Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

डिझायनर ज्वेलरी शिकण्याची प्रजासत्ताक दिनी संधी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लग्नसराईचे दिवस आले की सगळीकडे दागिने, सजावट इत्यादी गोष्टींची रेलचेल चालू होते. प्रत्येकीला लग्नात आपण छान दिसावे असे वाटत असते. मग त्यासाठी डिझायनर साडी, ज्वेलरी असे एक ना अनेक पर्यायांचा विचार चालू होतो. अशा प्रकारची ज्वेलरी शिकण्याची संधी महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लबतर्फे वाचकांना मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनी (ता. २६ जानेवारी) सकाळी ११ ते १ या वेळेत राजारामपुरीतील दुसऱ्या गल्लीतील कलर १४ आर्ट गॅलरीत ही कार्यशाळा होणार आहे.

विविध समारंभात पारंपरिक ज्वेलरीच्या ठसकेपणातही वेगळेपण दाखवणारी ट्रेंडी डिझायनर ज्वेलरी परिधान करण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. अशा प्रकारची ज्वेलरी बनविण्याचे शिक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे रविवारी आयोजित केलेल्या या कार्यशाळेत सिल्क थ्रेड ज्वेलरी प्रकारातील साडी पिन, छल्ला, पैंजण आणि काही नावीन्यपूर्ण प्रकार शिकविण्यात येणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी येताना कात्री घेऊन यावी. इतर साहित्य आयोजकांकडून देण्यात येणार आहे. इच्छुकांनी कलर १४ आर्ट गॅलरीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात १७ दिवसांत तब्बल

$
0
0

Uddhav.Godase @timesgroup.com Tweet : Uddhavg_MT कोल्हापूर : एक ते १७ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात आले. अभियानादरम्यान १२१ अपघातांची नोंद झाली, तर १५जण ठार झाले. दीडशेहून अधिक लोक जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दक्षता घेण्याच्या काळातही अपघातांचे प्रमाण गंभीर बनत असल्याचे हे निदर्शक आहे. वाढत्या अपघातांमुळे प्रवास सुरक्षित करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. देशात वर्षभर होणारे दहशतवादी हल्ले आणि सीमेवर शत्रूसोबत होणाऱ्या चकमकींमध्ये शहीद होणाऱ्या जवानांपेक्षा अपघाती मृत्यूंची संख्या खुपच जास्त आहे. भरधाव वेग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी रोज एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतो. अपघातांची संख्या कमी होऊन प्रवास सुरक्षित

बनावा यासाठी पोलिस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी महामंडळाकडून दरवर्षी रस्ते सुरक्षा अभियान राबवले जाते. एक ते १७ जानेवारीदरम्यान विविध उपक्रमांनी जिल्ह्यात रस्ते सुरक्षा अभियान राबवले. प्रबोधन फेरी, वाहनधारकांना मार्गदर्शन, गांधीगिरी पद्धतीने नियम मोडणाऱ्या वाहन धारकांना आवाहन करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातही वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली. प्रत्यक्षात, रस्त्यांवर मात्र याचे नेमके काय परिणाम झाले? असा प्रश्न उपस्थित व्हावा असे अपघातांचे प्रमाण आहे. रस्ते सुरक्षा अभियानादरम्यान जिल्ह्यात १७ दिवसात लहान-मोठ्या १२१ अपघातांची नोंद झाली. गंभीर अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला, तर १६० लोक जखमी झाले. पुणे-बेंगलोर महामार्गावर गोकुळ शिरगावजवळ झालेल्या अपघातात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. गडहिंग्लज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. गगनबावड्यात खराब रस्त्यावर दुचाकी घसरून तरुण ठार झाला. चंदगडमध्ये उसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार झाला, तर तिघे जखमी झाले. हुपरीमध्ये उसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार झाली. कागलमध्ये रस्त्यातील खड्डा चुकवताना दुचाकीवरील तरुणाचा जीव गेला. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाच्या अपघातात तरुण ठार झाला. शहरात राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रतिनिधिक अपघातांमध्ये बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यांची दुरवस्था ही प्रमुख कारणे समोर आली आहेत. अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब उद्‌धवस्त होते. जखमींना आयुष्यभरासाठी अपंगत्व येऊ शकते. आयुष्याची पुंजी उपचारामध्ये खर्च होते. विशेष म्हणजे अपघाताची अनेक उदाहरणे रोजच आसपास दिसत असूनही वाहनधारकांना याचे गांभीर्य नाही. हेल्मेट वापरासही विरोध होतो. पोलिस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, आदी सर्व यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नातून प्रवास सुरक्षित बनू शकतो. वाहनधारकांच्या स्वयंशिस्तीसह रस्ते सुस्थितीत

ठेवणे, आवश्यक ठिकाणी सूचनाफलक लावणे, ट्रॅफिक सिग्नल, पांढरे पट्टे, स्पीड ब्रेकर, सदोष वाहनांवरील कारवाया

यातून अपघातांची संख्या कमी होऊ शकते. मात्र, यासाठी इच्छाशक्ती गरजेची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजीचा बागुलबुवा पळवणारा अवलिया शिक्षक

$
0
0

लोगो : प्रयोगशील शिक्षणाची दिशा

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet@aunradhakadamMT

कोल्हापूर : मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी असलेला बागुलबुवा इतका आहे की त्यामुळेच त्यांच्यात ही जगाची भाषा बोलण्याचा आत्मविश्वास येत नाही. इंग्रजी सोपी करून शिकवली तर मुलांना त्याची गोडी लागेल आणि भीतीपेक्षा या भाषेसोबत त्यांची मैत्री होईल. या विचाराला कृतीची जोड देत कोल्हापुरातील मंगळवार पेठेत राहणारे कृपाल यादव हे अवलिया शिक्षक गेल्या ९ वर्षांपासून इन्स्पायरिंग यंग इंडिया या उपक्रमातून महापालिका शाळेतील मुलांना इंग्रजी शिकवत आहेत. त्यासाठी यादव यांनी आजवर २५० मोफत कार्यशाळा घेतल्या आहेत.

मोरेवाडी येथील शांतिनिकेतन स्कूल येथे इंग्रजी विषय शिकवणाऱ्या कृपाल यादव यांना २०११ मध्ये ही कल्पना सुचली. शिक्षण क्षेत्राचे विद्यार्थी असताना ग्रामीण भागात सराव पाठ घेताना त्यांच्या लक्षात आले की जिल्हा परिषद, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शिक्षित पालकांची नाही. अनेक आर्थिक अडचणींतून मार्ग काढत ही मुलं शाळेत येतात. त्यातच भविष्यातील स्पर्धेला तोंड देण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्वाची गरज असूनही या मुलांच्या मनातील इंग्रजीची भीती त्यांना या भाषेपासून दूर नेते. तेव्हाच यादव यांच्या मनात या प्रयोगशील उपक्रमाची सुरूवात झाली. स्वत:ची नोकरी सांभाळून उर्वरित वेळेत यादव यांनी त्यांच्या प्रयोगासाठी आठवड्यातील काही वेळ बाजूला काढला.

शिकवण्याच्या प्रचलित पद्धतीला फाटा देत यादव यांनी खेळ, कोडी, दैनंदिन जीवनातील शब्द, क्रिया यातून इंग्रजी भाषा शिकण्याची पद्धत तयार केली आहे. इंग्रजीची भीती मनातून जावी, मुलांना इंग्रजीतून संभाषण करता यावे, इंग्रजीतून कार्यालयीन काम, पत्रव्यवहार, संवाद याची समज यावी यासाठी यादव काम करतात. त्यासाठी लागणारे साहित्य यादव यांनी सुरूवातीच्या टप्प्यात स्वखर्चातून जमा केले. महापालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन त्यांनी मोफत कार्यशाळा सुरू केल्या.

कार्यशाळेच्या निमित्ताने शाळांमध्ये गेल्यावर, मुलांशी संवाद साधल्यावर यादव यांच्या लक्षात आले की अनेक मुलांकडे शालेय साहित्य नाही. घरातून आणण्यासाठी पैसे नाहीत. शाळांचीही यासाठी आर्थिक क्षमता नाही. त्यासाठी यादव यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करून मित्रपरिवाराला मदतीचे आवाहन केले. यादव यांच्या मोफत उपक्रमशील प्रयोगाची माहिती झाल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून शालेय साहित्याची मदत उभी राहिली. त्यातून मोफत कार्यशाळेत इंग्रजी शिकण्यासाठी येणाऱ्या गरीब मुलांना शालेय साहित्य वाटण्यात आले. आजपर्यंत यादव यांनी पाच हजार गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेच्या ज्ञानासोबत शालेय साहित्याचीही मदत केली आहे. यादव यांच्या कार्यशाळेत दहा हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा अवगत केली आहे. यादव यांनी एमए, बीएड या पदवीसह स्कूल मॅनेजमेंट या विषयात पदविका शिक्षण घेतले आहे. तसेच हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल्स मॅनेजमेंट या विषयातही ते तज्ज्ञ आहेत.

इंग्रजी भाषा ही भविष्यात अत्यंत महत्त्वाची आहे. जगाची भाषा अशी ओळख असलेल्या या भाषेला आपण नाकारून चालणार नाही. शिक्षणाचे माध्यम कोणतेही असले तरी इंग्रजी भाषा आली पाहिजे. महापालिकेच्या शाळांमधील मुलांना इंग्रजी ज्ञान योग्य पद्धतीने मिळत नसल्याने त्यांना इंग्रजी शिकण्याचीच भीती वाटते. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा अडथळा असल्याचे लक्षात आल्यामुळे या प्रयोगशील उपक्रमाला सुरूवात केली. यातून मला शिक्षक म्हणून खूप वेगळे समाधान मिळते.

- कृपाल यादव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा मंगळवारी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी भाजपच्यावतीने मंगळवारी (ता.२८) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली. संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या मोर्चात समविचारी पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केली. वीस हजार शेतकरी मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

घाटगे म्हणाले, 'राज्य सरकारने २१ डिसेंबर रोजी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. कर्जमाफीसाठी लावलेले निकष चुकीचे असून त्यामधील त्रुटी दूर कराव्यात. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, अशी घोषणा सरकारमधील नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली होती. त्यामुळे राज्य सरकारला या घोषणेची आठवण करुन देण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. कर्जमाफीत दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला असून दोन लाखापेक्षा जास्त कर्जाविषयी अध्यादेशात उल्लेख नाही. दोन लाखापेक्षा जास्त असलेले आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे. पश्चिम महाराष्ट्रात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी संख्या जास्त असून त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. महापूर, अतिवृष्टी, पूर पट्ट्यातील शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. त्यांना सरकारने न्याय द्यावा. सहकारी संस्थांतील ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एकत्रित दरमहा पगार २५ हजारपेक्षा जास्त आहे, त्यांनाही कर्जमाफीचा लाभ झाला पाहिजे. मायक्रोफायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेल्या व थकीत पूरग्रस्त भागातील महिलांचे कर्जही माफ व्हावे'.

