फोटो आहेत...
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी बुधवारी सकाळी शेकडो हात सरसावले. एकमेकांना साथी हाथ बढानाची साद घालत प्रयाग चिखली येथील नदीपात्रातील प्लास्टिकच्या वस्तू, जुने कपडे, पत्रावळ्या, तुटलेल्या काचा, बाटल्या अशा स्वरूपातील कचरा जमा केला. जवळपास साडेतीन तास चाललेल्या या श्रमदानातून जवळपास चार टन कचरा संकलित केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती करवीर आणि पन्हाळा येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मिळून २६३ जणांनी सहभाग घेतला.
'नमामि पंचगंगे' उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त श्रमदानाचे आयोजन केले होते. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीचा पुढील टप्पा म्हणून बुधवारी सकाळी प्रयाग चिखलीच्या घाटावर स्वच्छता मोहीम झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. शिवदास यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी सातच्या सुमारास स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. अध्यक्षा महाडिक, सीईओ मित्तल यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियानात सहभागी होत कचरा उठाव केला तसेच काही भागात साफसफाई केली.
प्रमुख पदाधिकारी, अधिकारी श्रमदानात सहभागी झाल्यामुळे कर्मचारीसुद्धा हिरीरीने उतरले. घाट परिसर आणि नदीपात्रात ठिकठिकाणी विखुरलेला कचरा गोळा करण्यास सुरुवात झाली. प्लास्टिकच्या वस्तू, जुने कपडे, पत्रावळ्या, खरमाती, काचेच्या बाटल्या एकत्रित करून त्यांचा ढीग तयार केला. सकाळी साडेदहापर्यंत ठिकठिकाणी पसरलेला कचरा हटवून जागेची साफसफाई केली. घाट परिसर आणि नदीपात्रातील मिळून चार टन कचरा जमा झाला. करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, जिल्हा परिषद सदस्या प्रियांका करवीर पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, प्रयाग चिखलीच्या सरपंच उमा पाटील, वरणगेच्या सरपंच अपर्णा पाटील यांनीही श्रमदानात सहभाग घेतला.
००००
पदाधिकारी-सदस्यांची पाठ, अधिकाऱ्यांचा सहभाग
पंचगंगा नदी जिल्ह्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय आहे. नदी प्रदूषणाची विषय सध्या गाजत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषणमुक्तीसाठी जिल्हा परिषदेचे कृतिशील पाऊल म्हणून बुधवारी स्वच्छता अभियान राबविले. पण या अभियानाकडे जिल्हा परिषदेतील विविध समित्यांचे सभापती, बहुतांश सदस्यांनी पाठ फिरवली. करवीर तालुक्यातील अनेक सदस्य अनुपस्थित होते. दरम्यान, ग्रामीण विकास प्रकल्प संचालक अजयकुमार माने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, प्रियदर्शिनी मोरे, राजेंद्र भालेराव, सोमनाथ रसाळ, महिला व बालकल्याण विकास अधिकारी डॉ. एस. एस. शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवशी, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांनी श्रमदानात सहभाग घेतला.
००००
कोट...
'पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या 'नमामि पंचगंगा' उपक्रमाची वर्षपूर्ती होत आहे. आतापर्यंत समाधानकारक कामे झाली असली तरी यापुढेही नदी प्रदूषणासाठी गावागावांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. पंचगंगेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दर आठवड्याला स्वच्छता मोहीम राबवून युवक आणि युवतींनी सातत्याने आणि दीर्घ काळपर्यंत योगदान देऊन पंचगंगेच्या शुद्धिकरणाची जबाबदारी उचलावी.'
शौमिका महाडिक, अध्यक्षा, जि. प.
०००
राजाराम बंधारा येथे महाश्रमदान
कसबा बावडा : राजाराम बंधारा येथे विविध संघटनांच्या वतीने बुधवारी महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कुलशेट्टी आणि डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाश्रमदान अभियान राबविण्यात आले. यामध्ये राजाराम बंधारा, त्याचबरोबर शहरातील पंचगंगा नदी घाट परिसर, रंकाळा या ठिकाणी स्वछता मोहीम राबविण्यात आली. राजाराम बंधारा येथे नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने या भागातील तीन डपंर कचरा काढण्यात आला. राजाराम बंधाऱ्यावरील दक्षिण बाजूला नदीपात्र तसेच दत्त मंदिर घाट परिसरात सकाळी सातपासून साडेदहापर्यंत स्वछता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नगरसेविका माधुरी लाड, नगरसेवक मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार, अशोक जाधव, आदींसह शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षदीप घाटगे, आदींसह सफाई कर्मचारी यांच्यासह ऋतुराज पाटील फाउंडेशन आणि इतर विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ :
राजाराम बंधारा येथे महाश्रमदान स्वछता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नदीपात्रात काचेच्या बाटल्यांचे फुटलेले तुकडे उचलताना महापौर सरिता मोरे, आयुक्त मल्लिनाथ कुलशेट्टी, ऋतुराज पाटील, आदी.