Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यास हद्दपारीची नोटीस

$
0
0

कारवाई एकतर्फी असल्याचा स्वाभिमानीचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भोगावती परिसरातील युवा अध्यक्ष जनार्दन पाटील यांना करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे यांनी रविवारपासून पाच दिवसांसाठी हद्दपार करण्याची नोटीस दिली आहे. दरम्यान, 'पाटील यांच्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीच्या आंदोलनातील विविध गुन्हे आहेत. ते वारकरी आहेत. दरवर्षी चालत पंढरपूरला जातात. समाजविघातक असे त्यांचे वर्तन नाही. अशा कार्यकर्त्याला प्रशासनाने हद्दपारीची एकतर्फी नोटीस काढून दडपशाही केली आहे', असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. जिल्ह्यातील दहा ते बारा कार्यकर्त्यांना अशा नोटिसा दिल्या आहेत, असेही त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले.

जनार्दन पाटील यांचे गाव करवीर तालुक्यातील परिते आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक स्वरूपाचे गुन्हे नाहीत. शेतकरी चळवळीतील गुन्हे आहेत. तरीही त्यांची बाजू ऐकून न घेताच तहसीलदार मुळे यांनी पोलिस अहवालावरून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकरी आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोणाच्या दबावामुळे पाटील यांच्यावर अन्यायी कारवाई केली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

नोटीसीमध्ये म्हटले आहे, पाटील यांच्याकडून निवडणूक काळात सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग निर्माण होईल, असे कृत्य शहरात आणि करवीर तालुक्यात होऊ शकते. त्यांच्याकडून अनुचित व विघातक घटना टाळणे महत्वाचे वाटते. यामुळे २० ते २५ ऑक्टोबरअखेर पाटील यांनी हद्दपार व्हावे. शहर आणि करवीर तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करू नये.

दरम्यान, अशी कारवाई करण्यापूर्वी नोटीस देणे अपेक्षित होते. त्यांची बाजू ऐकून घेऊन हद्दपार करण्याची प्रक्रिया आहे. हे सर्व टाळून पाटील यांना थेट हद्दपारीचीच नोटीस दिली आहे.

...

कोट

'स्वाभिमानी'चे पदाधिकारी, कार्यकर्ते कोणत्याही दबावाला,अमिषाला बळी पडत नाही. यामुळे सरकार प्रशासनाला हाताशी धरून कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटिसा काढून त्रास देत आहे. जिल्ह्यातील १० ते १२ कार्यकर्त्यांना हद्दपारीची नोटीस दिली आहे. हे अन्यायकारक असून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे.

राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळा विकासाचा ‘शिक्षक’ पॅटर्न

$
0
0

महापालिकेचा लोगो वापरावा....

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर

महापालिका शाळा टिकाव्यात, त्या ठिकाणी मुलांना आवश्यक सोयीसुविधा असाव्यात यासाठी शहरातील शिक्षक व सेवकांनीच पुढाकार घेतला आहे. महापालिका शाळेतील शिक्षक दरमहा ठराविक रक्कम जमा करतात आणि ज्या शाळेतील भौतिक सुविधांसाठी पैशाची गरज आहे त्यांना मदत करतात. आतापर्यंत ३० शाळांना मिळून दीड लाख रुपयांची रोख मदत केली आहे. शाळा विकासाचा हा महापालिकेच्या शिक्षकांचा पॅटर्न कौतुकाचा विषय ठरला आहे.

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या शहरात ५९ शाळा आहेत. यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दहा हजाराच्या आसपास आहे. शिक्षण समितीच्या मालकीच्या या शाळांनी गेल्या काही वर्षात कात टाकली आहे. शिक्षकांचे प्रयत्न, लोकसहभाग यामुळे अनेक शाळांचा कायापालट झाला. पटसंख्या वाढीस लागली. शैक्षणिक गुणवत्तेसह शिष्यवृत्ती व अन्य परीक्षेत महापालिका शाळेतील अभ्यास पॅटर्नचा गाजावाजा झाला. शिक्षकांकडून शाळा टिकविण्यासाठी आणि पटसंख्या वाढीसाठी सामूहिकपणे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अनेकदा प्रशासकीय पातळीवरुन सहकार्य लाभण्यास विलंब होतो. शाळा व शिक्षकांच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षकांनी 'शाळा विकास संस्था' या नावांनी काम करण्याचे ठरविले. यासाठी नऊजणांची एक समिती नेमली आहे. समितीमध्ये शिक्षक आणि शिक्षण समितीमधील अधिकारी आहेत. यामध्ये शिक्षण समितीमधील अधिकारी बाळासाहेब कांबळे, विजय माळी, शिक्षक संभाजी चौगुले, स्मिता पुनवतकर, दीपमाला ओतारी, राहुल बागडे, प्रभाकर लोखंडे, अमित जाधव, अविनाश लाड यांचा समावेश आहे. मात्र या समितीमध्ये कोणी अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही. सगळे समान कार्यरत असून 'शाळा संवर्धन निधी'साठी काम करत आहेत. महापालिका शाळेतील शिक्षकांची संख्या ३५० च्या आसपास आहे. तर सेवकवर्ग १००च्या घरात आहे. दर महिन्याला शाळा विकासासाठी ही मंडळी ठराविक रक्कम जमा करतात. प्रत्येकजण स्वेच्छेने रक्कम जमा करतो. यासाठी शिक्षकांच्या पतसंस्थेत खाते उघडले आहे. जमा झालेल्या निधीतून शाळेसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर आहे. या उपक्रमाला इतरांची साथ लाभत मिळत आहे. शिक्षकांमधून जे अधिकारी बनले आहेत, ते देखील शाळा विकास निधीला सहकार्य करत आहेत.

...

कोट

'शिक्षक व सेवकवर्ग दरमहा ठराविक रक्कम शाळा विकासासाठी जमा करतात. जमलेली रक्कम दोन शाळांना दिली जाते. तत्पूर्वी त्या शाळेला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे जाणून घेतले जाते. रक्कम दिल्यानंतर त्याचा विनियोग संबंधित शाळेने कसा केला हे समजावे म्हणून त्याचा तपशील मागविला जातो. प्रारंभी ५० शिक्षकांचा यामध्ये समावेश होता. आता त्याची व्याप्ती वाढली असून बहुतांश सर्वच शाळेतील शिक्षकांचा सहभाग आहे.

विजय सुतार, शिक्षक

....

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची हवी साथ

महापालिका शाळांचा लौकिक वाढविण्यासाठी शिक्षक शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात. त्यांना पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासनाची साथ आवश्यक आहे. शिक्षकांचे काही प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, पदोन्नती यासह शाळेतील अन्य सुविधांसाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. आयुक्तांनी या प्रश्नी लक्ष घातल्यास, शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक केल्यास महापालिका शाळांचा दर्जा आणखी उंचाविण्यासाठी शिक्षक आणखी जोमाने काम करतील, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुस्ती आधुनिकतेकडे नेणारा मल्ल

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet.satishgMT

कोल्हापूर : कोल्हापूरच्या लाल मातीची कुस्ती परंपरा जपणारा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लढण्यासाठी मॅट कुस्तीचा कास धरणाऱ्या शक्तिशाली लढवय्या मल्लांची परंपरा अखेरपर्यंत महान भारत केसरी, रुस्तम-ए-हिंद पैलवान दादू चौगुले यांनी जोपासली. चौगुले घराण्याच्या कुस्तीचा वारसा अखंड जपला. मुलगा विनोद याला घडवित हिंद केसरीची गदा त्यांनी घरात आणली. अखेरपर्यंत कुस्तीची नाळ न तोडता नवीन मल्ल घडवण्यासाठी आपले योगदान दिले.

कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथे १९४६ शेतकरी कुटुंबात जन्म झाला. वडीलही पैलवान असल्याने घरातच कुस्तीचे बाळकडू मिळाले. पैलवानकी करण्यासाठी ते मोतीबाग तालमीत आले. अर्जुन पुरस्कार विजेते गणपतराव आंदळकर, बाळ गायकवाड, बाळू गिरे यांच्या हाताखाली कुस्तीचे डाव गिरवले. मोठी उंची आणि पीळदार शरीर असलेल्या चौगुले यांचा व्यायाम पाहण्यासाठी तालमीत गर्दी व्हायची. आखाड्यात चौगले उतरले की प्रतिस्पर्धी मल्ल गर्भगळीत व्हायचा. हार, जीत होईल, अशी भीती न बाळगता ते प्रतिस्पर्धी मल्लाशी भिडले. दादू मामा ही त्यांची ओळख होती.

महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन वेळा जिंकून त्यांनी उत्तरेच्या बुरुजबंद मल्लांना आव्हान दिले. खासबाग मैदानात गणपतराव खेडकर आणि डब्बल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार यांच्यावर विजय मिळवत त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत आव्हान निर्माण केले. १९७३ मध्ये त्यांनी भारतातील दोन महत्त्वाचे किताब जिंकून त्यांनी दबदबा निर्माण केला. मुंबईत रुस्तम-ए-हिंद किताब मिळवताना हिंद केसरी दीनानाथ सिंह यांना पराभूत केले. दिल्लीत उत्तरेचा प्रसिद्ध मल्ल नेत्रपालला चारीमुंड्या चित करत महान भारत केसरीचा किताब पटकावत भारतात दबदबा निर्माण केला. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे कौतुक केले.

लाल मातीत कुस्ती करताना मॅटवरील कुस्तीतही त्यांनी प्रभुत्व मिळवले. १९७२ मध्ये ऑकलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हेवीवेट गटात कॅनडाचा मल्ल काऊडे पिटॉनशी लढत दिली. पण गुणावर झालेल्या अंतिम लढतीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला तरी त्यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिले. त्यांनी सतपाल, हरिश्चंद्र बिराजदार, कर्तारसिंग, आनंद रॉय या मल्लाबरोबर लढत दिली. रॉय हा त्या काळात भारतातील ताकदवान मल्ल होता. पण त्यालाही चौगुलेंनी आस्मान दाखवले. सतपाल यांच्याबरोबर त्यांची मैत्री कायम होती. सतपाल यांनी पराभव केल्यानंतर मल्लसम्राट युवराज पाटील यांना अगदी निगुतीने घडविले. यामागे पाटील यांनी सतपाल यांच्यावर विजय मिळवावा हा एकच हेतू होता.

कारकीर्द संपल्यानंतर चौगुले यांनी शेती, जमीन व्यवहारात जम बसवत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले. राष्ट्रीय तालीम संघाच्या मोतीबाग तालमीत अनेक मल्ल घडवले. त्यांची दोन्ही मुले विनोद आणि अमोल यांनी कुस्तीत नशिब आजमावले. विनोद यांनी नाशिक येथे हिंद केसरीची गदा पटकावत वडिलांची कुस्ती परंपरा कायम ठेवली. गतवर्षी त्यांच्या कुस्तीतील उल्लेखनीय कारकीर्दीबद्दल भारत सरकारने मानाचा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने गौरवले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पुरस्कार स्वीकारल्यावर त्यांना अत्यानंद झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महान भारत केसरी दादू चौगले यांचे निधन

$
0
0

\B

\B

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महान भारत केसरी, रुस्तम ए हिंद पैलवान दादू चौगले (वय ७३) यांचे रविवारी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुस्तीविश्वावर शोककळा पसरली. सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, तीन बहिणी, दोन भाऊ, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने तीन दिवसांपूर्वी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना ते कोमामध्ये गेले. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अंबाबाई मंदिर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी गर्दी केली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज , हिंदकेसरी दीनानाथ सिंह, वस्ताद बाळ गायकवाड, बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील, तालीम संघाचे सचिव ॲड महादेवराव आडगुळे, अशोक माने, चंद्रकांत चव्हाण, राजाराम चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, संभाजी वरुटे यांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली

अनेक नामवंत मल्लांना चितपट करणारे दादू चौगले यांची 'वज्रदेही मल्ल' म्हणून ओळख आहे. कुस्तीचा प्रसार, संघटन, नवीन मल्लांना प्रशिक्षण अशा सर्व क्षेत्रात त्यांनी प्रभावी कामगिरी केली. गतवर्षी केंद्र सरकारने त्यांना मानाचा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार देवून गौरवले. तर राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ते विद्यमान कार्याध्यक्ष तर कोल्हापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. मोतीबाग तालमीचे वस्ताद म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाड येथे जन्मलेल्या दादू चौगले यांची वयाच्या सातव्या वर्षी कुस्तीशी जुळलेली नाळ अखेरपर्यंत कायम राहिली. त्यांनी वस्ताद हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, बाळू बिरे यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले. १९७० मध्ये परशुराम पाटील यांना पराभूत करुन महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. १९७३ मध्ये दीनानाथ सिंह यांना अवघ्या एका मिनिटात नमवत 'रुस्तुम-ए-हिंद' हा मानाचा किताब पटकावला. त्याच वर्षी दिल्लीच्या नेत्रपालला हरवून 'महान भारत केसरी' ही मानाची गदा पटकावली. १९७३ मध्ये न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हेवीवेट गटात फ्री स्टाईल प्रकारात त्यांनी रौप्य पदकावर नाव कोरले. सत्पाल, सादिक पंजाबी, कर्तारसिंग, विजय कुमार, जगदिश मित्तल, नेत्रपाल या नामांकित मल्लांबरोबर झालेल्या त्यांच्या कुस्त्या विशेष गाजल्या. त्यांची कुस्ती परंपरा मुलगा विनोद याने 'हिंदकेसरी' किताब पटकावत पुढे चालवली आहे.

...

कोट

'दादू चौगले यांच्या जाण्याने कुस्ती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. नव्या दमाचे पैलवान घडविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी कुस्ती क्षेत्रात कोल्हापूरचे नाव उंचावले. त्यांची कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असे. यशापयशाची कोणतीही पर्वा न करता त्यांनी कुस्तीक्षेत्रात आपली वाटचाल चालू ठेवली. उत्कृष्ट मल्ल घडवण्यात त्यांनी आयुष्य वेचले.

राम सारंग, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते

...

'एक महान मल्ल म्हणून दादू चौगले यांचे नाव कायम राहील. कुस्ती हेच त्यांचे जीवन होते. कुस्तीतील डावांसह आधुनिकतेची जोड देत त्यांनी अनेक दशके मनोभावे या क्षेत्राची सेवा केली. राष्ट्रकुलसारख्या कुस्ती स्पर्धेतही त्यांनी आपल्या कुस्तीची चुणूक दाखवत आंतरराष्ट्रीयस्तरावर देशाचे नाव उंचावले. कुस्तीच्या प्रगतीसाठी ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले.

विष्णू जोशीलकर, महाराष्ट्र केसरी

....

'संपूर्ण समर्पित भावनेने कुस्तीसाठी आयुष्य वेचलेल्या दादूमामांच्या जाण्याने अतीव दुःख होत आहे. त्यांच्याकडून कुस्तीतील अनेक पैलू आत्मसात केले. नवे खेळाडू घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. येणारा काळ त्यांना कुस्तीतील अनमोल हिरा म्हणून कायम स्मरणात ठेवेल. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्राचा खराखुरा मार्गदर्शक हरपला आहे.

नामदेव मोळे, महाराष्ट्र केसरी

...

