Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अपहृत तरुणांची आजऱ्यातून सुटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देवदर्शनासाठी गोव्यातून महाराष्ट्रात आलेल्या गोव्यातील चार अपहृत तरुणांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी (ता. १२) पहाटे सुखरुप सुटका केली. तरुणांचे रविवारी (ता. १०) अज्ञातांनी अपहरण केले होते. संशयितांनी अपहृत तरुणांच्या मोबाइलवरूनच त्यांच्या नातेवाईकांकडे २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. दिलीप पुंडलिक धारगळकर (वय ५६, रा. गोवा) यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून तरुणांची सुटका केली, मात्र पोलिसांची चाहूल लागताच अपहरणकर्त्यांनी पलायन केले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, गोव्यातील राहुल धारगरळकर (वय २०), सावळो गावकर, ज्ञानेश्वर गोकाककर, मनोज गावकर हे चौघे शुक्रवारी (ता. ८) रात्री नऊच्या सुमारास शिर्डीला देवदर्शनाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. रविवारी (ता. १०) राहुल धारगळकर याच्या मोबाइलवून अज्ञाताने राहुलचे वडील दिलीप धारगळकर यांना फोन केला. तुमच्या मुलासह त्याच्या तीन मित्रांचे आम्ही अपहरण केले आहे. हे चौघे जिवंत हवे अशतील तर २५ लाख रुपये खंडणी द्या, अशी धमकी दिली. वारंवार धमकीचे फोन येऊ लागल्याने धारगळकर यांनी सोमवारी कोल्हापुरात येऊन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेऊन मुलांच्या अपहरणाची तक्रार केली. अधीक्षक मोहिते यांनी याचा तपास स्थानिक गन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला. निरीक्षक दिनकर मोहिते यांनी राहुल धारगळकर याच्या मोबाइल लोकेशनवरून संशयितांचा शोध सुरू केला. संशयितांनी दिलीप धारगळकर यांना फोन करून जयसिंगपूर येथे पैसे देण्यासाठी बोलवले होते. यानंतर नृसिंहवाडी येथे बोलवले. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला होता, मात्र अपहरणकर्ते आलेच नाहीच.

दरम्यान पोलिसांना संशयितांची माहिती काढून त्यांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी जवळच्या पोलिस ठाण्यांमध्ये घेऊन गेले. पोलिस नातेवाईकांपर्यंत पोहोचल्याचे लक्षात येताच अपहरणकर्त्यांनी अपहृत तरुणांना सोडून पळ काढला. पोलिसांनी मंगळवारी पहाटे अपहृत तरुणांच्या मोबाइल लोकेशनवरून आजरा परिसरातून तरुणांची सुखरूप सुटका केली. पळालेल्या अपहरणकर्त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली आहे.

अपहरणकर्त्यांकडून दोन कारचा वापर

अपहरणकर्त्यांनी संकेश्वर परिसरात गोव्यातील तरुणांची कार अडवली. त्यांना चाकूचा धाक दाखवत कारची काच फोडली. यानंतर त्यातील राहुल धारगळकर याला इनोव्हा कारमध्ये घेतले. तिघे अपहरणकर्ते मुलांच्या कारमध्ये बसले. यानंतर एक कार जयसिंगपूर परिसरात, तर दुसरी कार आजरा परिसरात गेली. यातील एक कार चोरीची असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. अपहरणकर्त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जयसिंगपुरातीलडॉक्टरचा डेंगीने मृत्यू

0
0

जयसिंगपूर

शहरातील नवव्या गल्लीतील आधार हॉस्पिटलचे मुख्य संचालक व अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. शकील मेहबूब मुल्ला (वय ४०) यांचा डेंगीसदृश आजाराने मृत्यू झाला. गेल्या चार महिन्यांपासून कोल्हापूर येथे वास्तव्यास असणाऱ्या डॉ. मुल्ला यांना शनिवारपासून ताप येऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी दुपारी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी द्या नाहीतर घरावर मोर्चा काढू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारकडून निधी मिळत नाही, सरकार केवळ घोषणाबाजी करते या मुद्यांवरून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका करीत कोंडीत पकडले. निधीवरून सर्वच सदस्यांनी कोंडी केल्याने पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आणि आताचे भाजपचे सदस्य अरूण इंगवले चांगलेच संतापले. पालकमंत्री चंदकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषद विकास कामांना निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी जर निधी दिला नाही तर सर्व सदस्य एकत्र येवून त्यांच्या घरावर मोर्चा काढू, असा इशारा इंगवले यांनी मंगळवारी दिला.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी हा इशारा देत भाजपला घरचा आहेरही दिला. अध्यक्षा शौमिका महाडिक अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कुणाल खेमनार यांनी प्रशासनातर्फे विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीसाठी गगनबावडा, राधानगरी तालुक्यासाठी काँग्रेसचे सदस्य आहेत, म्हणून निधी दिला नाही का, असा सवाल बजरंग पाटील यांनी उपस्थित केला. वंदना जाधव यांनीही याच विषयावरून पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. निधी वाटपात पक्षपातीपणा झाल्याचा आरोप केला. अध्यक्षा महाडिक यांनी पुढील वर्षाच्या आराखड्यात निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले. ताडपत्री, स्प्रे पंपसाठीच्या निधीतील काही रक्कम चाप कटरसाठी राखीव ठेवावा, अशी सूचना विजय भोज यांनी मांडली. माध्यमिक विभागात सीसीटीव्ही बसवल्यानंतर पैसे खायचे थांबणार नाही, तेथील सीसीटीव्हीवरील खर्चाचा निधी शेती खात्याकडे वर्ग करावा, अशी मागणीही त्यांनी केली. ग्रामपंचायत विभागाच्या निष्क्रिय कारभारावरून उपमुख्य कार्यकरी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र भालेराव यांची भोजे यांच्यावर चांगलीच टीका केली. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून भालेराव यांना निरूत्तर व्हावे लागले.

