Tweet:@satishgMT
कोल्हापूर : लोकसभा आणि विधानसभा नजरेसमोर ठेऊन जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी रविंद्र आपटे यांची निवड झाली. आपटे यांच्यासमोर संघाचा रोजचा २५ लाख रुपयांचा तोटा भरून काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे. 'अमूल'सह अन्य ब्रँडेड दूध कंपन्यांबरोबर स्पर्धा करताना मल्टिस्टेट ठरावावेळी दूध उत्पादकांत पसरलेली नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याविरोधात १२ संचालकांनी केलेले बंड शमवण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांनी पाटील यांचा राजीनामा घ्यावा लागला. राजीनाम्यानंतर आपटे यांच्यासह अरुण डोंगळे, रणजित पाटील, धैर्यशिल देसाई, पी. डी. धुंदरे यांची नावे चर्चेत होती. लोकसभा, विधानसभा आणि पुढील वर्षी गोकुळच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ज्येष्ठ संचालकांना संधीचा निर्णय नेत्यांनी घेतला. आपटे यांचे कार्यक्षेत्र आजरा, उत्तूर परिसरात आहे. उत्तूर हा जिल्हा परिषद मतदारसंघ कागल विधानसभा निवडणूक क्षेत्रात येतो. खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला आमदार हसन मुश्रीफ यांनी विरोध केला आहे. कागलच्या निवडणुकीत विजय आणि पराभवात फक्त अडीच हजार ते साडेचार हजार मतांचे अंतर असते. मुश्रीफ यांनी जर विरोध केला तर त्यांना विधानसभा निवडणूकीत उत्तूरमधून शह देण्यासाठी आपटे यांच्या मतांचा उपयोग होऊ शकतो अशी शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची चर्चा आहे. आपटे यांना दिलेल्या संधीमुळे गडहिंग्लज, चंदगड, आजरा भागाला प्रतिनिधीत्व दिल्याचा संदेश गेला आहे. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत महाडिक गटाला होण्याची शक्यता आहे.
अरुण डोंगळे यांनी राधानगरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांना पी. एन. पाटील यांचा सुप्त विरोध आहे. त्यांना अध्यक्षपदाची संधी दिली आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले तर गोकुळकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. मल्टिस्टेटच्या ठरावाच्यावेळी डोंगळे यांनी जनमानसाचा विरोध कसा आहे, अशी स्पष्ट भूमिका मांडल्याने नेत्यांनी त्यांच्या नावावर फुली मारली. रणजितसिंह व त्यांचे बंधू प्रविणसिंह पाटील यांच्यात फाटाफूट झाल्याने त्यांची ताकद कमी झाल्याने त्यांचे नाव पहिल्याच टप्प्यातच बाहेर पडले. धैर्यशिल देसाई यांना दोन्ही नेत्यांची संमती होती. पण जेष्ठत्याचा मुद्दा आल्याने देसाई यांचे नाव अखेरच्या क्षणी मागे पडले. विश्वास पाटील हे पीएन गटाचे असल्याने पुन्हा त्यांनाच संधी देता येत नसल्याने धुंदरे यांच्या नावाचा विचार झाला नाही.
एकीकडे निवडणुकीचे राजकारण नेत्यांनी सांभाळले असले तरी अतिरिक्त गायीच्या दुधामुळे गोकुळला तीन वर्षात १८० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादकांना फटका बसू नये म्हणून गोकुळच्यावतीने गायीचे दूध स्वीकारले जाते. त्यामुळे दिवसाला २४ ते २५ लाखांचा तोटा होत आहे. गायीच्या दुधापासून तयार केलेल्या पदार्थांना राज्य सरकारने पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. पण त्यासाठी राज्य सरकारने कॅशलेसची अट घातली आहे. फक्त ३० टक्के ग्राहकांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होत असल्याने कॅशलेसचे काम रखडले आहे. त्यामुळे गोकुळचे १२ कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे. प्रत्येक दूध उत्पादकाच्या खात्यावर रक्कम जमा झाली तर प्रतिदिवशी गोकुळचा तोटा १५ लाख रुपयांनी कमी होऊ शकतो. गोकुळपुढील आव्हाने पार करण्यासाठी आपटे यांना संधी दिली आहे. बीएस्सी अॅग्रीकल्चरची पदवी असलेल्या आपटे यांचा मार्केटिंगमध्ये हातखंडा आहे. तसेच मल्टिस्टेटची मान्यता केंद्राकडून मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. अमूलशी स्पर्धा आणि मल्टिस्टेटमुळे दूध संस्था आणि उत्पादकांमध्ये संचालक व नेते मंडळींच्याविरोधात झालेली नकारात्मक कमी करण्याचे आव्हान आपटे यांच्यापुढे असणार आहे.
