‘नवीन योजनांचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नात काँग्रेस गेल्या ६० वर्षातील स्वतःच्याच नाकर्तेपणाचा पाढा वाचत आहे. नागरिकांना असुविधांच्या गर्तेत ठेवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी या राक्षसांचा निःपात करण्याची वेळ आली असून लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष देईल तो उमेदवार विजयी करा,’ असे आवाहन शिवसेनेचे नेते आमदार दिवाकर रावते यांनी केले.
श्रेयवादात काँग्रेसचे नाकर्तेपण उघड
↧
↧
न्यायसंकुलावर न्यायमूर्ती समाधानी
मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी रविवारी कसबा बावडा येथील न्यायसंकुल व जिल्हा न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली. या दोन्ही इमारतींबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. यासह त्यांनी कोल्हापूर विमानतळाच्या प्रशस्त जागेचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
↧
जागावाटपाला उशीर होतोय!
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरू करून अंतिम निर्णय घ्यावा, या चर्चेला उशीर होतोय,’ असा इशारा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार रामदास आठवले यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला.
↧
रस्ते प्रकल्पाचे पुन्हा ऑडिट करा
‘रस्ते प्रकल्पाचे बजेट राज्यकर्ते व अधिकाऱ्यांनी संगनमताने फुगवून शंभर ते दिडशे कोटी खाल्ले आहेत. कोल्हापुरात टोल विरोधात होत असलेले आंदोलन कौतुकास्पद असून हा विरोध लक्षात घेऊन प्रकल्पाचे रिऑडिट करावे.
↧
झोपडपट्टीच्या जागा आमच्या नावावर करा
विचारेमाळ झोपडपट्टी १९६० पासून वसली आहे. मात्र, अद्यापही या जागा झोपडपट्टीधारकांच्या नावावर नाहीत. त्यामुळे या जागा आमच्या नावावर करा अशी मागणी करत सोमवारी विचारेमाळ लोकहक्क संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
↧
↧
कत्तलखाने वेगवेगळेच, विनाकारण गैरसमज
कत्तलखान्याचे एक ठिकाण असले तरी बकऱ्यांचा कत्तलखाना व जनावरांच्या कत्तलखान्याची इमारत स्वतंत्र आहे. त्यामुळे दोन कत्तलखाने एकत्र असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे.
↧
बीओटी तत्त्वाला कायमचा विरोध
‘महापालिकेकडून समाधानकारक आश्वासन मिळाल्यावरच मटण विक्री पुन्हा सुरु करण्यात येईल. आम्ही ग्राहकांना वेठीला धरले जाणार नाही, मात्र खाटीक समाज आणि व्यावसायिकांचे आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार आहे.
↧
चित्रभाषा समजून घेताना
एक चित्र समजून सांगण्यासाठी दुसरं चित्र काढून चालत नाही. चित्र किंवा शिल्प समजून घेण्यासाठी पुन्हा ‘शब्द’ या माध्यमाचाच आधार घ्यावा लागतो. गायन, संगीत, नृत्य, स्थापत्य या कला समजून घेण्यासाठीही शब्दांचीच गरज भासते.
↧
‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ने ‘स्वयंपूर्ण’
माळी कॉलनी येथील न्यायमूर्ती श्यामराव मंडलिक पार्कच्या ‘ए’ विंगने वर्षभर रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवला असून त्यातून येथील पाण्याची समस्या सोडविण्यात रहिवाशांना यश आले आहे.
↧
↧
धूम ४; कन्याकुमारीला बाइक टूर
येथील तीन युवकांनी कोल्हापूर ते कन्याकुमारी हा प्रवास बाइक्सवरून नुकताच पूर्ण केला. पश्चिम घाट बचाव आणि सेव्ह द बेबी गर्ल हा संदेश देण्यासाठी फुलेवाडी येथील उमाकांत चव्हाण (३०), शाहूवाडीतील अजिंक्य बेर्डे (२५) आणि विद्याधर दुर्गुळे (२६) यांनी ही रॅली पूर्ण केली.
↧
वाहतूक सुरक्षेसाठी ‘पहले आप’
रस्ते वाहतूक सुरक्षा पंधरवड्यानिमित्त शहर वाहतूक शाखा, जिल्हा पोलिस दल, प्रादेशिक परिवहन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे.
↧
कृष्णामाईसाठी ‘दत्त’ कळवळले
कृष्णामाईच्या पर्यावरण रक्षणासाठी सांगलीत मंगळवारी ‘दत्त’ कळवळला. प्रशासन, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तासभराच्या ‘धाव्या’नंतर ‘दत्त’जमिनीवर उतरले आणि प्रशासनासह सांगलीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.
↧
मराठा समाजाला आरक्षण द्या!
‘मराठा समाजाला आरक्षण देण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) केलेली मागणी ही राजकीय किवा मतांसाठी केलेली मागणी नाही. दलितांसारखीच आज अर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मराठा समाजातील सर्वसामान्य कुटुंबाची अवस्था आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून आम्ही सरकारकडे मराठा समाजालाही आरक्षण द्या, अशी मागणी करत आहोत.
↧
↧
माजी महापौर नायकवडींवर गुन्हा
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्यासह ११ जणांविरुद्ध मिरज शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शालेय पोषण आहारातील १३० पोती तांदळाचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
↧
धरणग्रस्तांचा साताऱ्यात मोर्चा
तारळी धरणग्रस्तांच्या विविध मागण्या आणि उरमोडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील धरणग्रस्तांच्या जमिनींना पाणी मिळालेले नाही. या योजनांची कामे तातडीने सुरू करावीत, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाने सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
↧
‘कायदा विद्यापीठ’ची प्रक्रिया सुरू
‘राज्यामध्ये एकही राष्ट्रीय कायदा विद्यापीठ नव्हते म्हणून मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तीन ठिकाणी राष्ट्रीय कायदा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या विषयीची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
↧
'स्वाभिमानी' महायुतीत येणार?
महायुतीत स्वाभिमानी संघटनेला सहभागी करून घेण्याबाबत आज, मंगळवारी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत खासदार राजू शेट्टी लोकसभेच्या आठ जागा मागणार असून चार जागांवर तडजोड होण्याची शक्यता आहे. या बैठकीस गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे व सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत.
↧
↧
१०४ बसच्या प्रस्तावाचा गुरुवारी निर्णय
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन (जेएनएनयुआरएम) योजनेतून केएमटी उपक्रमाकडे १०४ बसची खरेदी व इन्फास्ट्रक्चरसाठी राज्य सरकारच्या एसएलएससीची (स्टेट लेव्हल स्टँडिंग कमिटी) मंजुरी मिळाल्याने ४४ कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे.
↧
शिक्षण खात्यातही होणार क्रीडा स्पर्धा
शिक्षण खात्यात नव्याने रुजू झालेल्या तरुण लिपिक आणि अधिकारी यांच्या मागणीनुसार आता या विभागातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. शनिवारी आणि रविवारी या सरकारी सुट्टीच्या दिवशी या स्पर्धा होणार आहेत. शिक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच क्रीडा स्पर्धांचा श्रीगणेशा होत आहे.
↧
टोलविरोधात संघर्षाचा वज्रनिर्धार
प्रत्येकवेळी रस्त्यावरील आंदोलनात अग्रभागी असणारे, नेता म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून बिरुद पसंत करणारे, तरुणच नव्हे तर साठी ओलांडलेलेही, महिलाही त्यामध्ये मागे नाहीत, अशांच्या टोल विरोधी आंदोलनाने आता बेमुदत उपोषणासारखे निर्वाणीचे शस्त्र काढले आहे.
↧
More Pages to Explore .....