चंदगड तालुक्यातील एका शाळेतील मुख्याध्यापिकेने उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने विद्यार्थीनी गंभीर जखमी आहे. त्यामध्ये माध्यमिक शिक्षण विभागाने केलेली चौकशी दोषींना पाठीशी घालणारी आहे. फेरचौकशी करून दोषी मुख्याध्यापिकेवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सचिन बल्लाळ यांनी केली.‌ शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनी त्या मुख्याध्यापिकेवर त्वरित कारवाई करण्याची सूचना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दिले. कमी पटाच्या ३४ शाळा बंद करण्याला वंदना जाधव, बजरंग पाटील यांनी ‌तीव्र विरोध केला.

विजया पाटील यांनी पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईस विलंब का? सहा ते सात महिने कारवाई न होण्यामागचे कारण काय असा सवाल विचारला. सीईओ डॉ. खेमनार यांनी गटविकास अधिकारी पातळीवर विलंब होत असल्याचे सांगितले. जिल्यातील अनेक पाणी योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे वाड्या, वस्त्यांमध्ये पाणी जाऊन पोहचले नाही. भ्रष्टाचार केलेल्यांकडून रक्कम वसूल करावी, त्यांच्यावर कडक करवाई करावी, अशी मागणी अनिता चौगुले यांनी केले.

हंबीरराव पाटील, राजवर्धन निंबाळकर, डॉ. अशोक माने, बंडा माने, हेमंत कोलेकर, महेश चौगुले, डॉ. पद्माराणी पाटील, रेश्मा देसाई, स्वरुपाराणी जाधव, प्रसाद खोबरे, प्रियांका पाटील, राहुल आवाडे, मल्लाप्पा चौगुले यांनी विविध प्रश्न विचारले. सभेस सर्व समितीचे सभापती, खातेप्रमुख, सदस्य उपस्थित होते.

लाचेत सापडलेला का?

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना एस. टी. शिंदे लाच घेताना लाच लुचपत विभाग पथकाच्या जाळ्यात सापडले होते. त्यांनी मंत्रालयापर्यंत जावून सर्व मिटवून घेतले आहे. तशा व्यक्तीला जिल्हा परिषदेत मालमत्ता अधिकारी म्हणून का नियुक्त केले, असा सवाल सभापती प्रदीप झांबरे यांनी उपस्थित केला. मनोज फराकटे यांनीही शिंदे यांच्या नियुक्तीवर जोरदार आक्षेप घेतला. सीईओ डॉ. खेमनार यांनी यावर उत्तर दिले. ते म्हणाले, ‘शिंदे यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आर्थिक, तांत्रिक मान्यतेचे अधिकार दिले नाहीत. त्यांचे काम समाधानकारक नसल्याचे दिसता मुक्त करू.’


लाचखोर चंदगड तालुक्यात का ?

