Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कारभाऱ्यांविरोधात थोपटले दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शालिनी सिनेटानमधील दोन्ही भूखंड आरक्षित करण्याचा प्रस्ताव घाईगडबडीने नामंजूर करणाऱ्या कारभाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दंड थोपटले आहेत. सिनेटोनमधील जागा स्टुडिओसाठीच आरक्षित करावी आणि यापूर्वी नामंजूर केलेला प्रस्ताव रद्द करावा यासाठी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये मंगळवारी पहिल्याच दिवशी २४ नगरसेवकांनी सह्या केल्या आहेत. नगरसेवकांना अंधारात ठेवून परस्पर निर्णय घेणाऱ्या कारभाऱ्यांच्या मनमानी कामकाजाला हा एका अर्थी चाप असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. फेरप्रस्तावासंदर्भात बुधवारी (ता.२७) आयुक्तांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.

शालिनी सिनेटोनमधील भूखंड क्रमांक पाच आणि भूखंड क्रमांक सहाची जागा सिनेटोनसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या जागेच्या वटमुखत्यारांनी त्या अनुषंगाने हमीपत्र दिले आहे. महापालिका प्रशासनाने हे दोन्ही भूखंड स्टुडिओसाठी आरक्षित करण्याचा प्रस्ताव तयार करून महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला होता. मात्र महापालिकेतील काही कारभाऱ्यांनी ही जागा बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालण्याचा खटाटोप सुरू केला आहे. यासाठी कारभाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा सौदा केला. शिवाय सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या प्रस्तावावर कसलीही चर्चा न करता नामंजूर केला.

सिनेटोनसाठी राखीव जागेची विक्री करण्याचा घाट घातल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर नगरसेवकांत कारभाऱ्यांच्या कृत्याविषयी चीड निर्माण झाली आहे. दोन्ही काँग्रेसमधील नगरसेवक सिनेटोनचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी एकवटले. मंगळवारी त्यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत शालिनी सिनेटोनची जागा आरक्षित करण्याचा फेरप्रस्ताव सादर करावा आणि बारा डिसेंबर रोजी कारभाऱ्यांनी नामंजूर केलेला ठराव विखंडीत करावा, यासाठी मोहीम सुरू केली. पहिल्याच दिवशी २४ नगरसेवकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवित सह्या केल्या. सह्यांचे निवेदन महापौर, आयुक्तांना देण्यात येणार आहे. यामध्ये नगरसेवक दिलीप पोवार, भूपाल शेटे, प्रताप जाधव, सुभाष बुचडे, अशोक जाधव, संजय मोहिते, श्रावण फडतारे, संदीप कवाळे यांचा सहभाग आहे. परिवहन समिती सभापती नियाज खान, नगरसेवक राहूल चव्हाण यांच्याही त्यावर सह्या आहेत.



स्टुडिओ वाचविण्यासाठी नगरसेविकाही अग्रभागी

शालिनी सिनेटोनची जागा सिनेटोनसाठी आरक्षित संदर्भात फेरप्रस्ताव सादर करावा, यासाठी सुरू झालेल्या सह्यांच्या मोहिमेत नगरसेविकांचा सहभाग लक्षणीय आहे. नगरसेविका सुरेखा शहा, जयश्री चव्हाण, सूरमंजिरी लाटकर, दीपा मगदूम, माधुरी लाड, मेघा पाटील, शोभा कवाळे, प्रतिज्ञा निल्ले, वृषाली कदम, माधवी गवंडी, उमा बनछोडे, रिना कांबळे, अनुराधा खेडकर, सरिता मोरे आदींच्या सह्या आहेत. जुलै २०१७ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत दोघा नगररसेविकांनी जयप्रभा स्टुडिओ, शालिनी सिनेटोनची उर्वरित जागा सिने निर्मिती व स्टुडिओसाठीच आरक्षित करावा, असा सदस्य ठराव मांडला होता. सभागृहाने हा सदस्य ठराव मंजूर केला होता.

विरोधी आघाडीही स्टुडिओ टिकवण्याच्या बाजूने

विरोधी भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीची भूमिका ही शालिनी​ सिनेटोनची जागा स्टुडिओसाठीच आरक्षित राहावी, अशीच आहे. यासंदर्भात भाजप, ताराराणी आघाडीची भूमिका स्पष्ट असून सिने निर्मितीसाठीच दोन्ही भूखंड आर​क्षित राहावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचे ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी सांगितले. मात्र, महासभेत ठराव आल्यांनंतर याच आघाडीने मौन बाळगणे पसंद केल्याने भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिस्तुलाचा धाक दाखवत जागेच्या वादातून मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महावीर गार्डन परिसरात जागेच्या वादातून पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत निर्मला जवाहरलाल परदेशी (वय ७५, रा. प्लॉट नंबर २५०, ब ५६, महावीर गार्डन समोर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी पियुष विजयसिंह परदेशी (१४), अर्जुनसिंग प्रेमसिंग परदेशी (२८), विजयसिंग बलदेवसिंग परदेशी (४५), ऐश्वर्या विजयसिंग परदेशी (४४) ललिता प्रेमसिंग परदेशी (५०, सर्व रा. साईप्रसाद बंगला, महावीर गार्डनसमोर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निर्मला परदेशी या सून आणि नातवंडांसह महावीर गार्डनसमोर राहतात. त्यांचा मोठा मुलगा दलबिरसिंग हा पुणे येथे, तर लहान मुलगा उदयसिंग दिल्ली येथे नोकरीनिमित्त राहतो. सुटीच्या काळात ते कोल्हापुरातील घरी येतात. निर्मला परदेशी यांच्या घराच्या शेजारीच दीर बलदेवसिंग हिरालाल परदेशी राहतात. या दोघांमध्ये १० हजार, ८०० स्क्वेअर फुटांचा प्लॉट आहे. यातील ५ हजार, ४०० स्क्वेअर फुटाचा प्लॉट निर्मला यांच्या नावावर आहे. प्लॉटच्या वाटणीवरून दोन्ही कुटुंबात वाद सुरू आहे. शनिवारी (ता. २३) निर्मला यांची दोन्ही मुले घरी आले होते.

रविवारी रात्री अकराच्या सुमारास दोन्ही मुले परत निघाले होते. घरासमोर लावलेल्या कारचे निमित्त करून पुतण्या विजयसिंह याने दारुच्या नशेत मुलांशी वाद घातला. यावेळी त्याने मारहाणही केली. वाद सुरू असतानाच पियुष परदेशी हा घरातून पिस्तूल घेऊन आला. त्याने पिस्तुलाचा धाक दाखवत दलबिरसिंग आणि उदयसिंग या दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी ऐश्वर्या, ललिता आणि अर्जुनसिंग यांनीही निर्मला परदेशी यांच्या कुटुंबाला शिवीगाळ केली. निर्मला यांनी याबाबत सोमवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी तीन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधीअभावी अडले विकासाचे घोडे

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत पाच दशकांहून अधिक काळ असलेल्या काँग्रेसच्या सत्तेला सुरूंग लावत सरत्या वर्षात भाजपने सत्ता मिळवली. मात्र निधीअभावी तिजोरीत ठणठणाट, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेत उभी फुट, लाच घेताना रंगेहाथ पकडल्याचे पाच प्रकार, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बदल्यांनी गाजलेले राजकारण, गुरूजींच्या वादग्र्रस्त बदल्या, झिरो पेंडन्सी अशा अनेक घटनांनी हे वर्ष गाजले. निधी नसल्याने कामे कशी करायची असा प्रश्न पडला.

२०१७ च्या फेब्रुवारी महिन्यात जि.प. आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांची पंचवार्षिक निवडणूक झाली. पहिल्यांदाच गावपातळीवर भाजपने शिरकाव करीत मोर्चेबांधणी केली. केंद्र, राज्यात सत्ता असल्याने पूर्ण ताकदीनीशी भाजप उतरल्याने मोठी चुरस निर्माण झाली. त्यामुळे पंचायत समितीमध्ये भाजपचा चंचूप्रवेश झाला. मार्चमध्ये बेरजेचे राजकारण करीत जि. प.वर भाजपने सत्ता मिळवली. परिणामी तब्बल ५५ वर्षांची सत्ता काँग्रेसला गमवावी लागली.

अध्यक्षपदाची निवडणूक‌ गाजली

जिल्हा परिषदेच्या एकूण ६७ पैकी भाजपने काँग्रेस इतक्याच १४ जागा मिळवल्या. मात्र जनसुराज्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आवाडे गट, अपक्ष, युवक क्रांती आघाडी, ताराराणी आघाडी, शिवसेना (दहा पैकी सात) यांच्या मदतीने भाजपने सत्तेचे गणित जुळवले. अध्यक्षपदासाठी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका तर काँग्रेसमधून नेते पी. एन. पाटील यांचे पुत्र राहूल यांच्यात लढतीचे चित्र रंगवले गेले. मात्र, भाजपने जुळवाजुळव केल्याने राहुल पाटील यांनी समोर पराभव दिसत असल्याने शेवटच्या क्षणी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बंडा माने विरूध्द महाडिक अशी लढत झाली. महाडिक अध्यक्षा झाल्या. रंगतदार चुरशीमुळे अध्यक्ष निवड राज्यात लक्षवेधी ठरली होती.

