Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कागलमध्ये तीनपासून शाहू व्याख्यानमाला

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल नगरपालिकेच्या वतीने ३ जानेवारी ते ७ जानेवारीअखेर शाहू व्याख्यानमालेचे आयोजन केल्याची माहिती नगराध्यक्षा माणिक माळी यांनी दिली. कागल नगरपालिकेच्यावतीने सन २००१ ला शाहू व्याख्यानमालेची सुरुवात झाली. यावर्षी १७ वी व्याख्यानमाला होत आहे. या विचारपीठावर महाराष्ट्रातील दिग्गज आणि नामवंत व्याख्यात्यांनी आपले मौल्यवान विचार दिल्याचे माळी यांनी सांगितले.

व्याख्यानमालेत राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक अशा नामवंत दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे. श्रोत्यांच्या भव्य मेजवानीमध्ये ३ जानेवारीला सोलापूरचे हास्यसम्राट दीपक देशपांडे (हास्यकल्लोळ), दि. ४ रोजी ठाण्याचे प्रसिद्ध जनकवी अरुण म्हात्रे (कवितांच्या गावा जावे), दि. ५ पुण्याचे पसिद्ध व्याख्याते श्रीपाल सबनीस (भारतीय लोकशाहीचे भवितव्य), दि. ६ रायगडचे प्रसिद्ध व्याख्याते प्रशांत देशमुख (असे होते शंभुराजे), दि. ७ कोल्हापूरचे चित्रपट समीक्षक प्रभाकर तांबट (हिंदी चित्रपट संगीताचा प्रवास) या व्याख्यात्यांचा सहभाग राहणार आहे. व्याख्यानमालेचे वर्षभर नियोजन असावे, दरवर्षी १ ते १० जानेवारीअखेर व्याख्यानमाला व्हावी, व्याख्यानमालेत शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सामावून घ्यावे त्याचबरोबर प्रत्येक वर्षी युवक महोत्सव साजरा करावा, अशा सूचना यावेळी मांडण्यात आल्या. खर्डेकर चौकातील हिंदुराव घाटगे शाळेच्या पटांगणावर ३ ते ७ जानेवारीअखेर सायंकाळी सात वाजता व्याख्यानमाला होत आहे. व्याख्यानमालेचा प्रारंभ व सांगता आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जोतिबा घाट मृत्यूचा सापळा

$
0
0

दीपक जाधव, पन्हाळा

श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात, त्याचप्रमाणे वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. जोतिबा देवस्थान डोंगरावर असल्याने ये-जा करताना वाहनांना मोठी कसरत करावी लागते. या मार्गावर अनेक धोकादायक वळणे आहेत. मात्र, वळणांवर संरक्षक कठडे नसल्याने येथून जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावा लागतो. त्यामुळे हा मार्ग म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. त्यामुळे वळणाकृती रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण कठडे बांधणे गरजेचे आहे. नुकत्याच कर्नाटकातील शालेच्या सहलीच्या बसला झालेल्या अपघातामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महाराष्ट्र, कर्नाटकसह अन्य राज्यांतून दररोज, तसेच दर रविवारी तसेच चैत्र यात्रेसाठी लाखो भाविक डोंगरावर दर्शनासाठी येत असतात. ठिकठिकाणी दुचाकी-चारचाकी वाहनांना वळणे घेत असताना गाडीचा ताबा सुटण्याची शक्यता अधिक असते. याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेणे गरजेचे आहे. जोतिबावर कोल्हापूरहून केर्लीमार्गे अनेक भाविक जात असतात. या मार्गावरून येत असताना वाहने अतिशय धोकादायक वळणे घेत असताना दिसून येतात. काही ठिकाणी जुन्या संरक्षण भिंती असूनही नसल्यासारख्या आहेत. त्याचप्रमाणे वारणा-कोडोली, कुशिरेमार्गे येणाऱ्या वाहनांना अशीच कसरत करावी लागते.

यमाई मंदिरापासून शासकीय विश्रामगृहाकडे येणारा रस्ता अत्यंत अवघड वळणाचा असून, याठिकाणी तातडीने संरक्षण कठडे बसविणे गरजेचे आहे; अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. डोंगराच्या चारही बाजूंनी ठिकठिकाणी वळणाकृती रस्ते असल्याने वाहनांचा वेग कमी व्हावा यासाठी रस्त्यांवर स्पीड ब्रेकरबरोबरच मध्ये पांढरा पट्टा मारणे गरजेचे आहे. याशिवाय पावसाळ्यात कधीही दरडी कोसळण्याची शक्यता असते. गिरोली घाट हा महत्त्वाचा मार्ग असून, याठिकाणी तातडीने संरक्षण कठडे नसल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. चैत्र यात्रेळी सासनकाठी देवाच्या दारात नेण्यासाठी भाविक ट्रक व अन्य अवजड वाहने डोंगरावर नेत असतात. पुढील अनर्थ होऊ नये यासाठी बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.


जोतिबा डोंगरावर येताना सर्वज बाजूंनी अवघड वळणे आहेत. त्यामुळे अवघड वळणांच्या ठिकाणी संरक्षक कठडे बांधणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. मात्र, हे काम तातडीने होणे गरजेचे आहे.

रिया सांगळे, सरपंच, जोतिबा डोंगर


कर्नाटकातील शाळेच्या सहलीच्या एका बसला नुकत्याच झालेल्या अपघाताने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याप्रश्नी लक्ष घालून तातडीने जोतिबा डोंगरावर जाणाऱ्या रस्त्यांवरील सर्वच वळणांवर संरक्षक कठडे बसविणे गरजेचे आहे.

अमृत कदम, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखरेवरील आयात कर शंभर टक्के वाढवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशांतर्गत बाजारात दीड महिन्यात साखरेच्या दरात प्रतिक्विंटल ४०० रुपयांनी घसरण झाल्याने साखर कारखानदारीसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. सद्य:स्थितीला साखरेवरील आयात कर ५० टक्के असून जागतिक व्यापार संघटनेच्या धोरणानुसार १५० टक्के आयात कर लावू शकत असल्याने आणि यासाठी वेगळा कर करण्याची आवश्यकता नसल्याने साखरेवरील आयात कर शंभर टक्के करावा, अशी मागणी इंडियन शुगर्स मिल्स असोसिएशन (इस्मा) या कारखानदारांच्या संघटनेने बुधवारी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडे केली.

मंत्रालयाचे सहसचिव सुभाषीश पांडा यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘हंगामाच्या सुरुवातीस साखरेचा प्रतिक्विंटल दर सरासरी चार हजार रुपये होता. पण हंगाम सुरू झाल्यापासून साखर दरात प्रचंड घसरण झाली आहे. पश्चिम व दक्षिण भारतात खुल्या बाजारातील साखरेचा दर ३,०५० तर उत्तर भारतात ३,३५० रुपयांपर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे साखर उद्योगासमोर अडचणी निर्माण होत आहेत. उत्पादन खर्चाएवढाही दर मिळत नसल्याने उत्पादकांना वाजवी व किफायतशीर दर (एफआरपी) देणे अशक्य होऊन थकीत रक्कम वाढत जाऊन कर्जातही वाढ होईल.’

‘पाकिस्तान सरकारने भारतात १५ लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अनुदान जाहीर केले असून सिंधप्रांत राज्याने केंद्रापेक्षा जास्त अनुदान देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भारतात साखर निर्यात करणे पाकिस्तानातील कारखानदारीला सुलभ होणार आहे. पाकिस्तानातील साखर भारतात दाखल झाल्यास पुन्हा साखर दरात घसरण होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानातील साखर रोखण्यासाठी आणि उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित दर देण्यासाठी आयात करात शंभर टक्के वाढ करण्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत साखरेवर ५० टक्के आयात कर आकारला जात असल्याने जागतिक व्यापार संघटनेच्या धोरणानुसार आयात कर वाढविण्यासाठी केंद्र सरकारला स्वतंत्र कायदा करावा लागणार नसल्याने आयात कर वाढवून साखर उद्योगाला उभारी देण्याची मागणी असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक अभिनाष वर्मा यांनी पांडा यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध संघांवर कारवाई सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

राज्य सरकारने निर्देश देऊनही ज्या सहकारी दूध संघांनी दुधाच्या दरात वाढ केलेली नाही, अशा राज्यातील ५० दूध संघांवर महाराष्ट्र सहकार अधिनियम १९६० च्या कलम ७९ ‘अ’ नुसार नोटिसा दिल्या आहेत. नोटिसानुसार दूध संघावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून खासगी संघांनाही सरकारच्या आदेशाचे पालन करण्यासंदर्भात धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती दुग्ध व पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी अधिवेशनात दिली. मंत्री जानकर यांनी यापूर्वी सहकारी संघांना दिलेल्या नोटिसा रद्द करत असल्याची घोषणा एक महिन्यापूर्वी केलेली असताना विधीमंडळात त्यांनी कारवाई सुरू असल्याचे सांगितल्याने सहकारी संघांवर कारवाइची टांगती तलवार कायम आहे.

सरकारने निर्देश देऊनही सोलापूर जिल्हा दूध संघ उत्पादकांना दूध दर कमी देत असल्याचे आमदार भारत भालके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी बोलताना मंत्री जानकर म्हणाले, ‘सरकारी आदेशाचे पालन न केल्याने राज्यातील ५० दूध संघांना कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत. ३० दिवसांत सरकारच्या आदेशाचे पालन न केल्याने ७९ ‘अ’ नुसार कारवाई सुरू आहे. दूध दरासंदर्भात दुग्ध व पशू संवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीचा अहवाल दोन महिन्यांत प्राप्त होणार आहे. तत्पुर्वी जानेवारी महिन्यात बैठक घेणार असल्याचे सांगितले.’

विधीमंडळात मंत्र्यांनी कारवाई सुरू असल्याचे स्पष्टीकरण दिलेले असले, तरी नोव्हेंबर मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या राज्यातील सहकारी दूध संघाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत कारवाईच्या नोटिसा मागे घेत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सहकारी संघांना काहीसा दिलासा मिळाला होता, पण शुक्रवारी पुन्हा मंत्री जानकर यांनी कारवाई सुरू असल्याचे सांगितल्याने सहकारी संघावर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दंडात्मक अथवा प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खासगी संघही रडारवर

शेतकरी संपानंतर दूध खरेदीदरात वाढ करण्याच्या निर्णय सरकारने जाहीर केला. राज्यातील अनेक सहकारी दूध संघांनी निर्णयाची अंमलबजावणी केली, पण सरकारचे आदेश खासगी संस्थांना बंधनकारक नसल्याने दरवाढीची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे सहकारी व खासगी दूध संघाच्या दूध खरेदीदरात मोठी तफावत निर्माण झाली. तसेच काही सहकारी संघांनी वाढवलेला दरही कमी केला. पण सरकारने आता सहकारी संघाबरोबर सरकारचे आदेश खासगी दूध संघांना बंधनकारक करण्यासंदर्भात धोरण आखले जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे खासगी दूध संघही रडारवर आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीची चौथी यादी प्रसिद्ध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजनेची स्थगित केलेली चौथी यादी पडताळणीनंतर अंतिम होऊन सांगली जिल्हा बँकेत अखेर पोहचली आहे. पहिल्या यादीशी मिळती-जुळतीच ही यादी आहे. यामध्ये पूर्वीच्या यादीपेक्षा कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ६४९ने वाढली आहे तर प्रोत्साहन अनुदानास पात्र शेतकऱ्यांची संख्या १० हजार ६८३ने घटली आहे. जिल्ह्यातील एकूण १८ हजार ४६३ शेतकऱ्यांना यादीत समाविष्ट करण्यात आले असून, त्यांना ३० कोटी २३ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.
सांगली जिल्ह्यातील ७० हजार २४२ शेतकऱ्यांना १५३ कोटी ३ लाख ५२ हजार ९६४ रुपये कर्जमाफी झाली आहे. कर्जमाफीच्या चौथ्या यादीत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान आणि निकषावरील कर्जमाफीतून जिल्ह्यातील २१ हजार ९२२ शेतकऱ्यांना ६१ कोटी ६० लाख रुपये मिळाले. राज्य सरकारने त्यानंतर जाहीर केलेल्या सुधारीत यादीत पुन्हा ५ कोटी रुपयांची कात्री लावली आहे. पहिल्यांदा आलेल्या चौथ्या यादीत ३०७४ शेतकऱ्यांचे १०७८ कोटींचे कर्जमाफ करण्यात आल्याचे कळवले होते. २५ हजार ४२३ शेतकऱ्यांना ३९ कोटी २० लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मंजूर केले होते तर ७९९ शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीस पात्र ठरवले होते. या चौथ्या ग्रीन यादीवरून राज्यभर गोंधळ उडाला. आमदार प्रकाश आबिटकर यांनी अर्ज केलेला नसताना त्यांचे नाव चौथ्या यादीत आल्याचे समोर आले. अशी अनेक नावे यामध्ये आल्याच्या तकारी येऊ लागल्या. अधिवेशनात यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. अखेर सरकारने ही चौथी यादी थांबवण्याचा निर्णय घेतला. आठ दिवस झाले तरी चौथी ग्रीन यादी अंतिम होत नव्हती. अखेर शुक्रवारी ही यादी अंतिम होऊन रात्री उशिरा जिल्हा बँकांकडे प्राप्त झाली.
चौथ्या अंतिम यादीत जिल्ह्यातील ३ हजार ७२३ शेतकऱ्यांना १३ कोटी ५६ लाख २७ हजार रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. १४ हजार ७४० शेतकऱ्यांना १६ कोटी ६७ लाख ६४ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मंजूर झाले आहे. या शिवाय ८०४ शेतकऱ्यांना दीड लाख पर्यंतची सवलत जाहीर झाली आहे. एकूण १८ हजार ४६३ शेतकऱ्यांना ३० कोटी २३ लाख ९१ हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनिकेत कोथळे कुटुंबीयांना मदतीचा हात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
निंदनीय आणि लांच्छनास्पद घटनेत अनिकेत कोथळेच्या रुपाने आपला बाप गमावलेल्या तान्हुल्या प्रांजलीला आपण बाप मिळवून देऊ शकत नाही. परंतु, तिचे भविष्य मायेच्या ममतेतून आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उज्वल करू शकतो. अनिकेतच्या पत्नीसह कोथळे कुटुंबाच्या अडचणींना धावून येऊन भक्कम आधार देता येणे शक्य आहे. या भावनेतूनच आपण प्रांजलीच्या शिक्षणापासून ते पालनपोषणाच्या खर्चापर्यंतची जबाबदारी घेतली आहे. कोथळे कुटुंबालाही अधून-मधून अर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतल्याचे हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील म्हणाल्या.
हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील या शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली येथील दीर, जावांसह सांगलीत दाखल झाल्या. त्यांच्या पाच बहिणी आणि त्यांच्या मुलांचा गोतावळाही बरोबर होता. कोथळेंच्या घरी त्यांचा लवाजमा येताच सर्वपक्षीय कृती समितीने झाडाचे रोपटे देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आलेल्या प्रत्येकांनी आपण स्वतःहून खरेदी केलेल्या भेट वस्तू घेऊन प्रांजलीच्या दिशेने धावले. यामध्ये अगदी चार वर्षे वयाच्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत व्यक्तींचा समावेश होता. कोणी बाहुली, कोणी चेंडू, कोणी कपडे तर कोणी खाऊ, अशा वस्तू आणल्या होत्या. काही क्षणात प्रांजली आणि तिची आई आपुलकीत न्हाऊन निघाल्या. अनिकेतची आई, भाऊ आणि इतर नातेवाईकांचे डोळे पानावले. क्षणभर वातावरण धीर गंभीर झाल्याने पोलिस उपअधीक्षक पाटील यांनाही आश्रू आवरणे कठीण झाले. त्यानंतर त्यांनी २५ हजार रुपयांचा धनादेश कोथळे कुटुंबीयांकडे सूपूर्द केला.
पत्रकारांशी बोलताना सुजाता पाटील म्हणाल्या, ‘सांगली शहर पोलिसांच्या कोठडीत अनिकेतचा बळी जाण्याची लांच्छनास्पद घटना घडली. छोट्या प्रांजलीचा बाप, संध्याचा पती आणि अलका कोथळे यांचा मुलगा गेल्याने तीन महिलांचे छत्र हरपलेय. या तीनही महिला रस्त्यावर आल्यासारखी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर एक महिला म्हणून मदतीचा हात पुढे करण्याचा आपला निर्णय समस्त कुटुंबीयांना सांगितला. विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील आणि कोथळे कुटुंबीयांकडे प्रांजलीच्या पालकत्वा बाबत चर्चा केली. मुळचे कोल्हापूरच्याच असलेल्या कुटुंबीयांनी उस्फूर्तपणे पाठिंबा दिला. अनिकेतच्या संदर्भातील घटनेने पोलिस दल डागाळले गेले असले तरी सर्वच पोलिस वाईट नाहीत. आपण वरिष्ठ अधिकारी असल्याने मिळणाऱ्या वेतनातून प्रांजली आणि तिच्या आईचा खर्च उचलू शकते. माझी मुले मोठी आणि कळती असल्याने या पुढे प्रांजलीचे भविष उज्ज्वल करण्यावर आणि अनिकेतची पत्नी संध्या हिला आमच्या व्यापक प्रमाणात विस्तारलेल्या शिक्षण संस्थेत नोकरी देऊन स्थिरस्थावर करण्यासाठी अखंड प्रयत्न करणार आहे. प्रांजलीला तिच्या आईच्या कुशीतच राहण्याची संधी देऊन तिच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चाची जबाबदारी पाटील कुटुंबीयांनी घेतली आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक चोरी प्रकरणीकोल्हापूर पोलिसांचा तपास सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
चोरलेल्या ट्रकचे भंगार करणाऱ्या टोळीने महाराष्ट्रासह कर्नाटकाच्या काही भागात ट्रक चोरी केल्याचे समोर येत आहे. कागवाड आणि सावंतवाडीच्या पोलिसांनी संबधित टोळीबाबत माहिती घेतली असून, कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नरवरील गाडी अड्डा परिसरातील चाळीस भंगार दुकानात चोरीस गेलेल्या जड वाहनांचे भंगाररुपी भाग विभागले असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केल्याचे सांगलीच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक राजन माने यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.
दहा चाकींसारख्या ट्रकची चोरी केल्यानंतर गॅस कटरच्या माध्यमातून त्या ट्रकची मोडतोड करून भंगारात विकून मोकळी होणारी टोळी सांगली पोलिसांनी उघडकीस आणली. त्यानंतर कोल्हापुरातील परवेझ पटेल याच्या एकट्याच्या भंगार दुकानातून तीन ते चार ट्रकचे भाग मिळाले आहेत. ही कारवाई सुरू असताना पोलिसांनी संपूर्ण बाजारावर नजर टाकली असता इतर ठिकाणीही अशा प्रकारचेच जड वाहनांचे भाग दिसत होते. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आहे. सांगली जिल्ह्यातून एकूण सात ट्रक चोरीला गेले आहेत. अशा प्रकारची चोरी करणारी आणखी एक टोळी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. कागवाड आणि सावंतवाडीच्या पोलिसांनी सांगली पोलिसांनी कारवाई वेळी जप्त केलेल्या चेसीस क्रमांकांची यादी घेऊन चौकशी सुरू केली आहे. या टोळीने कोल्हापूरातूनही एक ट्रक चोरल्याने कोल्हापूर पोलिसांकडून या टोळीला अटक होण्याचीही शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभायरण्यानजीकच्या खासगी जमिनीखाली पांडुरंग घाडगे याने गाढलेले शेकडो ट्रकचे सांगाडे खोदून काढण्यात आले होते. या कारवाईने खळबळ उडाली होती. चोरट्यांनी जीपीआरएसची यंत्रणा असलेल्या टँकरची चोरी केली. त्यामुळे टँकरचे भंगारात रुपांतर केले जात असतानाच पोलिसांनी छापा घालून टोळीला गजाआड केले होते. त्या घटनेला पुन्हा उजाळा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेच्या पायथा वीजगृहातीललाईटनिंग अरेस्टर फुटून आवाज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
कोयना धरणाच्या पायथा वीजगृहात शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खबरदारीसाठी बसविलेले स्वीच यार्डमधील लाईटनिंग अरेस्टर उपकरण फुटून मोठा आवाज झाला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. फुटलेले उपकरण बदलून वीजपुरवठा त्वरीत पुर्ववत करण्यात आल्याची माहिती महाजनकोच्या पोपळी येथील कार्यालयाचे मुख्य अभियंता अभियंता चंद्रशेखर बाबर यांनी शनिवारी दिली.
२२० केव्ही वीज वाहिनीला अडथळा आला तर खबरदारीसाठी बसविलेले स्वीच यार्डमधील लाईटनिंग अरेस्टर उपकरण फुटल्याने त्याचा स्फोट होऊन मोठा आवाज झाला होता. या उपकरणाची व्यवस्था वीज वाहिनीला धोका उत्पन्न झाला तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केलेला असतो. पायथा वीजगृह व कोयना धरणा सुरक्षित आहे. सध्या या वाहिनीतील फुटलेले उपकरण बदलून त्वरीत वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे.
कोयना धरणाच्या पायथा वीजगृह ते पोपळी अशा २२० केव्हीच्या दोन वीज वाहिन्या आहेत. कोणत्याही वीज वाहिनीत अडथळा निर्माण झाला तर त्याचा वीजगृहावर परिणाम होऊ नये. तसेच संपूर्ण यंत्रणा सुरक्षित रहावी यासाठी लाईटनिंग अरेस्टर उपकरण बसविण्यात आले होते. एका वाहिनीचे लाईटनिंग अरेस्टर उपकरण फुटले असले तरी दुसरी वीज वाहिनी सुरू आहे. त्याचा वीजगृहावर कोणताही परिणाम झालेला नाही.
असे काम करते लाईटनिंग अरेस्टर
लाईटनिंग अरेस्टर २२० केव्ही वीज वाहिनीवर नियंत्रण ठेवते. वीजगृहातून निर्माण झालेली वीज २२० केव्ही वीज वाहिनीतून वाहून नेली जात असताना, या वाहिनीला एखाद्या झाडाच्या फांदीचा स्पर्श झाला. वादळी वाऱ्यात वाहिनी तुटली अथवा वीज चमकत असताना चमकणाऱ्या विजेतील करंट हे उपकरण खेचून घेते. त्यामुळे या उपकरणावर विजेचा जास्त दाब पडतो. तो नियंत्रित करणे व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी लाईटनिंग अरेस्टर उपकरण खबरदारीचा उपाय म्हणून बसविलेले असते. शुक्रवारी रात्री वीज वाहिनीला अडथळा निर्माण झाल्याने उपकरणाचा स्फोट झाला असावा, असेही बाबर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोगनोळी टोलनाक्याला कंटेनरची धडक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,कागल

कंटेनरची टोलनाक्याला धडक बसून झालेल्या अपघातात तिघे जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजता कोगनोळीनजीक घडली. अपघातात कंटेनरचे दोन भाग झाले असून सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. सिद्धलिंग कल्लाप्पा येळ्ळूर (वय ४२, रा. लेटेक्स कॉलनी निपाणी), मोहन नारायण टाकळे (वय ३५), सनीता कुमार वड्डर (वय २८) दोघेडही राहणार शिवाजीनगर, निपाणी अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आयशर कंटेनर क्र. (एमएच ०९ बीसी २७७६) हा बेळगाहून गोकुळ शिरगावच्या दिशेने चालला होता. दरम्यान कोनगोळी टोलनाक्यानजीक आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनरची टोलनाक्याला जोराची धडक बसली. यामध्ये कंटेनरचे दोन भाग झाले असून यातील तीन प्रवासी जखमी झाले. अपघात घडताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पुजलॉईड कंपनीचे आण्णाप्पा खराडे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना त्वरित खासगी वाहनातून महात्मा गांधी रुग्णालयात हलविले. त्यानंतर घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.

वाहनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे

हायवेवर बेदरकापणे वाहने चालविली जात असून त्यावर कोणतेही नियंत्रण नाही. काही चालक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून भरधाव वेगात वाहने चालवितात. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊण कोटीच्या प्लॉटची परस्पर विक्री

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बोगस व्यक्ती आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे राजोपाध्येनगरातील सहा गुंठे प्लॉटची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जागेच्या मालकीण आशा रामयाद यादव (वय ६२, रा. शिवशक्ती बंगला, नलवडे कॉलनी, प्रतिभानगर) यांनी शाहूपुरी पोलिसांत सहाजणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. परस्पर प्लॉट विक्रीचा महिन्यातील हा तिसरा प्रकार उघडकीस आल्याने महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्लॉट विक्री करणारी टोळी सक्रीय असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

विलास तुमाराम मेथे (रा. बोरीवडे, ता. पन्हाळा), प्रशांत मधुकर माने (रा. शास्त्रीनगर, सांगली), अशोक श्रीपाल पाटील (रा. झेंडा चौक, इचलकरंजी), विनोद रामचंद्र सुतार (रा. बिंदू चौक) व अन्य दोघांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामयाद यादव यांनी पंचवीस वर्षांपूर्वी राजोपाध्येनगरात तीन गुंठ्यांचे दोन प्लॉट खरेदी केले होते. यादव यांच्या मृत्यूनंतर पत्नी आशा यांनी दोन्ही प्लॉट स्वतःच्या नावावर करून घेतले. त्या आणि मुलगा असे दोघेच घरी असतात. अधूनमधून त्या प्लॉटकडे फेरी मारत होत्या. महिन्यापूर्वी त्या प्लॉटकडे गेल्या असता, त्यांना प्लॉटवर दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाचा फलक दिसला. हा फलक पाहिल्यानंतर यादव यांना जागेची परस्पर विक्री झाल्याचा संशय आला. फलकावरील मोबाइल नंबरवर त्यांनी फोन केल्यानंतर ही जागा विलास मेथे या व्यक्तीने खरेदी केल्याची माहिती मिळाली. आपण कुणालाही प्लॉट विकला नाही. प्लॉटची कागदपत्रे घरात आहेत, तरीही प्लॉटवर दुसऱ्याच व्यक्तीचे नाव असल्याने त्यांना धक्का बसला.

आशा यादव यांनी तातडीने नातेवाईकांच्या मदतीने कसबा बावडा येथील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन चौकशी केली. प्लॉटचे बनावट कागदपत्र हजर करुन सहा गुंठ्यांच्या प्लॉटची परस्पर विक्री केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी संशयित मेथे याच्यासह खरेदीपत्रकावर सह्या करणाऱ्या साक्षीदारांविरोधात शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. परस्पर प्लॉट विक्रीचा हा महिन्यातील तिसरा प्रकार उघडकीस आला आहे.


लँडमाफियांचे कारनामे

विलास मेथे हा पन्हाळा तालुक्यातील शेतकरी आहे. त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले गावातील लँडमाफियाने मेथे याला कमिशनचे आमिष दाखवून बनावट कागदपत्राआधारे त्याच्या नावावर चार प्लॉट खरेदी केले आहेत. अशी माहिती तपासात पुढे आली आहे. शाहूपुरी पोलिस लँडमाफियाच्या शोधात आहेत.


महसूल कर्मचाऱ्यांचीही चौकशी

साने गुरुजीनगर परिसरात एका वृद्धेच्या प्लॉटची परस्पर विक्री झाली आहे. यानंतर उजाळाईवाडीतील सुमारे एक कोटीचा प्लॉट परस्पर विकला. याबाबत पुण्यात राहणाऱ्या वृद्धाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. असाच तिसरा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून लाखोंच्या प्लॉटची परस्पर विक्री करणारे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्थानक नियंत्रण कक्ष पेटविला

$
0
0

म. टा. वृत्त्सेवा, कागल

येथील बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षाला अज्ञाताकडून शुक्रवारी रात्री आग लावण्यात आली. चोरीच्या उद्देशाने ही आग लावण्यात आल्याचा संशय आहे. चोरट्याने बसस्थानक परिसरातील दोन दुकानांची कुलूपे तोडली, मात्र सेंटर लॉकमुळे शटर उघडू शकले नाही. याच परिसरातील आयसीआय बँकेचे एटीएम मशीम फोडण्याचा प्रयत्न चोरट्याने केला. मात्र यामध्ये चोरट्याची हाती काहीही लागले नाही. त्यानंतर चोरट्याने साईमंदिर समोरील मोबाइल शॉपी फोडून त्यातील तीन मोबाइल लंपास केले. चोरट्याचे चित्रीकरण बसस्थानक परिसरातील दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.

दरम्यान कागल आगाराच्यावतीने कागल पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. ही आग मध्यरात्रीच्या वेळेस लावण्यात आली. वाहतूक नियंत्रण कक्षातील अनाउन्सिंगचे साहित्य, संगणक, सर्व्ह‌िस पासचे रेकॉड, खुर्च्या, फर्निचर आदी साहित्य जळून खाक झाले आहे. सुमारे दोन लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. पालिकेच्या अग्निशमन दलामया जवानांनी ही आग विझविली.

दरम्यान ,कागल नगरपालिकेला लागलेली आग व बसस्थानकाच्या नियंत्रण कक्षाला लावलेली आग या दोन्ही आगीमया घटना शुक्रवारच्या मध्यरात्रीच आहेत. तसेच आगीमया वेळाही सारख्याच असल्याची चर्चा आहे.

सीसीटीव्ही फुटेजप्रमाणे पहाटे अडीचनंतर आग लागल्याची माहिती मिळाली. फुटेजमध्ये एक व्यक्ती घटनास्थळी आल्याचे व गेल्याचे अस्पष्ट दिसत आहे. चोरीच्या उद्देशाने आलेल्या व्यक्तीने दगड घालून कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला असावा. सर्व साहित्य विस्कटून पैसे न मिळाल्याने आग लावली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभय कुरुंदकरचे अखेर निलंबन

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी, पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक महेश पाटील यांनी कुरुंदकरच्या निलंबनाचा आदेश काढला. अटकेनंतर पोलिस कर्मचारी किंवा अधिकारी ४८ तास पोलिस कोठडीत राहत असेल तर त्याच्यावर आपोआप निलंबनाची कारवाई होते, असा नियम आहे. कुरुंदकरबाबतीत मात्र निलंबनाचा आदेश काढण्यात तब्बल १५ दिवसांचा कालावधी लागला आहे. दरम्यान, दोन्ही संशयितांनी ब्रेन मॅपिंग चाचणीस नकार दिल्याचे सूत्रांकडून समजते.

पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांना बेपत्ता केल्याप्रकरणी ठाणे ग्राणीण पोलिसांनी दीड वर्षांनंतर संशयित अभय कुरुंदकर याला ७ डिसेंबरला अटक केली. यानंतर दुसरा संशयित आरोपी राजेश पाटील यालाही अटक केली. सध्या दोन्ही संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. कोणताही पोलिस कर्मचारी किंवा अधिकारी एखाद्या अरोपात ४८ तासांहून अधिक पोलिस कोठडीत असेल तर त्याचे निलंबन होते, असा नियम आहे. अभय कुरुंदकर याला अटक केल्यानंतर ठाणे ग्रामीणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुरुंदकरवर निलंबनाची कारवाई करण्यास टाळाटाळ केली. याबाबत बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त करीत वरिष्ठ पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली होती. यावरून नागपूर अधिवेशनात विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरल्यानंतर अखेर कुरुंदकर याच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आला आहे. ठाणे ग्रामीणचे अधीक्षक पाटील यांनी शनिवारी कुरुंदकरच्या निलंबन आदेशावर सही केली.

दरम्यान, अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील हे दोघे तपासात सहकार्य करीत नसल्याने त्यांची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याची परवानगी पोलिसांनी पनवेल कोर्टात मागितली होती. कुरुंदकर आणि पाटील या दोघांनीही ब्रेन मॅपिंगसाठी नकार दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी दोन्ही संशयितांची नार्को टेस्ट करावी, असा आग्रह धरला आहे. त्याचबरोबर ठाणे ग्रामीण पोलिस संशयितांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरातील भंगार दुकाने पोलिसांच्या रडारावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातून ट्रक, डम्पर चोरुन त्याचे स्पेअरपार्ट विकणाऱ्या टोळीकडून सांगलीतील एका ट्रक चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. सांगलीतून सात ट्रक चोरीला गेले आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषणने ट्रक चोरणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. हे चोरटे सांगलीसह, कोल्हापूर जिल्ह्यातून ट्रक चोरून सुटेभाग करून कोल्हापूर येथे विकत होते. असे सुटे भाग विकत घेणारी सुमारे ४० दुकाने पोलिसांच्या रडारवर आहेत. यातील बहुतेक दुकाने ही कोल्हापुरातील आहेत.
या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी टोळीतील चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन वाहनांसह वाहनांचे सुटे भाग मिळून सुमारे २२ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. अटक केलेल्यांमध्ये अनिस रशीद चौधरी (वय २७, रा. खंडोबानगर, मलकापूर, ता. कराड), मंगू तुकाराम घुणके (वय ३०, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज), आसिफ राजू शेख (वय ३३, रा. सुतार प्लॉट, कोल्हापूर रोड, सांगली) व परवेज सादखान पटेल (वय ४१, रा. साळे गल्ली, सोमवार पेठ, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.
अनिस चौधरी व मंगू घुणके यांनी नोव्हेंबर २०१६मध्ये सांगलीतील ईदगाह मैदानाजवळील मैदानातून ट्रक चोरले. त्यांच्या या कृत्यामध्ये त्यांच्यासोबत आसिफ शेख व परवेज पटेल या दोघांचाही सहभाग आहे. हे ट्रक चोरुन ते पटेलकडे घेवून जात. त्याच्या भंगार विक्रीच्या दुकानात ते ट्रकचे सुटे भाग करीत. त्यानंतर पटेल हा स्वत:च्या दुकानातून त्याची विक्री करायचा. कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नरवरील गाडी अड्डा येथील अनेक दुकानांमध्ये चोरीच्या ट्रकचे सुटे भाग खरेदी-विक्री होत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासामधून समोर आली आहे. या टोळीकडून सांगलीतून चोरलेल्या एका ट्रकचोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवठेमहांकाळमध्येड्रायपोर्ट करण्याला विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘विकासाच्या नावाखाली अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या माध्यमातून धनगर समाजाला देण्यात आलेली जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये भाजपचे खासदार अग्रस्थानी आहेत. यापूर्वीही अनेक राजकारण्यांनी असा प्रयत्न करून पाहिला आहे. आता ड्रायपोर्टच्या नावाखाली राज्य सरकारने जागा घेण्याचा प्रयत्न केला तर धनगर समाज सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरेल,’ असा इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला.
शेंडगे म्हणाले, ‘ड्रायपोर्टला आमचा विरोध नाही. देशातला सर्वात मोठा ड्रायपोर्ट दिल्लीत तुकलदाबादमध्ये आहे. त्याचे क्षेत्र सुमारे ४४ हेक्टर म्हणजे सर्वसाधारणपणे १०० एकर आहे. इतकी जागा जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी सहजपणे उपलब्ध होऊ शकते. रांजणी परिसरातच सुमारे ५०० एकराचे गायरान आहे. असे असताना त्यांना शेळी-मेंढी विकास महामंडळाचीच जमीन कशासाठी हवी आहे. १९७४मध्ये माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांच्या विनंतीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी धनगर समाजाच्या विकासासाठी या मंडळाची स्थापना केली. सुमारे २२०० एकर जमीन आहे. अधुनिक पद्धतीने शेळ्या-मेढ्यांचा विकास, त्यांची पैदास, संशोधन, प्रक्रिया उद्योग आणि प्रदर्शन या पातळीवर त्या ठिकाणी काम सुरू आहे. संबधित जागा मोठी वाटत असली तरी तितका परिसर शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी आवश्यक आहे. यापैकी काही जागा धनगर समाजाला शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी भाडेतत्वावर द्यावी, म्हणून आमचा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. ज्या हेतूसाठी जागा आहे, त्यांना सरकार जागा देत नसेल आणि केंद्र सरकारच्या ड्रायपोर्टसाठी मंडळाच्या मालकीची जागा देत असेल तर त्याला आमचा कडाडून विरोध राहील.’
खासदार संजय पाटील यांची आक्रमकतेने चार पावले पुढे टाकून स्वतःला झोकून देऊन गतीने काम करण्याची पद्धत आहे, असा उपरोधात्मक टोला लगावून शेंडगे म्हणाले, ‘खासदारांबरोबर काही भाजप नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून ड्रायपोर्टसाठी प्रयत्न चालविले आहेत. अद्यापही संबधित जागा महामंडळाच्या ताब्यात आहे. हस्तांतरण झालेले नाही. तरीही ड्रायपोर्ट आणि फूड पार्कच्या निविदा निघाल्याचे कोणी सांगत असेल तर ते बेकायदा आहे. आपण नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय पाटील या सर्वांच्या भेटी घेऊन संबधित जागेचे वास्तव लक्षात आणून देणार आहोत. धनगर समाजाच्या व्यथा सांगणार आहोत. त्या ठिकाणची एक इंचही जागा घेण्याचा अधिकारी नाही. त्यातूनही जागा हडपण्याचा हेतू ठेऊन कोणी सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणची जागा हस्तांतरण करण्याचा प्रयत्न केल्यास समाज गप्प बसणार नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापिकेच्या निलंबनाची चालढकल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अभ्यास केला नाही म्हणून विद्या‌र्थिनीस उठाबशाची शिक्षा दिलेल्या चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रुक येथील श्री भावेश्वरी संदेश विद्यालयातील मुख्याध्यापिका अश्विनी देवाण यांना अटक झाली. तरीही माध्यमिक शिक्षण प्रशासन त्यांच्यावर ठोस कारवाई करण्याचे धाडस केले नाही. हिवाळी अधिवेशनात प्रश्न गाजूनही प्रशासनाच्या आशीर्वादामुळे आणि संस्था चालकांच्या पाठबळामुळे त्यांना काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठवायचे आणि पुन्हा कामावर घ्यायचे असा प्रयत्न सुरू आहे. प्रशासनानेही कारवाई टाळण्यासाठी ‘वाटाघाटी’ सुरू केल्या आहेत का? असा सवाल शैक्षणिक क्षेत्रात विचारला जात आहे.

गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून ५०० उठाबशाची शिक्षा भोगताना विद्यार्थीनी विजया चौगुले हिच्या पायांना गंभीर इजा झाली. माध्यमांतून हे प्रकरण पुढे आल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत तिच्यावर मुंबईत केइएम येथे उपचार केले. आई सुनीता चौगुले यांन‌ी दिलेल्या फिर्यादीवरून मुख्याध्यापिका देवाण यांना अटक झाली. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यांना पुन्हा शाळेत रूजू होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

मुख्याध्यापिका, संस्था वादग्रस्त असतानाही घटना घडून १५ दिवस होऊनही त्यांच्यावर निलंबन, बडतर्फ अशी कठोर कारवाई होत नाही. यावरून शिक्षण प्रशासनची निष्क्रियता समोर येते. शिक्षकी पेशाला डाग लावणारा प्रकार राज्यात गाजला असतानाही ‌त्या मुख्याध्यापिकेला वाचवले जात आहे. दोषी मुख्याध्यापिका देवाण यांच्यावर संस्थाचालक कारवाई करीत नसतील तर शिक्षणाधिकारी, उपसंचालकांना कारवाईचे अधिकार आहेत. तरीही कारवाईसाठी प्रशासन संस्थाचालकांकडे बोट दाखवत आहे. एका मुलीच्या जीवावर प्रकरण बेतले असतानाही अटक झाल्यानंतर त्वरित निलंबन करण्याऐवजी प्रशासन कागदी घोडे नाचवत आहे. आता दबाव वाढत असल्याने देवाण यांना काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठवायचे आणि त्यानंतर पुन्हा रुजू करून घ्यायचे अशा हालचाली संस्थेने सुर केल्या आहेत.


तर पतीलाच करावे लागेल पत्नीचे निलंबन

मुख्याध्यापिका देवाण यांचे पती त्याच शाळेत शिक्षक, सचिव आहेत. इतर नातेवाईक संचालक आहेत. यामुळे मुख्याध्यापिका अश्विनी यांच्यावर कडक कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचविण्याच्या हालचाली सुरू आहेत. संस्था पातळीवरच देवाण यांच्यावर निलंबन, बडतर्फ अशा कारवाया झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा शिक्षण प्रशासन ठेवत आहे. यामागचे कोडे काही उलघडलेले नाही.

मुख्याध्यापिका देवाण यांच्यावर संस्थाचालकांनी कारवाई केली पाहिजे. त्यासंबंधीचा अहवाल मंगळवारी मिळेल. दरम्यान, विजया चौगुले व त्यांचे वडील निवृत्ती यांना दुसऱ्या शाळेत समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

किरण लोहार, शिक्षणाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटकांनी शहर फुलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सलग तीन दिवस आलेल्या सुटीमुळे शालेय सहली, पर्यटकांची प्रचंड गर्दी रविवारी कोल्हापुरात झाली. पर्यटक आणि वाहनांच्या गर्दीने कोल्हापूर फुलले. श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग एमएलजी हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, जोतिबा रोड, गुजरी कॉर्नर पर्यंत आली होती. भवानी मंडप आवारात दुतर्फा रांगा लागल्या. रविवारी सुमारे दीड लाखांवर भाविकांनी कोल्हापूरला भेट दिली. कोल्हापूरसह जोतिबा, पन्हाळा, नृसिंहवाडी, खिद्रापूरसह अन्य पर्यटन स्थळांवर गर्दी झाली.

पहाटे पाच वाजल्यापासून श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागली. शनिवार, रविवार आणि सोमवार सलग तीन दिवस सुट्यांची पर्वणी मिळाल्याने परगावच्या पर्यटक, भाविकांनी कोल्हापूरला पसंती दिली. मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, बेळगाव, गुजरात मधून पर्यटक कोल्हापुरात दाखल झाले. पर्यटकांच्या गर्दीने शहर दिवसभर हाउसफुल्ल झाले. अंबाबाई मंदिरात पहाटे पाच पासून सुरू असलेली गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम राहिली. दर्शनासाठी मंदिराच्या परिसरात भाविकांनी मोठ्या रांगा केल्या. विद्यापीठ हायस्कूलजवळील मंदिराच्या प्रवेशद्वारापासून भवानी मंडप, तुळजाभवानी मंदिर, एम. एल. जी. हायस्कूल पर्यंत भाविकांनी रांग केली. सरलष्कर भवन समोरील प्रवेशव्दाराच्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र देववस्थान व्यवस्थापन समितीने बॅरिकेट लावून गर्दीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. दिवसभरात भाविकांची वाढलेली गर्दीमुळे देवस्थान समिती आणि पोलिसांचे नियोजन कोलमडले. धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गसौदर्यंची उधळण करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला दिवसभरात दीड लाखांवर अधिक पर्यटकांनी भेट दिली.

अंबाबाई देवीचे दर्शनानंतर पर्यटक आणि भाविकांची सुरू झाला हा प्रवास रंकाळा चौपाटी, न्यू पॅलेस, कणेरी मठ, खिद्रापूर, जोतिबा आणि पन्हाळा या पर्यटनस्थळावर पूर्ण झाला. राजघाट वरून रंकाळा तलावावर पर्यटकांची गर्दी झाली. चौपाटी, तलावात बोटिंगचा आनंद, मिनी ट्रेन, घोड्यावर बसण्याचा आनंद पर्यटकांनी लुटला. न्यू पॅलेस येथील राजर्षी शाहू महाराज यांचे वस्तुसंग्रहालय, टाउन हॉल पाहण्यासाठी गर्दी झाली. पन्हाळा येथील तबक उद्यान, तीन दरवाजा, अंबरखाना येथे पर्यटकांची गर्दी झाली. जोतिबा डोंगरही भाविकांच्या गर्दीन फुलून गेला. त्यानंतर धार्मिक पर्यटनासाठी भाविक नृसिंहवाडीकडे रवाना झाले. पर्यटकांच्या गर्दीमुळे हॉटेल्स, लॉजिगवर रुम शिल्लक नसल्याचे फलक झळकले. कर्नाटक आणि कोकणाकडे जाताना कोल्हापूरसाठी एक दिवसांची पसंती पर्यटकांनी दिली. सलग मिळालेली तीन दिवस सुटीचे नियोजन काही पर्यटकांनी कोल्हापूर परिसरातील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी केले. त्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल्स हाउसफुल्ल झाली. पर्यटकांच्या गर्दीमुळे केएमटी, ऑटो रिक्षाच्या व्यवसायाला मोठी चालना मिळाली.

वाहतुकीची कोंडी

शहरात चारचाकी वाहनांचे पार्किग करण्यासाठी पर्यटकांना शोध घ्यावा लागला. बिंदू चौक, दसरा चौक, विद्यापीठ हायस्कूल, सरस्वती टॉकीज समोरील पार्किग फुल्ल झाल्याने पर्यटकांच्या चार चाकी आणि शालेय सहलींच्या मोठ्या रांगा लागल्या. शाहू स्टेडियम परिसर, ताराबाई रोडवर दुतर्फा वाहनांची गर्दी झाली. देवीच्या दर्शनानंतर अन्नछत्रासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे वाहनांची रांग ताराबाई रोडवरुन रंकाळा- जुना वाशी नाका रोडवर झाली. महाद्वार रोड, जोतिबा रोड परिसरातील लॉजिग आणि बोर्डिंगनी रुम उपलब्ध नसल्याचे फलक दर्शविले. रस्त्यावर ट्रॉफिक जाम झाले. महाद्वार रोड, बिंदू चौक, रंकाळा, लक्ष्मीपुरी चौकात वाहतूक विस्कळित झाली.