'भारतातील शक्तिमान मल्ल म्हणून भारतात दादू चौगलेंचा दबदबा होता. हातजीत याची भिती न बाळगता निडरपणे ते आखाड्यात मल्लाशी भिडत. चटकदार आणि वेगवान कुस्ती खेळण्यात त्यांचा हातखंडा होता. मातीबरोबर मॅटवरील कुस्तीच्या विकासासाठी ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले.

बापूसाहेब राडे, कुस्ती समालोचक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिवृष्टीने शहराची दैना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

परतीच्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशी शहर आणि जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. मेघगर्जनेसह पावसाच्या मोठ्या सरी जवळपास दोन तास कोसळत होत्या. शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतूक विस्कळित झाली.

ढगांचा कडकडाट, अधूनमधून चमकणारी वीज,धो-धो कोसळणारा पाऊस आणि रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे लोट यामुळे नागरिकांच्या मनात धडकी भरली. गटारी भरून वाहू लागल्याने रस्त्यांवर पाणी तुंबले.

जोरदार पावसामुळे लहानसहान व्यावसायिक, फेरीवाल्यांचा व्यवसाय पाण्यात वाहून गेला. दिवसभरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ झाली. रविवारी दिवसभराच्या पावसामुळे नागरिकांचेही बेहाल झाले. जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते बसंत बहार रोडवर फूट-दीड फूट पाणी साचले. परिणामी या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून दीड फूटावरून पाणी वाहत असल्यामुळे दुचाकी वाहनांना काही वेळ या मार्गावर वाहतुकीस मनाई केली होती. परीख पुलाखाली दोन ते अडीच फूट पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. मध्यवर्ती बसस्थानकडून परीख पुलाकडे पाण्याचे लोट वाहत होते. पुलाखालीला परिसराला ओढ्याचे स्वरूप लाभले होते.

जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते महावीर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाटलाचा वाडा हॉटेल येथे गुडघाभर पाणी होते. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल समोरील रस्ता, आयटीपार्क रोड, बिंदू चौक, निकम पार्क, संभाजीनगर ते नंगीवली चौक, न्यू महाद्वार रोडवरून पावसाचे पाणी वाहत होते. या भागातील ठिकठिकाणच्या रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. गटारी तुडूंब रस्त्यावर पसरलेल्या पाण्यामुळे रस्त्यातील खड्डयांचा अंदाज न आल्यामुळे वाहने घसरून किरकोळ अपघात घडले. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, दुधाळी परिसरातील रस्त्यांवर प्रचंड पाणी साचल्याचे चित्र होते. शहरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता.

झाडे कोसळली; भिंती पडल्या

ग्रामीण भागात ठिकठिकाणी घराच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. चंदगड तालुक्यातील तुडये येथील प्रभाकर पाटील यांच्या घराची भिंत कोसळून ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गडहिंग्लज येथील काळभैरव रोडवरील खोत वसाहत येथे मोठे झाड कोसळले. शहरातही अनेक भागात घरात पाणी घुसून प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाल्याचे प्रकार घडले. रविवारी सकाळी आठ वाजताच्या नोंदीनुसार जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३९८.२७ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ३३. ३५ मिली पाऊस पडला आहे. कोल्हापूर शहर, करवीर, कागलसह हातकणंगले, शिरोळमध्ये पावसाचा धडाका कायम होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बालिंगा रोडवरील एस. आर. पेट्रोल पंपानजीक झाड कोसळल्याची घटना घडली.धुवाँधार पावसामुळे रविवारची पहाट कधी उजाडली हे नागरिकांच्या लक्षात आले नाही. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मोठ्या सरी कोसळण्यास सुरुवात केली. तासभर पाऊस कोसळत राहिला. गटारी तुंबून रस्त्यावर पाणी पसरले. गेले दोन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे जयंती नाला ओव्हर फ्लो झाला. जयंती नाल्याच्या बंधाऱ्यावरुन सांडपाणी वाहून थेट पंचगंगा नदीत मिसळले.

पावसाने यंदा कहर केला आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. दरवर्षी दिवाळी सणाच्या कालावधीत दिवसभरात हजारो रुपयांची विक्री व्हायची. यंदा मात्र आमचा सारा व्यवसाय पाण्यात वाहून गेला आहे.

विद्या महाजन, कपडे विक्रेते महाद्वार रोड

बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यावर पाणीच पाणी

महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, राजारामपुरी जनता बझार चौक, लक्ष्मीपुरी धान्य लाइन बझारमधील प्रमुख रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. लक्ष्मीपुरीतील रस्त्यावर फूटभर पाणी साचल्यासारखी स्थिती होती. लहानसहान व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

शहरातील वाहतुकीचा बोजवारा

जनजीवन विस्कळीत

परीख पुलाखाली अडीच फूट पाणी

जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते बसंत बहार रोडवर दीड फूट पाणी

महाद्वार रोड, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, ताराबाई रोडवरील बाजार पाण्यात

केव्हीज पार्क, निकम पार्क, देवकर पाणंद, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसमोरील रस्त्यावरही पाणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन खांब कोसळले

$
0
0

दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे पाचगाव परिसरातील झाड उच्चदाब वीज वाहिनीवर कोसळले. रामानंदनगर वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही वाहिनीचे तीन खांब झाड कोसळल्याने मोडून पडले. यामुळे या वाहिनीवरील पाचगाव परिसरातील आठ रोहित्रावर अवलंबून २५०० ग्राहकांचा वीज पुरवठा शनिवारी रात्रीपासून बंद झाला होता. महावितरणच्या आरकेनगर शाखेतील कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी पावसातही दुरुस्तीचे काम हाती घेतले. रामानंदगर येथील ओढ्यात पाणी वाढल्यामुळे रस्त्याच्या कामात अडथळे आले. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत सायंकाळी सात वाजता वीज पुरवठा सुरळीत केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात ३४ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

$
0
0

सोलापुरात ३४ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

सोलापूर :

विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ३४ लाख ३४ हजार ५४९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अकरा मतदारसंघात प्रमुख पक्षाच्या ७० उमेदवारांसह एकूण १५४ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील ३ हजार ५२१ केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी १९ हजार २५२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना रविवारी त्या-त्या मतदारसंघात निवडणूक साहित्यासह ईव्हीएम मशिनचे वाटप केले गेले. कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी ५२२ एसटी बसेस, २२२ जीप व आवश्यकतेनुसार अन्य वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. ६ हजार ५०५ बॅलेट युनिट, ४ हजार ५८९ कंट्रोल युनिट तर ४ हजार ६९५ व्हीव्हीपॅट यंत्रे रवाना झाली आहेत.

एकाच मतदान केंद्रावर १५०० पेक्षा अधिक मतदार झाल्याने ४१ सहाय्यक मतदान केंद्रे नव्याने स्थापन केली आहेत. तसेच इमारती जीर्ण झाल्याने व त्या ठिकाणी आवश्यक सुविधा नसल्याने ७२ ठिकाणचे मतदान केंद्र बदलले आहेत. शिवाय ३० मतदान केंद्राच्या नावात बदल करण्यात आला आहे. ३ हजार ५२१ मतदान केंद्रापैकी ३५२ केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार आहे. यामध्ये ९२ संवेदनशील केंद्राचा समावेश आहे. संवेदनशील मतदान केंद्राच्या दहा टक्के मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. शहर उत्तर मतदारसंघात २०, दक्षिण सोलापूर मतदारसंघात १७ केंद्रे संवेदनशील आहेत. प्रचारावर केला जाणारा खर्च व प्रत्येक घडामोडींवर निवडणूक निरीक्षकांची नजर आहे. यासाठी फिरती व स्थिर पथके तैनात करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांडुळाची तस्करी करण्याऱ्या दोघांना अटक

$
0
0

मांडुळाची तस्करी करण्याऱ्या दोघांना अटक

सातारा

सांगली व सातारा जिल्हामध्ये काही टोळ्यांकडून अंधश्रद्धेपोटी वन्यप्रान्याची खरेदी करीत असलेची माहिती वन विभागाकडे प्राप्त झाली होती. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावाच्या हद्दीमध्ये कारगणी रोड लगत वन विभागाच्या पथकाने सापळा रचून दोन इसमांना मांडूळ या सर्पाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असताना मांडूळ सर्पासह रंगेहाथ ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणी विभागाच्या पथकांनी सांगली व सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण आठ इसमांना अटक केली आहे. तानाजी मारुती चव्हाण (रा. चिनके, ता. सांगोला), शिवाजी सोपान बनसोडे (रा. नाझरे, ता. सांगोला), शाहरुख ऊर्फ नयन दावल सुभेदार (रा. जवळा, ता. सांगोला), सलीम हुसेन मुजावर (रा. इस्लामपूर), कुमार राजाराम ढोबळे (रा. इस्लामपूर), प्रितम सतिश पवार (रा. इस्लामपूर), प्रवीण उर्फ अमोल सुबराव (रा. लेंगरे, ता. खानापूर) संजय ज्ञानू जाधव (रा. लेंगरे) या आठ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक दोन चाकी गाडी व सात मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

............

बामणोली येथून शिवसागर जलाशयाच्या पलिकडच्या भागातील मतदान केंद्रावर जाण्यासाठी लाँचमधून जावे लागते.

======================

साताऱ्यात २९७८ मतदान केंद्रांवर होणार मतदान

सातारा :

सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, जिल्ह्यात २९७८ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या सर्व मतदान केंद्रांवरून रविवारी बावीस हजार कर्मचारी येथील शाहू स्टेडियमवरून मतदान साहित्यासह रवाना झाले आहेत. साताऱ्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी १८ लाख ६० हजार तर आठ विधानसभा मतदारसंघासाठी २५ लाख ३४ मतदार मतदान करणार आहेत. अठरा ते एकोणीस वयोगटातील सर्वाधिक ७८ हजार मतदार असून, दुबार मतदार नोंदणी अभियानात अवघ्या तीनच महिन्यात तब्बल पस्तीस हजार मतदार वाढल्याचे मतदार यादींच्या अद्ययावती करणानंतर स्पष्ट झाले आहे.

सातारा व कराड उत्तर मतदारसंघात नऊ ठिकाणी पावसाने इमारती धोकादायक झाल्याने मतदान केंद्र बदलण्यात आली आहेत.

पावसामुळे कर्मचारी, शिक्षकांची प्रचंड तारांबळ झाली. नियंत्रण कक्षासाठी उभारण्यात आलेल्या मांडवातून प्रचंड पाणी येत होते. त्यामुळे आढावा प्रक्रिया बंदिस्त दालनात हलवण्याची वेळ आली. मतदान झाल्यानंतर आठ विधानसभा मतदारसंघापैकी सहा विधानसभा मतदारसंघातील मतांची मोजणी एमडीओ गोडाऊन सातारा एमआयडीसी येथे २४ रोजी होणार आहे. त्यासाठी त्रिस्तरीय बंदोबस्ताची रचना करण्यात आली आहे. पहिल्या स्तरावर आरपीएफ, दुसऱ्या स्तरावर सीआयएसएफ, तिसऱ्या स्तरावर स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे.

......

पावसामुळे ओढे, नाले तुडूंब; वाहतुक खोळंबल्याचे चित्र

फलटण शहरासह तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. आज रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत फलटणमध्ये सरासरी ४८.४४ मि. मी. पाऊस झाला असून, फलटण तालुक्याची पावसाची सरासरी ओलांडली आहे. या पावसामुळे ओढे, नाले तुडूंब भरुन वाहिल्याने ठिकठिकाणी वाहतूक खोळंबल्याचे चित्र होते. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या गाड्यांनाही पुराचा फटका बसल्याने त्यांनाही ताटकळावे लागले. मतदानावरही या पावसाचे सावट पसरल्याने नेतेमंडळींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गारवडेचा पूल गेला वाहूनकराड : पाटण

$
0
0

गारवडेचा पूल गेला वाहून

कराड :

पाटण तालुक्यातील मारूल हवेली भागातील गारवडे येथील गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ओढ्यावरील पूल रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने वाहून गेल्याने गावाची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. केवळ सहा महिन्यांपूर्वीच बांधकाम केलेल्या या पुलाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याने या बाबत गावकऱ्यांनी संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा करूनही याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर या पुलाने रविवारी अखेरचा निरोप घेतला.

दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्यानेच हा नवीन पूल वाहून गेल्याने संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावरती कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विधानसभा मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक असतानाच पूल वाहून गेल्याने निवडणुकीमध्ये कोणाला फटका बसणार याकडे लक्ष लागून आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर केला आहे. त्यामुळे येथील ओढे, नाले, नद्या वाहू लागल्या आहेत. यातच रविवारी पहाटेच्या सुमारास पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे गारवडे येथील गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यालाही पाणी आले होते. मात्र, या ओढ्यावरील पूल गेल्या सहाच महिन्यांपूर्वी सुमारे ३३ लाख रुपये खर्च करून बांधला होता. मात्र, या पुलाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने या पाण्यामुळे पुलाचे रोलिग, कठड्यांसह दोन्हीही बाजूच्या भरावांसह मोठा भाग पाण्याच्या दाबाने वाहून गेला आहे.

ओळ -गारवडे पूल पावसाच्या पाण्याने वाहून गेला.

शेतीचे मोठे नुकसान

कराड तालुक्यात परतीच्या पावसाने शनिवारी रात्रीपासून अक्षरशः थैमान घातले असून, या पावसाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरती पाणी आल्याने तेथील वाहतूक ठप्प झाली आहे. सोयाबीन, भुईमूग व भात काढणी व रब्बीच्या मशागतीची कामे खोळंबली असल्याने व ही पिके जलमय झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या परतीच्या जोरदार पावसामुळे कराड, पाटण तालुक्यांतील ओढे, नाल्यांना महापूर आला आहे. द्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे-बेंगळुरू आशियाई महामार्गाच्या सेवा रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी आल्याने तेथील सेवा रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती.

कोयनेचे दरवाजे चार दरवाजे एक फुटावर

कोयना धरण परिसरातही शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर सुरूच असल्याने व कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने रविवारी सायंकाळी सात वाजता धरणाच्या सहा वक्र दरवाजांपैकी चार दरवाजे एक फुट उचलण्यात आले. दरवाजा व पायथा वीजगृहातून एकूण ८४७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी सातपर्यंत कोयनानगर ६५, नवजा ५९, महाबळेश्वर ११ व वळवण येथे १६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात १२१३१ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणी पातळी २१६३.०५ फूट झाली असून, पाणीसाठा १०५.१४ टीएम्सी झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानासाठी प्रचंड चुरस

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पावसाने उघडीप घेतल्याने जिल्ह्यातील सर्व दहा मतदारसंघांत मोठ्या चुरशीने मतदानाचे चित्र दुपारपर्यंतच्या टप्प्यात दिसले. कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर या दोन मतदारसंघात 'तुल्यबळ' लढती होत असल्याने शहर, उपनगरातील अनेक मतदान केंद्रात महिलांसह पुरुषांच्या मोठ्या रांगा मतदानासाठी लागल्या होत्या. मतदान केंद्रांबाहेर समर्थकांनी मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत किल्ला लढवला. जिल्ह्यातील सर्व दहा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी ३८.१४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान कागल मतदारसंघात ४४.२४ टक्के तर सर्वात कमी ३१.८२ मतदान इचलकरंजी मतदारसंघात झाले.

गेले चार दिवस पावसामुळे निवडणुकीच्या प्रचारावर मर्यादा पडल्या होत्या. तरीही रविवारी रात्री उशिरापर्यंत राजकीय घडामोडी सुरू होत्या. सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रे सज्ज झाली. ढगाळ हवामान आणि हवेतील गारव्यामुळे सकाळच्या सत्रातील मतदानावर परिणाम झाला होता. मतदान केंद्रापासून २०० मीटर बाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी बूथ लावले होते. पहिल्या टप्प्यात, सकाळी आठ वाजेपर्यंत सहा ते सात टक्के मतदानाची नोंद झाली. साडेआठनंतर मतदारांच्या रांगा लागल्या.

दीपावली सण जवळ आल्याने फराळ तयार करण्यासाठी महिलावर्गाने लवकर मतदान केल्याचे चित्र पहायला मिळाले. सकाळी साडेनऊनंतर बहुतांशी मतदान केंद्रात महिला आणि पुरूषांच्या स्वतंत्र रांगा लागल्या होत्या. व्होटर स्लीपसह पुरावा असल्याची खात्री मतदान केंद्रांवर करुन घेतली जात होती. मतदान केंद्रांबाहेर आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी मतदारांना आवाहन करत होते. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी रिक्षाची सोय केली होती. वैद्यकीय मदतीसाठी सेवकांची उपस्थिती होती. पोलिस प्रशासनाकडून प्रत्येक केंद्रावर एक तासाने आढावा घेतला होता. उपनगर आणि बाहेरगावांतील मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांनी वाहनांची सोय केली होती.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. शुक्रवार पेठेतील बाळासाहेब खर्डेकर विद्यालय, ग. गो. जाधव विद्यालय, शाहू हायस्कूल, महानगरपालिका, शिवाजी पेठेतील आठनंबर शाळा, मंगळवार पेठेतील ताराबाई विद्यालय, अहिल्यादेवी विद्यालय, कदमवाडी, भोसलेवाडी येथील केंद्रांत मतदारांच्या रांगा लागल्या. नागाळा पार्क येथील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये सखी मतदान केंद्र महिलांनी हाताळले. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक, सरदार तालीमजवळ काँग्रेस आणि शिवसेनेच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दोन्ही गटाकडून मतदारांना आवाहन केले जात होते.

कोल्हापूर दक्षिणमधील भाजपचे आमदार अमल महाडिक आणि काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांच्यात निवडणूक चुरशीची असल्याने निवडणूक चुरशीची असल्याने काँग्रेस आणि भाजपच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. काँग्रेस, भाजप, ताराराणी आघाडीचे बहुतांशी नगरसेवक उपनगरात थांबून होते. भाजपने केशरी आणि हिरव्या रंगाच्या कनातीचे मंडप घातले होते. तर काँग्रेसने कार्यकर्त्यांच्या घराजवळ बूथ मांडले होते. जगरनगर, राजेंद्रनगर, साळोखेनगर, कळंबा, कंदलगाव, पाचगाव येथील केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. ग्रामीण भागात गडमुडशिंगी, उचगाव या ठिकाणी एकाच इमारतीत सात ते आठ मतदान केंद्र असल्याने मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. मतदान केंद्रांबाहेर दोन्ही पक्षांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर असल्याने जत्रेचे स्वरुप आले होते.

शहर उपाधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी मतदान कंद्रांवर पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले. मतदान केंद्रांतील गर्दी लक्षात घेऊन सकाळी अकरा वाजता जादा बंदोबस्त मागवण्यात आला. मतदान केंद्रांबाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले होते. दुपारी बारा वाजल्यानंतर कडक ऊन पडल्याने मतदार मोठ्या संख्येने केंद्रांवर आले. मतदानानंतर मतदारांना घरपोच सोडण्याची व्यवस्था उमेदवारांनी केली होती. बूथवरील कार्यकर्त्यांना फूड पॅकेटही वाटण्यात आले. दुपारी साडेतीन वाजल्यानंतर कार्यकर्त्यांकडून पुन्हा रिव्हू घेण्यात आला. मतदान केंद्रातून टक्केवारी घेऊन मतदारांना बाहेर करण्याची यंत्रणा सक्रीय करण्यात आली. घरोघरी जाऊन मतदान झाले आहे का? याची खातरजमा करून घेतली जात होती. शेवटच्या टप्यात मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरांमध्ये काँटे की टक्कर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दक्षिण मतदारसंघात 'हायहोल्टेज' लढतीचे स्वरुप प्राप्त झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत 'काँटे की टक्कर' असल्याचे दाखवून दिले. सायंकाळनंतर पावसाची शक्कता असल्याने सकाळपासून जास्तीजास्त मतदान व्हावे, यासाठी भाजपचे आमदार अमल महाडिक व काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. कळंबा, सुर्वेनगर, तपोवन, संभाजीनगर, फुलेवाडी, बोंद्रेनगर व सानेगुरुजी वसाहत येथील मतदान केंद्रांबाहेर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. उपनगरामधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी अखेरपर्यंत आर्थिक प्रलोभने दिली जात होती.

विद्यामंदिर कळंबा, कळंबा गर्ल्स हायस्कूल व कात्यायनी येथे कळंबा येथील मतदारांसाठी मतदान केंद्राची व्यवस्था केली होती. महाडिक व पाटील गट सक्रिय असल्याने येथे कमालीची चुरस पाहला मिळाली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करत होते. अशीच स्थिती सुर्वेनगर येथील महावीर इंग्लिश मीडियम स्कूलमधील मतदान केंद्रावर दिसत होती. सुर्वेनगर, महाराष्ट्र नगर, दत्तोबा शिंदे नगर, दादू चौगुले नगर, नवनाथ नगरातील मतदारांनी येथे रांगा लावल्या होत्या. तुलनेने परिसर मोठा असल्याने येथे मतदारांना आणण्यासाठी खासगी वाहनांचा सर्रास वापर झाला.

सकाळच्या सत्रात सर्वच ठिकाणी मतदानाची टक्केवारी चांगली दिसली. मात्र, ११ वाजल्यानंतर उन्हाची तिव्रता वाढत गेल्यानंतर काहीशी गर्दी कमी झाली. मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मंडप उभारला होता. पण, रांग त्यापुढे गेल्यानंतर मतदारांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला.

तपोवन मतदान केंद्रांपर्यंत गाड्यांच्या धुरळा उडत होता. शंभर मीटर रेषेच्या आत दोन्ही गटाचे समर्थक मतदारांना आ‌वाहन करत होते. येथे चार ठिकाणी स्वतंत्रपणे केंद्राची सुविधा असल्याने तुलनेने मतदानाचा वेग दिसत होता. साळोखेनगर येथील शिवशक्ती हायस्कूलध्ये विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या. तपोवन व शिवशक्ती मतदान केंद्रावर उमेदवार ऋतुराज पाटील यांनी भेट घेवून मतदानाचा आढावा घेतला. संभाजीनगरात न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मतदारांनी रांगच लावली होती. बोंद्रेनगर व फुलेवाडी गुरुदेव विद्यानिकेतन, महात्मा फुले विद्यामंदिर मतदान केंद्रावर व्यवस्था केली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची ईर्षा दिसत होती.

मोबाइल बंदीचा फज्जा

मतदानाबाबतची गुप्तता राखण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मतदान केंद्रात मोबाईल बंदी जाहीर केली. मात्र त्याबाबतची सक्ती करण्यात येत नव्हती. त्यामुळे बंदीआदेश कागदावरच राहिला. अनेकजण थेट मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जात होते. कार्यकर्ते तर मोबाईलवर संवाद साधतच प्रवेश करत होते. काहींनी मतदान झाल्यानंतर सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मतदारांच्या रांगा असल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत होते.