शिवसेनेत उभी फूट

नव्या सभागृहात शिवसेनेचे दहा सदस्य आहेत. त्यापैकी सात सदस्य भाजपसोबत म्हणजे सत्तेत आणि विरोधात तीन सदस्य आहेत. उपाध्यक्षपदावर शिवसेनेचे सर्जेराव पाटील यांना संधी मिळाली. जिल्हा परिषदेच्या राजकरणात शिवसेनेत उभी फूट पडली. सेनेतील गटबाजी सभागृहात समोर आली. यामुळे राज्याप्रमाणेच जि. प.मध्येही सत्तेत असूनही निधी, प्रश्न, समस्या सोडवून घेण्यासाठी पाच सदस्यांना संघर्ष करावा लागतो आहे.

विषय समित्यांत नामुष्की

अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर स्थायी, जलव्यवस्थापन व स्वच्छता, अर्थ, कृषी, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण या समित्यांच्या अध्यक्ष, सदस्य निवडी झाल्या. या निवडीही विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रतिष्ठेच्या केल्या. विशेष सभेत निवडीची प्रक्रिया पार पडली. मात्र, समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यांची नावे जाहीर न करताच सभा गुंडाळण्याची नामुष्की जि. प.च्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांवर ओढवली. निवडीची सभा झाल्यानंतरही काही नावे घुसडण्याचा प्रकार झाला.

निधी टंचाईने असंतोष

निधी टंचाइमुळे सदस्यांत असंतोष आहे. धोरणात्मक ‌निर्णयासंबंधी असलेले प्रश्न वारंवार प्रयत्न करूनही पदाधिकारी सोडवू शकत नाहीत. सदस्यांना मतदारसंघात विकासाची स्वप्ने दाखवलेली पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे संधी मिळेल, त्यावेळी मित्रपक्षाचे सदस्य भाजपवर कुरघोडी करीत असतात. आवाडे गटाचे सदस्य राहुल आवाडे यांनी एका बैठकीत अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या तोंडावरच आम्हाला आता गृहीत धरू नका असे सांगण्याचे धाडस केले. निधी नसल्याने ‘चूक झाली भाजपशी संगत केली’ अशी भावना मित्र पक्षातील सदस्यांची झाली आहे.

लाचखोरीचा डाग गडद

राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरीने नावलौकीक ‌मिळवलेल्या जिल्हा परिषदेवरील लाचखोरीचा डाग वर्षभरात गडद झाला. अर्थ विभागातील अधिकारी बाळासाहेब पाटील यांच्यासह आरोग्य, शिक्षण विभागातील कर्मचारी लाच घेताना सापडले. माध्यमिक शिक्षण विभागातील फाइल पैसे दिल्याशिवाय पुढे जात नसल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले. आर्थिक लाभापोटी चुकीच्या शिक्षक मान्यता देण्यासह अनेक गैरकामाचा ठपका असल्याने तत्कालीन शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यांना बदलीची शिक्षा देत खाबुगिरीच्या प्रकरणावर पडदा टाकला. अधिकारी पाटील यांना क्लिनचीट देण्याचा प्रयत्न झाला.

संघटना पदाधिकारी बदली

कर्मचारी बदली प्रक्रियेत संघटनेच्या पद‌ाधिकाऱ्यांचा समावेश होता. नियमानुसार पदाधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कुणाल खेमनार ठाम राहिले. त्यामुळे सीईओ डॉ. खेमनार यांच्याविरोधात बदली होणारे संघटनांचे पदाधिकारी उभे ठाकले. त्यांच्यात शीतयुध्द रंगले. वर्षानूवर्षे ठाण मांडून बसलेले संघटनेचे पद‌ाधिकारी बदलीने दुखावले गेले. त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करीत एक दिवसआधी बदली प्रकियेस स्थगिती मिळवली. त्यामुळे हा मुद्दा प्रतिष्ठेचा झाला. पदाधिकारी बदली टाळण्यासाठी राजकीय दबाव तंत्राचा वापर केला, याउलट कोणत्या दबावाला बळी न पडण्याची भूमिका सीईओ डॉ. खेमनार यांनी घेतली. शेवटी प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच संघटनेच्या पदाधिकारी न्यायालयातील याचिका मागे घेतली. बदली प्रक्रिया सुरळीत राबवली. पद‌ाधिकाऱ्यांची उचलबांगडी झाली.

गुरूजी आमने-सामने

सरकारच्या नव्या सुगम, दूर्गम निकषानुसार प्राथमिक शिक्षण प्रशासनाने बदलीची प्रक्रिया सुरू केली. या निकषात ऑनलाइनमुळे शिक्षक नेते, पदाधिकारी, राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप पूर्णपणे कमी झाला. पात्रता, पारदर्शकतेनुसार ही बदलची प्रक्रिया राबवली होत होती. त्यामध्ये अनेक वर्षे सुगम भागात ठाण मांडून असलेले शिक्षकांनी (गुरूजी) हायकोर्टात याचिका दाखल करून बदली प्रक्रियेत अडथळा आणला. त्यामुळे दीर्घकाळ डोंगराळ तालुक्यातील शाळांत काम करणारे दूर्गम भागातील शिक्षक प्रचंड दुखावले. तेही संघटीत झाले. ‌त्यामुळे सुगम, दूर्गम गुरूजी आमने-सामने आले. सुगम यादीतील घोळ शिक्षण सचिवाच्या निदर्शनास आला. सचिव कार्यालयातून अधिकारी येऊन यादीच्या घोळाची चौकशी केली. चौकशीचा अहवाल गुलदस्त्यात राहिला. बदल्या झाल्या नाहीत. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक ‌मिळाले नाहीत.

झिरो पेंन्डसी आणि आंदोलन

करवीर पंचायत समितीच्या एका लिपिकाने आत्महत्या केली. त्यानंतर सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचारी संघटनांनी ‌झिरो पेंन्डसीच्या कामाचा ताण सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत काम बंद आंदोलन केले. जि.प., पंचायत समित्यांचे चार दिवस कामकाज बंद पाडले. विधानसभेपर्यंत हा प्रश्न पोहचला. कर्मचारी संघटनेच्या आंदोलनात राजकीय नेत्यांनी थेट एन्ट्री केली. आत्महत्येचे मूळ कारण पोलिसांकडून उघड होण्याआधीच आंदोलन झाले. यामध्ये बदली प्रकरणात दुखावलेले संघटनांचे पदाधिकारी आघाडीवर राहिले. अधिकाऱ्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरली गेली. यामुळे प्रकरणच चांगलेच तापले. तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांची यातून बदली झाली. वादग्रस्त बाब झाली तरी झिरो पेंन्डसीत ‌पुणे विभागात कोल्हापूर जि.प. ने आघाडी घेतली.

रिक्त पदांचा ताण

अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने गतीमान प्रशासनास ब्रेक लागला आहे. कामाचा ताण वाढल्याने सामान्य नागरिकांचे हेलपाटे वाढले आहेत. निधी नाही, अधिकारी नाही अशी अवस्था महिला बाल कल्याण, समाज कल्याण विभागाची झाली आहे. वैय‌क्तिक लाभाच्या साहित्याचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या नावावर जमा केले जात आहेत. ही प्रक्रिया किचकट असल्याने गरीब लाभार्थी वंच‌ित राहत आहे. साहित्य खरेदीमधील मलिदा बंद झाल्याने पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप कमी झाला आहे.

कामचुकारांना चाप

कामचुकार कर्मचारी, अधिकाऱ्यांना चाप लावण्याचा प्रयत्न सीईओंनी केला. त्यासाठी सीईओ डॉ. खेमनार यांनी अचानकपणे अनेक विभागांना भेटी दिल्या. विनापरवानगी गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. ‌शिस्तीसाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आयकार्ड सक्तीचे केले. सीईओ डॉ. खेमनार यांनी स्वतः आयकार्ड वापरण्यास सुरूवात केल्याने इतर कर्मचारी आपोआप आयकार्ड वापरू लागले. कार्यालयात अधिकारी, ‌लिपिकांचे नामफलक लावले गेले. माध्यमिक विभागाची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांविरूध्द कारवाई झाली. कामचुकार ‌अ‌धिकारी, कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात चाप लागला.

नो पार्किंग झोन

जिल्हा परिषदच्या आवारात वाहने बेशिस्तपणे पार्किंग केली जात होती. त्यामुळे प्रशासनाने आवारात नो पार्किंग झोन केले. सीईओंसह सर्वच अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्षांची वाहनेही बाहेर थांबू लागली. त्यामुळे जि. प आवाराने मोकाळा श्वास घेतला. प्रशासनाचे ही चांगली कामगिरी केली. त्यास नूतन पद‌ाधिकाऱ्यांनी साथ दिली. अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मुख्य इमारतीशेजारी कँटीन सुरू झाले.

