शहराचा टोलचा प्रश्न ज्वलंत आहे. गेली पाच वर्षे टोल विरोधी आंदोलनाने आजपर्यंत शहर धगधगत आहे. निवडणूक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेना-भाजप युतीच्या अनेक मंत्र्यांनी टोलमुक्त कोल्हापूरची ग्वाही दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर दौऱ्यात टोलचा प्रश्न मिटवावा यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत निवेदन दिले.
निवेदनामध्ये महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि पंचगंगा नदीपात्राचा साबरमती नदीच्या धर्तीवर विकास व्हावा, आदी प्रश्नांबाबत सकारात्मक घोषणा व्हावी, एलबीटीबाबतचा निर्णय ऑगस्ट महिन्यापासून लागू होणार आहे. तरीसुद्धा सध्या अनेक व्यापाऱ्यांकडून जबरदस्तीने एलबीटी वसुली किंवा नोटीस देण्याचे प्रकार सुरू आहेत. हे तत्काळ थांबवावे, तसेच पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट