म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला. मात्र, संबंधीत गावांना मदत मिळू नये अशा प्रकारच्या जाचक अटी लावल्या आहेत. शब्दांचा खेळ करून शेतकऱ्यांनी दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे सरकारविरोधात पहिल्या टप्यात २ नोव्हेंबरला राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर किसान सभेतर्फे निदर्शने केली जातील,' अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. अजित नवले म्हणाले, 'किसान सभेचे दोन दिवसांची राज्यस्तरीय कार्यशाळा येथे झाली. त्यात पुढील काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणती भूमिका घ्यायची यावर सविस्तर चर्चा झाली. केद्र सरकारच्या निकषांआडून राज्य सरकार दुष्काळप्रश्नी उपाययोजना करण्यात दिरंगाई करीत आहे याकडे सरकारचे लक्ष वेधण्यात येईल. हमीभावासाठी बाजार समितीत घुसून यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजनेचा मोठा गाजावाजा केला. जाहिरातबाजी केली. मात्र, योजना फसवी निघाली. ठेकेदार, जेसीबीसह इतर यंत्रधारकांना पोसण्यासाठी ही योजना राबवल्याचे पुढे आले आहे. पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांची वाट लावली गेली. कोट्यवधी रुपये वाया घालवले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, हमीभाव द्यावा या मागणीसाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी १५ नोव्हेंबरला मुंबईत व्यापक शेतकरी परिषद होईल. त्यास भाजपवगळता सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण दिले जाईल. सत्तेत आल्यानंतर शेती, शेतकऱ्यांविषयी भूमिका काय राहणार अशी विचारणा त्यांना करण्यात येईल. परिषदेत २८ ते ३० नोव्हेंबरला देशाच्या तिन्ही बाजुने दिल्लीपर्यंत निघणाऱ्या शेतकरी लाँग मार्चची तयारी केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी देशभरातील १८० शेतकरी संघटना मार्चचे नेतृत्व करणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत.'
यावेळी उदय नारकर, सुनील मालुसरे, व्ही. बी. पाटील आदी उपस्थित होते.
भांडणे लावण्याचा उद्योग
'ऊस उत्पादक, साखर उद्योगासंबंधी चांगले धोरणात्मक निर्णय घेण्याची मुख्य जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. हे टाळून ते कोडोली येथे होणाऱ्या ऊस परिषदेस उपस्थित राहून शेतकरी आणि संघटनांत भांडणे लावण्याचा उद्योग करीत आहेत,' असा आरोप डॉ. अजित नवले यांनी यावेळी केला.
०००
(मूळ कॉपी)
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केले. मात्र संबंधीत गावांना मदत मिळू नये, अशा प्रकारच्या जाचक अटी लावल्या आहेत. शब्दांचा खेळ करून शेतकऱ्यांनी दिशाभूल केली जात आहे. यामुळे सरकार विरोधात पहिल्या टप्यात २ नोव्हेंबरला राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभेतर्फे निदर्शने आंदोलन केले जाईल, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, किसान सभेचे दोन दिवसाचे येथे राज्यस्तरीय कार्यशाळा झाली. त्यात पुढील काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणती भूमिका घ्यायची, यावर सविस्तर चर्चा झाली. केद्र सरकारच्या निकषाआडून राज्य सरकार दुष्काळप्रश्नी उपाय योजना करण्यास दिरंगाई करीत आहे. याकडे पहिल्या टप्यात सरकारचे लक्ष वेधण्यात येईल. हमीभावासाठी बाजार समितीत घुसून यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजनेचा मोठा गाजावाजा केला. जाहिरातबाजी केली. मात्र योजना फसवी निघाली. ठेकेदार, जेसीबी व इतर यंत्रधारकांना पोसण्यासाठी ही योजना राबवल्याचे पुढे आले आहे. पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांची वाट लावली. कोट्यांवधी रूपये वाया घालवले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, हमी भाव द्यावा, या मागणीसाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी १५ नोव्हेंबरला मुंबईत व्यापक शेतकरी परिषद होईल. त्यास भाजप वगळता सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण दिले जाईल. सत्तेत आल्यानंतर शेती, शेतकऱ्यांविषयी भूमिका काय राहणार, अशी विचारणा त्यांना करण्यात येईल. परिषदेत २८ ते ३० नोव्हेंबरला देशाच्या तीन बाजूंनी दिल्लीपर्यंत निघणाऱ्या शेतकरी लाँग मार्चची तयारी केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी देशभरातील १८० शेतकरी संघटना मार्चचे नेतृत्व करणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत.
------------
चौकट
भांडणे लावण्याचा उद्योग
ऊस उत्पादक, साखर उद्योगासंबंधी चांगले धोरणात्मक निर्णय घेण्याची मुख्य जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. हे टाळून ते कोडोली येथे होणाऱ्या ऊस परिषदेस उपस्थित राहत शेतकरी आणि संघटनांत भांडणे लावण्याचा उद्योग करीत आहेत, असा आरोप डॉ. नवले यांनी केला.
----------------