विद्यार्थिनीला उठाबशा प्रकरण

वर्षाच्या शेवटच्या टप्यात चंदगड तालुक्यातील मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनी विजया चौगुले यास ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. त्यामध्ये चौगुले जखमी झाल्याने हे प्रकरण विधानसभेत गेले. मुख्याध्यापिक ‌अश्विनी देवाण यांना अटक झाली. यानिमित्ताने आनंददायी शिक्षणाचा खरा चेहरा समोर आला. कोट्यवधी रूपयांच्या शालेय पोषण आहारातील मापातील पाप उघड झाले. डल्ला मारणारी प्रवृत्ती, गरीब, सामान्य कुटुंबातील मुलांच्या तोंडचा घास हिरावण्यासाठीच्या चोरवाटा चव्हाट्यावर आल्या. अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठीची आंदोलन, मोर्चा निघाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्याला वाढता धोका इ-कचऱ्याचा

$
0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ वेगवान बनली आहे. अनेक वस्तू अगदी काही महिन्यात जुन्या ठरत आहेत. त्याचा परिणाम इ–कचऱ्याचे प्रमाण भयानक वाढण्यात होत असून, आपण या साऱ्यांकडे अजूनही भंगार म्हणूनच पाहत आहे, पण या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू केवळ भंगार नसून त्या कचऱ्याचे विघटन शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जात नसल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांचे परिणाम प्रत्येक नागरिकाच्या थेट आरोग्यावर होत आहेत. भावी पिढीसाठी ही धोक्याची घंटा असल्याने आत्ताच या धोकादायक इ–कचऱ्याला नियंत्रणात आणण्याची गरज आहे. त्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’, येस बँक, दि कॉन्झर्व्हशेन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इ-कचरामुक्त कोल्हापूर’ मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत विविध ठिकाणी इ-कचऱ्याचे संकलन करण्यात येणार आहे.

घराघरांमध्ये किचनपासून व्हरांड्यापर्यंत विविध इलेक्ट्रॉनिक्स साधनां​शिवाय कामच होत नसल्याची परिस्थिती आहे. या साधनांची संख्या आणखी वाढत आहे. पण ही साधने खराब झाल्यानंतर होणारा कचरा याबाबत कुणीच गांभीर्याने पहात नाही. खराब झालेले एक तर भंगारात द्यायचे किंवा जुने देऊन नवीन घ्यायचे हे तंत्र अवलंबले जात आहे. ही जुनी साधने दुरुस्त करुन वापरण्याचा जमाना संपला असल्याने या वस्तू भंगारात देऊन पिच्छा सोडवला जात आहे. अनेक ठिकाणी ही भंगारातील साधने फोडून त्यातील किमती भंगार घेऊन उर्वरित कचऱ्यातच टाकला जात आहे. फ्रीज, टीव्ही, प्रिंटर, मोबाइल, कम्प्युटर, म्युझिक सिस्टीम, रेडिओ, ट्रान्झिस्टर्स, टेप रेकॉडर्स, व्हीडिओ रेकॉड‍्र्स, व्हीसीडी, प्रयोगशाळांतील उपकरणे अशा विविध वस्तू अनेकदा भंगारवाल्यांकडे देण्यास गेल्यानंतर अतिशय जुजबी किंमत ​केली जाते. काही वस्तू भंगारवाले स्वीकारत नाहीत. परिणामी इ-कचरा नेहमीच्या कचऱ्यातून फेकला जातो. भंगारवाले ज्या पार्टसमधून पैसे मिळतात ते काढून घेतात. त्यासाठी बहुतांश वेळेला काच फोडणे, वायर जाळणे अशा अशास्त्रीय पद्धती हाताळल्या जातात. परिणामी पारा, विविध गॅस बाहेर पडतात. ते मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत.

भावी पिढीसाठी हा धोका मोठा ठरत असल्याने या कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने विघटन करण्यासाठी ही मो​हीम हाती घेतली आहे. यासाठी शहरात विविध ठिकाणी संकलन केंद्र सुरू करण्यात येणार असून त्या केंद्रामध्ये अशा जुन्या वस्तू स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच ज्यांना केंद्रामध्ये आणून वस्तू देणे शक्य नाही, त्यांनी फोन करुन संपर्क साधल्यास त्यांच्या घरातून, कार्यालयातून या वस्तू संकलित केल्या जाणार आहेत. सरकारच्या मान्यताप्राप्त कंपनीकडून या वस्तूंचे विघटन करुन घेतले जाणार आहे. त्यामुळे घातक प्रदूषकांपासून शहरवासीयांना, पर्यावरणाला दूर राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कचरा धोकादायक

सध्या शहरात वर्षभरात एक हजार टन कचरा निर्माण होत आहे. यातील जवळपास ७५ टक्के कचऱ्याची विल्हेवाट अशास्त्रीय पद्धतीने लावली जाते. अनेक ठिकाणी नाल्यांच्या परिसरात ही विल्हेवाट लावली जात असल्याने पाऱ्यासारखे घातक प्रदूषणे पाण्यात मिसळून नागरिकांच्या शरीरात जाण्याचा धोका आहे. याबाबत कुणाचेही लक्ष नसल्याने हे प्रकार शरीरासाठी घातक ठरत आहेत.

....

२९ डिसेंबरला प्रारंभ

नवीन वर्ष दोन दिवसांवर आलेले असताना नव्या वर्षात इ-कचरामुक्त घर आणि शहर करण्यासाठी २९ डिसेंबरला या ‘इ-कचरामुक्त कोल्हापूर’ मोहिमेला प्रारंभ करण्यात येणार आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी विविध केंद्रावर इ-कचरा आणून द्यावा. ज्यांना शक्य नाही, त्यांनी फोनवरुन संपर्क साधल्यास तिथे जाऊन कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे.

.....

संकलन केंद्र

येस बँक ब्रँच

ताराराणी फायर स्टेशनसमोर, कावळा नाका

....

युनिव्हर्सल मोटर्स,

जाजल पेट्रोल पंपासमोर

.....

येस बँक ब्रँच, लक्ष्मीपुरी

....

सुशांत कम्युनिकेशन्स, गुजरी

.,......

कोट

ऑनलाइनच्या युगात इ-कचरा ही मोठी समस्या आहे. त्यासाठी ही संकलन मोहीम घेण्यात येत आहे. संकलित होणारा कचरा व त्याचे विघटन झाल्यानंतर काही अंशी पर्यावरण संवर्धनास मदत होणार आहे. त्यासाठी हे पहिले पाऊल टाकले आहे. नागरिकांनीही आपल्या भावी​ पिढीचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

आशीष ढवळे, अध्यक्ष, दि कॉन्झर्व्हेशन ऑफ इंडिया

...

शहरात इ-कचरा संकलन मोहीम व्यापक प्रमाणात राबवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी विविध ठिकाणी संकलन केंद्र ठेवण्यात आली असून त्याला शहरवासीयांकडून प्रतिसाद अपेक्षित आहे. घरात वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे काय करायचे, असा प्रश्न अनेकदा पडलेला असतो. त्यासाठी ही संकलन मोहीम राबवण्यात येत आहे. इ-कचरामुक्त कोल्हापूर करण्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे.

यतीश शहा, ब्रँच मॅनेजर, येस बँक लिमिटेड

.....

या वस्तू स्वीकारणार

कम्प्युटर, लॅपटॉप, फ्रीज, रेडिओ, टेलिफोन, टेप रेकॉर्डर, कम्प्युटर मॉनीटर, सीपीयू, प्रिंटर्स, सर्व्हर्स, फॅक्स मशिन, स्कॅनर, मदर बोर्ड, टेलिव्हिजन सेट, मोबाइल फोन, टेलिकॉमची उपकरणे, व्हॅक्यूम क्लिनर्स, टोस्टर्स, सीएमसी मशीन्स, वॉशिंग मशीन, ऑडिओ, व्हीडिओ कॅसेट, वैद्यकीय उपकरणे, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक साधने, स्पेअर पार्ट, बॅटरी, चोक्स, जुन्या सीडी, डीव्हीडी, अडॅप्टर, रिमोट कंट्रोल, वायर्स, केबल्स, पॉवर सप्लायर्स, केबल्स.

