श्रावण महिन्याची सुरुवात झाल्याबरोबर जागोजागी राख्यांचे स्टॉल दिसायला लागतात. श्रावणातल्या पौर्णिमेच्या आधी अगदी छोट्या-छोट्या मुलींपासून वयस्कर आजींपर्यंत बायकांचा राखी घेण्याचा अगदी अपूर्व उत्साहसुद्धा दिसून येतो.
भावबंधांची जपणूक अपेक्षित
↧
↧
‘गोकुळ’च्या दुधाला गळती
गोकुळचे दुध चोरुन परस्पर विकणारी टोळी व्यवस्थापनाच्या हाताला लागली आहे. ठेकेदारासह ‘गोकुळ’चा स्टाफ संगनमताने हा गोरखधंदा करत असल्याचे उघडीस येऊनही हे प्रकरण दडपण्याच्या हालचाली सुरु आहेत.
↧
‘गाडगेबाबांचे विचार आजही अनुकरणीय’
‘समाजाची वेदना ही आपली स्वतःची वेदना समजून कार्य करा, असा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करा,’ असे आवाहन अॅड. संभाजीराव मोहिते यांनी केले.
↧
शिक्षण, आरोग्याला प्राधान्य
मी अनेक विभागात काम केलेले आहे. काही योजनांचे ड्राफ्ट बनवण्याची संधी मला मिळाली होती. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची मला चांगली माहिती असल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली जाईल.
↧
१५५ कोटींचा आराखडा
आगामी तीस वर्षांत जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा विचार करून सोयी-सुविधांयुक्त असा १५५ कोटी रुपयांचा सुधारित आराखडा तयार केला असून, तो तत्काळ राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.
↧
↧
‘उत्तर’मधील मेळावा अखेर रद्द
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आयोजित केलेला कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा अखेर रद्द करण्यात आला.
↧
‘नाइट शेल्टर’साठीची ‘एकटी’ लढाई
एकट्या रहाणाऱ्या महिलांसाठी कार्यरत असलेल्या ‘एकटी’ संस्थेची गेल्या दीड वर्षापासून महिलांसाठीच्या नाइट शेल्टरसाठी लढाई सुरू आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने सिद्धार्थनगरामध्ये संस्थेसाठी शेल्टर मंजूर केले असतानाही स्थानिक विरोधामुळे संस्थेला शेल्टरची वास्तू देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
↧
स्टायलिश राख्यांना आले मार्केट
रेशीम धाग्यांनी भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यातील बंध अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. शहरातील अनेक ठिकाणी राख्यांचे स्टॉल लागले असून मार्केटमध्ये महिला व मुलींची गर्दी झालेली दिसून येत आहे.
↧
भवानी मंडपाचा मेक ओव्हर गरजेचा
मराठ्यांच्या राजधानीतील छत्रपतींचे निवासस्थान असलेला जुना राजवाडा, १८५७ च्या बंडाचा साक्षीदार असलेल्या भवानी मंडप, जुना राजवाडा व नगारखान्याचा इतिहास जपण्यासाठी आता प्रशासनाबरोबरच नागिरकांनीही पुढाकार घेतला पाहिजे.
↧
↧
महापौरपदी तृप्ती माळवी बिनविरोध
कोल्हापूरच्या ४१ व्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तृप्ती माळवी यांच्या बिनविरोध निवडीवर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखालील सभेमध्ये पंधरा मिनिटात निवडीचे सोपस्कार पूर्ण झाले.
↧
वाढतेय मोलाचे दान!
प्रभावी जनजागृतीमुळे अवयवदानाच्या मोहिमेचा प्रतिसाद वाढता आहे. सप्टेंबर २०१२ ते जून २०१४ या कालावधीमध्ये राज्यभरात १९३ ब्रेन डेड पेशंटमधून १०५ किडनी, ४८ लिव्हर, ६८ डोळे हे अवयव प्रत्यारोपणासाठी मिळवण्यात आले आहेत.
↧
आयआरबी, चले जाव!
क्रांतीदिनाचे औचित्य साधत टोलविरोधी कृती समितीने ‘चले जाव, चले जाव, आयआरबी चले जाव’ चा नारा देत शनिवारी भवानी मंडपात धरणे आंदोलन केले.
↧
क्रांतिदिनी हुतात्म्यांना अभिवादन
ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त शनिवारी विविध संस्था आणि संघटनांच्यावतीने शहरात उपक्रमांचे आयोजन करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.हुतात्मा स्मारक, प्रतिभानगर कोल्हापूर महापालिकेच्यावतीने प्रतिभानगर येथील हुतात्मा स्मारक येथे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
↧
↧
‘वडाप’चा बंद एसटीसाठी पर्वणी
केवळ चार गावांच्या मार्गावर धावणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या गाड्या दीड दिवस बंद राहिल्याने राधानगरीसारख्या दुर्गम भागातील एसटी आगाराच्या उत्पन्नात पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
↧
घोषणा भरपूर, अंमलबजावणी शून्य
गेल्या वर्षभरात नवरात्रौत्सव, चैत्रोत्सव, पर्यटनाचा सीझन अशा काळात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापनाने करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या विकासाबाबत आणि भाविकांच्या सुविधांबाबत अनेक घोषणा केल्या.
↧
नाट्यगृहासोबत पुतळ्याचे उद्घाटन
‘सध्या नुतनीकरण सुरू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचे उदघाटन होईल तेव्हा नाट्यगृहाच्या उदघाटनासोबत संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या पुतळ्याचेही उदघाटन करण्यात येईल,’ अशी घोषणा महापौर तृप्ती माळवी यांनी केली.
↧
मालोजीराजेंबाबत संदिग्धता कायम
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून आमदार सा.रे.पाटील यांनी माघार घेतल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. माजी आमदार मालोजीराजे व मधुरिमाराजे यांनी अर्ज घेतले पण ते न भरल्याने त्यांची संदिग्धता कायम राहिली आहे.
↧
↧
विमानतळाला एनओसीची प्रतीक्षा
कोल्हापूरची विमानसेवा सुरु होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या राज्य सरकारकडील सर्व मंजुरींची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता केवळ केंद्र सरकारच्या पातळीवरील नागरी विमान वाहतूक मंत्रालय व नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे (डीजीसीए) ना-हरकत प्रमाणपत्र मिळताच सेवा सुरू होणार आहे.
↧
घार धडकली; CM बचावले
कराड दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विमानाला शनिवारी घारीने धडक दिली. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व जण सुखरूप बचावले.
↧
नव्या नियमावलीने बेरोजगारीत वाढ
रस्ता तयार करताना स्काडा सिस्टीम तसेच ड्रम मिक्स प्लॅंट अनिवार्य करण्यात आला आहे. अचानक प्रशासनाने काढलेल्या या आदेशामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात वर्षाला होणाऱ्या शंभर कोटींच्यावर रस्ता डांबरीकरणाच्या कामांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
↧
More Pages to Explore .....