पत्रकार परिषदेला प्रदेश सचिव सुरेश हाळवणकर, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक, हिंदूराव शेळके, बाबा देसाई उपस्थित होते.

...

३१ हजार कोटी रुपये आले कोठून ?

राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असे सांगितले असून ही आकडेवारी कोणत्या आधारावर काढली, असा प्रश्न सुरेश हाळवणकर यांनी उपस्थित केला. राज्यातील बहुतांशी बँका या सत्ताधारी पक्षाकडे असल्याने बँकांचा फायदा करण्यासाठी आकडेवारी काढली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकांचे भले होणार आहे पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल का? याबाबत शंका वाटते, असेही ते म्हणाले. आसाम व्यतिरिक्त देशात कोणत्याही राज्यात एनआरसी कायदा लागू होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन वर्षात कमी वजनाच्या ६ हजारांवर मुलांचा जन्म

$
0
0

फाइल फोटो

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर

जिल्ह्यासह राज्यातील गर्भवती महिलांच्या आरोग्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत असून गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात ६ हजार ५२१ बालकांचे वजन जन्मत:च अत्यल्प म्हणजेच अडीच किलोपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. तर राज्यात कमी वजनाच्या ३ लाख १४ हजार ११२ बालकांनी जन्म घेतला आहे. जन्मतः अडीच किलोपेक्षा कमी वजनाच्या बालकांच्या संख्येत होणारी वाढ बाळाच्या वाढीसाठी घातक ठरते. या सर्व बाबींचा विचार करता गरोदरपणात महिलांना पोषक आहार मिळत नसल्याचे वास्तव चित्र स्पष्ट झाले आहे.

महिलेची प्रसूती झाल्यानंतर जन्मलेल्या बाळाचे वजन कमी असण्यामागे आईला होणारा पोषक आहाराचा अभाव हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. कमी वयात लग्न होणे, दोन मुलामंधील अंतर कमी असणे, यासह अन्य कारणांमुळे मुलांचे वजन कमी भरते. अलिकडे सरकारच्या माध्यमातून रुग्णालयातच बाळंतपण व्हावे यासंबंधी जनजागृती होत असली तरी मातेच्या आरोग्याबाबत अजूनही सजगता आल्याचे दिसत नाही. महिलेच्या गर्भधारणेपासून बाळाची दोन वर्षांपर्यंत होणारी वाढ या कालावधीत त्याचे आरोग्य पोषण आणि लसीकरणाकडे होत असलेले दुर्लक्ष बाळाच्या जीवावर बेतू शकते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरातही गर्भवती मातेच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. गर्भधारणेचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यासाठी गर्भधारणेच्या काळात लसीकरण व मातेच्या आहाराकडे लक्ष दिले जाण्याची गरज आहे.

याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्नेहा मोरे म्हणाल्या, 'जन्मताच बाळाचे वजन कमी असू नये यासाठी मातेने गरोदरपणात अधिक काळजी घ्यावी यासाठी रक्तक्षयाची तपासणी महत्त्वाची ठरते. गर्भधारणेच्या कालावधीत नियमित तपासण्या करून घ्याव्यात. रक्तक्षयाची समस्या असल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने फॉलिक अॅसिड व लोह असणाऱ्या गोळ्या सुरू कराव्यात. आहारातून जीवनसत्वे, लोह, प्रथिने असे घटक मिळतील याकडे लक्ष द्यावे. प्रसूतीसाठी दवाखान्यात नोंदणी करणे महत्त्वाचे ठरते.'

...

वजन कमी असल्यास

काय काळजी घ्यावी?

आईने बाळाला स्तनपान नीट काळजीने करावे. स्तनपान दर दोन तासांनी (थोड्या अंतराने) करावे. कारण बाळ अशक्त असल्यास अधिक वेळ स्तनपान घेऊ शकत नाही. तसेच त्याला कमीत कमी हाताळावे व त्याचे धुळीपासून संरक्षण करावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत.

...

कोट

'कमी वजनाचे बाळ जन्माला येण्यामागे बदलती जीवनशैली, अपुरा पोषण आहार, व्यायामाचा अभाव, बैठी कामे आणि व्यसनाधिनता ही मुख्य कारणे आहेत. गर्भाशयातील गर्भजल कमी झाल्याने बाळाच्या वजनावर त्याचा परिणाम होतो. कमी वजनाच्या बाळाचे संगोपन करणे पालकांच्या दृष्टीने जिकिरीचे जाते. त्यासाठी गर्भधारणेच्या काळातच विशेष काळजी घ्यावी.

डॉ. सतीश पत्की, बालरोगतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेचा कर्मचाऱ्यांमुळे लौकिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्य आणि देश पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त केले. या कार्यात कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच जिल्हा परिषदेच्या लौकिकात भर पडली,' असे गौरवोद्गार अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले.

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी, प्राथमिक शिक्षक बँक व जि.प. कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष पाटील बोलत होते. राजर्षी शाहू सभागृह येथे कार्यक्रम झाला.

पाटील म्हणाले, 'राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कर्मचारी पार पाडतात. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून त्यांचे हक्क, सेवा, सरकारकडून मिळणाऱ्या विविध सुविधांची इत्थंभूत माहिती मिळण्यास मदत होणार आहे.' उपाध्यक्ष सतीश पाटील, सदस्य भगवान पाटील यांनी जि.प.च्या उपक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग वाखाणण्याजोगे असल्याचे नमूद केले.

दिनदर्शिकेचे संकल्पक व सोसायटीचे संचालक महावीर सोळांकुरे म्हणाले, 'कर्मचाऱ्यांना सेवा व कर्तव्याची माहिती मिळाली पाहिजे. दिनदर्शिकेच्या माध्यमातून सेवापुस्तिका, मिळणारे भत्ते, कालबद्ध पदोन्नती गट, विमा व्यवसाय आदीबांबत मार्गदर्शन होणार आहे.'

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे, शिक्षक समितीचे कृष्णात कारंडे, शिक्षक बँकेचे चेअरमन नामदेव रेपे, आदींनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे चेअरमन राजीव परीट यांनी प्रास्ताविक केले. एम. आर.पाटील, एम, एम. पाटील, सुजाता सोलनकर, प्रकाश पाटील, संजय अवघडे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला सभापती हंबीरराव पाटील, सभापती डॉ. पद्माराणी पाटील, सभापती स्वाती सासने, सभापती प्रवीण यादव प्रमुख उपस्थिती होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावी परीक्षेवर बहिष्काराचा निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रलंबित विविध मागण्यांसाठी राज्य विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन कृती समितीतर्फे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटना पदाधिकाऱ्यांनी शासकीय परिपत्रकाची होळी केली. बारावी बोर्ड परीक्षा कामकाज व पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

संघटनेच्यावतीने यापूर्वी अडीचशेपेक्षा जास्त आंदोलने केली, परंतु सरकारकडून आश्वासनापलीकडे काहीच मिळालेले नाही. बिनपगारी १८ वर्षे काम करणाऱ्या शिक्षकांना अनुदान मिळावे व अनुदान पात्रता निकषासाठी बारावी परीक्षा शंभर टक्के निकालाची अट शिथिल करावी, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. यामुळेच बारावी बोर्ड परीक्षा कामकाजावर बहिष्कार घालण्यात आला असून यात एक हजार शिक्षक सहभागी होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

आंदोलनात राज्य कार्याध्यक्ष आर.एम.माळी, जिल्हाध्यक्ष बी.एस.बरगे, सांगली जिल्हाध्यक्ष जे. एस. सातपुते, सातारा जिल्हाध्यक्ष पी. जी. लोहार, जयसिंग जाधव, वनिता जाधव, पुष्पा पवार यांच्यासह कोल्हापूर,सांगली व सातारा जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरू शोध समितीवर डॉ. अश्विनकुमार नांगिया

$
0
0

कोल्हापूर

शिवाजी विद्यीपीठाच्या कुलगुरू नियुक्ती प्रक्रियेअंतर्गत राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात येणाऱ्या कुलगुरू शोध समितीमध्ये पुणे येथील नॅशनल केमिकल लॅबारेटरीचे संचालक डॉ. अश्विनकुमार नांगिया यांचे नाव निश्चित करण्यात आले. शिवाजी विद्यापीठात गुरूवारी व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषद यांच्या संयुक्त बैठकीत डॉ.नांगिया यांच्या नावाला दोन्ही परिषदेच्या सदस्यांनी मान्यता दिली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची कुलगुरू पदाची पंचवार्षिक मुदत जून २०२० ला समाप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नव्या कुलगुरू निवड प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीमार्फत पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. या समितीमध्ये एका सदस्याचे नाव निश्चित करण्यासाठी व्यवस्थापन व विद्यापरिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रकुलगुरू डॉ.डी. टी.शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही.डी.नांदवडेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात ३१ जानेवारीपर्यंतबंदी आदेश

$
0
0

कोल्हापूर

विविध पक्ष, संघटनांनी पुकारलेला महाराष्ट्र, भारत बंद तसेच प्रजासत्ताक दिनी विविध मागण्यांसंदर्भात काढण्यात येणारे मोर्चे, रॅली, उपोषण, आत्मदहन, धरणे आंदोलन होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभारी अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी ३१ जानेवारीपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे. या कालावधीत शस्त्रे, बंदुका, सोटा, तलवारी, भाले, सुऱ्या लाठी अगर काठी किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशा कोणत्याही वस्तू बरोबर नेऊ नयेत. कोणताही ज्वालाग्राही पदार्थ अगर स्फोटके पदार्थ वाहून नेण्यावर निर्बंध घातले आहेत. व्यक्ती अगर त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन, दहन करणे, सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करणे तसेच असभ्य हावभाव करता येणार नाही. पाच अगर याहून अधिक लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, सभा घेता येणार नाही. बंदी आदेशातून पोलिस ठाण्यातून परवाना घेतलेले कार्यक्रम, सर्व जातीधर्मांचे सण, उत्सव, जयंती, यात्रांना वगळण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खचलेल्या रिंगरोड रस्त्याच्या कामाला गती

$
0
0

मटा इम्पॅक्ट म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे कोगे - कुडित्रे (ता. करवीर) यांदरम्यानचा रिंगरोड रस्ता वळणावरच पावसाळ्यात खचला होता. या रस्त्याच्या तत्काळ दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष होते. त्यानंतर 'महाराष्ट्र टाइम्स'ने २५ नोव्हेंबर २०१९ रोजी 'कुडित्रे रिंगरोड धोकादायक' या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध करून धोकादायक वाहतुकीकडे लक्ष वेधले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत दुरुस्तीच्या सूचना संबंधित ठेकेदाराला केली. आता संबंधित ठेकेदाराने गेल्या दोन आठवड्यापासून खचलेल्या धोकादायक वळणावरील रस्त्याच्या दुरुस्तीला गती दिली आहे. शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यासाठी शहराभोवती असलेल्या २३ गावांतून रिंगरोड करण्याचे काम सुरू आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील जाजल पेट्रोल पंप, कणेरी, गिरगाव, नंदवाळ, वाशी, महे, कोगे, कुडित्रे फॅक्टरी, वाकरे फाटा, खुपिरे, यवलूज, वरणगे, केर्ली, निगवे, टोप, नागाव, मौजे वडगाव, हेर्ले, रुकडी फाटा, रुकडी बंधारा, चिंचवाड, वसगडे, सांगवडे, हलसवडे, विकासवाडी परत जाजल पेट्रोल पंप असा रिंगरोड मार्ग आहे. रिंगरोड अंतर्गत कोगे-कुडित्रे दरम्यान सुरू असलेल्या नदीकाठाजवळचा वळणावरचा भराव महापुरामुळे पावसाळ्यात तुटून गेला. नदीकडील बाजूला कोगे धरणापासून कुडित्रेकडे असणाऱ्या नागमोडी वळणापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी कॉंक्रिटचे लहान फुटिंग (भिंत) व दगडी पिचिंगचे काम करूनही पावसाळ्यात हे पिचिंग व भराव खचून गेल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीची समस्या गंभीर बनली होती. त्यामुळे अत्यंत दर्जेदार अशा रस्ता बांधकामाची येथे गरज आहे. शिवाय या मार्गावरून कुंभी, डी. वाय. पाटील, दालमिया, राजाराम आदी कारखान्यांची वाहतूक सुरू आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खचलेल्या वळणावरील भागातील सर्व भराव बाजूला काढून मजबूत दगडी काँक्रिटसह भिंत, झाळीसह पिचिंगचे काम गतीने सुरू आहे. हे काम चालू असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग करून देण्यात आला आहे. फोटो : कोगे - कुडित्रे (ता. करवीर) दरम्यानचा वळणावरच्या खचलेल्या रिंगरोड रस्त्याचे सुरू असलेली दुरुस्ती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदगडला विद्यार्थी बनले पृथ्वीरक्षक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

चंदगड येथील दी न्यू इंग्लिश स्कूलमधील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी पृथ्वीरक्षणाची शपथ घेतली. महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये विद्यालयातील सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

टी. टी. बेरडे म्हणाले, 'मानवाचे पर्यावरणावर अतिक्रमण होत असून हे माणसाला विनाशाकडे नेणारे आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे पृथ्वीचे तापमान झपाट्याने वाढत असल्याने पृथ्वीला धोका निर्माण झाला आहे. भविष्यातील धोका ओळखून मानवाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी आतापासून ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. छोट्या-छोट्या गोष्टीतून पर्यावरण संवर्धन करावे.'

प्राचार्य व्ही. जी. तुपारे यांनी पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी कार्य करावे असे आवाहन केले. एम. व्ही. कानूरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शपथ दिली. न्यू इंग्लिश स्कूल, न. भु. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य ए. जी. बोकडे, पर्यवेक्षक एस. आर. देवण यांनी उपक्रमासाठी पुढाकार घेतला. सहा. शिक्षक एस. जी. सातवणेकर, एम. एल. कांबळे, आर. पी. पाटील, टी. एस. चांदेकर, जे. जी. पाटील, एस. जी. साबळे, डी. जी. पाटील, एस. जे. शिंदे, टी. व्ही. खंदाळे, व्ही. के. पाटील, सौ. पी. एस. सुतार, व्ही. के. गावडे, एस. व्ही. तुपारे, व्ही. एस. शिंदे आदींसह विद्यार्थी उपस्थित होत्या.

फोटो

चंदगड येथील दी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी पृथ्वीरक्षणाची शपथ घेतली. यावेळी उपस्थित शिक्षक, विद्यार्थी.

14-1-20-2- शिक्षक एम. व्ही. कानुरकर पृथ्वीरक्षणाची शपथ देताना.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिघांची युती अभेद्य राहणार

$
0
0

गोकुळ लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांची युती अभेद्य आहे. तिघांनी सत्ताधारी आणि विरोधी पॅनेलला समान पातळीवर ठेवले आहे. निवडणुकीत तिघेही एकाच पॅनेलमधून लढणार असल्याचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी स्पष्ट केले आहे.

पाटील, डोंगळे आणि चुयेकर यांनी स्वतंत्र्यपणे निवडणुकीसाठी ठराव दाखल करुन सत्ताधारी आघाडीविरोधात बंड केले. पण दोन दिवसांनी बुधवारी डोंगळे गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात तळ ठोकून होते. त्यांनी अध्यक्ष रवींद्र आपटे यांची भेट घेतली. त्यामुळे डोंगळे स्वगृही परतल्याची चर्चा होती. पण त्याबाबत डोंगळे यांनी खुलासा करत आपण स्वगृही परतलो नसून तिघांची युती अभेद्य असल्याचा दावा केला. बुधवारी ठराव दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. त्यामुळे शिल्लक ठराव वेळेत दाखल व्हावे, यासाठी गोकुळमध्ये दिवसभर थांबून होतो, असे त्यांनी सांगितले.

