Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

निम्म्या शहराचा पाणीपुरवठा पंधरा दिवस बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुराच्या तडाख्याने ठप्प झालेला शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तब्बल पंधरा दिवसांचा अवधी लागणार आहे. बालिंगा पंपिंग स्टेशनमधून बुधवारी सकाळी पाणी उपसा सुरू होणर असला, तरी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे सी, डी व 'ए' वॉर्डातील काही भागाला दिलासा मिळणार आहे. शिंगणापूर योजनेवर अवलंबून असलेल्या संपूर्ण 'ई' वॉर्ड व 'ए' वॉर्डाच्या काही भागातील नागरिकांना मात्र पंधरा दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे सुरू असलेले प्रचंड हाल सुरुच राहणार आहेत.

महापुराच्या आपत्तीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. तसाच महापालिका प्रशासनालाही बसला आहे. विशेषत: शहराला पाणीपुरवठा करणारे बालिंगा, शिंगणापूर व नागदेववाडी पंपिंग स्टेशन पाण्यात बुडाल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल सुरू आहेत. पाच दिवसांपासून महापुराचे पाणी ओसरु लागले असले, तरी बालिंगा वगळता शिंगणापूर व नागदेववाडी पंपिंगकडे जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना वाट नसल्याने संपूर्ण पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे.

शिंगणापूर पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर अद्याप नऊ फूट पाणीपातळी असल्याने कर्मचाऱ्यांच्या कामात प्रचंड अडथळा येत आहे. नागदेववाडी अशुद्धजल केंद्रातून विद्युत पंप व स्टार्टर बाहेर काढून दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. मात्र शिंगणापूर योजनेतील विद्युतपंप काढण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शिंगणापूर योजनेतून पाणीपुरवठा होणाऱ्या संपूर्ण 'ई' वॉर्ड व 'ए' वॉर्डातील आणखी पंधरा दिवस पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुराची पातळी ओसरल्यानंतर बालिंगा पंपिंग स्टेशनमधून उपसा सुरू करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शनिवारी पुराच्या पाण्यातून जात कर्मचाऱ्यांनी विद्युतपंप बाहेर काढले. विद्युतपंपांसह, स्टार्टर, वायरिंग करुन मंगळवारी सकाळी एक पंप बसवला. तर रात्री उशीरा दुसराही पंप बसवला. त्यामुळे बुधवारी सकाळपासून पाणीपुरवठ्याला सुरुवात होणार आहे.

बालिंगा येथील तीनपैकी दोन विद्युतपंप सुरू होणार असल्याने 'सी' 'डी' वॉर्ड व 'ए' वॉर्डातील काही भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यासह फुलेवाडी रिंगरोड, लक्षतीर्थ वसाहत, आपटेनगर, तुळजाभवानी कॉलनी, सानेगुरुजी वसाहत, क्रेशर चौक, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, लक्ष्मीपुरी, बागल चौक, महापालिका परिसर व शाहूपुरीतील काही भागाला त्याचा फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताऱ्यात ३८२२४.९९ हेक्टर शेतीचे नुकसान

$
0
0

साताऱ्यात ३८२२४.९९ हेक्टर शेतीचे नुकसान

कराड :

साताऱ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे आजू-बाजूच्या शेतपिकांचे तसेच पाणी शेतात पाणी साचून राहिल्याने नुकसान झाले आहे. नजर अंदाजाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ३८२२४.९९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अहवालावरुन दिसून आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनिल बोरकर यांनी दिली. या पिकांचे संयुक्त पंचनामे करण्याचे काम सुरू असून, येत्या चार ते पाच दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करून सरकारला अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे, असे बोरकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोख मदत वाटपाला सुरुवात

$
0
0

फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर, परिसर आणि जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रापंचिक साहित्य खरेदीसाठी रोख पाच हजार रुपयांच्या वाटपला मंगळवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ३०८ कुटुंबांना १५ लाख ४० हजार रुपये वाटप करण्यात आले. शहरातील रमणमळा येथील स्थलांतरित पूरग्रस्त कुटुंबांना पाच हजार रुपये जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्याहस्ते देण्यात आले. दरम्यान, नुकसानीच्या प्रत्यक्ष पंचनाम्याच्या कामालाही प्रारंभ झाला.

अतिवृष्टीनंतर ६ ऑगस्टपासून पूरग्रस्तांना स्थलांतरित केले. करवीर तालुक्यातील आंबेवाडी, चिखली गावातील ९५ टक्के ग्रामस्थ तर शिरोळ, हातकणंगले तालुक्यात पूरग्रस्तांचेही स्थलांतर करण्यात आले. जिल्ह्यात एकूण ३२१ गावांमधून ८१ हजार ८८ कुटुंबांतील ३ लाख ३६ हजार २९७ व्यक्तींना २१० ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. सरकारच्या आदेशानुसार शहरातील पूरग्रस्तांना १५ हजार आणि ग्रामीणमधील पूरग्रस्तांसाठी १० हजार रुपये देण्यात येणार आहे. यातील पाच हजार रुपये रोख दिले जात आहे.

पूर ओसरल्याने बंद असलेले मार्ग चालू झाले. बँकांतूनही रोख पैसे उपलब्ध झाले आहेत. यामुळे मदतीचे रोख रक्कम दिली जात आहे. करवीर तालुक्यातील खुपिरे, शिंदेवाडीतील ७६, साबळेवाडीतील ४३ पूरग्रस्तांना प्रत्येक पाच हजार रुपये तहसीलदार सचिन गिरी, बाळासाहेब यादव यांच्याहस्ते देण्यात आले. गगनबावडा तालुक्यातील असळज, खोकुर्ले येथील १५ पूरग्रस्त कुटुंबीयांनाही मदत देण्यात आली. मदतीचा पहिलाच दिवस असल्याने गती कमी राहिली.

दरम्यान, स्थलांतर केलेल्या शिबिरातील आणि इतर सर्वच पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. मात्र, पंचनामा आणि पैसे वाटप करणारी एकच यंत्रणा असल्याने विलंब होत असल्याचे महसूल प्रशासनाचे म्हणणे आहे. पहिल्या टप्यात प्रापंचिक साहित्य खरेदीसाठी पाच हजार रुपये देण्यात येत आहे. त्यानंतर पूरग्रस्तांना प्रती व्यक्तीला प्रतिदिनी ६० रुपये आणि लहान मुलांना ४५ रुपये दुसऱ्या टप्यात देण्यात येणार आहेत. केवळ स्थलांतरितच नव्हे तर सर्वच पूरग्रस्तांना मदत दिली जाणार आहे. रोख पाच हजार रुपयांशिवायची इतर आर्थिक मदत कुटुंब प्रमुखाच्या बॅँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी बँक अकाउंट संकलित केले जात आहे. ग्रामीणमधील पूरग्रस्तांच्या यादीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील यादी तयार करण्यास मनुष्यबळअभावी विलंब होत आहे. यामुळे सर्व पूरग्रस्तांना मदत पोहोच होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.

०००

कोट

सरकारच्या आदेशानुसार पूरग्रस्तांना तातडीचे मदत म्हणून पाच हजार रुपये रोख दिले जात आहे. पहिल्याच दिवशी १५ लाख ४० हजारांचे वितरण करण्यात आले. टप्प्यप्प्प्याने पात्र सर्व पूरग्रस्तांना मदत पोहोच केली जाईल. नुकसानीच्या पंचनाम्याचेही काम केले जात आहे.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी

००००

चौकट...

शाहूवाडीत ९७ कुटुंबांना मदत

शाहूवाडी : अतिवृष्टीबरोबरच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे तालुक्यातील ४३५ कुटुंबांचे घर व प्रापंचिक साहित्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वारणा नदीच्या पुराच्या तडाख्यात सापडून सोंडोली, मालेवाडी, रेठरे या परिसराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पाठोपाठ कासारी नदीच्या पुरात करंजफेण पाल, सावर्डी, पेंडाखळे परिसरातील घरात पाणी शिरून लोकांना नुकसानीची मोठी झळ बसली आहे. प्रशासनाने या सर्व कुटुंबांना प्रत्येकी गहू, तांदूळ हा शिधा पोहोच केला आहे. संबंधित कुटुंबांपैकी पहिल्या टप्प्यात ९७ कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे नुकसानग्रस्तांच्या घरी जाऊन रोखीने सरकारी मदत सुपूर्द केली. सरकारी दराप्रमाणे दोन-तीन दिवसांत उर्वरित तातडीची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती प्रांताधिकारी माळी व तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक लाखाचे अर्थसाह्य

$
0
0

कोल्हापूर : महापुरातील जिल्ह्यातील ५२९ पाणीपुरवठा योजना पाण्याखाली आहेत. त्यापैकी १६९ योजना सुरू झाल्या आहेत. दरम्यान, खराब झालेल्या पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधीतून एक लाख रुपयांचे अर्थसाह्य केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोनशेहून अधिक वाहनांना जलसमाधी

$
0
0

कोल्हापूर

मुक्त सैनिक वसाहतीच्या पाठीमागील लक्ष्मीनारायण नगर म्हणजे नावाप्रमाणेच 'लक्ष्मी'चा वरदहस्त असलेला परिसर. लक्झरी अपार्टमेंट आणि एकमेकांशी स्पर्धा करणारे टुमदार बंगले. तेथील जवळपास प्रत्येक घरात छोट्या कारपासून अलिशान कार आहेच. त्याशिवाय दुचाकी वाहनांची संख्या वेगळीच. २००५ साली पुराचे पाणी काही अपार्टमेंट, बंगल्यांच्या दारात खेळले. यावेळी मात्र त्याच अपार्टमेंट, बंगल्यांच्या पूर्ण तळमजला पाण्याखाली गेला. त्यामुळे सोमवारी एका रात्रीत वाढलेल्या पुराने येथील दोनशेच्या आसपास कार व दुचाकी वाहनांना जलसमाधी मिळाली आहे. प्रापंचिक साहित्याचे तर त्यापेक्षाही जास्त नुकसान झाले आहे. मंगळवारी आठव्या दिवशीही या परिसरात पाणी असल्याने घराचे, वाहनांचे काय झाले हे नागरिकांना पाहता आलेले नाही.

मुक्त सैनिक वसाहतीच्या चौकापासून काटे मळ्यापर्यंत जाण्यासाठी अगदी एका मिनिटाचा रस्ता. शहर व पुणे बेंगळुरु महामार्गाची कनेक्टिव्हीटी असल्याने अनेक मोठे व्यावसायिक, सरकारी अधिकारी, मोठ्या कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकारी यांनी जागा निवडून घरे बांधण्यास सुरुवात केली. २००५ पर्यंत या परिसरातील वाढती मागणी पाहून अनेक मोठ्या अपार्टमेंट, बंगलोच्या स्कीम, स्वतंत्र बंगलेही उभारले. सध्या या टापूमध्ये आठ मजली ११ मोठ्या लक्झरी अपार्टमेंट उभ्या आहेत. यापूर्वीच्या २००५ सालच्या पुरावेळी काही भागात आलेले पुराचे पाणी वगळता इतरत्र काही फटका बसला नसल्याने येथे बांधकामे होत गेली. पण गेल्या सोमवारपर्यंत सतत झालेल्या पावसाने साऱ्यांचे गणित बदलून टाकले. रात्रीमध्ये दोन फुटापासून पाच फुटापर्यंत पाणी वाढत गेले. ज्यावेळी पाण्यामुळे कारच्या सेंटर लॉक सिस्टिमचे आवाज येऊ लागले, त्यावेळी अनेक नागरिकांना पाणी इतके वाढल्याचे दिसून आले. त्यातून ज्यांनी वाहने काढली, तितकीच वाहने सेफ राहिली. अनेक अपार्टमेंटचे पार्किंग रस्त्यापासून उंच असूनही बहुतांश ठिकाणच्या चारचाकी व दुचाकी वाहने पाण्यात चार फुटापर्यंत बुडली. मंगळवारी काही ठिकाणचे पाणी कमी झाल्यानंतर नागरिकांनी चारचाकी ढकलत बाहेर काढण्याचा प्रयत्न चालवला होता. अनेक अलिशान वाहने बुडाल्याच्या खुणा त्यांच्यावर दिसत आहेत.

अनेक बंगल्यांच्या तळमजल्यावर सहा ते सात फुटापर्यंत पाणी वाढल्याच्या निशाणी आहेत. काही उंचावरील बंगल्यांमधील पाणी उतरल्याने नागरिक घरात गेल्यानंतर पाण्याने सारे साहित्य अस्ताव्यस्त झाल्याचे दिसून आले. अनेक बंगल्यांमध्ये कित्येक लाखांचे असलेले फर्निचर पाण्याने खराब झाले आहे. दुर्गंधीने घर भरले आहे. प्रापंचिक साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. काटे मळा परिसरातही कधी नव्हे इतके पाणी चढले असल्याने अनेक कौलारु घरे पूर्णपणे बुडाली आहेत. काही कच्ची बांधकामे असणारी घरे भविष्यात कोसळण्याची भीती आहे.

...

पुराचा फटका बसलेल्या अपार्टमेंट

आयकॉन रेसिडन्सी, मलयगिरी अपार्टमेंट, गुरुबल रेसिडन्स, विश्व इन्क्लेव्ह, ईरा गार्डन, रिषभ संध्या, रंजना रेसिडन्सीच्या तीन इमारती, डेक अपार्टमेंट, यशोदा पार्क, आस्था रेसिडन्सी

....

कोट

'आमच्या इमारतीच्या पार्किंगमधील जवळपास १५ वाहने पूर्णपणे पाण्याखाली होती. तसेच दुचाकीही बुडाल्या आहेत. सात दिवस पाणी होते. सर्व ठिकाणच्या तळमजल्यावर पाणी होते.

संजीव कुलकर्णी, आयकॉन रेसिडन्सी.

...

कोट

'या परिसरात जवळपास ३०० च्या आसपास घरे, बंगले, अपार्टमेंट आहेत. पुरामुळे २०० च्यावर चारचाकी व दुचाकी वाहनांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घराजवळ पाणी आले म्हणून सुरक्षित ठिकाण म्हणून वाहने लावली मात्र तिथेही पाणी आले.

विजय पाटील, स्थानिक नागरिक

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रेट!! पूरग्रस्तांसाठी ५०० घरं बांधणार: नाना पाटेकर

$
0
0

कोल्हापूर: तुम्ही काळजी करू नका. छप्पर आलं की सगळं काही नीट होईल. आपण सर्व मिळून पुनर्वसन करू, असं आश्वासन देत अभिनेते नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला. शिरोळमध्ये पूरग्रस्तांसाठी ५०० घरे बांधून देणार असल्याची घोषणाही पाटेकर यांनी केली.

कोल्हापूर, सातारा आणि सांगलीवर महापुराचं संकट कोसळलं. लोकांचे संसार उघड्यावर आले. घरे वाहून गेल्यानं अनेकांना छप्परही राहिलं नाही. पूरग्रस्त आता उद्ध्वस्त झालेला संसार सावरत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीला सरकार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था, मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक जण धावून गेले आहेत. भीषण दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर पूरग्रस्तांच्या मदतीलाही धावले आहेत. त्यांनी आज कोल्हापुरातील शिरोळमधील पद्माराजे विद्यालयात पूरग्रस्तांची भेट घेतली. काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. छप्पर आलं की सगळं नीट होईल, असं म्हणत त्यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला. शिरोळमध्ये पूरग्रस्तांसाठी ५०० घरे बांधून देणार असल्याची घोषणा करून त्यांनी मोठा आधार दिला.

'लालबागचा राजा' मंडळाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत

सरकारने पूरग्रस्तांसाठी काही निधी दिला आहे. बाकीचे पैसे आम्ही देत आहोत. नाम संस्था, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंना या मदतीचे श्रेय नको. जे काही करतोय ते आपण सर्व जण एकत्र मिळून करतो आहोत. सध्या अनेक जण मदतीसाठी स्वतःहून पुढे आले आहेत. प्रत्येकाने यात वाटा उचलायचा आहे. मदतकार्य चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मी सुद्धा मदतीसाठी लोकांकडे हात पसरणार आहे. अनेक जण आर्थिक मदत सुद्धा करतात. त्यांना विश्वास आहे म्हणून ते मदतीसाठी पुढे येतात. ज्या ठिकाणी कमतरता भासेल त्या ठिकाणी आम्ही नक्कीच उभे राहतो, असंही नाना म्हणाले.

शिरोळमध्ये आल्यानंतर येथील परिस्थिती कळाली. त्यामुळं ५०० घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला. आता सगळ्यांना मदतीसाठी आवाहन करणार आहे. टाकळेवाडीत तीन हजार घरांच्या प्रकल्पासाठी आढावा घेणार आहे. पूरग्रस्तांना छप्पर मिळालं की सगळं नीट होईल. काळजी करू नका. नाम संस्थाच नाही तर सर्वांकडून मदत घेण्यात स्वीकारली जाईल. सरकारला सुद्धा मर्यादा आहेत. त्यामुळं आपण सगळे मिळून पूरग्रस्तांचं पुनर्वसन करायचं आहे, असं आवाहनही त्यांनी केलं. मदतीसाठी पुढे येणाऱ्या सर्वांचेच त्यांनी यावेळी आभार मानले.

दुष्काळ पडला त्यावेळी नाम संस्थेने लोकवर्गणीतून ६० कोटी रुपये दिले. सरकारनेच सर्व केले पाहिजे असं नेहमी म्हणतो. पण सरकार म्हणजे माणसंच आहेत ना! त्यामुळं आता रडायचं नाही. सगळ्यांनी मिळून या संकटाला तोंड द्यायचं, अशा शब्दांतही त्यांनी पूरग्रस्तांना धीर दिला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरहाल पाहून शर्मिला ठाकरे यांना अश्रू अनावर

$
0
0

सांगली: सांगली, कोल्हापूरमधील पूर ओसरला असला तरी तेथील दु:ख व दैन्य अजूनही कायम आहे. पूरग्रस्तांची दयनीय अवस्था हेलावून टाकणारी आहे. सांगलीतील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना आज तेथील परिस्थिती पाहून अश्रू अनावर झाले.

मनसेच्या वतीनं पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी शर्मिला ठाकरे यांनी आज सांगलीतील ब्रह्मनाळ गावाला भेट दिली. माजी आमदार नितीन सरदेसाई व अन्य पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. ब्रह्मनाळ गावातील अनेक नागरिकांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांचीही त्यांनी विचारपूस केली. यावेळी लोकांचे उद्ध्वस्त संसार पाहून त्या भावूक झाल्या. त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

मीडियाशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 'सांगलीतील परिस्थिती खूप वाईट आहे. इथं केवळ मदतीची गरज नाही. आख्खीच्या आख्खी कुटुंबं उभी करण्याची गरज आहे. माणसं उभी करण्याची गरज आहे. वैयक्तकरित्या व खासगी संस्था, संघटनांच्या मदतीनं छोटी-छोटी कामं होऊ शकतात. मात्र, घर बांधण्यासारखी, शेती उभी करण्यासारखी मोठी कामं सरकारनं करायला हवीत,' असं त्या म्हणाल्या.

संंबंधित बातम्या:

'लालबागचा राजा' मंडळाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत

पूरग्रस्तांसाठी ५०० घरं बांधण्याची नाना पाटेकरांची योजना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेडकरांनी घेतलं पूरग्रस्त 'ब्रह्मनाळ' गाव दत्तक

$
0
0

सांगली: महापुराचा सर्वाधिक फटका बसलेलं सांगलीच्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गाव वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतलं आहे. या संपूर्ण गावाचं ते पुनर्वसन करणार आहेत. ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून १७ जणांचा जीव गेला होता. पुराचा मोठा फटका या गावाला बसला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी तीन दिवसांपूर्वीच सांगली आणि कोल्हापूरमध्ये जाऊन पूरग्रस्त भागांची पाहणी केली होती. त्यांनी पूरग्रस्तांशी चर्चा करून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली होती. ब्रह्मनाळ गावालाही त्यांनी भेट दिली होती. या गावात साडे तीन हजार लोक राहतात. एकूण ७०० कुटुंबांच्या या गावाचं आंबेडकर पुनर्वसन करणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी हे गाव दत्तक घेतल्याचे कळताच गावचे संरपंच व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. ग्रामपंचायतीने आंबेडकर यांना पत्र देऊन आम्ही पुनर्वसनासाठी आमचे गाव देत आहोत, असं जाहीर केले आहे.

असं होणार पुनर्वसन

१. गावामध्ये स्वच्छता आणि औषध फवारणी, आरोग्य तपासणी व औषधोपचार
२. ७०० कुटुंबाना पुढील एक महिना पुरेल एवढं राशन देणार
३. विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप
४. गावात स्वच्छ पाण्याची कायमस्वरुपी सोय व्हावी म्हणून वॉटर एटीएम लावण्यात येईल
५. गावकऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मानस उपचार व वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातील
६. गावकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आई निधनाचे दु:ख विसरुन पूरग्रस्तांच्या मदतीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुराचे पाणी उतरल्यानंतर शुक्रवार पेठ पंचगंगा नदी परिसरातील नागरिकांना धीर देत महापौर माधवी गवंडी यांचे पती माजी नगरसेवक प्रकाश गवंडी आईच्या निधनाचे दु:ख विसरुन मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारी दिवसभर अग्निशामक दलाच्या फायर फायटरच्या माध्यमातून पंचगंगा रस्त्यावरील स्वच्छता मोहिमेत ते गुंतले होते.

१९८९ नंतर प्रथमच महापुराने पंचगंगा हॉस्पिटलपुढे पाण्याची पातळी गाठल्याने मस्कुती तलाव, गुणे बोळ, गवत मंडई परिसरातील घरे पहिल्या मजल्यापर्यंत बुडाली. करवीर शंकराचार्य मठाचे तळघर आणि भला मोठा चौक पाण्याखाली गेल्याने विद्या नृसिंह भारती यांना पहिल्या मजल्यावर आश्रय घ्यावा लागला. पुराचे पाणी ओसरल्यानंतर नागरिक घराकडे परतू लागले आहेत. या भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महापौर माधवी गवंडी यांचे घरही पाण्याखाली गेले होते. त्यांच्या सासूबाई बेबीताई आनंदराव गवंडी यांचे सोमवारी (ता.१२) सकाळी निधन झाले. पुराच्या पाण्यातूनच त्यांचे पार्थिव घरी आणले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महापौरांचे पती माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांना भेटण्यासाठी नागरिक सांत्वनाला येऊ लागले. पुरात अडकलेले नागरिक गवंडी यांचे सांत्वन करत होते तर पुरात नुकसान झालेल्या नागरिकांना गवंडी दिलासा देत होते. मंगळवारी सकाळी प्रकाश गवंडी यांनी आईचे दु:ख विसरुन स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली. महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी, स्थानिक नागरिकांच्या मदतीने पंचगंगा नदी रोडवरील गाळ फायर फायटरच्या सहाय्याने धुऊन काढला. परिसरातील कचरा उठावासाठी डंपर मागवण्यात आले.

परिसरात शिल्पा देशपांडे, प्रतिभा गुप्ते, अर्चना कुलकर्णी, कांचन प्रभू, संदीप चौगुले, कमल सुतार, सीमा कबुरे यांची घरे कोसळली आहेत. या कुटुंबांना धीर देण्याचे काम गवंडी यांच्यासह परिसरातील नागरिक करत आहेत. पडलेल्या घरातून साहित्य कसे बाहेर काढायचे याची त्यांना काळजी लागली आहे. घरोघरी पुराने साचलेला गाळ काढण्याचे काम सुरु आहे.

...