इ-कचऱ्याचा आरोग्याला धोका

कॅडमिअमसारख्या धातूंचा मूत्रपिंड, हाडांवर परिणाम होतो

पीव्हीसी केबल जाळल्या जातात. त्यातून बाहेर पडणाऱ्या डायॉक्सिन्सचा जननक्षमतेवर परिणाम

विविध प्रकारच्या फ्लॅट स्क्रिन डिस्प्लेमध्ये पारा असतो. त्या फोडल्याने बाहेर पडणारा पारा चेतासंस्था, मूत्रपिंड आणि मेंदूवर परिणाम करतो

कपॅसिटरमधील बेरिलियम गॅस घातक. डोळे, त्वचा, किडनी, कॅन्सर आदी प्रकारच्या रोगांना आमंत्रण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुख्यमंत्री फडणवीस यांचा डबल गेम’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना व नारायण राणे यांच्याशी ‘डबल गेम’ खेळत आहेत. ते शिवसेनेला सांगतात, त्यांना मंत्रिमंडळात घेणार नाही आणि राणेंना सांगतात, लवकरच मंत्री मंडळात समावेश करू. आता नक्की काय करतात ते बघू. मात्र राणे मंत्री झाल्यावरही शिवसेना सत्तेत राहिली तर मग मात्र शिवसेनेचे चांगलेच घोंगडे अडकलेले आहे, असे नक्की म्हणावे लागेल असा टोला बुधवारी आमदार जयंत पाटील यांनी लगावला.

भाजपच्या सरकार मध्ये एकसंघ पणा नाही. कोणत्याही मंत्र्याला गांभीर्य नाही, असा आरोपही पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. नागपूर अधिवेशानानंतर त्यांनी इस्लामपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘हल्लाबोल आंदोलन व आम्हा विरोधकांच्या दबावामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे देत आहे, दिले आहे, असे सरकारला जाहीर करणे भाग पडले नाहीतर या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे देणे, ३१ मार्च २०१८ पर्यंत लांबवले असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना व नारायण राणे यांच्याबरोबर ‘डबल गेम’ खेळत असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सत्ता स्थापनेच्या वेळी भाजपास पाठिंबा व्यक्त करण्याच्या भूमिकेचे समर्थन केले.’ हे घोषणा बाज सरकार आहे. अनेक प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नाही. अनेक मंत्री अधिवेशन कामकाजाबाबत गंभीर नव्हते, अशी खंत ही व्यक्त त्यांनी केली.

ते म्हणाले, ‘विदर्भातील शेतकऱ्यांचे कापसावरील बोंड अळी आणि धानावरील तुडतुड्या रोगाने मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्याची सरकारची मानसिकता नव्हती. मात्र हल्लाबोल आंदोलन व विरोधकांच्या दणक्याने सरकारला बियाणे कंपन्या, विमा कंपनी व केंद्र सरकारच्या मदत योजनेतून का होईना भरपाई देऊ अशी घोषणा करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचा वीजपुरवठा तोडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शंभर दिवस होऊन गेले तरी जयंती नाल्यातील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळण्यापासून रोखण्यात दुर्लक्ष केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी महापालिकेच्या मुख्य इमारतीचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई केली. पंचगंगा प्रदूषणाबाबत महापालिकेने चालवलेल्या दुर्लक्षाबाबत गेल्या सतरा वर्षांत वीजपुरवठा तोडण्याची ही दुसरी वेळ आहे. तर आणखी एकदा वीज तोडण्याचे आदेश देण्यात आले होते, पण महापालिकेकडून त्याला स्थगिती मिळवली होती. नूतन महापौरांच्या कार्यालय प्रवेशानंतर ही कारवाई करण्यात आल्याने महापालिकेची मोठी नामुष्की झाली आहे.

१४ सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे जयंती नाल्यातून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी तुटली होती. तेव्हापासून जयंती नाल्यातील सर्व मैलामिश्रीत सांडपाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळत आहे. त्याचा परिणाम शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गेल्या महिन्यापासून जाणवू लागला आहे. नदीवरील बंधारे अडवण्यात आल्याने शहरातील बाहेर पडणारे सांडपाणी विविध बंधाऱ्यांमध्ये अडून राहिले आहे. त्याची दुर्गंधी सुटली आहे. तसेच प्रचंड प्रदूषित पाणी नदीकाठावरील ३९ गावांतील ग्रामस्थांना प्यावे लागत आहे. आरोग्याचे प्रश्न भेडसावू लागले आहेत. ऊस तोडणीसाठी आलेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीच्या या पाण्यावर गुजराण करावी लागत आहे. त्यामुळेच तिथे मोठा धोका निर्माण झाला आहे.

याबाबत वारंवार तक्रार करूनही पाइप दुरुस्त केली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्र, नोटीस देण्याबरोबरच बैठकीत सूचनाही दिल्या होत्या. तरीही महापालिकेकडून अत्यंत संथ काम सुरू असल्याने उदय गायकवाड, अनिल चौगुले यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी कदम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईचे आदेश दिले होते. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे नेमलेल्या कमिटीच्यावतीने पाहणी करून त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. तरीही महापालिका आयुक्त व जलअभियंता यांनी पुर्णपणे दुर्लक्ष केले असल्याची तक्रार गायकवाड यांनी हायकोर्टाकडे केली होती. हायकोर्टाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अनबालगन यांनी फौजदारी कारवाईचे आदेश दिले.

यामुळे मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांनी गुरुवारी सकाळी महापालिकेचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश महावितरण कंपनीला दिले. साडेअकरा ते साडेबारा या कालावधीत प्रतिकात्मक म्हणून ही कारवाई करण्यात येत असल्याचे पत्र दिले. त्यानुसार तातडीने कारवाई करण्यात यावी, यासाठी महावितरण कंपनीमध्ये जाऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी अधिकाऱ्यांकडे आग्रह धरला. त्याप्रमाणे साडेअकरा वाजता महापालिकेच्या इमारतीबाहेर असलेल्या डीपीवरुन दिले गेलेला वीजपुरवठा तोडण्यात आला. ही कारवाई करण्यापूर्वी अकरा वाजता नूतन महापौर स्वाती यवलुजे व उपमहापौर सुनील पाटील यांनी महापालिकेत कार्यालय प्रवेश केला होता. वीजपुरवठा तोडल्यानंतर काही वेळानंतर महापालिकेने जनरेटर सुरु केला. तासभराच्या कारवाईनंतर महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला.
०००००००
जयंती नाल्यातील सांडपाणी पाइपलाइनच्या दुरुस्तीच्या कामाची दोनवेळा पाहणी केली. जलअभियंत्यांना १० जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अनबालगन यांना दिली आहे. त्यांनीही लवकरात लवकर काम पूर्ण करण्यास सांगितले आहे.
डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० लाख टन बफर स्टॉक करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घसरलेल्या साखरेच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने २० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्या. बफर स्टॉक केल्यास साखरेचे दर वाढू शकतात, असा विश्वासही साखर कारखानदारांनी व्यक्त केला. दरम्यान या प्रश्नांवर उद्या शुक्रवारी (ता. २९) राज्य साखर संघाने सहकारी व खासगी साखर कारखानदारांची बैठक पुण्यात बोलावली आहे. तसेच या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी दोन जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मुंबई बैठक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.

यंदाचा ऊस हंगाम सुरू होण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या बैठकीतील जिल्ह्यातील कारखानदारांनी एफआरपी आणि जादा २०० रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर साखर हंगाम सुरू झाला. यावेळी बाजारात साखरेचा दर ३५०० रुपये होता. आता हा दर ३०५० रुपये इतका खाली आला असल्याने ऊस उत्पादकांना दर देण्यासाठी साखर कारखान्यापुढे अडचणी वाढल्या आहेत. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, म्हाडा पुणे विभागाचे अध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार प्रकाश आवाडे, विनय कोरे, के. पी. पाटील, पी. एन. पाटील, संजय मंडलिक उपस्थित होते.

बैठकीतील चर्चेची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. साखरेचे दर ५०० रुपये खाली आल्याने साखर कारखान्यांनासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना एफआरपी आणि वाढीव २०० रुपये देणार आहेत. हा दर देताना शेवटच्या टप्प्यात ऊस गाळप झालेल्या उत्पादकांना दर देताना अडचणी येणार आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व साखर कारखान्यांनी राज्य सरकारकडे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून काही मागण्या केल्या आहेत. साखरेचा दर वाढवण्यासाठी राज्य सरकारने २० लाख टन साखरेचा बफर स्टॉक केल्यास साखरेचे दर वाढतील. तसेच बफर स्टॉक केलेल्या गोडाऊनचे भाडे सरकारने द्यावे. राज्य सरकारकडून प्रत्येक टनाला जे कर्ज दिले जाते ते १५ टक्के कापून न घेता १० टक्के कापून घ्यावे. तसेच २०१३-२०१४ मध्ये केंद्र सरकारने दिलेल्या कर्जाची पुनर्रचना करावी. कारण गतवर्षीपासून दर टनामागे ३०० रुपये हप्ता भरण्यास सुरुवात केली आहे. जर हप्त्यामध्ये पुर्नरचना केली तर शेतकऱ्यांना दर देण्यास मदत होणार आहे.

साखर कारखानदारांच्या मागणीबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘साखरेचे दर खाली आल्याने एफआरपी व वाढीव दोनशे रुपये देण्याबाबत अडचणींवर चर्चा झाली. राज्य बँकेकडून साखर कारखान्यांना जे कर्ज दिले जाते त्यासाठी राज्य सरकारला हमी द्यावी लागणार आहे. साखरेचा बफर स्टॉक, व अन्य कराबाबत साखर कारखानदारांनी मागण्या केल्या. साखरेच्या दराचा प्रश्न राज्यव्यापी असून मुख्यमंत्री फडणवीस व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करून साखर कारखान्यांच्या मागण्याबाबत निर्णय घेतला जाईल.’


