Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अमित शहा यांची रविवारी कोल्हापुरात सभा

$
0
0

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी (ता. १३) सकाळी ११ वाजता तपोवन मैदानावर जाहीर सभा होणार आहे. शुक्रवारी प्रदेश कार्यालयाकडून जिल्हा कार्यालयाला शहा यांच्या सभेची माहिती देण्यात आली. शहा यांची १० ऑक्टोबर रोजी सभा होणार होती. पण परतीचा पाऊस आणि नियोजन नसल्याने त्यांची सभा पुढे ढकलण्याची विनंती केल्यानंतर सभा रद्द करण्यात आली. गुरुवारी सांगली जिल्ह्यातील जत येथे होणाऱ्या सभेसाठी शहा उजळाईवाडी विमानतळावर आले होते. त्यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शहांना सभा घेण्याची विनंती केली होती. पण त्यांनी वेळापत्रक व्यस्त असल्याचे सांगितले होते. पण रात्री उशिरा शहा यांची सभा होणार असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांना कळवण्यात आले. त्यामुळे दोन दिवसांत शहा यांच्या सभेचे नियोजन करावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवारांनी माझा फटका अनुभवलेला नाही: चंद्रकांत पाटील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कोथरुडमध्ये अडकवून ठेवले असा पवारांचा समज आहे. पण तुम्ही या पाटलाला ओळखलेले नाही. मी चेहऱ्यावर कुठलाही भाव ठेवत नाही. मी कसा फटका लगावतो हे समजत नाही. माझा अनुभव तुम्ही घेतलेला नाही’. अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या शिवसेना-भाजप मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी काँग्रेसवरही सडकून टीका करताना भाजपमध्ये बंडखोरांची गय केली जाणार नाही, असा इशाराही दिला.

कोथरुड विधानसभा मतदार संघातून मोठ्या फरकाने विजयी होणार असा विश्वास व्यक्त करत पाटील म्हणाले, ‘या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीला माझ्याविरोधात उमेदवार मिळाला नाही. या मतदारसंघात शरद पवार, अजित पवारांचे डायरेक्ट, इनडायरेक्ट काही तरी चालले आहे. म्हणून अनेकवेळा पराभूत झालेले मनसेचे उमेदवार अॅड . किशोर शिंदे यांना आघाडीने पाठिंबा दिला आहे. या आघाडीत २४ पक्ष आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते मला भेटत असून ते म्हणत आहेत आम्ही मनसेचा झेंडा का फिरवायचा. कुणाला तरी बळीचा बकरा करायचा म्हणून आघाडीने मनसेला पाठिंबा दिला आहे’.

काँग्रेसला मरणकळा आल्या असताना त्यांना प्राणवायू घालू नका, असे आवाहन त्यांनी बंडखोरांना केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात पळून गेले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात नऊ, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा २०, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा २० सभा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसाला सहा सभा घेत आहेत. पक्षासाठी भाजपचे नेते मोठ्या प्रमाणावर कष्ट घेत आहेत. असे कष्ट घेण्याची काँग्रेसकडे धमक नाही अशा शब्दात त्यांनी टीका केली.

भाजपमध्ये बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दमही प्रदेशाध्यक्षांनी दिला. ते म्हणाले, भाजपमध्ये बंडखोरी करणाऱ्या शंकरसिंह वाघेला, मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह कल्याणसिंह यांची माती झाली आहे. भाजपमध्ये बंडखोरीला वाव नसून कर्तुत्वाला वाव आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे बहुमत मिळाले. विधानसभा निवडणुकीतही शिवसेना भाजप युतीला मोठे यश मिळणार असून २२० आकडा पार पडेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. या सभेला शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर अध्यक्ष राहूल चिकोडे, शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले उपस्थित होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांची कोटींची उड्डाणे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत विद्यमान ९ आमदार पुन्हा रिंगणात आहेत. सर्वच विद्यमान आमदारांची मालमत्तेने पाच वर्षांत संपत्तीत वाढ झाली आहे. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या विवरणपत्रातून मालमत्ता समोर आली आहे. रिंगणातील एकूण १०६ उमेदवारापैकी सर्वाधिक समरजित घाटगे श्रीमंत उमेदवार ठरले असून त्यांची मालमत्ता तब्बल १५२ कोटी, १५ लाख आहे.

सर्व विधानसभा मतदारसंघात एकूण १०६ उमेदवार रिंगणात आहेत. चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर वगळता विद्यमान सर्व आमदार पुन्हा रिंगणात आहेत. यांच्यासह उद्योजक, व्यवसायिक, डॉक्टरही निवडणूक लढवत आहेत. या सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मालमत्ता, गुन्ह्यांसंबंधीची माहिती दिली आहे. त्यात सर्वच विद्यमान आमदारांच्या मालमत्तेचा आलेख उंचावलेला आहे. उत्तरमधून शिवसेनेतून आमदार राजेश क्षीरसागर तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांची सन २०१४ मध्ये एकूण मालमत्ता तीन कोटी, ९७ लाख होती. पाच वर्षांत ती दुप्पटीहून अधिक वाढून सहा कोटी ४८ लाख झाली. शिरोळ मतदारसंघातून पहिल्यादांच २०१४ मध्ये उल्हास पाटील शिवसेना पक्षातून आमदार झाले. त्यावेळी त्यांची मालमत्ता चार लाख, ३२ हजार मालमत्ता होती. पाच वर्षात त्यात २० पटीहून अधिक वाढून ९० लाख १३ हजार झाली आहे. त्यांच्या मालमत्तेचीही वाटचाल कोटीच्या दिशेने सुरू आहे.

दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून अमल महाडिक २०१४ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी त्यांची मालमत्ता सहा कोटी ११ लाख होती. त्यात तिप्पट वाढ होऊन आता १७ कोटी ३८ लाख झाली आहे. आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची आता चार कोटींवर मालमत्ता आहे. २०१४ मध्ये त्यांच्या पत्नीच्या नावे ३० लाख ९६ हजार जंगम मालमत्ता होती. ती आता तीन कोटी तीन लाख झाली आहे. इचलकरंजीचे भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांची २०१४ मध्ये दोन कोटी २५ लाख मालमत्ता होती. आता ती दोन कोटी सहा लाख झाली आहे. उर्वरित सर्वच आमदारांच्या मालमत्तेत लक्षणीय वाढ झाली आहे.

