Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

राष्ट्रवादीकडून सदस्यांना व्हीप

$
0
0

जि.प. लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही स्वरुपाचा दगाफटका होऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना पक्षाकडून सोमवारी व्हीप लागू करण्यात आला. तर काँग्रेसच्या सदस्यांना मंगळवारी व्हीप लागू होणार असल्याचे वृत्त आहे. शिवाय काँग्रेस आघाडीच्या सदस्यांना बुधवारी (ता. २५) संध्याकाळी किंवा गुरुवारी सहलीवर पाठविण्याचे नियोजन सुरू आहे. दरम्यान 'जि.प.मध्ये दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना मिळून महाविकास आघाडीची सत्ता येईल. बहुमताची मॅजिक फिगर आघाडीकडे आहे. हे संख्याबळ ४७ सदस्यापर्यंत वाढेल. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजून उलाढाली होतील,' असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला. तसेच भाजपचेची नेते मंडळी खोट्या वल्गना करुन हवा करण्यात पटाईत आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला.

ए. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येथील शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी दुपारी दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांनी एकसंध राहण्याचा शब्द दिला. पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल त्याच्यासोबत प्रामाणिक राहण्याचा व जि.प.मध्ये सत्ता काबीज करण्याचा निर्धार बैठकीत झाला. बैठकीत सदस्यांच्या सह्या घेण्यात आल्या.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, 'राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी एकत्रित आहेत. आमदार मुश्रीफ हे पाठिंब्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह अन्य आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. जनसुराज्यचे नेते आमदार विनय कोरे यांच्याशीही चर्चा सुरू आहे.'

...

बैठकीला पाच सदस्यांची दांडी

जि.प.मध्ये काँग्रेसचे चौदा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ मिळून २५ सदस्य आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीकडे पाच सदस्यांनी पाठ फिरवली. यामध्ये काँग्रेसचे सदस्य सचिन बल्लाळ, अरुण सुतार आणि सदस्या रश्मी राहुल देसाई या अनुपस्थित होत्या. शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या परवीन पटेल आणि कागल तालुक्यातील सदस्या शिल्पा खोत या गैरहजर होत्या. दरम्यान पटेल आणि खोत यांनी बैठकीला काही कारणास्तव येऊ शकत नसल्याचे पक्ष नेत्यांना कळविले असल्याचे सांगण्यात आले. अपक्ष सदस्या रसिका पाटील यांनी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यांचे पती अमर हे बैठकीवेळी उपस्थित होते.

...

मंडलिक दोन दिवसात

शिवसेनेची बैठक घेणार

जि.प.मध्ये शिवसेनेची सदस्य संख्या दहा आहे. त्यापैकी माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील सरुडकर, सुजित मिणचेकर, संजय घाटगे गटाचे मिळून सात सदस्य गेली अडीच वर्षे भाजप आघाडीसोबत होते तर खासदार संजय मंडलिक, माजी आमदार उल्हास पाटील गटाचे मिळून तीन सदस्य काँग्रेस आघाडीसोबत राहिले. दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर कोल्हापुरातही महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू आहेत. खासदार मंडलिक यांनी शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या दोन दिवसात मंडलिक हे शिवसेनेच्या नेत्यांची संयुक्त बैठक घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फायनान्स कंपनीला ११ कोटींचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फ्लॅटची बनावट कागदपत्रे सादर करून दाभोळकर कॉर्नर येथील जी.आय.सी. फायनान्स कंपनीची ११ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत कंपनीचे शाखा व्यवस्थापक अमित विलास देसाई (वय ४०, रा. कराड, जि. सातारा) यांनी बुधवारी (ता. २५) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी बिल्डर, फ्लॅटधारक, फायनान्स कंपनीतील तत्कालीन शाखा व्यवस्थापक, व्हॅल्युएटरसह ५१ जणांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहर आणि परिसरातील काही बांधकाम व्यावसायिकांनी २०१५ ते २०१७ या कालावधीत जी.आय.सी. फायनान्स कंपनीकडे बांधकामांसाठी कर्जाची मागणी केली. दाभोळकर कॉर्नर येथील शाखेतील कंपनीचे तत्कालीन शाखा प्रमुख मिनू मोहन या महिलेने बांधकाम व्यावसायिक, फ्लॅटधारक, कंपनीतील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांवर कर्ज मंजूर केले.

कर्जाचे वितरण झाल्यानंतर कालांतराने कर्जदारांकडून परतफेडीचे हप्ते थकले. दरम्यान, शाखा व्यवस्थापक मिनू मोहन यांची बदली झाली. या जागेवर आलेले नवीन शाखा व्यवस्थापक अमित देसाई यांनी थकीत कर्जदारांची माहिती घेण्याचे काम सुरू केले. कराडसह परिसरातील कर्जदारांकडूनच मोठ्या प्रमाणात कर्जाचे हप्ते थकीत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी कर्ज प्रकरणांची तपासणी सुरू केली. या तपासणीत फसवणुकीचा प्रकार समोर आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. दाभोळे यांच्या पुस्तकाला पुरस्कार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. ज.रा. दाभोळे यांच्या 'प्रतीत्यसमुत्पाद' या पुस्तकाला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा 'डॉ. सूर्यकांत घुगरे ग्रंथ पुरस्कार' नुकताच प्रदान करण्यात आला. डॉ. दाभोळे यांनी 'प्रतीत्यसमुत्पाद' या बौद्ध तत्त्वज्ञानातील सिद्धांताबद्दल संशोधनपर ग्रंथ लिहीला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या ३६ व्या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. डॉ. दाभोळे या समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे तत्त्वज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सुधीर पिटके यांनी डॉ. दाभोळे यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी येऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. रोख २५०० रुपये, प्रशस्तिपत्रक, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची अध्यक्षपदाची मागणी

$
0
0

फोटो अर्जुन

जि.प. लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी स्थापायची की भाजपसोबत सत्ता कायम ठेवायची यावरुन नेतेमंडळीत मतभेद असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, 'जिल्हा परिषदेत शिवसेना ही किंगमेकर आहे. राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करायची झाल्यास अध्यक्ष व एका समितीचे सभापतिपद शिवसेनेला मिळायला हवे,' असा प्रस्ताव दोन्ही काँग्रेसकडे देण्याचे बैठकीत ठरले.

गुरूवारी सायंकाळी शिवसेना संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावासह महाविकास आघाडीसंदर्भात शुक्रवारी पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्किट हाऊस येथे जिल्ह्यातील नेते मंडळींसोबत जवळपास सव्वा तासाहून अधिक काळ चर्चा झाली. पत्रकार परिषदेतही शिवसेना नेतेमंडळींमध्ये पाठिंब्याबाबतची विसंगती ठळकपणे दिसून आली. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, अजित नरके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेतील राजकारणात कोणती भूमिक घ्यायची याविषयी जोरदार चर्चा झाली.

माजी आमदार नरके, सत्यजित पाटील यांनी स्थानिक राजकारण, आतापर्यंतचा दोन्ही काँग्रेसविरोधात शिवसेनेचा संघर्ष याबाबीही निदर्शनास आणल्या. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे दहा सदस्य आहेत. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही, हे नरके यांनी बैठकीत मांडले.

बैठक संपल्यानंतर संपर्कप्रमुख दुधवडकर म्हणाले,' कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना किंगमेकर आहे. राज्यात दोन्ही काँग्रेससह शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो आदेश देतील, तो आमच्यासाठी अंतिम असेल. शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची मते जाणून घेतली आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळविले जाईल. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार पुढील धोरण राहील. मात्र जिल्हा परिषदेत सत्तांतर अटळ आहे.'

.....

... तर करवीर पंचायतीयत शिवसेनेला पद हवे

आमदार चंद्रदीप नरके यांनी आक्रमकपणे आपली बाजू मांडली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ' शिवसेनेशिवाय कोणालाही बहुमत सिद्ध करता येणार नाही. पक्षाचा जो आदेश आहे त्याविषयी आम्हाला आदर आहे. जि.प.मध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे. यामुळे इतरांना आमच्या ताकदीचा वापर करु देणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीविरोधात लढून ठिकठिकाणी विजय मिळवला आहे. शिवाय पक्षश्रेष्ठींनीही इतरांना मोकळी मदत करा कधीही म्हटले नाही. राज्यातील महाविकास आघाडीच्या सूत्राप्रमाणेच जिल्हा परिषदेतही शिवसेनेला अध्यक्षपद, एक समिती सभापती मिळायला हवे. करवीर पंचायत समितीत शिवसेनेचे चार सदस्य आहेत. याठिकाणी महाविकास आघाडी करुन सभापती किंवा उपसभापतीपैकी एक पद शिवसेनेला द्यावे.'

............

चंद्रकांत पाटलांना शिवसेनेची ताकद दाखवू

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी भाजप आघाडीची सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याकडे लक्ष वेधल्यावर दुधवडकर यांनी 'प्रदेशाध्यक्ष पाटील, माजी आमदार महाडिक यांच्याविषयी आदर आहे. पण प्रदेशाध्यक्ष पाटील यांना शिवसेनेची ताकद दाखवू,'असा इशारा दिला.

..........

संजय घाटगे बैठकीला अनुपस्थित

माजी आमदार संजय घाटगे हे बैठकीला अनुपस्थित होते. घाटगे यांचे पुत्र अंबरिश घाटगे हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. जि.प.मध्ये घाटगे हे भाजपसोबत असून गेली अडीच वर्षे अंबरिश यांच्याकडे शिक्षण समिती सभापतीपद आहे. दुसरीकडे भाजपकडून जि.प.अध्यक्षपदासाठी इच्छुक सदस्य अरुण इंगवले व घाटगे हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत घाटगे हे इंगवले यांच्या बाजूने राहणार हे निश्चित आहे.

................

कोट

'शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची मते आजमावण्यासाठी बैठक होती. सर्वांनी एकसंधपणे राहावे या अनुषंगाने चर्चा झाली. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार पुढील निर्णय होईल. दोन्ही काँग्रेस नेत्यांशी चर्चा करू.

संजय मंडलिक, खासदार, शिवसेना

........................

फोटो ओळी...

शिवसेना पदाधिकाऱ्यांची संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. याप्रसंगी डावीकडून अजित नरके, संजय पवार, सुजित मिणचेकर, आमदार प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील, चंद्रदीप नरके व मुरलीधर जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाविकास आघाडी गोकुळ, केडीसीमध्येही होणार का ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महाविकास आघाडीची संकल्पना ही केवळ जिल्हा परिषद निवडणुकीपुरती मर्यादित आहे का? आगामी काळात होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँक, गोकुळ, बाजार समिती, साखर कारखान्यांच्या निवडणुकीतही दोन्ही काँग्रेसवाले शिवसेनेला सोबत घेणार आहेत का, याचाही सोक्षमोक्ष होऊ दे. प्रत्येक ठिकाणी दोन्ही काँग्रेसच्या सोयीची भूमिका होऊ नये,' असे मत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेना नेत्यांच्या बैठकीत मांडल्याची चर्चा आहे.

संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे माजी आमदार उपस्थित होते. बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीचे पडसाद उमटले. माजी आमदार नरके यांनी पक्षाच्या आदेशाचे आम्ही पालन करू, पण मात्र माझ्या पराभवास कोण कोण जबाबदार आहेत ते तपासा. माझ्याकडे त्यांची यादी आहे. विधानसभा निवडणुकीत माझ्या पराभवास जे जबाबदार आहेत त्यांच्यावर काय कारवाई होणार, असा सवाल उपस्थित केला.

'गोकुळच्या राजकारणात महाडिकांच्या विरोधात मी उघड शत्रुत्व पुकारले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काय घडले ?ज्यांना मदत केली ते सगळे माझ्याविरोधात एकवटले. माझ्याविरोधी काम केले. खरे तर, खासदार संजय मंडलिक यांनी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत भूमिका निभावणे गरजेचे होते. त्या कालावधीत त्यांच्याशी चर्चा करत होतो, 'असा मुद्दा नरके यांनी बैठकीत मांडला. तेव्हा खासदार मंडलिक यांनी 'मी तुमच्या विजयासाठी प्रयत्न केले. भूमिका योग्यपणे निभावली,'असे सांगितले. माजी आमदार नरके, त्यांचे बंधू अजित नरके यांनी विधानसभेतील घडामोडी संपर्कप्रमुखांसमोर मांडल्या. माजी आमदार सत्यजित पाटील यांनी स्थानिक पातळीवर राजकारणाचे वेगळे संदर्भ असतात असे बैठकीत सांगितले. महाविकास आघाडीत सामील होण्यावरुन बैठकीत गरमागरम चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

...

विधानसभेतील पराभवाचा शोध

संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी पाटील, बाजीराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुखांची बैठक घेतली. 'निवडणुकीत हार जीत होत असते. जिल्ह्यातील पराभवाने खचून जाऊ नका. पुन्हा एकदा ताकदीने संघटन करू. जिल्ह्यातील पराभव हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला आहे. पराभवाच्या कारणांचा व कोण जबाबदार आहेत याचा शोध घेतला आहे. योग्य वेळी संबंधितांवर कारवाई होईल,'असा इशारा दुधवडकर यांनी दिला. पक्षामध्ये राहून संघटना वाढीसाठी जे काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील, राजू यादव, तानाजी आंग्रे, संदीप कारंडे, देवस्थान समिती सदस्य शिवाजी जाधव, अवधूत साळोखे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शुभांगी पोवार, स्मिता सावंत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ४० पर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्र येत आहेत. यामुळे महाविकास आघाडीचे संख्याबळ ४० पर्यंत पोहचेल,' असा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केला. काँग्रेस कमिटी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी आघाडीने बहुमताचा आकडा ओलांडल्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचेही म्हटले आहे.

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना व काँग्रेस नेत्यांची गुरुवारी भेट झाली. शिवसेनेने थेट अध्यक्षपदासोबत समिती सभापतिपद मागितले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कमिटी येथे पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, 'दोन्ही काँग्रेस, शिवसेना मिळून महाविकास आघाडीचे संख्याबळ सध्या ३७ पर्यंत पोहचले आहे. येत्या काही दिवसात आघाडीकडील सदस्य संख्या ४० पर्यंत वाढेल. शिवसेनेने जि.प.अध्यक्षपदासह अन्य दोन समित्यांचे सभापतिपदासाठी दावा केला आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य आहेत. यामुळे काँग्रेसला अध्यक्षपद मिळावे असा दावा आम्हीही केला आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची आज बैठक

$
0
0

कोल्हापूर

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकारिणीची आज, शुक्रवारी येथे बैठक होणार आहे. शिवसेना नेते दिवाकर रावते हे कार्यकारिणीला मार्गदर्शन करणार आहेत. सर्किट हाऊस येथे दुपारी तीन वाजता बैठकीला सुरुवात होईल. कार्यकारिणी सदस्यांनी बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप आघाडीचे सदस्य आज सहलीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणात सदस्य अन्य पक्षाच्या गळाला लागू नयेत म्हणून सगळ्याच पक्षांनी खबरदारी घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपाठापोठ आता भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांचे सदस्य हे आज, शुक्रवारी सहलीवर रवाना होणार आहेत. भाजप व मित्र पक्षांची सायंकाळी पाच वाजता हॉटेल जोतिबा येथे बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सदस्यांना सहलीवर पाठविण्यात येणार आहे.

भाजपसह जनसुराज्य शक्ती पक्ष, आवाडे गट, ताराराणी विकास आघाडी, चंदगड युवक क्रांती आघाडीच्या सदस्यांना बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. भाजप आघाडीने जि.प.तील सत्ता कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेना नेत्यांच्याही ते संपर्कात आहेत. भाजपचे १४, जनसुराज्यचे सहा, ताराराणी विकास आघाडीचे तीन सदस्य आहेत. आवाडे गट व युवक क्रांती आघाडीचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. तर गेल्या अडीच वर्षात शिवसेनेचे सात सदस्य भाजपसोबत होते. शिवसेनेची यंदा भूमिका ठरायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टीम सरसावली

$
0
0

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणे जुळविण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत त्यांनी बैठक घेऊन संख्याबळाच्या दृष्टीने चर्चा केली. आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार धनंजय महाडिक, प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे अशी यंत्रणा सक्रिय आहे. जि.प.तील विविध घटकांच्या संपर्कात ही नेते मंडळी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूर्यवंशी ट्रस्टचे कार्य प्रेरणादायी

$
0
0

फोटो अर्जुन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहीद जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ कुटुंबीयांनी ट्रस्टची स्थापना करून स्मृती जपल्या आहेत. या ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. हे कार्य कौतुकास्पद आहे,' असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

ट्रस्टतर्फे शहीद जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून साकोली कॉर्नर येथील निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी संयोगीताराजे छत्रपती होत्या. ट्रस्टतर्फे 'बेस्ट जवान ऑफ द इअर' पुरस्काराने १०९ टीए मराठा बटालियनमधील हवालदार संजय चंद्रकांत पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'माजी सैनिकांचे सरकारी पातळीवरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील. अभिजित सूर्यवंशी यांनी देशवासीयांसाठी प्राणाचे बलिदान दिले आहे. त्यांच्या स्मृती कायम तरुणांना प्रेरणादायी ठरतील. सीमेवरील जवानांच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.'

संयोगीताराजे छत्रपती म्हणाल्या, 'कोपर्डीसारखी घटना समाजाला लांच्छनास्पद आहे. समाजात घडणाऱ्या गैरकृत्यांविरोधात प्रत्येकाने सैनिक म्हणून उभे राहावे.'

याप्रसंगी वीरपत्नी रतन गणपतराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविले. ट्रस्टचे कार्याध्यक्ष नितीन सूर्यवंशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने, १०९ टीए बटालियनचे नायब सुभेदार संजय वाघे, ट्रस्टच्या अध्यक्षा वीरमाता मनीषा सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,कसबा बावडा: शिरोली पुलाच्या (ता. हातकणंगले) येथे तरुणांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.शिरोली फाटा मेन रोडवरील सर्व्हिस रोडला रिकाम्या जागेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने एकच परिसरात एकच खळबळ माजली.

वयाच्या ३७ व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने केली आत्महत्या

खून झाल्याचे समजताच शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण भोसले आणि पीएसआय अतुल लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मृतदेहाच्या बाजूला तीन मोठे दगड आढळून आल्याने दगड डोक्यात घालून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव गणेश नामदेव लोहार ,(वय २६ ) असे असून तो प्लम्बिंगचे काम करत होता. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी करवीरचे पोलिस उप अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

अल्पवयीन मुलीच्या अंगाला केक लावला; DIG वर पोक्सो अंतर्गत गुन्हा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातग्रस्ताकडून रस्त्यातील खड्ड्यात लोटांगण घालून निषेध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे
फुलेवाडी नाका ते शिंगणापूर फाटा दरम्यानच्या रस्त्याला लागलेले खड्ड्यांचे ग्रहण काही संपता संपेना. खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्यावरून गुरुवारी दुपारी विजय मोरे पत्नी व मुलांसह दुचाकीवरून कोल्हापूरला येत असताना खड्ड्यामुळे गाडी घसरून पडले. या अपघातात त्यांच्या पत्नीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. पत्नीची झालेली गंभीर अवस्था पाहून उद्विग्न झालेल्या विजय मोरे यांनी घटनास्थळी परत येऊन चक्क खड्ड्यातच लोटांगण घालून खड्ड्यांच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाच्या होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. मोरे यांच्या या पवित्र्यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.

कोल्हापूर- गगनबावडा राज्यमार्गावरील फुलेवाडी जकात नाका ते शिंगणापूर फाटा येथील रस्ता गेली अनेक वर्षे खड्ड्यांनी ग्रासलेला आहे. खड्ड्यांत नेहमीच पाणी, चिखल, निरसट, वाहतूक ट्रॅफिक जॅम, आदीमुळे हा परिसर मृत्यूचा सापळा बनल्याने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. मात्र, कोल्हापूर महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीच्या वादात या रस्त्याचे काम रखडले आहे.
गुरुवारी विजय मोरे पत्नी व मुलांसह दुचाकीवरून दुपारी साडेतीनच्या सुमारास कोल्हापूरला येत असताना फुलेवाडी नाका ते शिंगणापूर फाटा दरम्यानच्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरून मोरे व त्यांची पत्नी व मुलगा सर्वजण खाली पडले. पत्नीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ खासगी दवाखान्यात दाखल केले. दवाखान्यातील उपचार पूर्ण झाल्यानंतर उद्विग्न झालेल्या मोरे यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत चक्क खड्ड्यात लोटांगण घालून रस्त्याच्या कामाकडे होणाऱ्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली.

मोरे यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे सारेच अवाक् झालेत. क्षणार्धात वाहने दोन्ही बाजूला थांबून राहिल्याने दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यावेळी घटनास्थळी करवीर पोलिसांनी धाव घेत मोरे यांना ताब्यात घेतले असता उपस्थित सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर खड्ड्यांच्या कामाकडे होणाऱ्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

चार दिवसांपूर्वी आमदार पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, नगरसेवक राहुल माने सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता स. शी. माने, कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता गगनबावड्याचे सी. ए. आयरेकर यांच्याबरोबर या रस्त्याच्या हद्दीबाबत बैठक पार पडली. बैठकीत हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याचा निर्वाळा देण्यात आला. येत्या आठ दिवसांत पाइपलाइनची गळती काढून चांगल्या दर्जाचा रस्ता करण्याचे ठरले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता तत्काळ पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडावी, अशी सूचनाही केली आहे. त्यामुळे हा रस्ता कधी पूर्ण होतो याकडे प्रवाशांसह परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

अपघातामुळे प्रश्न ऐरणीवर
फुलेवाडी नाका ते शिंगणापूर फाटा दरम्यानच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत होणाऱ्या दुर्लक्षाकडे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वेळोवेळी आवाज उठवून संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते तसेच होणाऱ्या संभाव्य धोक्याची कल्पनाही त्याअनुषंगाने दिली होती. मात्र, तात्पुरत्या मलमपट्टीव्यतिरिक्त येथे काही करण्यात आले नाही. गुरुवारी झालेल्या घटनेने अपघातग्रस्त विजय मोरे यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे तसेच प्रवाशांनी व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीमुळे पुन्हा एकदा हा प्रश्न समोर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. दाभोळे यांच्या पुस्तकाला पुरस्कार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. ज.रा. दाभोळे यांच्या 'प्रतीत्यसमुत्पाद' या पुस्तकाला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा 'डॉ. सूर्यकांत घुगरे ग्रंथ पुरस्कार' नुकताच प्रदान करण्यात आला. डॉ. दाभोळे यांनी 'प्रतीत्यसमुत्पाद' या बौद्ध तत्त्वज्ञानातील सिद्धांताबद्दल संशोधनपर ग्रंथ लिहीला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या ३६ व्या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. डॉ. दाभोळे या समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे तत्त्वज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सुधीर पिटके यांनी डॉ. दाभोळे यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी येऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. रोख २५०० रुपये, प्रशस्तिपत्रक, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गुणवत्तापूर्ण शिक्षणातूनच सुजान नागरिक’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'प्राथमिक शिक्षक हे राष्ट्राच्या सेवेचा आधार आहेत. प्राथमिक शिक्षण गुणवत्तापूर्ण असेल तर सुजाण नागरिक तयार होतील, 'असे मत कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक सत्यजित सोनवणे यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर महानगरपालिका खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी 'आदर्श शिक्षक पुरस्कार व विद्यार्थी पारितोषिक वितरण' सोहळा पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. पंतसंस्थेच्या कार्याचे कौतुकही त्यांनी केले. संस्थेतर्फे महापौर सूरमंजिरी लाटकर व उपमहापौर संजय मोहिते यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. यामध्ये रंगराव कांदळकर, रजनी कोळी, संतोष पाटील, दयानंद खाडे, अर्चना पट्टणशेट्टी, ज्योती मुडशिगीकर, अश्विनी भोकरे, शोभा शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले. आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून फिरोज नायकवडी यांचा सन्मान झाला. श्रीमती शितल माने यांना हिरकणी पुरस्काराने तर कै. रणजित भोसले पाटील कलाभिनय पुरस्काराने प्रकाश वांद्रे, तानाजी देशमुख यांना गौरविले. पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे म्हणाले, 'संस्थेने सुरुवातीपासूनच पारदर्शी व काटकसरीने कारभार करून वेगळा ठसा उमटविला आहे.'

पतसंस्थेचे चेअरमन राजेश कोंडेकर यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. संचालक आनंदा हिरुगडे यांनी स्वागत केले. व्हाइस चेअरमन कुमार पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी सचिव छाया हिरुगडे, संचालक शिवाजी निकम, शिवाजी भोसले, बाळासाहेब लंबे, अशोक पाटील, अनिल सरक, राजाराम हुल्ले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षपदी प्राचार्य एम. ए. वाहूळ

$
0
0

फोटो आहेत...

कोल्हापूर: असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर अॅन्युएटेड टीचर्स, महाराष्ट्र या सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. एम. ए. वाहूळ यांची फेरनिवड झाली. संघटनेच्या सचिवपदी प्राचार्य जे. एम. मंत्री यांची बिनविरोध निवड झाली. संघटनेची नूतन कार्यकारिणी निवडण्यासाठी सर्वसाधारण सभा नाशिक येथे झाली. संघटनेची अन्य कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी प्राचार्य पी. वाय. मद्वाण्णा (सांगली), सहसचिव डॉ. एम. एन. जाचक (नाशिक), कोषाध्यक्षपदी प्रा. एस. बी. नाफडे (औरंगाबाद) हे निवडून आले आहेत. कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. ए. डब्ल्यू. राऊत (अमरावती), डॉ. मानसिंग जगताप (कोल्हापूर), प्रा. बी. बी. देशपांडे (नांदेड), प्रा. ए. बी. पाटील (जळगाव), डॉ. आर.बी. बीडकर (बार्शी) आणि औरंगाबादमधील प्रा. कुमुद गोरे, प्रा. जी. टी. देगावकर, प्रा. लियाकत पटेल यांची सदस्यपदी निवड झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवजयंती उत्सव बैठक

$
0
0

कोल्हापूर

श्री शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासाठी सोमवारी (ता. ३०) बैठक आयोजित केली आहे. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे सायंकाळी साडेसहा वाजता बैठक होणार आहे. बैठकीला पेठेतील सर्व तालीम संस्था, तरुण मंडळे, सामाजिक संस्था व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण व उपाध्यक्ष अजित राऊत यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’मधील नोकरभरतीस ब्रेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सध्या गोकुळ दूध संघाकडून नोकरभरतीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्याला कोणत्याही प्रकारची मान्यता देण्यात येणार नाही, असा अहवाल सहकारी संस्थांचे (दुग्ध) विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दिला आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघातील नियोजित नोकरभरतीला ब्रेक लागणार आहे.

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाकडून गोकुळच्या विस्तारीकरणाच्या माध्यमातून २३९ जणांची नवीन नोकरभरती करण्याची चर्चा सुरू होती. यामुळे आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांनी सरकारकडे नोकरभरतीबाबत अहवाल मागितला होता. त्यानुसार विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांनी तो अहवाल नुकताच सादर केला आहे. संघामध्ये सरकारने मंजूर केलेला आकृतीबंध २३५८ पदांचा असून सद्यस्थितीत कोणतीही नोकरभरती प्रक्रिया चालू नाही. तसेच रिक्त असलेल्या जागांवर नोकरभरती करण्यास मान्यता मिळण्याबाबत कोणताही प्रस्ताव नोव्हेंबर २०१९ नंतर आजपर्यंत कार्यालयाकडे आलेला नाही. त्याला मान्यताही दिलेली नाही, असे त्या अहवालात म्हटले आहे.

संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत २३ एप्रिल २०२० रोजी संपत आहे. पुढील निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून १६ डिसेंबर ते २२ जानेवारीपर्यंत प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे संघाचा रिक्त पदावरील नोकरभरतीस मान्यतेचा प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्याला कोणत्याही प्रकारची मान्यता देण्यात येणार नाही, असेही शिरापूरकर यांनी अहवालात म्हटले आहे. हा अहवाल त्यांनी आमदार पाटील तसेच सहनिबंधकांकडेही पाठवला आहे.

नोकरभरतीचा मुद्दा विरोधकांनी नेहमी पुढे आणला जात होता. भरतीतून मोठा भ्रष्टाचार होत असल्याचाही आरोप केला होता. तसेच सर्वसाधारण सभांमधूनही याबाबत सातत्याने आवाज उठवला जात होता. यामुळे विरोधकांचे नेते आमदार पाटील, मुश्रीफ, मंडलिक यांनी सरकारकडेच याबाबतचा अहवाल मागितला होता.

.. .. .. .. ...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना भाजपसोबत राहील

$
0
0

जि.प. लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांमध्ये पाच वर्षांसाठी आघाडी झाली आहे. पाच वर्षे एकत्र राहण्याची कमिटमेंट सत्ताधारी आघाडीतील पक्षांनी दिली आहे. यामुळे शिवसेनेचे सातही सदस्य अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आघाडीसोबत राहतील,'असा विश्वास पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला. भाजप आघाडीत सामील शिवसेना नेत्यासोबत एक तारखेला अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसोबत चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजप, जनसुराज्य शक्ती पक्ष, ताराराणी विकास आघाडी आणि चंदगड येथील युवक क्रांती आघाडी अशी संयुक्त बैठक शुक्रवारी रात्री येथील हॉटेल जोतिबा येथे झाली. माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली. याप्रसंगी अध्यक्षपदासाठी इच्छुक सदस्यांसह अन्य सदस्यांची मते जाणून घेण्यात आली. दरम्यान, दोन्ही काँग्रेसकडून बहुमताचा आकडा सांगितला जात आहे. याकडे लक्ष वेधल्यावर हाळवणकर यांनी, 'प्रत्येक पक्ष दावा करू शकतो, मात्र सभागृहात दिसेल नक्की बहुमत कोणाकडे आहे'अशा शब्दांत काँग्रेस आघाडीला टोला लगाविला.

'अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापताना भाजपची सदस्य संख्या जास्त होती. सत्ता स्थापन करताना पाच वर्षे एकत्र राहण्याचा शब्द मित्रपक्षांनी दिला आहे. सर्वाधिक संख्या असतानाही भाजपने केवळ अध्यक्षपद घेतले. जनसुराज्य शक्ती पक्षाला बांधकाम व समाजकल्याण समिती सभापतिपद दिले. शिवसेनेला उपाध्यक्ष व शिक्षण समिती सभापती तर स्वाभिमानी व आवाडे गटाला पद दिले आहे. आगामी काळातही मित्रपक्षांना पदे मिळणार आहेत. भाजपने प्रत्येक घटक पक्षाला योग्य न्याय दिला आहे, मानसन्मान ठेवला आहे. शिवसेनेला काँग्रेस आघाडीसोबत जाऊन काय मिळणार आहे ? काँग्रेसवाले थोडेच त्यांना अध्यक्षपद देणार आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बैठकीला आवाडे गटाचे सदस्य राहुल आवाडे, ज्येष्ठ सदस्य अशोक माने, राजवर्धन निंबाळकर, महेश चौगुले, संध्याराणी बेडगे, राजू मगदूम, प्रकाश टोणपे यांची उपस्थिती होती.

.......

इच्छुक जास्त, निवडणुकीदिवशी व्हीप

हाळवणकर म्हणाले, 'अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, विजया पाटील, स्मिता शेंडुरे, कल्पना चौगुले असे पाचजण इच्छुक आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत या इच्छुक सदस्यांसोबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. भाजप व मित्रपक्षाच्या सदस्यांनी सहलीवर जाण्याची इच्छा व्यक्त केली तर नियोजन केले जाईल. शिवाय भाजपचे सगळे सदस्य हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. यामुळे त्यांना सध्या व्हीप लागू करायची आवश्यकता नाही. निवडणुकीदिवशी व्हीप लागू केला जाईल.'

....

जनसुराज्य, युवक क्रांती आघाडीसोबत

बैठकीला जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम हे पक्षाच्या सदस्यांसहित उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत सभापती सर्जेराव पाटील, विशांत महापुरे, शिवाजी मोरे, मनीषा मानेंसह सहा सदस्य उपस्थित होते. ताराराणी विकास आघाडीच्या सदस्या सुनीता रेडेकर हजर होत्या. हत्तरकी यांनी बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची पूर्वकल्पना दिल्याचे सांगण्यात आले. राणी खमलेट्टी अनुपस्थित होत्या. चंदगड युवक क्रांती आघाडीचे कल्लाप्पाणा भोगण उपस्थित होते. तर सदस्या विद्या पाटील या अनुपस्थित होत्या.

.......

शेट्टी काहींही करु शकतात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला आहे. याकडे लक्ष वेधल्यावर हाळवणकर म्हणाले, 'शेट्टी यांची पार्टी स्वतंत्र आहे. ते काहीही करू शकतात. स्वाभिमानी संघटना अडीच वर्षे भाजपसोबत होती. त्यांच्या गटाला आघाडीतंर्गत समिती सभापतिपद दिले होते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताराराणी आघाडीचा एक सदस्य काँग्रेस सोबत ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा बहुमताचा आकडा आघाडीकडे असल्याचा दावा केला आहे. तसेच सत्ताधारी भाजप आघाडीशी निगडीत ताराराणी विकास आघाडीचा एक सदस्य काँग्रेसला मिळाला असल्याचा दावा पक्षाच्या कारभाऱ्यांकडून केला जात आहे. यामुळे काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ४१ पर्यंत पोहचल्याचे म्हणणे आहे. दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणखी पाच सदस्य शुक्रवारी सहलीवर रवाना झाले.

महाविकास आघाडी स्थापण्याच्या हालचाली सुरू असून येत्या काही दिवसात मूर्त रुप पाहावयास मिळेल असेही काँग्रेसचे म्हणणे आहे. दरम्यान, शिवसेनेकडून दोन्ही काँग्रेसला सादर केलेल्या प्रस्तावावर फारशा घडामोडी घडल्या नाहीत. मात्र शिवसेना सदस्यावर पक्षासोबत राहण्याविषयी दबाव वाढत असल्याची चर्चा आहे. शिवसेनाही अध्यक्ष व दोन समिती सभापतिपदाच्या मागणीवरुन एक पाऊल मागे येण्याची शक्यता असल्याचे काही सदस्यांचे म्हणणे आहे. अध्यक्षपदाऐवजी तीन समिती सभापतिपद मिळावेत, असा नवा प्रस्ताव तयार केल्याचे वृत्त आहे. या संदर्भात शिवसेना नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यासंदर्भात ठामपणे बोलण्यास शिवसेनेच्या नेत्यांनी व सदस्यांनी नकार दिला.

...

चंद्रदीप नरके, सत्यजित पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाचे तीन आणि माजी आमदार सत्यजित पाटील गटाचे दोन, माजी आमदार संजय घाटगे व माजी आमदार सुजित मिणचेकर गटाचा एक सदस्य असे सात सदस्य गेली अडीच वर्षे भाजपसोबत होते. या सातपैकी पाच सदस्य हे नरके व पाटील गटाचे आहेत. हे दोन्ही नेते काय भूमिका घेतात यावर भाजप आणि दोन्ही काँग्रेस आघाडीचे बहुमताचे भवितव्य अवलंबून आहे. भाजप व काँग्रेस आघाडीकडून शिवसेनेचा पाठिंबा आपणालाच मिळेल असा दावा केला जात आहे. तर सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत नरके यांनी अध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडला. तसेच दोन्ही काँग्रेससोबत आघाडी करताना स्थानिक राजकारणाचा विचार करावा, असे मत मांडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागोवा: क्रीडाक्षेत्र २०१९

$
0
0

कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राची उपेक्षाच

०००

एंट्रो...

कोल्हापूरला शतकोत्तर क्रीडा परंपरा लाभली आहे. मात्र, गेल्या वर्षभरात काही खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी वगळता जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला अपेक्षित यश लाभलेले दिसत नाही. यामागे प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव, विविध क्रीडा प्रकारांसाठी लागणारी मैदाने उपलब्ध नसणे ही यामागची खरी शोकांतिका आहे. परिणामी क्रीडा क्षेत्राची उपेक्षाच झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

००००

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : जिल्ह्यातील नवोदित होतकरू खेळाडूंना सेवासुविधांच्या अभावी सरावासाठी पुणे, मुंबई गाठावे लागत आहे. शहराच्या क्रीडा विकासाकडे स्थानिक स्वराज्य संस्था, क्रीडा संघटना, लोकप्रतिनिधी व क्रीडा खात्याने दुर्लक्षच केल्याचे आढळते. तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कोल्हापूरच्या खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत नाव उंचावले आहे. गेल्या वर्षभरात शहरातील मैदानांच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकूनही त्याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे

यांनी गाजवले वर्ष

कोल्हापूरच्या खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. प्रतिकूल परिस्थितीत सोयी-सुविधांचा अभाव असतानाही केवळ जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडूंनी बाजी मारली आहे. नेमबाज राही सरनोबतने जर्मनीतील म्युनिक येथे वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले, तर तेजस्विनी सावंतने १४ व्या एशियन शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्तम कामगिरी करत १२ वा ऑलिम्पक कोटा मिळवला. अभिज्ञा पाटीलने ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत २५ मीटर स्पोर्ट पिस्तूल प्रकारात एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक मिळविले. अनुष्का पाटीलने 'खेलो इंडिया'मध्ये १७ वर्षांखालील १० मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले. शाहू तुषार मानेने ज्युनिअर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तर क्रिकेटपटू विशांत मोरे याची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात रणजी स्पर्धेसाठी निवड झाली. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट टी-व्टेंटी स्पर्धेसाठी अनुजा पाटीलची निवड झाली. भारतीय महिला चॅलेंजर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी शिवाली शिंदेचा भारतीय 'अ' संघात समावेश झाला. कुस्तीत सोनबा गोंगाणेने २३ वर्षांखालील वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. इराण येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती वर्ल्डकपसाठी विक्रम कुराडेची भारतीय संघात निवड झाली. दिव्यांग स्वरूप उन्हाळकरने ऑस्ट्रेलियात झालेल्या पॅरा शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात यश मिळवले. भारतीय ज्युनिअर मुलांच्या फुटबॉल संघात विश्वविजय शिंदेची निवड झाली.

विभागीय क्रीडा संकुल रखडलेलेच

तब्बल १६ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या विभागीय क्रीडा संकुलातील अपूर्ण कामांचा पाढा पुढे सुरू आहे. तब्बल नऊ वर्षे सुरू असलेले विभागीय क्रीडा संकुलाचे काम अद्याप अपूर्णच आहे. पूर्ण झालेल्या कामाच्या दर्जाबाबतही शंका असून कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे अशी मागणी अनेक क्रीडा संघटनांनी केली आहे. क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची समस्या कायम असून दर्जाहीन कामामुळे तब्बल ७१ लाख रुपये खर्चून बांधलेला जलतरण तलाव धूळखात पडून आहे. याबाबत माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ कार्यवाही करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलाची अवस्था फारशी समाधानकारक नाही.

मैदानाची दुरवस्था कायम

एकेकाळी मैदानांचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापुरातील मैदानांती दुरवस्था कायम आहे. अनेक आंतरराष्ट्रीय, रणजी क्रिकेट सामने झालेल्या शिवाजी स्टेडियमला समस्यांचे ग्रहण लागले आहे. क्रिकेटसाठी अद्ययावत मैदान नसल्याने खेळाडूंना सरावासाठी शहराबाहेर जावे लागत आहे. गांधी मैदान, दुधाळी मैदानाच्या समस्या कायम आहेत. शहरातील मैदानावर प्राथमिक सोयीसुविधा, प्रसाधनगृहे यांचीही वानवा आहे. अनेक मैदानांना संरक्षक भिंतींही नाहीत. शहरातील एकमेव छत्रपती शाहू स्टेडियम मैदान सुस्थितीत असून उर्वरित मैदानांची अवस्था दयनियच आहे.

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला निधी

गेली कित्येक वर्षे शहरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. स्टेडियम मद्यपींचा अड्डा बनला असून, दुरवस्था कायम आहे. कित्येक वर्षांपासून स्टेडियमला अॅस्ट्रो टर्फसाठी निधीची मागणी केली जात होती. यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

कुस्तीकडे दुर्लक्ष

कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हटले जाते. मात्र, गेल्या वर्षभरात कुस्तीकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. गेल्या तीन वर्षांत गावोगावी कुस्त्यांची मैदाने होऊ लागली आहेत. कुस्तीकडे महिलांचाही सहभाग वाढतो आहे. मात्र, गेल्या वर्षभरात खासबाग मैदानावर पैलवान ग्रुपने घेतलेल्या कुस्ती स्पर्धेशिवाय अन्य कोणत्याही मोठ्या स्पर्धा झालेल्या नाहीत. दिवसेंदिवस कुस्ती स्पर्धा कमी होत असल्याने इतर खेळांच्या तुलनेत कुस्ती मागे पडेल अशी भीती क्रीडाविषयक अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

यांच्या झाल्या निवडी

जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या अध्यक्षपदी व्ही. बी. पाटील आणि शहराध्यक्षपदी हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांची निवड झाली. तर खासदार संभाजीराजे छत्रपती यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाली. केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झाली, तर जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांची कार्यकारिणी समितीवर सदस्य म्हणून निवड झाली.

सिटी ऑफ आयर्न मॅन

गेल्या वर्षभरात कोल्हापुरातून आयर्न मॅन स्पर्धेसाठी अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. ऑस्ट्रिया येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापुरातील १३ जणांनी यशस्वी सहभाग नोंदवला. गेल्या तीन वर्षांत ३१ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. यात अमर धामणे, अतुल पोवार, स्वप्निल कुंभारकर (सांगली), उदय पाटील, वैभव बेळगावकर, अविनाश सोनी, वरुण कदम, यश कदम, बाबासाहेब पुजारी (इचलकरंजी), कुमार ब्रीजवाणी, वीरेंद्रसिंह घाटगे यांचा समावेश आहे. स्पर्धेच्या धर्तीवर कोल्हापुरातही ट्रायथलॉन स्पर्धा घेण्यात आली.

कुस्तीतील हिरा गमावला

देश-विदेशातील अनेक मल्लांशी भिडत त्यांना अस्मान दाखविणाऱ्या रुस्तुम ए हिंद, महान भारत केसरी पैलवान दादू चौगले यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने कुस्तीक्षेत्राचे मोठे नुकसान झाले. त्यांना भारत सरकारने मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images