसा काढल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेने बुधवारी कारवाईचा बडगा उगारला. चार पत्र्याच्या शेडसह २८ केबीन हटविल्या.

क्रांतिसिंह नाना पाटीलनगर ते फुलेवाडी रोडवर जयभवानी हॉललगत मोठ्या प्रमाणात विना परवाना केबीन थाटल्या आहेत. रस्त्याला लागून केबीन सुरू केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. महापालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालय व अतिक्रमण ​विरोधी पथकाने बुधवारी या भागात कारवाई केली. उपशहर अभियंता रमेश मस्कर, अतिक्रमण विरोधी पथकाचे पंडीत पोवार यांच्या नेतृत्वाखाली कारवाई झाली.

महापालिकेतर्फे कारवाईला सुरूवात झाल्यानंतर संबंधित व्यावसायिकांनी स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांच्यामार्फत कारवाई थांबविण्याची मागणी केली.

लक्ष्मीपुरी परिसरातील वसगडेकर हॉस्पिटलजवळ एकाच जागेवर दोघा हातगाडी चालकांनी हक्क सांगण्यास सुरूवात केली आहे. या जागेवर हातगाडी लावण्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाल्याने पथकाने दोघांच्या हातगाड्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यांना गुरुवारी महापालिकेत बोलाविले आहे. आजी, माजी नगरसेवकाच्या पाठबळामुळे दोघा व्यावसायिकात एकाच जागेवरून वाद सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वुई केअरची निर्भयाला साथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महिला आणि मुलींची छेडछाड रोखण्यासाठी पोलिसांनी नुकतीच निर्भया पथकाची स्थापना केली. या पथकाच्या माध्यमातून मुली आणि महिलांसाठी निर्भय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांच्या या उपक्रमात कोल्हापुरातील 'वुई केअर' या ग्रुपच्या ३३ महिला समुपदेशनासाठी मदत करणार आहेत.

शहरातील बोंद्रेनगर येथे दोन महिन्यांपूर्वी पल्लवी बोडेकर हिने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर शहरातील काही महिलांनी एकत्र येऊन वुई केअर ग्रुपची स्थापना केली. विविध क्षेत्रांतील १५० महिला या ग्रुपच्या सदस्य आहेत. मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस काम करण्याचा निर्धार या ग्रुपने केला आहे. छेडछाड रोखण्यासाठी मुलींचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी ग्रुपमधील ३३ महिलांचे पथक बनवले आहे. या प्रशिक्षित महिला महाविद्यालयीन मुलींचे समुपदेशन करणार आहेत. पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनीच निर्भया पथकासोबत काम करण्याचे आवाहन वुई केअर ग्रुपला केले होते. हा ग्रुप निर्भया पथकासोबत वैफल्यग्रस्त मुली, महिला आणि पुरुषांचेही समुपदेशन करेल. मिलिंद धोंड हे ग्रुपचे अध्यक्ष आहेत. भाग्यश्री कलगटगी आणि कविता मोदी या दोघी ग्रुपच्या प्रमुख म्हणून काम करणार आहेत. मानसोपचार तज्ज्ञ कल्याणी कुलकर्णी महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर दाम्पत्याच्या खुनाचे गूढ कायम

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

रूकडी (ता हातकणंगले) येथे मंगळवारी सकाळी डॉ.उद्धव कुलकर्णी व डॉ. प्रज्ञा या पतीपत्नींच्या खूनप्रकरणी बुधवारी दिवसभर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिस यंत्रणा कार्यान्वित झाली, परंतु अद्याप कोणतेही धागेदोरे मिळाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या डॉक्टर दाम्पत्याच्या खुनाचे गूढ वाढले असून बुधवारी दिवसभर अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ.दिनेश बारी हे गावात तळ ठोकून होते. पोलिसांनी डॉक्टरांचा दूधवाला, मोलकरीण तसेच अन्य काहींची चौकशी केली.

मंगळवारी सकाळी डॉ. उद्धव कुलकर्णी व डॉ .प्रज्ञा यांचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घूनपणे खून केल्याचे निदर्शनास आले. या घटनेने हल्लेखोरांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. यावेळी श्वानपथकास पाचारण केले, पण त्याने हॉस्पिटल परिसरात माग दाखवला. त्यामुळे हल्लेखोर चारचाकी वाहनातून आल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा तपास हातकणंगले पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून होत आहे.