ग्रामसेवक बदलीसंबंधी वारंवार तक्रारी करून कार्यवाही होत नसल्याचे विजय बोरगे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी त्या ग्रामसेवकास चंदगड तालुक्यात बदली करा, असा सल्ला दिला. चंदगड तालुक्यातील सदस्य सचिन बल्लाळ, कल्लाप्पा भोगण यांनी त्यास विरोध केला. लाचखोर, निष्क्रिय कर्मचारी, अधिकारी चंदगड तालुक्यातच का? अशी विचारणा केली. बोरगे यांनी तक्रार केलेल्या ग्रामसेवकाची बदली उपाध्यक्षाच्या गावातच करा, असा टोला पाटील यांनी मारला. ‘ते ग्रामसेवक तुमचे जावई आहेत’, का असा प्रश्न सतीश पाटील यांनी भालेराव यांना विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजोपाध्येनगरात बंद बंगल्यात चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात चोरट्यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असून राजोपाध्येनगरातील मुख्य रस्त्यानजिक बंद बंगला फोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा किमती ऐवज लंपास केला. सोमवारी संध्याकाळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. शिल्पा विजय शेतवाळ (वय ५५, रा. राजोपाध्येनगर, प्लॉट नं. २०१, स्वानंद बंगला) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गेल्या आठवड्यापासून शहरात रोज चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरासह उपनगरातील बंद घरे आणि दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. रोज चोरीच्या घटना घडत आहेत, मात्र पोलिसांना चोरटे सापडत नाहीत. राजोपाध्येनगरातही चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. राजोपाध्येनगरातील शिल्पा शेतवाळ या बँकेत नोकरीस आहेत. राधानगरी रोडलगत त्यांचा स्वानंद बंगला आहे. शनिवारी (ता. ९) सकाळी त्या कुटुंबासह बारामती येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेल्या होत्या. सोमवारी संध्याकाळी त्या परत घरी आल्या. घराचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर त्यांना हॉल आणि बेडरुममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. यानंतर त्यांनी कॉम्प्युटर रुममध्ये जाऊन पाहिले असता, लोखंडी कपाट आणि लाकडी कपाटातील सोने, चांदीचे दागिने लंपास केल्याचे आढळले. याशिवाय एटीएम कार्ड आणि बँकांचे पासबुकही चोरट्यांनी लंपास केले होते.

शेतवाळ यांनी सर्व दरवाजांचे कडी-कोयंडे तपासले, तर सर्व कडी-कोयंडे सुरक्षित होते. चोरट्यांनी एका बेडरुमच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जुना राजवाडा पोलिसांना याची माहिती दिली. काही वेळात ठसे तज्ज्ञांसह दाखल झालेल्या पोलिसांनी परिसराची पाहणी केली. श्वानपथकानेही चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र श्वान परिसरातच घुटमळले. चोरट्यांनी तीन तोळे वजनाचे दोन गंठण, १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे वळे, ६ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, सोन्याचे पाणी दिलेला कोल्हापुरी साज, लक्ष्मीहार, गंठण, तोडे, ७० ग्रॅम वजनाचा चांदीचा मेखला, रोख पाच हजार रुपये असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याशिवाय बँकांचे पासबुक आणि एटीएम कार्डही लंपास केले.

शिल्पा शेतवाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दखल केला आहे. घराचा कडी-कोयंडा तोडण्याऐवजी खिडकीचे गज कापून होणारी ही गेल्या दहा दिवसांतील दुसरी चोरी आहे. याशिवाय शटर उचकटून दुकानातील किमती वस्तू लांबवण्याच्या घटनाही वाढल्या आहेत, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विज्ञान प्रदर्शनातून नवसंकल्पनांची मांडणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ओझोनचा थर कमी होत असल्याने मानवी आरोग्यावर होणारे परिणाम, पवनचक्कीच्या माध्यमातून निर्माण होणारी पारंपरिक ऊर्जा निर्मिती, ग्रीन व्हीलेजच्या माध्यमातून दिला जाणार वीज बचतीचा संदेश आणि कठपुतळ्यांच्या माध्यमातून स्त्री-भ्रूण हत्येवर टाकेला प्रकाश आदी प्रयोगांतून विद्यार्थी व शिक्षकांनी जिज्ञासू वृत्तीचे दर्शन घडवले. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभाग आणि एम. एस. पटेल इंग्लिश मीडिया स्कूलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४३ व्या शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शाश्वत विकासाच्या कल्पना विद्यार्थ्यांनी मांडल्या.

विद्यार्थ्यांमधील विज्ञानवादी दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यापूर्वी प्रदर्शनात मांडलेल्या प्रयोगांनी देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवलेला असल्याने आजच्या प्रदर्शनामध्ये विद्यार्थी, शिक्षकांनी मांडलेल्या प्रयोगाबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. दुपारी तीन वाजता प्रदर्शनाचे उदघाटन झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रयोग पाहण्यासाठी खुले झाले.

प्रदर्शनामध्ये २७३ प्रयोगांची मांडणी केली आहे. माध्यमिक विभागातून १६८, प्राथमिक १३४, शिक्षक गटातून १४ व लोकसंख्या शिक्षण विभागातून चार प्रयोगांची मांडणी केली आहे. शहरातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील ९० शाळांचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले आहेत. लोकसंख्या शिक्षण गटातून एम. एल. जी. हास्कूलच्या शिक्षकांनी कठपुतळ्यांच्या माध्यमातून स्त्री भ्रुण हत्येच्या विषयाची मांडणी केली आहे. नवजात बालकाला फेकून दिल्यानंतर चिमणी त्याचे कसे पालन-पोषण करत हिरवाई निर्माण करते, हा संदेश दिला.

एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या सलीम शेख यांनी प्युरिफिकेशन यंत्राच्या सहाय्याने लोखंड, माती वेगळ करत असलेल्या उपक्रमाची मांडणी केली आहे. तीनवेळा प्रक्रिया होऊन शुद्ध लोखंड मिळत असताना पाणी, लेबर आणि वेळेचे बचत होत असल्याची संदेश दिला आहे. याबरोबर ऊर्जा बचत, प्लास्टिक कचऱ्याचा विळखा, ग्रीन व्हिलेज आदी संकल्पनांची मांडणी जिज्ञासू वृत्तीने केली आहे.

उदघाटनप्रसंगी डायटचे प्राचार्य डॉ. विलास पाटील म्हणाले, ‘जिज्ञासा ज्ञानाचे मूळ असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासूवृत्तीमधून प्रश्नाची मालिका तयार होते.’

उद्घाटन समारंभास मुख्याध्यापिका दिपाली सावंत, जसवंतभाई शहा, सर्जेराव म्हातुगडे, जयंत नगराळे, एस. एम. शिंदे, डी. एम. रेडेकर, प्रकाश सुतार, डी. एम. सावंत आदी उपस्थित होते. माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयटीआय’मध्ये केली अश्लील चित्रफितमुलींच्या स्वच्छतागृहात लावले मोबाइल

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) मुलींच्या स्वच्छतागृहात मोबाइल कॅमेरे लपवून अश्लील चित्रफित तयार केल्याचा प्रकार उघकीस आला आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशीत चार विद्यार्थ्यांची नावे समोर आल्यानंतर तत्काळ निलंबित करण्यात आले. याप्र करणीगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील दोषी विद्यार्थ्यांना संस्था पाठिशी घालत असल्याचा आरोप करीत एनएसयूआयसह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी करीत प्राचार्यांना धारेवर धरले. संबंधित विद्यार्थ्यांसह शिक्षकांवरही कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
आयटीआयमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शेकडो विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाच्या इमारतीतच मुलींसाठी स्वच्छतागृह आहे. मात्र, या स्वच्छतागृहाला कडी-कोयंडाच नाही. त्याचाच गैरफायदा घेत काही विद्यार्थ्यांनी गेल्या शुक्रवारी मुलींच्या स्वच्छतागृहात जाऊन कॅमेरा चालू ठेऊन मोबाइल लपवला. त्याद्वारे त्यांनी स्वच्छतागृहात जाणाऱ्या विद्यार्थिनींची अश्लील चित्रफित तयार केली. सायंकाळी हा प्रकार काही मुलींच्या निदर्शनास आला. त्यामुळे मुलींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. काही विद्यार्थिनींनी या बाबत महिला प्राध्यापकांना माहिती दिली. मात्र, त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतली नाही. त्यानंतर सोमवारी अकरा रोजी संबंधित विद्यार्थिंनी वर्गात बसलेली असताना चित्रफित तयार करणारे विद्यार्थी त्याठिकाणी आले. त्यांनी प्राध्यापकांसमोरच त्या विद्यार्थिनींना शिवीगाळ करीत दमदाटी केली. आमच्याविषयी तक्रार करायची नाही आणि केलीस तरी आम्हाला फरक पडणार नाही. तुम्हाला बघून घेतो, असे त्यांनी संबंधित विद्यार्थिनींना धमकावले. या दमदाटीमुळे प्रकरण आणखी चिघळले.
त्यानंतर प्राचार्य टी. एन. मिसाळ यांनी चौकशी केली असता त्यामध्ये चार विद्यार्थ्यांचा सहभाग समोर आला. त्यामुळे त्यांनी त्या चार विद्यार्थ्यांना निलंबित केले. मात्र, पुढे कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. संबंधित विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे असताना त्याबाबत कोणतीच कार्यवाही महाविद्यालयाकडून करण्यात आली नाही. बुधवारी १३ रोजी या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर एनएसयूआय आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी महाविद्यालयात पोहोचले. त्यांनी संस्थेत जाऊन प्राचार्यांना धारेवर धरले. संस्थेत तणाव निर्माण झाल्यानंतर कराड शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. या प्रकरणातील दोषी विद्यार्थी, प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वधूवर सूचक केंद्राकडूनतरुणांची फसवणूक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींना मुलींचे फोटो दाखवून स्वतः लग्न लावून देण्याची हमी देऊन अनेकांची अर्थिक लुबाडणूक करून दांपत्याने पळ काढला आहे. राजकिशोर शिंदे आणि विजया शिंदे या दाम्पत्यासह तिघांच्या विरोधात सांगलीतील विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सांगलीत आपटा पोलिस चौकीनजीक राजकिशोर वधूवर सूचक केंद्र सुरू करून त्याची जाहिरात राज्यभर केली गेल्याने फसवणूक झालेल्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील काहींचा समावेश आहे.
वधूवर सूचक केंद्राची हमखास लग्न जुळवून देण्याची जाहिरात वाचून अनेक जणांनी राजकिशोर वधूवर सूचक केंद्राकडे धाव घेतली होती. ७०० ते ८०० रुपयांचे नोंदणी शुल्क घेतल्यानंतर संबधित व्यक्तींना काही मुलींचे फोटा दाखविले जात असत. त्यापैकी पसंत असलेल्या मुलीला केंद्रात बोलावून घेऊन त्या व्यक्तीबरोबर चर्चा घडविली जायची. संबधित मुलींही फसवणुकीच्या रॅकेटचाच एक भाग असल्याने त्या संबधित व्यक्तींना पसंती दाखवायच्या. पसंती झाली की, लग्न कोर्टात किंवा नोंदणी पद्धतीने नाहीतर आमच्या केंद्रामार्फत लावून दिले जाईल, अशी अट घातली जायची. लग्नाचा खर्च म्हणून मोठी रक्कम घेतली जायची. त्यानंतर काही दिवसांनी संबधित मुलगी लग्नाला तयार नसल्याचे सांगितले जायचे. पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला तर विनयभंग, छेडछाडीचा गुन्हा दाखल करून बदनामी करण्याची धमकी दिली जायची. त्यामुळे पोलिसांपर्यंत तक्रार करण्याचे धाडस कोणाचे होत नव्हते. परंतु, मिरज तालुक्यातील सलगरे येथील रमेश तम्मा कोळेकर (वय २६) या तरुणाने धाडस करून मंगळवारी विश्रामबाग पोलिसात राजकिशोर शिंदे, विजया शिंदे आणि त्यांच्याकडे मदतनीस म्हणून काम करणाऱ्या देशमुख नावाच्या महिलेच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली. लग्नाचे अमीष दाखवून गंडवलेल्या राजकिशोर वधूवर सूचक केंद्राच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच बुधवारी आणखी तिघांनी विश्रामबाग पोलिसात धाव घेऊन आपली फसगत झाल्याचे सांगितले.
विश्रामबाग पोलिसांशी संपर्क साधणाऱ्यांमध्ये शशिकांत नारायण हल्ल्याळ (सांगली) यांच्याकडून तीन हजार, लक्ष्मण महादेव खारे (म्हैसगाव, माढा) यांच्याकडून १५ हजार आणि अनिल हणमंत जगदाळे (तासगाव) यांच्याकडून ५७ हजार रुपये आणि तक्रारदार कोळेकर या तरुणाकडून २५ हजार रुपये संबधित दाम्पत्याने उकळल्याचे समोर आले आहे.
बुधवारचा मुहुर्त
माढा तालुक्यातील म्हैसगाव येथून लग्नाच्या तयारीने आलेले लक्ष्मण खारे (वय ४१) यांना राजकिशोर वधूवर सूचक केंद्र बंद दिसले. अधिक चौकशीत त्यांना विश्रामबाग पोलिसांनी शिंदे दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे समजताच ते विश्रामबाग पोलिसांकडे धावले. त्या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘आपण मुलगी पसंत केल्यानंतर लग्नाचा खर्च म्हणून पंधरा हजार रुपये घेतले. आज, बुधवारी लग्न लावून देणार असल्याचे सांगितले होते. म्हणून आपण लग्नाच्या तयारीने आलो होतो. पण इथे आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे कळले.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पात्र शेतकऱ्यांचा नव्याने समावेश?

