Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

१२२ गुंडांच्या हद्दपारीचे प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘खासगी सावकारी, खुनाचा प्रयत्न, मारामारी, लूटमार अशा गंभीर गुन्ह्यात पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी पोलिसांनी प्रस्ताव सादर केले आहेत. यात शहरातील १० टोळ्यांमधील १२२ जणांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. लवकरच हद्दपारीची कारवाई होणार आहे’, अशी माहिती शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी अक्शन प्लॅन तयार केला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून पुन्हा-पुन्हा गुन्हे घडत आहेत, त्यामुळे सराईतांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. शहरातील चार पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत १० टोळ्यातील ८१ गुन्हेगारांवर कलम ५५ प्रमाणे, ४० गुन्हेगारांवर कलम ५६ आणि ५७ प्रमाणे, तर झोपडपट्टीदादा कलमांतर्गत २ अशा एकूण १२२ गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव तयार केले आहेत.

कलम ५५ प्रमाणे कारवाईचे प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयात सादर केले आहेत. कलम ५६, ५७ चे प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयात पाठवले आहेत. तर काही प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवले आहेत. प्रकाश बागडे (रा. मोरेवाडी) व मनोहर मिणेकर (रा. मोरेवाडी) यांच्यावर झोपडपट्टी अॅक्टनुसार कारवाई करण्याचा

प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.

शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पोलिस ठाण्यांकडून हे प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवले आहेत. यातील काही प्रस्ताव याआधीच मंजूर झाले असून त्यातील ज्यांची मुदत संपली आहे, त्यांच्यावर फेरप्रस्ताव पाठवले आहेत. संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून हे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती डॉ. अमृतकर यांनी दिली. दरम्यान, या प्रकारामुळे शहरातील गुंडगिरीला आळा बसण्यासाठी प्रयत्न होतील अशी अपेक्षा आहे.

हे होणार हद्दपार

मटका अड्ड्यांचा बुकी विजय लहू पाटील याच्यासह ६ साथीदार, बशीर अब्बास पटेकर याच्या टोळीतील १४, अजित संपत बागलसह ८, राहुल बाबू गायकवाडसह ५, आयुब खुदबुद्दीन जमादार याच्यासह २२, बबन कवाळेसह ५, सलीम मुल्लासह ६ अशा १२२ जणांचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरची बदनामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘सध्याच्या कर्जमाफी योजनेचे अपयश लपवण्यासाठी २००८च्या कर्जमाफीत जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे देण्यात आलेल्या कर्जमाफीत घोळ झाल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केला. त्यांनी हा आरोप सहकार विभागाने दिलेल्या चुकीच्या माहितीवर केला असावा. मुख्यमंत्री फडणवीस यांनी चुकीचा आरोप करून हायकोर्टचा अवमान करीत कोल्हापूर जिल्ह्याची, शेतकऱ्यांची बदनामी केली आहे’, असा आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केला.

आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘गेल्या सरकारच्या शेतकरी कर्जमाफीत माझा कार्यकर्ता युवराज पाटील यांना मोठी कर्जमाफी दिल्याचा उल्लेख फडणवीस यांनी केला. प्रत्यक्षात पाटील यांना कर्जमाफीचा लाभ झाला नाही. त्यांच्या मुलास १० लाखांची माफी मिळाली. हा संदर्भ घेत जिल्हा बँकेवर चुकीचा आरोप केला आहे. ‘क.म.’चा मुद्दा पुढे करून नाबार्डने बेकायदेशीरपणे लायसन रद्द करण्याची धमकी देऊन ११२ कोटी बँकेकडून परत घेतले. त्यामुळे ४४ हजार ६५९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. त्यांनी नाबार्डच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत अपात्र शेतकऱ्यांना कर्जामाफीचा लाभ देण्याचा आदेश नाबार्डला ‌दिला. असे असताना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा बँकेने चुकीची कर्जमाफी दिल्याचा आरोप करून हायकोर्टच्या आदेशाचा अवमान केला.’

आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘भाजप, शिवसेनेच्या कर्जमाफी योजनेत प्रचंड त्रुटी आहेत. ऑनलाइन अर्ज करताना शेतकऱ्यांना प्रचंड त्रास झाला. दिवाळीपूर्वी घाईत कर्जमाफीची प्रमाणपत्रे देण्यात आली. ती चुकीची असल्याने परत घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. वेळेत कर्जमाफी झाली नाही. अनेक त्रुटी आहेत. आयटी विभागाने घोळ केल्यानेच अर्ज न केलेल्यांनाही लाभ मिळत आहे.’

वाघ यांचा प्रस्ताव नाकारला

‘जिल्हा बँकेने सीईओ पदासाठी एस. टी. वाघ यांच्या नावाचा प्रस्ताव राज्य बँकेचे अध्यक्ष सुषदेव यांनी नाकारला’ अशी माहिती अध्यक्ष मुश्रीफ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस भरतीच्या आमिषाने फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस भरतीचे आमिष दाखवून हातकणंगले तालुक्यातील दोन तरुणांची १४ लाखांची फसणूक झाल्याचे उघड झाले. बाबासाहेब भाऊसाहेब शेंडगे (वय ५०, रा. तळंदगे, ता. हातकणंगले) याच्या विरोधात गुरुवारी (ता. १४) शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महेश सुभाष चव्हाण (२२, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) आणि अविनाश शंकर वडर (२४, रा. किणी, ता. हातकणंगले) या दोघांनी फिर्याद दिली आहे.

महेश चव्हाण आणि अविनाश वडर हे दोघे पोलिस भरतीसाठी प्रयत्न करीत होते. दरम्यान तळंदगे येथील बाबासाहेब शेंडगे यांच्याशी दोघांची ओळख झाली. शेंडगे याने दोघांनाही पुणे येथे पोलिस खात्यात वशिल्याने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने फेब्रुवारी २०१६ ते १४ डिसेंबर २०१७ दरम्यान वेळोवेळी महेश आणि अविनाश या दोघांकडून प्रत्येकी सात लाख रुपये घेतले. पैसे मिळाल्यानंतर १० दिवसांच्या आत नोकरीची ऑर्डर देतो, असे सांगितले होते. पैसे घेऊन बरेच दिवस उलटले तरीही त्याच्याकडून पुढे काहीच हालचाल झाली नाही. वारंवार विचारणा करूनही तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वडर आणि चव्हाण या दोघांनी १३ डिसेंबरला पेठवडगाव कोर्टात शेंडगे याच्याविरोधात तक्रार दाखल केली. कोर्टाच्या आदेशानुसार शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून, पोलिस संशयित शेंडगे याचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्विनीच्या मुलीची डीएनए टेस्ट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेपत्ता महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे हिचा शोध लागला नसल्याने खुनाची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दीड वर्षात मिळालेल्या बेवारस मृतदेहांमध्ये अश्विनीचा मृतदेह आहे काय? याचा शोध घेण्यासाठी अश्विनीच्या मुलीची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी अश्विनीच्या मुलीचे रक्ताचे नमुने घेतले. शिवाय पोलिसांकडून गुन्ह्यात वापरलेल्या कारचा शोध सुरू आहे. संशयित अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील या दोघांना पनवेल कोर्टात हजर केले असता, दोघांनाही कोर्टाने पुन्हा पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिंद्रे ११ एप्रिल २०१६ रोजी रात्री गायब झाली होती. त्यादरम्यान संशयित अभय कुरुंदकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील आणि अश्विनी बिंद्रे हे तिघेही भाईंदरमध्ये होते. या तिघांचेही मोबाइल लोकेशन एकाच ठिकाणी असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. दोन्ही संशयितांनी अश्विनीचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानुसार पोलिसांचा शोध सुरू आहे.

पुढच्या तपासासाठी अश्विनीच्या मुलीची डीएनए टेस्ट घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. शुक्रवारी मुलीच्या रक्ताचे नमुनेही घेतले. पोलिसांना अश्विनीच्या फ्लॅटवरून तिचे रक्ताने माखलेले कपडे मिळाली होती. हे कपडे सध्या कलिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये आहेत. कपड्यांवरील रक्ताची डीएनए टेस्ट होणार आहे. त्यानंतर गेल्या दीड वर्षातील बेवारस मृतदेहांच्या डीएनए टेस्टची पडताळणी केली जाणार आहे अशी माहिती पोलिसांनी गोरे कुटुंबीयांना दिली. संशयित कुरुंदकर आणि पाटील यांनी गुन्ह्यात कारचा वापर केला होता, असा पोलिसांना संशय आहे. पोलिस त्या कारचा शोध घेत आहेत. शुक्रवारी कोर्टात हजर केल्यानंतर या दोघांनाही कोर्टाने मंगळवारपर्यंत (ता. १९) पोलिस कोठडी वाढवली.

तपासात असहकार्य

पोलिस तपासात दोन्ही संशयित असहकार्य करीत आहेत. सुरुवातीला मिळालेल्या १० दिवसांच्या पोलिस कोठडीत अभय कुरुंदकरने तपास अधिकाऱ्यांना कोणतीच माहिती दिलेली नाही. पोलिसांनी दुसरा संशयित राजेंद्र पाटील याला अटक केल्यानंतर दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. या चौकशीत पाटील याच्याकडून काही महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली. कुरुंदकर याने मात्र मौन बाळगल्याने पोलिसांनी त्याची कोठडी वाढवून मागितली.

कुरुंदकरवर आणखी एक गुन्हा

अभय कुरुंदकर याने सहकारी महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिंद्रे हिच्याशी विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप अश्विनीच्या नातेवाईकांनी केला आहे. सरकारी कर्मचाऱ्याने विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे उघडकीस आल्यास कलम ४९७ नुसार त्याला पाच वर्षांचा कारावास आणि आर्थिक दंडाची शिक्षा होऊ शकते. कुरुंदकर आणि अश्विनी या दोघांच्या काही चित्रफितीही नातेवाईकांना मिळाल्या आहेत. या माहितीच्या आधारे अश्विनीचे पती राजू गोरे हे कळंबोली पोलिस ठाण्यात कुरुंदकरच्या विरोधात फिर्याद देत आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती राजू गोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातप्रकरणी रहाणेंना नोटीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल येथील अपघातात वृद्धेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्या वडिलांना चौकशीसाठी पोलिसांत हजार राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. दरम्यान, पूर्ण चौकशीअंती त्यांना न्यायालयात हजार केले जाणार आहे.

कागल बसस्थानकाशेजारील जोड पुलाजवळ महामार्ग ओलांडताना लक्ष्मीबाई दादासाहेब कांबळे (वय ६७, रा. इचलकरंजी) या वृद्ध महिलेचा गुरुवारी (ता. १४) सकाळी कारच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला. त्या कागलच्या अखिलेश पार्कमधील पाहुण्यांकडे आल्या होत्या. धडक दिलेल्या कारमध्ये क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकर रहाणे (वय ५२), आई सुजाता (वय ४९) ,भाऊ शशांक (वय २२), बहिण अपूर्वा (वय २५५) असे कुटुंबिय होते. मधुकर रहाणे हेच गाडी चालवत होते, कारच्या पुढच्या बाजूचा उजव्या बाजूचा टायर फुटला आणि वृद्धेला धडकून कार दुभाजाकावर आदळली, असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. मधुकर राहणे यांच्यावर महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, निष्काळजीपणे भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

तारकर्लीकडे जाणाऱ्या या कारने (एमएच ०३ - सीबी २०२१ ) जोराची धडक दिल्याने वृद्ध महिला रस्त्यावर आपटून त्यांना जोराचा मार बसला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डेमुक्तीचा उडाला फज्जा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या अखत्यारीतील जिल्ह्यातील २६१८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. मात्र टार्गेट पूर्ण करण्यासाठी केलेल्या या कामांचा दर्जा खराब असल्याने येत्या दोन ते तीन महिन्यांत पुन्हा खड्डे पडतील अशी स्थिती आहे. तर अनेक रस्त्यांवर सध्या खड्डे दिसत आहेत. खड्डेमुक्तीचा फज्जा उडाल्याचे चित्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहे.

दरम्यान, या खड्ड्यांसंदर्भात विचारणा केली असता ते रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाने हात झटकले आहेत. खड्डेमुक्तीसाठी सहा कोटी रुपये खर्च झाल्याचे विभागाचे म्हणणे आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खुड्डेमुक्त महाराष्ट्र मोहिमेची घोषणा करून खड्डे बुजवण्यासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत जाहीर केली होती. मात्र, पाच डिसेंबर रोजीच खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले आहे असा दावा करीत सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील २६१८ किलोमीटरचे रस्ते खड्डेमुक्त केल्याचे सांगितले आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, प्रमुख मार्ग, जिल्हा मार्ग, जिल्हा परिषदेकडील रस्ते अशी विभागणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे १०९६ किलोमीटर राज्य महामार्ग तर १५२२ किलोमीटरचे प्रमुख जिल्हा रस्ते आहेत. दरवर्षी पावसाळ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्याची मोहिम हाती घेतली जाते. ३१ डिसेंबरपूर्वी खड्डे बुजवण्याची नेहमीची मुदत होती. मात्र रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी खड्ड्यांसोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकल्याने आणि टीका होऊ लागल्याने युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले.



सहा कोटींचा खर्च

गेल्या दीड महिन्यांत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील खड्डे बुजवण्यात आले आहेत. त्यासाठी सहा कोटी रुपये खर्च आला आहे. त्यामध्ये कोल्हापूर गगनबावडा, कोल्हापूर गारगोटी गडहिंग्जल चंदगड रस्ता, बोरपाडळे वाठार हातकणंगले इचलकरंजी रस्ता, कोल्हापूर हुपरी रेंदाळ इचलकरंजी रस्ता यांचा समावेश आहे. या रस्त्यांवरील छोच्या घाटांवरही विशेष लक्ष देण्यात आले. खड्डे बुजवताना काही ठिकाणी पॅचवर्क तर काही ठिकाणी छोट्या लांबी-रुंदीचे रस्ते ठेकेदारांकडून करुन घेण्यात आले, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.


‘खड्ड्यांत गोलमाल’चा सेनेचा आरोप

मात्र, ठेकेदारांनी खड्डे बुजवताना कमी डांबर वापरणे, डांबरावर खडी पसरून कामे केली आहेत. कामे ठिकाणी दर्जाहिन झाली असल्याने दोन ते तीन दिवसात पुन्हा खड्डे पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठेकेदारांनी खराब साहित्य वापरुन खड्डे बुजवले आहेत, असा आरोप शिवसेनेने केला आहे. खराब काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजयाला मुंबईस हलवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कानूर बुद्रुक (ता. चंदगड) येथील श्री भावेश्वरी संदेश विद्यालयातील मुख्याध्यापिकेने उठाबशाची शिक्षा दिल्याने जखमी झालेली विद्यार्थिनी विजया चौगुले हिला शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता मुंबईतील केइएम हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. तिच्यावरील उपचाराच्या खर्चाची जबाबदारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली. त्यामुळे खर्चिक उपचारासाठी पैशाच्या विवंचनेत असलेल्या तिच्या आई, वडिलांना दिलासा मिळाला.

हिंदीचा गृहपाठ पूर्ण न केल्याने मुख्याध्यापिका अश्विनी देवाण यांनी विद्यार्थिनी विजया चौगुले यास ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. ‌३०० उठाबशा काढल्यानंतर विजया ही चक्कर येऊन कोसळली. गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात उपचार घेऊनही प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे ११ डिसेंबर रोजी तिला उपचारासाठी येथील सीपीआरमध्ये दाखल केले. येथे उपचार करूनही तिच्या पायाला होणारा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे मेंदूसंबंधी उपचारासाठी केईएम हॉस्पिटलमध्ये हलवले. त्यावेळी सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, प्रजासत्ताक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांच्यासह डॉक्टर उपस्थित होते.

दरम्यान, विजयाला मुंबईला हलवण्यापूर्वी चंदगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार यांनी सीपीआरमध्ये भेट घेतली. त्यांनी तिचा सविस्तर जबाब नोंदवला. जबाबावेळी विजयाने सर्व वस्तुस्थिती निरीक्षक पवार यांना सांगितली. जबाब घेतल्यानंतर तपास व्यापक करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. हायस्कूलच्या संस्थाचालकांच्या घरी जाऊन पोलिस जबाब नोंदवून घेणार आहेत. यापूर्वी अशा प्रकारची शिक्षा इतर विद्यार्थ्यांना दिली होती काय? अशी विचारणा करण्यात येणार आहे. सर्व घटकांचा जबाब नोंदवून तपास पूर्ण झाल्यानंतर विधी तज्ज्ञांचा सल्यानुसार देवाण यांच्यावरील खटल्यांतील कलमे वाढवण्यात येणार आहे.

मुख्याध्यापिकेला जामीन मंजूर

चंदगड : मुख्याध्यापिका देवण यांना गुरूवारी त्यांना अटक करुन चंदगड येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. शुक्रवारी त्यांची जामिनावर मुक्तता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिर प्रवेशापासून पाटणकरांना रोखले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिरात शुक्रवारी दर्शनासाठी आलेले ज्येष्ठ पुरोगामी नेते डॉ. भारत पाटणकर यांना सोवळे नेसले नसल्याने पुजाऱ्यांनी गाभाऱ्यात येण्यापासून रोखले. पुजाऱ्यांनी त्यांना चांदीच्या उंबऱ्याच्या आत प्रवेश नाकारला. यामुळे मंदिराच्या पेटीचौकातच पाटणकर यांनी पुजारी हटाओच्या घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, सोवळे नेसणे म्हणजे शुद्ध होणे. याचा अर्थ आम्ही सोवळ्याशिवाय शुद्ध नाही का? असा सवाल उपस्थित करत ही मूठभरांची मक्तेदारी असल्याचा आरोप डॉ. पाटणकर यांनी यावेळी केला.

