Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT
कोल्हापूर
जिल्ह्यातील नऊ नद्यांना पूर आल्याने काठावरील १२९ गावांतील १४ लाख ५१ हजार १२२ जण बाधित झाले आहेत. त्यांच्यात पुराच्या पाण्याने भय निर्माण झाले आहे. पाणीच जिवावर उठल्याने नको बाबा पाऊस, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
आठवड्याहून अधिक काळ जोरदार पाऊस पडत आहे. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. सर्वच मध्यम आणि लहान धरणे ८० टक्क्यांहून अधिक भरल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. परिणामी सहा नद्यांतील पाणी पात्राबाहेर पडले आहे. साडेतीन हजारांवर लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. नदीकाठांवरील १२९ गावांना पूर वेढत आहे. यामुळे तेथील एकूण साडेचौदा लाखांपेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षणे त्रास सहन करावा लागत आहे. तेथील अत्यावश्यक सेवेवर परिणाम होत आहे. अनेक रस्ते बंद झाल्याने दळणवळण मंदावले असून जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर बनला आहे. काठावरील ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ येत आहे. काठावरील सर्वच गावात जलजन्य आजारांचा फैलाव होत आहे. यामुळे तेथे भीतीचे वातावरण आहे. काठावरील सर्व १२९ गावांतील नागरिकांना पूर ओसरण्याचे वेध लागले आहेत. यासाठी ते हवामान खात्याच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून आहे. मात्र पाऊस कमी होण्याऐवजी वाढतच आहे. धरणातून विसर्ग वाढल्याने आणि पाणी जमिनीत मुरण्याची क्षमता संपल्याने पावसाचा प्रत्येक थेंब वाहताना दिसत आहे. यातूनच नद्यांचे पाणी वाढत आहे.
...
शहरालाही फटका
जिल्ह्यातील नऊ नद्यांपैकी सर्वाधिक पंचगंगा नदीकाठावरील २९ गावे बाधित झाली आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहराचाही समावेश आहे. शहराच्या मध्यापर्यंत पंचगंगा नदीचा फुगवटा आल्याने रहिवाशांचे हाल सुरू आहेत.
...
कोट
'जिल्ह्यातील नदी काठावरील पूरबाधित १२९ गावांतील लोकांच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज आहे. काठाजवळील ज्या गावांच्या वेशीत पाणी आले आहे, तेथील कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.
प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
...
नदीचे नाव पूरबाधित गावांची संख्या बाधित लोकांची संख्या
कृष्णा २२ ९९१७७
वारणा १७ १०६६०९
कडवी २ ६८८८
कासारी ६ १६५०४
कुंभी १७ २४२३२
भोगावती १७ ५०४५३
पंचगंगा २९ १०७३६३८
दूधगंगा १२ ५२४९६
वेदगंगा ७ २११२५
...
जिल्ह्यातील पूरबाधित गावे
शिरोळ : कोथळी, उमळवाड, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, कनवाड, हसूर, शिरटी, नृसिंहवाडी, बस्तवाड, अकिवाट, राजारापूर, खिद्रापूर, मजरेवाडी, गणेशवाडी, शेडसाळ, कवठेगुलंद, गौरवाड, औरवाड, बुबनाळ, आलास, दत्तवाड, दानवाड, कवठेसार, दानोळी, टाकवडे, शिरदवाड, अब्दुललाट, शिरोळ, कुरूंदवाड, धरणगुत्ती, नांदणी, शिरढोण, तेरवाड, हेरवाड.
राधानगरी : फेजिवडे, पडळी, राधानगरी, गुडाळ, गुडाळवाडी, आणाजे, आवळी बु., घोटवडे, टिटवे, सरवडे, कसबा वाळवा,
करवीर : हळदी, आरे, बालिंगे, नागदेवाडी, साबळेवाडी, खुपीरे, शिंदेवाडी, हणमंतवाडी, पाडळी खु., निटवडे, केर्ले, केर्ली, वरणगे, चिखली, शिंगणापूर, आंबेवाडी, कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीकाठाजवळील वसाहती, वडणगे, निगवे, कसबा बावडा, शिये, भुये, वळीवडे.
पन्हाळा : बाजारभोगाव, कळे, मल्हारपेठ, सावर्डे तर्फे असंडोली, भामटे, तांदूळवाडी, आकुर्डे, गोठे, आसगांव, परखंदळे, घरपण.
गगनबावडा : अणदूर, खोकुर्ले, मार्गेवाडी, निवडे, साळवण, मांडुकली पैकी पडवळवाडी, वेतवडे.
कागल : वंदूर, सुळकूड, सिध्दनेर्ली, बामणी, करनूर, शंकरवाडी, एकोंडी, निढोरी, कुरूकली, बाणगे, चिखली.
भुदरगड : पाटगांव, शेणगांव, खानापूर.
शाहूवाडी : सोडोली, थेरगाव, मलकापूर, पाटणे, करंजफेण.
हातकणंगले : निल्लेवाडी, पारगाव, चावरे, घुणकी, किणी, भादोली, लाटवडे, भेंडवडे, खोची, वाठार तर्फे वडगाव, कुंभोज, हिंगणगाव, शिरोली पुलाची, हालोंडी, इंगळी, रूई, चंदूर, रांगोळी, हुपरी, इचलकरंजी, रेंदाळ.