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
ऑनलाइन अर्जाच्या गोंधळामुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केलेला नाही. अर्ज न केलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार असल्याची शक्यता सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या सुरू असलेली प्रक्रिया संपल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा विचार होणार असल्याची चर्चा आहे. ज्यांनी अर्ज केले नाहीत त्यापैकी कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या शोध घेऊन त्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे.
६७ हजार शेतकऱ्यांना १५५ कोटींची कर्जमाफी
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर पैसे जमा करण्याच्या कामाला गती आली आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील आणखी ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ५५ कोटी रुपये वर्ग करण्यात आले . पैसे खात्यावर जमा झालेल्या शेतकऱ्यांची एकूण संख्या ६७ हजार झाली असून, सुमारे १५५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नावांवर जमा झाले आहेत.
कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या तीन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. चार महिने कर्जमाफी रकमेच्या प्रतीक्षेत शेतकरी राहिले. आता कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी पात्र असलेला एकही शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दिली होती.
जिल्ह्यासाठी २२० कोटी रुपये मंजूर झाले आहेत, त्यापैकी १४१ कोटी ३८ लाख रुपये जिल्हा बँकेला प्राप्त झाले. त्याशिवाय ३६ कोटींची मागणी करण्यात आली होती, ती ३६ कोटी रुपयांची रक्कम मंगळवारी जमा झाली. जिल्हा बँकेकडून मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांसाठी ५५ कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली. जिह्यातील २२ हजार ३८३ शेतकऱ्यांना ८१ कोटी २६ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम वर्ग केली आहे. ३८ हजार २८५ शेतकऱ्यांना ५६ कोटी ८३ लाख रुपये प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा केली.
वन टाइम सेटलमेंटसाठी मार्च अखेरची मुदत
वन टाईम सेटलमेंटसाठी ५ हजार ७३९ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांच्यासाठी ३९ कोटी ४२ लाख रुपये मंजूर आहेत. ओटीएससाठी यापूर्वी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. सरकारने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी सर्व पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर सुरू होईल.
सोलापुरात ४४७६६ शेतकऱ्यांना
२२७ कोटींची कर्जमाफी
सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र ४४७६६ शेतकऱ्यांना २२७ कोटी ६१ लाख १४५५३ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. शेतकरी कर्जमाफी अंतर्गत २१७५८ शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे. १२८८२ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. त्यापोटी २३ कोटी ७० लाख २५२१३ रुपये वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिली.
साताऱ्यात २३३ कोटींची कर्जमाफी
सातारा :
सातारा जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ४१७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्याला आजपर्यंत २३३ कोटी ६३ लक्ष ६ हजार ९२८ रुपये प्राप्त झाले असून, यापैकी १८१ कोटी २९ लक्ष रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी दिली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेला १५९३०८ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २१० कोटी २२ लक्ष ४७ हजार २७५ आणि राष्ट्रीय व व्यापारी बँकांना ३ हजार ५६५ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २३ कोटी ४० लक्ष ५९ हजार ६५३ रुपये असे एकूण २३३ कोटी ६३ लक्ष ६ हजार ९२८ रुपये प्राप्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ मुख्याध्यापिकेवर कारवाईचे आदेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चंदगड तालुक्यातील कानूर ब्रुद्रुकच्या श्री भावेश्वरी संदेश विद्यालयालयातील विद्यार्थिनीला ‌उठाबशा काढण्याची शिक्षा देऊन शारीरिक इजा पोहोचवल्याच्या प्रकाराची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. संबंधित मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. या आदेशानुसार मुख्याध्यापिका अश्विनी अशोक देवाणचे रोखण्याची कारवाई शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी बुधवारी केली. दरम्यान, चौकशी समितीनेही देवाणवर ठपका ठेवला आहे. ​ दरम्यान, मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादिवरून मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवाणने दिलेल्या शिक्षेमुळे आठवीतील विजया चौगुले ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिंदी विषयाचे पत्रलेखन आणि समानार्थी शब्दांसंदर्भात विद्यार्थ्यांना प्रकल्प दिला होता. यांपैकी ७ विद्यार्थ्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण केला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. विजया ‌उठाबशा काढून थकली आणि ती जाग्यावरच कोसळली होती.

