लीड ... आहे
साखर पोती फोटो
...........
लोगो
.............
गोड साखरेची कडू कहाणी - १
...........
विभागात ५०६ कोटींची एफआरपी थकीत
खरीप हंगामावर परिणाम, व्याज सवलतीपासून अनेक शेतकरी वंचित
Maruti.Patil
@timesgroup.com
tweet: @MarutipatilMT
कोल्हापूर
ऊसदरावरुन सुरुवातीस पेटलेल्या संघर्षानंतर यावर्षीच्या गळीत हंगामाची अखेर सांगता झाली. विभागातील ३७ कारखान्यांनी गळीत हंगाम पूर्ण केला. कारखाने सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसांत ऊस उत्पादकांना वेळत एफआरपी रक्कम देण्यात आली. पण त्यानंतर साखर उद्योगावर निर्माण झालेल्या संकाटामुळे एफआरपी थकीत जाण्यास सुरुवात झाली. हंगाम संपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना अद्याप उत्पादकांना संपूर्ण एफआरपी मिळालेली नसून १५ मे अखेर कोल्हापूर विभागात ५०६ कोटी १२ लाख रुपयांची एफआरपी थकीत आहे. कारखान्यांकडे रक्कम थकीत असल्यामुळे त्याचा परिणाम खरीप हंगामावर होऊ लागला आहे.
बाजारपेठेत साखरेला असलेला चांगला दर आणि केंद्र सरकारने एफआरपीमध्ये केलेल्या वाढीमुळे यावर्षीचा गळीत हंगाम ऊस उत्पादकांना चांगला फायदेशीर ठरेल असा अंदाज वर्तवला जात होता. तरीही हंगामापूर्वीच ऊसदरावरुन संघर्षाची ठिणगी पेटली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर एफआरपी अधिक २०० रुपये दोन टप्प्यात देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पहिल्या पंधरवड्यामध्ये उत्पादकांना ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार कारखान्यांकडून एफआरपी मिळाली. पण त्यानंतर साखरेच्या दरात घसरण होत गेल्यानंतर उत्पादकांना एफआरपी वेळेत मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या, त्या हंगाम संपला तरी कायम आहेत.
ठरल्याप्रमाणे एफआरपी देण्यास साखर कारखाने बांधिल असल्याचे कारखानदारांकडून हंगामाच्या मध्यावर स्पष्ट केले, तरी हंगामाच्या मध्यावरच तोडग्यातील एफआरपीमध्ये ५०० रुपये कमी केले. कारखानदारांच्या एकतर्फी निर्णयाविरोधात उत्पादक व शेतकरी संघटनांनी प्रादेशिक साखर सहसंचालक व साखर आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली. तक्रारींची दखल घेत कारखान्यांवर कारवाईही करण्यात आली. पण तरीही हंगाम संपून दोन महिने झाले असताना अद्याप उत्पादकांना संपूर्ण एफआरपी मिळालेली नाही.
विभागातील ३९ कारखान्यापैकी ३७ कारखान्यांनी गळीतास सुरुवात केली होती. त्यामध्ये २७ सहकारी व दहा खासगी कारखान्यांचा समावेश होता. या सर्व कारखान्यांनी एप्रिलअखेर १२.४५ सरासरी उताऱ्यांसह दोन कोटी १४ लाख मेट्रिक टनाचे गाळप केले. गाळप झालेल्या उसापोटी उत्पादकांना विभागातील कारखान्यांनी पाच हजार ३८० कोटीची एफआरपी दिली असून अद्याप साखर कारखान्यांकडे ५०६ कोटी १२ लाखांची एफआरपी थकीत आहे.
हंगाम संपून दोन महिन्याचा कालावधी होऊनही पूर्ण एफआरपी मिळालेली नसल्याने उत्पादक अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामातील मशागत, बी-बियाणे, खते खरेदी व पेरणीला सुरुवात झाली असताना बिले मिळालेली नसल्याने उत्पादकांना हात उसणवारीवर आपल्या गरजा भागवाव्या लागत आहे. कारखाने अडचणीत असल्याने उत्पादक शांत असला, तरी यावर त्वरीत उपाययोजना न केल्यास, याचे गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे.
............................
चौकट
आरआरसीतंर्गत कारवाई झालेले कारखाने
शुगर कंट्रोल अॅक्टनुसार ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी न दिलेल्या पाच कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसीतंर्गत करवाई केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती, वारणा, पंचगंगा (रेणुका शुगर्स) तर सांगली जिल्ह्यातील माणगंगा व महाकाली साखर कारखान्यांचा समावेश होता.
..............
चौकट
१५ मेपर्यंत दिलेली एफआरपी
५,३८० कोटी ४६ लाख
विभागाने दिलेली एफआरपी
५०६ कोटी १२ लाख
विभागातील थकीत एफआरपी
..................
कोल्हापूर जिल्हा
३,४५२ कोटी २८ लाख
जिल्ह्यातील उत्पादकांना मिळालेली एफआरपी
२४८ कोटी ८९ लाख
थकीत एफआरपी
................
शंभर टक्के एफआरपी दिलेले कारखाने : १२
५० ते ९९ टक्के एफआरपी : २४
५० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी : १
.............
कोट
'थकीत एफआरपीसाठी कारखान्यांच्या दारात जावून बसल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी लवकरच साखर आयुक्तांची भेट घेणार आहोत. तसेच एकाचवेळी बाजारात येणारी साखर रोखण्यासाठी रिलीज ऑर्डरची अंमलबजावणी केली पाहिजे.
धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुश संघटना