चांदी कारखानदारांना फटका

मस्कुती तलाव परिसरात घरोघरी चांदीच्या वस्तू तयार करण्याचे छोटे मोठे कारखाने आहेत. या कारखान्यांना मोठा फटका बसला आहे. मोटारी जळाल्या आहेत. चांदीच्या वस्तू तयार करणारे साचे खराब झाले असून प्रत्येक कारखान्याला अडीच ते दहा लाख रुपयांचा फटका बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. शहा, डॉ. केळकर, अनिता माळगेंना शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

$
0
0

डॉ. शहा, डॉ. केळकर, अनिता माळगेंना शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

सोलापूर :

शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे जीवनगौरव पुरस्कार यंदा डॉ. गुलाबचंद शहा, डॉ. संजीवनी केळकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी आणि ग्रामीण भागातील महिला उद्योजक अनिता योगेश माळगे यांना जाहीर झाले आहेत. माजी आमदार आणि स्वातंत्र्यसेनानी वि. गु. शिवदारे यांच्या जयंतीदिनी, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी दिली.

सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय आणि कृषी क्षेत्रात प्रदीर्घ काळ नि:स्वार्थ भावनेने सेवा करून योगदान देणाऱ्या व्यक्ती-संस्थांना प्रती कृतज्ञता व्यक्त करुन, गौरव निधी व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्याच्या उद्देशाने सन १९९९ साली शिवदारे प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. सन २००० सालापासून या प्रतिष्ठानचे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यास प्रारंभ झाला. सन्मानचिन्ह आणि रोख २१ हजार रुपये असे, या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असल्याचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी प्रारंभी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापुरात अडीच हजार किमीचे रस्ते,३८ हजार हेक्टर शेतीचे नुकसान

$
0
0

महापुरात अडीच हजार किमीचे रस्ते,

३८ हजार हेक्टर शेतीचे नुकसान

सातारा

अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील २६५१ किलोमीटरच्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे. ४३४ पूलही महापुराने बाधित झाले आहेत. त्यामध्ये बांधकाम विभागाचे ४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत नुकसान झाले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम दक्षिण व उत्तर विभागाच्या अंतर्गत ८ हजार ४५९.५४ किलोमीटर लांबीचे ग्रामीण व जिल्हा मार्ग आहेत. अतिवृष्टीमुळे यामधील जवळपास अडीच हजार किलोमीटर रस्त्यांची वाट लागली आहे. त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यातून वाहन चालकांना वाट काढणेही अवघड झाले आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने तसेच शेतात पाणी साचून राहिल्याने अतोनात नुकसान झाले आहे. महसूल विभाग तसेच कृषी विभागाने नजर अंदाजाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ३८ हजार २२४.९९ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालावरून स्पष्ट होते. दरम्यान, पुरामुळे महिनाभरात ५ व्यक्‍तींचा मृत्यू झाला असून, लहान-मोठी २२ जनावरे दगावली आहेत, तर २८९५ घरांची पडझड झाली आहे.

'वाई अर्बन'कडून

पूरग्रस्तांना २५ लाख

सातारा :

दि वाई अर्बन को. ऑप. बॅँकेच्या वतीने कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला आहे, अशी माहिती बॅँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवरून बॅँकेचे कौतुक करून मदतीबद्दल धन्यवाद दिले आहेत.

काळे म्हणाले, पुरग्रस्तांना नव्याने उभे राहण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून वाई अर्बन बॅंकेच्या वतीने तसेच सर्व संचालकांचे मानधन, कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा पगार एकत्र करून रुपये २५ लाख तातडीची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे. पुढील काळात सभासदांच्या मतांचा विचार करून पुरग्रस्तांच्या मदतीमध्ये वाढ करण्याबाबत विचार करण्यात येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांच्या घरी चार लाखांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापूर ओसरल्यानंतर चिखली, लक्ष्मीपुरी येथील दोन बंद घरे चोरट्यांनी फोडून सोने चांदीच्या दागिन्यांसह सुमारे चार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉलच्या दक्षिण बाजूस आणि चिखली (ता. करवीर) येथील दोन घरांमध्ये मंगळवारी चोरी झाली. या प्रकरणी लक्ष्मीपुरी व करवीर पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापुरात चिखली, आंबेवाडीसह शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी परिसर पाण्याखाली गेला होता. येथील अमोल मनोहर कांबळे (वय ३५) यांचे रिलायन्स मॉलच्या दक्षिण बाजूस शेजारी घर आहे. त्यांच्या घरी पुराचे पाणी आल्याने त्यांनी सोन्याचांदीचे दागिने, रोकड लोखंडी तिजोरीत ठेवले व ते घर बंद करून श्रमिक हॉल येथे राहण्यासाठी गेले . पाणी ओसरल्यानंतर ते कुटुंबासह घरी गेले असता दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. त्यामध्ये १८ हजारांची रोकड, सोन्याचे गंठण, ब्रेसलेट, नेकलेस, वेलजोड, कर्णफुले, चेन, अंगठ्या असे १२ तोळे दागिने, चांदीच्या वस्तू असा सुमारे अडीच लाख किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली.

दुसरी चोरी चिखली (ता. करवीर) येथे झाली. येथील नितीन नाना कांबळे (३५) यांच्याही घरी पाणी आल्याने ते स्थलांतरित झाले होते. ते पाणी ओसरल्यानंतर घरी गेले असता घराचा दरवाजा मोडलेला दिसला. त्यांच्या घरातून ३५ हजार रूपये रोकड, सोन्याची चेन, वळे, बदाम, चांदीचे ब्रेसलेट, करदोडा असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आले. त्यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान, महापुरात अडकलेल्या घरांना चोरट्यांनी लक्ष केले असून आठवडाभरापूर्वी कसबा बावडा येथून ८० तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 20

केएमटीला आठवड्यात ७५ लाखांचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुराच्या तडाख्याने महापालिकेच्या सार्वजनिक वाहतूक सेवा (केएमटी) आठवडाभर ठप्प झाली. संपूर्ण शहराला भेटाचे स्वरुप प्राप्त झाल्याने जेमतेम बसेस मार्गावर धावल्या. संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने आठवड्यात केएमटीला ७५ लाखाचा फटका बसला. चार दिवसांपासून महापूर ओसरु लागला असला, तरी अद्याप १०२ पैकी ३८ बसेस वर्कशॉपमध्ये असून दैनंदिन तीन लाख ३४ हजाराचे उत्पन्न जमा होत आहे. बहुतांशी मार्ग खुले झाल्यामुळे बुधवारपासून मुक्कामी बसेसना सुरुवात झाली.