शिक्षाधिकारी लोहार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विस्तार अधिकारी सौ. एस. एस. सुभेदार यांची नियुक्ती केली होती. सुभेदार यांनी चौकशी केली. चौकशीवेळी सातपैकी विजया गैरहजर होती. त्यामुळे तिच्या काळगोंडवाडी (ता. चंदगड) मूळ गावी जाऊन चौकशी करण्यात आली. तिची आई सुनीता, वडील निवृत्ती चौगुले यांचा लेखी जबाब नोंदवला. त्यांनी मुख्याध्यापिका देवाण यांनी विजयाला ५०० उठाबशा काढायला सांगितले. तिने ३०० बैठका काढल्या. तर विजयाने दिलेल्या जबाबात देवाण यांनी मला ९ च्या वर्गात बोलावून उठाबशा काढण्यास लावले, असे सांगितले. प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिकेने उठाबशा काढायला लावून शारीरिक शिक्षा दिल्याचे स्पष्ट होते. किशोरवयीन मुलांना अन्य विद्यार्थ्यांसमोर बैठका काढायला लावणे, हे कृत्य अयोग्य आहे, असे अहवालात म्हटले आहे.

==========

या मुख्याध्यापिकेवर पहिल्या टप्प्यात वेतन रोखण्यासाठी कारवाई झाली आहे. आता संस्थेला नोटीस दिली जाईल. पुढील टप्प्यात मुख्याध्यापिकेचे कायमस्वपरूपी वेतन रोखणे, निलंबन आणि बडतर्फी आवश्यकता वाटल्यास संस्थेचे अनुदान बंद करणे किंवा मान्यता रद्द करण्याची कारवाई होऊ शकते.

