दोन महिन्यांपूर्वी झालेली सर्व २५ टक्के दरवाढ रद्द करू असे जाहीररित्या सांगणाऱ्या राणे समितीने १५ टक्के दर कपातीची शिफारस करून राज्यातील सर्व वीज ग्राहकांची निराशा केली आहे. केवळ निवडणुका नजरेसमोर ठेवून वीज ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. शिवाय दर कपात ही राज्य सरकारकडून अनुदान देऊन केली जाणार आहे.
वीज ग्राहकांची फसवणूक
↧
↧
अनेकांचे बिंग फुटणार
आयआरबी कंपनीला रस्ते प्रकल्पाचा ठेका देण्यापासून ते टोल रद्द करेपर्यंतच्या साडे तन वर्षाच्या घडामोडीत आयआरबी कंपनीकडून अनेकांनी ढपला पाडला. त्यामुळेच या प्रकल्पाचा खर्च वाढल्याचा आरोप सुरू आहे.
↧
सांगली-कोल्हापूर चौपदरीकरणही ऐरणीवर
कोल्हापुरातील टोलविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. प्रकल्पाचे रखडतच सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या ना त्या कारणाने या प्रकल्पाच्या कामातही अडथळे येत होते.
↧
६ दिवस उपोषण,७ व्या दिवशी आंदोलनात
रास्ता रोको, मोर्चा अशा टप्प्याटप्प्यांनी टोल वसुलीला विरोध केल्यानंतर टोल विरोधी कृती समिती सदस्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. सहा जानेवारीपासून महापालिकेसमोर उपोषणाला सुरूवात केली. मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर सहाव्या दिवशी शनिवारी कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
↧
आंदोलनाचे केंद्रबिंदू ‘एन. डी. पाटील’
सकाळी दहाच्या सुमारास फुलेवाडी टोलनाका आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह समर्थकांनी उध्वस्त केला. यानंतर आंदोलकांनी शिरोली टोलनाक्याकडे मोर्चा वळवला. शिरोली टोलनाक्यावर टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने घोषणाबाजी करत होते. यावेळी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, निवास साळोखे आदी नाक्यावर येऊन थांबले.
↧
↧
आक्रमक आंदोलकांपुढे पोलिस हतबल
टोलनाक्यावरील उद्रेक सुमारे चार साडेचार तास सुरु असताना पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडून फारशा हालचाली झाल्या नाहीत. बाराच्या सुमारास डीवायएसपी विठ्ठल पवार व त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी शांततेचे आवाहन सुरु केले.
↧
आंदोलन कोल्हापुरात, पडसाद मुंबईत
रविवारी सकाळपासूनच कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलनाची धग वाढल्यामुळे त्याचे पडसाद दुपारीच मुंबईतही उमटले. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
↧
उपोषणानंतर आंदोलनाला धार
टोलला कायमचा हद्दपार करण्यासाठी टोलविरोधी कृती समितीच्या सहा कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर उपोषण सुरु केले होते. शनिवारी रात्री जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी रस्ते विकास प्रकल्पासाठी आलेला खर्च महापालिका देईल, असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर करताच जल्लोषही साजरा करण्यात आला.
↧
महापालिका भार कसा सोसणार?
रस्ते प्रकल्पासाठी आलेला खर्च महापालिका देणार असल्याचे मंत्र्यांनी जरी सांगितले असले तरी सध्याची महापालिकेची डबघाईला आलेली आर्थिक परिस्थिती, यापूर्वीच्या शिंगणापूर योजना, नगरोत्थान योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील महापालिकेच्या अंगावर असलेले कर्ज पाहता हे नवीन कर्ज न झेपणारेच आहे.
↧
↧
अपूर्ण कामांची जबाबदारी कुणाची?
रस्ते विकास प्रकल्पातील अनेक कामे अजूनही अपूर्ण असून, ती पूर्ण करण्याची जबाबदारी आता कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
↧
‘टोल वसुली सुरूच राहणार’
टोल विरोधी कृती समितीच्या हिंसक आंदोलनानंतरही टोल वसुली सुरूच राहणार असल्याचे आयडियल रोड बिल्डर्स (आयआरबी) कंपनीने स्पष्ट केले आहे.
