‘शेकडो वर्षे गुण्यागोविंदाने नांदणारे हिंदू-मुस्लिम समाज आधुनिकरणानंतर एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे प्रकार घडले. कितीही विरोध केला तरीही आता आपण जागतिकीकरण थोपवू शकत नाही.
धर्मनिरपेक्षता हाच चळवळींचा आधार
↧
↧
परिवहन समितीची विनाकारण बदनामी
‘परिवहन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या बसेसविषयी सदस्यांना काही शंका आहेत. तांत्रिक मुद्दे प्रशासनाला कळविले आहेत, कन्सल्टंट कंपनीकडेही खुलासा मागितला आहे. मात्र, अद्याप कन्सल्टंट कंपनीच्या प्रतिनिधीने खुलासा केलेला नाही.
↧
चाळीस जणांची बँक खाती सील
स्थानिक संस्था कर भरण्यासंदर्भात वारंवार कळवूनही टाळाटाळ केल्याबद्दल आणि कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याच्या कारणावरून महापालिकेने शहरातील व्यापाऱ्यांसह ४० जणांची बँक खाती सहा महिन्यांसाठी सील केली आहेत.
↧
स्मित फुलवण्यासाठी हवी मदत
अभ्यासात अत्यंत हुशार, प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणारी, सर्वांसोबत मिळून मिसळून वागणारी अशी चौदा वर्षीय हसतमुख स्मिता माने. मात्र, नियतीला हे पहावले नाही.
↧
मुस्लिम जोडप्यांनी केला अभिषेक
भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या रावणेश्वर मंदिरातील शिवलिंगावर श्रावण सोमवारचे औचित्य साधून सहा मुस्लिम जोडप्यांनी विधिवत अभिषेक व पूजा करून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला. मंदिरात शहरातील मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने येतात, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली.
↧
↧
गणेशोत्सवाआधी पॅचवर्क
गणेशोत्सवाच्या आधक्ष शहरातील रस्त्यांची दुरूस्ती आणि पॅचवर्कचे काम पूर्ण केले जाणार आहे. गणरायाच्या आगमन आणि विसर्जन मार्गाच्याही दुरूस्तीचे काम हाती घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.’ अशी माहिती नूतन महापौर तृप्ती माळवी यांनी दिली.
↧
गोकुळाष्टमीला न्यू गुजरीत ‘रंगारंग’
गोकुळ अष्टमीनिमित्त न्यू गुजरी मित्र मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या १ लाख रुपयांच्या दहीहंडीसाठी यावेळी अभिनेत्री मृणाल दुसानीस उपस्थित राहणार आहे.
↧
पेट्रोल पंपांचे मीटर डाउन
राज्य सरकारच्या विविध प्रकारच्या करांविरोधात मुंबई वगळता राज्यभरात पेट्रोल आणि डिझेल पंपचालकांनी सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. या संपाला कोल्हापूर जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील सर्व २३० पेट्रोल पंप बंद राहिले.
↧
मालोजीराजेंनी मैदान सोडले!
गेली बारा वर्षे राजकारणात सक्रीय असलेल्या माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी विधानसभा निवडणुकीला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना भेटून ते भूमिका मांडणार आहेत.
↧
↧
रक्षाबंधनाहून परतताना अपघात
पुणे-बेंगळुरू महामार्गावर वळसे गावाजवळ सोमवारी पहाटे झालेल्या इंडिगो कार व खासगी ट्रॅव्हल्स बस अपघातात कोल्हापुरातील दाम्पत्यासह तीनजण ठार झाले. या अपघातात दोन वर्षाचे बालक व चालक गंभीर जखमी झाले आहेत.
↧
हरलो तर राजकारण संन्यास
विधानसभा निवडणुकीत हरलो तर संन्यास घेईन. समोरच्यांनी आव्हान देऊन समोर यावे. मी प्रचंड मतांनी विजयी झालो नाही तर राजकारण सोडेन. मात्र, जिंकलो तर समोरच्यांनी अपघाताने मिळालेली खासदारकी सोडावी, असे आव्हान गृहमंत्री आर आर. पाटील यांनी त्यांचे कट्टरविरोधक, खासदार संजय पाटील यांना दिले.
↧
आघाडीच्या बालेकिल्ल्यात महायुती
महापालिका, जिल्हा परिषद, आठ नगरपालिका यासह सर्वच साखर कारखाने व सहकारी संस्था दोन्ही काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्यामुळे विधानसभेत आघाडी भक्कम दिसत असली, तरीही काँग्रेस नेत्यांमधील मतभेद, संभाव्य बंडखोरी, शिवसेना व भाजपला मिळालेली ‘स्वाभिमानी’ची ताकद यामुळे आघाडीच्या बालेकिल्ल्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुती जोरात टक्कर देण्याची चिन्हे आहेत.
↧
गांडूळ खतनिर्मिती
कागल तालुक्यातील व्हन्नूर गावातील दौलतराव निकम हायस्कूलने गेल्यावर्षी गणेशोत्सवावेळी गावातील निर्माल्य तलावात न टाकण्यासाठी मोहीम राबवली होती. या निर्माल्यातून गांडूळ खत बनवून त्याचा उपयोग शाळेतील शोभेच्या झाडांच्या कुंड्या आणि अन्य झाडांसाठी करण्यात आला आहे.
↧
↧
शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा
२००६ पासून पगार न मिळालेल्या नऊ शिक्षक व कर्मचाऱ्यांनी १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबीयांसह आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
↧
महाडीक-सतेज पाटील यांच्यात चुरस
उत्तर मतदारसंघाचा उमेदवार गृह राज्यमंत्री सतेज पाटील की आमदार महाडिक गटाचा हा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
↧
ऑक्टोबरच्या परीक्षांचे वेळापत्रक
शिवाजी विद्यापीठाच्यावतीने विविध अभ्यासक्रमांच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ४६० परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा २९ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून त्यासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
↧
सुटी सुरू, धमाल चालू
१५ ऑगस्टला जोडून आलेले शनिवार, रविवार व पारशी दिन अशा चार दिवसांच्या सुटीमुळे ट्रिपची तयारी सुरु झाली आहे. नोकरीनिमित्त परगावी असणारे घरी परतण्याचे तर शहर परिसरात स्थायिक असलेले फिरण्यासाठी विविध पर्यटनस्थळी जाण्याची तयारी करत आहेत.
↧
↧
फक्त १०० मंडळांना परवानगी
कोणताही उत्सव साजरा करायचा असेल तर त्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी घ्यावी लागते. यावर्षी नोंदणी सुरू झाल्यापासून ४०० मंडळांनी अर्ज घेतले आहेत. त्यापैकी १०० अर्ज दाखल झाले असून त्या सर्वांना गणेशोत्सवासाठी परवानगी देण्यात आली आहे.
↧
महिला स्वच्छतागृहांना प्राधान्य
पर्यटन आणि देवदर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. नोकरी आणि कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय आहे. महिलांच्या सुविधेसाठी कोल्हापुरात ठिकठिकाणी स्वच्छतागृहे प्राधान्याने उभारण्यात येतील.
↧
लाडूचा दर्जा तपासणार
श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना देण्यात येणारा लाडूप्रसाद निकृष्ट दर्जाचा असल्याच्या लोकशक्ती सामाजिक संघटनेच्या तक्रारीवरुन अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी ताब्यात घेतलेल्या लाडूप्रसादाचे नमुने तपासण्याच्या प्रक्रियेस सुरूवात झाली.
↧
More Pages to Explore .....