गोकुळमधील कामकाज, दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय याबाबत वैचारिक मतभेद असल्याने आम्ही तिघांनी सवता सुभा केल्याचे डोंगळे यांनी सांगितले. ते म्हणाले, 'सहा महिन्यांपूर्वी मी मल्टिस्टेटला विरोध केला होता. तसेच अध्यक्षांसह सर्व संचालकांनी गोकुळची वाहने वापरण्याचे बंद करावे, अशी सूचना केली होती. निवडणूक प्रक्रियेस अजून दीड महिना बाकी असून त्यावेळी तिघे एकत्र बसून निर्णय घेणार आहे. तसेच आमचा अजेंडाही त्यावेळी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होईल. पण आम्ही तिघेही एकत्र निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

....

मंत्र्याच्या बैठकीनंतर होणार निर्णय

सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात आघाडी उभारण्याचा निर्णय पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ घेणार आहेत. पालकमंत्री शुक्रवारी कोल्हापुरात येणार असून पुढील दोन दिवसात त्यांची आणि मुश्रीफांची भेट होण्याची शक्यता आहे. खासदार प्रा. संजय मंडलिक विरोधी आघाडीसाठी जुळवाजुळव करत आहेत. दोन्ही मंत्र्यांच्या बैठकीनंतर विरोधी आघाडी आकारास येणार आहे. निवडणूक कार्यक्रम मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार असून त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अर्ज भरल्यानंतर पॅनेल आकारास येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरशिवाजी विद्यीपीठाच्या कुलगुरू

$
0
0

कोल्हापूर

शिवाजी विद्यीपीठाच्या कुलगुरू नियुक्ती प्रक्रियेअंतर्गत राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात येणाऱ्या कुलगुरू शोध समितीमध्ये पुणे येथील नॅशनल केमिकल लॅबारेटरीचे संचालक डॉ. अश्विनकुमार नांगिया यांचे नाव निश्चित करण्यात आले. शिवाजी विद्यापीठात गुरूवारी व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषद यांच्या संयुक्त बैठकीत डॉ.नांगिया यांच्या नावाला दोन्ही परिषदेच्या सदस्यांनी मान्यता दिली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची कुलगुरू पदाची पंचवार्षिक मुदत जून २०२० ला समाप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नव्या कुलगुरू निवड प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीमार्फत पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. या समितीमध्ये एका सदस्याचे नाव निश्चित करण्यासाठी व्यवस्थापन व विद्यापरिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रकुलगुरू डॉ.डी. टी.शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही.डी.नांदवडेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यम को ऑप. सोसायटीची निवडणूक बिनविरोध

$
0
0

सिंगल फोटो आहेत...

...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर उद्यम को ऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. आमदार चंद्रकांत जाधव आणि विद्यमान अध्यक्ष प्रकाश चरणे यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न केले.

निवडणुकीसाठी सर्वसाधारण गटातून सात जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात होते. गुरुवारी शेवटच्या दिवशी दहाजणांनी माघार घेतली. महिला राखीव मतदार गटातून दोन जागांसाठी तिघांनी अर्ज भरले होते. एका महिलेने माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. इतर मागासवर्गीय गटात दोघांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

विजयी उमेदवार असे: सर्वसाधारण गट: आमदार चंद्रकांत जाधव, संजय अंगडी, चंद्रकांत चोरगे, हिंदुराव कामते, नितीन वाडीकर, अशोक जाधव, माणिक सातवेकर. महिला राखीव: संगीता नलवडे, दिप्तेजा निकम, इतर मागासवर्गीय: अशोक सुतार, अनुसुचित जाती जमाती: राजन सातपुते, भटक्या जमाती: चंद्रकांत मुळे. सोसायटी मतदारसंघ: दिनेश बुधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायकवडी यांना पीएचडी

$
0
0

कोल्हापूर

येथील न्यू कॉलेजमधील मराठी विषयाच्या प्रा. मनीषा माने-नायकवडी यांना शिवाजी विद्यापीठाने मराठी विषयातील पीएचडी पदवी प्रदान केली. त्यांनी, 'महात्मा जोतीराव फुले यांच्या चरित्रग्रंथांचा अभ्यास' या विषयावरील संशोधन प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता. माजी प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा प्रबंध सादर केला. मनीषा नायकवडी यांनी मराठी विषयातून सेट, नेट तसेच संगीत विशारद, संगीत अलंकार, एम. ए. ( शास्त्रीय संगीत),एम.एड. या पदव्या संपादित केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात १७ दिवसांत तब्बल

$
0
0

Uddhav.Godase @timesgroup.com Tweet : Uddhavg_MT कोल्हापूर : एक ते १७ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात आले. अभियानादरम्यान १२१ अपघातांची नोंद झाली, तर १५जण ठार झाले. दीडशेहून अधिक लोक जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दक्षता घेण्याच्या काळातही अपघातांचे प्रमाण गंभीर बनत असल्याचे हे निदर्शक आहे. वाढत्या अपघातांमुळे प्रवास सुरक्षित करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. देशात वर्षभर होणारे दहशतवादी हल्ले आणि सीमेवर शत्रूसोबत होणाऱ्या चकमकींमध्ये शहीद होणाऱ्या जवानांपेक्षा अपघाती मृत्यूंची संख्या खुपच जास्त आहे. भरधाव वेग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी रोज एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतो. अपघातांची संख्या कमी होऊन प्रवास सुरक्षित