साखर कारखानदारांकडून २००० कोटी जीएसटी

साखर कारखान्याकडून यापूर्वी केंद्र सरकारला अबकारी कर मिळत होता. आता अबकारी कर बंद होऊन जीएसटीची अंमलबजावणी सुरू आहे. राज्य सरकारला जीएसटीतून २००० कोटी रुपये मिळणार असल्याने राज्य सरकारने साखर कारखान्यांना मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी साखर कारखानदारांनी केली.

रेशनवरील साखरेचे अनुदान द्या

रेशनवर गरीबांना साखर दिली जाते. ही साखर कमी किंमतीत न देता गरीब लोकांच्या खात्यावर साखरेच्या किंमतीचे अनुदान जमा करावे, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. गडकरींच्या योजनेची अंमलबजावणी सरकारने केल्यास या साखरेचा गैरवापर करणाऱ्या मिठाई, चॉकटेल, सॉफ्ट ड्रिंक करणाऱ्यांवर चाप बसेल, अशी प्रतिक्रिया आमदार मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

बैठकीतील प्रमुख मागण्या

सरकारने तातडीने २० लाख मेट्रिक टन साखरेचा बफर स्टॉक करावा.

बफर स्टॉकसाठी होणारे निम्मे व्याज सरकारने भरावे.

‍‍राज्य बँकेकडून मिळणाऱ्या कर्जात ५ टक्क्यांची वाढ करावी

एफआरपीसाठी कर्जाची पुनर्रचना करावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळेचे उल्लंघन केल्यास कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
‘शहरात अवजड वाहतुकीसाठी सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते संध्याकाळी ९ पर्यंत प्रवेशबंदी आहे. याशिवाय रत्नागिरीकडून येणाऱ्या अवजड वाहतुकीला आंबेवाडी, शियेमार्गे पुणे-बेंगळुरू महामार्गावर वळवले आहे. वाहतुकीच्या वेळा आणि मार्गांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलिसांनी वाहनधारकांना दिल्या आहेत. याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल,’ असा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी वाहनधारक आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत दिला. गुरुवारी (ता. २८) शहर वाहतूक नियंत्रण शाखेत बैठक झाली.
शहरातील व्यापाऱ्यांकडे धान्य उतरण्यासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. लक्ष्मीपुरीतील धान्य ओळ, शाहूपुरी यासह महापालिका इमारतीच्या परिसरात नारळ विक्रेत्यांना नारळांचा पुरवठा करणारे ट्रकही गर्दीच्या मार्गांवरच उभे केले जातात. धान्य उतरल्यानंतर अनेक वाहने शहरात जागा मिळेल त्या ठिकाणी पार्क केले जातात. या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. ही कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहतुकीसाठी वेळेचे नियोजन करून दिले आहे. सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांनी शहरात प्रवेश करू नये, असे नियोजन यापूर्वीच केले आहे. या नियोजनाची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार शिवसेनेने पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे केली होती. यानुसार शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आणि शहर वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ यांनी शहरातील अवजड वाहनधारकांसह व्यापारी असोसिएनची बैठक आयोजित केली होती.
बैठकीत बोलताना व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी सदानंद कोरगावकर यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या मांडल्या. ‘धान्याचे ट्रक वाहतुकीच्या वेळांचे पालन करतात. महापालिकेने दिलेल्या विक्रमनगर येथील जागेत अद्याप मूलभूत सुविधा नाहीत. सुविधा मिळाल्या तरच दुकानांचे स्थलांतर होऊ शकते. व्यापारी पोलिसांना सहकार्य करतात, त्यामुळे पोलिसांनीही सहकार्य करावे,’ असे आवाहन, कोरगावकर यांनी केले. यावेळी लॉरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही पार्किंगसाठी जागा उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
व्यापाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर उपअधीक्षक डॉ. अमृतकर म्हणाले, ‘बॉक्साईटची वाहतूक आंबेवाडी, शियेमार्गे महामार्गाकडे वळवली आहे. संबंधित वाहतूकदार आणि बॉक्साईट कंपन्यांनाही याबाबत सूचना दिल्या आहेत. सूचना देऊनही काही वाहनधारक शहरातून वाहतूक करतात. याशिवाय ‍वेळेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवरही कारवाई केली जाईल. शहरात पर्यटकांच्या वाहनांची गर्दी वाढत आहे. गर्दीच्या काळात वेळेच्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करावी. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल,’ असा इशारा त्यांनी दिला. यावेळी वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पंडित कोरगावकर त्याचबरोबर व्यापारी असोसिएशनचे किशोर तांदळे, नयन प्रसादे, वैभव सावर्डेकर, धर्मेंद्र नष्टे, अमित खटावकर, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अकबर मोहल्ल्यात अतिक्रमण मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
अकबर मोहल्यामधील बोळामध्ये करण्यात आलेले अनाधिकृत बांधकामावर महापालिकेने गुरुवारी प्रचंड पोलिस बंदोबस्त व कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यामध्ये कारवाई केली. अनाधिकृत बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेची यंत्रणा आल्यानंतर त्या इमारतीमधील महात कुटुंबीय बाहेर न पडल्याने जवळपास तासभर सर्व यंत्रणा थांबून राहिली. या कारवाईमुळे अकबर मोहल्ला परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.
अकबर मोहल्यामध्ये अकबर महात यांनी लहान बोळात अनाधिकृत बांधकाम केले होते. त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याने नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार दोन महिन्यापूर्वी नगररचना विभागाचे अधिकारी व कर्मचारी कारवाई करण्यास गेले असता कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला. त्यावेळी पोलिस बंदोबस्त कमी असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही फार आक्रमक भूमिका घेतली नाही. तरीही दोन तास हा प्रकार चालल्याने शेवटी महात कुटुंबियाने अनाधिकृत बांधकाम काढून घेण्याचा अवधी घेतला. त्यानुसार बोळातील पिलर काढण्यात आले पण त्यावरील काही भाग हटवण्यात आला नव्हता.
तो भाग हटवण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सकाळी अकराच्या सुमारास मोठ्या फौजफाट्यासह पोहचली. शंभर पोलिस, महापालिका कर्मचारी, अग्निशमन दलाचे बंब व जवान अशी यंत्रणा आल्यानंतर महात कुटुंब घरात त्या अनाधिकृत बांधकामामध्ये बसून राहिले. ते बाहेर येत नाहीत, तोपर्यंत बांधकाम पाडता येत नसल्याने तासभर सर्व यंत्रणा थांबून होती. त्यामुळे नगररचना विभागाचे नारायण भोसले यांनी पोलिस निरीक्षकांना बोलवून घेतले. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत दुपारी बारा वाजता तिथे आल्यानंतर महात कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अनाधिकृत बांधकाम असल्याने ते काढावे लागेल, त्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन करण्यात आले. त्यानंतर महात कुटुंब बाहेर आल्यानंतर कारवाईला सुरुवात केली. दिवसभर कारवाई सुरू राहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर कारखानदारीवर मंगळवारी संयुक्त बैठक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साखरेचे दर झपाट्याने उतरल्याने साखर कारखानदारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारीच बैठक लावण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, घसरलेल्या साखरेच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने २० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या साखर कारखानदारांनी पालकमंत्री पाटील यांच्याकडे केल्या. बफर स्टॉक केल्यास साखरेचे दर वाढू शकतात, असा विश्वास कारखानदारांनी व्यक्त केला.

सर्किट हाउसवर कारखानदारांची बैठक आयोजित केली होती. कारखानदारीच्या प्रश्नावर यावेळी दीर्घ चर्चा झाली. कारखानदारांनी सरकारकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी तातडीने बैठक घेण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. हे प्रश्न आर्थिक असल्याने मुख्यमंत्र्यांशीच बोलून आणि सहकारमंत्र्यांना सोबत घेऊन निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे मंगळवारीच ही बैठक व्हावी, यासाठी प्रयत्न राहतील. राज्य बँकेने केलेले ८५ टक्के मूल्यांकन वाढवून ते याआधी ९० टक्के केले होते. यंदाही याच पद्धतीने उपाय करावे लागतील, असे ते म्हणाले.


