Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कागदपत्रांची रद्दी करणारा विभाग

$
0
0
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाची इमारत ही जुनी आहे. एखाद्या अरुंद बोळासारख्या अंधाऱ्या खोल्यांमध्ये कामगारांच्या भविष्याची गोळाबेरीज केली जाते. कामगारांनी जगभरात क्रांती करुन हक्कासाठी लढे दिले आहेत. कोल्हापुरातील कामगारांबाबतची सरकारी पर्यायाने प्रशासकिय उदासीनता पाहिली तर मोर्चे, निदर्शनांचे प्रमाण का वाढत चालले आहे याचे वास्तव समजून येते.

बाजारीकरणात साहित्यच तारेल!

$
0
0
खरेदी-विक्री हेच जगण्याचे सूत्र बनले आहे. डोंगर, नद्या, माती, मत, रक्त, अगदी गर्भाशयही विकायला सुरुवात झाली आहे. यामुळे बाजारीकरण झालेल्या या जगात समाजाला शाश्वत विकासासाठी साहित्याची गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांनी व्यक्त केले.

'सह्याद्री हाच माझा गॉडफादर'

$
0
0
‘सह्याद्रीचा डोंगर हाच माझा गॉडफादर आहे. खडतर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत प्रसंगी वॉचमनचे काम केले. अभिनयाची शेती केली. कवितेची आवड मला समृद्ध करीत गेली आणि माझ्यातील अभिनेता घडला. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी दुसऱ्याचे अनुकरण न करता स्वत:मधील मी शोधा, म्हणजे यशस्वी व्हाल,’ असा मौलिक सल्ला अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिला.

‘अडत विभागणार’

$
0
0
‘व्यापारी व शेतकऱ्यांवर अडत विभागून देण्याचा विचार असून त्यासाठी एकत्रित बैठक घेऊन लवकरच निर्णय घेतला जाईल,’ असे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. ‘शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून सौदे सुरू करण्यासाठी अडत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

टोलबाबत पर्याय तपासू

$
0
0
‘रस्ते प्रकल्पाच्या परताव्याच्या रकमेबाबत आयआरबी कंपनीचे समाधान झाले तर टोल रद्द केल्यानंतर भविष्यात काही कायदेशीर अडथळे येणार नाहीत. त्यामुळे समिती नेमून परतावा किती द्यायचा व कशा पद्धतीने द्यायचा हे जानेवारीत निश्चित केले जाईल,’ असे सांगत टोल विरोधी कृती समितीला नियोजीत ३० डिसेंबरचा मेळावा स्थगित करण्याची विनंती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

थंडीचा कडाका वाढला

$
0
0
कोल्हापूरकरांना वर्षाच्या शेवटच्या रविवारचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागला. शहरातील किमान तापमानाचा पारा १४ अंशांवर घसरल्याने शहरात थंडीचा कडाका चांगलाच जाणवत होता.

वर्षाला दोन कोटीला गाळात

$
0
0
भाडेकराराची मुदत संपलेल्या शहरातील हजारो गाळ्यांच्या नवीन भाड्याबाबत महापालिकेने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वर्षाला जवळपास दोन कोटींच्या करापासून मुकावे लागत आहे.

रस्त्यांची कामेही रखडणार

$
0
0
शहरांतर्गत रस्त्यांच्या कामावर नियंत्रणासाठी समिती स्थापना झाली, महापालिका पदाधिकाऱ्यांनी अचानक भेट ठेवून गुणवत्ता तपासणीचा निर्णय झाला. या घोषणेला महिना उलटला तरी रस्त्यांच्या कामाला ना गती लाभली ना दर्जेदार रस्ते तयार झाले.

विद्यार्थिनीची आत्महत्या

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहातील एका विद्या‌र्थिनीने रविवारी आत्महत्या केली. सुप्रिया कृष्णा पाटील (वय २४,. रा. रिळे, ता. शिराळा) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यावर कॅम्पसमध्ये खळबळ उडाली.

दर्जेदार रस्त्यांसाठी निवृत्त अधिकारी

$
0
0
राज्यातील रस्ते दर्जेदार व टिकाऊ व्हावेत यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा मदत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशा अधिकाऱ्यांची लवकरच एक समिती नेमण्यात येणार आहे.

दोन हजार बकरी, चाळीस टन कोंबड्या

$
0
0
यंदा ३१ डिसेंबर बुधवारी असल्याने मांसाहारी खवय्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. थर्टी फर्स्टचा दिवस कॅश करण्यासाठी शहरातील विक्रेते सज्ज झाले आहेत. दोन हजार बकरी, चाळीस टन बॉयलर कोंबड्यांची खरेदी विक्रेत्यांनी केलेली आहे.

यंदा मद्यविक्री पहाटेपर्यंत

$
0
0
थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी जल्लोषी पार्ट्यांचे नियोजन सुरू असताना गृह खात्याने बिअर बार व परमिट रूम पहाटे पाचपर्यंत खुली राहतील असे राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवले आहे. कंट्री लिकर्स च्या दुकानाची शटर मात्र दीड वाजता बंद होणार आहेत.

पालिकेत शह-काटशहाचे राजकारण

$
0
0
विधानसभा निवडणुकीतील राजकारणाचे पडसाद महापालिकेतील विविध समिती सभापतींच्या निवडीवर उमटत आहेत. स्थायीसाठी जनसुराज्यच्या नगरसेविका मृदुला पुरेकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसकडून झालेला विरोध आणि राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी डावलल्यामुळे महापालिकेत शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे.

आज शाहिरी महोत्सव

$
0
0
शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्यावतीने मंगळवारी (ता.३०) कोल्हापुरी शाहिरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवात जिल्ह्यातील दहा शाहिरी पथकांचा समावेश असून ते विविध विषयावर पोवाडे सादर करणार आहे.

राष्ट्रवादीविरोधात जनसुराज्य

$
0
0
महापालिकेच्या राजकारणात गेली दहा वर्षे एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य शक्ती पक्षातील मैत्रीत वितुष्ट निर्माण झाले आहे.

‘स्वाभिमानी’कडून टोलफोड

$
0
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी शिरोली टोलनाका फोडला. कडक पोलिस बंदोबस्तामुळे शाहू आणि सरनोबतवाडी नाक्यावरील हल्लाबोल कार्यकर्त्यांनी स्थगित केला. सर्व नाक्यांवर जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वीज सवलतीसाठी लवकरच बैठक

$
0
0
उद्योजकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत लवकरच बैठक घेतली जाईल. एमआयडीसीतील वापर नसलेले भूखंड अन्य उद्योजकांना दिले जातील, शिवाय वेस्ट स्टँड निर्गतीसाठीही जागा देण्याचे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योजकांच्या बैठकीत दिले.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच!

$
0
0
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. मंत्रिमंडळातील बारा जागा रिक्त असून, आरपीआय (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम पक्ष या घटकपक्षांना प्रत्येकी एक जागा देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेठजी-भटजींच्या युतीने सामान्य माणूस संभ्रमित

$
0
0
‘रोजच्या जगण्याच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच घरवापसीसारखे धर्मांतराचे कार्यक्रम राबविण्याचे प्रकार सुरू आहेत. शेठजी-भटजींच्या युतीने सामान्य माणसाला संभ्रमित केले,’ असा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी लोकशासन आंदोलन पक्ष कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण वर्गात बोलताना केला.

कारखान्यांवर फौजदारी होणारच

$
0
0
‘एफआरपीप्रमाणे उसाला दर देण्यास टाळटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांवर फौजदारी ही होणारच आहे. कोणत्याही परिस्थितीत साखर कारखानदारांचे लाड करणार नाही,’ अशा शब्दात सहकार आणि बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारकडे बोट दाखविणाऱ्या साखर कारखानदारांना सुनावले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images