राष्ट्रीय पर्यटन दिन विशेष ... लोगो
Sachin.patil1@timesgroup.com
Tweet@sachinpMT
विपुल निसर्गसंपदा असलेला जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. दरवर्षी चाळीस ते पन्नास लाख पर्यटक कोल्हापूरला आवर्जून भेट देतात. मात्र जिल्ह्याच्या पर्यटनवाढीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या केवळ दोन कर्मचाऱ्यांवरच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा भार आहे. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने जिल्ह्याच्या पर्यटनाला 'खो' बसत आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे शहरातील दोन ठिकाणी असलेल्या माहिती व आरक्षण केंद्रापैकी एक केंद्र वारंवार बंद ठेवावे लागते. अधिकारी व कर्मचारी संख्या वाढवून पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
कोल्हापूरला ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा आहे. त्यामुळे जिल्ह्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थिती लावतात. ऐतिहासिक पुरातत्वीय महत्त्व असणाऱ्या जिल्ह्याच्या पर्यटनाची माहिती पर्यटकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर असते. मात्र पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय शहरात नसल्याने केवळ दोन कर्मचाऱ्यांच्यावर कार्यालयाच्यावतीने पर्यटनवाढीचे काम केले जाते. यामध्ये अंबाबाई मंदिराजवळ दक्षिण दरवाजाजवळ व जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील उद्योग भवन येथे माहिती व आरक्षण केंद्र उपलब्ध आहे. तसेच या कर्मचाऱ्यारवर सांगली जिल्ह्याचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे बऱ्याचदा उद्योग भवनातील कार्यालय बंद अवस्थेत असल्याचे आढळते
शहरासह सांगली जिल्ह्यातील पर्यटनाची जबाबदारी केवळ दोन कर्मचाऱ्यांवर आहे. एमटीडीसीकडून सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक नसल्याने जिल्ह्यातील सरकारच्या ताब्यातील असलेल्या प्रॉपर्टीविषयक न्यायालयीन कामकाजासाठी तसेच कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळ, वनखाते तसेच इतर तत्सम बैठकींसाठी एका कर्मचाऱ्याला उपस्थित राहावे लागते. साधारणत: महिन्यातून सात ते आठ वेळा पर्यटनविषयक बैठका होत असतात. त्यामुळे सातत्याने एक कर्मचारी या कामात व्यस्त राहतो. रोज हजारोंच्या संख्येने भाविक अंबाबाई च्या दर्शनाला येतात. त्यांना जिल्ह्यातील पर्यटन स्थळांविषयी तसेच प्रवास नियोजनाबाबत माहिती पुरवावी लागते. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे एका कार्यालयाला कायमचे कुलूप लागण्याची शक्यता आहे.
...
चौकट
प्रादेशिक कार्यालय सुरू करावे
जिल्ह्यातील वाढते पर्यटक पाहता एमटीडीसीचे प्रादेशिक कार्यालय पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यालय पूर्ववत करू असे आश्वासन दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. सध्या सरकारी पातळीवर त्याबाबत कोणतीही हालचाल होत नाही.
...
कोट
'एमटीडीसीचे विभागीय कार्यालय कोल्हापुरात सुरु झाल्यास शहराला कोकण, कर्नाटक, गोवा या भागाशी जोडण्यास मदत होईल. कोल्हापूरची पर्यटनवाढीतील वृद्धी लक्षात घेता सक्षम अधिकारी नेमून सरकारी पातळीवर त्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. याकरिता मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.
सिद्धार्थ लाटकर, सचिव, हॉटेल मालक संघ
.....
(मूळ कॉपी)
पर्यटनाचा भार केवळ २ कर्मचाऱ्यांवर
Sachin.patil1@timesgroup.com
Tweet@sachinpMT
विपुल निसर्गसंपदा असलेला जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. दरवर्षी चाळीस ते पन्नास लाख पर्यटक कोल्हापूरला आवर्जून भेट देतात. जिल्ह्याच्या पर्यटन वाढीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दोन कर्मचाऱ्यांवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा भार आहे. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने जिल्ह्याच्या पर्यटनाला 'खो' बसत आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे शहरातील दोन ठिकाणी असलेल्या माहिती व आरक्षण केंद्रापैकी एक केंद्र वारंवार बंद ठेवावे लागते. अधिकारी व कर्मचारी संख्या वाढवून पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्याची मागणी नागरीकातून होत आहे.
कोल्हापूरला ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा आहे. त्यामुळे जिल्ह्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस होत आहे. शहरातील अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थिती दर्शवतात. ऐतिहासिक पुरातत्वीय महत्त्व असणाऱ्या जिल्ह्याच्या पर्यटनाची माहिती पर्यटकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर असते. मात्र पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय शहरात नसल्याने केवळ २ कर्मचाऱ्यांच्यावर कार्यालयाच्यावतीने पर्यटनवाढीचे काम केले जाते. यामध्ये अंबाबाई मंदिराजवळ दक्षिण दरवाजापाशी असलेल्या व जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील उद्योग भवन येते माहिती व आरक्षण केंद्र उपलब्ध आहे. तसेच या कर्मचाऱ्यारवर सांगली जिल्ह्याचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे बऱ्याचदा उद्योग भवनातील कार्यालय बंद अवस्थेत असल्याचे आढळते
कर्मचारी संख्या वाढवण्याची गरज
शहरासह सांगली जिल्ह्यातील पर्यटनाची जबाबदारी दोन कर्मचाऱ्यांवर आहे. एमटीडीसीकडून सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक नसल्याने जिल्ह्यातील सरकारच्या ताब्यातील असलेल्या प्रॉपर्टी विषयक न्यायालयीन कामकाजासाठी तसेच कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळ, वनखाते तसेच इतर तत्सम बैठकींसाठी एका कर्मचाऱ्याला उपस्थित राहावे लागते. साधारणत: महिन्यातून सात ते आठ वेळा पर्यटनविषयक बैठका होत असतात. त्यामुळे सातत्याने एक कर्मचारी या कामात व्यस्त राहतो. रोज हजारोंच्या संख्येने भाविक अंबाबाई च्या दर्शनाला येतात. त्यांना जिल्ह्यातील पर्यटन स्थळाविषयी तसेच प्रवास नियोजनाबाबत माहिती पुरवावी लागते. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे एका कार्यालयाला कायमचा लॉक लागण्याची शक्यता उद्भवली आहे.
प्रादेशिक कार्यालय सुरू करावे
जिल्ह्यातील वाढते पर्यटक पाहता एमटीडीसीचे प्रादेशिक कार्यालय पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यालय पूर्ववत करू असे आश्वासन दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. सध्या सरकारी पातळीवर त्याबाबत कोणतीही हालचाल होत नाही. पर्यटन विकास महामंडळाने कोल्हापूरकडे पाहण्याचा संकुचित दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.
कोट:::
एमटीडीसीचे विभागीय कार्यालय कोल्हापुरात सुरु झाल्यास शहराला कोकण, कर्नाटक, गोवा या भागाशी जोडण्यास मदत होईल. कोल्हापूरची पर्यटनवाढीतील वृद्धी लक्षात घेता सक्षम अधिकारी नेमून सरकारी पातळीवर त्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. याकरिता मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.
सिद्धार्थ लाटकर, सचिव, हॉटेल मालक संघ
कोट व इतर एक फोटो: अर्जुन टाकळकर