चार ऑगस्टला शहराच्या मध्यवस्तीपर्यंत महापुराचे पाणी आल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले. निम्म्या शहरात पाणी शिरल्याने सोमवारपासून केएमटी सेवेला ब्रेक लागला. कळंबा, शिवाजी विद्यापीठ, पाचगाव, जीवबा नाना पार्क, फुलेवाडी अशा मोजक्या मार्गांवर केएमटीच्या फेऱ्या झाल्या. मात्र प्रवासी संख्या कमी असल्याने यातूनही केएमटीला फारसे उत्पन्न मिळाले नाही.

केएमटीच्या दररोज १०२ बसेस धावत असतात. आठवडाभरात केवळ १५ ते २० बसेस मार्गस्थ होत होत्या. संपूर्ण शहराला बेटाचे स्वरुप प्राप्त झाल्याने ग्रामीण भागात जाणाऱ्या सर्व बसेस थांबून राहिल्या. १०२ बसेसच्या माध्यमातून दैनंदिन नऊ ते साडेनऊ लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र यापैकी निम्म्याही बसेस मार्गस्थ न झाल्याने आठड्यात तब्बल ७५ लाखांचे उत्पन्न बुडाले. शुक्रवारपासून महापूर ओसरण्यास सुरुवात झाली असून रविवारपासून शहरातील सर्व रस्ते वाहतुकीस खुले झाले आहेत. मात्र अद्यापही ग्रामीण भागात केएमटी पूर्ण क्षमतेने धावू शकलेल्या नाहीत.

बुधवारपासून केएमटीच्या १०२ बसेसपैकी ६४ बसेस मार्गस्थ झाल्या असून मुक्कामी बसेसला सुरुवात झाली. आठ दिवसांपासून बंद असलेल्या वडकशिवाले-बाचणी, कागल, पेठवडगाव, रुकडी-माणगाव, नागाव, बहिरेश्वर, शिरोली दुमाला, कुडित्रे येथील बससेवेला सुरुवात झाली. अद्यापही पन्हाळा, राशिवडे, जठारवाडी येथील मुक्कामी बससेवा बंद आहे. चार दिवसांत संपूर्ण बसेस मार्गस्थ होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांचे महिन्याचे मानधन पूरग्रस्तांना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यासह शहराला महापुराचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख तर शहरातील दीड हजार कुटुंबांची महापुराच्या पाण्याने वाताहत केली आहे. अनेकांचा संसार पाण्यातन वाहून गेला. अशा नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी महापालिकेच्या सर्व नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे आठ लाख रुपयांचे मानधन महापालिकेचे सर्वपक्षीय नगरसेवक पूरग्रस्तांकडे सुपूर्द करणार आहेत.

महापुराने प्रथमच शहराच्या अनेक भागात प्रवेश केला. महापुराचे पाणी येईल अशी कल्पना नसलेल्या भागातही पुराच्या पाण्याने शिरकाव केल्याने शहरवासियांचे अतोनात नुकसान झाले. संसारपयोगी साहित्यांबरोबर अनेक विक्रेत्यांच्या साहित्यांचे प्रचंड नुकासन झाले. महापुराच्या तडाख्यातून अद्यापही नागरिक सावरलेले नाहीत. पुराचे पाणी ओसरु लागले असले, तरी अद्याप काहीठिकाणी पुराचे पाणी आहे. पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्तांकडून स्वच्छता सुरू आहे. स्वच्छतेदरम्यान घरातील झालेल्या नुकसानीची त्यांना कल्पना येवू लागली आहे.

अनेक कुटुंबांना यातून उभारी घेण्यासाठी मदतीची गरज आहे. राज्यभरातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लाखो हात पुढे येवू लागले आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनीही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक नगरसेवकाला महिन्याला दहा हजार रुपये मानधन मिळते. हे एक महिन्याचे संपूर्ण मानधन पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. ८१ नगरसेवकांचे सुमारे आठ लाख दहा हजार रुपये पूरग्रस्तांना लवकरच देण्यात येणार आहेत.

...

कोट

'नैसर्गिक आपत्तीचा फटका शहरातील सर्वसामान्य जनतेला बसला आहे. पुराच्या तडाख्याने अनेकांचे संसार उद्धवस्थ झाले आहेत. अशा लोकांना धीर देण्यासाठी नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.

शारंगधर देशमुख, सभापती, स्थायी समिती

....

'महापुराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. पूरग्रस्तांना पाठबळ देवून त्यांना मदत म्हणून एक महिन्याचे मानधन देण्यात येणार आहे. समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीही आपली मदत देवून नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पूरग्रस्तांना पाठबळ द्यावे.

विजय सूर्यवंशी, गटनेते, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूरच्या मोहकचा आवाज पोहोचला जगभर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

डिस्कव्हरीच्या मराठी चॅनेलवर मॅन व्हर्सेस वाइल्ड या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याचा रंजक प्रवास उलगडताना पाहण्याची संधी कुणीही सोडणार नाही. सोमवारी रात्री या कार्यक्रमाचे प्रसारण सुरू झाले आणि मोदींच्या तोंडून जो आवाज ऐकायला मिळाला त्यातील कणखरपणाला कोल्हापूरचा बाज होता. अवघ्या २८ वर्षाच्या मोहक निनाद काळे या कोल्हापूरच्या युवकाने मोदींसाठी केलेल्या डबिंगमुळे कोल्हापूरचा आवाज जगभरातील प्रेक्षकांनी ऐकला.

बेअर ग्रील्सचा हा शो डिस्कव्हरी चॅनेलवरील लोकप्रिय शो आहे. उत्तराखंड येथील जिम कॉर्बेट पार्क येथे या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या शोच्या मराठी आवृत्तीसाठी मोदी यांना मराठी आवाजाचे ध्वनीमुद्रण करणे आवश्यक होते. मोहकचा खणखणीत आवाज, त्यातील शब्दोच्चार, चढउतारांवरील हुकूमत या बळावर मोहकच्या आवाजावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुंबईत सलग सहा तास मोहकने मोंदीसाठी डबिंग केले.

मोहकने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतरच डबिंगच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. शालेय अभ्यासात आवड नसल्याचे त्याने वडील प्रख्यात निवेदक व डबिंग आर्टिस्ट निनाद यांना सांगितल्यानंतर त्यांनीही त्याच्यातील कलेला प्रोत्साहन दिले. दहावीची परीक्षा दिल्यानंतर वडीलांसोबत कामासाठी मुंबईला गेलेल्या मोहकला आवाजाच्या दुनियेने खुणावले. निनाद कोल्हापूरला परतले मात्र मोहक डबिंगचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी मुंबईत नातेवाईकांकडे राहिला. गेल्या सात वर्षात त्याने या क्षेत्रातील सर्व बारकावे, भाषेवरील प्रभुत्व शिकून घेतले आहे. आजपर्यंत त्याने अनेक हॉलीवूड सिनेमांच्या रिमिकसाठी आवाज दिला आहे. कार्टुन फिल्मसाठी डबिंग केले आहे. भविष्यात त्याला दिग्दर्शक व्हायचे आहे.

मी मुंबईत डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करतो. ही संधी चालून आली तेव्हा क्षणाचाही वेळ न घेता होकार कळवला. एक तर पाच भाषा बोलल्या जाणाऱ्या व १८० देशांमध्ये या शोचे प्रसारण होणार होते. त्यात गेस्ट म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधणारी ही क्लिप होती. या शोच्या मराठी डबिंगसाठी पंधरा ते वीस डबिंग आर्टिस्टच्या व्हॉइस टेस्टमधून माझ्या आवाजाची निवड करण्यात आली याचा खूप अभिमान वाटतो- मोहक काळे, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांचे पूररेषेवर पुनर्वसन करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पूरग्रस्तांचे पुनर्वसन पूररेषेच्या वरील उंच जमिनीवर करावे. प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधून देताना गायरान जमिनीचा वापर करावा तसेच पूर ओसरल्याने रोगराईवर नियंत्रण आणण्यासाठी दूषित पाण्याचे स्त्रोत बंद करावेत', अशा सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी बुधवारी केल्या.

परदेशी यांच्यावर सरकारने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या समन्वयाची जबाबदारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेत ही बैठक झाली.

परदेशी म्हणाले, 'पूरग्रस्त भागात फवारणीसाठी मुंबई महानगरपालिकेची फॉगिंग मशीन येथे येतील. महावितरणने सध्याची पूररेषा गृहीत धरून आपले रोहित्र, उपकेंद्रे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावीत. विकासकांचा आराखडा मंजूर करताना उपकेंद्रासाठी जागा देण्याची अट घालावी. शेतपिकांच्या नुकसानीचा पंचनामा प्रधानमंत्री किसान योजनेच्या माहितीच्या आधारावर करावा. अतिपाऊस आणि पुरामुळे खराब रस्त्यांची पुढील तीन महिन्यात दुरूस्ती करावी. जे पूल पाण्याखाली होते, त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडीटसाठी आयटीआय, इंजिनिअरिंग महाविद्यायातील विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. यासाठीच्या निधीची मागणी कळवावी. पुराच्या पाण्याने बंद असलेल्या पाणी योजना सुरू करण्यासाठी आवश्यक निधी सीएसआर फंडातून संकलित करावे.'

आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'पूरग्रस्त भागात मुंबईमधून आरोग्य पथके पाठवण्यात आली आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात औषधांचा साठाही उपलब्ध केला आहे. नागपूर, लातूर, यवतमाळ येथूनही आरोग्य पथके आली आहेत.'

मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, 'शेतकऱ्यांना अनुदानावर औषध फवारणी पंप दिला आहे. त्यांचा वापर पूरग्रस्त भागात औषध फवारणीसाठी करावा. पूरग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. जास्तीत-जास्त मदतीसाठी सकारात्मक निर्णय घेऊ.'

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'कर्जमाफीपेक्षा सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पुरामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने सांगली आणि कोल्हापूरसाठी वेगळे प्राधिकरण तयार करावे.'

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, 'पुरातील ऊस पिके कुजलेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी द्यावी.' तर ' विशेष आपत्ती म्हणून पूरग्रस्त भागाला अधिकाधिक निधी द्यावा. पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करावी', अशी मागणी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांनी केली.

यावेळी आमदार अमल महाडिक, नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.

...

चौकट

१ लाख ५ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, 'आजपर्यंत १६२ टक्के पाऊस झाला आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडून ५५.७ फूट इतकी पाणी पातळी गाठली. ३२१ गावांमध्ये ९० हजार ३६८ कुटुंबांतील ३ लाख ५८ हजार ९१ जणांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले. प्राथमिक अंदाजानुसार १ लाख ५ हजार हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीन लाखांवर पूरग्रस्तांना दैनंदिन भत्ता

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

शहरासह जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९१ पूरग्रस्तांना प्रत्येकी प्रतीदिनी मोठ्या व्यक्तीस ६० तर लहान मुलांना ४५ रूपये दैनंदिन निर्वाह भत्ता पूर उतरेपर्यंतच्या दिवसाचा मिळणार आहे. याशिवाय ९० हजार ३६८ कुटुंबांना दहा आणि पंधरा हजार रूपये प्रापंचिक साहित्य खरेदीसाठी देण्यात येत येणार आहे. यातील पाच हजार रूपयांचे वाटप युध्दपातळीवर केले जात आहे.

