सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ दिल्या जाणाऱ्या यंदाच्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली आहे.
समाजभूषण पुरस्कारांचे आज वितरण
↧
↧
शाहू जन्मस्थळाची मालकी खासगीच
कसबा बावडा येथील राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाची कागदोपत्री मालकी अद्याप छत्रपती शहाजी महाराज यांच्या नावावर दिसते. संबंधित जमिनीवर असणाऱ्या दोन विहिरी गायब झालेल्या आहेत. कोणतीही मोजणी किंवा विभाजन न करता या परिसराचा विकास सुरू असल्याचा आरोप प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
↧
शाहू लोकजीवनाचा खजिना अडगळीत
शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधनात केंद्रातील शाहू लोकजीवन म्युझियमसाठीच्या वस्तू गेली अनेक वर्षे अडगळीत पडल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात या म्युझियमसाठी मंजूर झालेला दहा कोटींचा निधी अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे आणखी काही वर्षे शाहू लोकजीवन म्युझियमसाठी वाट पाहावी लागणार आहे.
↧
पाटील,सावंत विजयी
आघाडीतील बंडखोरीने झालेल्या मतविभागणीमुळे पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदारकी कायम राखली. अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये पाटील यांनी दोन हजार ३८० मतांच्या फरकाने निसटता विजय मिळाला. शिक्षक मतदारसंघात पंढरपूरचे दत्तात्रय सावंत यांनी विजय मिळविला.
↧
...म्हणून कुस्तीचे नुकसान
मातीतील कुस्तीमुळे अनेक नामवंत पैलवान उदयास आले. मात्र बदलत्या तंत्रज्ञानामुळे मॅटवरील कुस्तीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. मॅटवरील मल्ल तयार होण्यासाठी मातीवरील कुस्ती खेळावीच लागणार आहे. पण दुर्दैवाने मैदाने भरवणाऱ्यांची संख्या कमी होत आहे.
↧
↧
राजर्षींना आज मुजरा
राजर्षी शाहू महाराजांच्या १४० व्या
जयंतीनिमित्त गुरूवारी (ता. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या
प्रमुख उपस्थितीत शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी सहा वाजता श्रीमंत शाहू
महाराज यांच्या हस्ते हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना शाहू पुरस्कार
पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
↧
शब्दप्रभूंचा ‘लोकराजा’
राजर्षी शाहू महाराज करवीर संस्थानचे राजे होते. मात्र, त्यांनी कारभार करताना संपूर्ण भारताचा विचार करून समाजाला नवी दिशा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सहकार, कृषी, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी उत्तुंग कामगिरी केली.
↧
पाइपलाइनला सप्टेंबरचा मुहूर्त
कोल्हापूरकरांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याची समजली जाणारी काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेची निविदा ४८८.७४ कोटी रुपयास निश्चित केली. महापालिका आणि हैदराबाद येथील जीकेसी प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीबरोबर गेल्या दोन दिवसांच्या चर्चेअंती बुधवारी यावर शिक्कामोर्तब झाले.
↧
कोयना धरणाने गाठला तळ
कोयना धरणातील पाणीसाठ्याने सध्या तळ गाठला असून, राज्यासमोर वीज आणि पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची भीती आहे. पाण्याअभावी चौथ्या टप्प्यातील तांबटवाडी विद्युतगृहातील वीजनिर्मिती थांबविण्यात आली आहे.
↧
↧
साधू-संतांची टोळी नाही
‘मराठा आरक्षणाची मागणी आम्ही केली नव्हती. ती अनेक वर्षांपासून होत होती. आता निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण दिले गेल्याने त्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो. ताकाला जाऊन भांडे लपवायला आम्ही काय साधू-संतांची टोळी आहे का?’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
↧
हत्ती मानवी वस्तीकडे
डोंगरात हिरव्या चाऱ्याची वानवा व पाणी स्त्रोत आटल्यामुळे भुदरगड तालुक्यात मागील एक महिन्यापासून हत्तींनी मानवी वस्तीत ठाण मांडले आहे. तालुक्यातील बेडीव, आरळगुंडी आदी भागांसह जंगल पायथ्याशी असणाऱ्या गावांच्या बरोबर शेत – शिवारात हत्ती राजरोस वावरू लागल्याने तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
↧
गावागावांत प्लास्टिकमुक्ती
जिल्हा परिषदेच्या निर्मल भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यास शाहू जयंतीचे औचित्य साधून गुरुवारी सुरवात झाली. प्रत्येक गावातील सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायती कार्यालयात गुरूवारी सकाळी निर्मलग्राम सप्ताहाचे नियोजन सांगून जनजागृती केली.
↧
बेचाळीस वर्षांनी घाट, मंदिरे खुली
मृग नक्षत्राने पाठ फिरवल्यानंतर आर्द्रा नक्षत्रातही कडकडीत ऊन पडल्याने पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावल्याने १९७२ च्या दुष्काळानंतर ४२ वर्षांनी प्रथमच सर्व घाट खुले झाले आहेत. नदीतील गाळ दिसू लागला असून, महापालिकेने गाळ काढण्याच्या मोहिमेला शुक्रवारी दुपारी सुरुवात केली आहे.
↧
↧
आरक्षण निर्णयाचे जल्लोषी स्वागत
राज्य सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के व मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाची घोषणा करून शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मराठा व मुस्लिम समाजातील विविध संघटनांच्यावतीने साखर पेढे वाटप, आतषबाजी तसेच मोटारसायकल रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला.
↧
कुस्ती संवर्धनासाठी हवा भरीव खुराक
‘शाहू महाराजांनी रुजवलेली लाल मातीतील कुस्ती टिकवण्यासाठी सरकारकडून वरवरचा नव्हे तर भरीव खुराक मिळाला पाहिजे,’ असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले. क्रिकेटला मिळणाऱ्या पाठिंब्याच्या दहा टक्के पाठिंबा जरी कुस्तीला मिळाला तर मोठे परिवर्तन घडू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
↧
लवकरच जातपडताळणी विकेंद्रीकरणाचा निर्णय
‘जातपडताळणी समितीचे विक्रेंद्रीकरण करण्यासाठी केंद्रीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती आपला अहवाल महिन्याभरात देईल. त्यानंतर समाजहित लक्षात घेऊन विकेंद्रीकरणाबाबत निर्णय घेतला जाईल,’ अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली.
↧
कर्तृत्ववान राजाचे चित्रमय दर्शन
रयत सुखी व्हावी म्हणून संस्थानात रस्त्यांचे जाळे निर्माण करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे आदेश व रस्ते बांधणी केलेले अंदाजपत्रक शाहू जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या दुर्मिळ छायाचित्रे व आदेशांच्या प्रदर्शनात मुख्य आकर्षण ठरले आहे.
↧
↧
विविध उपक्रमांनी शाहू जयंती
राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस शिवाजी विद्यापीठात पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.
↧
गुजरात मॉडेलने दिली तिलांजली
सामाजिक न्याय म्हणजे, न्यायालयाने न्याय निवाडा करण्याचा विषय नव्हे. सामाजिक न्याय या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत. उत्पादनाच्या समान वाटपावर तो घडत नाही. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे गुजरात मॉडेल हे आहे.
↧
शाहू विचारांचे नव्याने आकलन करा
राजर्षी शाहू महाराजांनी हिंदू-मुस्लिम ऐक्य जोपासले. जातीय विषमता, अस्पृश्यता नष्ट करण्याचे प्रयत्न केले. मात्र अजूनही जातीव्यवस्थेच्या चक्रातच समाज अडकला आहे.
↧
More Pages to Explore .....