कोल्हापूर, जोतिबा, पन्हाळा दर्शन घेऊन कोकणाकडे पुढील पर्यटनांसाठी नियोजन केले. श्री अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. कमी वेळेत दर्शन मिळण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि पोलिसांनी नियोजन करण्याची गरज आहे. पार्किंगसाठी मंदिराच्या जवळपास जागा उपलब्ध नाही. अधिकाधिक सुविधा दिल्या पाहिजेत.

केदार हसबनीस, पुणे


मंदिराच्या पूर्वप्रवेशद्वारात मंडप उभारला. पोलिस प्रशासनाकडून जादा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. दर्शन मंडप उभारणीसह गर्दी टाळून नेटके दर्शनासाठी नियोजन केले आहे. भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. गर्दीच्या काळात देवस्थानचे जादा कर्मचारी नेमले आहेत.

धनाजी जाधव, व्यवस्थापक, देवस्थान समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापक संघात सत्तारुढांचा धुव्वा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडीने २५ पैकी २२ जागांवर विजय मिळवत डी. बी. पाटील यांच्या सत्तारूढ छत्रपती शाहू सत्तारूढ पॅनेलचा धुव्वा उडवत सत्तांतर घडवले. विजयाची खात्री असलेल्या सत्तारूढ पॅनेलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. संघाच्या इतिहासात प्रथमच सत्तारूढ मंडळाला आव्हान देत उभ्या ठाकलेल्या विरोधकांनी निवडणूक लढवून विजयाचा गुलालही उधळला. रात्री निकाल जाहीर होताच मुख्याध्यापक संघाचा आवार फटाक्यांच्या आतषबाजीने दुमदुमून गेला. ४४ वर्षांनी संस्थेत परिवर्तन झाले.

जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळीतील प्रमुख केंद्र असलेल्या मुख्याध्यापक संघाची त्रैवार्षिक निवडणूक रविवारी झाली. डी. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू सत्तारूढ पॅनेल विरुद्ध दादा लाड, दत्ता पाटील, बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडी अशा दुरंगी लढतीत एकूण ४९ उमेदवार रिंगणात होते. रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली होती. ७१० मतदारांपैकी ६९७ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. तीन केंद्रांवर मतदान झाले. ९८.१६ टक्के मतदान झाले. स्वाभिमानी पॅनेलचे २२ उमेदवार निवडून आल्यानंतर समर्थकांनी आतिषबाजी करत मोठा जल्लोष केला.

दुपारी चार वाजता मतमोजणीला सुरवात झाली. यात राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडीने सुरुवातीपासूनच सत्तारुढ छत्रपती शाहू सत्तारूढ पॅनेलला धक्का दिला. मतमोजणीवेळी आघाडीच्या उमेदवारांनी २२ जागांवर विजय मिळवला. तर सत्तारुढ गटाला अवघ्या तीन जागा राखता आल्या.

दरम्यान, सत्तारूढ शाहू पॅनेलचे नेते आणि विद्यमान अध्यक्ष विलास पोवार यांचा १८ मतांनी पराभव करत विरोधी स्वाभिमानी आघाडीच्या सुरेश संकपाळ यांनी अध्यक्षपदावर नाव कोरले. आघाडीचे नेते दत्तात्रय पाटील यांनी शाहू पॅनेलच्या दत्तात्रय घुगरे यांचा ६१ मतांनी पराभव करत सचिवपदासाठी विजयी पताका फडकवली. दोन उपाध्यक्षपदांपैकी एका पदावर मात्र डॉ. आनंदा पाटील यांनी सत्तारूढ शाहू पॅनेलची जागा राखण्यात यश मिळवले तर स्वभिमानीचे बाबासाहेब बुगडे यांची उपाध्यक्षपदावर विजयी वर्णी लागली.

संस्थेत ४९ वर्षांनंतर सत्ता बदल करण्यात आम्ही जे यश मिळाले आहे त्यामध्ये सर्व सभासदांचा मोठा वाटा आहे. याचा अर्थ सभासदांना संचालक मंडळाच्या सध्याच्या कामकाजात त्रुटी जाणवत होत्या हे स्पष्ट झाले. या विजयाने मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे, त्याचा उपयोग आदर्शवत काम करण्यासाठी व्यासपीठ म्हणून केला जाईल. चार दशकांची एकहाती सत्ता बदलून आमच्या हाती आले आहे, याचा आनंद नक्कीच आहे.

दादासाहेब लाड, पॅनेलप्रमुख, राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॅकरच्या धडकेतजयसिंगपुरात बालिका ठार

$
0
0

जयसिंगपूर



सांगली - कोल्हापूर महामार्गावर येथील उदगाव बँकेजवळ टँकर आणि स्प्लेंडर मोटारसायकलची धडक झाली. या अपघातात पाच वर्षीय संस्कृती अभिजीत कांबळे ही बालिका जागीच ठार झाली. तर तिचे वडील जखमी झाले. या अपघातानंतर संतप्त जमावाने टँकरवर दगडफेक केली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीहल्ला केला. यावेळी जमावाने जयसिंगपूर पोलिसांच्या जीपवरही हल्ला केला. रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, अपघातातील टँकर सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. तर संस्कृती आपल्या वडीलांसमवेत मोटरसायकलवरुन जात होती. शहरातील उदगाव बँकेजवळ टँकर व मोटरसायकलची धडक झाली. या अपघातात बालिका जागीच ठार झाली, तर तिचे वडील जखमी झाले. दरम्यान या अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला. संतप्त जमावाने टँकरवर दगडफेक केली, तसेच टँकरमधील ऑइलचे व्हॉल्व सोडले व टँकर पेटविण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठी हल्ला केला. यावेळी प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक सई भोरे - पाटील , विनायक नरळे , सांगली येथील गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष डोके , उपनिरीक्षक किरण दिडवाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली.

संतप्त जमावाने जयसिंगपूर पोलिसांच्या जीपवरही हल्ला करीत समोरील काच फोडली. पोलिसांनी जमावाला पांगवून रस्त्यावरील बालिकेचा मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी बालिकेच्या नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रोश केला. पोलिसांनी जयसिंगपूर नगरपालिकेच्या अग्निशमन पथकास पाचरण करुन रस्त्यावर सांडलेले ऑइल धुवून काढले. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशाळगड घाटातसहलीच्या बसला अपघात

$
0
0

शाहूवाडी

आंबा- विशाळगड (ता.शाहूवाडी) घाटातील केंबुर्णी फाट्यानजीक अपघाती वळणावर रविवारी सहलीच्या बसचा झाडावर आदळून झालेल्या अपघातात अकरा विद्यार्थ्यांसह तेराजण किरकोळ जखमी झाले आहेत. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला . शाहूवाडी पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.

पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, कोरोची (ता.हातकणंगले) येथील न्यू मिलेनियम पब्लिक स्कूल या शाळेतील दोन शिक्षक व २२ विद्यार्थी खासगी टाटा मिनी बस (एमएच ०९ सीए ८५०) घेवून विशाळगड (ता. शाहूवाडी) येथे सहलीकरीता निघाले होते. आंबा ते विशाळगड घाटातील केंबुर्णी फाटा परिसरातील एका धोकादायक वळण उतारावर बसचे ब्रेक निकामी झाल्याचे समजताच बसचालकाने प्रसंगावधानाने ही बस रस्त्याकडेला घेऊन मोठ्या झाडावर आदळली. या अपघातात बसचालक दिनेश प्रकाश बडवे (वय ३४, रा. इचलकरंजी), संगीता जिरे (शिक्षिका), अजय गुरव (शिक्षक) व दिशा न्यालचंद लोढा, तेजस्वी अनिल बेलेकर, महेश ओमप्रकाश शर्मा, अनिश दीपक पाटील, गोपाल रमाकांत सोनी, निशांत सचिन कोरवी, सत्यम रवींद्र सिंग, जान्हवी प्रदीप व्यास, प्रिया चंदरलाल जवानी, रिध्दी कमलेश बोहरा, मेघम प्रदीप कांबळे हे सर्व सातवी व आठवीच्या वर्गात शिकणारे १४ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. अपघातात बसचा पुढील भाग झाडावर आदळून दबल्यामुळे काही काळ अडकून पडलेल्या जखमी बसचालकाला नागरिकांनी बाहेर काढून लगेच उपचारासाठी पाठविले.

अपघाताची माहिती शाहूवाडी पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांनी सहाय्यक फौजदार शेडगे, पोलिस नाईक ढवळे, पोलिस शिपाई जाणकर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन १०८ या सरकारी रुग्णवाहिकेमधून अपघातग्रस्तांना मलकापूर ग्रामीण तसेच आंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सर्व जखमींवर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून किरकोळ दुखापत वगळता सर्व शिक्षक व विध्यार्थी सुखरूप असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डी. बी. पाटील यांच्या सत्तेला सुरूंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ४९ वर्षांपासून मुख्याध्यापक संघात छत्रपती शाहू पॅनेलच्या एकहाती सत्तेला सुरूंग लावत राजर्षी शाहू लोकशाही स्वाभिमानी आघाडीने चार दशकांनंतर सत्ताबदल केला. रविवारी झालेल्या मतमोजणीनंतर एक अध्यक्ष, दोनपैकी एक उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजानीस या पदांसह २२ जागांवर वर्चस्व मिळवत सत्ताधाऱ्यांची वर्चस्व मोडीत काढले. निकालानंतर फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर आ​णि गुलालाची उधळण करत सत्तापरिवर्तनाचा जल्लोष साजरा केला. अध्यक्षपदी लोकशाही स्वाभिमानी आघाडीच्या सुरेश संकपाळ यांनी विजयी सलामी दिली. तर आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या दत्तात्रय पाटील यांनी सचिवपदावर विजय मिळवला.

गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ मुख्याध्यापक संघ म्हणजे डी. बी. पाटील असे समीकरण होते. २०१३ मध्ये मुख्याध्यापक संघात प्रथमच निवडणुकीचा बिगुल वाजला. त्यावेळीही डी. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शाहू पॅनेलने बाजी मारली. यंदाच्या निवडणुकीतील प्रचाराची धुरा आणि पॅनेलचे नेतृत्व करणारे दादासाहेब लाड त्यावेळी डी. बी. पाटील यांच्या गटात होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत दादा लाड विरूद्ध डी. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढत झाली. दरम्यान या निवडणुकीसाठी अॅड. सुधाकर शेरेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

मुख्याध्यापक संघाच्या सत्तारूढ संचालक मंडळाविरोधात दादा लाड, दत्तात्रय पाटील आणि बाबासाहेब पाटील यांनी शड्डू ठोकला. सत्तारूढांच्या विरोधात राजर्षी शाहू लोकशाही स्वा​भिमानी आघाडीची बांधणी करत प्रचाराची रणनीती आखली. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व तालुके पिंजून काढत स्वाभिमानी आघाडीचा प्रचार केला. तर सत्तारूढ संचालक मंडळ शाहू पॅनेलच्या माध्यमातून रिंगणात उतरले. डी. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान अध्यक्ष व्ही. जी. पोवार, आर. वाय. पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. मात्र अखेर जिल्ह्यातील ६९७ मतदारांनी लोकशाही स्वाभिमानी आघाडीला कौल देत गेल्या ४९ वर्षांचा एकहाती सत्तेला सुरुंग लावला. मतमोजणीत २५ मते अवैध ठरली.

कपबशी आणि पतंगाच्या टोप्या

सत्तारूढ पॅनेलचे चिन्ह पतंग तर विरोधी पॅनेलचे चिन्ह कपबशी होते. या दोन्ही पॅनेलच्या समर्थकांनी ​आपापल्या चिन्हांचे चित्र असलेल्या पांढऱ्या गांधी टोप्या परिधान केल्या होत्या. सकाळी आठ वाजल्यापासून हे टोपीधारी समर्थक मुख्याध्यापक संघाच्या आवारात बसून होते. दुपारी चारनंतर मतमोजणीला सुरूवात झाली असता समर्थकांची गर्दी वाढायला लागली. यावेळीही या टोप्यांनी लक्ष वेधून घेतले.

ढोलताशा हलगी आ​णि आतषबाजी

सायंकाळी साडेसहा वाजता मतांचा कौल विरोधी आघाडीकडे असल्याचे चित्र दिसताच स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवार व समर्थकांनी एकच जल्लोष करायला सुरूवात केली. मतमोजणी कक्षात असलेल्या प्रतिनिधींमार्फत मोबाइल फोनवरून निकालाचे अपडेट येतील तशी जल्लोषात वाढ होत होती. सात वाजण्याच्या सुमारास संचालक मंडळापैकी दोन जागा वगळता सर्व जागा स्वाभिमानी आघाडीने जिंकल्याचे स्पष्ट होताच आतषबाजीने परिसर उजळून गेला. विजयी उमेदवारांवर गुलालाची उधळण करण्यात आली. तर आठ वाजता अध्यक्ष व उपाध्यक्षपदासह पदाधिकाऱ्यांच्या निवडीचाही निकाल जाहीर झाला आणि एकच जल्लोष करत मुख्याध्यापकांनी हलगीच्या ठेक्यावर नृत्य केले.

जवळपास ९८ टक्के मतदान झाल्यामुळे विजयाची खात्री होती. मात्र मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. संचालक मंडळात उपाध्यक्षपदापैकी एक उपाध्यक्ष व दोन सदस्य शाहू पॅनेलचे आहेत. त्यामुळे नव्या संचालक मंडळावर आमचा अंकुश असेल. नूतन संचालक मंडळाला सहकार्य केले जाईल.

व्ही. जी. पोवार, माजी अध्यक्ष, राजर्षी शाहू पॅनेल प्रमुख

विजयी उमेदवार

सुरेश संकपाळ (अध्यक्ष, ३५६ लोकशाही स्वाभिमानी आघाडी), बुगडे बाबासाहेब(३५६, उपाध्यक्ष),

डॉ. आनंद पाटील(३५१, उपाध्यक्ष, राजर्षी शाहू पॅनेल)

दत्तात्रय पाटील(३१७, सचिव) सुनील पसाले(३५४, सहसचिव)

नंदकुमार गाडेकर (खजानीस, ३६१)

संचालक (लोकशाही स्वाभिमानी आघाडी) अन्सारी महंमद अखलाक(३४५), संजय भांदुगरे (३६०) सखाराम चौकेकर(३४७), संजय देवेकर (३५८), बबन इंदुलकर(३५८), संपत कळके (३५५), श्रीशैल मठपती (३७३) रवींद्र मोरे (३६८), जितेंद्र म्हैशाळे (३५६) , गुलाब पाटील (३५९), जगन्नाथ पाटील (३७०) , श्रीकांत पाटील (३५१), प्रकाश पोवार (३७१), अजित रणदिवे (३६२), प्रदीप शिंदे (३४४), सुरेश उगारे (३३९), अनिता नवाळे (३४९) राजर्षी शाहू पॅनेल : सुनंदा भागवत (३२२), भगवंत पाटील (३३७)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images