शुक्रवारी सकाळी अकरा वाजता डॉ. पाटणकर अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आले. यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ संशोधक गेल ऑम्वेट व अन्य कार्यकर्ते होते. सुरूवातीला डॉ. पाटणकर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयात गेले. त्यांनी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ते पेटीचौकात आले. यावेळी पुजाऱ्यांनी त्यांना सोवळे नेसल्यानंतरच गाभाऱ्यात प्रवेश दिला जाईल, असे सांगितले. त्यावरून पाटणकर आणि पुजारी यांच्यात काहीसा वाद झाला. पाटणकर पुजाऱ्यांना म्हणाले, ‘महाराष्ट्रात कोणत्याही मंदिरात मूर्तीच्या चरणांना स्पर्श करून दर्शन घेता येते. मग अंबाबाई मंदिरातच गाभाऱ्यात जाण्यासाठी सोवळे नेसण्याचे बंधन कशासाठी? शिवाय सोवळे नेसले की शुद्ध होतो आणि अन्य कपडे परिधान केले असतील आम्ही अशुद्ध आहोत का? अंबाबाई ही आद्यदेवता आहे. सोवळ्याचा नियम कुणी ठरवला? मला प्रवेश मिळाला पाहिजे,’ अशी मागणी पुजाऱ्यांकडे केली. मात्र सोवळ्याशिवाय गाभाऱ्यात प्रवेश न देण्यावर पुजारी ठाम राहिल्याने पाटणकर व पुजारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर पाटणकर पेटीचौकापासूनच ‘पुजारी हटाओ,’ च्या घोषणा देत मंदिराबाहेर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ वादग्रस्त वधूवर सूचक केंद्राच्याचौकशीबाबत पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली
लग्नाचे अमीष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या सांगलीतील राजकिशोर वधूवर सूचक केंद्राच्या चौकशीबाबत पोलिसांनी कमालीचे दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. केंद्र चालकानी सीसीटीव्हीच्या डिव्हीआरपासून महत्वाच्या नोंदी आणि कागदपत्रे गायब केली असून, आपण काही केलेच नाही, असा आव आणून केंद्र उघडून बसणाऱ्यांना शनिवारी महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरून जाब विचारला. संबधित अपार्टमेंटमधील इतर रहिवाशांनी या केंद्रात भलतच काहीतरी चालत असल्याची वारंवार तक्रार केली होती. तरीही पोलिसांनी दखल घेतली नसल्याचे शनिवारी समोर आले.
सांगलीत आपटा पोलिस चौकीच्या समोरील अपार्टमेंटमधील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राजकिशोर वधूवर सूचक केंद्राचा थाट आणि रचना, अलिशान फर्निचर, पोस्टरनी सजविलेल्या भिंती पाहिल्या की, एखादा अद्यावत स्टुडीओही फिका पडेल. त्या ठिकाणी मेकअपच्या तयारीपासून ते कपडे, लग्नात वापरण्याच्या चप्पलपर्यंत सर्व काही उपलब्ध होते. २१ वर्षांच्या तरुण-तरुणींपासून ते ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत विवाह इच्छुकांच्या फोटोच ढिगच सर्वत्र विखुरलेले होते. शनिवारी सकाळी शिवसेनेचे युवा नेते पृथ्वीराज पवार, रेखा पाटील आदींना अपार्टमेंटमधील इतर रहिवाशांनी बोलवून आपल्या अडचणी मांडल्या. त्यानंतर केंद्राचे कुलुप तोडून काढण्यात आले. काही वेळातच तोंडाला कापड बांधलेल्या तीन तरुणी त्या ठिकाणी हजर झाल्या. त्यांना पहाताच महिला मंडळाचा पारा चढला. त्या मुलींनी आपण इथे नौकरी करीत असल्याचे सांगितले तर रहिवाशांनी अशा प्रकारे तोंडाला कापड बांधलेल्या अनेक मुली, महिला मागच्या दाराने सतत ये-जा करीत असल्याचे सांगितले. त्यांच्या वर्दळीने इतर रहिवाशी कुटुंबातील महिलांच्या बघण्याचा दृष्टीकोन बदलला जात आहे. जाब विचारायला गेले तर छेडछेडीचा गुन्हा दाखल करून आत टाकण्याची धमकी दिली जाते. त्या केंद्रात दिवसभर टवाळखोरी शिवाय काहीच चालत नाही. स्वतःचे सीसीटीव्ही बसवून अपार्टमेंटमधील रहिवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाते, दोन पोलिसांचे या केंद्रात सतत येणे जाणे असते, अशा रहिवाशांकडून तक्रारी सुरू असतानाच सध्या पसार असलेल्या केंद्र चालकाचा मुलगा त्या ठिकाणी आला. त्यानंतर त्याच्या भावाला बोलवून घेण्यात आले. भाऊ किशोर शिंदे याने आपण व्यापारी आहोत. या ठिकाणी भाऊ राज शिंदे आणि त्याची पत्नी विजया शिंदे दोन वर्षांपासून केंद्र चालवितात, इतकीच आपल्याला माहिती आहे. अपार्टमेंटमधील रहिवाशांची तक्रार असेल तर आजपासून हे केंद्र उघडले जाणार नाही. पोलिसांत गुन्हा दाखल असल्याने पोलिसांना योग्य ती कार्यवाही करण्यास सहकार्य देण्याची हमी दिली. या संदर्भात पवार आणि अपार्टमेंटमधील रहिवाशांनी अप्पर पोलिस अधीक्षकांना निवेदन देवून वधूवर सूचक केंद्राच्या नावाखाली सुरू असलेला उद्योग तत्काळ बंद करून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्यिक बलिदान द्यायला तयारभाषा तज्ज्ञ गणेश देवी यांचे मत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
‘साहित्यिक आपले समाज परिवर्तनाचे विचार मांडण्यासाठी आणि बलिदान देण्यासाठी क्षणभर देखील मागे पुढे पाहणार नाहीत. प्रत्येक साहित्यिक दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश व्हायला मागे हटणार नाहीत आणि हटले तर ते साहित्यिक नव्हेत,’ असे विचार भाषा तज्ज्ञ गणेश देवी यांनी व्यक्त केले.
मराठा मंदिर येथे गोविंद पानसरे नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आठव्या अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून गणेश देवी बोलत होते. देशात गेल्या ६० वर्षांत बदल करण्यासाठी सामाजिक चळवळ उभी करण्यात आल्यामुळे शाहू-फुले-आंबेडकर-गांधी यांचे विचार घेऊन पुढे जाता आले. आज हे विचार आपल्याला उपयोगी असले तरीही सध्या निर्माण झालेल्या नवीन समस्या सोडविण्यासाठी उपयोगी पडतील की नाही याचा विचार करा, असेही मत गणेश देवी यांनी मांडले.
बेळगाव येथे आठव्या लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे उद्घाटन जाती व्यवस्थेची मडकी फोडून करण्यात आले. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी महापौर संज्योत बांदेकर, उमा पानसरे, भालचंद्र कांगो, नागेश सातेरी, प्रा. संध्या देशपांडे, हैदराबाद विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख प्रा. माया पंडित आदी उपस्थित होते.
सकाळी उद्घाटनापूर्वी छत्रपती शिवाजी उद्यान येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली. महापौर संज्योत बांदेकर यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनस्थळी ग्रंथदिंडीची सांगता झाली. ग्रंथदिंडीत शाळकरी विद्यार्थी, वारकरी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लेझीम पथक आणि भजनी मंडळ ग्रंथदिंडीचे आकर्षण ठरले होते.
उद्घाटनाच्या सत्रानंतर झालेल्या परिसंवादात अनेक मान्यवर सहभागी झाले होते. शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या शाहिरीतून दिलेल्या योगदानाचे स्मरण म्हणून सीमालढ्यात सहभागी असलेले शाहीर मनोहर भातकांडे, यल्लापा बिर्जे, निन्गोजी हुद्दार, शिवाजी चंदगडकर यांचा सत्कार माजी महपौर नागेश सातेरी यांच्या हस्ते करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवानांच्या चित्तथरारक कसरतींनी विजय दिवस समारोहाचा समारोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
छत्रपती शिवाजी स्टेडियमवर हजारोंच्या साक्षीने लष्करी व पोलिस जवानांनी केलेल्या विविध कसरतींनी गेले तीन दिवस येथे सुरू असलेल्या विजय दिवस समारोहाचा समारोप झाला.
विजय दिवस ज्योतीचे येथील स्टेडीमयमध्ये आगमन झाल्यानंतर समारोप समारोहास प्रारंभ झाला. विलय दिवस ज्योतीचे लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नु, निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर लष्कराचे जवान, पोलिस दल, एनसीसी विद्यार्थी-विद्यार्थीनी, वुमेन्स मिल्ट्री अॅकॅडमी, पोलिसांचे निर्भया पथक आदींनी उपस्थित मान्यवरांना संचलनाने मानवंदना दिली. त्यानंतर बेळगावच्या मराठा लाइट इन्फंट्रीच्या जवानांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. अत्यंत चपळाईने जवानांनी सादर केलेली प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्याची पारणे फेडली. सुभेदार दयानंद निकम यांनी या पथकाचे नेतृत्व केले. येथील होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूलच्या विद्यार्थीनींच्या बँण्डने उपस्थितांची चांगलीच दाद मिळवली. पुणे येथील शैलेश तारभे, कॅप्टन डी. ए. गील, मंगेश दिघे यांनी पॅराग्लायडिंगची तर अॅरीक मॅनेजीस यांनी पॅरामोटरची प्रात्यक्षिक सादर केले. घारीप्रमाणे आकाशात घिरट्या घालून उंचीवर स्टेडिमयवर छत्रीच्या सहाय्याने उतरलेले मॅनेजीस यांना उपस्थितांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला. बेळगाव येथील लोकमान्य बँडने सादर केलेले वादन उपस्थितांसाठी औत्स्युक्याचा विषय ठरला. त्यानंतर विठामाता विद्यालयाच्या मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील नृत्यगीत सादर केले. मिनल ढापरे यांच्या संयोजनात सादर झालेल्या गिताने उपस्थितांनी चांगली दाद दिली. बबन कुंभार, हमेश पाटील यांची मोटरसायकली प्रात्यक्षिक झाली. तेजस गायकवाड या युवकाने रिक्षांचा डोळ्याची पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
एकलव्य अॅकॅडमीच्या वतीने सादर केलेली प्रात्यक्षिकांनाही चांगली दाद मिळाली. पेठ वडगाव येथील पुनावाला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मासपेटी आणि मानवी मनोऱ्याची प्रात्यक्षिक सादर केली. त्याचबरोबर दोरीवरील उड्यांच्याही प्रात्यक्षिकांनीही उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यानंतर सैन्यदलाच्या बॅण्डचे प्रात्यक्षिक झाले, सैन्यदलाच्या बॅण्डने सादर केलेल्या राष्ट्रगीताने समारोप झाला. भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सोलापुरात दिवसातकांद्याची साडेबारा कोटींची उलाढाल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी इतिहास घडला. ५८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच बाजार समितीने कांद्याच्या उलाढालीचा विक्रम मोडला. शनिवारी ५०९ ट्रकमधून १ लाख १ हजार ९२२ पिशव्या कांद्याची आवक झाली. यामुळे बाजार समितीत शनिवारी १२ कोटी ५७ लाख ८१ हजार ७२५ रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवारी कांद्याला कमाल चार हजार उच्चांकी दर मिळाला. सुमारे ११ कोटी ३३ लाख ८८ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले. शनिवारी चार हजार रुपये दराने २७ क्विंटल तर दोनशे रुपये दराने १३ क्विंटल कांदा विक्री झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.
मागील काही दिवसांपासून सोलापूर बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक होत आहे. सोलापूर बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, तुळजापूर, उस्मानाबाद आदी परिसरातून कांद्याची आवक होत आहे. यंदा कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. बाजार समितीत मागील काही दिवसांपूर्वी कांदा चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर बाजार समिती प्रशासनाने योग्य उपाययोजना केल्यामुळे या चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यात बाजार समिती प्रशासनाला यश मिळाले असल्याची माहिती प्रभारी सचिव विनोद पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुजारी हटाओ’ला अधिवेशनात बगल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासंबंधीच्या विधेयक हिवाळी अधिवेशनात बगल देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तांत्रिक अडचणीमुळे हे विधेयक सादर होऊ शकल्याचे सांगितले जात आहे. अधिवेशन संपल्यानंतर १५ दिवसांत पुजारी नेमण्याबाबत सरकारच्यावतीने वटहुकूम काढण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबाबाई मंदिरी पुजारी हटाओ संघर्ष समितीला दिले आहे. पालकमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा समितीने दिला.

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणुकीचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार नसल्याची माहिती मिळताच समितीने तातडीने शनिवारी बैठक घेतली. बैठकीला माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, दिलीप पाटील, संजय पवार, विजय देवणे, प्रा. जयंत पाटील, अॅड. चारुलता चव्हाण, वसंतराव मुळीक, शरद तांबट उपस्थित होते. बैठकीची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकाव्दारे प्रसिद्ध केली आहे. पत्रकात म्हटले आहे की, बैठकीतील सदस्यांनी पालकमंत्री पाटील यांच्याशी फोनवर संपर्क साधला. त्यावेळी पगारी पुजारी नेमणुकीविषयीचे विधेयक आणण्यात तांत्रिक अडचण असल्याने वेळेअभावी हे विधेयक अधिवेशनात आणलेले नाही, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. अधिवेशन संपल्यानंतर १५ दिवसानंतर अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणुकीबाबत सरकारच्यावतीने वटहुकूम काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पालकमंत्र्याच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

अंबाबाई मूर्तीला नऊ जून रोजी घागरा चोली नेसवल्यानंतर पुजारी हटाओची मागणी करत भाविकांनी आंदोलन केले होते. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पालकमंत्री पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात पगारी पुजारी नियुक्तीसंबधी आश्वासन दिले होते. अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नियुक्तीचा ठराव ३१ ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करुन विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर केले जाईल, असे आश्वासनही पाटील यांनी समितीला दिले होते.