आज पुण्यात चर्चा

पुण्यात आज (शुक्रवार) राज्यातील सर्व कारखाना अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकांची महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्य साखर संघाने दुपारी दोन वाजता साखर संकुलात ही बैठक बोलावली आहे. साखरेचे दर उतरल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर यावेळी चर्चा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीपीतील अधिकारी कारभाऱ्यांचा सल्लागार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
नोकरीला महापालिकेत आणि काम कारभाऱ्यांचा असा अजब प्रकार सहायक संचालक नगररचना विभागात सुरू आहे. नगररचना विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडल्याने प्रबळ बनलेला हा ‘वजनदार’ अधिकारी महापालिकेतील कारभाऱ्यांचा सल्लागार म्हणून कार्यरत आहे. महापालिकेशी निगडीत विविध जागांच्या संदर्भात कारभाऱ्यांच्या सोयीने कामकाज करणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे. शालिनी सिनेटोन प्रकरणातही या अधिकाऱ्यांने नेहमीप्रमाणे कारभाऱ्यांच्याच बाजूने भूमिका बजावल्याची चर्चा महापालिकेसह बांधकाम व्यावसायिकांत रंगली आहे.
नगररचना हा थेट लोकांशी संबंधित विभाग आहे. बांधकाम मंजुरीपासून पूर्णत्त्वाचा दाखल्यापर्यंत बहुतांश अधिकार या कार्यालयाच्या अखत्यारित येतात. महापालिकेच्या मलईदार खात्यामध्ये नगर रचना विभागाचा समावेश होतो. यामुळे या ठिकाणी सहायक शहर रचनाकार, उप शहर रचनाकारपासून सहायक संचालकापर्यंत साऱ्यांचीच चलती असते. सहायक संचालकांची तीन वर्षातून एकदा बदली होते. मात्र महापालिकेतील काही अधिकारी या विभागात रुजू झाल्यानंतर कित्येक वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम केल्यामुळे मक्तेदारी निर्माण होऊन त्यांचे कार्यालयातील वजनही वाढले आहे. गेल्या कित्येक वर्षाच्या अनुभवाच्या बळावर एकाची तर वजनदार अधिकारी म्हणून ओळख तयार झाली आहे. महापालिकेतील कारभाऱ्यांशी त्यांची सलगी वाढली आहे.
नोकरी महापालिकेची अन् काम कारभाऱ्यांचे अशी त्या अधिकाऱ्याच्या कामाची पध्दत बनली आहे. महपालिकेच्या पर्चेस नोटिशीपासून खुल्या जागा, आरक्षित जागा, भूसंपादन अशा विविध टप्प्यावर कारभाऱ्यांना माहिती देणे, कायदेशीर पळवाटा शोधून देणे, नियमावलीतील त्रुटी दाखवत कारभाऱ्यांचे हित साधण्यासाठी हा अधिकारी आपले बुद्धीचातुर्थ आणि शक्ती खर्च करत असल्याची ओरड नगरसेवकांतून होत आहे. या विभागातील बांधकामाच्या फायलींचा प्रवास लवकर पूर्ण होण्यासाठी वारंवार हेलपाटे मारताना अनेक नगरसेवकांना ‘नारायण, नारायण’ म्हणण्याची वेळ येते मात्र काही नगरसेवकांचा हा प्रवास एका अधिकाऱ्यामुळे सुलभ बनला आहे.
सध्या गाजत असलेल्या शालिनी सिनेटोन प्रकरणातही नगररचना विभागातील काही अधिकारी सामील आहेत. त्यांनी जागेच्या संदर्भातील इथंभूत माहिती, नियमावली, जागे संदर्भातील कायदेशीर बाबी या संदर्भात कारभाऱ्यांना माहिती, कागदपत्रे पुरविली आहेत. अनेकदा या अधिकाऱ्याने कारभाऱ्यांसाठी कागदपत्रे तयार केल्याचे दाखले या क्षेत्रातील मंडळी देतात. आयुक्तांनी नगररचना विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी अनेक बदल केले. फायलींची वर्षनिहाय वर्गवारी झाली. टीपीतील फायलींचे स्कॅनिंग सुरु केले आता या विभागात वर्षानुवर्षे काम करत मक्तेदारी निर्माण केलेल्या अधिकाऱ्यांवर वॉच ठेवण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडलिकांबाबत मुश्रीफांचे घुमजाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिकाच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हाडाची काडं आणि रक्ताचे पाणी करतील असे सांगणाऱ्या आमदार आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी घुमजाव करत प्रा. मंडलिक हे शिवसेनेतच आहेत, असे सांगितले. तसेच माझ्या विधानाचा विर्पयास केल्याचा ‘भाबडा’ खुलासाही त्यांनी केला. शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना त्यांच्यासोबत प्रा. मंडलिकही उपस्थित होते.
खासदार शरद पवार हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात गंगाराम कांबळे स्मारक आणि मुरगूड येथे मंडलिक यांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पवारांच्या दौऱ्यात संजय मंडलिकांच्या लोकसभा उमेदवारीची राष्ट्रवादी पक्षाची घोषणा होणार का? या प्रश्नावर ‘प्रा. मंडलिक हे शिवसेनेत आहेत, त्यांची घोषणा आम्ही कशी करणार?’ असे उत्तर दिले.
मुरगूड येथील कार्यक्रमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असे सांगून ते म्हणाले, दिवगंत खासदार मंडलिकांचे कार्य पुढे न्यायचे असून जर मंडलिक व प्रवीण पाटील एकत्र आले तर आपणही एकत्र येऊ, असे वक्तव्य केले होते, असा खुलासा केला.
ते टीव्हीवर कॅसेट दाखवतात...
खासदार धनंजय महाडिक यांनी घसरलेल्या साखरेचा दराचा प्रश्न लोकसभेत उपस्थित केला होता याकडे त्यांचे लक्ष वेधले असता खासदार महाडिक यांनी प्रश्न उपस्थित केल्याबद्दल त्यांचे स्वागत आहे. पण त्यांनी हा प्रश्न शून्य प्रहरात केला होता. या प्रश्नाला मंत्री उत्तर देण्यास बांधील नसतात. ते अशा प्रश्नांची टीव्हीवर सभागृहातील कामकाजाची कॅसेट दाखवतात, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. खासदार राजू शेट्टी यांनीही लोकसभेत प्रश्न उपस्थित करावा. साखर दर कमी झाल्याने त्यावर निर्णय घेण्यासाठी खासदार शेट्टी यांची प्रकाश आवाडे, संजय मंडलिक भेट घेतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार प्रकाश आवाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, के. पी. पाटील, अशोक चराटी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालिनी सिनेटोनप्रश्नी फेरप्रस्तावाची तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
शालिनी सिनेटोनसाठी भूखंड आरक्षित ठेवण्याचा कार्यालयाने पाठवलेला प्रस्ताव शहर व महापालिकेच्या हिताचा वाटत असल्याने आगामी सर्वसाधारण सभेमध्ये त्याबाबतचा फेरप्रस्ताव सादर करण्याची मागणी सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी व शिवसेनेच्या ४७ नगरसेवकांनी गुरुवारी आयुक्तांकडे केली. ज्यावेळी प्रस्ताव मंजूर असल्याचे मत निम्याहून जास्त नगरसेवकांनी स्वाक्षऱ्यांनिशी दिल्यानंतर जुना प्रस्ताव आपोआप विखंडीत होऊन तो मंजूर होतो. त्यामुळे फेरप्रस्ताव सादर करुन त्यामध्ये वेळ घालवण्याची आवश्यकता नाही, असा मतप्रवाह आहे. दरम्यान, जुना नामंजूर केल्याच्या प्रस्तावावर महापौरांची स्वाक्षरी झाली असून त्यामधून काही कायदेशीर वाद निर्माण होऊ नये म्हणून कोर्टात कॅव्हेट दाखल करण्याची तयारी केली आहे.
दोन भूखंड आरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला होता. तो नामंजूर केल्याने ती जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे समजताच सत्ताधारी नगरसेवकांनीच स्वाक्षऱ्यांची मोहीम सुरू केली. हे प्रकरण हाताबाहेर चालल्याचे समजताच कारभाऱ्यांनी जागा आरक्षित ठेवण्याबाबत साऱ्यांचे एकमत असेल तर पक्षाच्यावतीने तसे पत्र दिले जाईल, असे सांगत स्वतंत्र पत्र तयार केले. त्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षरी घेण्यात येत होत्या. बाहेरगावी गेलेल्या अनेक नगरसेवकांना बोलवून स्वाक्षरी घेतल्या. यासाठी कारभाऱ्यांची धावाधाव सुरू होती. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबरोबर शिवसेनेच्या चार नगरसेवकांनीही स्वाक्षरी केल्या. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी ४७ नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना सादर केले. नगरसेवक भूपाल शेटे, दिलीप पोवार, लाला भोसले, माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी पत्र दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अफजल पिरजादे यांच्या एका स्वाक्षरीसाठी दिवसभर प्रयत्न करण्यात येत होते. पण त्यांची स्वाक्षरी शेवटपर्यंत मिळाली नाही.
हा प्रस्ताव मंजूर करण्याचे ४७ नगरसेवकांचे मत असल्यानंतर तो आपोआपच मंजूर होतो. त्यासाठी फेरप्रस्ताव सादर करण्याची गरज नसल्याचे मत आहे. याबाबत आयुक्त डॉ. चौधरी कायदेसल्लागारांकडून मत घेण्याबरोबरच तरतुदींचा विचार करणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय घेतील. दरम्यान, ज्या नगरसेवकांकडे वाटा पोहच झाला होता, तो त्या त्या आघाडीतील कारभाऱ्यांकडे परत पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावातील म्होरक्या कोण? याबाबत नगरसेवकांकडून वेगवेगळी नावे समोर येत होती. ज्यांनी स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवली, त्यांच्याकडून माजी स्थायी समिती सभापतींच्या नावाची चर्चा करण्यात येत असल्याचे समजताच त्यातील काही नगरसेवकांना या ‘माजीं’ नी आपले नाव न घेण्याबाबत सुनावले. अशा प्रकारांमुळे या प्रकरणात तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिरंगाईमुळेच महापालिकेवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पंचगंगेमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्याबाबत महापालिकेला सातत्याने निर्देश देऊनही जयंती नाल्यातील तुटलेल्या पाइपलाइनचे काम शंभर दिवसानंतरही अपुर्णावस्थेत आहे. या दिरंगाईमुळे नदीकाठावरील गावांमध्ये प्रदूषणाची समस्या जीवघेणी बनली असल्याने ग्रामस्थांमध्ये वाढत असलेला असंतोष, मासे मरण्याची घटना, आंदोलने या साऱ्यांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला जबाबदार धरत लक्ष वेधण्यासाठी वीज तोडण्याची कारवाई केल्याचे आदेशात स्पष्ट केले.
१४ सप्टेंबरपासून मिसळत असलेल्या सांडपाण्याबाबत पक्ष, संघटनांच्यावतीने निवेदन तसेच आंदोलने करण्यात आली. सांडपाणी रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आदेश मंडळाने दिले होते. पण आजतागायत कोणतेही प्रभावी पाऊल उचलले गेले नसल्याने सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळत आहे. महापालिका आयुक्तांना वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटी दूर करण्यास ते अयशस्वी ठरले आहेत. सांडपाणी सातत्याने वाहत असून तेरवाड बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणावर मासे मृत झाले आहेत. शेतकऱ्यांनीही सांडपाणी थांबवण्याबाबत मागणी केली आहे. या सर्व परिस्थितीला महापालिका जबाबदार असल्याचे स्पष्ट करत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांनी कारवाई केली.
प्रदूषणाबाबत २००० साली वीज तोडण्याची कारवाई करण्यात आली होती. त्याबाबत मंत्रालय पातळीवरून हालचाली झाल्यानंतर पुरवठा पुर्ववत करण्यात आला होता. त्यावेळी महापौर सुनील कदम महापौर झाले होते. आता नूतन महापौर स्वाती यवलुजे यांच्या महापौर कार्यालय प्रवेशावेळी ही दुसरी कारवाई झाली. या योगायोगाची महापालिकेत चर्चा होती. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महापौरांच्या प्रवेशावेळी झालेल्या या कारवाईमुळे ओढवलेल्या नामुष्कीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांमधून होत आहे.
विज्ञान प्रबोधिनीने १९८९ साली काविळीने दोन महिलांचा मृत्यू झाल्यानंतर पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न मांडला होता. १६ डिसेंबर, १९९७ रोजी मुंबई हायकोर्टाने
महापालिकेला पाच वर्षात कामे पुर्ण करण्याचे आदेश दिले होते. पण त्या आदेशाला या महिन्यात २० वर्षे झाली तरी हा प्रश्न अजून प्रलंबित राहिला आहे. त्यामध्येच जयंती नाल्यावरील लाइन फुटली. त्यातून बाहेर पडणारे सांडपाणी पुर्ण नदी प्रदूषित करीत असल्याने तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता होती. पण शंभर दिवस होऊन गेले तरी अद्यापही नाल्यामध्ये पाया खोदाईचे काम सुरू आहे. अशा संथ प्रकारे चाललेल्या कामामुळे जानेवारी महिन्यातही काम पुर्ण होईल की नाही याबाबत शंका आहे. या परिस्थितीमुळे पंचगंगा नदीकाठावरील पुढील गावांमध्ये प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होऊ लागला असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली.