सर्वात तरूण ऋतुराज

रिंगणातील प्रमुखांमध्ये सर्वात तरुण दक्षिण विधानसभा मतदारसंघातून रिंगणात असलेले ऋतुराज पाटील आहेत. त्यांचे वय २९ वर्षांचे आहेत. ७४ वय असलेले के. पी. पाटील हे सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत. ते राधानगरी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पन्नाशी ओलांडलेले १२ उमेदवार असून ११ जण पन्नाशीच्या आतील आहेत. विद्यमान आमदारांत सर्वात तरुण दक्षिणचे भाजपचे उमेदवार अमल महाडिक असून त्यांचे वय ४१ आहे. त्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर ४५ वर्षांचे आहेत.

१७ उमेदवार पदवीधर

प्रमुख उमेदवारांपैकी १७ उमेदवार पदवीधर आहेत. डॉक्टर, इंजिनीअर, कृषी पदवी घेतलेले तर नववी, दहावी, अकरावी उत्तीर्ण झालेलेही उमेदवार आहेत. आमदार डॉ. मिणचेकर हे डेंटल सर्जन आहेत. घाटगे सी. ए आहेत. आमदार सत्यजित पाटील यांनी फलोत्पादनची तर राजेश पाटील कर्नाटकातून कायद्याची पदवी घेतली आहे. ऋतुराज पाटीलांचे शिक्षण बी. बी. ए. झाले आहे. आमदार महाडिक, ऋतुराज यांच्यासह अनेक उमेदवारांनी उत्पन्नाचे स्रोत शेती असल्याची नोंद प्रतिज्ञापत्रात केली आहे.

उमेदवारांची मालमत्ता

पालकमंत्री चंद्रकांत पाटील : १० कोटी ८९ लाख

आमदार अमल महाडिक :१७ कोटी ३८ लाख

सुजित मिणचेकर : ५ कोटी १० लाख

सत्यजित पाटील : २ कोटी

प्रकाश आबिटकर : १ कोटी ४७ लाख

चंद्रदीप नरके : ९ कोटी ७ लाख

राजेश क्षीरसागर : ९ कोटी २८ लाख

हसन मुश्रीफ : ८ कोटी ८७ लाख

उल्हास पाटील ९० लाख १३ हजार

सुरेश हाळवणकर : २ कोटी

पी. एन. पाटील : १० कोटी

प्रकाश आवाडे : १५ कोटी ५२ लाख

सतीशचंद्र कांबळे : १ कोटी ४४ लाख

सावकर मादनाईक :१ कोटी २ लाख

अनिलकुमार यादव :१२ कोटी ५४ लाख

राजेंद्र पाटील-यड्रावकर : ८ कोटी २० लाख

संजय घाटगे : ५ कोटी १६ लाख

ऋतुराज पाटील : ३४ कोटी

चंद्रकांत जाधव : ८० कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा माजी आमदार पुन्हा रिंगणात

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीत सहा माजी आमदार रिंगणात उतरले असून त्यांना तुल्यबळ विद्यमान आमदाराविरोधात टक्कर द्यावी लागली आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे, विनय कोरे, माजी आमदार के. पी. पाटील, पी. एन पाटील, राजीव आवळे, संजय घाटगे यांनी विजयासाठी अस्तित्व पणाला लावले आहे.

इचलकरंजी मतदार संघातून सलग आठव्यांदा प्रकाश आवाडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सातवेळा काँग्रेस पक्षाकडून लढणाऱ्या आवाडेंनी यंदा काँग्रेस जिल्हाध्यक्षदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. आवाडे यांच्या ४५ व्या वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांना तीनवेळा पराभव पत्करावा लागला असून चार वेळा ते विजयी झाले आहेत.

१९९५ पासून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे माजी जिल्ह्याध्यक्ष पी.एन. पाटील यांनी २००४ मध्ये फक्त एकदाच निवडणूक जिंकली. पण तत्पुर्वी झालेल्या दोन निवडणुकीत त्यांना शेकापचे संपतराव पवार यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक आणि काँग्रेसनिष्ठ असलेल्या पाटील यांचा २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांनी पराभव केला. गतवेळच्या निवडणुकीत अवघ्या ७१० मतांनी पराभव झालेल्या पी.एन. यांनी नरके यांची हॅटट्रीक रोखण्यासाठी यावेळी कंबर कसली आहे.

१९९९ मध्ये रिंगणात उतरलेल्या विनय कोरे यांनी पहिलीच निवडणूक जिंकली. त्यानंतर विलासराव देशमुख यांचे सरकार पाडणाऱ्या बंडखोरांना मिळाले. २००४ मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना करत जिल्ह्यात तीन जागा जिंकल्याने त्यांना अपारंपारिक उर्जामंत्री मिळाले. पण २००९ च्या निवडणुकीत जनसुराज्यच्या जागा कमी झाल्याने जिल्ह्यातील स्वत:ची जागा वाचवण्यात यश आले. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सत्यजित पाटील यांच्याकडून ३८८ मतांनी पराभव झाला.

१९९९ मध्ये काँग्रेसचे आमदार बजरंग देसाई यांच्याकडून पराभूत झालेल्या के. पी. पाटील यांनी २००४ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेत प्रवेश केला. मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ राधानगरी मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. याही निवडणुकीत के.पी.ने बाजी मारली. २०१४ मध्ये हॅटट्रीकसाठी सज्ज असलेल्या के.पीं.ना शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांनी पराभूत केले. यंदाच्या निवडणुकीत आबिटकरासमोर पुन्हा आव्हान निर्माण केले आहे.

२००४ मध्ये जनसुराज्यकडून हातकणंगले मतदार संघातून राजीव आवळे विजयी झाले. पण त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या निवडणूकीत पराभव पत्करावा लागला. यंदा त्यांना जनसुराज्यनेउमेदवारी नाकारली असली तरी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

\Bसंजय घाटगे पुन्हा मैदानात

\B१९९७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत आमदारकीचा राजीनामा देऊन उतरलेल्या सदाशिवराव मंडलिक खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर कागल विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून संजय घाटगे निवडून आले. त्यांनी हसन मुश्रीफांचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या सर्व चारही निवडणुकीत घाटगे यांचा मुश्रीफांनी पराभव केला. घाटगे यांनी १९९९ मध्ये काँग्रेसकडून २००४ मध्ये शिवसेनेकडून २००९ मध्ये स्वाभिमानीकडून तर २०१४ मध्ये परत शिवसेनेकडून निवडणूक लढवली. पण त्यांना यश आले नाही. यंदाही ते सेनेकडून लढत असून त्यांना मुश्रीफासह समरजित घाटगे यांचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे.

