Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आंदोलकांनी दिला तृप्तीचा ढेकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाचा तडाखा पचवत ,पोटाची आबाळ करत हक्काच्या जमिनीसाठी रस्त्यावर उतरलेले चांदोली अभयारण्यग्रस्त गावाकडून पाठवलेली भाकरी दोन दिवस पुरवून खात होते. एकीकडे उष्म्यामुळे अंगाची लाही होत असताना पोटाला चिमटा देत महिलांसह पावणेदोनशे आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच्या फूटपाथवर न्यायासाठी ठिय्या मारून बसले आहेत.

गेल्या १९ दिवसांपासून हाच दिनक्रम सुरू असताना शुक्रवारी मात्र या आंदोलकांनी तृप्तीचा ढेकर दिला. कोल्हापुरातील राजस्थानी जैन मारवाडी समाजाच्यावतीने या आंदोलकांना भोजन देण्यात आले. तसेच आंदोलन संपेपर्यंत दररोज दोन्हीवेळचे जेवण समाजातर्फे देण्यात असल्याची माहिती ईश्वर परमार यांनी दिली.

चांदोली अभयारण्यासाठी ज्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांना गेल्या १८ वर्षापासून पर्यायी जागा मिळालेली नाही. त्यासाठी गेल्या १९ दिवसांपासून या अभयारण्यग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांमध्ये महिला, तरूण व पुरूष असे पावणेदोनशे आंदोलक रस्त्यावरच ठाण मांडून बसले आहेत. यामध्ये काही वृद्ध महिलाही आहेत. आंदोलकांमधील काही तरूण दोन ते तीन दिवसांतून एकदा गावाकडे जाऊन आंदोलकांसाठी त्यांच्या घरातून भाकरी, चटणी घेऊन येत होते. पुढची भाकरी आणेपर्यंत आणलेल्या तीनचार भाकऱ्या चटणीच्या पाण्यासोबत खाऊन आंदोलकांनी १९ दिवस भूक भागवली.

आंदोलकांना पोटभर जेवण नाही आणि त्यात उन्हाच्या झळांमध्ये दिवसभर बसल्यामुळे आरोग्य बिघडण्याचा धोका लक्षात घेऊन राजस्थानी समाजातील कार्यकर्त्यांनी या आंदोलकांना भोजन देण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी जोतिबा यात्रेच्या मुख्य दिवसाचा मुहुर्त साधत समाजातील कार्यकर्ते आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी आंदोलकांची पंगत बसवून आग्रहाने भोजन वाढले. कोल्हापुरात मिळालेल्या या अनोख्या पाहुणचाराने अभयारण्यग्रस्त भारावून गेले. नरेंद्र ओसवाल, जवाहर गांधी, कांतीलाल ओसवाल, माणिक ओसवाल, प्रकाश ओसवाल, श्रेणिक ओसवाल, राजेंद्र ओसवाल, राजेश राठोड यांनी उपक्रमासाठी योगदान दिले.

या लोकांचे हक्काच्या जागेसाठी आंदोलन सुरू आहे. जेवणाची सोय नसल्याने आंदोलक बरेचदा उपाशीच राहत असल्याचे समजल्यानंतर त्यांच्यासाठी रोज भोजन देण्याचे ठरवले आणि समाजातील सर्वजणांनी यासाठी आर्थिक मदत दिली. त्यामुळे आंदोलनाची सांगता होईपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवला जाणार आहे. भगवान महावीरांचा दुसऱ्यांना मदतीचा संदेश आचरणात आणल्याचे समाधन आहे.

ईश्वर परमार, सदस्य, जैन समाज संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गोकुळ’चे चित्र दोन दिवसांत स्पष्ट होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजाराम कारखाना आणि गोकुळच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत बुधवारी (ता.८ एप्रिल) एकाच दिवशी असल्याने पॅनेल निश्चिती करताना नेत्यांची कसोटी लागणार आहे. दोन्ही ठिकाणी महादेवराव महाडिक हे सत्ताधारी तर सतेज पाटील विरोधी गटात आहेत. माजी मंत्री पाटील यांनी नाराज घटकांना एकत्र करत महाडिकांना आव्हान देण्याची खेळी सुरू केली आहे. दुसरीकडे गोकुळच्या उमेदवारीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रविवारी तर, मंडलिक गट, माजी आमदार संजय घाटगे गटाचा शनिवारी मेळावा होणार आहे. राष्ट्रवादीसह मंडलिक, आणि घाटगे गटाची भूमिका दोन दिवसात स्पष्ट होणार असल्याने निवडणुकीचा रंगारंग समजणार आहे.

पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीने चार जागांची मागणी करत सत्तारूढ गटावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.रविवारच्या मेळाव्यात राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ गटासोबत राहतील असे संकेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यापूर्वी दिले आहेत. विधानसभा निवडणुकीतील उट्टे काढण्याच्या इराद्यातूनमाजी आमदार संजय घाटगे यांना गोकुळमध्ये स्थान मिळू नये याकरिता मुश्रीफ प्रयत्नशील आहेत. सत्तारूढ गटातून घाटगे यांना पुन्हा संधी देण्यावरून प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने त्यांच्या गटाच्या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे.

'सत्तारूढ'च्या घोषणेनंतरच विरोधी पॅनेलला आकार

सत्तारूढ गटाच्या पॅनेलच्या घोषणेनंतरच विरोधी पॅनेलला आकार येणार आहे. सत्तारूढ पॅनेलमध्ये ज्या उमेदवारांना संधी मिळणार नाही ते नाराज घटक आपसूकपणे माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने तयार होणाऱ्या पॅनेलच्या आश्रयाला जाणार आहेत. बुधवारी (ता. ८ एप्रिल) दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची जादा जागांची मागणी, भाजपच्या वाढलेल्या अपेक्षा आणि वर्षानुवर्षे गोकुळच्या राजकारणात महाडिकांसोबत राहिलेले संचालक या साऱ्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ गटापुढे पॅनेलची उभारणी करताना मोठे आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील यांच्यासाठी आग्रही असणार आहेत तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या जवळचे समजले जाणाऱ्या माजी आमदार संजयसिंह घाटगे यांच्या कुटुंबींयातील सदस्यासाठी पाटील प्रयत्नशील आहेत.

उमेदवारांची संख्या वाढणार

गोकुळच्या निवडणुकीच्या रिंगणात २२० उमेदवार आहेत. अर्ज माघारीचा कालावधी आणखी पाच दिवस आहे. उमेदवारांची निश्चिती, पॅनेलच्या घोषणेला विलंब झाला तर निवडणुकीत उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकृष्ट गहू : तक्रार का नाही?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

तालुक्यातील पारपोलीमधील अंगणवाडीस पुरविण्यात आलेला गहू अत्यंत निकृष्ट होता. याबाबतचा पुरावा म्हणून त्याचा नमुना ठेवून घेत संबंधित पुरवठाधारक एजन्सीविरोधात तक्रार द्यायला हवी होती. मात्र, अशी कोणतीही कारवाई आजरा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून झाली नसल्याचा आरोप आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. यावर जिल्हास्तरावरून विभागाच्या वरिष्ठांनी याबाबत तक्रार न करण्याच्या सूचना केल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तेव्हा तालुक्याचा विभागप्रमुख कोण, अशी विचारणा करण्यात आली. एजन्सीवाल्यांशी असणारे आपले साटेलोटे उघडकीस येऊ नये म्हणून हा उपद्व्याप वरिष्ठांकडून केल्याचा आरोप संबंधितांवर करीत, त्यांनी खून तर केलाच, शिवाय पुरावेही नष्ट केल्याचा हा प्रकार असल्याचे व येथून पुढे असा प्रकार झाल्यास संबंधितांबाबत कठोर कारवाईसाठी प्रथम पोलिसांत तक्रार नोंदविण्याच्या व येथून पुढे धान्य तपासूनच सेविका व मदतनीसांनी ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. सभापती विष्णू केसरकर अध्यक्षस्थानी होते.