महापुराने रौद्र रूप धारण केल्याने दहा दिवस बाधीत कुटुंबांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. घरात पाणी घुसल्याने नातेवाईक, प्रशासनाने सुरू केलेल्या शिबिरात पूरग्रस्तांना स्थलांतर व्हावे लागले. पुराच्या पाण्यात अनेकांचे प्रापंचिक साहित्य वाहून गेले. संसार उपयोगी साहित्य खराब झाले. पूरस्थिती आणि स्थलांतरामुळे मजुरी, नोकरी, व्यावसायाच्या ठिकाणचे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले. यामुळे पूर असलेल्या दिवशी सर्व पूरग्रस्तांना प्रत्येक दिनी प्रती माणसी ६० रूपये आणि लहान मुलांना ४५ रूपये देण्यात येणार आहे. शहरातील पूरग्रस्तांना प्रापंचिक साहित्य खरेदीसाठी १५ हजार आणि खेड्यातील पूरग्रस्तांना १० हजार रूपये मिळणार आहे. यातील पाच हजार तातडीने वाटप केले जात आहे. उर्वरित मदत आणि निर्वाह भत्यांची रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

सध्याच्या सरकारी आदेशातील मार्गदर्शन सूचनेनुसार मदत निधी, निर्वाह भत्ता दिला जात आहे. परंतु, पुराने गाव वेढले असूनही तेथील घरात पाणी गेलेले नाही. त्यांना नुकसान भरपाई आणि सरकारची मदत मिळणार का, यासंबंधीही प्रशासकीय पातळीवर संभ्रम आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्यात अनेक गावांत ही अडचण येत आहे. पुराने वेढलेल्या गावातील सर्व कुटुंबांना मदत दिली तर मदतपात्र कुटुंबांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.

...

सरकारच्या आर्थिक मदतीसाठी पात्र पूरग्रस्तांची संख्या अशी

तालुक्याचे नाव गावांची संख्या कुटुंब संख्या पूरग्रस्तांची संख्या

कोल्हापूर शहर १ ५६४१ २२३३३

कागल ३५ १८४८ ८१९२

राधानगरी २१ ७४६ ३६१५

गडहिंग्लज १५ ९३६ ४००३

आजरा २४ ९७ ३७४

भुदरगड १९ २३४ ९७२

शाहूवाडी २४ ४२७ १९६२

पन्हाळा ४४ ८७९ ४१८८

शिरोळ ४२ ४९७३२ १८४००४

हातकणंगले २३ २१३२९ ९३६०८

करवीर ५५ ८२२७ ३३३१५

गगनबावडा २ ५० २४१

चंदगड १६ २२२ १२८४

...

चौकट

अपार्टमेंटमधील

पूरग्रस्तांबाबत संभ्रम

शहरात अनेक अपार्टमेंटमधील बेसमेंट आणि पहिल्या मजल्यावर पुराचे पाणी घुसले. त्यामुळे संपूर्ण अपार्टमेंटमधील कुटुंबांना सुरक्षितस्थळी जावे लागले. अशा कटुंबांतील सर्व व्यक्तींना निर्वाह भत्ता मिळणार आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि त्यावरील मजल्यावर राहणाऱ्या पण तळमजल्यावर पाणी आल्याने स्थलांतर व्हावे लागलेल्या कुटुंबांना प्रापंचिक साहित्य खरेदीसाठीचे १५ हजार रूपये द्यावेत की देऊ नये, याबाबत जिल्हा प्रशासनात संभ्रम आहे. त्यांनी सरकारकडे याबाबत मार्गदर्शनपर सूचना देण्यासंबंधी पत्रव्यवहार केला आहे.

...

कोट

'शहर, परिसर आणि जिल्ह्यातील सर्व पूरग्रस्तांना दैनंदिन निर्वाह भत्ता देण्यात येईल. त्याची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. अपार्टमेंटमधील तळमजल्यावर पाणी गेलेल्या घरातील कुटुंबांना १५ हजारांचे अर्थसहाय मिळेल. वरच्या मजल्यावरील अपार्टमेंटधारकांना मदतीसंबंधी सरकारकडे मार्गदर्शन मागितले आहे.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुभाषनगरातील तरुणाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुभाषनगर येथून गेले सात दिवस बेपत्ता असलेल्या श्रीकांत राम साळे (वय ३४) या तरुणाचा मृतदेह व्हीनस कॉर्नर येथील जयंती नाल्याच्या पात्रात बुधवारी सकाळी सापडला. आठ ऑगस्टला शाहूपुरीतून कामावरून घरी येत असताना पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.

पोलिसांनी सांगितले की, साळे शाहूपुरी येथील कुशनच्या दुकानात कामाला होते. ते आठ ऑगस्ट रोजी सकाळी कामावर गेले. मात्र रात्री उशीरापर्यंत घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची फिर्यात पोलिसांत दिली. बुधवारी सकाळी व्हीनस कॉर्नर येथील जयंती नदीच्या पात्रात एका तरुणाचा मृतदेह सापडला. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. नातेवाइकांना फोन करून बोलवून घेतले असता त्यांनी साळे यांचा मृतदेह असल्याचे सांगितले. रात्रीच्या वेळी कामावरून घरी येत असताना पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. साळे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांची संपूर्ण कर्जमाफी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी. तसेच नवीन लागवडीसाठी तातडीने कर्जपुरवठा आणि व्यापारी, उद्योजकांच्या कर्जाला हप्ते वाढवून देण्याबरोबरच व्याजही माफ करावे', अशी मागणी राज्य आणि केंद्र सरकारकडे करण्यात येणार असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार बैठकीत दिली.

महापुराच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी बुधवारी शिरोळसह करवीर तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना ते म्हणाले, 'महापुरात ऊस आणि सोयाबीन बुडाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी सरकारकडे करणार आहे. या पुराने छोटे मोठे व्यापारी, उद्योजक, कारागीर आणि शेतमजुरांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनाही काही सवलती देण्याबरोबरच अर्थसाह्य देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. ज्यांची घरे पडली आहेत त्यांना तातडीने घरे बांधून द्यावीत, मदत करताना ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव करू नये, केंद्राकडे मागितलेली सहा हजार आठशे कोटींची मदत तातडीने मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा अनेक मागण्या सरकारकडे करण्यात येणार आहेत.'

.. ..

निवडणूक लांबणीवर नको

महापुराचा तडाखा राज्यातील केवळ तीन जिल्ह्यांना बसला आहे. त्यामुळे राज्याची विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी, असे वाटत नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्या या मागणीलाही पवार यांनी विरोध केला. राज्य सरकारने मदत आणि बचावाचे जे काम केले त्याबद्दल तक्रारी ऐकायला मिळाल्या. मात्र आता राजकारण करायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images