डॉ. कुणाल खेमनार, सीइओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण हटाव मोहीम बंद पाडली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्यानंतर नागोजीराव पाटणकर हायस्कूलसमोरील अनाधिकृत केबिन्स काढण्यास उपशहर अभियंत्यांनी बुधवारी मुदत दिली. या प्रकाराने संतप्त झालेल्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोहीमच थांबवली. मुदत देण्याच्या प्रकारावरुन मोठा तणाव निर्माण झाला. अन्य कोणत्याही ठिकाणी कारवाईस मुदत दिली नसल्याने येथेही मुदत देऊ नये, असा पवित्रा अतिक्रमण निर्मूलन विभागाने घेतला. मात्र उपशहर अभियंत्यांनी परस्पर मुदत दिल्याने महापालिकेच्या दोन विभागातील बेबनाव उघड झाला. तत्पूर्वी फुलेवाडी जकात नाक्याजवळ एक शेड हटवण्यात आले. तर फुलेवाडी फायर

स्टेशनजवळ पुन्हा लावलेल्या केबिन्स काढण्यात आल्या. यातील काही शेडमध्ये मटका अड्डा सुरू होता. शेड हटवतानाही महापालिकेच्या पथकांबरोबर किरकोळ वादावादी झाली.

गेल्या दोन आठवड्यांपासून महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. कारवाई कोणत्याही परिस्थितीत थांबवू नये असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. चारही उपशहर अभियंत्यांना या मोहिमेचे नेतृत्व करण्यास सांगितले आहे. कारवाईवेळी कोणतीही मुदत द्यायची नाही, असे ठरले आहे. रंकाळा रोडवरील नागोजीराव पाटणकर हायस्कूलसमोरील ओढ्यावर महापालिकेने ८ ​केबिन्सचे पुनर्वसन केले आहे. मात्र प्रत्यक्षात दुप्पट केबिन्स होत्या. त्यामुळे बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास इस्टेट अधिकारी प्रमोद बराले यांना बोलवून अनाधिकृत केबिन्सची खातरजमा करण्यात आल्या. त्यानंतर कारवाई सुरू करण्यात येणार होती. त्याचवेळी नगरसेवक प्रताप जाधव यांनी केबिन्सधारकांची बाजू मांडत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख पंडीत पोवार यांना बोलावून घेऊन, केबिन्स काढून घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यास सां​गितले. अशी मुदत देता येणार नाही, असे पोवार यांनी सांगितले. यावरुन तेथे वाद झाला. त्यावेळी पोवार यांनी वरिष्ठांशी चर्चा करा, असे नगरसेवकांना सांगितले. नगरसेवक जाधव यांनी उपशहर अभियंता एस. के. माने यांच्याशी चर्चा केली. दोन दिवसांची मुदत मागितली. लेखी हमी देतो असेही सांगितले.

यावेळी माने यांनी, पुढे कारवाई करुया, असे पोवार यांना सांगितले. पोवार यांनी मात्र यापूर्वीच्या कोणत्याही कारवाईवेळी मुदत दिलेली नाही. त्यामुळे आता मुदत दिली तर पूर्वीच्या कारवाई केलेल्या फेरीवाल्यांचा रोष निर्माण होईल. कारवाईला विरोध होत राहील, असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही मुदत

देण्याच्या निर्णयात बदल न केल्याने पोवार यांनी अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई थांबवत असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांना जेवणाची सुट्टी दिली. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनाही कारवाई थांबवत असल्याचे फोनवरुन कळवले. या प्रकाराची माहिती आयुक्तांना देणार असल्याचे पोवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिर्यादिच्या ड्रायव्हरकडूनच दरोडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाचगाव रोड येथील जगतापनगरमध्ये ३ डिसेंबरला पडलेल्या दरोड्याचा करवीर पोलिसांनी उलगडा केला असून, चार संशयितांना अटक केली. फिर्यादी शिवलिंग खतकल्ले (वय ७१, रा. जगतापनगर) यांच्याकडे १७ वर्षे कारचालक म्हणून काम करणारा संजय संपत सरदार (४२, रा. योगेश्वरी कॉलनी, जरगनगर) याच्यासह जयसिंग महादेव चौगले (३४, रा. योगेश्वरी कॉलनी, जरगनगर), सिकंदर बादशहा शेख (३८) आणि दत्तात्रय संभाजी भारती (३२, दोघेही रा. आशियाना कॉलनी, जरगनगर) या चौघांना पोलिसांनी बुधवारी (ता. १३) पहाटे अटक केली. पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी ही माहिती दिली.

