कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे आणि महादेवराव महाडिक यांच्यात अखेर बुधवारी दिलजमाई झाली. गेल्या अनेक दिवसांपासून आमदार कोरे कोल्हापूर मतदारसंघाबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते.
महाडिकांनाही ‘जनसुराज्य शक्ती’
↧
↧
पात्राशिवाय साहित्य नसते
भालचंद्र नेमाडे यांच्या ‘देखणी’ या कवितासंग्रहातील ‘हे लांब लांब रस्ते’ या कवितेतील या ओळी आहेत. प्रत्येक व्यक्तीभोवती किती तरी माणसे असतात. सगळेच एकमेकांना ओळखत नसतात. अनोळख्या ठिकाणी गेलो की ओळखीचा कुणी आहे का, याचा शोध घेतला जातो.
↧
सच्चा कलावंत गेला
‘एकीकडे सिनेमा इंडस्ट्रीत येण्यासाठी करावा लागणार संघर्ष आणि दुसरीकडे या क्षेत्रात येण्यासाठी घरातून होत असलेला विरोध यातून मार्ग काढत अभिनय कौशल्यावर विश्वास ठेवून यशस्वी झालेल्या कुलदीप पवार यांच्या रूपाने एक सच्चा कलावंत आणि मोठ्या मनाचा माणूस गेला,’ अशा शब्दांत रंगकर्मींनी कुलदीप पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
↧
रेंट फॉर शूट...
सिनेमातील घर हे त्या सिनेमाच्या कथेनुरूप पडद्यावर येत असतं. गावाकडचा सिनेमा असेल तर छपराचं साधं घर आणि शहरातील कथेवर बेतलेला सिनेमा असेल तर पॉश बंगला दिसतो. सिनेमाला रिअल लूक यावा यासाठी निर्माते सेटऐवजी खऱ्याखुऱ्या घरालाच पसंती देतात.
↧
कोणता झेंडा घेऊ हाती?
‘इलेक्शन आलीया भाऊ...’ होय, अलीकडं सध्या बहुतांशी प्रश्नांची उत्तरं याच वाक्यावर येऊन थांबतात. मग ती चर्चा कुठंही रंगू दे. मंडळाचा कट्टा असो, तालमी असोत, कॉलेज कट्टा असो किंवा आणखी कुठंही. कॉलेज कॅम्पसमध्येही निवडणुकांचं वारं चांगलंच घोंगावताना दिसत आहे.
↧
↧
शांततेचा संदेश सात मिनिटांत
दहशतवादी कारवाया... अतिरेक्यांचे हल्ले, त्यात प्राण गमावणारी हजारो निष्पाप माणसं... रस्त्यावर येणारी कुटुंब या सगळ्याचं मूळ जगातील अशांतता आहे असं म्हणतो... त्यात काही खोटे आहे असेही नाही. जगातील शांतता प्रत्येकालाच हवी आहे. मुस्लिम राष्ट्रांमध्ये शांततेचं महत्व पटायला हवं असेल तर तिथे शिक्षणाचं बीज रूजलं पाहिजे.
↧
सुप्रिया म्हणतात, नाराजी सोडा
‘आपल्या घरचं कार्य असेल तर आपण कशा जबाबदाऱ्या वाटून घेतो, तहानभूक हरपून कार्यसिद्धीला जाईपर्यंत पायाला पानं बांधून काम करतो. मग यंदाची निवडणूक म्हणजे आपल्या पक्षाचं लग्न आहे असं समजा आणि मला कुणाचा फोनच आला नाही, मला कुणी निरोप दिला नाही.
↧
सांगलीला बसू लागल्या पाणीटंचाईच्या झळा
सांगली जिल्ह्यात सध्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. जिल्ह्यातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. चार दिवसांपूर्वी कृष्णा नदीचे पात्रही कोरडे पडले होते; पण कोयना धरणातून पाणी सोडल्याने नदीपात्रात पुन्हा पाणी आले आहे.sangali
↧
जेवणावळींना ‘घरगुती’ टच
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी शहरांसह ग्रामीण भागात जेवणावळींच्या पंगती उठू लागल्या आहेत. आचारसंहितेचा बडगा टाळण्यासाठी या जेवणावळींना घरगुती समारंभाचा टच देण्यात येत आहे.