↧
टोलनाके उद् ध्वस्त
टोल रद्द केल्याची घोषणा कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील करूनही आयआरबीने टोल वसुली सुरूच ठेवल्याने रविवारी कोल्हापूरकरांच्या संतापाचा उद्रेक झाला. आंदोलकांनी नऊपैकी पाच टोलनाक्यांची तोडफोड केली.
↧
टोलचे नामोनिशाण मिटले!
कोल्हापुरातील टोल बंद करण्याची मंत्र्यांनी घोषणा करूनही शनिवारी मध्यरात्रीनंतर शिरोली नाक्यावर पुन्हा टोलवसुली सुरू झाल्याची माहिती मिळताच, असंतोष धुमसू लागला आणि रविवारी कोल्हापुरातील टोलचे नामोनिशाणच मिटले.
↧
↧
मिरजेत चोरी
मिरजेतील ब्राह्मणपुरीत विश्वास शंकर पटवर्धन यांचे घर फोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. इलेक्ट्रॉनिक साहित्याचे व्यापारी विश्वास पटवर्धन यांचे खाडिलकर गल्लीत घर आहे. पटवर्धन कुटुंबीय नऊ जानेवारीपासून बेंगळुरुला गेले असल्याने त्यांचे घर कुलप बंद होते.
↧
सुविधांअभावी स्थलांतराची वेळ
सोयीसुविधांअभावी स्थलांतर करण्याची वेळ व्याजवाडीतील जांभूळणी (ता. वाई) या वाडीवर आली आहे. सत्तर लोकांच्या या वाडीवर सध्या फक्त दोन जणच राहात आहेत. जिल्हा प्रशासनाचे या वाडीकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याची टीका या वाडीतील मूळ रहिवाशांकडून केली जात आहे.
↧
फ्री एनर्जी
‘हरीश्चंद्रगडावर ह्या वाटेने जाण्यातली मजा काही औरच !’ समोरच्या शेकोटीत छोट्या काटक्या सारत त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. ते सगळे पट्टीचे प्रस्तरारोहक होते. त्यांच्यातल्या काहींनी ह्या नळीच्या वाटेने याआधीही काही वेळा हरीश्चंद्रगड गाठला होता.
↧
वांगी, गाजराला मागणी
मकरसंक्रातीच्या पर्वसंध्येला ओवसा पुजनासाठी लागणाऱ्या भाज्यांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. तर मकरसंक्रातीला देण्यात येणाऱ्या तिळगूळ रेवडी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.
↧
↧
मागण्या त्याच मात्र आंदोलने वेगळी
अंगणवाडी सेविका व मदतनीसच्या प्रलंबित मागण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप पाचव्या दिवशीही सुरू होता. संघटनांच्या एकीअभावी एकाच मागण्यासाठी वेगवेगळ्या संघटना कोल्हापुरात वेगवेगळी आंदोनल करत असल्यामुळे आंदोलनाचे बळ कमी पडत असून संघटनांमधील एकीचा अभाव असल्याचे या संपामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
↧
तोडगा निघेल का?
बीओटी तत्त्वावर कत्तलखाना नको, मोठी आणि छोटी जनावरे एकाच ठिकाणी कापू नयेत यासाठी खाटिक समाज आणि मटण डीलर असोसिएशनने अकरा दिवस दुकाने बंद करून आंदोलन केले.
↧
नामोनिशाण मिटवले
सरकारमधील मंत्र्यांनी दिलेल्या शब्दाला आयआरबीने वाटाण्याच्या अक्षता लावत टोल वसुली सुरुच ठेवल्याने संतप्त कोल्हापूरकरांनी रविवारी टोलनाक्यांवर जोरदार हल्ला चढवत कोल्हापुरी हिसका दाखवला. आतापर्यंत आंदोलन संयम आणि गांधीगिरी मार्गाने सुरु असताना अशा पद्धतीने केलेल्या विश्वासघातामुळे संतापलेल्या कोल्हापूरकरांनी शिरोली नाक्यावरील आयआरबीचे नामोनिशाण मिटवून टाकले.
↧
More Pages to Explore .....