दरम्यान, बुधवारी पोलीसांनी डॉक्टरांचा दूधवाला, मोलकरीण तसेच हॉस्पिटल बाहेरील हातगाडी चालक यांच्यासह संपर्कातील अनेक व्यक्तींना बोलावून चौकशी केली. या घटनेमागच्या अनेक कारणांचा शोध पोलिस घेत असून हल्लेखोरांला लवकरच ताब्यात घेऊ, असा विश्वास हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सी.बी.भालके यांनी व्यक्त केला. रूकडीकर ग्रामस्थांनी डॉक्टर दाम्पत्यावर अंत्यसंस्कार गावात व्हावेत, अशी इच्छा नातेवाईकांकडे केली होती. त्यामुळे डॉक्टर दाम्पत्यावर मंगळवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, बुधवारी सकाळी ग्रामपंचायतीमध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी अनेकांनी या घटनेचा निषेध करून पोलिस प्रशासनाने हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली. ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद ठेऊन डॉक्टर दाम्पत्याला श्रद्धांजली वाहीली. सायंकाळी जिल्हा पोलीसप्रमुख प्रदीप देशपांडे यांनी रूकडी येथे भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मगदूम, नेजदारांनाही हायकोर्टाचा दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेसचे नगरसेवक डॉ. संदीप नेजदार, नगरसेविका दीपा मगदूम यांच्या जात प्रमाणपत्राची पुन्हा एकदा पडताळणी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. त्यामुळे या दोघांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नगरसेवक नीलेश देसाई, संतोष गायकवाड, सचिन पाटील यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात काय निकाल लागणार याकडे लक्ष आहे.

समितीच्या निर्णयाविरोधात सदस्यांनी हायकोर्टात दाद माग​तली होती. सदस्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत दक्षता समितीचा अहवाल विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणीने डावलला असल्याचे नगरसेवकांच्या वकिलांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आाणले. यावर समितीच्यावतीने बाजू मांडताना सरकारी वकिलांनी नगरसेवकांनी चुकीची कागदपत्रे जोडल्याचे सांगत जातीचे दाखले अवैध ठरविण्याचा निर्णय योग्य असल्याचे नमूद केले. तसेच दक्षता समितीचा अहवाल विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणीवर बंधनकारक नसल्याचेही सांगितले.

या दोन्ही सदस्यांनी ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढविताना कुणबी जातीचा दाखला जोडला होता. हायकोर्टातील न्यायमूर्ती शंतनू केमकर व एम.एस. क​र्णिय यांनी मगदूम व नेजदार या सदस्यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भातील कागदपत्रांची सहा आठवड्यांत फेरपडताळणी करून निर्णय घेण्याचाही आदेश जातपडताळणी समितीला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पूल आदेशानंतर पाच तासांनी खुला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीचा पूर कमी झाल्याने मंगळवारी दुचाकी वाहनांसाठी खुला केलेला शिवाजी पूल बुधवारी सायंकाळी सर्व वाहनांसाठी खुला केला. जिल्हाधिकाऱ्यांकडून दुपारी पूल सुरू करण्याचा आदेश होऊनही संथ कारभारामुळे वाहतूक सुरू होण्यास पाच तास लागले. पाणी तसेच पुलामुळे सहा दिवसांपासून बंद असलेली रत्नागिरी मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी पंचगंगा नदीचा पूर इशारा पातळीवर गेल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शिवाजी पुलावरून वाहतूक बंद केली. मंगळवारी आमदार चंद्रदिप नरके व ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे दुचाकी वाहतूक सुरू झाली. अन्य वाहनांसाठी बुधवारी निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सर्व वाहने सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आला. जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी एक वाजता त्यावर स्वाक्षरी करुन कार्यवाहीसाठी पुढे पाठवला.

मात्र पुलावर बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलिसांना आदेश नसल्याने वाहतूक बंदच राहिली. पोलिसांना द्यायचे पत्र, पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबतचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र एकदम पाठविण्याच्या प्रयत्नात पाच तास मंजुरी खोळंबली. व्हॉट्सअॅपवरून मेसेज येत असल्याने अनेकांनी पूल खुला करण्याबाबत पोलिसांकडे विचारणा केली. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी, पाचच्या सुमारास पोलिसांना पत्र दिले. त्यानंतर शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्या आदेशानंतर साडेपाच वाजता पूल खुला झाला. दिवसभर वाहने थांबली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images