फौजदारी कारवाईची टांगती तलवार
प्रदूषणामुळे गंभीर बनलेल्या परिस्थितीमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर दूषित पाणी फेकण्याचे प्रकार झाले. या पार्श्वभूमीवर कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबून पहिल्या टप्प्यात वीज तोडली. त्यानंतर या परिस्थितीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यामध्ये पाणी प्रदूषणाबरोबर घनकचरा व्यवस्थापनाबाबतचा मुद्दाही समाविष्ट केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी मंत्री जयंत पाटील यांना मातृशोक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्री कुसुमताई राजारामबापू पाटील (वय ९५) यांचे शुक्रवारी निधन झाले. मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये गेले दोन आठवडे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी १.४५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी (ता.३०) कासेगाव येथे सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कुसुमताई यांच्या निधनाने वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली. कासेगाव शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये श्रद्धांजली वाहून दुपारचे कामकाज बंद ठेवण्यात आले. वाळवा तालुक्यातील विविध सामाजिक, सहकार, शिक्षण संस्थांच्या आवारात श्रद्धांजली वाहिली. काही गावे बंद ठेवण्यात आली.
१९२२ साली सातारा जिल्ह्यातील चरेगाव येथील एका साध्या आणि शेतकरी कुटुंबात कृष्णराव माने यांच्या पोटी कुसुमताईंचा जन्म झाला. एक भाऊ, चार बहिणी असा त्यांचा परिवार होता. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी त्या २६ मे १९४६ रोजी विवाहबद्ध झाल्या. विवाहानंतर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. बापूंसोबत त्यांनी ३८ वर्षे संसार केला. त्या आदर्श गृहिणी होत्या. लोकनेते राजारामबापू यांच्या अकाली निधनानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुला-मुलींचा सांभाळ केला. अत्यंत शांत स्वभावाच्या कुसुमताई ‘आईसाहेब’ नावाने परिचित होत्या. अलीकडे त्या मुंबईत वास्तव्यास होत्या. इस्लामपूर व परिसरातून आलेल्या माणसांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना त्या प्रेमाने वागवत. नुकताच कुटुंबीयांनी एकत्र येऊन त्यांचा ९५वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या जाण्याने वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
त्यांच्या पश्चात उद्योजक भगतसिंग पाटील, आमदार जयंत पाटील यांच्यासह कन्या राहुरीच्या माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई प्रसाद तनपुरे, विजया फत्तेसिंग जगताप (शिवाजीनगर, पुणे), नीलिमा नरेंद्र घुले-पाटील (अहमदनगर) अशा तीन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शनिवारी सकाळी साडेसात वाजता कासेगाव (ता. वाळवा) येथे त्यांचे पार्थिव आणण्यात येईल. आझाद विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवले जाईल. त्यानंतर अंत्ययात्रा निघेल. सकाळी दहा वाजता कासेगाव येथे कृष्णा नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निपाणी तालुक्याच्या मागणीसाठी मूक मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निपाणी
कर्नाटक सरकारने तालुका निर्मिती घोषणेत निपाणी तालुक्याला वगळले आहे. त्यामुळे सीमाभागातील तालुक्यावर अन्याय झाला आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी सर्वपक्षीय बैठक घेऊन शुक्रवारी सकाळी अकरा वाजता उपतहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात त्यामध्ये विविध सामाजिक संघटना, शहरवासीय व राजकीय नेते मंडळी सहभागी झाले होते. मोर्चानंतर विशेष तहसीलदार एन. बी. गेज्जी यांना निवेदन देण्यात आले. मंगळवारपर्यंत तालुका घोषित करून अमलबजावणी न झाल्यास सायंकाळी चार वाजता पालिकेत व्यापक बैठक घेऊन बुधवारी, तीन जानेवारीला निपाणी बंदचा इशारा देण्यात आला.
सकाळी आठ वाजल्यापासून बसस्थानक परिसर, साखरवाडी, बेळगाव नाका परिसरातील सर्वच व्यवसायिकांसह रिक्षा संघटनांनी आपले व्यवहार बंद ठेवून मूक मोर्चात सहभाग घेतला होता. सकाळी दहा वाजल्यापासूनच येथील धर्मवीर संभाजी चौकात शहरवासियांसह सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्रित जमली. त्यानंतर साखरवाडी, नगरपालिका कार्यालयामार्गे बेळगाव नाक्यापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. तेथून विशेष तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर सभेत रुपांतर झाले. या वेळी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी निवेदनाचे वाचन केले. नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, उपनगराध्यक्ष सुनील पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, लक्ष्मण चिंगळे, निपाणी भाग काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेश कदम यांच्या हस्ते विशेष तहसीलदार एन. बी. गेज्जी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर विविध मान्यवरांनी मनोगतातून निपाणी तालुक्याची अमलबजावणी तत्काळ न झाल्यास मतदारसंघ बंद ठेवण्यासह राज्य व महामार्ग रोखून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांमयासह नगरसेवकांनी सामूहिक आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांशी हुज्जत महाग पडणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाहतुकीचे नियम मोडून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे आता वाहनधारकांना महाग पडणार आहे. बेशिस्त वाहनधारकांचा पुरावा पोलिसांकडील बटन कॅमेऱ्यात कैद होणार आहे. वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी हा पुरावा महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अडवल्यानंतर आधी आपली चूक तपासून पाहा. अन्यथा तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बेशिस्त वाहनधारक आणि हुल्लडबाजांकडून वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रकार वारंवार घडतात. ट्रीपल सिट दुचाकी चालवणे, वन-वेतून बेदरकार वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे असे प्रकार नेहमीच घडतात. वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू होताच असे वाहनधारक पोलिसांनाच दमदाटी करतात. गेल्या वर्षभरात चार ठिकाणी हुल्लडबाज वाहनधारकांनी शहरात वाहतूक पोलिसांवर हात उचलला आहे. कायदेशीर कारवाई करताच पोलिसांनीच वाद घातल्याचा कांगावा वाहनधारक करतात. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांसाठी बटन कॅमेरे दिले आहेत. शहरातील गर्दीच्या दहा चौकात वाहतूक पोलिसांच्या शर्टला बटन कॅमेरे लावले जाणार आहेत.

