शहरात रविवारी दिवसभर पावसाची उघडीप असली तरी धरणक्षेत्रात व जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला. राधानगरी व शाहूवाडी तालुक्यात तर तुफान पाऊस झाला आहे.
राधानगरीतून विसर्ग सुरू
↧
↧
कारभाराचा चिखल
सगळे शहर उन्हाळ्यात जेव्हा खड्डे बुजवण्याची मागणी करत होते तेव्हा महापालिका प्रशासन अजगरासारखे सुस्त होते. पण पाऊस सुरू होताच याच महापालिकेच्यावतीने मुरुमाचे डंपरच्या डंपर या खड्ड्यांमध्ये जिरवण्यात येत आहेत.
↧
फाशीच्या निर्णयाने समाधान
राज्यात खळबळ माजवणाऱ्या बालके हत्याकांडातील प्रमुख आरोपी रेणुका शिंदे, सीमा गावित यांनी फाशीची शिक्षा रद्द करावी म्हणून दाखल केलेल्या दयेचा अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी फेटाळल्याच्या निर्णयाचे सर्व थरातून समाधान व्यक्त केले जात आहे. दोघींच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्याच्या वृत्ताची शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.
↧
चंदगडला पावसाचा जोर वाढला
गेले आठवडाभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने तीन-चार दिवस काहीशी उसंत दिली होती. मात्र सोमवार सकाळपासून पावसाने रिपरिप लावली असून दुपारनंतर वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे ताम्रपर्णी व घटप्रभा नद्या दुथडी भरुन वाहत असून पावसाचा जोर असाच राहिल्यास कोणत्याही क्षणी पूर येण्याची शक्यता आहे.
↧
जयसिंगपुरात चोरट्यांचा धुमाकूळ
जयसिंगपूर शहरात सोमवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सहाव्या गल्लीत भाऊ प्लाझामध्ये दोन फ्लॅट फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा अडीच लाखाचा ऐवज लंपास केला. तर अन्य पाच ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.
↧
↧
लोटेवाडीची शाळा भरते मंदिरात
लोटेवाडी (ता. भुदरगड) येथील प्राथमिक शाळेला स्वतःच्या इमारतीत वर्ग खोल्या असतानाही स्थानिक ग्रामस्थांच्या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शिक्षणासाठी पडक्या मंदिराचा आधार घ्यावा लागत आहे.
↧
काँग्रेसचे लक्ष्य पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला, पण लोकसभा निवडणुकीत या बालेकिल्ल्याला महायुतीने भगदाड पाडल्याने काँग्रेस हादरली. विधानसभा निवडणुकीत तरी असा भूकंप होऊ नये यासाठी पक्षाचे नेते दक्ष झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या बालेकिल्ल्यात विशेष लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन केले आहे.
↧
पाणीटंचाई कायम
फिल्टर हाऊस शेजारी ना संरक्षक भिंत, ना पाणी शुध्दीकरणाची सुविधा, खराब झालेले व्हॉल्व, फिल्टर हाऊसचा आतील भाग ठिकठिकाणी उखडलेला हे चित्र आहे, पाचगाव येथील फिल्टर हाऊसचे. पाणी तपासणीकरिता लागणारी उपकरणेही मोजकीच आहेत. सध्या पंधरा दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो, तो ही पूर्ण शुध्दतेने होत नाही.
↧
कोल्हापूर: लो कॉस्ट विमानतळ
देशभरात ५० ठिकाणच्या छोट्या शहरांमध्ये २०० लो कॉस्ट विमानतळांची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा नागरी उड्डयन मंत्री जी. एम. सिद्धेवरा यांनी लोकसभेत सोमवारी केली. त्यात महाराष्ट्रातील पाच विमानतळांचा समावेश आहे. विकसित करण्यात येणाऱ्या या विमातळांमध्ये कोल्हापूरचाही समावेश असल्याने येथून लवकर टेक ऑफ होईल यावर शिक्कामोर्तब झाले.