येत्या शैक्षणिक वर्षापासून तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी एकच गणवेश करण्याची कार्यवाही करण्यात येत असून त्यासाठी गणवेश निवडही केल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी बी. एम. कासार यांनी दिली. तसेच येत्या शैक्षणिक वर्षात तालुक्यातील कोवाडे, देवकांडगाव, शेळप, वझरे, धामणे व सरोळी अशा सहा शाळांमध्ये अॅक्टिव्हीटी बेस्ड लर्निंग सुरू होत असल्याचेही सांगण्यात आले. प्रज्ञाशोध परीक्षेत सहभागी बारा विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर विविध क्रमांक पटकावत तालुक्याला लौकिक प्राप्त करून दिला आहे. या विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव समारंभ पंचायत समितीमध्ये आयोजित करण्याबाबत सूचित करण्यात आले. पिकअप शेड बांधकामासाठी मातीमिश्रित वाळू वापरली जात आहे. दोन वर्षांत बांधकाम निकृष्ट करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे काय, ठेकेदारावर लक्ष ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

तालुक्यातील एकमेव टस्कर आता चौकुळहून दोडामार्ग परिसरात उतरला आहे. तो परत आल्यास त्याला जेरबंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून, त्याबाबतची प्राथमिक माहिती कोकणात जाऊन एका पथकामार्फत घेतल्याचे तसेच या वर्षात हत्ती व अन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची सुमारे २२ लाखांची रक्कम वाटप झाल्याचे वनविभामार्फत स्पष्ट करण्यात आले. उर्वरित पावणेसहा लाखांची रक्कम एप्रिल-मे दरम्यान वाटप होईल. वसुंधरा पाणलोट योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या कामांबाबत संबंधित विभागांमध्ये समन्वय नसल्याचा सूर सभेत उमटला. तालुक्याच्या बचत गट भवन इमारत अपूर्णावस्थेत दोन वर्षे पडून आहे. निधीअभावी काम रेंगाळले असले तरी किमान तळमजला तरी उपलब्ध करून देण्याबाबत बांधकाम विभागास सांगण्यात आले. यावेळी सर्व सदस्यांसह विभागप्रमुख उपस्थित होते. गटविकास अधिकारी ए. डी. कांबळे यांनी प्रशासन सांभाळले. उपसभापती दिपक देसाई यांनी आभार मानले.

'सर्फनाला'बाबत अडेलपणा

सर्फनाला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, ते वारंवार बंद पाडण्यात येत आहे. कारण प्रकल्पग्रस्तांच्या सुपीक जमिनीबाबत मनमानी व संघटनांचा अडेलतट्टूपणा सुरू असल्याचे सर्फनाला अभियंत्यांनी स्पष्ट केले. यावर प्रकल्पांतर्गत पुनर्वसनासाठी जमीन असताना असे का घडते, यावर्षी किमान २५ टक्के पाणी साठवणे गरजेचे होते, असे मत सभापती केसरकर यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्किट बेंचचा मार्ग मोकळा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये हायकोर्टाचे सर्किट बेंच स्थापन करण्याबाबत राज्य सरकारच्यावतीने ठराव करण्याच्या घेतलेल्या भूमिकेने गेल्या २८ वर्षांचा लढा अंतिम टप्प्यात पोहचला आहे. या भूमिकेनुसार मंत्रीमंडळाचा ठराव झाल्यानंतर सर्किट बेंच स्थापनेचा मार्ग सुकर होणार आहे. तसेच मंजुरी मिळाल्यानंतर थेट कामकाज सुरू झाल्यानंतर कोल्हापूरसह सांगली , सातारा , सोलापूर , रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहाही जिल्ह्यांतील पक्षकार आणि वकिलांची ससेहोलपट थांबणार आहे. तसेच साठ हजार प्रलंबित खटल्यांचे काम येथून सुरु होऊ शकेल.

खंडपीठाची मागणी मान्य होत नाही, असे लक्षात आल्यानंतर खंडपीठ कृती समितीने २०१० पासून सर्किट बेंचसाठी सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी कायमस्वरूपी न्यायाधीशाची नियुक्ती नसते. रोटेशनप्रमाणे तीन ते सहा न्यायाधीश सर्किट बेंचच्या कामकाजासाठी येतात. त्यामुळे खंडपीठासारख्या स्वतंत्र सुविधेपेक्षा थोड्या कमी, परंतु खास सुविधा सर्किट बेंचसाठी उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्या सर्व सुविधा कोल्हापुरात आहेत. २०१० नंतर सर्किट बेंचच्या मागणीबाबत विचार करण्यासाठी आतापर्यंत हायकोर्टाने सध्याच्या समितीसह चार समित्या नेमल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठ देतो, असे ठाम आश्वासन दिले होते. त्यासाठी राज्य सरकारचा ठराव महत्त्वाचा आहे. त्यानुसार अधिवेशन संपल्यानंतर होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत तो ठराव केला जाणार असल्याचे आश्वासन आहे.

हायकोर्टाचे कामकाज सुटसुटीत आणि कमी वेळेत होण्यासाठी खंडपीठाची संकल्पना अमलात आणली जाते. खंडपीठ हे हायकोर्टाच्या कामकाजाचाच भाग असल्यामुळे हायकोर्टाला लागणाऱ्या स्वतंत्र इमारत , स्वतंत्र निवासस्थान, स्पेशल स्टाफ या सर्व पायाभूत सुविधा खंडपीठासाठी आवश्यक असतात. खंडपीठासाठी न्यायाधीशांची स्वतंत्र टीम नियुक्त असते. सर्किट बेंचचे काम खंडपीठाची शाखा असल्यासारखेच असते. सर्व प्रमुख न्यायालयांचे कामकाज एकाच इमारतीत व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या न्यायसंकुलाची इमारत आता सर्किट बेंचच्या कामकाजासाठी उपलब्ध होऊ शकते. या ठिकाणी सर्व सोयीसुविधा निर्माण होणार असल्याने येथे सर्किट बेंच काम करु शकते.

पायाभूत सुविधांची व्यवस्था

विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरु असल्याने आगामी काळात येथून देशभर विमानसेवा सुरु होण्याची शक्यता असल्याने दळणवळणाबाबत कोल्हापूर सुटसुटीत ठिकाण आहे. मुंबई हायकोर्टात प्रलंबित असणाऱ्या सहा जिल्ह्यातील साठ हजार खटल्यांचे कामकाज सर्किट बेंचच्या माध्यमातून कोल्हापूरातून सुरु होऊ होईल. यासाठी पक्षकार मोठ्या प्रमाणात कोल्हापूरात येऊ शकतात. पक्षकारांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. कोल्हापुरात फाइव्ह स्टार हॉटेलसह चांगल्या दर्जाची हॉटेल्स उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्गणी काढून सुविधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जवळपास तीस वर्षांत मोजक्याच रस्त्यांना डांबर लागले. अजूनही भरपूर रस्त्यांना रस्ते म्हणावे का, असा प्रश्न आहे. गटारींचा कुठेच पत्ता नसल्याने पावसाळ्यात प्रत्येक कारखान्यासमोर डबके व चिखल ठरलेले असते. या परिसरात स्वच्छता करायची असते हे बहुधा महापालिकेच्या सफाई विभागाला माहितीच नसते. पिण्याच्या पाण्याची सोय नाहीच. शिवाय स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने या दोन्ही कारणांसाठी घराकडे अथवा अतिआवश्यकता झाल्यास इतरत्र जावे लागते. ज्या गरजेच्या सुविधा आहेत, त्या वर्गणी काढूनच कारखानदार आतापर्यंत करत आले आहेत. या प्रचंड दयनीय अवस्थेत पांजरपोळ औद्योगिक वसाहतीतील उद्योजक दिवस काढत आहेत.