उमेदवाराचे नाव एकूण निवडणूका जय पराभव

हसन मुश्रीफ ५ ४ १

प्रकाश आवाडे ८ ५ ३

के. पी. पाटील ५ २ ३

संजय घाटगे ५ १ ४

पी. एन. पाटील ५ १ ४

विनय कोरे ४ ३ १

राजीव आवळे ३ १ २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारकीसाठी ‘नेक्स्ट जनरेशन’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी सहा मतदारसंघातून माजी आमदारांची मुले यावर्षी विधानसभा निवडणूक लढवित आहेत. विधानसभा लढवायची म्हणून त्यांनी गेल्या तीन चार वर्षांपासून तयारी सुरू केली होती. काहींनी पक्षांतरही केले. ऐनवेळी ज्या पक्षात प्रवेश केला त्या पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून बंडखोरी करत विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. राधानगरी, कागल, चंदगड, हातकणंगले मतदारसंघात ते नशीब आजमावत आहेत.

माजी आमदार दिनकरराव जाधव यांचा मुलगा सत्यजित, माजी आमदार बजरंग देसाई यांचा मुलगा राहुल, माजी आमदार नरसिंग पाटील यांचे मुलगा राजेश आणि महेश, माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांचा मुलगा समरजितसिंह, माजी आमदार जयवंतराव आवळे यांचा मुलगा राजू हे विविध मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. वडिलांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी नेक्स्ट जनरेशन सरसावली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार नरसिंग पाटील यांचा मुलगा राजेश यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून नरसिंग पाटील यांचा मुलगा आणि शिक्षण समितीचे माजी सभापती महेश यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरत घरातच आव्हान दिले आहे. हातकणंगले मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचे पुत्र राजू आवळे हे निवडणूक लढवित आहेत. इचलकरंजीमध्ये खंजिरे कुटुंबीयांतील तिसरी पिढी आमदारकीसाठी सरसावली आहे. राहुल खंजिरे काँग्रेसच्या चिन्हावर लढत आहेत.

सत्यजित जाधव, राहुल देसाई यांनी राधानगरी मतदारसंघातून बंडखोरी केली आहे. जाधव यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र राधानगरी मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाला आहे. तर राहुल देसाई यांनी विधानसभा लढवायची म्हणून त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपच्या वजनदार नेत्यांनी त्यांना उमेदवारीचा शब्द दिला होता. मात्र सेना, भाजपची युती झाल्यानंतर राधानगरीची जागा शिवसेनेला मिळाली. यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

समरजित घाटगेंचा भाजपला रामराम

कागलमध्ये भाजपकडून समरजित घाटगे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. भाजपने त्यांना, म्हाडा पुणे विभागाचे अध्यक्षपद दिले होते. मात्र युतीधर्मानुसार ही जागा शिवसेनेकडे गेली. पण गेली पाच वर्षे जोरदार तयारी करणाऱ्या समरजित यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी करत शड्डू ठोकला आहे.

उमेदवार भाजपचा, चिन्ह जनसुराज्यचे

गेली पाच वर्षे विनय कोरे आणि भाजपमध्ये सख्य आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सरकारने त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवत कारखान्याला पॅकेजही दिले. विधानसभा निवडणुकीत कोरे आणि भाजपची हातमिळवणी झाली आहे. शिवसेना, भाजप युतीमुळे ज्या मतदारसंघात भाजप उमेदवारांची कोंडी झाली, त्या ठिकाणी भाजपमधील इच्छुकांना जनसुराज्यने उमेदवारी बहाल करत त्यांच्या लढण्याचा मार्ग सुकर केला. हातकणंगले, शिरोळ आणि चंदगड येथे उमेदवार भाजपाचा आणि चिन्ह जनसुराज्यचे अशी स्थिती आहे. हातकणंगलेमध्ये जनसुराज्यकडून दलितमित्र अशोक माने यांना उमेदवारी मिळाली. याठिकाणी जनसुराज्यचे माजी आमदार राजीव आवळे यांनी बंडखोरी केली आहे. ते अपक्ष म्हणून लढत आहेत.

रिंगणातील माजी आमदारांची मुले

समरजित घाटगे (अपक्ष, कागल)

राहुल देसाई (अपक्ष, राधानगरी)

सत्यजित जाधव (अपक्ष, राधानगरी)

राजू आवळे(काँग्रेस, हातकणंगले)

राजेश पाटील (राष्ट्रवादी, चंदगड)

महेश पाटील (अपक्ष, चंदगड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदूत्चाचा गड काँग्रेसला देऊ नका

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'भाजप शिवसेना युती हिंदुत्वावर आधारलेली आहे. कोल्हापूर उत्तर हा हिंदुत्त्वाचा पारंपरिक गड असून तो काँग्रेसच्या ताब्यात देऊ नका', असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले. युतीच्या कार्यकर्ते एकदिलाने काम करून आमदार राजेश क्षीरसागर हॅटट्रीक साजरी करतील. त्यांनी विजयी मिरवणुकीची तयारी करावी, अशा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. पाटील यांच्या उपस्थितीत गडकरी सभागृहात शिवसेनेची तर राजर्षी शाहू स्मारक भवन येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

आमदार क्षीरसागर यांना विरोध का? असा सवाल करत प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, 'गेल्या पाच वर्षांत युती सरकारने कोल्हापूरसाठी भरीव विकास कामे केली आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यातील महानगरपालिकेने कोल्हापूरवर लादलेला टोल आमदार सतेज पाटील यांना माहीत नव्हता का? आघाडी सरकारने टोल सुरू केला तर आम्ही टोल रद्द करून आयआरबीचे ४२५ कोटी रुपये चुकते केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, मराठा समाजाला आरक्षण, धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला. विमानतळाचे काम सुरू झाले आहे. विकासाचा मुद्दाच विरोधकाकडे राहिला नसल्याने आमदार क्षीरसागर यांचा विजय निश्चित आहे.

काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांचाही नाव न घेता त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, 'काँग्रेस उमेदवारांचे भाऊ आणि पत्नी भाजपचे नगरसेवक, नगरसेविका आहेत. त्यांनी काँग्रेसचे सभासदही घेतले नव्हते. काँग्रेसचे तिकीट कोणीही घेत नाही. जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी राजीनामा देऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसकडे उमेदवारांची मोठी यादी असताना बळीचा बकरा करण्यासाठी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसला मरणकळा आली असताना त्यांच्यात प्राणवायू घालवण्याचा प्रयत्न करू नका. युतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रचार करावा. डोळ्यात तेल घालून विरोध पक्षावर नजर ठेवावी. विरोधकांकडून उडवण्यात येणाऱ्या कंड्या, अफवावर विश्वास ठेऊ नये. लोकसभा निवडणुकीतही मी धनंजय महाडिक यांना एका हॉटेलमध्ये भेटलो अशी अफवा पसरली होती. पण आम्ही युती धर्म पाळल्याने अडीच लाखाहून अधिक मताने प्रा. संजय मंडलिक विजयी झाले. जिल्ह्यातील दहाही जागा जिंकण्यासाठी युतीच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार करावा'.

आमदार क्षीरसागर म्हणाले, 'विरोधक आपल्याजवळपासही पोहचू शकत नाही. गेली दहा वर्षे शहरातील राजकारण, समाजकारण, चळवळीत सक्रीय आहे. टोल, खंडपीठ, एलबीटी आंदोलनात सक्रीय आहे. पालकमंत्री पाटील यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे शहरातील ओपन जीम, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र, फुटबॉल टर्फ ग्राऊंडसह अन्य विकास कामे करू शकलो. राज्यात युतीची सत्ता पुन्हा स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे.' यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिवसेना शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, भाजप सरचिटणीस विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस अशोक देसाई, शिवसेना नगरसेवक राहुल चव्हाण यांच्यासह भाजप शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

देसाईंना इशारा

भाजप माजी महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांना समज देताना पाटील यांनी बंडखोरांना इशारा दिला. ते म्हणाले, 'देसाई यांना पद दिले, प्रेम दिले, मदत केली पण काही चुकामुळे थोडे थांबायला सांगितले आहे. पण गणेशोत्सवात पक्षाच्या बूथसमोर स्वत:चा बूथ उभारणे, नोटाचे आवाहन करणे हे कदापही सहन केले जाणार नाही. त्याला फोन केला जाईल, प्रसंगी घरी जाऊन भेट घेऊन समजावेन. पण बंडखोरीची भाषा सहन केली जाणार नाही, असे सुनावले. युतीधर्म पाळलाच पाहिजे अन्यथा पक्ष कारवाई करेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला संघटनाची मूठ घट्ट

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी शड्डू ठोकला आहे. अद्याप युती व आघाडीच्या काही उमेदवारांची घोषणा झाली नसली तरी जिल्ह्यात उमेदवारीची समीकरणे रंगायला सुरुवात झाली आहे. कुठे दुरंगी, कुठे तिरंगी तर कुठे काटे की टक्कर होण्याचेही संकेत दिसत आहेत. मतदारांचा कौल आपल्यालाच कसा मिळेल यासाठी पक्ष, नेते, उमेदवार, कार्यकर्ते यांनी प्रत्येक वयोगटासह विशिष्ट मतदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यातील ३१ लाखांवर असलेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या १५ लाखांच्या घरात महिला मतदार आहेत. विजयाची गणित मांडत असताना महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या महिला संघटना सक्रिय झाल्या आहेत. महिलांचे प्रश्न जाणून त्यांच्याशी संवाद साधण्याच्यादृष्टीने उमेदवारांसाठीही महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फळी महत्त्वाची आहे. 'ति'चं मत मिळवण्यासाठी राजकीय महिला संघटनांनी प्रचाराचे नियोजन करत मूठ घट्ट केली आहे.

महिलांशी संवादावर भर

अर्थात यामध्ये युवती, गृहिणी, नोकरदार व ज्येष्ठ अशा प्रत्येक महिलेच्या समस्या, अपेक्षा व त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यावर काँग्रेसपक्षाची महिला संघटना भर देणार आहे. विकासाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग या मुद्द्यावर महिला मतदारांचे विचार समजून घेण्यासाठी प्रचाराची आखणी करण्याचेही नियोजन केले आहे. उमेदवारीच्या यादीत नेहमीच महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. मात्र मतदार म्हणून महिलांचा कौल निर्णायक कसा ठरेल व महिलांची दखल घेणे महत्त्वाचे ठरेल याची सांगड काँग्रेसच्या महिला संघटनाच्यामाध्यमातून घातली जाणार आहे.

सरला पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य

महिलांविषयक योजनांबाबत जागृती करणार

समाजाचा घटक म्हणून महिलांसाठी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या सरकारने अनेक चांगल्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांबाबत ग्रामीण भागातील महिला अजूनही अनभिज्ञ आहेत. त्यांच्यापर्यंत योजनांचे फायदे व लाभ घेण्याबाबत माहिती पोहोचवण्याची यंत्रणा राष्ट्रवादी महिला संघटनेच्यावतीने केली आहे. प्रचारकाळात महिलांना मतदार म्हणून त्यांच्या बलस्थानांदृष्टीने सजग करण्यात येणार आहे. गेल्या पाच वर्षात भाजपने मात्र महिलांचे आर्थिक गणित बिघडेल अशाप्रकारे महागाईचा आलेख वाढवला आहे.

जहिदा मुजावर, शहराध्याक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी

महिला विकासावरच प्रचारयंत्रणा

गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाने महिलांच्या विकासासाठी ज्या योजना राबवल्या, निर्णय घेतले व त्यातून महिलांना त्यांच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी निर्माण करून दिली त्यावरच भाजपच्या प्रचाराची आखणी करण्यात येणार आहे. नोकरी व्यवसायात कार्यरत असलेल्या महिलांपासून ते ग्रामीण शेतकरी, लघुउद्योजक महिलांना भाजपने विकासाच्या कक्षेत आणले आहे. उद्योगासाठी कर्ज योजनांपासून ते शिक्षण, नोकरीतील संधींपर्यंत महिलांचा विचार हा भाजपच्या विकासप्रक्रियेचा प्रमुख धागा आहे या मुद्द्यावर प्रचारयंत्रणा राबवण्यात येणार आहे.

वैशाली पसारे, जिल्हाध्यक्ष, भाजप महिला आघाडी

सर्वसामान्य महिलांचा आवाज बनणार

सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायासाठी नेहमीच रस्त्यावर उतरणारा, प्रशासनाशी भांडणारा पक्ष म्हणून शिवसेनेने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या माध्यमातून महिला मतदारांचा कौल मिळवण्यासाठी त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व भविष्यातील सुरक्षितता याविषयावर प्रचाराची जोडणी करण्यात येणार आहे. शहर व ग्रामीण महिलांचे प्रश्न वेगळे असल्यामुळे त्याचा अभ्यास करून बचतगटांच्या सोबतीने मेळावे आयोजित केले जाणार आहेत. शिक्षण, नोकरी, उद्योग, आरोग्य यामध्ये महिलांसाठी झालेल्या कामाची पावती हा प्रचाराचा गाभा असेल.

शुभांगी पोवार, जिल्हाध्यक्ष, शिवसेना महिला आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅडमिंटनपटू जान्हवीची राष्ट्रीय पातळीवर झेप

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूरची प्रतिभावान बॅडमिंटनपटू जान्हवी कानिटकरने राष्ट्रीय पातळीवर झेप घेतली. तिची आदिदासच्या ब्रँड अँबेसिडरपदी निवड झाली. तिने राष्ट्रीय मानांकनात देशात नववे स्थान पटकावले.

तिने वयाच्या १५ व्या वर्षी बॅडमिंटन खेळात १० राज्यस्तरीय पदके, राष्ट्रीय मानांकनात नऊ क्रमांक आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या आदिदास कंपनीची अॅम्बेसिडर होण्याची ही किमया साधली. जान्हवीला आजी-आजोबांकडून बॅडमिंटनचे बाळकडू मिळाले. तिचे वडील याच खेळात शिवाजी विद्यापीठाकडून खेळले आहेत. वयाच्या आठव्या वर्षी जान्हवीने पहिल्यांदा रॅकेट हातात धरले. वडील मंदार कानिकटर यांच्या मार्गदर्शनखाली तिने सराव सुरू केला. थोड्याच कालावधीत वडिलांनी तिची खेळातील चूणूक हेरली आणि तिची स्पर्धात्मक खेळासाठी तयारी करून घ्यायला सुरुवात केली. वयाच्या नवव्या वर्षी तिने दहा वर्षाखालील गटात जिल्हा स्पर्धेत विजतेपद मिळवले. कराड व मुंबईत झालेल्या स्पर्धेत राज्य अजिंक्यपद पटकावले, परभणी येथे १३ वर्षाखालील एकेरी व दुहेरित अजिंक्यपद मिळवले. २०१७ मध्ये काकिनाड (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत तिने उपविजतेपद पटकावले. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात नांदेड व ठाणे येथे झालेल्या स्पर्धेत सलग दोन वर्षे दोनदा विजतेपद पटकावले. नागपूर येथे ऑल इंडिया स्पर्धेत राष्ट्रीय अग्रमानांकित गोपीचंद अकॅडमीच्या खेळाडूला सरळ सेटमध्ये पराभूत करत राष्ट्रीय स्पर्धेतही तिने आपली छाप उमटवली.

जान्हवीला १७ व १९ वर्षांखालील मुली या दोन्ही गटात राष्ट्रीय मानांकन आहे. अकरावीत शिकणाऱ्या जान्हवीचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विजतेपद तसेच ऑलिंपिक पदकाचे स्वप्न आहे. सध्या ती ठाणे येथे श्रीकांत वाड यांच्याकडे आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक अक्षय देवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्येष्ठ नागरिकांची पेन्शनसाठी निदर्शने

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ई.पी.एस. ९५च्या निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तवेतनात वाढ करून ती किमान नऊ हजार रुपये करावी, यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर पेन्शनर संघटनेच्यावतीने ताराबाई पार्कमधील भविष्यनिर्वाह निधी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास पाच डिसेंबरला दिल्ली येथे संसदेवर मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

ई.पी.एस. ९५ राष्ट्रीय समन्वय समितीतर्फे दिल्ली येथील प्रधान कार्यालयावर व देशभरातील क्षेत्रीय कार्यालयांवर गुरुवारी मोर्चा, निदर्शने करून निवेदने देण्यात आली. जिल्हा पेन्शनर संघटनेच्या वतीने भविष्यनिर्वाह निधीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्हा पेन्शनर संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

मागण्या मान्य होईपर्यंत सनदशीर मार्गाने लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. पेन्शन वाढीसाठी न्यायालयाने निर्णय देऊनदेखील सरकारकडून न्याय मिळत नसेल तर आत्मदहन करू, असा इशाराही देण्यात आला. पाच डिसेबरला दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन होणार असून, त्याच दिवशी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये पेन्शनरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

निदर्शनानंतर संघटनेचे अध्यक्ष शामराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली. आयुक्त सौरभ प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात सचिव ए. बी. पाटील, संघटक सुभाष गुरव, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य शिवाजी देसावळे, शिवाजी सावंत, समन्वयक दिलीप पाटील, ए. सी. दांडेकर, बिद्री साखर कामगार सभेचे अध्यक्ष आनंदराव आबिटकर यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दक्षिणमध्ये हजार कोटींची कामे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आमदार अमल महाडिक यांनी गेल्या पाच वर्षांत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात एक हजार कोटीहून अधिक रुपयांची विकासकामे केली आहेत. त्यांच्यामध्ये निधी खेचून आणण्याची आणि विकासकामे पूर्ण करण्याची धमक आहे. दक्षिण मतदारसंघातील त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी पुन्हा त्यांना निवडून द्या,'असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.

सांगवडे येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. महाडिक म्हणाल्या, 'भाजप सरकारने महिलांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या. महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. व्यवसाय उद्योगाला प्रोत्साहित करणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीमुळे हजारो महिला स्वावलंबी बनल्या. आता घराघरात महिलांच्या जीवनात विधायक परिवर्तन व स्वावलंबन पाहावयास मिळत आहे.

त्या पुढे म्हणाल्या, 'आमदार महाडिक यांनी उज्ज्वला योजना, सुकन्या समृद्धी योजनेद्वारे हजारो महिलांना सुरक्षित इंधन आणि महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. अभ्यासू व व्यापक दृष्टिकोनामुळे मतदारसंघाचा समतोल विकास साधला आहे. भविष्यातही विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी महाडिक यांनाच विजयी करा.' याप्रसंगी पद्मश्री पाटील, सुजाता देसाई, संगीता देसाई, सुवर्णा पाटील, रेखा कुराडे, सविता कोलोलीकर, प्रतिभा तिरपणकर आदीसह महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दारू दुकानांचेपरवाने निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नियमाचा भंग केल्याप्रकरणी तीन देशी दारु दुकाने आणि एका हॉटेलचा परवाना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी विशिष्ट कालावधीसाठी निलंबित केला. आचारसंहितेच्या कालावधीत या दुकानदारांनी निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ दारूची विक्री केल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. या कालावधीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, रात्री उशिरापर्यंत जेवणावळी सुरू राहू नयेत यासाठी रात्री ११ नंतर हॉटेल, खानावळी, बार, दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आले आहेत. मात्र काही दुकानदार या आदेशाचा भंग करीत असल्याच्या तक्ररी आहेत. यामुळे शिवाजी पेठेतील सुवर्णा साळोखे, न्यू शाहूपुरीतील पृथ्वीराज पाटील आणि यादवनगरातील प्रकाश गायकवाड यांच्या दारू दुकानाचा परवाना २५ ऑक्टोबरपर्यंत निलंबित करण्यात आला आहे. करवीर तालुक्यातील केर्ली येथील व्ही. एस. आसुळकर यांनी यश हॉटेलमध्ये परवाना नसताना दारू विक्री केली होती. त्यामुळे त्यांच्या हॉटेलचा परवाना एक महिना बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या दिवशी एक हजारांवर पोस्टल मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीच्या कामावर असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल मतदानाची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवसात १ हजार ४९ जणांनी मतदान केले. मतदानाची प्रक्रिया मतमोजणीच्या आदल्या दिवशी म्हणजे २३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

जिल्ह्यात ८ हजार ७५३ सैनिक मतदार आहेत. याशिवाय निवडणूक कामावर दहा हजारांवर अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यांना पोस्टल मतपत्रिकेव्दारे मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रशासनाने केली आहे. प्रशिक्षणाच्या ठिकाणीच विधानसभा मतदारसंघनिहाय पोस्टल मतपत्रिका स्वीकारल्या जात आहेत. त्यानुसार पहिल्याच दिवशी १ हजार ४९ जणांनी मतदान केले. सैनिक मतदार आपली मतपत्रिका पोस्टाने पाठवत आहेत. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय सैनिक मतदार असे : चंदगड : २२५०, राधानगरी : १०८५, कागल : १८०७, दक्षिण : ४९१, करवीर : ६४८, उत्तर : ९६, शाहूवाडी :१२२३, हातकणंगले : ४०७, इचलकरंजी : १४८, शिरोळ : ५९८.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीव्हीजील अॅपवरीलतक्रारींची दखल १०० मिनिटांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी ऑनलाईन करण्यासाठी निवडणूक आयोगाने सीव्हीजील अॅप कार्यान्वित केले आहे. अॅपवरील तक्रारींचे निरसन नियमानुसार १०० मिनिटांच्या आत होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. आतापर्यंत अॅपवर १६ तक्रारी आल्या होत्या. त्यातील ७ तक्रारींमध्ये तथ्य नव्हते. त्या वगळण्यात आल्या. उर्वरित ९ तक्रारींवर कारवाई करण्यात आली.

लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यादांच सीव्हीजील अॅप कार्यान्वित केले आहे. इंटरनेटची सुविधा असलेल्या अँड्रॉईड मोबाइलवर अॅप डाऊनलोड करून घेता येते. २१ सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू झाल्यानंतर अॅप सुरू झाले. अॅपवर छायाचित्र आणि व्हिडिओसह तक्रार करण्याची सुविधा आहे. त्याचा वापर केला जात आहे. अॅपवरील तक्रारींची दखल घेण्यासाठीचा कक्ष चोवीस तास सुरू ठेवण्यात आला आहे. अॅपवर तक्रार दाखल झाल्यानंतर कक्षातील संगणकावर सविस्तर माहिती येते. त्यानंतर संबंधित विधानसभा मतदारसंघातील कारवाईच्या प्रक्रियेला सुरूवात होते. अॅपवर नावानिशी तक्रार केल्यास कारवाईच्या प्रत्येक टप्प्याची माहिती मिळू शकते.

निनावी तक्रारही करता येते. यामुळे तक्रारींचा ओघ वाढत आहे. सर्वाधिक तक्रारी शहरातील उत्तर मतदारसंघातून आल्या आहेत. शाहूवाडी, राधानगरी, चंदगड विधानसभा मतदारसंघातून एकही तक्रार अॅपवर आलेली नाही. उर्वरित मतदारसंघात आलेल्या तक्रारींत डिजिटल फलक, प्रचार सभा, बैठका, रात्री उशिरापर्यंतचे हॉटेल, बार सुरू असल्याचा समावेश आहे. काही तक्रारीतील फोटो अस्पष्ट येत आहेत. यामुळे कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. अशा तक्रारी वगळण्यात येत आहेत. तथ्य असलेल्या तक्रारींवर कारवाई केली जात आहे. यासाठी जिल्ह्यात ६० भरारी पथके कार्यरत आहेत.

...