शेवटपर्यंत आर्थिक प्रलोभने

'दक्षिण'मध्ये महाडिक आणि पाटील गटामध्ये कमालीची ईर्षा निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा पॅटर्न कायम राखण्यासाठी पाटील गट सक्रिय झालेला असताना मतदारसंघावरील वर्चस्व कायम राखण्यासाठी महाडिक गटानेही चांगली तयारी केली. प्रचाराला सुरुवात झाल्यापासून कार्यकर्त्यांसह मतदारांना विविध अमिषे दाखवण्यात आली. शेवटचे दोन दिवस तर प्रचंड आर्थिक उलाढाल झाली. सोमवारी मतदान सुरू असतानाही 'काठा'वरील मतदारांना आर्थिक अमिषे दाखवली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगाव, जरगनगरमध्ये चुरशीने मतदान

$
0
0

जवाहरनगरात मतदान यंत्रात बिघाड;

कोल्हापूर टाइम्स टीम

संवेदनशील गाव म्हणून समजल्या जाणाऱ्या पाचगावमध्ये अतिशय चुरशीने मतदान झाले. तर जरगनगर, रामानंदनगरमधील मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. जवाहरनगर येथील वीर कक्कया विद्यालय येथील मतदान केंद्रावर सकाळी मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदारांना काही वेळ वाट पाहावी लागली. एक मशिन जवळपास सव्वा तास बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रशासनाने मतदान यंत्र बदलण्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात झाली.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पाचगाव हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव समजले जाते. महाडिक आणि पाटील गटाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. पाचगाव केंद्र शाळा, शांतीनगर येथील षटकोनी शाळा, वस्ती शाळा आणि आरकेनगर येथील शाळेत मतदानाची सोय होती. पाचगाव केंद्र शाळेत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. महिलांची संख्या लक्षणीय होती.

भाजपचे उमेदवार व आमदार अमल महाडिक यांच्यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भिकाजी गाडगीळ, दत्ता गवळी, संभाजी शिंदे, अमर कारंडे, प्रकाश गाडगीळ, विशाल पाटील आदींची यंत्रणा राबत होती. काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्यासाठी सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच प्रविण कुंभार, सदस्य प्रकाश गाडगीळ, संग्राम पोवाळकर, कृती समितीचे संजय पाटील, नारायण गाडगीळ आदी सक्रिय होते.

जरगनगर-रामानंदनगर भागात मिळून जवळपास आठ हजार मतदार आहे. या भागात जरगनगर विद्यामंदिर येथील मतदान केंद्र आहे. येथील आठही मतदान केंद्रावर सकाळपासून मतदार मोठ्या संख्येने नजरेस पडत होते. काही ठिकाणी मतदारांची ने, आण करण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनाची व्यवस्था केली होती. नेहरुनगर विद्यामंदिर परिसरात पाटील आणि महाडिक गटातील कार्यकर्त्यांतील ईर्षा दिसली. भाजपकडून सयाजी आळवेकर, शिवाजी आळवेकर, जयसिंग शिंदे, सुधीर देसाई, प्रितम यादव मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करत होते. काँग्रेसकडून जगमोहन भुर्के, प्रसन्न वैद्य, अरुण बारामते आदींची यंत्रणा सक्रिय राहिली. बारामते हे भाजपच्या नगरसेविका अश्विनी बारामते यांचे पती आहेत.

व्हीलचेअरसाठी धावाधाव

जवाहरनगरमधील वीर कक्कया विद्यालय येथे दिव्यांगासाठी व्हीलचेअरची सुविधा नव्हती. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या वर्षानगर येथील प्रियांका पोवार यांना सकाळी दोन तास मतदान केंद्राबाहेर थांबावे लागले. व्हीलचेअर नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली. महापालिका प्रशासनाने अन्य ठिकाणची व्हीलचेअर याठिकाणी उपलब्ध केली. यानंतर पोवार यांना मतदानाचा हक्क बजावता आला. दरम्यान व्हीलचेअर केंद्रावर नसल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांची धावाधाव झाली. सुभाषनगर येथील अंध व्यक्ती चंदन बागडेकर यांनी मतदान केले.

राजेंद्रनगरात उमेदवारांनी

पुरवली मतदानासाठी रसद

राजेंद्रनगर परिसरात एका बाजूला बंगलो आणि अपार्टमेंटधारक तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी असे चित्र आहे. कोल्हापूर पब्लिक स्कूल, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर राजेंद्रनगर येथे मतदानाची सोय करण्यात आली होती. राजेंद्रनगर विद्यामंदिरात सकाळपासूनच मतदारांनी रांगा लागल्या होत्या. विद्यामंदिरमध्ये तीन ठिकाणी मतदान करण्याची सोय केली होती. झोपडपट्टीतील मतदान बाहेर काढण्यासाठी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा सक्रिय होती. या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस फौजफाटा लावला होता. दुपारनंतर झोपडपट्टीतील मतदान बाहेर काढण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाल्या. थेट मतदारांपर्यंत यंत्रणेची रसद पोहचत होती. अधिकाधिक मतदान होण्यासाठी कार्यकर्ते सक्रिय झाल्यामुळे दुपारनंतर मतदान केंद्रावर पुन्हा रांगा वाढल्या. संत रोहिदास विद्यामंदिर येथे मतदानासाठी रांगा होत्या.

मी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रियेविषयी मला उत्सुकता होती. पहिल्या मतदानाची अनुभूती माझ्या कायम लक्षात राहिल. विकासाभिमुख नेतृत्व, समाजहिताचा व्यापक दृष्टीकोन आणि सामान्य लोकांसाठी काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करायचे हे मी ठरविले होते.

- अजय आळवेकर, नवमतदार नेहरुनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगाव, जरगनगरमध्ये मतदारांची गर्दी

$
0
0

appasaheb.mali @timesgroup.com Tweet : @appamali_MT कोल्हापूर : संवेदनशील गाव म्हणून समजल्या जाणाऱ्या पाचगावमध्ये अतिशय चुरशीने मतदान झाले. तर जरगनगर, रामानंदनगरमधील मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. जवाहरनगर येथील वीर कक्कया विद्यालय येथील मतदान केंद्रावर सकाळी मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदारांना काही

वेळ वाट पाहावी लागली. एक मशिन जवळपास सव्वा तास बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले.

प्रशासनाने मतदान यंत्र बदलण्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात झाली. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पाचगाव हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव समजले जाते. महाडिक आणि पाटील गटाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. पाचगाव केंद्र शाळा, शांतीनगर येथील षटकोनी शाळा, वस्ती शाळा आणि आरकेनगर येथील शाळेत मतदानाची सोय होती. पाचगाव केंद्र शाळेत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. महिलांची संख्या लक्षणीय होती. भाजपचे उमेदवार व आमदार अमल महाडिक यांच्यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भिकाजी गाडगीळ, दत्ता गवळी, संभाजी शिंदे, अमर कारंडे, प्रकाश गाडगीळ, विशाल पाटील आदींची यंत्रणा राबत होती. काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्यासाठी सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच प्रविण कुंभार, सदस्य प्रकाश गाडगीळ, संग्राम पोवाळकर, कृती समितीचे संजय पाटील, नारायण गाडगीळ आदी सक्रिय होते. जरगनगर-रामानंदनगर भागात मिळून जवळपास आठ हजार मतदार आहे. या भागात जरगनगर विद्यामंदिर येथील मतदान केंद्र आहे. येथील आठही मतदान केंद्रावर सकाळपासून मतदार मोठ्या संख्येने नजरेस पडत होते. काही ठिकाणी मतदारांची ने, आण करण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनाची व्यवस्था केली होती. नेहरुनगर विद्यामंदिर परिसरात पाटील आणि महाडिक गटातील कार्यकर्त्यांतील ईर्षा दिसली. भाजपकडून सयाजी आळवेकर, शिवाजी आळवेकर, जयसिंग शिंदे, सुधीर देसाई, प्रितम यादव मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करत होते. काँग्रेसकडून जगमोहन भुर्के, प्रसन्न वैद्य, अरुण बारामते आदींची यंत्रणा सक्रिय राहिली. बारामते हे भाजपच्या नगरसेविका अश्विनी बारामते यांचे पती आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात मतदान केंद्रांत पाणी

$
0
0

सोलापुरात मतदान केंद्रांत पाणी

आडम मास्तर-माने आमने-सामने; करमाळ्यात आमदार नारायण पाटलांच्या समर्थकांचे डोके फोडले

सोलापूर :

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळी दहा वाजता उघडला. रात्रभर सुमारे ७० मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रात पाणी शिरले होते. सकाळी नऊ वाजेपर्यंत बहुतांश मतदान केंद्रांबाहेर गुडघाभर पाणी होते. अनेक मतदान केंद्रांतही पाणी शिरल्याने केवळ पाच टक्केच मतदान झाले. दहा वाजता सूर्यदर्शन झाल्यानंतर मतदानाला वेग आला.