शाहू मिल्सच्या पिछाडीस असलेल्या व राजारामपुरीतील भाजी मंडईपासून यादवनगरापर्यंत पसरलेल्या या वसाहतीमध्ये दोन विभागात छोटे-मोठे कारखाने आहेत. दुचाकी दुरुस्ती करणाऱ्या मिस्त्रीपासून मोठ्या उद्योजकांसाठी पॅटर्न तयार करणारे कारखानदार येथे आहेत. पांजरपोळ संस्थेपासून यादवनगरपर्यंत व शाहूनगरपासून गोखले कॉलेजपर्यंत जाणारे दोन मुख्य रस्ते सोडल्यास सहा अंतर्गत रस्ते व त्यांना जोडणाऱ्या छोट्या-छोट्या गल्ली आहेत. दोन प्रमुख रस्तेच व्यवस्थित आहेत. आतील रस्ते व गल्ल्यांमध्ये डांबर केव्हा पडले आहे हे आता तेथील कारखानदारांना आठवतही नाही. त्यामुळे रस्त्यांच्या बाजूला पडलेले मातीचे ढीग, कचरा कित्येक वर्षे जैसे थे आहेत. गटारी केलेल्याच नाहीत. त्यामुळे जिथे सखल भाग असेल तिथे पाणी वाहत जाते व साठते. त्यामुळे पावसाळ्यात सर्व रस्ते म्हणजे छोटे नालेच बनतात. ते पाणी शिरू नये म्हणून कारखानदारांनी स्वतःच दारात काँक्रिटीकरण केले आहे. त्यामुळे पावसाळ्यापेक्षा उन्हाळाच बरा असे येथील नागरिक सांगतात.

स्वच्छतेच्याबाबतीत तर हा परिसर म्हणजे डंपिंग लँड झाला आहे. सफाई कर्मचारी महिनोंमहिने फिरकत नाहीत. त्यामुळे स्वत‍ःच्या दारातील कचरा सकाळी रस्त्याच्या मध्यभागापर्यंत ढकलून ठेवायचा. दिवसभर वाहनांनी पुन्हा तो दारात येतो व दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तेच काम करायचे अशा पद्धतीने कचऱ्याचे साम्राज्य तिथे आहे. औषध फवारणीचा विषय कित्येक मैल दूर आहे. राजारामपुरीपासून यादवनगरपर्यंत एकही स्वच्छतागृह नाही. पाइप उभा करून एक तात्पुरते स्वच्छतागृह उभे केले आहे. पिण्याच्या पाण्याची काहीजणांकडे कनेक्शन आहेत, पण पहाटे पाणी येऊन जाते. त्यामुळे कारखानदारांपासून कामगारांना दिवसभरासाठी घरातून पाणी घेऊन यावे लागते.

येथे जवळपास चारशे लहान-मोठे कारखानदार आहेत. या सर्वांचे मतदान नसल्याने तक्रारी करूनही समस्यांची सोडवणूक होत नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वर्गणी काढून टाकी बसवली आहे. सफाई कामगार फिरकत नसल्याने रस्त्यांच्या दुतर्फा कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. दारातील स्वच्छता आम्हालाच करावी लागते.'

-राजाराम हरवंदे, कारखानदार

या परिसरात एकच बोअर मारण्यात आली होती. तीही काही वर्षांपूर्वी बंद पडली आहे. या परिसरात जमिनीखाली पाण्याची मुबलकता आहे. फक्त बोअर मारण्याची आवश्यकता आहे. येथील कारखानदारांसाठी पाण्याची उपलब्धता करणे अत्यावश्यक आहे. किमान एक तरी सफाई कर्मचारी कायमस्वरूपी नेमला तर परिसरात कचरा साठणार नाही.'

-दीपक सावेकर, कारखानदार

या परिसरात एकही गटार केलेली नाही. प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. त्यामुळे ढिगांची उंची वाढली आहे व मध्यभागी सखल झाल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून डबक्यांचे स्वरूप प्राप्त होते. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण होते. रस्त्यांचे डांबरीकरण करताना याचा विचार करुन दुरुस्ती झाली पाहिजे.'

-अजय साळोखे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’ विरोधात ‘परिवर्तन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. सात एप्रिल पर्यंत अर्ज माघारीची मुदत असली तर अजूनही २१ जागांसाठी २३६ उमेदवार रिंगणात आहेत. पॅनेल प्रमुखांच्याकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. उमेदवारांच्या माघारीसाठी व्यूहरचना सुरु झाल्या आहेत. दोन्ही आघाडीकडून दिवसांत उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. थेट दुरंगी लढत असल्याने चुरस आणखीनच वाढणार आहे.

स्वाभिमानी आणि महाआघाडीने प्रचाराची सुरुवात केली आहे. बारा तालुक्यात मेळावे आणि आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. कोजिमाशीत स्वाभिमानी सहकारी आघाडीचे वर्चस्व आहे. दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखाली या आघाडीचे प्रचाराचे काम सुरु आहे. आघाडीचे वर्चस्व कमी करण्यासाठी महाआघाडी एकत्र आली आहे. यात शिक्षक संघटनेचे नेते, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, संस्थाचालक, विनाअनुदानित कृती समितीने नेते आणि काही सभासदांनी महाआघाडीची घोषणा करुन ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला. पतसंस्थेत एकाधिकारी, हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात सात संघटनांनी एकत्र येऊन राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी स्थापन केली. सुकाणू समितीच्या आदेशानुसार महाआघाडीने डावपेच सुरु केले आहेत. सत्ताधारी आघाडीतील सात संचालक आपल्या बाजूला असल्याचा दावाही आघाडीने केला आहे. दाखल झालेल्या अर्जांत स्वाभिमानीचे १०० आणि महाआघाडीचे सुमारे १२५ अर्ज आहेत. दोन्ही आघाडीकडून उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सहा एप्रिलपर्यंत दोन्ही आघाडीचे उमेदवार निश्चित केले जातील. उमेदवार निश्चित करण्यासाठी महाआघाडीकडून तीन ते चार तासांच्या बैठका घेतल्या जात आहेत. स्वाभिमानीतून काही नाराज झालेल्या संचालकांनी महाआघाडीत प्रवेश केल्याने महाआघाडी आत्मविश्वास अधिक वाढला आहे.

महाआघाडीचे एम. एम. गळदगे, राम पाटील, शिवाजीराव सावंत, शिवाजीराव चौगले, शिक्षकेतर संघटनेचे गणपतराव बागडी, संस्थाचालक संघटनेचे जयंत आसगांवकर, धर्माजी सायनेकर, बाबा पाटील, दत्ता पाटील, पंडित पवार, बी. डी. पाटील, एस. जी. तोडकर, राजेंद्र रानमाळे, संजय पाटील, राजेश वरक, राजाराम बरगे, जी. ए. पाटील, शहाजी पाटील, सुलोचना कोळी, सुरेश खोत संचालक एस. एस. कलागते, एस. टी. संकपाळ, जे. ए. भास्कर आदींनी एकत्र येऊन महाआघाडी केली आहे. दरम्यान उमेदवारांना माघारीसाठीची मुदत सात एप्रिल पर्यंत आहेत. येत्या १९ एप्रिल रोजी मतदान होत असून २० एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषणावर सक्तीचे‘मॉनिटरिंग’

$
0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टिम बसविण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. कारखान्यातून होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ही व्यवस्था तातडीने अंमलात आणण्यासाठी आता कारखान्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत, परंतु सध्या साखर कारखान्यांसमोर आर्थिक संकट असल्याने यंत्रणा बसविण्यासाठी कारखान्यांना काही वेळ द्यावा, अशी कारखानदारांची मागणी आहे.

कारखान्यांने कार्यान्वित केलेल्या या यंत्रणेमुळे प्रदूषण नियंत्रण यंत्रणेचा अहवाल क्षणोक्षणी कळण्यासाठी ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टिम बसवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तीन महिन्यात ही यंत्रणा न बसवल्यास कारखान्यांची बँक हमी जप्त करण्याबरोबरच परवाना रद्द करण्याचा इशाराही केंद्राने दिला आहे.

देशात सातशेवर तर महाराष्ट्रात १७८ साखर कारखाने आहेत. साखर कारखान्यापासून होणारे प्रदूषण नवीन नाही. मळीचे पाणी थेट नदीत सोडल्याने अनेक नद्या प्रदूषित होतात. हवा प्रदूषणातही हे कारखाने आघाडीवर आहेत. कारखान्यातून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी बहुतां​शी कारखान्यात यंत्रणा कार्यरत आहे. त्याची पाहणी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहे. पण या यंत्रणेकडे गांभीर्य नसल्याने या कारखान्यावर आता दिल्लीतूनच वॉच ठेवण्यात येणार आहे. त्यासाठीच ही यंत्रणा बसवण्याचा आदेश देण्यात आला आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी कारखाने जी यंत्रणा राबवत आहेत त्याचा ऑनलाइन रिपोर्ट सरकारला मिळणार आहे.

या नवीन यंत्रणेसाठी सुमारे चाळीस ते पन्नास लाख रुपये खर्च येणार आहे. गेल्या दोन वर्षांत साखरेचे दर कोसळल्याने सर्वच कारखाने अडचणीत आले आहेत. यामुळे राज्यातील कारखान्याकडे शेतकऱ्यांचे साडेचार हजार कोटी रुपये अडकले आहेत. बिले देण्याची स्थिती नसताना आता या नव्या यंत्रणेसाठी लाखो रूपये खर्च करावे लागणार आहेत. यासाठी केंद्राने तीस जूनअखेर मुदत दिली आहे. अन्यथा यंत्रणा बसवण्यासाठी जो खर्च येणार आहे तेवढ्या रकमेची बँक हमी जप्त करण्यात येणार आहे. शिवाय व्यवसाय परवानाही रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सर्वच कारखानदार अस्वस्थ झाले आहेत.

ही व्यवस्था अत्यंत चांगली आहे. सध्या कारखान्यातून प्रदूषण होणार नाही, याची दक्षता आम्ही सर्व पातळ्यांवर घेतो. सरकारने जी व्यवस्था करण्याची सक्ती केली आहे ती तातडीने अंमलात आणणे अनेक कारखान्यांना शक्य नाही. त्यामुळे काही वेळ दिला तर ही व्यवस्थाही अंमलात आणणे शक्य आहे.

- प्रकाश आवाडे, अध्यक्ष, जवाहर सहकारी साखर कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात टोल'भडका'

$
0
0

संतप्त नागरिकांची तोडफोड

मटा ऑनलाइन वृत्त। कोल्हापूर

गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूरमधील टोलप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. टोलवसुलीमुळे आधीच संतापलेल्या नागरिकांनी आज शनिवारी आयआरबीला 'टोल'दणकाच दिला. एका स्थानिक वाहनचालकाने टोल भरण्यास नकार दिल्यानंतर तेथील कर्मचारी आणि त्या वाहनचालकात वाद झाल्याने तेथे जमलेल्या नागरिकांनी कळंबा टोलनाक्याची तोडफोड केली.

कळंबा टोलनाक्यावर एका स्थानिक वाहनचालकाने टोल भरण्यास नकार दिला. यावरून टोल कर्मचारी आणि वाहनचालकात वाद झाला. टोलवसुलीच्या जाचामुळे पिचलेल्या कोल्हापूरमधील नागरिक त्या ठिकाणी जमले. त्यात टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्या चालकाच्या गाडीवर लोखंडी बॅरिकेड्स आदळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तेथे जमा झालेले नागरिक आणखीनच संतापले. त्यामुळे प्रचंड वाद झाला. संतापलेल्या जमावाने टोलनाक्याची तोडफोड केली, असा आरोप स्थानिकांनी केला.

या तोडफोडीमुळे तेथील वातावरण काहीकाळ तापले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या तेथे तणावपूर्ण शांतता असून हा टोलनाका तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे, असे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फॅब इंडियाच्या सेल्समनला अटक

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी गोव्यातील फॅब इंडियाच्या ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा असल्याचं उघड केल्यानं खळबळ उडाली असतानाच, कोल्हापुरातील फॅब इंडिया शो रुम विचित्र प्रकारामुळे चर्चेत आलंय. चेंजिंग रुममधील तरुणीचं लपून चित्रीकरण केल्याप्रकरणी या शो रुममधील सेल्समन प्रकाश इस्पुर्ले याला अटक करण्यात आली आहे.

३१ मार्चला शाहूपुरी भागातील फॅब इंडियामध्ये एक तरुणी खरेदीसाठी गेली होती. तिथल्या चेंजिंग रुममध्ये ती काही कपड्यांची ट्रायल घेत असताना, सेल्समन प्रकाशनं दाराच्या फटीतून (दार आणि जमिनीमधल्या जागेतून) मोबाइलवर व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार लक्षात येताच तिनं आरडाओरडा करून व्यवस्थापकांकडे तक्रार केली होती. तसंच, शाहूपुरी पोलिसांतही तक्रार नोंदवली होती. त्या आधारे आज पोलिसांनी प्रकाश इस्पुर्लेला अटक केली आहे.

दरम्यान, फॅब इंडिया हा प्रतिष्ठित ब्रँड या लागोपाठच्या घटनांमुळे संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे. कालच्या गोव्यातील तक्रारीनंतर, फॅब इंडियाच्या सर्व शोरूममध्ये सुरक्षेसाठी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, ते ट्रायल रूममध्ये नाहीत, असा दावा फॅब इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विल्यम बिस्सेल यांनी केला आहे. परंतु, तेवढ्यानं या प्रकरणावर पडदा पडेल असं दिसत नाही. त्यामुळे ते आपला ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी काय पावलं उचलतात, हे पाहावं लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळवंटात नेहमीसारखीच घाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

चैत्री यात्रेत चंद्रभागेच्या वाळवंटात राहुट्या उभ्या न राहताही नेहमी सारखीच घाण झाली आहे. चंद्रभागा आणि वाळवंटाचे प्रदूषण रोखण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटात राहुट्या उभारण्यास वारकरी संप्रदायाला मुंबई हायकोर्टाने मनाई केली आहे. त्यामुळे या यात्रेत राहुट्या उभ्या केल्या नव्हत्या, तरीही वाळवंटात नेहमी सारखीच घाण झाली आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशनंतरही काहीही फरक पडल्याचे दिसत नाही.

दरम्यान, यामुळे हतबल झालेले प्रशासन मुंबई हायकोर्टाला वाळवंटात तात्पुरते शौचालय उभे करू देण्याची विनंती करण्याच्या विचारात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वाळवंटात जमा झालेल्या भाविकांना रोखणे मनुष्यबळाच्या दृष्टीने अशक्य असल्याने अखेर कोर्टाच्या सुचनेनुसार 'निरी'या संस्थेने केलेल्या सूचना पूर्ण करून अशी शौचालये उभी करण्याबाबत विनंती केली जाणार आहे.

वाळवंटात घाण होऊ नये, यासाठी मुंबई हायकोर्टाने यापुढे कधीही वाळवंटात तंबू, राहुट्या किंवा कसलेही तात्पुरते बांधकाम करण्यास मनाई केली आहे. प्रशासनानेही हा आदेश गांभीर्याने घेत यंदा एकही दिंडीला राहुट्या उभ्या करू न दिल्याने वारकऱ्यांना नदीवर मुक्काम करता आला नाही. यामुळे नेहमीप्रमाणे कोणत्याही प्रकारचा कचरा वाळवंटात झाला नाही. मात्र, वारकरी नेत्यांनी मोठ मोठाल्या घोषणा करूनही वाळवंटाचा मोठ्या प्रमाणात प्रातर्विधीसाठी वापर झाल्याचे दिसून आले. यंदा राहुट्या उभ्या करायच्या नसल्याने नेहमीप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपाच्या शौचालयाची उभारणीही प्रशासनाने वाळवंटात केली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केडीसीसी निवडणुकीत ताकदीने उतरणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'गोकुळ' प्रमाणेच विक्रमसिंह घाटगे गट जिल्हा मध्यवर्ती बँके (केडीसीसी) च्या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याची घोषणा शनिवारी समरजितसिंह घाटगे यांनी कागल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, 'आमच्याकडे संस्था आहेत. जिल्ह्यात संस्था जपणारा गट म्हणून आदर्श पारदर्शी कारभार आहे. आमच्या कार्यकर्त्यांनीही विक्रमसिंह घाटगेंच्या विचारावरच संस्था नावारुपाला आणल्या आहेत. त्याचेच उदाहरण म्हणजे कागल को ऑप.बँकेचा एन.पी.ए. तुलनेने इतर बँकाच्या अतिशय चांगला आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही व आमचे कुटुंब सदस्य असे आमचे धोरण नाही. विक्रमसिंह घाटगे यांचे केवळ मार्गदर्शन घेण्यापेक्षा त्यांच्या विचाराची माणसं सहकारात येण्याची गरज आहे. प्रशासक असणे म्हणजे सहकाराचा तसा अपमानच आहे. परंतु बेकायदेशीर कर्जांवर त्यांनी चांगले नियंत्रण ठेवून बँकेला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच विश्वासाची व चांगल्या पारदर्शी विचाराची माणसे बँकेत आली पाहिजेत.' ते पुढे म्हणाले, 'गोकुळ'प्रमाणेच जिल्हा बँकेतल्या सत्तेपासून राजे गटाचे कार्यकर्ते वंचितच आहेत. ज्या पारदर्शी कारभाराची आणि विश्वासाची आज बँकेला गरज आहे, तो देण्यासाठी व विचार रुजवण्यासाठी उतरत आहे. 'गोकुळ' बाबत सध्या तरी 'वेट अँड वॉच' धोरण आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडलिक गट सतेज पाटलांकडे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघात आता कोणालाही संधी देता येणार नाही म्हणून आमदार महादेवराव महाडिक आणि माजी आमदार पी. एन. पाटील डावलत असतील तर सतेज पाटील यांना भेटण्यात काय गैर आहे, असा सवाल करत जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची मते विचारात घ्यावीत आणि याबाबत सर्वाधिकार प्रा. संजय मंडलिक यांना देण्यात यावेत, असा निर्णय मंडलिक यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांची संपूर्ण जिल्ह्यात ताकद होती. जिल्ह्याच्या सर्वच भागात त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कागल तालुक्यासह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घ्यावीत आणि निर्णय घ्यावा असे ठरविण्यात आले. महाडिक आणि पाटील हे मंडलिक गटाला डावलत असतील तर सतेज पाटील यांना भेटण्यात काय गैर आहे, असा सवालही यावेळी कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांची अजिंक्यतारा येथे भेट घेऊन जिल्ह्यातील राजकारणाबाबत सविस्तर चर्चा केली. प्रा. संजय मंडलिक म्हणाले, 'जिल्ह्यातील मंडलिकप्रेमी राजकीय नेते व कार्यकर्त्यांची तत्काळ बैठक घेऊन मते जाणून घेतली जातील. सर्वांना विश्वासात घेऊन गोकुळसह सर्व संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाऊ.'

बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, 'दूरदृष्टीने सारासार विचार करून राजकीय आराखडा तयार करा आणि आक्रमक विचाराने यापुढील राजकारण करण्याची गरज आहे.' यावेळी कागल पं. स. उपसभापती भूषण पाटील, आर. डी. पाटील, प्रकाश पाटील, चंद्रकांत गवळी, बंडोपंत चौगुले, आदींची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गूळ पिवळाधमक, पण...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुळाला पिवळा रंग येण्यासाठी सल्फरची पावडर मिसळण्याची पद्धत आहे. पण सरकारने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षाही जास्त सल्फर तसेच त्या जोडीने अन्य काही रसायने गुळात मिसळली जातात. यामुळे गुळाच्या रंगावर न भाळता सेंद्रिय गूळच खाण्यासाठी वापरला पाहिजे, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांचे आहे.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रेग्युलेशन्स २०११ (फूड प्रॉडक्ट स्टॅँडर्ड आणि फूड अॅडिटिव्हज) या कायद्यानुसार गुळात जास्तीत जास्त ७० पीपीएम इतके सल्फर डायऑक्साइड मिसळण्याची परवानगी आहे. पण यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने 'गुळव्या' आपल्या अंदाजाने सल्फर मिसळत असतो. काही गुळात हे प्रमाण ३५० ते १५०० पीपीएम इतके सल्फरही असू शकते. सर्वसाधारणपणे सल्फरचे प्रमाण जास्त झाले तर अल्सरसारखे आजारही संभवतात. याशिवाय कोणत्याही पदार्थाला अधिक पिवळेपणा येण्यासाठी 'मेटानिल येलो' ही रासायनिक पावडर वापरली जाते. हळद पावडरमध्ये

मेटानिल येलोची पावडर वापरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे गूळ पिवळाधमक करण्यासाठी काही ठिकाणी मेटानिल येलोचाही वापर केला जातो.

त्यानंतर वापरला जाणारा घटक म्हणजे सोडीयम बायकार्बोनेट हा होय. सर्वसाधारणपणे गूळ करण्यासाठी सोडियम कार्बोनेटचा वापर होत असतो. याशिवाय झेएफएस आणि सोडीयम हायड्रोफॉस्फेट, कॅ‌‌ल्शियम कार्बोनेट अशा रसायनांचा उपयोग गुळाला अधिकाधिक चमकदार करण्यासाठी केला जातो. सोडीयम बायकार्बोनेटच्या अतिवापर असलेल्या गूळ खाल्ल्याने उलट्या जुलाब असे प्रकार होवू शकतात. तर मेटानिल येलो ही पावडर कॅन्सरला निमं‌त्रण देणारी आहे.