फक्त अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र कायदा

पंढरपूरप्रमाणे फक्त अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीचा स्वतंत्र कायदा करावा, अशी आमची मागणी आहे, असे विजय देवणे व दिलीप पाटील यांनी सांगितले. सरकारने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व मंदिरांचा एकत्रित विचार केल्यास हा कायदा पुन्हा रखडणार आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परवाना’तील फाइल्सची चोरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या परवाना विभागात चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता. १६) सकाळी उघडकीस आला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडल्याची शक्यता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वर्तवली आहे. चोरट्यांनी १९९० ते २०१५ या काळातील महत्त्वाच्या फाइल्स आणि रजिस्टरचे गठ्ठे लंपास केले आहेत. याबाबत शनिवारी संध्याकाळी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, या चोरीबाबत महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

शिवाजी मार्केटच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर परवाना विभागाचे कार्यालय आहे. गुरुवारी संध्याकाळी कर्मचारी कार्यालय बंद करून निघून गेले. शुक्रवारी महापालिकेच्या वर्धापन दिनाची सुटी असल्याने कार्यालय बंद होते. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या शटरचे कुलूप नसल्याचे निदर्शनास आले. आत जाऊन पाहिल्यानंतर काही फाइल्स आणि रजिस्टरचे गठ्ठेही गायब असल्याचे लक्षात आले. यानंतर कर्मचाऱ्यांनी विभागाचे अधीक्षक सचिन जाधव यांना घटनेची माहिती दिली. जाधव यांनी तातडीने कार्यालयात धाव घेऊन घटनेची माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना दिली. पाटणकर यांच्या सल्ल्याने जाधव यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

काही कागदही चोरले

चोरट्यांनी कापडात बांधून कपाटात ठेवलेले फाइल्स आणि रजिस्टरचे गठ्ठे काढले आहेत. काही गठ्ठे सोडून त्यातील फाइल्स विस्कटल्या आहेत. शोध घेऊन चोरट्यांनी १९९० ते २०१५ या काळातील काही महत्त्वाच्या फाइल्स आणि रजिस्टरचे गठ्ठे पळवल्याची चर्चा कर्मचाऱ्यांत आहे. काही फाइल्स चाळून त्यातील पानेही चोरट्यांनी काढली आहेत. चोरट्यांनी शटर बंद केले, मात्र कुलूप नेले. पोलिसांनी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

विशिष्ट हेतूनेच चोरी

या विभागात जुने सर्व रेकॉर्ड या कार्यालयात जपून ठेवले आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि करांच्या वसुलीसाठी हे परवाने महत्त्वाचे असतात. रोख रक्कम किंवा ऐवज कार्यालयात नसतो. याची माहिती असूनही जाणीवपूर्वक काही फाइल्स गायब करण्यासाठीच चोरी केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विशिष्ट हेतूने कार्यालयाची माहिती असलेल्या लोकांनीच हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॉवर फेस्टिव्हल २४ पासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएसबीपीतर्फे येत्या २४ ते २८ डिसेंबर दरम्यान दोन लाख आकर्षक फुलांचे प्रदर्शन पोलिस उद्यानाच्या सहा एकर परिसरात बहरणार आहे. या प्रदर्शनात १०० हून अधिक प्रकारची सुमारे दोन लाखांवर फुले पाहता येणार आहेत. प्रदर्शनात फुलांनी सजविलेल्या दहा आकर्षक कमानीत, देशी विदेशी फुलांनी सजविलेली १२ फूट रुंद, २४ फूट लांब राधानगरी धरणांची प्रतिकृती, राजर्षी शाहू महाराजांचा नऊ फुटांचा पुतळा, शाहूंच्या जीवनपटावर आधारित फुलांनी केलेली कलात्मक रचनेसह अनेक आकर्षक वैशिष्ट्य आहे. पर्यटकांसह स्थानिकांचे आकर्षण कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हल ठरणार असून सुमारे तीन लाखांवर नागरिक भेट देतील, अशी अपेक्षा केएसबीपीचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पित्रे म्हणाले, कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाने (केएसबीपी) यापूर्वी शहरातील रस्ते आणि चौकांचे सुशोभिकरण झाले आहे. एक लाख चौरस फूट उद्यानाची निर्मितीही केली आहे. आता बेंगळूरु, श्रीनगर, उटीच्या धर्तीवर पोलिस उद्यानात सकाळी नऊ ते रात्री साडेआठ या कालावधीत कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिवल भरविला जाणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या फेस्ट‌िव्हलचे उद्‍घाटन होणार आहे. त्याची सुरुवात २४ डिसेंबरला कावळा नाका येथून सकाळी नऊ वाजता फ्लॉवर परेडने होणार आहे. या फ्लॉवर परेडमध्ये भव्य चित्ररथ, फुलांनी सजविलेली वाहने, शालेय विद्यार्थ्यांचे समूह नृत्य, २४ फूट उंच हत्ती, २० फुटाची बैलगाडी, १५ फूट उंच राष्ट्रध्वज, आकर्षक आणि कलात्मक रचना केलेल्या फुलांच्या प्रतिकृती परेडचे आकर्षण आहे. पोलिस उद्यान परिसरातील सहा एकर जागेत फ्लॉवर फेस्टिवल भरविला जाणार आहे. यामध्ये सुमारे दोन लाख आकर्षक फुलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील विविध संस्थाकडून देशी आणि विदेशी फुले मागविली आहेत. प्रदर्शनासाठी वनविभाग, पोलिस, शिवाजी विद्यापीठाचे सहकार्य लाभले आहे. फेस्टिव्हलमध्ये व्हर्टिकल गार्डनचे तज्ज्ञ वैभवराजे, प्रदीप बारपांडे मार्गदर्शन करणार आहेत. आजरा येथील लक्ष्मण सुतार लाइव्ह सॅलेट कार्निव्हल सादर करणार आहे. करिअरच्या नव्या वाटांसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. गृहिणींच्या कलागुणांना नवावा देणाऱ्या व्यवसायाची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. समूह नृत्य, कॉमेडी शो, सुगम संगीतासह सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. विज्ञान, चित्रकला, फॅन्सी ड्रेस, फेस पेटिंग आदी विषयावर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा होतील. पुष्परचनाकारांची आकर्षक कौशल्य स्पर्धा होईल. सजविलेली शिल्पे, सेल्फी पाँइटस्सह कृषी, कला, लॅण्डस्केपसह उद्यानविषयक संस्थाची डिसप्ले आहेत. या वेळी सचिव राहुल कुलकर्णी नर्सरी असोसिएशनचे संतोष लोबो, रसिया पडळकर, विजय मळगे, दीपक सुतार, आर्किटेक्ट संतोष रामाणे, अभिनंदन मगदूम, अभिजित जाधव, शिल्पकार मंगेश कुंभार, राहुल बहिरशेठ, महेश माळी, शेखर वळिवडेकर, राहुल मोरे आदी उपस्थित होते.