↧
↧
‘सोशल’ प्रचार ‘बेकायदाच’
‘कुठंबी हुडीक मुन्ना महाडिक...’ ‘कोल्हापूरचा इरादा, संजयदादा...’ ‘वाजवा शिट्टी, फक्त शेट्टी’, ‘सगळे नेते गाठीशी, आवाडेंच्या पाठीशी,’ असा प्रचार आता घराघरात मतदारांच्या चर्चेचा बनला आहे.
↧
मुख्यमंत्र्यांसाठी व्यासपीठावर
‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आदर राखण्यासाठी मी सांगलीतील काँग्रेसच्या व्यासपीठावर गेलो होतो. माझे सहकारी कार्यकर्ते, हितचिंतकांशी विचारविनिमय करून माझ्या उमेदवारीबद्दलचा निर्णय घेईन,’ असे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार हाफीज धत्तुरे यांनी सांगितले.
↧
साथी हाथ बढाना
अपक्ष उमेदवार अॅड. वर्षा माडगूळकर यांनी मंगळवार तळ्यापासून पोवई नाक्यापर्यंत प्रदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधला. वाटेत रस्त्याच्या कामावरील मजुरांबरोबर खोरे घेऊन पाटीत माती भरत त्यांनी या कामगारांना आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले.
↧
‘बालेकिल्ल्यात’ पदयात्रा
उदयनराजे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या सातारा शहरातील पश्चिम भागात गुरुवारी राजेंनी पदयात्रा काढून प्रचार केला. राजेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सारा परिसर दणाणून टाकला. आमदार शिवेंद्रराजेदेखील या पदयात्रेत सहभागी झाले होते.
↧
↧
मोबाइल हॅन्डसेट बदलून देण्याचे आदेश
तक्रारदाराला मोबाइल हॅन्डसेट बदलून द्यावा, असा आदेश ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष संजय बोरवाल, सदस्य दिनेश गवळी, सौ. रूपाली घाटगे यांनी दिला. सुजित महादेवराव खाडे (रा. आझाद गल्ली, भाऊसिंगजी रोड) यांनी तक्रार दिली होती.
↧
‘सुटीच्या कालावधीत दाखले काढा’
विद्यार्थी व पालकांनी दहावी व बारावीनंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे प्रतिज्ञापत्र व दाखले एप्रिल व मे महिन्याच्या अगोदर काढून घ्यावेत, असे आवाहन तहसीलदार हनुमंतराव पाटील यांनी केले आहे.
↧
स्वत:ला ओळखायला शिका
स्वत:मधील राजेपण शोधणारे आणि त्यानंतर हयातभर सामान्यांतील राजेपण शोधण्याचा प्रयत्न करणारे सयाजीराव गायकवाड यांच्यासारख्या स्वाभिमानी प्रशासकाची आजच्या युगात नितांत गरज आहे.
↧
महालक्ष्मी रथोत्सवाची तयारी सुरू
श्री महालक्ष्मी रथोत्सवासाठी रथ स्वच्छता मोहिमेस गुरूवारपासून सुरूवात झाली. रथोत्सवासाठी नगरप्रदक्षिणा मार्गावर येणाऱ्या चांदीच्या रथाला पॉलिश करण्याचे कामही करण्यात येणार आहे.
↧
↧
संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्हीची नजर
हिंदू युवा प्रतिष्ठानच्यावतीने शहरातील चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. शिवाजी चौक, महालक्ष्मी मंदिर, उभा मारूती चौक व बिंदू चौक येथे हे कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती हिंदू युवा प्रतिष्ठानचे अशोक देसाई यांनी पत्रकार बैठकीत दिली.
↧
मंडलिक थेट महायुतीच्या व्यासपीठावर
महायुतीची उमेदवारी घेतलेल्या मुलाच्या प्रचारात पडद्याआडून सूत्रे हलवणाऱ्या खासदार सदाशिवराव मंडलिकांना शेवटी महायुतीच्या व्यासपीठावर उतरावे लागले.
↧
आपटेंच्या निवडीने राष्ट्रवादीला शह
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अखेर पी. एन. पाटील यांची समजूत काढत सतेज पाटील गटानेच बाजी मारली. अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोणालाही झुकते माप न देता आजरा तालुक्यात राष्ट्रवादीला शह देवून काँग्रेसला आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर उमेश आपटे यांना संधी देणे गरजेचे होते.
↧
More Pages to Explore .....