००००
(मूळ कॉपी)
निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन आपटेंना संधी
Satish.ghagtage@timesgroup.com
Tweet:satishgMT
लोकसभा आणि विधानसभा डोळयासमोर ठेऊन जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्षपदी रविंद्र आपटे यांची निवड करण्यात आली आहे. आपटे यांना राजकारणाबरोबर रोजचा २५ लाख रुपयांचा तोटा भरुन काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे. अमूलसह अन्य ब्रँडेड दूध कंपन्याबरोबर स्पर्धा करताना मल्टिस्टेट ठरावाच्यावेळी दूध उत्पादकांत पसरलेली नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याविरोधात १२ संचालकांनी केलेले बंड शमवण्यासाठी 'डिझास्टर मॅनेजमेंट' राबवताना माजी आमदार महादेवराव महाडिक, पी.एन. पाटील यांनी त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला. राजीनाम्यानंतर रविंद्र आपटे, अरुण डोंगळे, रणजित पाटील, धैर्यशिल देसाई, पी.डी. धुंदरे यांची नावे चर्चेत होती. लोकसभा, विधानसभा आणि पुढील पाच वर्षांनी गोकुळच्या निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी ज्येष्ठ संचालकाला संधी देण्याचा निर्णय नेते मंडळींनी घेतला. आपटे यांचे कार्यक्षेत्र आजरा, उत्तूर परिसरात आहे. उत्तूर हा जिल्हा परिषद मतदार संघ कागल विधानसभा निवडणूक क्षेत्रात येतो. खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला आमदार हसन मुश्रीफ यांनी विरोध केला आहे. कागलच्या निवडणूकीत विजय आणि पराभवात फक्त अडीच ते साडेचार मतांचे अंतर असते. मुश्रीफ यांनी जर विरोध केला तर त्यांना विधानसभा निवडणूकीत उत्तूरमधून शह देण्यासाठी आपटे यांच्या मताचा उपयोग होऊ शकतो अशी शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची चर्चा आहे. आपटे यांना दिलेली संधीमुळे गडहिंग्लज, चंदगड, आजरा भागाला प्रतिनिधीत्व दिल्याचा संदेश गेला आहे. त्याचा फायदा लोकसभा निवडणूकीत महाडिक गटाला होण्याची शक्यता आहे.
अरुण डोंगळेंनी राधानगरी मतदार संघातून निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. डोंगळे यांना पीएन यांचा सुप्त विरोध आहे. तसेच त्यांना अध्यक्षपदाची संधी दिली आणि विधानसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरले तर गोकुळकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. मल्टिस्टेटच्या ठरावाच्यावेळी डोंगळे यांनी जनमानसाचा विरोध कसा आहे, अशी स्पष्ट भूमिका मांडल्याने नेते मंडळींनी त्यांच्या नावावर फुली मारली आहे. रणजितसिंह पाटील व त्यांचे बंधू प्रविणसिंह पाटील यांच्यात फाटाफूट झाल्याने त्यांची ताकद कमी झाल्याने त्यांचे नाव पहिल्याच टप्प्यातच बाहेर पडले. धैर्यशिल देसाई यांना दोन्ही नेत्यांची संमती होती. पण जेष्ठत्याचा मुद्दा आल्याने देसाई यांचे नाव अखेरच्याक्षणी मागे पडले. विश्वास पाटील हे पीएन गटाचे असल्याने पुन्हा पीएन गटाला संधी देता येत नसल्याने धुंदरे यांच्या नावावर विचार झाला नाही.
एकीकडे निवडणूकीचे राजकारण नेते मंडळींना सांभाळले असले तरी अतिरिक्त गायीच्या दुधामुळे गोकुळला तीन वर्षात १८० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादकांना फटका बसू नये म्हणून गोकुळच्यावतीने गायीचे दूध स्वीकारले जाते. त्यामुळे दिवसाला २४ ते २५ लाखाचा तोटा होत आहे. गायीच्या दूधापासून तयार केलेल्या पदार्थांना राज्य सरकारने पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. पण त्यासाठी राज्य सरकारने कॅशलेसची अट घातली आहे. फक्त ३० टक्के ग्राहकांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होत असल्याने कॅशलेसचे काम रखडले आहे. त्यामुळे गोकुळचे १२ कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे. प्रत्येक दूध उत्पादकाच्या खात्यावर रक्कम जमा झाली तर प्रतिदिवशी गोकुळचा तोटा १५ लाख रुपयांनी कमी होऊ शकतो. गोकुळपुढील आव्हाने पार करण्यासाठी आपटे यांना संधी दिली आहे. बीएस्सी अॅग्रीकल्चरची पदवी असलेल्या आपटे यांचा मार्केटिंगमध्ये मोठा हातखंडा आहे. तसेच मल्टिस्टेटची मान्यता केंद्राकडून मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. अमूलशी स्पर्धा आणि मल्टिस्टेटमुळे दूध संस्था आणि उत्पादकांमध्ये संचालक व नेते मंडळींच्याविरोधात झालेली नकारात्मक कमी करण्याचे आव्हान आपटे यांच्यापुढे असणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट