जिल्ह्यात साथीच्या रोगाचा वेगाने फैलाव होत असताना, जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने साथ आटोक्यात आणण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याच्या निषधार्थ जिल्हा शिवसेनेच्यावतीने जिल्हा परिषदेवर म्हशींसही मोर्चा काढला.
जिल्हा परिषदेच्या दारात म्हशी
↧
↧
देवीचा जागर... नैवेद्याची भाकर
सौंदत्तीच्या डोंगरावरून भंडारा उधळून परतीच्या प्रवासाने घरी आलेल्या रेणुकादेवीच्या भाविकांना आता वेध लागले आहेत ते रविवारी कोल्हापुरात होणाऱ्या यलम्मादेवीच्या आंबिल यात्रेचे. कोल्हापूर परिसरातून सुमारे ५० हजार भाविकांच्या गर्दीने रेणुका मंदिर गजबजून जाते.
↧
महाराष्ट्र टाइम्सतर्फे ‘सिक्रेट सांता’चे आयोजन
ख्रिसमसच्या सकाळी उशीजवळ सांताक्लॉजने काय गिफ्ट ठेवले असेल याची उत्सुकता चिमुकल्यांच्या आनंदात भर टाकत असते. पण गरीब कुटुंबातील गरजू आणि निराधार मुलांसाठी असा कोणताच सांताक्लॉज येत नाही.
↧
‘तेजस्विनी’ची सुखी आयुष्याची गुरुकिल्ली
कुणालाही न सांगता मुले-मुली पळून जाऊन लग्न करतात. अविचाराने केलेले असे अनेक विवाह नव्या नवलाईसारखे संपून जातात. लग्नापूर्वीचे रोमिओ-ज्युलिएट नंतर वैफल्यग्रस्त आयुष्य जगतात. या एका घटनेमुळे अनेकांचे आयुष्य सुरु होण्यापूर्वीच संपुष्टात आल्यासारखे होऊन जाते.
↧
वायदे बाजारातील साखर विक्रीची चौकशी करा
साखरेच्या वायदेबाजारात दोन हजार कोटी रूपयांची लूट झाली असून याचा भुर्दंड ग्राहक, उस उत्पादक शेतकरी व साखर कारखाने यांना बसलेला आहे.
↧
↧
मैदान नामांतरप्रश्नी अधिका-यांना नोटिसा
येथील संत नामदेव मैदानाच्या नामांतरामध्ये पालिका प्रशासनाने दिशाभूल केल्यामुळेच चूक घडली. त्यामुळे नामांतराचा ठराव रद्द करण्यात येत असल्याची कबुली नगराध्यक्षा सुमन पोवार यांना आज द्यावी लागली.
↧
फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकूर
शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहून फेसबुकवर टाकल्याप्रकरणी विकास शशिकांत बोरे (रा. देवर्डे, ता. भुदरगड) या तरुणावर भुदरगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
↧
नदीत खोदाई : गजरगावच्या दोघांना अटक
आजऱ्यातील चित्रा नदीपात्रामध्ये विनापरवाना सुरूंग लावून दगड उत्खनन करणाऱ्या ठेकेदार शिवाजी दत्तू पाथरवट, जगदीश अर्जुन पाथरवट (दोघेही रा. गजरगाव, ता. आजरा) या दोघांना गुरुवारी आजरा पोलिसांनी अटक केली.
↧
थकीत बिल भरल्यावरच ‘दौलत’ सुरू
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याचे थकीत बिल भरल्यानंतर प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामकाजाला सुरू करणार आहे. त्यासाठी कामगारांनी तयारीत रहाण्याची सूचना केशव शुगर्सचे संजय वाठारकर यांनी केली.
↧
↧
‘लाळ खुरकत’ची वाघापुरात साथ
जिल्ह्यात लाळखुरकत आजाराचा प्रादूर्भाव होत मोठ्या प्रमाणात होत आहे. कागल तालुक्यातील कुरणी पाठोपाठ आता वाघापूर (ता. भुदरगड) येथेही लाळखुरकत आजाराने पाच जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.