आपटेनगर येथील डॉ. संदीप लव्हटे म्हणाले, 'गुळाची निर्मिती कशी केली जावे याचे प्रमाणिकरण झालेले नाही. त्यामुळे कोणते रसायन वापरले जावू नये, कोणते रसायन किती वापरायचे याचे काही प्रमाण ठरलेले नाही. गुळाचे विशेष असे ब्रँडिंग नसल्याने त्यात कोणते घटक आहेत, याची नोंद गुळाच्या पॅकिंगवर केलेली नसते. ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा जास्त वापरली जाणारे रसायने तसे काही बंदी असलेली रसायने आरोग्याला अपयकारक असतात. गुळातील भेसळ ओळखणे सहजासहजी शक्य नसल्याने शक्यतो खात्रीशीर सेंद्रिय गूळ घेणे हाच चांगला उपाय आहे. तसेच सर्वच खाद्यपदार्थांचे क्वालिटी कंट्रोल होण्याची गरज आहे.'

पिवळ्या रंगाला भुलून खरेदी

सर्वसाधारणपणे गुळाची निर्मिती करताना गुळाचा रस काहीलीमध्ये उकळला जातो. त्यावेळी त्यातील कचरा काढण्यासाठी चुना टाकला जातो. त्यानंतर त्यात भेंडीच्या पानांची पावडर टाकली जाते, त्यामुळे गुळाला चव येते. पण या प्रकियेत गुळाचा पिवळा रंग यावा म्हणून त्यात सल्फरची पावडर टाकली जाते. चवीचा विचार केला तर सेंद्रिय गूळ केंव्हाही चांगला ठरतो. निव्वळ पिवळ्याधमक रंगाला भुलून लोक पिवळा गूळ विकत घेतात.

प्रयोगशाळेची गरज

अन्न आणि औषध प्रशासनाची स्थापना १९७० झाली असून प्रिव्हेंशन ऑफ फूड अॅडल्टरेशन अॅक्ट १९५४ ची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनाकडे आहे. पण या विभागाकडे एकूण स्टाफ कमी असल्याने या कायद्याची कडक अंमलबजावणी करताना अडचणी येतात. तसेच प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा नसल्याने संशयास्पद खाद्यन्नाची तपासणी करण्यातही वेळ जातो.

सेंद्रिय गुळाचे फायदे

सेंद्रिय गुळात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने अॅनिमियामध्ये याचा चांगला उपयोग होतो.

सेंद्रिय गुळात असलेल्या मॅग्नेशियमचा उपयोग स्नायुंच्या बळकटीसाठी होतो.

रोगप्रतिकार क्षमता वाढते तसेच रक्तदाबावर नियंत्रण राहते.

पचनक्रियेसाठी सेंद्रिय गुळ उपयुक्त ठरतो. त्यामुळे जेवणानंतर गुळाचा तुकडा तोंडात टाकण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे.

शरीरात उष्मांक वाढवण्यासाठी गुळाचा चांगला उपयोग होतो.

सेंद्रिय गूळ अँटिऑक्सिडंट म्हणूनही काम करतो.

सेंद्रिय गूळ आणि केमिकल फ्री गूळ

सेंद्रिय गूळ आणि केमिकल फ्री गूळ यामध्ये फरक आहे. सेंद्रिय गुळाची निर्मिती करत असताना उसाची लागवड ही सेंद्रीय पद्धतीने केली जाते. त्यानंतर गूळ निर्मिती करताना त्यात कोणतेही रसायन वापरले जात नाही. अशा पद्धतीने बनवलेल्या गुळाला सेंद्रिय गूळ म्हटले जाते. असा गूळ दिसायला चॉकलेटी, काळसर आणि मऊ असतो. केमिकल फ्री गुळात उसाची लागवड रसायनिक खते वापरून केली असली तरी चालते, पण गुळाची निर्मिती करताना मात्र त्यात कोणतेही केमिकल वापरले जात नाही. साहजिकच सेंद्रिय गुळाच्या तुलनेते केमिकल फ्री गुळाची गुणवत्ता कमी असते.

गूळ क्लस्टर मंजूर

कोल्हापुरात सुमारे ९०० गुऱ्हाळघरे असून जवळपास २५ हजार शेतकरी गुऱ्हाळासाठी ऊस देतात. येथील बाजार समितीमध्ये सर्वसाधारणपणे तीनशे कोटींच्यावर उलाढाल वर्षाला होते. काही शेतकरी सेंद्रीय तसेच केमिकल फ्री गूळ निर्मिती करतात. राजर्षी शाहू गूळ खरेदी विक्री संघाच्यामाध्यमातून सेंद्रीय गुळाचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. तसेच कोल्हापुरात केंद्र सरकारकडून गूळ क्लस्टरही मंजूर झाले आहे. पण या क्लस्टरचे काम रेंगाळले आहे.

किती केमिकल ‌घातले पाहिजे याचे सरकारी नियम आहेत. वस्तुस्थिती जर पाहिली तर केमिकल फ्री गूळ चवीला, खाण्यास आणि आरोग्यालाही चांगला असतो. ज्या ग्राहकांना याची जाण आहे, ते केमिकल फ्री गूळच घेतात. पण बाजारात आकर्षक दिसणाऱ्या पिवळ्या रंगाच्या गुळाला जास्त मागणी असते. अधिक आकर्षक गूळ बनवण्याच्या प्रयत्नात काहीवेळा जास्त केमिकलही टाकले जातात. अशावेळी चांगला गूळ बनवण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची आहे. मालकांनीच लक्ष घालून चांगल्या प्रतीचा गूळ बनवण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

- उत्तम चौगुले, गूळ उत्पादक शेतकरी, उचगाव

बाजारात जे चालते ते विकण्याची पद्धत आहे. बाजारात केमिकल फ्री गुळाचा दर कमी असल्याने तसा गूळ बनवण्यास फारच कमी लोक उत्सुक असतात. कमीतकमी केमिकल वापरून जास्तीजास्त चांगला गूळ बनवण्याचा प्रयत्न काही गुळवे करतात. पण बाजारात 'फ्रेश' दिसणारा गूळ हवा असतो. केमिकल फ्री गुळाची किंमत कमी असल्याने शेतकरी आपला ऊस साखर कारखान्यांने देणे पसंत करतात. केमिकल फ्री गूळ बनवण्याचा प्रयत्न आम्ही केला होता, पण गुळाला दर फार कमी दर मिळाला.

- प्रकाश पाटील, गुऱ्हाळ मालक, कोतोली

सेंद्रीय तसेच केमिकल फ्री गुळाबद्दल जागृती वाढत आहे. तरीही कोणता गूळ केमिकल फ्री आहे, कोणता गूळ सेंद्रीय आहे, हे समजण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून त्याचे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. बाजारात सेंद्रीय म्हणून विकल्या जाणाऱ्या वस्तू खरोखरच सेंद्रीय आहेत का याबद्दल शंका असते. गूळ निर्मितीचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे. गूळ‌ विक्री करताना त्याचे नीट पॅकिंग करून त्यातील घटक पदर्थांची माहिती त्यावर नोंद केली तर ग्राहकाला उपयोगी होईल.

- ज्योती अडवलीकर, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिलीप गांधींचे वक्तव्य चुकीचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी तोंडाचा कॅन्सर आणि तंबाखूजन्य प्रकारच्या कॅन्सरचे दोन हजारहून अधिक नवीन पेशंट आढळतात, तर देशात तोंडाच्या कॅन्सरचे ७५ ते ८० हजार पेशंट नव्याने आढळतात. अशा स्थितीत अहमदनगर येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी यांनी केलेल वक्तव्य धक्कादायक आहे,' असे मत कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे मुख्य सर्जन डॉ. सूरज पवार यांनी व्यक्त केले.

