Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मोहिते-पाटलांच्या कारखान्याचा लिलाव बबनराव शिंदेंनी १२५ कोटींत घेतला

$
0
0

मोहिते-पाटलांच्या कारखान्याचा लिलाव

कट्टरविरोधक बबनराव शिंदेंनी १२५ कोटींत घेतला

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या खासगी मालकीचा आणि मागील सहा-सात वर्षांपासून तब्बल १८३ कोटींची थकबाकी असलेल्या विजय शुगर या कारखान्याचा (करकंब, ता. पंढरपूर) सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी लिलाव काढला. कारखाना १२५ कोटी १० लाख रुपये मोजून माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी खरेदी केला आहे. त्यामुळे बॅँकेचा एनपीए झपाट्याने कमी झाला आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पंढरपूर तालुक्‍यातील करकंब येथील विजय शुगर हा खासगी कारखाना विविध कारणांमुळे अडचणीत आला होता. जिल्हा बॅँकेने दिलेले सुमारे पावणे दोनशे कोटींचे कर्ज कारखान्याकडे थकीत होते. त्याचा परिणाम बॅँकेच्या एनपीएवर झाला होता. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांकडील मोठ्या थकबाकीमुळे मागील काही वर्षांपासून सामान्य शेतकऱ्यांना कर्ज वाटप करता येत नव्हते. कारखाना लिलावात काढल्यामुळे बँकेचा एनपीए मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. जून २०२०पासून सुरळीत शेतीकर्ज वाटप करता येईल, असा विश्‍वास प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी व्यक्‍त केला आहे. बँकेकडून आता आमदार दिलीप सोपल यांच्या बार्शीतील आर्यन शुगर या कारखान्याकडील वसुली सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोट

जिल्ह्यातील अडचणीत येऊन बंद पडलेल्या कारखान्यांकडील थकबाकी वसूल करण्याचे आव्हानात्मक काम बँकेकडून नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. विजय शुगर कारखाना लिलावात विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने म्हणजेच आमदार बबनराव शिंदे यांनी १२५ कोटी १० लाख रुपयांना खरेदी केला आहे. आठ-दहा वर्षांपासून बंद असलेले शेती कर्जांचे वितरण जून २०२०पासून सुरू होणार आहे.

- शैलेश कोथमिरे, प्रशासक,

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

जय सांगलीनाका परिसरात पानपट्टीत मटका घेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न घडला. याप्रकरणी पोलिसांनी मटका घेतल्याप्रकरणी तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विनायक अनिल तराळ (वय २२ ) व अनिल बंडू तराळ (वय ५०, दोघे रा. आर. के. नगर, शहापूर) या दोघांना अटक केली. या कारवाईत त्यांच्याकडून २४ हजार, ४० रूपयाची रोकड, दोन मोबाइल, यामाहा मोटरसायकल असा सुमारे ८३ हजार, ९४० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

येथील जय सांगली नाका परिसरात पानपट्टीमध्ये मटका घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस सुनील पाटील व सागर हारगुले यांच्यासह पथक तेथे गेले होते. दुपारी छापा टाकला. यावेळी पानपट्टीचालक विनायक तराळ याला पथकाने ताब्यात घेतले. मुलास ताब्यात घेतल्याच्या कारणावरून अनिल तराळ यांनी पोलिसांशी वाद घातला. तुम्ही मुलांना घेवून जावू नका. तुम्ही कसे घेवून जाता हे बघतोच, असे म्हणत पोलिस सुनील पाटील व हारगुले यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले. या कारवाईवेळी त्यांच्याकडून रोख २४ हजार रुपये, दोन मोबाइल, यामाहा कंपनीची मोटरसायकल (क्र. एम. एच. ०९ डीडब्ल्यू १२१३) यासह अन्य जुगाराचे साहित्य असा सुमारे ८३ हजार, ९४० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघाही तराळ पिता-पुत्रांना गावभाग पोलिसांनी अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांची जादू चालली; साताऱ्यातून उदयनराजे १० हजार मतांनी पीछाडीवर

$
0
0

सातारा: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या आधी खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीला रामराम ठोकणारे उदयनराजे भोसले तब्बल १० हजार मतांनी पीछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाती प्रचाराचा फटका उदयनराजेंना बसल्याचं बोललं जात आहे.

Live: पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची चांगली कामगिरी

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार पक्ष सोडून गेल्यानंतर उदयनराजे यांनीही भाजपमध्ये उडी मारली होती. त्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीनच महिन्यात त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. भाजपनं दिल्लीत मोठा इव्हेंट घडवून उदयन यांचा भाजप प्रवेश सोहळा घडवून आणला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयन यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली होती. मात्र, या कशाचाही फायदा उदयन यांना झाला नसल्याचं दिसत आहे. ते पीछाडीवर गेले आहेत.

शरद पवारांचे खंदे समर्थक व साताऱ्याचे माजी आमदार श्रीनिवास पाटील हे त्यांना जोरदार लढत देत असल्याचं दिसत आहे. उच्चशिक्षित असलेल्या श्रीनिवास पाटील यांच्याबाबत मतदारांमध्ये आपुलकीची भावना आहे. पवारांना मानणाऱ्या साताऱ्यातील मतदारांनी त्यांना साथ दिल्याचं दिसत आहे. अर्थात, मतमोजणीच्या अनेक फेऱ्या अद्याप बाकी असल्यानं अंतिम निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडद्याआड घडामोडी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. जाहीर प्रचाराची सांगता होऊन पडद्यामागून हालचालीने वेग घेतला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांना 'लक्ष्मी'चे दर्शन देण्यासाठी यंत्रणा गतिमान झाली असून अखेरच्या टप्प्यात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. पाठिंबा देणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून मतदारांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदानाच्या शेवटच्या घटकेपर्यंत मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लुप्त्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून रात्रभर लढवल्या जात होत्या.

विधानसभा निवडणुकीनिमित्त जिल्ह्यातील सर्वच पक्षातील उमेदवारांचा प्रचार टिपेला पोहोचला होता. पंधरा दिवसांपासून पदयात्रा, मोटारसायकल रॅली, कोपरा व जाहीर सभेच्या माध्यमातून दहाही मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले. स्टार प्रचारकांच्या उत्साहपूर्ण भाषणांनी वातावरण निर्मिती केली. स्थानिक पातळीवरील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी उमेदवारांवर जोरदार टीका केली. तर अनेक उमेदवारांनी फोडाफोडीच्या राजकारणात अधिक रुची दाखवली. एकमेकांचे कार्यकर्ते फोडत विरोधी उमेदवारांमध्ये धडकी भरवण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी अशा प्रयत्नांना यश आले.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकीतील हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. झालेल्या आणि न झालेल्या विकासकामांवर विद्यमान आमदार व विरोधी उमेदावारांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. प्रचाराच्या माध्यमातून एकमेकांच्या सहकारी संस्थांवर टिकेची झोड उठवली गेली. शनिवारी सायंकाळी सहानंतर मात्र प्रचाराची रणनितीच बदलली. रात्रीपासून छोट्या-मोठ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर वॉच ठेवण्यात येऊ लागला. मंडळांना विविध अमिषे दाखवून एकगठ्ठा मते खेचण्याचा प्रयत्न सुरू झाला. तो रात्री उशीरापर्यंत सुरू होता. साम, दाम, दंड आणि भेद या चतु:सूत्रीचा वापर करण्यात येऊ लागला आहे. यापैकी दाम आणि दंड याचा जोरदार वापर रविवारी रात्रभर झाला. दबावाचे राजकारण करताना मुक्तहस्ताने मतदारांना 'अर्थ' पुरवठा केला. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात ठेवली आहेत. गेल्या आठ दिवसांपासून जेवणावळीही झडत असताना मतदारांना पास देवून हॉटेल व धाब्यावर पाठवले जात आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंब्याचे व्हीडिओ व्हायरल केले जावू लागले आहेत.

सोमवारी सकाळी मतदानापर्यंत उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून विविध प्रलोभने दिली जाणार आहेत. सर्वच मतदारसंघांत कमालीची चुरस असल्याने अखेरची रात्रही अनेकांसाठी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

मद्य विक्री बंद

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बिअरबारसह मद्यविक्री आज रविवारपासून सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. तर गुरुवारी (ता.२४) होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी बिअरबार बंद राहणार आहेत. त्यामुळे तळीरामांची अडचण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांनीही हाती घेतला झाडू

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार थंडावला. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारामुळे रविवारच्या महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळाला. पण ज्येष्ठ नागरिकांनी ही कसर भरून काढत भरपावसात स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. ज्येष्ठ नागरिकांनी कर्मचाऱ्यांसोबत पंचगंगा घाटाची स्वच्छता केली. विविध परिसरात स्वच्छता करत सुमारे ५५ टन कचरा व प्लास्टिकची उचल करण्यात आली.

महापालिकेतर्फे दर रविवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबविली जाते. मे महिन्यापासून सुरू झालेल्या मोहिमेला सामाजिक संस्था, विद्यार्थी व पर्यावरणप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजचा रविवार मात्र अपवाद ठरला. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचारात व्यस्त असलेल्या शहरवासियांनी व विद्यार्थ्यांनी मोहिमेकडे पाठ फिरवली. रविवारी जाहीर प्रचार नसला, तरी पडद्यामागील घडामोडीत सहभागी असलेले कार्यकर्ते आले नाहीत. मात्र त्यांची अनुपस्थिती ज्येष्ठ नागरिकांनी भरुन काढली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह या ज्येष्ठ नागरिकांनी पंचगंगा घाट व यल्लमा मंदिर, रंकाळा तलावावरील शाहू स्मृती बाग, हुतात्मा पार्क आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. घाट परिसरातील पात्रातील मंदिरांवर साठलेला कचरा काढून टाकण्यात आला. घाटावरील पायऱ्यांचीही स्वच्छता करण्यात आली. विविध ठिकाणी राबवलेल्या स्वच्छता मोहिमेतून ५५ टन कचरा व प्लास्टिकची उचल करण्यात आली.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह सहायक आयुक्त संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाी, डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान यंत्र वाटपात पावसाचा व्यत्यय

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विधानसभेसाठी मतदान केंद्रांवर साहित्य पोहोचविण्याच्या प्रक्रियेत रविवारी दिवसभर पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे अनेक केंद्रांवर साहित्य पोहोचण्यास उशीर झाला. पावसाळी वातावरण असल्याने विवेकानंद कॉलेजमध्ये साहित्य वाटपाच्या ठिकाणी मोठा मंडप उभारण्यात आला होता. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पावसामुळे मंडपातही पाणी आले. परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे निवडणूक प्रशासनास काही काळ साहित्य वाटपाचे काम थांबवावे लागले.

जिल्ह्यातील ३ हजार ३४२ मतदान केंद्रावर आज, सोमवारी मतदान होणार आहे. सकाळी सातला मतदानाला प्रारंभ होणार आहे. केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी, पोलिस सर्व साहित्य घेऊन पोहोचत आहेत. त्यासाठी दहा ठिकाणी सकाळी ११ वाजल्यापासूनच साहित्य वाटपाला सुरूवात करण्यात आली. कर्मचारी, पोलिस कर्मचारी सकाळी सात वाजताच साहित्य वाटपाच्या हजर होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन त्यांना साहित्य वाटपाच्या ठिकाणच्या मंडपात केंद्रनिहाय आखून दिलेल्या जागांवर बसविण्यात आले. नंतर केंद्रनिहाय मतदान यंत्रांसह आवश्यक साहित्य केंद्राध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले.

स्वामी विवेकानंद कॉलेजमधील हॉलमधून शहरातील उत्तर मतदारसंघातील साहित्य वाटप करण्यात आले. त्यासाठी येथे मंडप उभारला होता. साहित्य आणि कर्मचारी नेण्यासाठी केएमटीच्या गाड्यांची रांग लागली होती. त्यामुळे कॉलेजसमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. साहित्य वाटप सुरू असताना दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पाऊस आला. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी हातात व्हीव्हीपॅट, इव्हीएम, शाईची बाटली आदी साहित्य घेऊन पाऊस जाण्याची प्रतिक्षा करीत थांबले होते.

व्यासपीठावर उपस्थित निवडणूक अधिकारी, 'पावसात मतदान यंत्र, साहित्य भिजवू नका' असे आवाहन करीत होते. शेवटी पाऊस थांबल्यानंतरच मतदान अधिकारी, कर्मचारी केएमटी बसमधून 'उत्तर' मतदानसंघातील मतदार केंद्रांवर जाऊन पोहचले. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदान साहित्याचे वाटप राजारामपुरीत ताराराणी विद्यापीठाच्या व्ही. टी. पाटील हॉलमधून तर करवीर मतदारसंघातील साहित्याचे वाटप रमणमळा परिसरातील शासकीय गोदामांतून करण्यात आले. तेथेही साहित्य वाटपात पावसामुळे तारांबळ उडाली.

मंडपातच डब्यातील जेवण

मतदान केंद्रांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्यात आली आहे. त्यामुळे शहर, करवीरमधील केंद्रातील कर्मचारी गडहिंग्लज, आजरा, चंदगड आदी तालुक्यातील आहेत. त्यांनी साहित्य ताब्यात घेतल्यानंतर त्याच ठिकाणी बसून डब्यातून आणलेल्या जेवणावर ताव मारला. त्यानंतर प्रशासनाने सोय केलेल्या वाहनातून ते केंद्रावर पोहचले. दरम्यान, केंद्रांवर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या पोस्टल मतदानाच्या पेट्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आल्या. यासाठी पोलिस बंदोबस्त असलेले विशेष वाहन तैनात केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी

$
0
0

जिल्ह्यातील १०६ उमेदवारांचे आज ठरणार भवितव्य

विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवार :

चंदगड : रमेश रेडेकर (अपक्ष), शिवाजी पाटील (अपक्ष), संग्राम कुपेकर (शिवसेना), सुभाष देसाई (अपक्ष), श्रीकांत कांबळे (बसपा), अप्पासाहेब भोसले (अपक्ष), अनिरुध्द रेडेकर (अपक्ष), संतोष पाटील (अपक्ष), प्रकाश रेडेकर (अपक्ष), नामदेव सुतार (अपक्ष), राजेश पाटील (राष्ट्रवादी), अप्पी पाटील (वंचित बहुजन आघाडी), अशोक चराटी (जनसुराज्य शक्ती), महेश पाटील (अपक्ष).

राधानगरी : प्रकाश आबिटकर (शिवसेना), के.पी. पाटील (राष्ट्रवादी), युवराज येडूरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), गोविंदा शिंदे (बसपा), जीवन पाटील (वंचित बहुजन आघाडी), अरुण डोंगळे (अपक्ष), प्रविण कोरगांवकर (अपक्ष), कृष्णा देसाई (अपक्ष), चंद्रकांत पाटील (अपक्ष), दिनकर चांदम (अपक्ष), राहुल देसाई (अपक्ष), सत्यजित जाधव (अपक्ष).

कागल : हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी), रवींद्र कांबळे (बसपा), संजय घाटगे (शिवसेना), सिध्दार्थ नागरत्न (बहुजन मुक्ती पार्टी), समरजित घाटगे (अपक्ष), श्रीपती कांबळे (अपक्ष).

कोल्हापूर उत्तर : अजय प्रकाश कुरणे ( बहुजन समाज पार्टी), चंद्रकांत जाधव (कॉँग्रेस), राजेश क्षीरसागर (शिवसेना), सतीशचंद्र कांबळे (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), राहुल राजहंस (वंचित बहुजन आघाडी), अमित अतिग्रे (अपक्ष), सलीम बागवान (अपक्ष), संभाजी साळुंखे (अपक्ष).

कोल्हापूर दक्षिण : अमल महाडिक (भाजप), ऋतुराज पाटील (काँग्रेस), सचिन कांबळे ( बहुजन समाज पार्टी), चंद्रकांत नागांवकर (बहुजन मुक्ती पार्टी), बबनराव कावडे (वंचित बहुजन आघाडी), अमित महाडिक (अपक्ष), राजेंद्र कांबळे (अपक्ष), सलीम बागवान (अपक्ष).

करवीर : चंद्रदीप नरके (शिवसेना), पी. एन. पाटील (काँग्रेस), बजरंग पाटील (बसपा), डॉ. आनंदा गुरव (वंचित बहुजन आघाडी), गोरख कांबळे (बहुजन मुक्ती पार्टी), डॉ. प्रगती चव्हाण (संभाजी ब्रिगेड पार्टी), ॲड. माणिक शिंदे (बळीराजा), अरविंद माने (अपक्ष).

शाहूवाडी : गौतम कांबळे (बसपा), सत्यजीत पाटील (शिवसेना), भारत पाटील (शेकाप), डॉ. विनय कोरे (जन सुराज्य शक्ती), डॉ. सुनिल पाटील (वंचित बहुजन आघाडी) , अफजल देवळेकर (अपक्ष), आनंद यादव (अपक्ष), विनायक गुजर (अपक्ष), विनायक जाधव (अपक्ष),सत्यजित पाटील (अपक्ष), संतोष खोत (अपक्ष).

हातकणंगले : राजू आवळे (काँग्रेस), चंद्रशेखर कांबळे (बसपा), डॉ. सुजित मिणचेकर (शिवसेना), दलितमित्र डॉ. अशोकराव माने (जनसुराज्य शक्ती), किरण कांबळे (ताराराणी पक्ष), एस. पी. कांबळे (वंचित बहुजन आघाडी), सागर शिंदे (एमआयएम), डॉ. अविनाश सावर्डेकर (अपक्ष), शिवाजी आवळे (अपक्ष), प्रदीप कांबळे (अपक्ष), ॲड. तेजस पठाणे (अपक्ष), प्रशांत गंगावणे (अपक्ष), राजीव किसनराव आवळे (अपक्ष), राजू वायदंडे (अपक्ष), राहुल पाटोळे (अपक्ष), संदीप दबडे (अपक्ष).

इचलकरंजी : उमेश खांडेकर (बसपा), राहुल खंजिरे (काँग्रेस), सुरेश हाळवणकर (भाजपा), शशिकांत आमणे (वंचित बहुजन आघाडी), इस्माईल समडोळे (स्वराज इंडिया), संतोष कोळी (बाळमहाराज) (अखिल भारतीय हिंदू महासभा), अभिजीत खोत (अपक्ष), कुबेरसिंग रजपूत (अपक्ष), नितीन लायकर (अपक्ष), प्रकाश आवाडे (अपक्ष), बाळकृष्ण म्हेत्रे (अपक्ष), शकुंतला मगदूम (अपक्ष), शाहूगोंडा पाटील (अपक्ष), संजय पोळ (अपक्ष).

शिरोळ : आदम मुजावर (बसपा), उल्हास पाटील (शिवसेना), सावकर मादनाईक (स्वाभिमानी पक्ष), अनिलकुमार यादव (जन सुराज्य शक्ती), सुनिल खोत (वंचित बहुजन आघाडी), जितेंद्र ठोंबरे (अपक्ष), प्रमोद पाटील (अपक्ष), राजेंद्र पाटील - यड्रावकर (अपक्ष), शिवाजी संकपाळ (अपक्ष).

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी, २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी यंत्रे आणि इतर साहित्य तालुक्याच्या ठिकाणी पोहच करून ती स्ट्राँगरूममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत मतदान होणार आहे.

मतदार

चंदगड : ३१८९१३

राधानगरी : ३२५५३८

कागल : ३२२४६९

कोल्हापूर दक्षिण : ३२४३६७

करवीर : ३०३१७७

कोल्हापूर उत्तर : २८५४४७

शाहूवाडी :२८७४४७

हातकणंगले : ३१७६६८

इचलकरंजी : २९३२४३

शिरोळ : ३१२३९१.

एकूण ३० लाख ९० हजार ६६०

...

१०

निवडणूक निर्णय अधिकारी

३१

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी

एका मतदान केंद्रावर कर्मचारी

२६ हजार ९८२

एकूण कर्मचारी

७०

संवेदनशील केंद्रे

मतदानासाठीची ११ प्रकारची कागदपत्रे

- पासपोर्ट

- वाहनचालक परवाना

- शासकीय, निमशासकीय, महामंडळ कर्मचाऱ्यांचे छायाचित्रासह ओळखपत्र

- छायाचित्र असलेले बँकेचे आणि पोस्टाचे पासबूक

- पॅनकार्ड

- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत स्मार्ट कार्ड

- जॉब कार्ड

- हेल्थ इन्शूरन्स स्मार्ट कार्ड

- छायाचित्रासहीत निवृत्तीवेतन कागदपत्रे

- खासदार, आमदारांना दिलेले शासकीय ओळखपत्र

- आधारकार्ड

दहा सखी केंद्रे

चंदगड : नेसरी

राधानगरी : फेजिवडे, अनाप खुर्द

कागल : गोपालकृष्ण गोखले विद्यामंदिर

कोल्हापूर दक्षिण : रोटरी विद्यालय, केडीसीसी बँकेजवळ

शाहूवाडी : उकळी

हातकणंगले : रामराव इंगळे हायस्कूल

इचलकरंजी : बाबासाहेब खंजिरे नाईट कॉलेज

शिरोळ : पद्माराजे विद्यालय

दहा आदर्श केंद्रे

चंदगड : अडकूर

राधानगरी : गारगोटी

कागल : म्युनिसिपल हॉल, कागल

कोल्हापूर दक्षिण : रोटरी विद्यालय

कोल्हापूर उत्तर : इस्टर्न पॅटर्न गर्ल्स स्कूल

शाहूवाडी : पन्हाळा कुमार विद्यामंदिर

हातकणंगले - रामराव इंगवले हायस्कूल

इचलकरंजी : गंगामाई गर्ल्स हायस्कूल

शिरोळ : छत्रपती शिवाजी विद्यामंदीर

मतदारांसाठी हेल्पलाइन : १९५० टोल फ्री

दिव्यांग मतदारांसाठी अॅप : pwd

मतमोजणीचे ठिकाण

चंदगड : नगरपरिषद पॅव्हेलियन हॉल गडहिंग्लज

राधानगरी, भुदरगड : जवाहर बाल भवन मौनी विद्यापीठ, गारगोटी

कागल : जवाहर नवोदय विद्यालय सांगाव रोड

शाहूवाडी : जुने शासकीय गोदाम

हातकणंगले : नवीन प्रशासकीय इमारत

इचलकरंजी : राजीव गांधी भवन, कापड मार्केटसमोर

शिरोळ : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शिरोळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चा तर होणारच

$
0
0

जिंकण्यासाठीच सारे काही

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली तर गेल्या महिनाभरातील आरोप-प्रत्यारोप, व्यक्तीगत टिकाटिप्पणीमुळे आणखी काही दिवस राजकीय धुरळा उडत राहणार आहे. वास्तविक विधानसभा निवडणुकीत संपूर्ण मतदारसंघातील सर्वांगिण विकासाचा अजेंडा, उद्योगधंदा, रोजगार निर्मितीला चालना, तरुणांच्या हाताला काम याविषयी चर्चा घडायला हवी होती. मात्र नेहमीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही हे सारे बाजूला पडले आणि बहुतांश सर्वच उमेदवारांनी व्यक्तीगत टिकाटिप्पणी करत प्रचाराची दिशाच बदलली. 'जिंकण्यासाठी सारे काही' या सुत्राचा अवलंब झाला. भोजनावळी, सहली आणि 'लक्ष्मी'दर्शनाचा कार्यक्रम घडला. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात तर प्रचाराची पातळी आणखी घसरली. कोल्हापूर दक्षिण आणि कागल मतदारसंघात तर प्रचारात कुटुंबीयांना गोवले गेले.

जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात यंदा अटीतटीची लढाई आहे. या निवडणुकीत ज्या त्या मतदारसंघातील विकासकामाचा अजेंडा, परराज्यात निघालेले उद्योग, खुंटलेली रोजगार निर्मिती, रोजगाराच्या शोधातील तरुण या अनुषंगाने पक्ष आणि उमेदवारांकडून अपेक्षित कृती कार्यक्रम आवश्यक होता. मात्र युद्धात आणि प्रेमात सारे काही माफ असते याची प्रचित घडवित विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी व्यक्तीगत उणीदुणी काढत फड गाजविला. निवडणुकीच्या सुरुवातीच्या कालावधीत शिवसेना, भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र होते.

प्रचाराला कालावधी उलटत गेला तसे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी पक्षाने जिल्ह्यात कडवे आव्हान उभे केले. खरं तर हा जिल्हा काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, मात्र गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत भाजप, सेनेने जिल्ह्यातील एकेक गड सर केले. दोन्ही काँग्रेसच्या मातब्बर मंडळींना आपल्यात सामावून घेतले. प्रत्येकाला काही ना काही शब्द दिला. कोणाला विधानसभेची उमेदवारी, कोणाला महामंडळाचे अध्यक्षपद यामुळे युतीमध्ये भरपूर 'इनकमिंग'झाले. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत युती आणि आघाडी धर्म पाळला नाही. प्रत्येकाला आमदारकीची वेध लागलेले. यामुळे अनेकांनी 'तिकीट दिले तर पक्षासोबत, उमेदवारी नसल्यास स्वतंत्र'असा बाणा ठेवत निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

बंडखोरीचे ग्रहण सुटावे म्हणून काही ठिकाणी दबावतंत्राचा अवलंब झाला. निलंबनाची भिती घातली. काही जणांना अन्य ठिकाणी सामावून घेण्याचे ठरले. मात्र बंडखोरांनी लढण्याचा बाणा कायम ठेवला. राजकारणातील जुने हिशेब चुकते केले. पडद्याआड राहून रसद पुरविली. आघाडी आणि युतीतही काही ठिकाणी संशयकल्लोळ निर्माण झाला. शिरोळ तालुक्यात आघाडीतील काही मंडळी गेल्या निवडणुकीत हातात हात घालून काम करत होते. आता आता एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकले. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमध्ये युती आणि आघाडीधर्माचा पुरता खेळखंडोबा झाला. कोणी विरोधी उमेदवारांच्या गळ्यात गळे घातले.

कुणी पक्षात राहूनच स्वपक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केले. त्याला ना पदाधिकारी अपवाद ना कार्यकर्ते. सगळयांचेच सोयीचे राजकारण. दक्षिण आणि करवीरमध्ये फोडाफोडीचे राजकारण रंगले. 'चंदगड'मध्ये भाऊबंदकी उफाळली. हातकणंगलेमध्ये उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे निकालाचा अंदाज लागेना अशी स्थिती बनली आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची समजून प्रत्येक मतदारसंघात अख्खे कुटुंब प्रचारात उतरले. यामुळे प्रचाराला कौटुंबीक झालर लाभली. परिणामी एक, दोन मतदारसंघात उमेदवारापुरती मर्यादित ही निवडणूक कुटुंबाभोवती फिरली. कार्यकर्त्यांतील राजकीय ईर्षा आणखी वाढली. सर्वच मतदारसंघात जाहीर सभेपेक्षा पदयात्रा, गाठीभेटीवर भर दिला. मतदानाची अंतिम टप्प्यात सर्व भोजनावळींना ऊत आला. आर्थिक घडामोडी वेगावल्या. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभा गाजल्या. मतांचे पॉकेट मिक्स करण्यासाठी कारभाऱ्यांनी रात्र जागवली.

- आप्पासाहेब माळी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यास हद्दपारीची नोटीस

$
0
0

कारवाई एकतर्फी असल्याचा स्वाभिमानीचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भोगावती परिसरातील युवा अध्यक्ष जनार्दन पाटील यांना करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे यांनी रविवारपासून पाच दिवसांसाठी हद्दपार करण्याची नोटीस दिली आहे. दरम्यान, 'पाटील यांच्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीच्या आंदोलनातील विविध गुन्हे आहेत. ते वारकरी आहेत. दरवर्षी चालत पंढरपूरला जातात. समाजविघातक असे त्यांचे वर्तन नाही. अशा कार्यकर्त्याला प्रशासनाने हद्दपारीची एकतर्फी नोटीस काढून दडपशाही केली आहे', असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. जिल्ह्यातील दहा ते बारा कार्यकर्त्यांना अशा नोटिसा दिल्या आहेत, असेही त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले.

जनार्दन पाटील यांचे गाव करवीर तालुक्यातील परिते आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक स्वरूपाचे गुन्हे नाहीत. शेतकरी चळवळीतील गुन्हे आहेत. तरीही त्यांची बाजू ऐकून न घेताच तहसीलदार मुळे यांनी पोलिस अहवालावरून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकरी आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोणाच्या दबावामुळे पाटील यांच्यावर अन्यायी कारवाई केली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

नोटीसीमध्ये म्हटले आहे, पाटील यांच्याकडून निवडणूक काळात सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग निर्माण होईल, असे कृत्य शहरात आणि करवीर तालुक्यात होऊ शकते. त्यांच्याकडून अनुचित व विघातक घटना टाळणे महत्वाचे वाटते. यामुळे २० ते २५ ऑक्टोबरअखेर पाटील यांनी हद्दपार व्हावे. शहर आणि करवीर तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करू नये.

दरम्यान, अशी कारवाई करण्यापूर्वी नोटीस देणे अपेक्षित होते. त्यांची बाजू ऐकून घेऊन हद्दपार करण्याची प्रक्रिया आहे. हे सर्व टाळून पाटील यांना थेट हद्दपारीचीच नोटीस दिली आहे.

...

कोट

'स्वाभिमानी'चे पदाधिकारी, कार्यकर्ते कोणत्याही दबावाला,अमिषाला बळी पडत नाही. यामुळे सरकार प्रशासनाला हाताशी धरून कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटिसा काढून त्रास देत आहे. जिल्ह्यातील १० ते १२ कार्यकर्त्यांना हद्दपारीची नोटीस दिली आहे. हे अन्यायकारक असून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे.

राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा विकासाचा ‘शिक्षक’ पॅटर्न

$
0
0

महापालिकेचा लोगो वापरावा....

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर

महापालिका शाळा टिकाव्यात, त्या ठिकाणी मुलांना आवश्यक सोयीसुविधा असाव्यात यासाठी शहरातील शिक्षक व सेवकांनीच पुढाकार घेतला आहे. महापालिका शाळेतील शिक्षक दरमहा ठराविक रक्कम जमा करतात आणि ज्या शाळेतील भौतिक सुविधांसाठी पैशाची गरज आहे त्यांना मदत करतात. आतापर्यंत ३० शाळांना मिळून दीड लाख रुपयांची रोख मदत केली आहे. शाळा विकासाचा हा महापालिकेच्या शिक्षकांचा पॅटर्न कौतुकाचा विषय ठरला आहे.

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या शहरात ५९ शाळा आहेत. यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दहा हजाराच्या आसपास आहे. शिक्षण समितीच्या मालकीच्या या शाळांनी गेल्या काही वर्षात कात टाकली आहे. शिक्षकांचे प्रयत्न, लोकसहभाग यामुळे अनेक शाळांचा कायापालट झाला. पटसंख्या वाढीस लागली. शैक्षणिक गुणवत्तेसह शिष्यवृत्ती व अन्य परीक्षेत महापालिका शाळेतील अभ्यास पॅटर्नचा गाजावाजा झाला. शिक्षकांकडून शाळा टिकविण्यासाठी आणि पटसंख्या वाढीसाठी सामूहिकपणे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अनेकदा प्रशासकीय पातळीवरुन सहकार्य लाभण्यास विलंब होतो. शाळा व शिक्षकांच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षकांनी 'शाळा विकास संस्था' या नावांनी काम करण्याचे ठरविले. यासाठी नऊजणांची एक समिती नेमली आहे. समितीमध्ये शिक्षक आणि शिक्षण समितीमधील अधिकारी आहेत. यामध्ये शिक्षण समितीमधील अधिकारी बाळासाहेब कांबळे, विजय माळी, शिक्षक संभाजी चौगुले, स्मिता पुनवतकर, दीपमाला ओतारी, राहुल बागडे, प्रभाकर लोखंडे, अमित जाधव, अविनाश लाड यांचा समावेश आहे. मात्र या समितीमध्ये कोणी अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही. सगळे समान कार्यरत असून 'शाळा संवर्धन निधी'साठी काम करत आहेत. महापालिका शाळेतील शिक्षकांची संख्या ३५० च्या आसपास आहे. तर सेवकवर्ग १००च्या घरात आहे. दर महिन्याला शाळा विकासासाठी ही मंडळी ठराविक रक्कम जमा करतात. प्रत्येकजण स्वेच्छेने रक्कम जमा करतो. यासाठी शिक्षकांच्या पतसंस्थेत खाते उघडले आहे. जमा झालेल्या निधीतून शाळेसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर आहे. या उपक्रमाला इतरांची साथ लाभत मिळत आहे. शिक्षकांमधून जे अधिकारी बनले आहेत, ते देखील शाळा विकास निधीला सहकार्य करत आहेत.

...

कोट

'शिक्षक व सेवकवर्ग दरमहा ठराविक रक्कम शाळा विकासासाठी जमा करतात. जमलेली रक्कम दोन शाळांना दिली जाते. तत्पूर्वी त्या शाळेला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे जाणून घेतले जाते. रक्कम दिल्यानंतर त्याचा विनियोग संबंधित शाळेने कसा केला हे समजावे म्हणून त्याचा तपशील मागविला जातो. प्रारंभी ५० शिक्षकांचा यामध्ये समावेश होता. आता त्याची व्याप्ती वाढली असून बहुतांश सर्वच शाळेतील शिक्षकांचा सहभाग आहे.

विजय सुतार, शिक्षक

....

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची हवी साथ

महापालिका शाळांचा लौकिक वाढविण्यासाठी शिक्षक शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात. त्यांना पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासनाची साथ आवश्यक आहे. शिक्षकांचे काही प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, पदोन्नती यासह शाळेतील अन्य सुविधांसाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. आयुक्तांनी या प्रश्नी लक्ष घातल्यास, शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक केल्यास महापालिका शाळांचा दर्जा आणखी उंचाविण्यासाठी शिक्षक आणखी जोमाने काम करतील, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुस्ती आधुनिकतेकडे नेणारा मल्ल

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet.satishgMT

कोल्हापूर : कोल्हापूरच्या लाल मातीची कुस्ती परंपरा जपणारा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लढण्यासाठी मॅट कुस्तीचा कास धरणाऱ्या शक्तिशाली लढवय्या मल्लांची परंपरा अखेरपर्यंत महान भारत केसरी, रुस्तम-ए-हिंद पैलवान दादू चौगुले यांनी जोपासली. चौगुले घराण्याच्या कुस्तीचा वारसा अखंड जपला. मुलगा विनोद याला घडवित हिंद केसरीची गदा त्यांनी घरात आणली. अखेरपर्यंत कुस्तीची नाळ न तोडता नवीन मल्ल घडवण्यासाठी आपले योगदान दिले.

कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथे १९४६ शेतकरी कुटुंबात जन्म झाला. वडीलही पैलवान असल्याने घरातच कुस्तीचे बाळकडू मिळाले. पैलवानकी करण्यासाठी ते मोतीबाग तालमीत आले. अर्जुन पुरस्कार विजेते गणपतराव आंदळकर, बाळ गायकवाड, बाळू गिरे यांच्या हाताखाली कुस्तीचे डाव गिरवले. मोठी उंची आणि पीळदार शरीर असलेल्या चौगुले यांचा व्यायाम पाहण्यासाठी तालमीत गर्दी व्हायची. आखाड्यात चौगले उतरले की प्रतिस्पर्धी मल्ल गर्भगळीत व्हायचा. हार, जीत होईल, अशी भीती न बाळगता ते प्रतिस्पर्धी मल्लाशी भिडले. दादू मामा ही त्यांची ओळख होती.

महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन वेळा जिंकून त्यांनी उत्तरेच्या बुरुजबंद मल्लांना आव्हान दिले. खासबाग मैदानात गणपतराव खेडकर आणि डब्बल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार यांच्यावर विजय मिळवत त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत आव्हान निर्माण केले. १९७३ मध्ये त्यांनी भारतातील दोन महत्त्वाचे किताब जिंकून त्यांनी दबदबा निर्माण केला. मुंबईत रुस्तम-ए-हिंद किताब मिळवताना हिंद केसरी दीनानाथ सिंह यांना पराभूत केले. दिल्लीत उत्तरेचा प्रसिद्ध मल्ल नेत्रपालला चारीमुंड्या चित करत महान भारत केसरीचा किताब पटकावत भारतात दबदबा निर्माण केला. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे कौतुक केले.

लाल मातीत कुस्ती करताना मॅटवरील कुस्तीतही त्यांनी प्रभुत्व मिळवले. १९७२ मध्ये ऑकलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हेवीवेट गटात कॅनडाचा मल्ल काऊडे पिटॉनशी लढत दिली. पण गुणावर झालेल्या अंतिम लढतीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला तरी त्यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिले. त्यांनी सतपाल, हरिश्चंद्र बिराजदार, कर्तारसिंग, आनंद रॉय या मल्लाबरोबर लढत दिली. रॉय हा त्या काळात भारतातील ताकदवान मल्ल होता. पण त्यालाही चौगुलेंनी आस्मान दाखवले. सतपाल यांच्याबरोबर त्यांची मैत्री कायम होती. सतपाल यांनी पराभव केल्यानंतर मल्लसम्राट युवराज पाटील यांना अगदी निगुतीने घडविले. यामागे पाटील यांनी सतपाल यांच्यावर विजय मिळवावा हा एकच हेतू होता.

कारकीर्द संपल्यानंतर चौगुले यांनी शेती, जमीन व्यवहारात जम बसवत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले. राष्ट्रीय तालीम संघाच्या मोतीबाग तालमीत अनेक मल्ल घडवले. त्यांची दोन्ही मुले विनोद आणि अमोल यांनी कुस्तीत नशिब आजमावले. विनोद यांनी नाशिक येथे हिंद केसरीची गदा पटकावत वडिलांची कुस्ती परंपरा कायम ठेवली. गतवर्षी त्यांच्या कुस्तीतील उल्लेखनीय कारकीर्दीबद्दल भारत सरकारने मानाचा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने गौरवले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पुरस्कार स्वीकारल्यावर त्यांना अत्यानंद झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महान भारत केसरी दादू चौगले यांचे निधन

$
0
0

\B

\B

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महान भारत केसरी, रुस्तम ए हिंद पैलवान दादू चौगले (वय ७३) यांचे रविवारी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुस्तीविश्वावर शोककळा पसरली. सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, तीन बहिणी, दोन भाऊ, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने तीन दिवसांपूर्वी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना ते कोमामध्ये गेले. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अंबाबाई मंदिर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी गर्दी केली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज , हिंदकेसरी दीनानाथ सिंह, वस्ताद बाळ गायकवाड, बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील, तालीम संघाचे सचिव ॲड महादेवराव आडगुळे, अशोक माने, चंद्रकांत चव्हाण, राजाराम चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, संभाजी वरुटे यांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली

अनेक नामवंत मल्लांना चितपट करणारे दादू चौगले यांची 'वज्रदेही मल्ल' म्हणून ओळख आहे. कुस्तीचा प्रसार, संघटन, नवीन मल्लांना प्रशिक्षण अशा सर्व क्षेत्रात त्यांनी प्रभावी कामगिरी केली. गतवर्षी केंद्र सरकारने त्यांना मानाचा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार देवून गौरवले. तर राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ते विद्यमान कार्याध्यक्ष तर कोल्हापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. मोतीबाग तालमीचे वस्ताद म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाड येथे जन्मलेल्या दादू चौगले यांची वयाच्या सातव्या वर्षी कुस्तीशी जुळलेली नाळ अखेरपर्यंत कायम राहिली. त्यांनी वस्ताद हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, बाळू बिरे यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले. १९७० मध्ये परशुराम पाटील यांना पराभूत करुन महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. १९७३ मध्ये दीनानाथ सिंह यांना अवघ्या एका मिनिटात नमवत 'रुस्तुम-ए-हिंद' हा मानाचा किताब पटकावला. त्याच वर्षी दिल्लीच्या नेत्रपालला हरवून 'महान भारत केसरी' ही मानाची गदा पटकावली. १९७३ मध्ये न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हेवीवेट गटात फ्री स्टाईल प्रकारात त्यांनी रौप्य पदकावर नाव कोरले. सत्पाल, सादिक पंजाबी, कर्तारसिंग, विजय कुमार, जगदिश मित्तल, नेत्रपाल या नामांकित मल्लांबरोबर झालेल्या त्यांच्या कुस्त्या विशेष गाजल्या. त्यांची कुस्ती परंपरा मुलगा विनोद याने 'हिंदकेसरी' किताब पटकावत पुढे चालवली आहे.

...

कोट

'दादू चौगले यांच्या जाण्याने कुस्ती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. नव्या दमाचे पैलवान घडविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी कुस्ती क्षेत्रात कोल्हापूरचे नाव उंचावले. त्यांची कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असे. यशापयशाची कोणतीही पर्वा न करता त्यांनी कुस्तीक्षेत्रात आपली वाटचाल चालू ठेवली. उत्कृष्ट मल्ल घडवण्यात त्यांनी आयुष्य वेचले.

राम सारंग, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते

...

'एक महान मल्ल म्हणून दादू चौगले यांचे नाव कायम राहील. कुस्ती हेच त्यांचे जीवन होते. कुस्तीतील डावांसह आधुनिकतेची जोड देत त्यांनी अनेक दशके मनोभावे या क्षेत्राची सेवा केली. राष्ट्रकुलसारख्या कुस्ती स्पर्धेतही त्यांनी आपल्या कुस्तीची चुणूक दाखवत आंतरराष्ट्रीयस्तरावर देशाचे नाव उंचावले. कुस्तीच्या प्रगतीसाठी ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले.

विष्णू जोशीलकर, महाराष्ट्र केसरी

....

'संपूर्ण समर्पित भावनेने कुस्तीसाठी आयुष्य वेचलेल्या दादूमामांच्या जाण्याने अतीव दुःख होत आहे. त्यांच्याकडून कुस्तीतील अनेक पैलू आत्मसात केले. नवे खेळाडू घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. येणारा काळ त्यांना कुस्तीतील अनमोल हिरा म्हणून कायम स्मरणात ठेवेल. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्राचा खराखुरा मार्गदर्शक हरपला आहे.

नामदेव मोळे, महाराष्ट्र केसरी

...

'भारतातील शक्तिमान मल्ल म्हणून भारतात दादू चौगलेंचा दबदबा होता. हातजीत याची भिती न बाळगता निडरपणे ते आखाड्यात मल्लाशी भिडत. चटकदार आणि वेगवान कुस्ती खेळण्यात त्यांचा हातखंडा होता. मातीबरोबर मॅटवरील कुस्तीच्या विकासासाठी ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले.

बापूसाहेब राडे, कुस्ती समालोचक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिवृष्टीने शहराची दैना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

परतीच्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशी शहर आणि जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. मेघगर्जनेसह पावसाच्या मोठ्या सरी जवळपास दोन तास कोसळत होत्या. शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतूक विस्कळित झाली.

ढगांचा कडकडाट, अधूनमधून चमकणारी वीज,धो-धो कोसळणारा पाऊस आणि रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे लोट यामुळे नागरिकांच्या मनात धडकी भरली. गटारी भरून वाहू लागल्याने रस्त्यांवर पाणी तुंबले.

जोरदार पावसामुळे लहानसहान व्यावसायिक, फेरीवाल्यांचा व्यवसाय पाण्यात वाहून गेला. दिवसभरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ झाली. रविवारी दिवसभराच्या पावसामुळे नागरिकांचेही बेहाल झाले. जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते बसंत बहार रोडवर फूट-दीड फूट पाणी साचले. परिणामी या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून दीड फूटावरून पाणी वाहत असल्यामुळे दुचाकी वाहनांना काही वेळ या मार्गावर वाहतुकीस मनाई केली होती. परीख पुलाखाली दोन ते अडीच फूट पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. मध्यवर्ती बसस्थानकडून परीख पुलाकडे पाण्याचे लोट वाहत होते. पुलाखालीला परिसराला ओढ्याचे स्वरूप लाभले होते.

जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते महावीर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाटलाचा वाडा हॉटेल येथे गुडघाभर पाणी होते. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल समोरील रस्ता, आयटीपार्क रोड, बिंदू चौक, निकम पार्क, संभाजीनगर ते नंगीवली चौक, न्यू महाद्वार रोडवरून पावसाचे पाणी वाहत होते. या भागातील ठिकठिकाणच्या रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. गटारी तुडूंब रस्त्यावर पसरलेल्या पाण्यामुळे रस्त्यातील खड्डयांचा अंदाज न आल्यामुळे वाहने घसरून किरकोळ अपघात घडले. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, दुधाळी परिसरातील रस्त्यांवर प्रचंड पाणी साचल्याचे चित्र होते. शहरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता.

झाडे कोसळली; भिंती पडल्या

ग्रामीण भागात ठिकठिकाणी घराच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. चंदगड तालुक्यातील तुडये येथील प्रभाकर पाटील यांच्या घराची भिंत कोसळून ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गडहिंग्लज येथील काळभैरव रोडवरील खोत वसाहत येथे मोठे झाड कोसळले. शहरातही अनेक भागात घरात पाणी घुसून प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाल्याचे प्रकार घडले. रविवारी सकाळी आठ वाजताच्या नोंदीनुसार जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३९८.२७ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ३३. ३५ मिली पाऊस पडला आहे. कोल्हापूर शहर, करवीर, कागलसह हातकणंगले, शिरोळमध्ये पावसाचा धडाका कायम होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बालिंगा रोडवरील एस. आर. पेट्रोल पंपानजीक झाड कोसळल्याची घटना घडली.धुवाँधार पावसामुळे रविवारची पहाट कधी उजाडली हे नागरिकांच्या लक्षात आले नाही. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मोठ्या सरी कोसळण्यास सुरुवात केली. तासभर पाऊस कोसळत राहिला. गटारी तुंबून रस्त्यावर पाणी पसरले. गेले दोन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे जयंती नाला ओव्हर फ्लो झाला. जयंती नाल्याच्या बंधाऱ्यावरुन सांडपाणी वाहून थेट पंचगंगा नदीत मिसळले.

पावसाने यंदा कहर केला आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. दरवर्षी दिवाळी सणाच्या कालावधीत दिवसभरात हजारो रुपयांची विक्री व्हायची. यंदा मात्र आमचा सारा व्यवसाय पाण्यात वाहून गेला आहे.

विद्या महाजन, कपडे विक्रेते महाद्वार रोड

बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यावर पाणीच पाणी

महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, राजारामपुरी जनता बझार चौक, लक्ष्मीपुरी धान्य लाइन बझारमधील प्रमुख रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. लक्ष्मीपुरीतील रस्त्यावर फूटभर पाणी साचल्यासारखी स्थिती होती. लहानसहान व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

शहरातील वाहतुकीचा बोजवारा

जनजीवन विस्कळीत

परीख पुलाखाली अडीच फूट पाणी

जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते बसंत बहार रोडवर दीड फूट पाणी

महाद्वार रोड, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, ताराबाई रोडवरील बाजार पाण्यात

केव्हीज पार्क, निकम पार्क, देवकर पाणंद, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसमोरील रस्त्यावरही पाणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन खांब कोसळले

$
0
0

दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे पाचगाव परिसरातील झाड उच्चदाब वीज वाहिनीवर कोसळले. रामानंदनगर वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही वाहिनीचे तीन खांब झाड कोसळल्याने मोडून पडले. यामुळे या वाहिनीवरील पाचगाव परिसरातील आठ रोहित्रावर अवलंबून २५०० ग्राहकांचा वीज पुरवठा शनिवारी रात्रीपासून बंद झाला होता. महावितरणच्या आरकेनगर शाखेतील कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी पावसातही दुरुस्तीचे काम हाती घेतले. रामानंदगर येथील ओढ्यात पाणी वाढल्यामुळे रस्त्याच्या कामात अडथळे आले. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत सायंकाळी सात वाजता वीज पुरवठा सुरळीत केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात ३४ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

$
0
0

सोलापुरात ३४ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

सोलापूर :

विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ३४ लाख ३४ हजार ५४९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अकरा मतदारसंघात प्रमुख पक्षाच्या ७० उमेदवारांसह एकूण १५४ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील ३ हजार ५२१ केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी १९ हजार २५२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना रविवारी त्या-त्या मतदारसंघात निवडणूक साहित्यासह ईव्हीएम मशिनचे वाटप केले गेले. कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी ५२२ एसटी बसेस, २२२ जीप व आवश्यकतेनुसार अन्य वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. ६ हजार ५०५ बॅलेट युनिट, ४ हजार ५८९ कंट्रोल युनिट तर ४ हजार ६९५ व्हीव्हीपॅट यंत्रे रवाना झाली आहेत.

एकाच मतदान केंद्रावर १५०० पेक्षा अधिक मतदार झाल्याने ४१ सहाय्यक मतदान केंद्रे नव्याने स्थापन केली आहेत. तसेच इमारती जीर्ण झाल्याने व त्या ठिकाणी आवश्यक सुविधा नसल्याने ७२ ठिकाणचे मतदान केंद्र बदलले आहेत. शिवाय ३० मतदान केंद्राच्या नावात बदल करण्यात आला आहे. ३ हजार ५२१ मतदान केंद्रापैकी ३५२ केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार आहे. यामध्ये ९२ संवेदनशील केंद्राचा समावेश आहे. संवेदनशील मतदान केंद्राच्या दहा टक्के मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. शहर उत्तर मतदारसंघात २०, दक्षिण सोलापूर मतदारसंघात १७ केंद्रे संवेदनशील आहेत. प्रचारावर केला जाणारा खर्च व प्रत्येक घडामोडींवर निवडणूक निरीक्षकांची नजर आहे. यासाठी फिरती व स्थिर पथके तैनात करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मांडुळाची तस्करी करण्याऱ्या दोघांना अटक

$
0
0

मांडुळाची तस्करी करण्याऱ्या दोघांना अटक

सातारा

सांगली व सातारा जिल्हामध्ये काही टोळ्यांकडून अंधश्रद्धेपोटी वन्यप्रान्याची खरेदी करीत असलेची माहिती वन विभागाकडे प्राप्त झाली होती. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावाच्या हद्दीमध्ये कारगणी रोड लगत वन विभागाच्या पथकाने सापळा रचून दोन इसमांना मांडूळ या सर्पाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असताना मांडूळ सर्पासह रंगेहाथ ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणी विभागाच्या पथकांनी सांगली व सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण आठ इसमांना अटक केली आहे. तानाजी मारुती चव्हाण (रा. चिनके, ता. सांगोला), शिवाजी सोपान बनसोडे (रा. नाझरे, ता. सांगोला), शाहरुख ऊर्फ नयन दावल सुभेदार (रा. जवळा, ता. सांगोला), सलीम हुसेन मुजावर (रा. इस्लामपूर), कुमार राजाराम ढोबळे (रा. इस्लामपूर), प्रितम सतिश पवार (रा. इस्लामपूर), प्रवीण उर्फ अमोल सुबराव (रा. लेंगरे, ता. खानापूर) संजय ज्ञानू जाधव (रा. लेंगरे) या आठ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक दोन चाकी गाडी व सात मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

............

बामणोली येथून शिवसागर जलाशयाच्या पलिकडच्या भागातील मतदान केंद्रावर जाण्यासाठी लाँचमधून जावे लागते.

======================

साताऱ्यात २९७८ मतदान केंद्रांवर होणार मतदान

सातारा :

सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, जिल्ह्यात २९७८ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या सर्व मतदान केंद्रांवरून रविवारी बावीस हजार कर्मचारी येथील शाहू स्टेडियमवरून मतदान साहित्यासह रवाना झाले आहेत. साताऱ्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी १८ लाख ६० हजार तर आठ विधानसभा मतदारसंघासाठी २५ लाख ३४ मतदार मतदान करणार आहेत. अठरा ते एकोणीस वयोगटातील सर्वाधिक ७८ हजार मतदार असून, दुबार मतदार नोंदणी अभियानात अवघ्या तीनच महिन्यात तब्बल पस्तीस हजार मतदार वाढल्याचे मतदार यादींच्या अद्ययावती करणानंतर स्पष्ट झाले आहे.

सातारा व कराड उत्तर मतदारसंघात नऊ ठिकाणी पावसाने इमारती धोकादायक झाल्याने मतदान केंद्र बदलण्यात आली आहेत.

पावसामुळे कर्मचारी, शिक्षकांची प्रचंड तारांबळ झाली. नियंत्रण कक्षासाठी उभारण्यात आलेल्या मांडवातून प्रचंड पाणी येत होते. त्यामुळे आढावा प्रक्रिया बंदिस्त दालनात हलवण्याची वेळ आली. मतदान झाल्यानंतर आठ विधानसभा मतदारसंघापैकी सहा विधानसभा मतदारसंघातील मतांची मोजणी एमडीओ गोडाऊन सातारा एमआयडीसी येथे २४ रोजी होणार आहे. त्यासाठी त्रिस्तरीय बंदोबस्ताची रचना करण्यात आली आहे. पहिल्या स्तरावर आरपीएफ, दुसऱ्या स्तरावर सीआयएसएफ, तिसऱ्या स्तरावर स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे.

......

पावसामुळे ओढे, नाले तुडूंब; वाहतुक खोळंबल्याचे चित्र

फलटण शहरासह तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. आज रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत फलटणमध्ये सरासरी ४८.४४ मि. मी. पाऊस झाला असून, फलटण तालुक्याची पावसाची सरासरी ओलांडली आहे. या पावसामुळे ओढे, नाले तुडूंब भरुन वाहिल्याने ठिकठिकाणी वाहतूक खोळंबल्याचे चित्र होते. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या गाड्यांनाही पुराचा फटका बसल्याने त्यांनाही ताटकळावे लागले. मतदानावरही या पावसाचे सावट पसरल्याने नेतेमंडळींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारवडेचा पूल गेला वाहूनकराड : पाटण

$
0
0

गारवडेचा पूल गेला वाहून

कराड :

पाटण तालुक्यातील मारूल हवेली भागातील गारवडे येथील गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ओढ्यावरील पूल रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने वाहून गेल्याने गावाची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. केवळ सहा महिन्यांपूर्वीच बांधकाम केलेल्या या पुलाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याने या बाबत गावकऱ्यांनी संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा करूनही याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर या पुलाने रविवारी अखेरचा निरोप घेतला.

दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्यानेच हा नवीन पूल वाहून गेल्याने संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावरती कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विधानसभा मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक असतानाच पूल वाहून गेल्याने निवडणुकीमध्ये कोणाला फटका बसणार याकडे लक्ष लागून आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर केला आहे. त्यामुळे येथील ओढे, नाले, नद्या वाहू लागल्या आहेत. यातच रविवारी पहाटेच्या सुमारास पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे गारवडे येथील गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यालाही पाणी आले होते. मात्र, या ओढ्यावरील पूल गेल्या सहाच महिन्यांपूर्वी सुमारे ३३ लाख रुपये खर्च करून बांधला होता. मात्र, या पुलाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने या पाण्यामुळे पुलाचे रोलिग, कठड्यांसह दोन्हीही बाजूच्या भरावांसह मोठा भाग पाण्याच्या दाबाने वाहून गेला आहे.

ओळ -गारवडे पूल पावसाच्या पाण्याने वाहून गेला.

शेतीचे मोठे नुकसान

कराड तालुक्यात परतीच्या पावसाने शनिवारी रात्रीपासून अक्षरशः थैमान घातले असून, या पावसाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरती पाणी आल्याने तेथील वाहतूक ठप्प झाली आहे. सोयाबीन, भुईमूग व भात काढणी व रब्बीच्या मशागतीची कामे खोळंबली असल्याने व ही पिके जलमय झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या परतीच्या जोरदार पावसामुळे कराड, पाटण तालुक्यांतील ओढे, नाल्यांना महापूर आला आहे. द्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे-बेंगळुरू आशियाई महामार्गाच्या सेवा रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी आल्याने तेथील सेवा रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती.

कोयनेचे दरवाजे चार दरवाजे एक फुटावर

कोयना धरण परिसरातही शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर सुरूच असल्याने व कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने रविवारी सायंकाळी सात वाजता धरणाच्या सहा वक्र दरवाजांपैकी चार दरवाजे एक फुट उचलण्यात आले. दरवाजा व पायथा वीजगृहातून एकूण ८४७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी सातपर्यंत कोयनानगर ६५, नवजा ५९, महाबळेश्वर ११ व वळवण येथे १६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात १२१३१ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणी पातळी २१६३.०५ फूट झाली असून, पाणीसाठा १०५.१४ टीएम्सी झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानासाठी प्रचंड चुरस

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पावसाने उघडीप घेतल्याने जिल्ह्यातील सर्व दहा मतदारसंघांत मोठ्या चुरशीने मतदानाचे चित्र दुपारपर्यंतच्या टप्प्यात दिसले. कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर या दोन मतदारसंघात 'तुल्यबळ' लढती होत असल्याने शहर, उपनगरातील अनेक मतदान केंद्रात महिलांसह पुरुषांच्या मोठ्या रांगा मतदानासाठी लागल्या होत्या. मतदान केंद्रांबाहेर समर्थकांनी मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत किल्ला लढवला. जिल्ह्यातील सर्व दहा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी ३८.१४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान कागल मतदारसंघात ४४.२४ टक्के तर सर्वात कमी ३१.८२ मतदान इचलकरंजी मतदारसंघात झाले.

गेले चार दिवस पावसामुळे निवडणुकीच्या प्रचारावर मर्यादा पडल्या होत्या. तरीही रविवारी रात्री उशिरापर्यंत राजकीय घडामोडी सुरू होत्या. सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रे सज्ज झाली. ढगाळ हवामान आणि हवेतील गारव्यामुळे सकाळच्या सत्रातील मतदानावर परिणाम झाला होता. मतदान केंद्रापासून २०० मीटर बाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी बूथ लावले होते. पहिल्या टप्प्यात, सकाळी आठ वाजेपर्यंत सहा ते सात टक्के मतदानाची नोंद झाली. साडेआठनंतर मतदारांच्या रांगा लागल्या.

दीपावली सण जवळ आल्याने फराळ तयार करण्यासाठी महिलावर्गाने लवकर मतदान केल्याचे चित्र पहायला मिळाले. सकाळी साडेनऊनंतर बहुतांशी मतदान केंद्रात महिला आणि पुरूषांच्या स्वतंत्र रांगा लागल्या होत्या. व्होटर स्लीपसह पुरावा असल्याची खात्री मतदान केंद्रांवर करुन घेतली जात होती. मतदान केंद्रांबाहेर आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी मतदारांना आवाहन करत होते. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी रिक्षाची सोय केली होती. वैद्यकीय मदतीसाठी सेवकांची उपस्थिती होती. पोलिस प्रशासनाकडून प्रत्येक केंद्रावर एक तासाने आढावा घेतला होता. उपनगर आणि बाहेरगावांतील मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांनी वाहनांची सोय केली होती.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. शुक्रवार पेठेतील बाळासाहेब खर्डेकर विद्यालय, ग. गो. जाधव विद्यालय, शाहू हायस्कूल, महानगरपालिका, शिवाजी पेठेतील आठनंबर शाळा, मंगळवार पेठेतील ताराबाई विद्यालय, अहिल्यादेवी विद्यालय, कदमवाडी, भोसलेवाडी येथील केंद्रांत मतदारांच्या रांगा लागल्या. नागाळा पार्क येथील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये सखी मतदान केंद्र महिलांनी हाताळले. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक, सरदार तालीमजवळ काँग्रेस आणि शिवसेनेच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दोन्ही गटाकडून मतदारांना आवाहन केले जात होते.

कोल्हापूर दक्षिणमधील भाजपचे आमदार अमल महाडिक आणि काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांच्यात निवडणूक चुरशीची असल्याने निवडणूक चुरशीची असल्याने काँग्रेस आणि भाजपच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. काँग्रेस, भाजप, ताराराणी आघाडीचे बहुतांशी नगरसेवक उपनगरात थांबून होते. भाजपने केशरी आणि हिरव्या रंगाच्या कनातीचे मंडप घातले होते. तर काँग्रेसने कार्यकर्त्यांच्या घराजवळ बूथ मांडले होते. जगरनगर, राजेंद्रनगर, साळोखेनगर, कळंबा, कंदलगाव, पाचगाव येथील केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. ग्रामीण भागात गडमुडशिंगी, उचगाव या ठिकाणी एकाच इमारतीत सात ते आठ मतदान केंद्र असल्याने मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. मतदान केंद्रांबाहेर दोन्ही पक्षांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर असल्याने जत्रेचे स्वरुप आले होते.

शहर उपाधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी मतदान कंद्रांवर पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले. मतदान केंद्रांतील गर्दी लक्षात घेऊन सकाळी अकरा वाजता जादा बंदोबस्त मागवण्यात आला. मतदान केंद्रांबाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले होते. दुपारी बारा वाजल्यानंतर कडक ऊन पडल्याने मतदार मोठ्या संख्येने केंद्रांवर आले. मतदानानंतर मतदारांना घरपोच सोडण्याची व्यवस्था उमेदवारांनी केली होती. बूथवरील कार्यकर्त्यांना फूड पॅकेटही वाटण्यात आले. दुपारी साडेतीन वाजल्यानंतर कार्यकर्त्यांकडून पुन्हा रिव्हू घेण्यात आला. मतदान केंद्रातून टक्केवारी घेऊन मतदारांना बाहेर करण्याची यंत्रणा सक्रीय करण्यात आली. घरोघरी जाऊन मतदान झाले आहे का? याची खातरजमा करून घेतली जात होती. शेवटच्या टप्यात मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरांमध्ये काँटे की टक्कर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दक्षिण मतदारसंघात 'हायहोल्टेज' लढतीचे स्वरुप प्राप्त झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत 'काँटे की टक्कर' असल्याचे दाखवून दिले. सायंकाळनंतर पावसाची शक्कता असल्याने सकाळपासून जास्तीजास्त मतदान व्हावे, यासाठी भाजपचे आमदार अमल महाडिक व काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. कळंबा, सुर्वेनगर, तपोवन, संभाजीनगर, फुलेवाडी, बोंद्रेनगर व सानेगुरुजी वसाहत येथील मतदान केंद्रांबाहेर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. उपनगरामधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी अखेरपर्यंत आर्थिक प्रलोभने दिली जात होती.

