पर्यटन व देवदर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये महिलांची असलेली वाढती संख्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने दहा ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत.
महिलांसाठी दहा स्वच्छतागृहे
↧
↧
नुकसानग्रस्तांसाठी पाच लाख जमा
समाजात शांतता प्रस्थापित व्हावी हा संदेश सर्वधर्मीयांच्यावतीने देण्यासाठी बुधवारी (ता. ११) दुपारी चार वाजता दसरा चौकातून शांतता फेरी काढण्यात येणार आहे. फेसबुकवर छत्रपती शिवरायांचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर झालेल्या दगडफेकीतील नुकसानग्रस्तांना रविवारी (दि. १५) मदतीचे वाटप केले जाईल.
↧
ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी गरज प्रयत्नांची
सुमारे सहा लाख लोकसंख्येच्या शहरात दरवर्षी जमा होणाऱ्या घनकचऱ्यातून चार हजार टन ई-कचरा तयार होतो. या ई-कचऱ्याची विल्हेवाट पर्यावरणपूरक पद्धतीने लावून त्यांच्या पुनर्वापरासाठी (रिसायकल्ड) महापालिकेने महालक्ष्मी ई रिसायकलर्स संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या प्रयत्नांना समाजाच्या पाठबळाची गरज आहे.
↧
जीवरक्षक कमांडो पथक सज्ज
कोणतेही संकट असो किंवा नैसर्गिक आपत्ती. रस्ते अपघात असो किंवा पूरस्थिती. प्रत्येक वेळी मदतीचासाठी व्हाईट आर्मी, जीवरक्षक दिनकर कांबळे, कॅप्टन उत्तम पाटील यांची संस्था पुढे सरसावतात.
↧
स्टेडियमवरील कार्यक्रम बंद करा
शिवाजी स्टेडियमची दुरवस्था फुटबॉल खेळल्यामुळे नव्हे तर, नियोजनाअभावी झाली आहे. मैदान सुरु झाल्यापासून येथे फुटबॉल खेळला जातो. ज्यावेळी फुटबॉल खेळला जात होता.
↧
↧
ऐन सुटीत स्वीमिंग टँक बंद
जिल्हा क्रीडा संकुलच्या जलतरण तलावाची पाणी फ्लिटर करणारी मोटर बंद पडल्याने गेल्या आठवड्यापासून शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलाव बंद आहे. तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी किमान आठवडा लागणार असल्याने ऐन सुटीच्या काळात विद्यार्थ्यांसह हौशी जलतरणपटूना पोहण्याच्या आनंदापासून दूर राहावे लागणार आहे.
↧
केएमटीच्या फेरीला वडापचा खोडा
एसटी स्टँडकडून येणाऱ्या प्रवाशांना शिवाजी पुतळ्यापर्यंत नेण्याच्या प्रयत्नात भाऊसिंगजी रोड व लुगडी ओळ या प्रचंड वर्दळीच्या रस्त्यावर केएमटी बसेसच्या दिवसभर तब्बल १०० फेऱ्या सुरु झाल्या आहेत. स्टँड, रेल्वे स्टेशनवरुन महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांसाठी केएमटीचा हा मार्ग योग्य आहे.
↧
भारनियमन आजपासून
महावितरणला मागणीइतकी वीज मिळत नसल्याने बुधवारपासून (ता. ११) पुन्हा राज्यभर भारनियमन सुरू करण्यात येत आहे. भारनियमन करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी वेळापत्रक तयार नसल्याने दिवसभरात कधीही २ ते ५ तासांचे भारनियमन केले जाणार आहे.
↧
रस्ते मूल्यांकन, समिती नियुक्त
शहरातील वादग्रस्त रस्ते प्रकल्पाचा खर्च भागवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रकल्पाच्या मूल्यांकनासाठी अखेर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने पाच सदस्यीय समिती स्थापन केली.
↧
↧
टोल चुकवण्यासाठी नव्या वाटा
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आयआरबीकडून टोल वसुलीच्या हालचाली सुरू असतानाच, शहरवासीय आणि वाहनधारकांना टोलमधून वाचविण्यासाठी महापालिकेने पर्यायी रस्ते निर्मितीचा प्रयत्न सुरू केला आहे.