गांधी हे सबॉर्डिनेट लेजिस्लेशन कमिटीचे अध्यक्ष आहेत. तंबाखू उत्पादनांच्या आवरणावर ८५ टक्के भागात तंबाखू सेवन किती हानिकारक आहे याबाबत स्पष्टपणे लिहिणे बंधनकारक करण्यापूर्वी तंबाखू सेवनाचा भारतीयांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याची मेडिकल बोर्डाकडून तपासणी होणे आवश्यक आहे, असा अहवाल सादर केला आहे. याबद्दल कॅन्सर तज्ज्ञांत नाराजी व्यक्त होत आहे.

डॉ. पवार म्हणाले, 'खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेशी गांधी यांची भूमिका विसंगत आहे. जवळपास ७० टक्के कॅन्सर तंबाखू सेवनातून उद्भवतो असे अभ्यास सांगतो. तरुणांमध्ये तंबाखू सेवनातून कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा कॅन्सरचे निदान वेळेवर न लागल्याने तरुणवयातच मृत्यूला सामोरे जावे लागते. तंबाखू सेवन करणाऱ्या तिघांपैकी एक दुष्परिणामांना बळी पडतो, हे जगभरातील चित्र आहे. जागतिक आरोग्य संघटना, अमेरिका आणि इतर ठिकाणच्या तज्ज्ञांनी केलेल्या शिफारशींना गांधी आव्हान देत आहेत, ही बाब आश्चर्यकारक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरने तंबाखू चघळण्याच्या सवयीच्या दुष्परिणामांबद्दल अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिला आहे. यात गुटख्यासह तंबाखू चघळता येईल अशा पद्धतीच्या उत्पादनात कॅन्सरला निमंत्रण देणारी २८ घटक असल्याचे नमूद केले आहे. भारतात तोंडाचा कॅन्सर होण्याच्या केसीसमध्ये ९० टक्के केसीस तंबाखूच्या दुष्परिणामांशी संबंधित आहेत. भारतात तंबाखूजन्य आणि तंबाखूशी संबंधित निगडित आजारांचा मुकाबला करण्यासाठी १४ हजार ५०० कोटी रुपये खर्ची पडतात. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, कोणत्याही प्रकारच्या तंबाखू सेवनाच्या विरोधात ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारांअभावी दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न देणारा आणि जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणाचा पाया असलेल्या उद्यमनगरातील नागरी सुविधांची स्थिती अतिशय खराब आहे. उद्यमनगरसाठी स्वतंत्र बजेटची तरतूद केली जावी अशी मागणी उद्योजकांची आहे. रस्ते, पाणी आणि स्वच्छता या सुविधा मिळाव्यात इतकी माफक अपेक्षा उद्योजकांची आहे. मात्र, निव्वळ या परिसरात स्थानिक मतदार कोणी नसल्यानेच सुविधा पुरवल्या जात नाहीत अशी येथील स्थिती आहे.

फाउंड्री उद्योगात सध्या कोल्हापूरचे नाव देशात आघाडीवर आहे. या उद्योगांचा पाया म्हणजे शिवाजी उद्यमनगर होय. कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी ही जागा उपलब्ध करून दिली होती, पण उद्यमनगरात आज एकही रस्ता चांगला नाही. डॉ. अमर अडके यांच्या दवाखान्यासमोरील रस्ता, बिग बझारच्या मागील रस्ता असे रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले आहेत. याशिवाय परिसरात पाणी वेळेवर येत नसल्याने त्याचाही उद्योजकांना मोठा त्रास होत असतो. गोकुळ हॉटेल ते जवाहरनगर येथील रस्ता नगरोत्थान योजनेतून करायचा आहे. या रस्त्याचे काम सुरू झाले असले तरी अजूनही शेतकरी संघाचा पेट्रोलपंप ते वाय. पी. पोवारनगरपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. तसेच माधवराव करजगार मार्गावर अनेक वर्षे डांबरीकरण झालेले नाही. या औद्योगिक वसाहतीत अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने होणे आवश्यक आहे. साई सर्व्हिसच्या ट्रू व्हॅल्यू या शोरूमच्या मागील रस्ता तसेच वालावलकर हॉ‌स्पिटलसमोरील रस्ता दुरुस्त होणे गरजेचे आहे.

उद्यमनगरातील जवळपास सर्वच रस्त्यांची स्थिती खराब झालेली आहे. विशेषकरून अंतर्गत रस्त्यांवर डांबरीकरण होऊन बरीच वर्षे उलटली असल्याने थोडाजरी पाऊस पडला तरी येथील रस्ते चिखलमय होतात. कित्येक उद्योगांत निर्यातक्षम कास्टिंग बनवले जाते. परदेशातील पाहुणे त्यांच्याकडे येत असतात, त्यामुळे खड्ड्यांनी भरलेली उद्यमनगर असेच चित्र त्यांच्यासमोर निर्माण होते.

'औद्योगिक वसाहतीतील समस्यांसंदर्भात अगदी मुख्यामं‌त्र्यांपर्यंत तक्रारी केल्या आहेत, पण औद्योगिक वसाहतींना कोणीही वाली नाही,' अशी प्रतिक्रिया राजर्षी शाहू लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष शदर तांबट यांनी दिली.

महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न देणारा परिसर म्हणजे उद्यमनगर औद्योगिक वसाहत होय. एलबीटी, घरफाळा, पाणीपट्टी या माध्यमातून वर्षाला सर्वाधिक कर महापालिकेला मिळतो, पण या ठिकाणी कोणी मतदार नसल्याने उद्यमनगरकडे महापालिकेचे दुर्लक्ष होते. रस्ते, पाणी, गटारी इतक्या माफक सुविधा मिळाव्यात ही मागणी मान्य होत नाही.'

-संजय अंगडी, अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन

उद्यमनगरात एकूण २० ते २५ लाख रुपये निधीच्या कामाचे नियोजन केले आहे. त्यातील चार ते पाच लाखांची दोन-तीन कामे येत्या चार दिवसांत सुरू होतील. श्रीकृष्ण मंदिर ते स्टेट बँकेपर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी १० लाखांचा निधी देऊ. उद्यमनगरातील मुख्य प्रश्न रस्त्यांचाच आहे. त्यासाठी निधीची तरतूद केली आहे. रस्ते चांगले होतील याकडे विशेष लक्ष देऊ.'

कादंबरी कवाळे, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फसवणूकप्रकरणी मॅनेजर ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उच्च दर्जाच्या सेवा देणाऱ्या कंट्री क्लबमध्ये सदस्य करतो, म्हणून १० जणांनी फसवणूक झाल्याप्रकरणी राजारामपूरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकारात सुमारे ६०० जणांची फसवणूक झाली असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोल्हापूर येथील मॅनेजर उदय मगदूम याला ताब्यात घेतले आहे.

शहरामध्ये अत्यंत उच्च दर्जाच्या सेवा देणारा कंट्री क्लब सुरू होत आहे. त्यात सभासद करून घेतो म्हणून मनोज राठोड यांच्यासह दहा जणांकडून प्रत्येकी ३५ हजार रुपये घेण्यात आले होते. मात्र या प्रकारातून फसवणूक झाल्याची तक्रार मंगळवार पेठेतील भक्तीपूजा नगरातील मनोज राठोड यांनी दिली. हैदराबादच्या कंट्री क्लबचे मालक राजीव शेट्टी यांच्यासह क्लबचे संचालक मंडळ, मुंबई व कोल्हापूर येथील ललिता गुप्ता, संजय घागरे, संतोष देसाई, सर्वेश नांगीचा, जावेद जमादार आणि कोल्हापूर येथील मॅनेजर उदय मगदूम यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापैकी उदय मगदूम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टाकाळा परिसरात २००८ पासून कंट्री क्लबचे कार्यालय सुरू करण्यात आले. क्लबमध्ये वेगवेगळ्या सुविधा देण्यात येणार असून शहरातील प्रतिष्ठित क्लबपेक्षा अधिक चांगल्या सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सदस्य संख्या वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबा टोलनाक्याची मोडतोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टोल देण्याच्या कारणावरून कळंब्यातील साई मंदिरानजीकच्या आयआरबी कंपनीच्या टोलनाक्याची शनिवारी सकाळी संतप्त जमावाने मोडतोड केली. आक्रमक जमावाने टोलनाक्याची केबिन उचलून शंभर फूट अंतरावर फेकून दिली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसमोरच हा प्रकार घडल्याने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पळ काढला. टोलच्या बूथची मोडतोड केल्याप्रकरणी कंपनीचे सुपरवायझर उमाकांत नारायण राजमाने (वय २८, सध्या रा. टोपसंभापूर, मूळ गाव ओगलेवाडी, ता. करवीर) यांनी ५० ते ६० अज्ञात व्यक्तींविरोधात करवीर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली.

गारगोटीतील सुरेश आनंदराव जाधव हे कुटुंबासह नवीन वॅगनआर मोटार घेऊन कोल्हापूरला येत होते. साई मंदिरानजीकच्या टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांनी जाधव यांच्याकडे टोलची मागणी केली. जाधव यांनी टोल देण्यास नकार दिल्यानंतर बूथवरील कर्मचाऱ्यांनी, 'नवीन गाडीचे पेढे म्हणून पैसे द्या' अशी मागणी केली. त्यालाही जाधव यांनी नकार दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी आणि मोटारीतील महिलांशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद टोकाला गेल्यानंतर जाधव हे पर्यायी रस्त्याने जाण्यासाठी मोटार वळवत असताना कर्मचाऱ्यांनी मोटारीमागे बॅरिकेड लावल्याने मोटार त्यावर आदळली. यात मोटारीचे नुकसान झाल्याचे पाहून संतप्त जाधव यांच्याबरोबरच त्यांची हातघाई सुरू झाली. टोलनाक्यावर वाहनधारकाला मारहाण होत असल्याचे पाहताच परिसरातील ५० ते ६० जणांच्या जमावाने टोलनाक्यावर चाल केली. जमावाने पोलिसांना धारेवर धरत केबिनला लक्ष्य केले. दहा ते पंधरा तरुणांनी केबिन उचलून लांब फेकून दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तेथून पलायन केले. त्यानंतर तेथे करवीर पोलिस दाखल झाल्यानंतर दोन तासांनंतर वातावरण निवळले. कर्मचारी दुपारी तीन वाजता पुन्हा तेथे आले. मात्र, रात्री उशीरापर्यंत टोलवसुली सुरू झाली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरून शूटिंगचा प्रयत्न

$
0
0



कोल्हापूर:

गोव्यातील कँडोलिम येथे फॅब इंडियाच्या ट्रायल रूममध्ये असलेल्या छुप्या कॅमेऱ्याच्या शूटिंगचे प्रकरण ताजे असतानाच, फॅब इंडियाच्या कोल्हापुरातील शोरूममध्ये ट्रायल घेणाऱ्या तरुणीचे मोबाइलवरून शूटिंग करण्याचा प्रयत्न तेथील कर्मचाऱ्याने केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी प्रकाश इस्पुर्ले या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. हा प्रकार ३१ मार्चला झाला होता. दरम्यान, गोव्यातील चार अटक आरोपींना शनिवारी कोर्टाने जामीन मंजूर केला. तर स्टोअर मॅनेजरने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॅब इंडियाच्या सेल्समनला अटक

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी गोव्यातील फॅब इंडियाच्या ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा असल्याचं उघड केल्यानं खळबळ उडाली असतानाच, कोल्हापुरातील फॅब इंडिया शो रुम विचित्र प्रकारामुळे चर्चेत आलंय. चेंजिंग रुममधील तरुणीचं लपून चित्रीकरण केल्याप्रकरणी या शो रुममधील सेल्समन प्रकाश इस्पुर्ले याला अटक करण्यात आली आहे.

३१ मार्चला शाहूपुरी भागातील फॅब इंडियामध्ये एक तरुणी खरेदीसाठी गेली होती. तिथल्या चेंजिंग रुममध्ये ती काही कपड्यांची ट्रायल घेत असताना, सेल्समन प्रकाशनं दाराच्या फटीतून (दार आणि जमिनीमधल्या जागेतून) मोबाइलवर व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार लक्षात येताच तिनं आरडाओरडा करून व्यवस्थापकांकडे तक्रार केली होती. तसंच, शाहूपुरी पोलिसांतही तक्रार नोंदवली होती. त्या आधारे आज पोलिसांनी प्रकाश इस्पुर्लेला अटक केली आहे.

दरम्यान, फॅब इंडिया हा प्रतिष्ठित ब्रँड या लागोपाठच्या घटनांमुळे संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे. कालच्या गोव्यातील तक्रारीनंतर, फॅब इंडियाच्या सर्व शोरूममध्ये सुरक्षेसाठी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, ते ट्रायल रूममध्ये नाहीत, असा दावा फॅब इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विल्यम बिस्सेल यांनी केला आहे. परंतु, तेवढ्यानं या प्रकरणावर पडदा पडेल असं दिसत नाही. त्यामुळे ते आपला ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी काय पावलं उचलतात, हे पाहावं लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळवंटात नेहमीसारखीच घाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

चैत्री यात्रेत चंद्रभागेच्या वाळवंटात राहुट्या उभ्या न राहताही नेहमी सारखीच घाण झाली आहे. चंद्रभागा आणि वाळवंटाचे प्रदूषण रोखण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटात राहुट्या उभारण्यास वारकरी संप्रदायाला मुंबई हायकोर्टाने मनाई केली आहे. त्यामुळे या यात्रेत राहुट्या उभ्या केल्या नव्हत्या, तरीही वाळवंटात नेहमी सारखीच घाण झाली आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशनंतरही काहीही फरक पडल्याचे दिसत नाही.

दरम्यान, यामुळे हतबल झालेले प्रशासन मुंबई हायकोर्टाला वाळवंटात तात्पुरते शौचालय उभे करू देण्याची विनंती करण्याच्या विचारात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वाळवंटात जमा झालेल्या भाविकांना रोखणे मनुष्यबळाच्या दृष्टीने अशक्य असल्याने अखेर कोर्टाच्या सुचनेनुसार 'निरी'या संस्थेने केलेल्या सूचना पूर्ण करून अशी शौचालये उभी करण्याबाबत विनंती केली जाणार आहे.

वाळवंटात घाण होऊ नये, यासाठी मुंबई हायकोर्टाने यापुढे कधीही वाळवंटात तंबू, राहुट्या किंवा कसलेही तात्पुरते बांधकाम करण्यास मनाई केली आहे. प्रशासनानेही हा आदेश गांभीर्याने घेत यंदा एकही दिंडीला राहुट्या उभ्या करू न दिल्याने वारकऱ्यांना नदीवर मुक्काम करता आला नाही. यामुळे नेहमीप्रमाणे कोणत्याही प्रकारचा कचरा वाळवंटात झाला नाही. मात्र, वारकरी नेत्यांनी मोठ मोठाल्या घोषणा करूनही वाळवंटाचा मोठ्या प्रमाणात प्रातर्विधीसाठी वापर झाल्याचे दिसून आले. यंदा राहुट्या उभ्या करायच्या नसल्याने नेहमीप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपाच्या शौचालयाची उभारणीही प्रशासनाने वाळवंटात केली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images