बनावा यासाठी पोलिस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी महामंडळाकडून दरवर्षी रस्ते सुरक्षा अभियान राबवले जाते. एक ते १७ जानेवारीदरम्यान विविध उपक्रमांनी जिल्ह्यात रस्ते सुरक्षा अभियान राबवले. प्रबोधन फेरी, वाहनधारकांना मार्गदर्शन, गांधीगिरी पद्धतीने नियम मोडणाऱ्या वाहन धारकांना आवाहन करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातही वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली. प्रत्यक्षात, रस्त्यांवर मात्र याचे नेमके काय परिणाम झाले? असा प्रश्न उपस्थित व्हावा असे अपघातांचे प्रमाण आहे. रस्ते सुरक्षा अभियानादरम्यान जिल्ह्यात १७ दिवसात लहान-मोठ्या १२१ अपघातांची नोंद झाली. गंभीर अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला, तर १६० लोक जखमी झाले. पुणे-बेंगलोर महामार्गावर गोकुळ शिरगावजवळ झालेल्या अपघातात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. गडहिंग्लज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. गगनबावड्यात खराब रस्त्यावर दुचाकी घसरून तरुण ठार झाला. चंदगडमध्ये उसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार झाला, तर तिघे जखमी झाले. हुपरीमध्ये उसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार झाली. कागलमध्ये रस्त्यातील खड्डा चुकवताना दुचाकीवरील तरुणाचा जीव गेला. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाच्या अपघातात तरुण ठार झाला. शहरात राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रतिनिधिक अपघातांमध्ये बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यांची दुरवस्था ही प्रमुख कारणे समोर आली आहेत. अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब उद्‌धवस्त होते. जखमींना आयुष्यभरासाठी अपंगत्व येऊ शकते. आयुष्याची पुंजी उपचारामध्ये खर्च होते. विशेष म्हणजे अपघाताची अनेक उदाहरणे रोजच आसपास दिसत असूनही वाहनधारकांना याचे गांभीर्य नाही. हेल्मेट वापरासही विरोध होतो. पोलिस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, आदी सर्व यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नातून प्रवास सुरक्षित बनू शकतो. वाहनधारकांच्या स्वयंशिस्तीसह रस्ते सुस्थितीत

ठेवणे, आवश्यक ठिकाणी सूचनाफलक लावणे, ट्रॅफिक सिग्नल, पांढरे पट्टे, स्पीड ब्रेकर, सदोष वाहनांवरील कारवाया

यातून अपघातांची संख्या कमी होऊ शकते. मात्र, यासाठी इच्छाशक्ती गरजेची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेचा कर्मचाऱ्यांमुळे लौकिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्य आणि देश पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त केले. या कार्यात कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच जिल्हा परिषदेच्या लौकिकात भर पडली,' असे गौरवोद्गार अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले.

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी, प्राथमिक शिक्षक बँक व जि.प. कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष पाटील बोलत होते. राजर्षी शाहू सभागृह येथे कार्यक्रम झाला.

पाटील म्हणाले, 'राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कर्मचारी पार पाडतात. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून त्यांचे हक्क, सेवा, सरकारकडून मिळणाऱ्या विविध सुविधांची इत्थंभूत माहिती मिळण्यास मदत होणार आहे.' उपाध्यक्ष सतीश पाटील, सदस्य भगवान पाटील यांनी जि.प.च्या उपक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग वाखाणण्याजोगे असल्याचे नमूद केले.

दिनदर्शिकेचे संकल्पक व सोसायटीचे संचालक महावीर सोळांकुरे म्हणाले, 'कर्मचाऱ्यांना सेवा व कर्तव्याची माहिती मिळाली पाहिजे. दिनदर्शिकेच्या माध्यमातून सेवापुस्तिका, मिळणारे भत्ते, कालबद्ध पदोन्नती गट, विमा व्यवसाय आदीबांबत मार्गदर्शन होणार आहे.'

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे, शिक्षक समितीचे कृष्णात कारंडे, शिक्षक बँकेचे चेअरमन नामदेव रेपे, आदींनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे चेअरमन राजीव परीट यांनी प्रास्ताविक केले. एम. आर.पाटील, एम, एम. पाटील, सुजाता सोलनकर, प्रकाश पाटील, संजय अवघडे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला सभापती हंबीरराव पाटील, सभापती डॉ. पद्माराणी पाटील, सभापती स्वाती सासने, सभापती प्रवीण यादव प्रमुख उपस्थिती होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सत्ताधारी’ पालकमंत्र्यांकडे येण्यास इच्छुक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील यांनी आपल्याशी संपर्क साधलेला नाही, पण सत्ताधारी संचालक मंडळातील अनेकजण आमच्याकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत', असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गोकुळचा धंदा करणाऱ्या महादेवराव महाडिकांशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार विनय कोरे यांनी पालकमंत्री पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची स्वतंत्र भेट घेऊन गोकुळ निवडणुकीसंबधी चर्चा केली आहे.