बटनसारखे दिसणारे कॅमेरे वाहनधारकांना पटकन लक्षात येणार नाहीत. या कॅमेऱ्यांमध्ये वाहनधारकांचे चित्रीकरण आणि आवाजाचेही रेकॉर्डिंग होणार आहे. यात ८ जीबी मेमरी कार्ड आहे. एकाच वेळी यात अर्धा तासाचे चित्रीकरण होऊ शकते. हुज्जत घालणाऱ्या वाहनधारकांचे चित्रीकरण या कॅमेऱ्यात होते. हे चित्रीकरण वाहतूक नियंत्रण कार्यालयातील संगणकात साठवता येते. वाहनधारकांवर कायदेशीर कारवाईसाठी याचा वापर केला जाणार आहे. कोर्टात तक्रार दिल्यानंतर हे चित्रीकरणही सादर केले जाणार आहे.

शहरातील ताराराणी पुतळा चौक, दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, सीपीआर चौक, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीज चौक, भवानी मंडप, बिंदू चौक, रंकाळा या परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांकडे बटन कॅमेरे दिले जाणार आहेत. पोलिसांना कॅमेरे हाताळण्याचे प्रशिक्षणही दिले आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारपासूनच कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.


पोलिसांचा वचक वाढणार

वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारताच वाहनधारक स्वतःकडील मोबाइलमध्ये पोलिसांचे चित्रीकरण घेतात. स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. अनेकदा वादाचे प्रसंग हातघाईवरही जातात. वाहतूक पोलिसांकडील कॅमेरा सुरू आहे हे लक्षात येताच वाहनधारक नरमतील. वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.

--------

बेशिस्त वाहनधारकांमुळे शहरातील वाहतुकीची शिस्त बिघडते. काही ठिकाणी वाहतूक पोलिसांना मारहाणीच्याही घटना घडल्या आहेत. त्या टाळण्यासाठी आणि वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांना बटन कॅमेरे दिले आहेत. नक्कीच याचे चांगले परिणाम दिसतील.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या वर्षात ई वॉर्डात मुबलक पाणी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी वर्षामध्ये ई वॉर्डमधील विविध प्रभागांमधील ना​गरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नवीन शिंगणापूर योजनानंतर अडीच कोटी रुपये खर्च करुन गेल्यावर्षी टाकण्यात आलेली नवीन पाइपलाइन सोमवारपासून कार्यान्वित होणार असल्याचे शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने सांगितले. यामुळे ई वॉर्डला व्यवस्थित पाणीपुरवठा होईल.

ई वॉर्डमध्ये सातत्याने अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नवीन शिंगणापूर योजना राबवण्यात आली. या योजनेतून कसबा बावडा फिल्टर हाऊसकडे पाणी वळवण्यात आले. त्यातून कसबा बावडा आणि बावडा फिल्टर हाउसवर अवलंबून प्रभागांना पाणीपुरवठा झाला. पण ई वॉर्डमधील राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी पार्क, टेंबलाईवाडी परिसरातील प्रभागांना अजूनही कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्यासाठी नागरिकांची नेहमी तक्रार होती. नगरसेवकही सर्वसाधारण सभेत आवाज उठवत होते. शिंगणापूर योजनेची पाइपलाइन कळंबा फिल्टर हाऊसवरुन राजारामपुरीमार्गे कावळा नाका, राजारामपुरी, मार्केट यार्ड, टेंबलाई पाण्याच्या टाकीकडे जाते. पण या पाइपलाइनवर ठिकठिकाणी फाटे फोडण्यात आले असल्याने या चार टाकी पुर्ण क्षमतेने भरल्या जात नव्हत्या. परिणामी कदमवाडी, भोसलेवाडी, बापट कॅम्पपासून राजारामपुरीपर्यंत पाण्याची टंचाई होती. त्यासाठी कळंबा कारागृहापासून ई वॉर्डासाठी नवीन पाइपलाइन टाकली. त्यासाठी अडीच कोटी खर्च केले आहेत. या पाइपलाइनचे काम गेल्यावर्षी पुर्ण झाले. पण ती पाइपलाइन काही दिवसच सुरु करण्यात आली. त्यानंतर ही पाइपलाइन बंद होती. आता ती सोमवारी सुरु करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुसुमताई पाटीलयांच्यावर अंत्यसंस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्री कुसुमताई राजारामबापू पाटील यांना शनिवारी दुपारी कासेगाव (ता. वाळवा) येथे साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. वाळवा तालुक्यासह सांगली जिल्हा व राज्यातून आलेले हजारो कार्यकर्ते, मान्यवर, पदाधिकारी, नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर कृष्णा नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ चिरंजीव भगतसिंग पाटील, जयंत पाटील यांनी त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला. रक्षा विसर्जन सोमवारी, एक जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता कासेगाव येथे होणार आहे.
शनिवारी सकाळी आझाद विद्यालयाच्या प्रांगणात त्यांचे पार्थिव दर्शनासाठी आणण्यात आले. अत्यंत शोकाकूल वातावरणात अनेक मान्यवर, नातलगांच्यासह हजारो ग्रामस्थांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर पार्थिव त्यांच्या येथील घरी नेण्यात आले. येथे धार्मिक विधी झाल्यानंतर अंत्ययात्रा सुरू करण्यात आली. ज्ञानबा-तुकारामाचा उद्घोष आणि टाळ-मृदुंगांच्या गजरात ही अंत्ययात्रा गावाच्या मुख्य मार्गावरून पुढे सरकत होती. अनेक आबाल-वृद्ध, नादरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पार्थिवाचे दर्शन घेतले. दुपारी दीड वाजता कृष्णा नदीच्या तीरावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून त्यांना साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.
या वेळी राहुरीचे माजी आमदार प्रसादराव तनपुरे, पुण्याचे फत्तेसिंग जगताप, नेवाशाचे माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, शिराळयाचे सत्यजित देशमुख, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आदित्य पाटील, जनार्दन पाटील, सुरेंद्र पाटील, उदय पाटील, देवराज पाटील यांच्यासह कुटुंबातील सदस्य, व पाहुणे-नातलग व राजारामबापू समुहातील पदाधिकारी उपस्थित होते.
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आरपीआयचे प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, प्रकाश आवाडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, अॅड. उज्ज्वल निकम, अजितराव घोरपडे, राजेंद्र देशमुख, वैभव नायकवडी, रघुनाथदादा पाटील, जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निपाणीचा उरुस सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निपाणी
श्री. दस्तगीरसाहेब यांचा उरुस आणि वर्षअखेरीचा अनोखा योग यंदा जुळून आला आहे. ३० आणि ३१ डिसेंबर रोजी निपाणीत उरुस साजरा होत आहे. ३१ डिसेंबरचा वर्षअखेरीचा दिवसही रविवारी आला आहे. यामुळे निपाणीतील घराघरांमध्ये पाहुण्यांची अक्षरश: गर्दी उसळली आहे. संत बाबा महाराज चव्हाण यांचे वारस बाळासाहेब देसाई आणि परिवारातील सदस्यांच्या हस्ते विविध विधींनी निपाणीच्या उरुसाला प्रारंभ झाला आहे.
संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांचा उरुस २०१७ सालामध्ये दोन वेळा साजरा होत आहे. जानेवारीमध्ये निपाणीचा उरुस झाला होता. मुस्लीम दिनदर्शिकेनुसार १५ दिवस सण मागच्या तारखांना येतात. त्यानुसार ३० आणि ३१ डिसेंबर रोजी निपाणीचा उरुस होत आहे. उरुस आणि ३१ डिसेंबरच्या निमित्ताने मेजवाणीच्या पंगती उठत असून, तांबड्या पांढऱ्या रश्याच्या पार्ट्यांची रंगत वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images