कोल्हापूर टाइम्स टीम
प्रलंबित कृषी पंपासाठी त्वरीत वीज जोडणी देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखा या मागणीसाठी शिवसेनेने अनोखे आंदोलन केले. खोट्या नोटांचे पाकिट देऊन 'पैशाचं पाकिट घ्या, शेतीपंपाला वीज कनेक्शन द्या' अशी मागणी 'महावितरण'कडे करण्यात आली. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन न दिल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, मार्च २०२०पर्यंत जिल्ह्यातील सर्व कृषीपंपांसाठी वीज जोडणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी यावेळी दिली.
महावितरणकडे कोल्हापूर जिल्ह्यातील ५०५० तर सांगली जिल्ह्यातील १० हजार ७५५ शेतकऱ्यांनी शुल्क भरुन अर्ज केले आहेत. मात्र गेली तीन वर्षे शेतीसाठी
वीज कनेक्शन दिलेले नाही. महावितरणच्या या कारभाराविरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विद्युत लोकपालाकडे धाव घेतली आहे. विद्युत लोकपालांनी या शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी द्यावी, असा आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली आहे असा आरोप करीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ताराबाई पार्कातील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. 'शेतकऱ्याच्या आत्महत्येची वाट पाहणार का?', 'तीन वर्षे पैसे भरुनही वीज कनेक्शन कधी मिळणार?' अशी शेतकऱ्यांकडून विचारणा करणारा कार्यकर्त्यांच्या हातातील फलक यावेळी लक्ष वेधून घेत होता.
निदर्शने केल्यानंतर शिवसेनेने थेट कार्यालयावर हल्लाबोल केला. मुख्य अभियंता भोसले यांना पूजेच्या ताम्हणात मांडण्यात आलेल्या खोट्या नोटा, पैशाचे पाकिट, मंगल कलश देण्यात आला. 'पैसे घ्या, पण वीज कनेक्शन द्या' अशी मागणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी आणि माजी नगरसेवक धनंजय सावंत यांनी पैसे भरूनही तीन वर्षे वीज कनेक्शन न मिळाल्याने शेतीचे किती नुकसान झाली याची माहिती दिली.
मुख्य अभियंता भोसले यांनी कार्यकर्त्यांना वीज कनेक्शनच्या सद्यस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले, 'गेली तीन वर्षे निधी आला नसल्याने वीज कनेक्शन मिळालेली नाहीत. आठ महिन्यांपूर्वी राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन दिला आहे. सध्या ४७०० वीज कनेक्शन देण्याचे काम प्रलंबित आहे. कनेक्शन देण्यासाठी निविदा काढण्यात आली असून १७ ठेकेदारांना काम दिले आहे. मार्च २०२०पूर्वी जिल्ह्यातील प्रलंबित सर्व शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात येईल.'
आंदोलनात दुर्गेस लिंग्रस, विराज पाटील, तानाजी आंग्रे, सुजित चव्हाण, कमलाकर जगदाळे, शशिकांत बीडकर, अनिल पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पश्चिम महाराष्ट्राला वेगळा न्याय का?
आंदोलनात मराठवाडा, विदर्भाला सवलती आणि पश्चिम महाराष्ट्राला वेगळा न्याय का? असा प्रश्न जिल्हाप्रमुख देवणे यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, उद्योजक नियमित बील भरतात. पण ज्या ठिकाणी शेकडो कोटी रुपयांचा तोटा आहे, त्यांना मात्र सवलती दिल्या जातात' असा आरोप देवणे यांनी केला.
०००
(मूळ कॉपी)
वीज कनेक्शनसाठी शिवसेनेचे 'पैशाचे पाकिट' देऊन आंदोलन
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
प्रलंबित कृषी पंपासाठी त्वरीत वीज जोडणी देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखा, या मागणीसाठी शिवसेनेने अनोखे आंदोलन केल. सेनेने खोट्या नोटांचे पाकिट देऊन 'पाकिट पैशाचं घ्या, शेती पंपाचा वीज कनेक्शन द्या' अशी मागणी वीज मंडळाकडे केली. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन न दिल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मार्च २०२० पर्यंत जिल्ह्यातील सर्व कृषी पंपासाठी वीज जोडणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी यावेळी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील ५०५० तर सांगली जिल्ह्यातील १० हजार ७५५ शेतकऱ्यांनी शुल्क भरुन अर्ज केले असताना शेतीसाठी गेले तीन वर्षे विजेचे कनेक्शन दिलेले नाही. वीज मंडळाच्या कारभाराच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विद्युत लोकपालाकडे धाव घेतली. त्यांनी तातडीने वीज जोडणी द्यावी, असा आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. या प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ताराबाई पार्क येथील वीज मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
'शेतकऱ्याच्या आत्महत्येची वाट पाहणार का?' हा फलक यावेळी लक्ष वेधून घेतले. 'तीन वर्षे पैसे भरुनही वीज कनेक्शन कधी मिळणार' हा शेतकरी अधिकाऱ्यांना विचारात असलेला प्रश्नाचा फलकही शिवसैनिकांनी मोर्चात आणला होता.
निदर्शनानंतर शिवसैनिकांनी थेट कार्यालयावर हल्लाबोल केला. मुख्य अभियंता भोसले यांना पूजेच्या ताम्हणात मांडण्यात आलेल्या खोट्या नोटा, पैशाची पाकिट, मंगल कलश देण्यात आला. पैसे घ्या व पण वीज कनेक्शन द्या अशी मागणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी आणि माजी नगरसेवक धनंजय सावंत यांनी पैसे भरुनही तीन वर्षे वीज कनेक्शन न मिळाल्याने शेतीचे किती नुकसान झाली याची माहिती दिली.
मुख्य अभियंता भोसले यांनी आंदोलकांना माहिती दिली. ते म्हणाले, गेले तीन वर्षे निधी आला नसल्याने वीज कनेक्शन मिळालेली नव्हती. आठ महिन्यापूर्वी राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन दिला असून ४७०० वीज कनेक्शनचे काम प्रलंबित आहेत. कनेक्शन देण्यासाठी निविदा काढण्यात आली असून १७ ठेकेदारांना काम दिले आहे. मार्च २०२० पूर्वी जिल्ह्यातील प्रलंबित सर्व शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात येईल.
आंदोलनात दुर्गेस लिंग्रस, विराज पाटील, तानाजी आंग्रे, सुजित चव्हाण, कमलाकर जगदाळे, शशिकांत बीडकर, अनिल पाटील यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.
०००००
पश्चिम महाराष्ट्राला वेगळा न्याय का?
मराठवाडा, विदर्भाला सवलती आणि पश्चिम महाराष्ट्राला वेगळा न्याय का असा प्रश्न जिल्हा प्रमुख देवणे यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, उद्योजक नियमित बील भरतात. वेळेवर वीज बिल भरतात. पण ज्या ठिकाणी शेकडो कोटी रुपये तोटा आहे त्यांना मात्र सवलती दिल्या जातात असा आरोप देवणे यांनी केला.