कोल्हापूर टाइम्स टीम
जुन्या इमारतीचे रखडलेले नूतनीकरण, डॉक्टरांची रिक्त पदे, अपुरा कर्मचारी वर्ग, राज्यकर्त्यांची उदासीनता, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा अशा प्रकारामुळे कोल्हापुरातील राज्य कामगार विमा रुग्णालयाची (इएसआय) अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्यावर्षी सुरू झालेल्या इएसआय हॉस्पिटलला प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. मात्र जबाबदार लोकप्रतनिधींनी याकडे पाठ फिरवली आहे.
कामगारांचे आरोग्य चांगले राहावे या हेतूने राज्य कामगार विमा रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र सरकारी उदासीनतेमुळे रुग्णालयाची दुरवस्था आहे. ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृहालगत दहा वर्षांपूर्वी ९ कोटी ५० लाख रुपये खर्चून राज्य कामगार विमा योजनेच्या हॉस्पिटलची इमारत उभारण्यात आली. सद्यस्थितीत हॉस्पिटलमध्ये केवळ बाह्यरुग्ण विभाग चालू असून उर्वरित इमारत धूळ खात पडली आहे. रोज किमान अडीचशेहून अधिक कामगार उपचारासाठी बाह्यरुग्ण विभागात येतात. मात्र, गेल्या वर्षभरात बाह्यरुग्ण विभागापुढे काम सरकलेले नाही. आंतररुग्ण विभाग व प्रयोगशाळा सुविधा चालू करण्याची वारंवार मागणी होऊनही सरकारी पातळीवर हालचाल होत नाही. हॉस्पिटल प्रशासनाने यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याबाबत दुर्लक्ष केले आहे. हॉस्पिटलमधील रिक्त पदसंख्या, तेथे सुरू करायचे विभाग अशा धोरणात्मक बाबींचे निर्णय मुंबईत होत असल्याने स्थानिक पातळीवर कार्यरत अधिकारी हतबल आहेत.
सुसज्ज इमारतीची वाताहत
इएसआय हॉस्पिटल तब्बल आठ एकरात खाजगी हॉस्पिटलपेक्षाही देखणी व प्रशस्त इमारतीत आहे. डॉक्टरांसाठी निवासस्थाने, स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा आदींची सोय करण्यात आली होती. मात्र प्रशासनाच्या कचखाऊ धोरणांमुळे जुन्या इमारतींची वाताहत झाली आहे. नूतनीकरण नसल्याने इमारतीची पडझड झाली आहे. खिडक्यांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत असून विद्युत वायरी तुटलेल्या आहेत. ठिकठिकाणी उगवलेली झुडपे, गंजलेली लोखंडी दारे यामुळे इमारतीची अवस्था एखाद्या भयपटातील प्रसंगासारखी झाली आहे. हॉस्पिटलच्या आतील भागाचे विद्युतीकरण झालेले नाही तर ट्रान्सफॉर्मरही जळाला आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. जनरेटरची मागणी करूनही त्याबाबत काहीच हालचाल झालेली नाही.
रिक्त पदभरती नाही
शंभर बेडच्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची ३८ पदे मंजूर असून केवळ पूर्णवेळ ४ डॉक्टरांसह १० कंत्राटी डॉक्टर घेऊन प्रशासनाकडून सध्या हॉस्पिटलचा गाडा हाकला जात आहे. दररोज मोठ्या संख्येने उपचारासाठी कामगार येतात. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जिल्ह्याबाहेरून आलेल्या कामगारांना तिष्ठत राहावे लागते. केसपेपर काढण्यासाठी तब्बल एक तासाहून अधिक वेटिंग असल्याचे उपस्थित रुग्णांनी सांगितले. जिल्ह्यात पन्नास हजारांहून अधिक लाभार्थी आहेत.
चोरीच्या घटना वाढल्या
हॉस्पिटलची १५ फूट उंचीची संरक्षक भिंत कोसळली असल्याने चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. हॉस्पिटलचे वसतिगृह व इतर इमारतीतील वस्तूंची चोरी झाली आहे. लोखंडी वस्तू आणि इतर महत्त्वाचे साहित्य गायब आहे. काही दिवसांपूर्वी प्रसाधनगृहातील साहित्य, पाण्याच्या पाइप चोरीला गेल्याने रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागले होते. गेल्यावर्षी चोरट्यांबरोबर डॉक्टरांची हातघाई झाली होती. त्यामध्ये एका डॉक्टराच्या पायाच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. सध्या केवळ एका शिफ्टमध्ये दोन ते तीन सुरक्षारक्षक उपलब्ध असतात. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी अन्य वर्गातूनही पुढाकार घेणे गरजेचे आहे.
आरोग्यसेवा देण्यासाठी कामगारांच्या वेतनातून लाखो रुपये सरकार घेते. मात्र कामगारांना मिळणारा परतावा अतिशय तुटपुंजा आहे. सरकार कामगारांच्या आरोग्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कामगारांना काम सोडून हेलपाटे मारावे लागतात. पैसे देऊनही विकतचा मन:स्ताप होत आहे. यासाठी किमान स्थानिक राजकीय नेत्यांनी लक्ष द्यावे.
- युवराज पाटील, कामगार
हॉस्पिटलला अधिकाधिक निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. इमारतीच्या नूतनीकरणासाठी मुंबई येथील ऑफिसशी सातत्याने संपर्क सुरू आहे. आंतररुग्ण, दक्षता विभाग व प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी व पायाभूत सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
- डॉ. काजल गोल्डार, मेडिकल सुपरिटेंडेंट
000
(मूळ कॉपी)
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
हॉस्पिटलच्या जुन्या इमारतीचे रखडलेले नूतनीकरण, डॉक्टरांची रिक्त पदे, अपुरा कर्मचारी वर्ग, राज्यकर्त्यांची उदासीनता, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कोल्हापुरातील राज्य कामगार विमा रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गतवर्षी सुरू झालेल्या इएसआय हॉस्पिटलला प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. याकडे जिल्ह्यातील नूतन खासदारांनी लक्ष देण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.
राज्यातील कामगारांचे आरोग्य चांगले राहावे या हेतूने राज्य कामगार विमा रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र सरकारी उदासीनतेमुळे या रुग्णालयात दुरवस्था आहे. तब्बल दहा वर्षे ९ कोटी ५० लाख रुपये खर्चून नागाळा पार्क शासकीय विश्रामगृहाच्या लगत राज्य कामगार विमा योजनेच्या हॉस्पिटलची इमारत उभारण्यात आली. सद्यस्थितीत हॉस्पिटलमध्ये केवळ बाह्यरुग्ण विभाग चालू असून उर्वरित इमारत धूळ खात पडली आहे. रोज किमान अडीचशेहून अधिक कामगार बाह्यरुग्ण विभागात येतात. मात्र, गेल्या वर्षभरात केवळ बाह्यरुग्ण विभागाच्या पुढे काम सरकलेले नाही. आंतररुग्ण विभाग व प्रयोगशाळा सुविधा चालू करण्याची वारंवार मागणी होऊनही सरकारी पातळीवर हालचाल होत नाही. हॉस्पिटल प्रशासनाने यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही वरिष्ठ अधिकारी त्याबाबतीत गाफील आहेत. हॉस्पिटलच्या धोरणांबाबत मुंबईत निर्णय होत असल्याने इथले अधिकारी हतबल आहेत.
सुसज्ज इमारतीची वाताहत
तब्बल आठ एकर परिसरात खाजगी हॉस्पिटलपेक्षाही देखणी व प्रशस्त इमारत उभा करण्यात आली आहे. डॉक्टरांसाठी निवास्थान, स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा आदीची सोय करण्यात आली होती. मात्र प्रशासनाच्या कचखाऊ धोरणामुळे जुन्या इमारतींची वाताहत झाली आहे. नूतनीकरण नसल्याने इमारतींची पडझड झाली आहे. खिडक्यांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत असून विद्युत वायर तुटलेल्या आहेत. अनावश्यक उगवलेली झुडपे, गंजलेली लोखंडी दारे यामुळे इमारतीची अवस्था हॉरर चित्रपटातील प्रसंगासारखी झाली आहे. हॉस्पिटलच्या आतील भागाचे विद्युतीकरण नाही तर ट्रान्सफॉर्मर जळाला आहे. प्रसंगी लाईट गेल्यास रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. जनरेटरची मागणी करूनही त्याबाबत काहीच हालचाल झालेली नाही.
रिक्त पदांची भरती नाही
शंभर बेडच्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची ३८ पदे मंजूर असून केवळ पूर्णवेळ ४ डॉक्टरांसह १० कंत्राटी पद्धतीने डॉक्टर घेऊन सध्या हॉस्पिटलचा गाडा हाकला जात आहे. दररोज मोठ्या संख्येने उपचारासाठी कामगार वर्ग येत असल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जिल्ह्याबाहेरून आलेल्या कामगारांना तिष्ठत राहावे लागते. केसपेपर काढण्यासाठी तब्बल एक तासाहून अधिक वेटिंग असल्याचे एकाने सांगितले. जिल्ह्यात पन्नास हजाराहून अधिक लाभार्थी आहेत.
चोरीच्या घटना वाढल्या
हॉस्पिटलची १५ फूट उंचीची संरक्षक भिंत कोसळली असल्याने चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. हॉस्पिटलचे वसतिगृह व इतर इमारतीतील वस्तूंची चोरी झाली आहे. लोखंडी व इतर महत्त्वाच्या साहित्य गायब आहे. काही दिवसांपूर्वी प्रसाधनगृहातील साहित्य, पाण्याच्या पाईप चोरीला गेल्याने रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागले होते. गतवर्षी चोरट्यांबरोबर डॉक्टरांची हातघाई झाली होती. त्यामध्ये एका डॉक्टराच्या पायाच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. सध्या केवळ एका शिफ्टमध्ये दोन ते तीन सुरक्षारक्षक उपलब्ध असतात. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
कोट:
आरोग्य सेवा देण्यासाठी कामगारांच्या वेतनातून लाखो रुपये सरकारला मिळतात. मात्र कामगाराला मिळणारा परतावा अतिशय तुटपुंजा आहे. सरकार कामगारांच्या आरोग्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कामगारांना काम सोडून हेलपाटे मारावे लागतात. पैसे देऊनही विकतचा मनस्ताप होत आहे. यासाठी किमान स्थानिक राजकीय नेत्यांनी लक्ष द्यावे.
युवराज पाटील, कामगार
हॉस्पिटलला अधिकाधिक निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. इमारतीच्या नूतनीकरणासाठी मुंबई येथील ऑफिसशी सातत्याने संपर्क सुरू आहे. आंतररुग्ण, दक्षता विभाग व प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी व पायाभूत सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
- डॉ. गोल्डार, मेडिकल सुपरिटेंडेंट