बसव व्याख्यानमाला ... लोगो .................. सिंगल फोटो ........ लिंगायत धर्म हिंदू धर्मापेक्षा वेगळा प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचे प्रतिपादन म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'लिंगायत धर्म हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे. महात्मा बसवेश्वरांनी वेद आणि पुराण म्हणजे थोतांड असे वचन साहित्यात नमूद केले आहे. लिंगायत धर्मात अंधश्रध्देला थारा नाही. हा धर्म विवेकी, बुध्दीवादी आहे. श्रम संस्कृतीला श्रेष्ठत्वाचा दर्जा व विचार-उच्चार-कृतीच्या स्वातंत्र्यावर आधारित हा धर्माचा पाया आहे. सध्याच्या फॅसिझमच्या वातावरणात वचन साहित्यातील क्रांतिकारी विचार बंधूभाव, समानतेवर आधारित समाज निर्मितीसाठी उपयुक्त ठरतील,' असे मत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी व्यक्त केले. कोल्हापूर लिंगायत समाज संस्था व बसव केंद्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बसव व्याख्यानमालेत ते बोलत होते. 'लिंगायत क्रांतिकारी प्रागतीक धर्म' हा व्याख्यानाचा विषय होता. डॉ. सुभाष देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य कुंभार यांनी महात्मा बसवेश्वरांचे वचन साहित्य, शिवानुभव मंटपच्या कार्य पध्दतीचे विश्लेषण केले. प्राचार्य कुंभार म्हणाले, 'महात्मा बसवण्णा व वचन साहित्यांनी विषमता, जातीभेदाला विरोध केला. हिंदू धर्म ज्या गोष्टीवर उभारला होता, त्या गोष्टी नाकारल्या. वेद, पुराण झिडकारले. आर्थिक, सामाजिक, धार्मिक गुलामगिरीतून समाजाला मुक्त केले. माणसाचे माणूसपण नाकारणारी प्रस्थापितांची बलस्थाने वचनांच्या माध्यमातून उध्दवस्त केली. परिस्थिती चळवळीला जन्म देते आणि चळवळीला प्रेरणा लागतात. बसवेश्वर व त्यांच्या अनुयायांचे वचन साहित्य हे चळवळीसाठी प्रेरणादायी आहे. माणसासोबत माणुसकीच्या नात्याने व्यवहार हे वचन साहित्याचे वैशिष्ट्य समानतेच्या पातळीवर पोहचविते. श्रमिकांसाठी देश निर्माण करावयाचे असेल तर बसवेश्वरांच्या विचार कार्यांची अंमलबजावणी गरजेची आहे.' लिंगायत समाज संस्थेचे अध्यक्ष बाबूराव तारळी यांनी प्रास्ताविक केले. चंद्रशेखर बटकडली यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. यश आंबोळे यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर पांगे यांनी आभार मानले. ............... धार्मिक स्वातंत्र्याच्या चळवळीला यश कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुभाष देसाई म्हणाले, 'करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सरकारनियुक्त पगारी पुजारी नेमण्याचा लढा हा एका अर्थाने धार्मिक स्वातंत्र्याची चळवळ होती. पगारी पुजारी नेमण्याच्या कायद्यावर राज्यपालांची सही झाल्याने त्या चळवळीला यश आले. या चळवळीत समाजातील अनेकविध घटक सहभागी झाले. परिवर्तनवादी संस्था, व्यक्ती, डाव्या संघटना आदींचा सहभाग राहिला. गेल्या वर्षी मी कुडलसंगम येथे गेलो होतो. तेथील महात्मा बसवेश्वरांच्या समाधीजवळ बसून पगारी पुजारी नेमणुकीसाठी सुरु केलेल्या चळवळीला बळ मिळू दे, लढाईला ताकद मिळावी अशी प्रार्थना केली होती. अंबाबाई ही स्त्री देवता आहे. यामुळे या देवीची पूजा ही महिलांकडून झाली पाहिजे अशी भूमिका आहे. सरकार नियुक्त पुजाऱ्यांमध्ये ५० टक्के महिला असतील.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट