महाराष्ट्र टाइम्सच्या ‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रमांत रविवारी प्रचंड प्रतिसाद देत कोल्हापूरकरांनी मनसोक्त आनंद लुटला. ‘मटा’चा हॅपी स्ट्रीट उपक्रम म्हणजे धमाल आणि मनसोक्त आनंद असे समीकरणच झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी थंडीची तमा न बाळगता सकाळी सातपासूनच उपस्थिती दर्शवली.
हॅपी स्ट्रीटवर हॅपी संडे
↧
↧
महिला आरोग्यासाठी ‘चिरायू’
आरोग्य सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच माता व अर्भक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात प्रथमच जिल्हा परिषदेच्यावतीने कोल्हापूरात चिरायु योजना गेल्या दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आली.
↧
झलक भारतीय संस्कृतीची!
देशाबरोबरच राज्याच्या विविध भागातील लोककला, पारंपारिक वाद्यांचा गजर आणि सजवलेल्या बैलगाड्यांसह रविवारी शहरातून मोठ्या उत्साहात काढण्यात आलेल्या दिमाखदार मिरवणुकीने चौथ्या भारत विकास संगम संमेलनाचा प्रारंभ झाला.
↧
बेबी शकुंतला यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला ऊर्फ उमादेवी नाडगोंड (वय ८३) यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा सुरेश, सून वर्षा नाडगोंड, मुलगी तेजस्वीनी घाटगे, जावई कॅप्टन घाटगे असा परिवार आहे.
↧
रेशन समित्यांवर करडी नजर
रेशन अर्थात सार्वजनिक व्यवस्थेमाफत वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा, तालुका व गावपातळीवर नेमण्यात आलेल्या दक्षता कमिट्या कुचकामी ठरत आहेत.
↧
↧
राज्यात लवकरच गोहत्याबंदी
‘भारतीय संस्कृती आणि परंपरा विज्ञाननिष्ठ आहेत, म्हणूनच त्या शाश्वत आहेत. देशी गायीचे दूध आरोग्यदायी आहे. भारतीय संस्कृतीत तिचे महत्त्व मोठे असल्याने राज्यात लवकरच गोहत्या बंदी कायदा लागू होईल’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले.
↧
८० मेगावॉट वीजनिर्मिती करणार
‘राज्यात वीजेची गरज असतानाही कोयनेतील ४० मेगावॅटच्या दोन केंद्राचे काम सात वर्षांपासून रखडले आहे. या कामाची मी स्वत: पाहणी केली असून, पुढील २० महिन्यांत हे काम पूर्ण होऊन त्यातून वीज निर्मिती सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
↧
परीक्षेमुळे बालमहोत्सवावर विरजण?
महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने दरवर्षी घेण्यात येणारा चाचा नेहरू बालमहोत्सवाची यंदा नव्या सरकारला पूर्णच विसर पडला आहे. या महोत्सासाठी सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी ५ लाख आणि विभागीयस्तरासाठी १० लाखाचा निधी देण्यात येतो.
↧
ऊस फडांना शॉर्टसर्किटचा धोका
ग्रामीण भागात ऊस हंगाम मध्यावर आला आहे. शेतकरी मिळेल त्या कारखान्याला उस पाठवून आपले शेत – शिवार मोकळे करून आणखीन एखादे तीन – चार महिन्याचे पिक घेण्याच्या प्रयत्नात आहे.
↧
↧
पोलिसही ‘फॅन्सी’, वाहतूक नियमांना हरताळ
सर्वसामान्य नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, असे आग्रह धरणारे पोलिस कर्मचारीच आपल्या दुचाकींवर फॅन्सी नंबरप्लेट लावत असून, वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासत आहेत. पोलिस दलातील ४० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर फॅन्सी व नियमबाह्य नंबर प्लेट आहेत.
↧
रेखा आवळे यांचे नगरसेवकपद रद्द
जातीचा खोटा दाखला सादर केल्याचे सिद्ध झाल्याने महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती रेखा अनिल आवळे यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी क्रमांक दोन कार्यालयाकडून आवळे यांनी सादर केलेला ओबीसी दाखला अवैध ठरविला.
↧
‘गोकुळ’चे पडसाद ‘केडीसीसी’तही
जिल्ह्याची आर्थिक सत्ताकेंद्रे असलेल्या गोकुळ व जिल्हा बँकेच्या निवडणुका एकाचवेळी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे या दोन्ही संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना एकाचवेळी फिल्डिंग लावावी लागणार आहे.
↧
रेकॉर्ड ब्रेक गर्दी
चौथ्या भारत विकास संगम संमेलनाच्या निमित्ताने कणेरी येथे श्री क्षेत्र सिद्धगिरी मठावरील देशी गायी, सेंद्रीय शेती, राजर्षी शाहू कलादालन आदींसह आरोग्य धाम प्रदर्शन सोमवारपासून खुले झाले.
↧
↧
राज्य सरकारची पहिली ग्रीन बिल्डिंग
येथील ख्यातनाम आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी डिझाईन केलेल्या पुण्यातील नवीन सर्कीट हाउसच्या इमारतीला ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबिटॅट असेसस्मेंट (ग्रिहा) या संस्थेचे ग्रीन बिल्डींगासाठीचे रेटिंग मिळाले आहे.
↧
प्राध्यापकांना सात तास काम
सीनिअरच्या प्राध्यापकांना पाच तासांऐवजी कॉलेजसाठी सात तास द्यावे लागणार आहेत. अध्यापनासह दोन वाजेपर्यंतच्या कामाचा अहवालाची तपासणी शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून केली जाणार आहे. त्यामुळे दोन तास काम करुन घरी जाणाऱ्या प्राध्यापकांना लगाम बसणार आहे.
↧
‘लोकसहभागा’तून विकास कधी?
पदावर नवीन आल्यानंतर अनेकांना लोकप्रिय घोषणा करण्याची मोठी हौस असते, त्यानंतर काही काळ त्याचा पाठपुरावा देखील केला जातो. पण नंतर त्याचा पाठपुरावा बंद होतो, पदाधिकारी बदलल्यानंतर तर योजनांचे तीन तेरा वाजतात.
↧
महापालिकेला मिळेनात प्रायोजक
लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रायोजक शोधण्यात पोलिसांनी बाजी मारली असतानाच महानगरपालिका मात्र अद्याप अंधारात चाचपडत आहे. महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी व अधिकारी शहराच्या विकासाबाबत उदासीन असल्याचे चित्रच या निमित्ताने समोर आले आहे.
↧
↧
जिल्हा बँकांचे रणांगण मेमध्ये
कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्हा बँकांची निवडणूक घेण्यासाठी ठराव मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २१ जानेवारी ते २० फेब्रुवारीअखेर हे ठराव सहकार सह निबंधकांकडे सादर करावे लागणार आहेत. त्यानंतर मेमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.
↧
कणेरीत संस्कृतीचा महासोहळा
राज्याच्या कानाकोपऱ्यांतून हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविलेल्या नागरिकांच्या उपिस्थितीत कणेरी मठावर चौथ्या भारत विकास संगम संमेलनाला प्रारंभ झाला.
↧
ऊस खरेदी करप्रश्नी बोळवणच
राज्य सरकारने चालू गळीत हंगामातील उसाचा खरेदी कर माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असला तरी या निर्णयाचा सर्व साखर कारखान्यांना फायदा होणार नाही. सहवीज प्रकल्प असलेल्या कारखान्यांना यापूर्वीच १० वर्षांसाठी खरेदी कर माफ करण्यात आलेला आहे.
↧
More Pages to Explore .....