कोल्हापूर टाइम्स टीम
दिवाळी सणाच्या पूर्वतयारीसाठी घरोघरी धांदल सुरू झाली आहे. बाजारपेठेत व्यापारी, दुकानदारांनी स्टॉल्स सजवले आहेत. सणासुदीच्या काळात अन्नधान्याची मोठी खरेदी होते. या काळात भेसळीच्या प्रकारांनाही जोर चढतो. अन्नधान्यांत भेसळ करून बक्कळ कमाई केली जाते. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दुकाने, गोडाऊन्स, खाद्यपदार्थ तयार करणारी ठिकाणे, अन्नधान्य विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी सुरू आहे. पण, या विभागाची यंत्रणा तोकडी असल्याने भेसळीचे पदार्थ ग्राहकांच्या माथी मारले जातात. त्यासाठी ग्राहकांना सजग रहावे लागणार आहे.
दर्जेदार धान्य, डाळी न वापरता कमी दर्जाचे, सडक्या वस्तू वापरुन रवा, आटा, मैदा, बेसन तयार केल्याचा संशय आल्यास ग्राहकांना तक्रार करता येते. पॅकिंगवर कंपनीचे नाव, तारीख नसणे, खाद्यतेल, तूप, पनीर, मलई, खवा, तयार फराळ, मिठायांसह किराणा मालाबाबत संशय आल्यास तक्रार करता येते. जिथे अन्नपदार्थ तयार केले जातात, साठवणूक अथवा विक्री केली जाते अशी ठिकाणी भेसळ होत असल्याची तक्रार करता येते.
इथे करा तक्रार
ग्राहकाला तक्रार निनावी अथवा लेखी करता येते. कोल्हापुरातील सुभाष रोडवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात जाऊन लेखी अथवा तोंडी तक्रार करता येते. तसेच सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, रघुकूल बिल्डिंग, सुभाष रोड या पत्त्यावर पत्र पाठवूनही तक्रार करता येते. कार्यालयातील ०२३१-२६४०५७३ आणि २६४१०९१ या टेलिफोन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत तुम्ही तक्रार नोंदवू शकता. ग्राहकाला ऑनलाइन fdakolhapur@gmail.com या इमेलवर तक्रार देता येते. तक्रारदाराची इच्छा असल्यास नाव गुप्त ठेवले जाते.
अशी होते तपासणी
ग्राहकांच्या तक्रारींनंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मालाची तपासणी करणे बंधनकारक आहे. वस्तूंचे उत्पादन, विक्री होत असेल तर संबंधित पदार्थाचे, वस्तूचे नमुने घेतले जातात. हे नमुने पुणे येथील सरकारी प्रयोगशाळा अथवा वाय. पी. पोवार नगरातील प्रयोगशाळेत पाठवले जातात. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कारवाई केली जाते.
कारवाईचे स्वरुप
कमी मानांकनाचे पदार्थ वापरून त्याची दर्जेदार पदार्थ म्हणून विक्री करणाऱ्या दुकानदार, व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. जर पदार्थांमध्ये हानीकारक घटक असतील तर थेट पुण्यातील कोर्टात खटले दाखल केले जातात.
जर भेसळीबद्दल संशय आल्यास ग्राहक, नागरीक लेखी, तोंडी अथवा ऑनलाइन तक्रार करू शकतात. त्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेतली जाईल. दिवाळी सणाच्या काळात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने अन्न औषधे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. भेसळ ओळखण्यासाठी त्या-त्या पदार्थांची प्रयोगशाळेत तपासणी आवश्यक आहे. ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- मोहन केंबळकर, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग
सहा महिन्यांतील कारवाया (१ एप्रिल ते ३० सप्टेंबरअखेर)
- सहा महिन्यांत एकूण २३ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करून सात जणांवर खटले दाखल करण्यात आला आहे.
- १४५ नमुने घेऊन ३२ व्यापाऱ्यांवर कमी मानांकनाचे साहित्य वापरल्याबद्दल कारवाई करण्यात आली. अन्नपदार्थांमध्ये शरीराला अपायकारक पदार्थ वापरल्याबद्दल नऊ जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.
- पुण्यात दाखल करण्यात आलेल्या खटल्यांमध्ये २३ व्यापाऱ्यांना एक लाख ३९ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
- १६ ठिकाणी कारवायांत अधिकाऱ्यांनी जाग्यावरच एक लाख २५ हजार रुपये दंड वसूल केला.
- दोन ठिकाणी धाडी टाकून चार लाखांचा माल जप्त केला. त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत.
- उघड्यावर पदार्थ विकणे, अस्वच्छ जागेवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांकडून १ लाख १७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
०००००
000
(मूळ कॉपी)
अन्न धान्यात भेसळीबद्दल अशी करा तक्रार
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
दिवाळी सण साजरा करण्यासाठी सर्वत्र धामधूम सुरु आहे. बाजारपेठेत व्यापारी, दुकानदार, विक्रेते ग्राहकांची प्रतिक्षा करत आहेत. अन्न धान्याची मोठी खरेदी विक्री होणार असल्याने काही व्यापारी अन्न धान्यात भेसळ करुन बक्कळ कमाई करतात. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दुकाने, गोडाऊन, खाद्य पदार्थ तयार करणारी ठिकाणे, अन्न धान्य विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी सुरु आहे. पण या विभागाची यंत्रणा तोकडी असल्याने भेसळीची पदार्थ ग्राहकांच्या माथ्यावर मारले जातात. त्यासाठी ग्राहकांना सजग रहावे लागणार आहे. अन्न धान्यातील भेसळीबाबत संशय आल्यास तक्रार करता येणे शक्य आहे. अन्न धान्य भेसळीबाबत तक्रार कशी करायची, कारवाईची प्रक्रिया कशी केली जाते, अन्न धान्य विभागाकडून कोणत्या कारवाया झाल्या, याचा 'मटा गाईड' च्या माध्यमातून घेतलेला आढावा
००००
भेसळ असणारे अन्न धान्य पदार्थ
दर्जेदार धान्य, डाळी न वापरता कमी दर्जाचे व सडके अन्नधान्य वापरुन रवा, आटा,मैदान बेसन तयार केल्याचा संशय आल्यास ग्राहकाला तक्रार करता येते. पॅकिंगवर कंपनीचे नाव, पॅकिंगची तारीख नसणे, तसेच खाद्य तेल, तूप, पनीर, मलई, खवा, तयार फराळ, मिठाईसह सर्व अन्न धान्याबाबत संशय आल्यास तक्रार करता येते. जिथे अन्नपदार्थ तयार केले जातात. साठवले जातात, विक्री केली जाते अशी ठिकाणी भेसळ होत असल्याची माहिती नागरिकांना कळाली तर तक्रार करु शकतात.
००००
तक्रारीचे स्वरुप व साधने
ग्राहकाला तक्रार निनावी अथवा लेखी करता येते. ग्राहक सुभाष रोड येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात जाऊन लेखी अथवा तोंडी तक्रार करु शकतात. तसेच सहाय्यक आयुक्त अन्न धान्य औषध प्रशासन, रघुकुल बिल्डिंग, सुभाष रोड या पत्त्यावर पत्र पाठवू शकतात. कार्यालयातील ०२३१,२६४०५७३ आणि ०२३१,२६४१०९१ या टेलिफोन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत तक्रार नोंदवू शकतात. ग्राहकाला ऑनलाईनवर fdakolhapur@gmail.com वर तक्रार देता येते. तक्रारदाराची इच्छा असल्यास नाव गुप्त ठेवले जाते.
०००००
अशी होते अन्न तपासणी
तक्रारीनंतर अन्न सुरक्षा अधिकारी घटनास्थळी जातात. तिथे अन्नधान्याचे नमुने घेतले जातात. हे नमुने पुणे येथील सरकारी प्रयोगशाळा अथवा वाय.पी. पोवार नगर येथील प्रयोगशाळेत पाठवले जातात. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कारवाई केली जाते.
००००
कारवाईचे स्वरुप
कमी मानांकनाचे पदार्थ वापरुन दर्जेदार पदार्थ म्हणून विक्री करणाऱ्या दुकानदार, व्यापारी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. जर पदार्थात हानीकारक पदार्थ असतील तर थेट पुण्यातील कोर्टात खटले दाखल केले जातात.
०००००
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाई अशा
(१ एप्रिल ते ३० सप्टेंबर पर्यंत)
१४५ नमुने घेऊन ३२ व्यापाऱ्यांवर कमी मानांकनाचे साहित्य वापरल्याबद्दल कारवाई करण्यात आली तर नऊ जणांवर शरीराला अपायकारक पदार्थ वापरल्याबद्दल खटले दाखल करण्यात आले आहेत.
०००००
पुण्यात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात २३ व्यापाऱ्यांना एक लाख ३९ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
०००००
१६ ठिकाणी झालेल्या कारवाईत अधिकाऱ्यांनी जागेवरच एक लाख २५ हजार रुपये दंड वसूल केला.
००००
दोन ठिकाणी धाडी टाकून चार लाखाचा माल जप्त केला. त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले.
००००
उघड्यावर पदार्थ विकणे, अस्वच्छतेबद्दल खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांकडून एक लाख १७ हजार रुपये दंड वसूल.
००००
सहा महिन्यात २३ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त. सात जणांवर खटले दाखल.
०००००
भेसळ ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत तपासणी आवश्यक आहे. जर भेसळीबद्दल संशय आल्यास ते लेखी, तोंडी, अथवा ऑनलाईनद्वारे तक्रार करु शकतात. त्यांच्या तक्रारीची ताबडतोब दखल घेतली जाईल. दिवाळी सणात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने अन्न औषधे सुरक्षा रक्षक तपासणी करत आहेत.
मोहन केंबळकर, सहाय्यक आयुक्त, अन्न, औषध प्रशासन विभाग