मुलाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यास गेलेल्या राजू बाबूराव सावंत (वय ४८, रा. सरनाईक वसाहत, शिवाजी पेठ) यांच्यावर लोखंडी गजाने केलेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. सावंत हे छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजता वारे वसाहतीत घडली.
‘छावा’चे जिल्हाध्यक्ष सावंत मारहाणीत जखमी
↧
↧
पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा २७, २८ सप्टेंबरला ठाण्यात
कॉलेजविश्वात मानाची समजली जाणारी नी. गो. पंडितराव स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यंदा २७ आणि २८ सप्टेंबर रोजी ठाण्यात शिवदौलत सभागृह, शिवसमर्थ विद्यालयात होणार आहे. कनिष्ठ आणि पदवी अशा दोन गटांत होणाऱ्या या स्पर्धेसाठी अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत २२ सप्टेंबर आहे. स्पर्धेचे यंदाचे ४६ वे वर्ष आहे.
↧
सीमाभाग केंद्रशासित करा
‘सीमाप्रश्नाबाबत निकाल लागत नाही तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा आणि तेथील सीमाबांधवांच्या रक्षणासाठी स्वतंत्र राखीव दल केंद्राने पाठवावे,’ अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
↧
पंचगंगा नदी प्रदूषण आराखडा पडून
पंचगंगा नदी प्रदूषणाच्या आराखड्यात राज्याच्या पर्यावरण विभागाने काढलेल्या त्रुटी पूर्ण करून तो पुन्हा सादर केल्याला आता आठ महिने झाले तरी हा अहवाल अंतिम करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेला नाही.
↧
५५ फाउंड्री ऊर्जा कार्यक्षम
जागतिक बँकेच्या ग्लोबल एन्व्हायरन्मेंट फॅसिलिटी आणि केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीच्यावतीने संपूर्ण भारतात पाच शहरातांतील उद्योगांसाठी ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा प्रसार केला जात आहे.
↧
↧
शाहूवाडी, राधानगरी महायुतीसाठी अडचणीचे
राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीची उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून प्रकाश आबिटकर यांनी शिवबंधन हातात बांधले. पण स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील यांच्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी आग्रह धरला आहे.
↧
‘देवस्थान’ची गाडी खरेदी
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने काही महिन्यांपूर्वी खरेदी केलेली १७ लाख अकरा हजार ८७० रुपये किंमतीची इनोव्हा झेड एक्स गाडी देवस्थानचे प्रभारी अध्यक्ष, जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या घरातील आवारात का लावली जाते ?
↧
केएमटीप्रश्नी ‘स्थायी’त खडाजंगी
केएमटी कर्मचाऱ्यांच्या थकित पगारावरून स्थायी समितीची बैठक शुक्रवारी चांगलीच गाजली. कर्मचाऱ्यांना दोन-तीन महिने पगारासाठी वाट पाहावी लागत आहे. उपायुक्त, आयुक्त हे परिवहन विभागाचे प्रमुख आहेत.
↧
महिलांना लुटणारी टोळी अटकेत
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने राष्ट्रीय महामार्गावर महिलांना हेरून त्यांचे दागिने लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील या टोळीतील सहाजणांना अटक केली असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.
↧
↧
खंडपीठ स्थापनेसाठी मंत्रिमंडळाचा ठराव हवा
मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठ स्थापनेसाठी मंत्रिमंडळाचा ठराव पाठवावा असे पत्र मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
↧
हाडे खिळखिळी करणारा रस्ता
शास्त्रीनगरमधील रस्ता म्हणजे पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून तयार झालेला रस्ता. परंतु शास्त्रीनगर हा शहराचा भाग आहे असे सांगितले तर अजिबात विश्वास बसणार नाही.
↧
यंदा मखर थर्माकोलचेच
गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. बाप्पा घरी येणार असल्याने सजावटीची लगबग सुरु झाली आहे. गणराया विराजमान होण्यासाठी नेहमीप्रमाणे यावर्षीही मखरासाठी थर्माकोलला मागणी वाढली आहे.
↧
गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरे भरवावीत
काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. उत्सवाच्या निमित्ताने काही विधायक उपक्रम राबविले जातात. उत्सव काळात अन्नदान (महाप्रसाद) मोठ्या प्रमाणावर केले जाते. विविध मंडळांनी गणेशोत्सव काळात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.
↧
↧
बकालपण हटविण्यासाठी हव्यात सुविधा
घरे घेण्याची परिस्थिती नसल्याने जिथे जागा मिळेल तिथे झोपडी उभारल्याने शहरात ठिकठिकाणी झोपडपट्टी उभ्या राहिल्या. त्यातील अनेक झोपडपट्टी अधीकृत करुन तेथील घरे त्यांच्या नावावर करुन देण्यात आली.
↧
मंडपांमुळे रस्ते ब्लॉक
शहरभर प्रचंड खड्ड्यांनी हैराण झालेल्या वाहनधारकांच्या तापात आता गणेश मंडपामुळे ब्लॉक केलेल्या रस्त्यांमुळे दोन चार रस्त्यांना फेरा घालण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांनी रस्त्यावर मंडप घालून रस्ते ब्लॉक केले आहेत.
↧
मुख्यमंत्र्यांचे स्वागत बंदनेच
सरकारशी आता चर्चेची इच्छा नाही, आम्हाला टोल मुक्तीचा निर्णय हवा आहे. मंगळवारच्या कोल्हापूर बंदच्या निर्णयावरही आम्ही ठाम आहोत. बंदनेच मुख्यमंत्र्यांचे स्वागत होईल, असे टोल विरोधी कृती समितीने स्पष्ट केले आहे.
↧
राजू शेट्टी हे दलाल!
‘राजू शेट्टी हे भाजप व आरएसएसचे दलाल व शेतकऱ्यांमधील गद्दार असून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी त्यांना पद्धतशीरपणे सोडले आहे. शेट्टींना जर खरोखरच शेतकऱ्यांचा कैवार असेल तर त्यांनी भाजप सरकारमधून बाहेर पडावे,’ असे आव्हान युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिले.
↧
↧
संवेदनशील ठिकाणांवर लक्ष
विशेष पोलिस महानिरीक्षकापासून जिल्ह्यातील सर्व २८ पोलिस ठाण्यांतील अधिकारी नवीन असल्याने आगामी गणेशोत्सव व विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.
↧
मूल्यांकन ४५० कोटी?
रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकन समितीने राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे अहवाल सादर केला आहे. आयआरबी कंपनीकडून झालेल्या रस्त्याचे मोजमाप करून प्रकल्पाचे मूल्यांकन निश्चित केले आहे.
↧
चेक क्लिअरिंग आता गतीने
महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बॅँकेच्यावतीने चेक ट्रंकेशन सिस्टम (सीटीसी) सुरू करण्यात आली असून या सुविधेचे उदघाटन शनिवारी करण्यात आले. नॅशनल पेयमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत हा व्यवस्था सुरू करण्यात आली.
↧