पावसामुळे सोमवारी सकाळच्या सत्रात पुरती दाणादाण उडाली होती. सकाळच्या सत्रात पावसाचा आनंद लुटत अनेकांनी छत्रीचा आधार घेत केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. सकाळी धो-धो पाऊस होता, पाऊस सुरू झाल्यानंतर नागरिक मतदानासाठी बाहेर पडले. सकाळच्या सत्रातील मतदानाची अवस्था पाहून उमेदवार धास्तावले होते. मात्र, अकरानंतर पाऊस थांबल्यानंतर मतदानासाठी नागरिक बाहेर पडल्यानंतर उमेदवारांचे चेहरे फुलले.

सोलापूर शहरातील सम्राट चौक, शेळगी, बुधवार पेठ, दमाणी नगर सुंदराबाई हायस्कूल, पाणी गिरणी आदी ठिकाणच्या मतदान केंद्रांवर पावसामुळे दलदल निर्माण झाली होती. बऱ्याच केंद्रामध्ये थेट पाणी शिरल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाण्यात उभे राहूनच कामकाज पाहावे लागले. ठिकठिकाणी मतदान केंद्राबाहेरील पायऱ्या ही पाण्यात असल्याने अन्य ठिकाणांहून टेबल आणून वेगळी सोय करावी लागली. बोरामणी नाका, मातंग वस्ती परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने येथील नागरिक रस्त्यावर उतरले. शाहीर वस्ती येथील केंद्राबाहेर उभारण्यात आलेला मंडप पोलिसांच्या अंगावर कोसळला. मात्र, कोणीही जखमी झाले नाही. रामवाडी, कोतम चौकातील मतदान केंद्रात पाणी होते. शहरातील अनेक मतदान केंद्रांना पाण्याचा वेढा पडल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्र जागून काढली. सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर ही कर्मचाऱ्यांचे हाल सुरूच होते.

आडम मास्तर- दिलीप माने आमने-सामने

दत्त नगरातील मतदान केंद्रात माकपचे उमेदवार नरसय्या आडम बराच वेळ आताच असल्याने कार्यकर्त्यांनी हरकत घेतली. सेनेचे उमेदवार दिलीप माने यांना समजताच ते तत्काळ मतदान केंद्रावर आले. तेव्हा आडम आणि माने यांच्याच बाचाबाची झाली. काही वेळाने वाद निवळला. ज्या रिक्षातून मतदारांना आणून मतदान करण्यात येत होते, ती रिक्षा माकपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे दिली.

नारायण पाटलांच्या कार्यकर्त्याचे डोके फोडले

करमाळा विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच तणाव होता. सेनेचे आमदार, अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्या एका समर्थकाला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार संजय शिंदे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्यामुळे डोक्यातून रक्तस्त्राव झाला. रक्तबंबाळ अवस्थेतील समर्थकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. माढा तालुक्यातील दहिवली गावात हा प्रकार घडला. पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त वाढविल्याने अनर्थ टळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारांना सवलतीची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध पातळीवर प्रयत्न झाले. प्रशासनाच्या या प्रयत्नांना शहरातील लहानसहान व्यावसायिक, नाष्टा सेंटर व बिर्याणी विक्रेत्यांनी साथ दिली. प्रत्यक्ष मतदानादिवशी त्यांनी, 'मतदान करा आणि लाभ मिळवा'अशी संकल्पना राबवली. मतदान करुन आलेल्या ग्राहकांसाठी डोसा, बिर्याणी, मिसळच्या बिलात दहा टक्के सवलत दिली.

शुक्रवार पेठेतील अविज बिर्याणी हाऊसने 'योग्य उमेदवाराला मतदान करा व लोकशाही बळकट करा. बोटावरील शाई दाखवा आणि बिर्याणीवर दहा टक्के सवलत मिळवा'अशी ऑफर जाहीर केली होती. मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा यासाठी वेगळी शक्कल लढवली. दुपारी बारा ते रात्री दहा या वेळेत जवळपास ४० हून अधिक ग्राहकांनी लाभ घेतला'असे अविराज गवस यांनी सांगितले. शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही प्रकारच्या बिर्याणीवर ही सवलत होती.

उद्यमनगर येथील लक्ष्मी मिसळ येथे सवलतीच्या दरात मिसळीचा आस्वाद चाखण्याची संधी मतदारांना उपलब्ध करुन दिली होती. मिसळच्या बिलावर दहा टक्के सवलत दिली. राजारामपुरी खाऊ गल्लीतील आवटी खानावळने मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आपल्यापरीने हातभार लावला. खवैय्यांसाठी या ठिकाणी बिलावर दहा टक्के सवलत जाहीर केली होती. उजळाईवाडी फाटा परिसरातील सात बारा हॉटेलनेही 'बोटावरील शाई दाखवा आणि सवलतीचा लाभ घ्या'म्हणून मतदारांना बिलात दहा टक्के सवलतीची भेट दिली. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग वाढला पाहिजे यासाठी हा वेगळा प्रयत्न केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापूर शहरातमतदान केंद्रांत पाणी

$
0
0

सोलापूर : सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळी दहा वाजता उघडला. रात्रभर सुमारे ७० मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रात पाणी शिरले होते. सकाळी नऊ वाजेपर्यंत बहुतांश मतदान केंद्रांबाहेर गुडघाभर पाणी होते. दहा वाजता सूर्यदर्शन झाल्यानंतर मतदानाला वेग आला.

पावसामुळे सोमवारी सकाळच्या सत्रात पुरती दाणादाण उडाली होती. सकाळच्या सत्रात पावसाचा आनंद लुटत अनेकांनी छत्रीचा आधार घेत केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. शहरातील सम्राट चौक, शेळगी, बुधवार पेठ, दमाणी नगर सुंदराबाई हायस्कूल, पाणी गिरणी आदी ठिकाणच्या मतदान केंद्रांवर पावसामुळे दलदल निर्माण झाली होती. बऱ्याच केंद्रामध्ये थेट पाणी शिरल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाण्यात उभे राहूनच कामकाज पाहावे लागले. ठिकठिकाणी मतदान केंद्राबाहेरील पायऱ्या ही पाण्यात असल्याने अन्य ठिकाणांहून टेबल आणून वेगळी सोय करावी लागली. शाहीर वस्ती येथील केंद्राबाहेर उभारण्यात आलेला मंडप पोलिसांच्या अंगावर कोसळला. अनेक मतदान केंद्रांना पाण्याचा वेढा पडल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्र जागून काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची उघडीप; महिला मतदारांची संख्या लक्षणीय

$
0
0

पावसाची उघडीप; महिला मतदारांची संख्या लक्षणीय

सातारा :

सातारा जिल्ह्यात लोकसभेची पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघासाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६४.४७ टक्के मतदान झाले. पावसाने उघडीप दिल्यामुळे बहुतांश नागरिकांनी सकाळीच मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. सातारा येथे राजमाता कल्पनाराजे भोसले, उदयनराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले आणि दीपक पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर वाई-महाबळेश्वर-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मदन भोसले आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेखर गोरे यांच्या वाहनांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या दोन घटना वगळता जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सातारा, पाटण, कराड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले. माण मतदारसंघात मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काहीकाळ मतदान थांबल्याचे प्रकार घडले