जगातील सर्वांच उंच ध्वज कोल्हापुरात

अध्यक्ष पित्रे म्हणाले, पोलिस उद्यानात देशातीर दुसऱ्या क्रमाकांचा ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ आहे. पाकिस्तानने जगातील मोठा ध्वज उभारला आहे. पाकिस्तानपेक्षाही आणि जगातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज कोल्हापुरात उभा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी एका आंतरराष्ट्रीय कंपनीही तयार झाली आहे. या राष्ट्रध्वजाची उंची १२० बाय १८० फूट इतकी उंच असू शकेल. त्यासह कोल्हापुरची विमानसेवा २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त आकर्षक फुलांनी सजविलेली २४ फुटाची विमानाची प्रतिकृतीही आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पॅचवर्क, डांबरीकरण निकृष्ट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

तालुक्यातील रस्त्यांचे नुकतेच केलेले पचवर्क चार दिवसांत उखडत आहे. या कामावर प्रशासनाची देखरेख आहे की नाही? असा सवाल करत रस्त्यांची कामे निष्काळजीपणे सुरू असून याबाबत कोणतेही सुरक्षा उपाय योजलेले नाहीत. साइड पट्ट्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, असा आरोप गड‌हिंग्लज पंचायत समिती सभेत करण्यात आला. यावेळी पॅचवर्क आणि अन्य कामांसाठी किती खर्च झाला याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे मागितली असता त्यांना ती देता आली नाही. त्यामुळे सदस्य अधिकच संतप्त झाले. विद्याधर गुरबे आणि विठ्ठल पाटील यांनी याप्रकरणी प्रश्न उपस्थित करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाभाडेच काढले. अध्यक्षस्थानी सभापती जयश्री तेली अध्यक्षस्थानी होत्या.

विजय पाटील यांनी अभिनंदन व श्रद्धांजलीचा ठराव मांडला. सभापती तेली यांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उर्जा बचत अभियानाबद्दल माहिती दिली. या सौरउर्जा अभियानात ग्रामपंचायत स्तरावरून ८० टक्के माहिती जमा झाली आहे. त्यावर अभ्यास करून प्रत्यक्ष कामाला तत्काळ सुरवात होईल, अशी माहिती दिली.

सभागुहात आढावा देताना येणारे विभागप्रमुख अथवा त्यांच्या प्रतिनिधीने आढाव्यासंदर्भात तपशीलवार माहिती सभागुहासमोर मांडावी, अशी सूचना मागील सभेवेळी गुरबे यांनी केली होती. मात्र तरीही बऱ्याच विभागप्रमुखांनी मोघम माहिती देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यावर संतप्त झालेल्या गुरबे यांनी सभापतींना ‘तुमचा प्रशासनावर कंट्रोल नाही. त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही. त्यामुळेच अशी गुळमुळीत उत्तरे दिली जात आहेत’ असा आरोप केला. यावर तेली यांनी यापुढील काळात मिटिंगच्या एक दिवस आधी टिपण्णी मिळालीच पाहिजे, असा आदेश केला.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या गारगोटी-नागनवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. कारण नियमाप्रमाणे त्या बांधकामावर पाण्याची कमतरता आहे. तसेच साइडपट्टीवर काळी माती टाकली जात आहे. जे सुरू आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. या कामावर कुठेही सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना अथवा बोर्ड दिसत नाहीत. त्यामुळे अपघातांची शक्यता आहे. दुर्दैवाने काही घडल्यास याला जबाबदार कोण अशी विचारणा सदस्य विठ्ठल पाटील यांनी केली.

गुरबे यांनी नेसरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचाही सदस्य नसलेला पुढारी सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन उद्‍घाटन करतो आणि असे फोटो सोशल मीडियावर पसरविले जातात. लोकप्रतिनिधीना बाजूला ठेवून तुम्ही उद्‍घाटन करणार आहात का? अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. तालुका विज्ञान प्रदर्शनासाठीही स्थानिक आमदार अथवा लोकप्रतिनिधी नसताना दुसऱ्या मतदार संघातील आमदार बोलविण्याचे प्रयोजन काय? असा सवाल केला.

कानडेवाडी येथील सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारकाचा वादही सभागृहात गाजला. त्याचा ताबा समितीकडे असताना ग्रामसेवकांकडे चौकशी कशी काय करता? असा प्रश्न गुरबे यांनी केला. तर याबाबतचा निर्णय तत्काळ लावून स्मारकाची दुरावस्था दूर करा, अशी सूचनाही त्यांनी मांडली.