विद्यामंदिर कळंबा, कळंबा गर्ल्स हायस्कूल व कात्यायनी येथे कळंबा येथील मतदारांसाठी मतदान केंद्राची व्यवस्था केली होती. महाडिक व पाटील गट सक्रिय असल्याने येथे कमालीची चुरस पाहला मिळाली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करत होते. अशीच स्थिती सुर्वेनगर येथील महावीर इंग्लिश मीडियम स्कूलमधील मतदान केंद्रावर दिसत होती. सुर्वेनगर, महाराष्ट्र नगर, दत्तोबा शिंदे नगर, दादू चौगुले नगर, नवनाथ नगरातील मतदारांनी येथे रांगा लावल्या होत्या. तुलनेने परिसर मोठा असल्याने येथे मतदारांना आणण्यासाठी खासगी वाहनांचा सर्रास वापर झाला.

सकाळच्या सत्रात सर्वच ठिकाणी मतदानाची टक्केवारी चांगली दिसली. मात्र, ११ वाजल्यानंतर उन्हाची तिव्रता वाढत गेल्यानंतर काहीशी गर्दी कमी झाली. मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मंडप उभारला होता. पण, रांग त्यापुढे गेल्यानंतर मतदारांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला.

तपोवन मतदान केंद्रांपर्यंत गाड्यांच्या धुरळा उडत होता. शंभर मीटर रेषेच्या आत दोन्ही गटाचे समर्थक मतदारांना आ‌वाहन करत होते. येथे चार ठिकाणी स्वतंत्रपणे केंद्राची सुविधा असल्याने तुलनेने मतदानाचा वेग दिसत होता. साळोखेनगर येथील शिवशक्ती हायस्कूलध्ये विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या. तपोवन व शिवशक्ती मतदान केंद्रावर उमेदवार ऋतुराज पाटील यांनी भेट घेवून मतदानाचा आढावा घेतला. संभाजीनगरात न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मतदारांनी रांगच लावली होती. बोंद्रेनगर व फुलेवाडी गुरुदेव विद्यानिकेतन, महात्मा फुले विद्यामंदिर मतदान केंद्रावर व्यवस्था केली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची ईर्षा दिसत होती.

मोबाइल बंदीचा फज्जा

मतदानाबाबतची गुप्तता राखण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मतदान केंद्रात मोबाईल बंदी जाहीर केली. मात्र त्याबाबतची सक्ती करण्यात येत नव्हती. त्यामुळे बंदीआदेश कागदावरच राहिला. अनेकजण थेट मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जात होते. कार्यकर्ते तर मोबाईलवर संवाद साधतच प्रवेश करत होते. काहींनी मतदान झाल्यानंतर सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मतदारांच्या रांगा असल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत होते.

शेवटपर्यंत आर्थिक प्रलोभने

'दक्षिण'मध्ये महाडिक आणि पाटील गटामध्ये कमालीची ईर्षा निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा पॅटर्न कायम राखण्यासाठी पाटील गट सक्रिय झालेला असताना मतदारसंघावरील वर्चस्व कायम राखण्यासाठी महाडिक गटानेही चांगली तयारी केली. प्रचाराला सुरुवात झाल्यापासून कार्यकर्त्यांसह मतदारांना विविध अमिषे दाखवण्यात आली. शेवटचे दोन दिवस तर प्रचंड आर्थिक उलाढाल झाली. सोमवारी मतदान सुरू असतानाही 'काठा'वरील मतदारांना आर्थिक अमिषे दाखवली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगाव, जरगनगरमध्ये चुरशीने मतदान

$
0
0

जवाहरनगरात मतदान यंत्रात बिघाड;

कोल्हापूर टाइम्स टीम

संवेदनशील गाव म्हणून समजल्या जाणाऱ्या पाचगावमध्ये अतिशय चुरशीने मतदान झाले. तर जरगनगर, रामानंदनगरमधील मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. जवाहरनगर येथील वीर कक्कया विद्यालय येथील मतदान केंद्रावर सकाळी मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदारांना काही वेळ वाट पाहावी लागली. एक मशिन जवळपास सव्वा तास बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रशासनाने मतदान यंत्र बदलण्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात झाली.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पाचगाव हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव समजले जाते. महाडिक आणि पाटील गटाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. पाचगाव केंद्र शाळा, शांतीनगर येथील षटकोनी शाळा, वस्ती शाळा आणि आरकेनगर येथील शाळेत मतदानाची सोय होती. पाचगाव केंद्र शाळेत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. महिलांची संख्या लक्षणीय होती.

भाजपचे उमेदवार व आमदार अमल महाडिक यांच्यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भिकाजी गाडगीळ, दत्ता गवळी, संभाजी शिंदे, अमर कारंडे, प्रकाश गाडगीळ, विशाल पाटील आदींची यंत्रणा राबत होती. काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्यासाठी सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच प्रविण कुंभार, सदस्य प्रकाश गाडगीळ, संग्राम पोवाळकर, कृती समितीचे संजय पाटील, नारायण गाडगीळ आदी सक्रिय होते.

जरगनगर-रामानंदनगर भागात मिळून जवळपास आठ हजार मतदार आहे. या भागात जरगनगर विद्यामंदिर येथील मतदान केंद्र आहे. येथील आठही मतदान केंद्रावर सकाळपासून मतदार मोठ्या संख्येने नजरेस पडत होते. काही ठिकाणी मतदारांची ने, आण करण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनाची व्यवस्था केली होती. नेहरुनगर विद्यामंदिर परिसरात पाटील आणि महाडिक गटातील कार्यकर्त्यांतील ईर्षा दिसली. भाजपकडून सयाजी आळवेकर, शिवाजी आळवेकर, जयसिंग शिंदे, सुधीर देसाई, प्रितम यादव मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करत होते. काँग्रेसकडून जगमोहन भुर्के, प्रसन्न वैद्य, अरुण बारामते आदींची यंत्रणा सक्रिय राहिली. बारामते हे भाजपच्या नगरसेविका अश्विनी बारामते यांचे पती आहेत.

व्हीलचेअरसाठी धावाधाव

जवाहरनगरमधील वीर कक्कया विद्यालय येथे दिव्यांगासाठी व्हीलचेअरची सुविधा नव्हती. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या वर्षानगर येथील प्रियांका पोवार यांना सकाळी दोन तास मतदान केंद्राबाहेर थांबावे लागले. व्हीलचेअर नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली. महापालिका प्रशासनाने अन्य ठिकाणची व्हीलचेअर याठिकाणी उपलब्ध केली. यानंतर पोवार यांना मतदानाचा हक्क बजावता आला. दरम्यान व्हीलचेअर केंद्रावर नसल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांची धावाधाव झाली. सुभाषनगर येथील अंध व्यक्ती चंदन बागडेकर यांनी मतदान केले.

राजेंद्रनगरात उमेदवारांनी

पुरवली मतदानासाठी रसद

राजेंद्रनगर परिसरात एका बाजूला बंगलो आणि अपार्टमेंटधारक तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी असे चित्र आहे. कोल्हापूर पब्लिक स्कूल, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर राजेंद्रनगर येथे मतदानाची सोय करण्यात आली होती. राजेंद्रनगर विद्यामंदिरात सकाळपासूनच मतदारांनी रांगा लागल्या होत्या. विद्यामंदिरमध्ये तीन ठिकाणी मतदान करण्याची सोय केली होती. झोपडपट्टीतील मतदान बाहेर काढण्यासाठी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा सक्रिय होती. या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस फौजफाटा लावला होता. दुपारनंतर झोपडपट्टीतील मतदान बाहेर काढण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाल्या. थेट मतदारांपर्यंत यंत्रणेची रसद पोहचत होती. अधिकाधिक मतदान होण्यासाठी कार्यकर्ते सक्रिय झाल्यामुळे दुपारनंतर मतदान केंद्रावर पुन्हा रांगा वाढल्या. संत रोहिदास विद्यामंदिर येथे मतदानासाठी रांगा होत्या.

मी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रियेविषयी मला उत्सुकता होती. पहिल्या मतदानाची अनुभूती माझ्या कायम लक्षात राहिल. विकासाभिमुख नेतृत्व, समाजहिताचा व्यापक दृष्टीकोन आणि सामान्य लोकांसाठी काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करायचे हे मी ठरविले होते.

- अजय आळवेकर, नवमतदार नेहरुनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images