सोमवारी पहाटेपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे मतदान करण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. मतदानसाठी सातारा जिल्ह्यात २९७८ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. त्यासाठी २२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आपआपल्या उमेदवारांना अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली होती. मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, त्यांना मतदान स्लिप देणे, वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे या कामात कार्यकर्ते दिवसभर व्यस्त होते. प्रशासनाच्या वतीने दिव्यांग, गरोदर महिला यांना मतदान करण्यासाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. मतदान प्रक्रिया दरम्यान सातारा येथे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. सातारा जिल्ह्यांत सरासरी ६४.४७ टक्के मतदान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची उघडीमुळे वाढला मतदानाचा टक्का

$
0
0

पावसाची उघडीमुळे वाढला मतदानाचा टक्का

सातारा :

सातारा जिल्ह्यात लोकसभेची पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघासाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६४.४७ टक्के मतदान झाले. पावसाने उघडीप दिल्यामुळे बहुतांश नागरिकांनी सकाळीच मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. सातारा येथे राजमाता कल्पनाराजे भोसले, उदयनराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले आणि दीपक पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर वाई-महाबळेश्वर-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मदन भोसले आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेखर गोरे यांच्या वाहनांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या दोन घटना वगळता जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सातारा, पाटण, कराड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले. माण मतदारसंघात मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काहीकाळ मतदान थांबल्याचे प्रकार घडले.

माजी मुख्यमंत्री, येथील महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण, महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी रेठरे बुद्रुक तर अपक्ष उमेदवार अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उडाळकर यांनी उंडाळे येथे आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला.

कराड दक्षिण, उत्तरमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रित मतदान होत असल्याने मतदारांना मतदानासाठी वेळ लागत होता. अनेक मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाल्याने त्या ठिकाणी नवीन यंत्रे दिल्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले.

सोमवारी पहाटेपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे मतदान करण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. मतदानसाठी सातारा जिल्ह्यात २९७८ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. त्यासाठी २२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आपआपल्या उमेदवारांना अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली होती. मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, त्यांना मतदान स्लिप देणे, वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे या कामात कार्यकर्ते दिवसभर व्यस्त होते. प्रशासनाच्या वतीने दिव्यांग, गरोदर महिला यांना मतदान करण्यासाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. मतदान प्रक्रिया दरम्यान सातारा येथे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. सातारा जिल्ह्यांत सरासरी ६४.४७ टक्के मतदान झाले.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुबळी रेल्वे स्टेशनवरील स्फोटाचे कोल्हापूर कनेक्शन

$
0
0

कोल्हापूर: कर्नाटकच्या हुबळी रेल्वेस्टेशनवर झालेल्या भीषण स्फोटाचे कोल्हापूर कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) आणि बॉम्बशोध पथकाच्या तज्ज्ञांची टीम सोमवारी रात्री तातडीने हुबळीकडे रवाना झाली आहे.

हुबळी रेल्वे स्टेशनवर सोमवारी अज्ञात वस्तूंच्या स्फोटात एकजण जखमी झाला आहे. ज्या पार्सलचा स्फोट झाला ते तमिळनाडूमधून कोल्हापूरला येत होते. ज्या रेल्वेतून पार्सल येत होते ती अमरावती एक्स्प्रेस हुबळीपर्यंतच होती. आरपीएफ जवानाला डब्यातील बॉक्स संशयास्पद वाटल्याने तो उतरून विक्रेत्याकरवी खोलण्याचा प्रयत्न केला असता त्याचा स्फोट झाला. या स्फोटाचे उजळाईवाडीत शुक्रवारी झालेल्या स्फोटाशी काही कनेक्शन आहे काय, याची चौकशी कोल्हापूर पोलिस करणार आहेत. त्यासाठी एक विशेष पथक सोमवारी रात्री हुबळीकडे रवाना झाले.

या दोन्ही स्फोटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘हायअलर्ट’जारी करण्यात आला आहे. दरम्यान, कोल्हापुरात घातपात घडवण्यासाठी की अन्य काही कारणासाठी स्फोटके आणण्यात येत होती, या अनुषंगाने तपास सुरू आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलिस सतर्क झाले असून रेल्वे स्टेशन, बसस्थानके, धार्मिक स्थळे, आदी ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महामार्गासह शहरात नाकेबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

१८ ऑक्टोबरला उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील (रा. न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) यांचा मृत्यू झाला होता. पुलाच्या शेजारील नाल्यात जिलेटिन, तांब्याची केबल, सुतळ्या, रासायनिक पावडर, पुंगळी आदी साहित्यही सापडले होते. या स्फोटाचे कर्नाटक कनेक्शन असल्याच्या संशयावरुन हैदराबाद आणि कर्नाटकच्या दहशतवादी पथकाने उजळाईवाडी परिसरात भेट देऊन माहिती देखील घेतली होती.

कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्टेशनवरील स्फोटाचे कोल्हापूर कनेक्शन असल्याची शक्यता कर्नाटक पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दृष्टीने विशेष पथक हुबळीला पाठवले आहे.
डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा: नवलेवाडीत कोणतंही बटण दाबलं तरी कमळाला मत!

$
0
0

सातारा: कोरेगाव मतदारसंघातील नवलेवाडी गावातील मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या केंद्रावरील ईव्हीएमवरील कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळ या चिन्हालाच जात असल्याचं समोर आलं. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना सांगितले. केंद्रावरील अधिकाऱ्यांनीही ही बाब मान्य केली आणि तातडीनं ईव्हीएम बदलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीसह लोकसभेच्या सातारा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठीही मतदान झालं. सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. कोरेगाव मतदारसंघातील नवलेवाडी गावातील मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचं मतदारांच्या लक्षात आलं. मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान दिल्यानंतरही व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपच्या उमेदवाराला मत जात असल्याचं काही गावकऱ्यांच्या लक्षात आलं. सकाळी अकराच्या सुमारास ही बाब निदर्शनास आलं. तोपर्यंत दोनशेच्या जवळपास मतदान झालं होतं. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना याबाबत गावकऱ्यांनी तक्रार केली. तसंच नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला. सुरुवातीला गावकऱ्यांच्या तक्रारीकडे मतदान अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, आक्रमक झालेल्या ग्रामस्थांमुळं पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. काही वेळ तणावाचं वातावरण होतं. हा गोंधळ सुरू असतानाच ईव्हीएममध्ये घोळ असल्याच्या तक्रारी अनेक ग्रामस्थांकडून करण्यात आल्या. अखेर मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना त्याची दखल घ्यावी लागली. त्यांनी ईव्हीएममधील घोळाची शाहनिशा करून घेतली. खात्री पटल्यानंतर त्यांनी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं मान्य केलं. त्यानंतर ईव्हीएम बदलण्यात आलं. त्यानंतर मतदान केंद्रावरील तणाव निवळला, अशी माहिती काही गावकऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

मुंबई शहरासह राज्यात मतटक्का घसरला

एक्झिट पोल: भाजप-सेनेला २१३ जागांचा अंदाज

ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा प्रकार मतदानाला सुरुवात झाल्यानंतर तब्बल चार तासांनी लक्षात आला. तोपर्यंत दोनशेहून अधिक मतदारांनी मतदान केलं होतं. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी तातडीने दखल का घेतली नाही, असा प्रश्न मतदार विचारत आहेत. तसंच आधी झालेल्या मतदानाचं काय करणार याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. या घटनेची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेणं आवश्यक आहे, अशी मागणी आता मतदार करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images