↧
कोल्हापुरात आजपासून टोलवसुली
आयआरबीने बुधवारी दुपारनंतर शहरातील नऊही टोल नाक्याची डागडुजी करत टोलवसुलीसाठी सर्व यंत्रणा उभारली आहे. कर्मचारीही हजर केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पोलिस प्रशासनाने एसआरपीसह बंदोबस्त पुरविल्याने कोणत्याही क्षणी, कदाचित आजपासूनच (गुरुवार) टोल सुरू होण्याची शक्यता आहे.
↧
पत्नीव्रताची अनोखी कहाणी
पतीचा जीव परत आणणाऱ्या सावित्रीची कथा वर्षानुवर्षे आपण ऐकतो. त्याच निष्ठेने एखादा सत्यवानही आपल्या सावित्रीची सेवा करीत असल्याच्या घटनाही दिसतात. अपघातात डोळे गमावलेल्या पत्नीची गेल्या दोन वर्षांपासून सर्वार्थाने सेवा करणारे बाळासाहेब पोकर्णेकर त्यांपैकी एक.
↧
खुराड्यासारख्या घरांमध्ये काळोखाचे साम्राज्य
पोलिस मुख्यालयानंतर जुनी असलेली पोलिस वसाहत म्हणजे शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयासमोरील सोन्या मारूती चौक पोलिस लाइन. लहान खोल्या, शौचालयाची अडचण व अंधाऱ्यांच्या साम्राज्यामुळे ८४ खोल्यापैकी ५० हून अधिक खोल्या रिकाम्या आहेत.
↧
↧
धोकादायक इमारती उठल्या जिावावर
कमकुवत भिंती, स्लॅब पडण्याचा धोका, आणि ढासळणारी छपरे यांमुळे शहरातील ९१ इमारती धोकादायक बनल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाली आहे. मात्र गेल्यावर्षीच्या १४१ इमारतींपैकी दोन सोडल्यास महापालिकेने अन्य कोणतीही इमारत धोकादायक म्हणून उतवलेली नसल्याने महापालिकेकडूनच घोडे पेंड खात असल्याचे स्पष्ट होते.
↧
स्टेडियम बनले गैरकृत्यांचा अड्डा
शहरातील मैदानांची संख्या कमी असल्याने सकाळी व सायंकाळी फिरायल्या येणाऱ्या नागरिकांची प्रचंड कुचंबना होत आहे. आरक्षिीत जागेवर मैदानांची निर्मिती करण्यापेक्षा असा जागा बळकवण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो.
↧
अधिकाऱ्यांचे वेतन रोखावे
पे अॅड पार्किंगमधील भ्रष्टाचार, बोगस पावत्या करून अनधिकृतपणे केलेली वसुली, शहरातील खराब रस्ते, आणि सावित्राबाई फुले हॉस्पिटल व पंचगंगा हॉस्पिटलमधील सोयीसुविधा प्रकरणी नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजाचे चांगलेच वाभाडे काढले.
↧
एलबीटी की अन्य पर्याय?
एलबीटीप्रश्नी तोडगा काढण्यासाठी महापालिका गुरूवारी व्यापाऱ्यांशी चर्चा करणार आहे. व्यापाऱ्यांचा एलबीटीला विरोध आणि राज्य सरकारने याप्रश्नी निर्णय घेण्याविषयी महापालिकडे टोलविलेला चेंडू याचे पडसाद बुधवारच्या सर्वसाधारण सभेत उमटले.
↧
↧
गोकुळचे दूध दोन रुपयांनी महाग
गोकुळ दूध संघाने गाय आणि म्हैस दूध विक्रीदरात दोन रुपयांनी वाढ केली असून, खरेदी दरामध्ये दीड रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोकुळचे दूध पुणे आणि मुंबईत ५० रुपये लिटर तर कोल्हापूर परिसरात ४६ रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहे.
↧
परंपरा शाहूंच्या सर्वधर्मसमभावाची
कोल्हापूरची परंपरा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदू - मुस्लिम ऐक्याची आणि शाहू महाराजांच्या सर्वधर्मसमभावाची आहे. त्यामुळे या शहराला कधी जातीय दंगलीची बाधा झाली नाही आणि यापुढेही होणार नाही.
↧
प्रतीक्षा वसुलीच्या आदेशाची
टोल वसुलीसाठी आवश्यक सर्व यंत्रणांची उपलब्धता, प्रत्येक नाक्यावर कर्मचाऱ्यांची हजेरी, केबिनची केलेली डागडुजी आणि बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणा... मात्र सर्वांच्या नजरा टोल वसुलीच्या आदेशाकडे, असे चित्र गुरुवारी दिवसभर पाहावयास मिळाले.
↧
More Pages to Explore .....