चौकट

विधानसभा मतदारसंघनिहाय अॅपवर आलेल्या तक्रारी अशा : हातकणंगले :१, इचलकरंजी : २, कागल : १, उत्तर : ७, दक्षिण : ४, शिरोळ : १.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक लाखांच्या ठेवी परत द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विमा सरंक्षण असल्याने एक लाख रुपयांच्या ठेवी त्वरीत द्याव्यात', अशी मागणी पीएमसी बँक खातेदार हक्क सरंक्षण समितीच्या शिष्टमंडळाने केली. ज्येष्ठ नागरिकांना औषधोपचारासाठी, संस्थांच्या ठेवी, पूरग्रस्त खातेदारांना त्वरीत रक्कम देण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

कॉ. चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली खातेदार हक्क संरक्षण समितीने शुक्रवारी रुईकर कॉलनी येथील शाखेत धडक मारत अधिकाऱ्यांना जाब विचारला. शहर आणि उपनगरात असलेल्या पीएमसी बँकेच्या शाखेत अंदाजे शंभर कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बहुतांशी खातेदार आणि ठेवीदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी आयुष्याची पुंजी विश्वासाने बँकेत ठेवली आहे. सर्वसामान्य नागरिक, छोट्या आणि मोठ्या व्यावसायिकांनी ठेवलेली रक्कम बँकेच्या कृतीमुळे अडकली आहे. २५ हजार रुपये देण्याची घोषणा हा तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खातेदार आणि ठेवीदारांच्या हितासाठी ही बँक सक्षम बँकेत विलीन करावी, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, नागरिकांची रक्कम बँकेत अडकल्याने शहरातील सामाजिक शांतता व सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे अधिकारी व खातेदारांच्या संयुक्त बैठका आयोजित कराव्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात राजू लाटकर, शंकर काटाळे, लक्ष्मण वायदंडे यांचा समावेश होता.

...

लढा उभारणार

'कोल्हापूर जनता बँकेचे विलिनीकरण पीएमसी बँकेत झाले आहे. तसेच शहरातील काही बँका बुडाल्याने शहरातील अनेक नागरिकांकडून या बँकेत खाती उघडली असून मोठी रक्कम बँकेत अडकली आहे. ठेवीदार आणि खातेदारांची रक्कम परत मिळावी, यासाठी पुढील आठ दिवसात लढा उभारण्यात येईल', अशी घोषणा चंद्रकांत यादव यांनी केली .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठातंर्गत ५०८ विद्यार्थी सेट उत्तीर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य पात्रता परीक्षेत (सेट) शिवाजी विद्यापीठ केंद्रातून परीक्षा दिलेल्या ७५६९ विद्यार्थांपैकी ५०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ६.८ इतकी आहे. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्यावतीने कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील ३८ हून अधिक विषयांसाठी २३ जून रोजी 'सेट' ची परीक्षा घेण्यात आली. शुक्रवारी दुपारी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. राज्यभरातून सुमारे ७९८७९ विद्यार्थांनी परीक्षा दिली. शिवाजी विद्यापीठातंर्गत असणाऱ्या केंद्रातून ९५१२ विद्यार्थांनी नोंदणी केली. १९ केंद्रावर ही परीक्षा झाली. त्यापैकी परीक्षेला ७५६९ विद्यार्थी उपस्थित होते. १९४३ विद्यार्थी गैरहजर राहिले. राज्यातून 'सेट' परीक्षेत ५४१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या सेट-नेट परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. प्रशांत अनभुले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महेश कोठेंची शिवसेनेमधून हकालपट्टी

$
0
0

महेश कोठेंची शिवसेनेमधून हकालपट्टी

सोलापूर :

सोलापूर शहर मध्य मतदारसंघांमधून बंडखोरी केलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांची शिवसेनेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष इंदुमती अलगोंडा-पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सोलापूर शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये कमालीच्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

सोलापूर शहर मध्य, सांगोला, करमाळा, बार्शी या तालुक्यांमध्ये प्रमुख्याने बंडखोरीला ऊत आला आहे. त्यामुळे अधिकृत तिकीटावर निवडणूक लढवीत असलेले उमेदवार पुरते हैराण झालेले दिसून येत आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघांमधून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती, त्या अनुषंगाने त्यांनी शहर मध्य मतदारसंघांमध्ये कामाला सुरुवातही केली होती. मात्र, ऐनवेळी काँग्रेस पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार दिलीप माने यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची शिवसेनेची उमेदवारी दिल्यामुळे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी बंडखोरी केली आहे. बंडखोरीमुळे शिवसेनेचे शहर मध्यचे अधिकृत उमेदवार दिलीप माने यांची कोंडी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसेवाल्यांविरोधात आपला लढा

$
0
0

पैसेवाल्यांविरोधात आपला लढा

कराड :

'प्रत्येक निवडणुकीत आपणाला संघर्ष करावा लागला आहे. या निवडणुकीत ही सत्ता व पैसेवाल्यांविरोधात आपला लढा आहे. लेबल फक्त बदलले आहे, बाटली तीच आहे. अशा प्रवृत्तीचा जनतेने मतदानाद्वारे पराभव करावा, असे आवाहन माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केले.

येळगाव (ता. कराड) येथे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अ‍ॅड.उदयसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. विलासराव पाटील-उंडाळकर म्हणाले, 'कराड दक्षिणची विधानसभा निवडणूक ऐतिहासिक आहे. येथील लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. कार्यकर्त्यांनी विचलित न होता कष्ट व चिकाटीच्या जोरावर ही निवडणूक आपणाला जिंकायची आहे. कार्यकर्त्यांनी आपआपल्या गावात लक्ष केंद्रित करावे. कराड, मलकापूरची काळजी करू नका. आपण जनतेच्या ताकतीवर आजपर्यंत भल्याभल्यांना लोळवले आहे. आपल्यासमोर वाममार्गाने पैसे मिळवलेले विरोधक आहेत. त्यांचा पैसा व आमिषे गावागावांत दलालांमार्फत पोहोचतील. कार्यकर्त्यांनी सावध राहून, अशा प्रवृत्तींना आळा घालावा. कराड दक्षिण मतदारसंघातील जनतेला विकासासाठी कोणाकडे याचना कराव्या लागल्या नाहीत. समतोल विकास साधताना डोंगरी विभागातील शेतीला पाणी आणायचे काम केले. त्यामुळेच कुसळे पिकणाऱ्या या भागात आता मुसळा एवढा ऊस पिकू लागला आहे.'

अ‍ॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, 'मला सत्तेची लालसा नाही. जनतेच्या आग्रहाखातर आपण ही विधानसभा लढवित आहे. संघटनेकडील गेलेली आमदारकी परत मिळवण्यासाठी हा संघर्ष असून, गत पाच वर्षांत मंदावलेला विकास आपणाला पूर्वपदावर आणायचा आहे. सर्वांनी सजग राहून आपले कपबशीचे चिन्ह घराघरांत पोचवावे.'

.....

अमित शहांची रविवारी कराडमध्ये सभा

कराड :

केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले व कराड दक्षिण विधानसभा मतदारसघातील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ येथे जंगी सभेचे आयोजन करण्यात आली आहे.

छ. शिवाजी स्टेडियमवर रविवारी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित असणार आहेत. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले व येथील कराड दक्षिण, उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार या सभेला उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संदीप देसाई भाजपमधून निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय जनता पक्षाने माजी महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांना निलंबित केले. काँग्रेसचे दौलत देसाई यांच्या भाजप प्रवेशाच्यावेळी संदीप देसाई उपस्थित होते. त्यानंतर अवघ्या पाच तासांत देसाईंवर निलंबनाची कारवाई केल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.

भाजपने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी देसाई यांनी सोशल मिडियावरुन शिवसेनेच्या उत्तर मतदारसंघातील उमेदवारांचा आपण प्रचार करणार नसून 'नोटा' चा आधार घेणार आहे असे जाहीर केले होते. देसाई यांना कोणताही अधिकार नसताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीत भाजपच्या स्वागत कक्षासमोर बूथ उभारुन भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. सेना भाजप उमेदवाराच्या प्रचाराच्या मुद्द्यावरुन विचार मांडल्याने त्यांना भाजपमधून निलंबित करत आहे, असे पत्रकात म्हटले आहे. त्यांनी पक्षाच्या 'कमळ' चिन्हाचा व पक्षाच्या नावाचा वापर करु नये. तसेच सोशल मिडियावरुन भाजप कार्यकर्ता म्हणून संबोधन करु नये. देसाई यांच्या निलंबनाचा निर्णय कोअर टीमच्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठांना विचारुन घेतला आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवारांचे आक्षेपार्ह हातवारे; भाजप संतापला!

$
0
0

बार्शी (सोलापूर): आमच्यासमोर कुस्ती लढायला कुणीच नसल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या हातवाऱ्यांवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर

सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बार्शी इथं झालेल्या जाहीर सभेत आज शरद पवारांचे भाषण झाले. भाषणाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी शिवसेना-भाजपवर टीकेची झोड उठवली. विशेषत: मुख्यमंत्री फडणवीस यांना पवारांनी लक्ष्य केले. 'विरोधक थकले आहेत. आमच्याशी कुस्ती लढायला समोर कुणीच नाही,' असं वक्तव्य फडणवीस यांनी एका जाहीर सभेत केलं होतं. त्या अनुषंगानं बोलताना पवार म्हणाले, 'कुस्ती पैलवानांशी होते, या 'अशांशी' होत नाही.'

हे वाक्य बोलताना पवार यांनी विशिष्ट प्रकारे हातवारे केले. पवारांच्या भाषणाचं चित्रण करणाऱ्या टीव्ही कॅमेऱ्यांनी ते हातवारे टिपले. काही वेळातच ते सर्वत्र व्हायरल झाले आणि चर्चेला उधाण आलं. भाजपनं यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. 'इतकी वर्षे राजकारणात असलेल्या माणसानं असं करणं शोभत नाही. त्यांचा तोल आधीच गेलाच होता, आता पराभवाच्या भीतीनं ते अधिकच बिथरले आहेत,' अशी टीका भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण यांनी केली.
71552933

वाचा: शरद पवारांना नागपूरकर गुंड वाटू लागलाय: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.

वाचा: पवारांनी माझा फटका अनुभवलेला नाही: चंद्रकांत पाटील

असा आहे निवडणूक कार्यक्रम

२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना
४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत
५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर : मतदान
२४ ऑक्टोबर : मतमोजणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुम्हाला राज्य चालवायचं आहे, स्वयंपाक करायचा नाही: पवार

$
0
0

बार्शी (सोलापूर): पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार खिल्ली उडवली आहे. 'शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही आणि आता ते थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य चालवायचं आहे, स्वयंपाक करायचा नाही,' असा सणसणीत टोला पवार यांनी शिवसेनेला हाणला आहे.

वाचा: शिवसेना देणार अवघ्या १० रुपयांत जेवण

सोलापुरातील बार्शी इथं झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आज आपला वचननामा जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील जनतेला १० रुपयांत भोजन देण्याचं प्रमुख वचन देण्यात आलं आहे. हाच धागा पकडून पवार यांनी आपल्या खास शैलीत शिवसेनेवर हल्लाबोल केला. 'युतीचं सरकार असताना शिवसेनेनं १ रुपयांत झुणका-भाकर ही योजना सुरू केली होती. मात्र, ही योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही,' असं पवार म्हणाले.

भाजपाध्यक्ष अमित शहा हे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सभा घेत आहेत. प्रत्येक सभेत ते कलम ३७० च्या मुद्द्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांचीच री ओढत आहेत. कलम ३७० ला विरोध करणाऱ्या पक्षांना मतदान करणार का, असा प्रश्न मतदारांना विचारत आहेत. त्यावरूनही पवार यांनी सेना-भाजपचा समाचार घेतला. 'कलम ३७० रद्द करण्याला आमचा पाठिंबाच आहे. मात्र, त्यांचा विनाकारण जप सुरू आहे. ३७० कलमावरून ओरडणारे ३७१ कलमावर गप्प का?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

वाचा: पवारांनी माझा फटका अनुभवलेला नाही: चंद्रकांत पाटील

'सत्तेवर आल्यानंतर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करू, असं आश्वासन भाजपनं दिलं होतं. पण समुद्रात एक वीटही उभी राहिली नाही. उलट शिवछत्रपतींच्या काळात ज्या किल्ल्यांवर भवानी तलावर तळपली, त्या किल्ल्यांवर भाजप-शिवसेनेच्या काळात 'छमछम' बघावी लागेल अशी चिन्हे आहेत,' अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.

निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर

असा आहे निवडणूक कार्यक्रम

२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना
४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत
५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर : मतदान
२४ ऑक्टोबर : मतमोजणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images