यावेळी कृषी, शिक्षक, आरोग्य, पशुसंवर्धनसह विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. उपसभापती बनश्री चौगुले वगळता सर्व सदस्य उपस्थित होते. गटविकास अधिकारी सीमा जगताप यावेळी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टींच्या तडजोडीमुळेऊस उत्पादकांचे नुकसानअजित नवले यांची टीका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘ऊसदराबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी एफआरपी अधिक दोनशे रुपयांची तडजोड मान्य करून राज्यातील ऊस उत्पादकांचे नुकसान केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तेरा ते साडे तेरा टक्के ऊस उतारा मिळतो, मात्र इतर जिल्ह्यात हा उतारा खूप कमी आहे. नेत्यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे,’ असा आरोप शेतकरी कर्जमाफी सुकाणू समितीचे निमंत्रक अजित नवले यांनी खासदार राजू शेट्टींचे नाव न घेता केला.
नवले म्हणाले, ‘कोल्हापूरमधील नेत्यांनी ऊसदराबाबत एफआरपी अधिक दोनशे रुपयांचा तडजोड केली. अशी तडजोड करणारे शेतकरी नेते स्वत:ला देशाचे नेते, राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेतात. त्यांचे योगदान आम्हीही मान्य करतो. मात्र, देशाचे नेते असणाऱ्या नेत्यांनी केवळ एका जिल्ह्यामध्ये अशी तडजोड केल्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा हा १३ टक्के उतारा असणारा पट्टा सोडता, उर्वरित महाराष्ट्रावर याचा गंभीर परिणाम झालेला आहे.’
नवले म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकाने जाहीर केलेली कर्जमाफी ही ऐतिहासिक नव्हे तर ऐतिहासिक फसवणूक आहे. शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व संपानंतर सरकारने कर्जमाफी देण्याची घोषणा केली. सहा महिन्यानंतर बघितल्यास खूपच कमी लोकांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. मुख्यमंत्री सभागृहात देत असलेल्या आकडेवारीमध्ये विसंगती आहे. सरकारने ९८ लाख ८७ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र जे ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. यामध्ये केवळ ७७ लाख खातेधारकांचेच अर्ज प्राप्त होऊ शकले. याचा अर्थ सरकारच्या जाचक अटी आणि सतत बदलणाऱ्या निकषांमुळे तब्बल १२ लाख ८७ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अर्जच करू शकलेले नाहीत. शिवाय कुटुंबातील एकच अर्ज गृहित धरण्याचे धोरण घेतल्यामुळे केवळ ५६ लाख शेतकरीच प्रत्यक्ष अर्ज करू शकले. याचाच अर्थ तब्बल ३३ लाख ८७ हजार शेतकरी पहिल्याच टप्प्यात सरकारने बाद ठरविले. त्यामुळे सरकार ऐतिहासीक कर्जमाफी मिरवत असले तरी प्रत्यक्षात ती फसवणूकच आहे. ९८ लाख ८७ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत लढत राहू. अधिवेशनानंतर पुन्हा एकदा सुकाणू समितीच्या सर्व शेतकरी संघटनाना एकत्र येऊन बैठक घेऊन कर्जमाफीसाठी पुढील दिशा ठरविणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धीरज पाटीलअखेर जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
मलेशियातील हॉटेलमध्ये मॅनेजरच्या नोकरीचे अमीष दाखवून गंडा घालणाऱ्या रॅकेटचा म्होरक्या धीरज बाळासाहेब पाटील याला सांगली शहर पोलिसांनी रविवारी पकडले. पुण्यातील चतुश्रृंगीनजीकच्या एका लॉनवर सुरू असलेल्या डॉग शोच्या ठिकाणी तो असल्याची माहिती मिळताच त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. रविवारी सायंकाळी त्याला सांगली शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
मलेशियातील नोकरीच्या अमीषाला बळी पडलेल्या चार तरुणांना मलेशिया कोर्टाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. त्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र शेळके आणि तपास अधिकारी उपनिरीक्षक समीर चव्हाण यांनी दोन्ही संशयितांचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिस पुत्र कौस्तुभ पवार तत्काळ सापडला. परंतु, या रॅकेटचा म्होरक्या धीरज पाटील (रा. पाटणे प्लॉट, हरीपूर रोड) हा सापडत नव्हता. मोबाइल बंद ठेवून तो वावरत होता. नातेवाईकांनी तो मलेशियात असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याला महागड्या श्वान पालनाचा, विक्रीचा शौक असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. तो नेमका डॉग शोच्या ठिकाणीच पोलिसांच्या तावडीत सापडला.
या टोळीकडून फसगत झालेले आणि सध्या मलेशियातील भारतीय दुतावासाला शरण गेलेले पाच जण परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या सहकार्यामुळे भारतात सुखरुप परतणार आहेत, असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. शिक्षा भोगत असलेल्यांच्या सुटकेसाठी आणखी दोन महिन्यांची वाट पहावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसंपादन न करताचरस्त्याचे रुंदीकरणपलूस, बांबवडे, कुंडलमध्ये शेतकरी रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
गुहागर-विजापूर महामार्गाचे काम सुरू झाले आहे. रस्त्यासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीबाबत पलूस तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांना कायदेशीर नोटीस आलेल्या नाहीत. सरकार आम्हा शेतकऱ्यांचा विचार करणार की, गुपचूप, जबरदस्तीने जमिनी घेणार आहे, असा सवाल करून बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. या बाबत बांबवडे, पलूस, कुंडल, सांडगेवाडी, येळावी गावचे नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी पलूसच्या तहसीलदारांना निवदेन दिले आहे.
पलूस तालुक्यातील बांबवडे येथील सुधीर जाधव म्हणाले, ‘महामार्गात येणाऱ्या जमिनींवरील वृक्षतोड सुरू झाली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत ही झाडे आहेत, त्यांना कोणतीही पूर्वसूचना दिली गेलेली नाही. सरकारचा हा कारभार शेतकरी, व्यापाऱ्यांना उद्वस्त करणारा आहे. त्यामुळे महामार्गाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. वृक्षतोडीची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी आणि वृक्षतोडीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, अशी आमची मागणी आहे.’
अ‍ॅड. दिपक लाड म्हणाले, ‘सध्या जे महामार्गाचे काम चालू आहे, हे कोणाला विचारून चालू केले आहे हे माहिती नाही. परंतु, अशा कामाबाबत अगोदर नोटीस द्यावी लागते. २१ दिवसांत हरकती घ्यायच्या असतात. यासाठी कायदा आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीला सरकार हात लावू शकत नाही. कायद्यात निवाड्याची रक्कम निश्चित करताना आधीच्या तीन वर्षांच्या बाजारभावाची सरासरी काढून सर्वांत जास्त विक्री झाली आहे, ती लक्षात घेऊन बाजार भावाप्रमाणे किंमत ठरवण्यात यावी आणि चौपट रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, त्यामध्ये जमिनीवर असणारी घरे, विहिरींची किंमत करावी, अशी तरतूद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती माहिती मिळणे आवश्यक आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकरी सतरा लाखांची भरपाईवांग-मराठवाडी धरणग्रस्तांना सरकारचा दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
पाटण तालुक्यातील वांग-मराठवाडी प्रकल्पातील मेंढ आणि उमरकांचन येथील धरणग्रस्तांना एकरी सतरा लाख रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. निर्णयाप्रमाणे धरणग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिले आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे राज्य प्रवक्ते भरत पाटील यांनी पाटण येथे दिली.
भरत पाटील म्हणाले, ‘वांग-मराठवाडी धरणग्रस्तांचे प्रश्न गेली १५-२० वर्ष प्रलंबित होते. या प्रश्नांसाठी धरणग्रस्तांचा सतत लढा सुरू होता. धरणग्रस्तांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक घेऊन वांग-मराठवाडी धरणग्रस्तांच्या मागणीची दखल घेऊन धरणग्रस्तांना खास बाब म्हणून एकरी सतरा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा या बैठकीत निर्णय घेतला आहे. या बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पुनर्वसन खात्याचे सचिव उपस्थित होते. डिसेंबरअखेर पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करून धरणग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिले आहेत. तसेच धरणग्रस्तांचे पुनर्वसण पूर रेषेबाहेर होणार आहे. धरणांचा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश झाल्याने या योजनेचा फायदा धरणग्रस्तांना होणार असून, हा निधी केंद्र सरकारकडून मिळणार आहे. या बैठकीला उपस्थित आसलेल्या धरणग्रस्तांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images