↧
कागलमध्ये मारामारीत एकजण जखमी
मोटारसायकलची बॅटरी बदलण्याच्या कारणावरून येथील कागल बाईक्सच्या शोरूमच्या मालकास साके (ता. कागल) येथील एकाने फायटरच्या सहाय्याने मारहाण केली.
↧
आकुर्डे MIDC बाबत सकारात्मक चर्चा
भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील कित्येक वर्ष रखडलेला एमआयडीसी प्रकल्प मार्गी लागावा यासाठी आमदार के. पी. पाटील यांनी अतारांकित प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला.
↧
फेरीवाल्यांना नवीन वर्षात बायोमेट्रिक ओळखपत्रे
फेरीवाला धोरणामध्ये झालेल्या बदलांप्रमाणे नवीन प्रभागस्तरीय तसेच शहरस्तरीय समिती स्थापन करुन नवीन फेरीवाले झोन तयार केले जाणार आहेत. त्यामुळे किमान सहा महिने तरी फेरीवाल्यांच्या झोनबाबत निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. पण १ जानेवारीपासून ६ हजार फेरीवाल्यांना बायोमेट्रिक ओळखपत्रांचे वाटप केले जाणार आहे.
↧
↧
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांवर हक्कभंग प्रस्ताव
जिल्हाधिकारी राजाराम माने व पोलिस अधिक्षक विजयसिंह जाधव यांच्यावर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी हक्कभंग समितीकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
↧
भिशीतून फसविणा-या कंडक्टरला अटक
भिशीच्या माध्यमातून एक लाख ७७ हजार ८०० रूपयाची फसवणूक करणाऱ्या संभाजीनगर बस स्थानकातील कंडक्टर युवराज संभाजी शिंदे (रा. माळी कॉलनी), भाऊ कृष्णात शिंदे (रा. हणबरवाडी, ता. करवीर) या चुलतभावांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.
↧
गुंठेवारीबाबत १५ दिवसांत बैठक
इचलकरंजी ग्रामीण परिसरातील गुंठेवारी सुरू करण्यासंदर्भात येत्या १५ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेण्याचे लेखी आश्वासन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी दिले. या आश्वासनानंतर इचलकरंजी परिसर जमीन कायदेविषयक अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने प्रांत कार्यालय चौकात चार दिवसापासून सुरू असलेले बेमुदत उपोषण मागे घेतले.
↧
मानवामुळे जैवविविधता धोक्यात
‘जीवजंतूंच्या साखळीने पर्यावरणाचे संतुलन अबाधित असते. जीवसृष्टी ही एकमेकांवर आधारीत अशी सिस्टीम आहे. त्यामुळे या साखळीतील एकाचा ऱ्हास झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होऊ शकतो. मानवी हस्तक्षेप हे ऱ्हासाचे कारण दिसून येत आहे.
↧
↧
शेतमालांच्या किमती ठरवाव्यात
देशात केंद्रीय कृषिमूल्य आयोग यापूर्वीच स्थापन केला आहे. भारत खंडप्राय देश असल्याने राज्याराज्यांतील पाऊस, हवामान वेगवेगळे असल्याने शेतीची पद्धतही भिन्न आहे. याचा विचार करून स्वामिनाथन समितीने प्रत्येक राज्याने कृषिमूल्य आयोग स्थापन करावा अशी शिफारस केली होती. त्याला अनुसरून राज्य कृषिमूल्य आयोगाची स्थापना केली आहे.
↧
धूम स्टाइलने २ किलो सोने लंपास
धूम स्टाईलने मोटरसायकलवरून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास करण्याच्या जिल्ह्यात १२१ घटना घडल्या असून तब्बल दोन किलो सोने लंपास झाले आहे. या सोन्याच्या दागिन्यांची किंमत तब्बल ६२ लाख ५० हजार इतकी भरते.
↧
महामंडळावर नियुक्तीसाठी नेते सक्रिय
चार राज्यात झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रसेला जाग आली आहे. त्यामुळे कार्यकर्ते व नाराज नेत्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी पक्ष अचानक सक्रिय झाला आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या वाट्याला आलेल्या महामंडळावरील पदाधिकारी तातडीने भरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
↧
More Pages to Explore .....