गोकुळच्या निवडणुकीसाठी ठराव गोळा करण्याची प्रक्रिया संपली असून मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. माजी अध्यक्ष पाटील, डोंगळे आणि शशिकांत पाटील,चुयेकर यांनी सत्ताधारी आघाडीतील नेते आमदार पी.एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी सवतासुभा मांडून बंड केले आहे. तिघेही एकत्रित निर्णय घेणार असून ते सत्ताधारी आघाडीशी फारकत घेऊन विरोधी आघाडीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'गोकुळच्या निवडणूक कार्यक्रमास अजून वेळ असून यावेळी गेल्यावेळेप्रमाणे तगडे विरोधी पॅनेल उभे केले जाणार आहे. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. यंदा परिवर्तन अटळ असून सत्ताधारी संचालक मंडळातील विरोधी पॅनेलमध्ये येण्यास इच्छुक आहेत. गेली पंचवीस वर्षे महाडिकांशी सोबत असणाऱ्या संचालकांनी त्यांची साथ का सोडली हे लक्षात घेतले पाहिजे. गोकुळ हा दूध उत्पादकांच्या मालकीचा राहिला पाहिजे.'

दरम्यान, जिल्हा नियोजन मंडळाची बैठक संपल्यानंतर सतेज पाटील आणि मुश्रीफ शासकीय विश्रामगृहावर गेले. तेथे आमदार विनय कोरे यांनी मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची भेट घेऊन स्वतंत्रपणे चर्चा केली. गोकुळबाबत ही चर्चा झाल्याचे समजते. कोरे यांनी विरोधी आघाडीला पाठिंबा द्यावा, यासाठी सतेज पाटील यांनी विनंती केली. याबाबत कोरे यांना विचारले असता त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहता न आल्याने पालकमंत्र्याची भेट घेतल्याचे सांगितले. गोकुळबाबत त्यांना विचारले असता त्यांनी बोलणे टाळले.

....

शेतकरी संघाच्या अध्यक्षांच्या

राजीनाम्याबाबत चर्चा

मुश्रीफ आणि कोरे यांच्यामध्ये शेतकरी संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली. माने यांची मुदत संपली असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी इच्छा मुश्रीफ यांनी कोरे यांच्याकडे व्यक्त केली. लवकरच माने राजीनामा देतील, असे कोरे यांनी मुश्रीफांना सांगितल्याचे कळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवार हल्ल्याप्रकरणी माजी नगरसेवकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाई टँक परिसरात खाद्यपदार्थांच्या गाडीवर झालेल्या किरकोळ वादातून दोघा तरुणांवर तलवार हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचा माजी नगरसेवक दत्ता विलास टिपुगडे (वय ५०, रा. सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ) याला जुना राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दरम्यान, यापूर्वी त्याचा मुलगा सागर टिपुगडे याला अटक केली होती.

पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल चंद्रकांत पाटील (वय ३२), अजय विलास पाटील (३६, दोघेही रा. माजगावकर मळा) हे दोघेजण ११ डिसेंबरला सायंकाळी शालिनी पॅलेसच्या पिछाडीस असलेल्या अंबाई टँक परिसरातील खाद्यपदार्थांच्या गाडीवर नाष्टा करण्यासाठी गेले होते. या वेळी या दोघांचा आइस्क्रीमचा गाडा चालविणाऱ्या कामगाराशी वाद झाला होता. त्याने मालक टिपुगडे बापलेकास बोलवून घेतल्यानंतर या बापलेकांनी तलवार हल्ला केला होता. दोघांच्या डोक्यात तलवारीचे घाव बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी जखमी स्वप्निल पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गेले महिनाभर संशयित टिगुपडे हा पसार झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील ३३ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३३ हजार शेतकरी पात्र ठरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या आकडेवारीमुळे कर्ज भरणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांचा आकडा जास्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सहकार विभागाने थकीत कर्ज खात्यांचे लेखा परीक्षण केले. जिल्हा विशेष लेखा परीक्षक धनंजय पाटील आणि जिल्हा उप निबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ७३ लेखा परीक्षकांनी १९०१ विकास सेवा संस्थांतील थकीत कर्जखात्यांची पडताळणी केली. १३ जानेवारीपासून हे काम सुरू आहे.

एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीत वाटप करण्यात आलेले कर्ज आणि ३० सप्टेंबरपर्यंत असलेल्या थकबाकीत असलेल्या पीक कर्ज खात्यांची तपासणी करण्यात आली. तसेच १५ जानेवारीपर्यंत वाटप करण्यात आलेले कर्ज, मुदतीत पुनर्गठन कर्जाची तपासणी करण्यात आली. तपासणी करताना लेखा परीक्षकांनी वाटप केलेले कर्ज, थकबाकी खाती, थकीत कर्जाची वैयक्तिक खतावणी, बँकेकडील कर्ज उतारा, सेवा सोसायटीची उचल क्षमता व केलेली उचल याची माहिती तपासली.

शनिवारी (ता.२५) कर्जदारांची यादी तयार करण्याची अंतिम मुदत असून सहकार खात्याने ९९ टक्के काम पूर्ण केले आहे. जिल्हा लेखापरिक्षक पाटील लेखा परीक्षण अहवाल सोमवारी (ता.२७) जिल्हा बँकेला सादर करणार आहेत. त्यानंतर ही यादी पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images