↧
↧
कोल्हापूरमध्ये सीसीटीव्ही
कोल्हापूरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. डिसेंबर महिन्यात हे सीसीटीव्ही कार्यान्वित होतील, अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिली. अपघातातील जखमींना मदत करण्याऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
↧
कोल्हापूरचे 'चेरापुंजी'
एखाद्या दिवशी शंभराच्या पट्टीत पाऊस झाला तर जोरदार अतिवृष्टीची चर्चा होते..मात्र घनदाट गर्द हिरवीगार झाडी...दिवसा उजेडीही समोरचे काहीच दिसणार नाही असे दाट धुके....कडाक्याची बोचरी थंडी...घोंघावणारे वादळी वारे आणि यातच पूर्ण हंगामात एकसारखा कोसळणारा धुवांधार पाऊस असणाऱ्या दाजीपुरात रोजच अतिवृष्टी होत असल्याचे वास्तव आहे.
↧
विठ्ठलपूजेसाठी दहा पुजारी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हंगामी पुजारी म्हणून दहा जणांची नेमणूक करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. त्यामध्ये पाच ब्राह्मण, दोन गुरव, जंगम, शिंपी आणि कासार समाजातील प्रत्येकी एकाचा समावेश असेल, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी दिली.
↧
कडव्यातील वृद्धा ओढ्यात वाहून गेल्याची भीती
शाहूवाडी तालुक्याला दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपल्याने शेते व ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले होते. शेतातून गुरे घेऊन परतत असताना रेडकाला वाचविण्याच्या प्रयत्नात कडवे (ता. हातकणंगले) येथील हौसाबाई गणपती भालेकर (वय ६८) ही वृद्धा ओढ्यातून वाहून गेली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
↧
↧
'दत्त-शिरोळ' बिनविरोध
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा कारखान्याच्या सोमवारी (ता. २८) होणाऱ्या विशेष सभेत होणार आहे.
↧
रिपाईंला हव्या ३५ जागा
‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) हा केवळ बौद्धांचा नाही तर बहुजनांचा पक्ष आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी राज्यात ३५ जागा मागितल्या असून पश्चिम महाराष्ट्रात १५ तर कोल्हापूर जिल्ह्यात ४ जागांची मागणी केली आहे’ अशी माहिती आरपीआयचे प्रदेश सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी दिली.
↧
पोलिसांची व्हॉट्सअॅप हेल्पलाइन
कोल्हापूर पोलिस प्रशासनाने अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी व सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या समाजविघातक कृत्यांची माहिती देण्यासाठी व्हॉट्सअॅपवर हेल्पलाइन कार्यरत करण्यात आली आहे.
↧
नोकरदारांनी लाटले फ्लॅट
कोल्हापूर भोई समाज गृहनिर्माण संस्थेत मागासवर्गीय व दुर्बल घटकांसाठीचे निकष डावलून एक लाख रुपयांच्या पुढे उत्पन्न असणाऱ्या नोकरदार मंडळींनी फ्लॅट लाटले आहेत.
↧
↧
इथे फक्त ‘बाबां’चे राज्य
बिंदू चौक सबजेलमध्ये न्यायालयीन कोठडी दिलेल्या संशयितांना ठेवले जाते. या सबजेल भिंतीआडच्या व्यवहार व गैरव्यवहाराच्या सुरस कथा सतत चर्चेत असतात. फक्त संशयित म्हणून आरोपी असलेल्यांना इथे जनावरासारखी वागणूक दिली जात असल्याच्या लेखी तक्रारी यापूर्वी करण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जेलचं वास्तव अंतरंग आजपासून..
↧
मोबाइल जॅमर विरोधात आंदोलन
कळंबा मध्यवर्ती कारागृहात सुरक्षेच्या कारणास्तव मोबाइल जॅमर बसविला आहे. मात्र, त्याचा जेलच्या परिसरातील नागरिकांना संभाषणात अडथळा येत आहे. जॅमरमुळे आमचे मोबाइल ‘आउट ऑफ रेंज’ असल्याचा संदेश संपर्क करणाऱ्यांना मिळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
↧
शाहू विचारांची ज्ञानगंगा
मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमासाठी मदत केली जाते. संस्थेने मराठी, उर्दू माध्यमांच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. बहुजन समाजातील दुर्बल घटकांना अभ्यासासाठी ज्ञानाची दारे खुली केली.
↧
More Pages to Explore .....