समाजकल्याण विभागातून सेवानिवृत्त झालेले शिवलिंग खतकल्ले विजयकुमार पेडणेकर या मित्रासोबत धान्यविक्रीचा भागीदारीत व्यवसाय करतात. खतकल्ले यांच्याकडे गेल्या १७ वर्षांपासून संजय सरदार हा कारचालक म्हणून काम करतो. तर पेडणेकर यांच्याकडे जयसिंग चौगले हा कारचालक म्हणून काम करतो. खतकल्ले यांच्याकडे पैसे असल्याची माहिती या दोघांनाही होती. हे दोघेही जरगनगरातील योगेश्वरी कॉलनीत राहतात. जवळच असलेल्या आशियाना कॉलनीतील सिकंदर शेख आणि दत्तात्रय भारती या जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या दोघांशी ओळख होती. झटपट पैसे मिळवून श्रीमंत होण्याची चर्चा या चौघांमध्ये नेहमीच होत असे. पंधरा दिवसांपूर्वी संजय सरदार याने इतर तीन साथीदारांसह शिवलिंग खतकल्ले यांच्या घरावर दरोडा टाकून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा कट रचला. सरदार आणि चौगले हे दोघेही खतकल्ले यांच्या ओळखीचे असल्याने त्यांनी दरोड्यासाठी शेख आणि भारती या दोघांना पाठवले.

शेख आणि भारती या दोघांनी खतकल्ले कुटुंबीयांना धमकावून रोख ८० हजार रुपये आणि १३ तोळे दागिने लुबाडले. याशिवाय ३० लाख रुपयांच्या खंडणीसाठीही धमकावले. सोमवारी (ता. ११) फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने फोन कॉल्सच्या डिटेल्स काढून संशयितांचा शोध सुरू केला. फोनवर बोलताना संशयितांनी ‘अण्णा कुठे आहेत?’ अशी विचारण केली होती, त्याचबरोबर घरातील पैसे आणि दागिन्यांविषयी त्यांना माहिती होती, त्यामुळे खतकल्ले कुटुंबीयांशी संबंधित चोरटे असल्याचा संशय बळावला होता. संशयितांनी केलेल्या फोन कॉल्सवरून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. यात आढळलेल्या निळ्या रंगाच्या कारच्या नंबरवरून पोलिस संशयितांपर्यंत पोहोचले. निरीक्षक दिलीप मोहिते यांनी बुधवारी पहाटे संशयितांच्या घरांवर छापे टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीतील ८० हजार रुपये आणि ८ तोळे दागिने हस्तगत केले आहेत.

======

झटपट श्रीमंतीसाठी दरोडा

संजय सरदार हा खतकल्ले यांचा कारचालक आहे, तर जयसिंग चौगले हा विजयकुमार पेडणेकर यांचा कारचालक आहे. हे दोघे अनेकदा शेख आणि भारती यांच्याशी गप्पा मारत होते. शेख आणि भारती हे दोघेही जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. पैशांची चणचण भासत असल्याचे शेखने सांगितल्यानंतर संजय सरदारने स्वतःच्या मालकाच्या घरीच दरोडा टाकण्याचा कट रचला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाइम्स पुणे प्रॉपर्टी’ शोमधून व्हा पुणेकर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुण्यामध्ये घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी पुण्यात जाऊन फिरण्यापेक्षा त्या घरांची माहिती कोल्हापुरातच मिळाली तर.. दि टाइम्स ऑफ इंडिया व महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने आयोजित केलेले दोन दिवसांचे ‘दि टाइम्स पुणे प्रॉपर्टी प्रदर्शन’ त्यासाठीच आयोजित केले आहे. शनिवार (​ता. १६ डिसेंबर) व ​रविवार (ता. १७ डिसेंबर) असे दोन दिवस हॉटेल सयाजी येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

विद्येचे माहेरघर, विविध प्रकारच्या इंडस्ट्री यामुळे ​पुणे प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुण्यामध्ये हक्काचे घर असावे, अशी अनेकांची मनोमनी इच्छा असते. आपल्या आवडीच्या परिसरात, बजेटमध्ये घर असावे, असे वाटत असते. पण ते कसे शोधायचे हा प्रश्न असतो. पण ‘दि टाइम्स पुणे प्रॉपर्टी प्रदर्शन’ नक्कीच हा प्रश्नाचा गुंता सोडवण्यास मदत करणार आहे. सलग तिसऱ्या वर्षी होत असलेले प्रदर्शन हॉटेल सयाजीमध्ये आयोजित केले आहे.

शनिवारी (१६ डिसेंबर) या प्रदर्शनाचे उ‍द‍्घाटन होणार आहे. पुण्यातील २०० हून अधिक महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांची माहिती ग्राहकांना मिळणार असून त्यासाठी नागरिकांना पुण्यामध्ये चकरा मारण्याची अजिबात गरज नाही. सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून प्रवेश व पार्किंग विनामूल्य आहे. पुण्यातील घराबरोबरच प्रदर्शनामध्ये लक्झरी ऑटो पॅव्हेलियन हे खास आकर्षण राहणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या लक्झरी कार पहायला मिळणार आहेत. त्यामुळे पुण्यातील हक्काचे घर यामध्ये नक्कीच निश्चित करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णकुमार ‘जनसुराज्यशक्ती श्री’ चा मानकरी

0
0

पन्हाळा

सहकारमहर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या २३ व्या पुण्यस्मरणनिमित्त वारणानगर (ता.पन्हाळा) येथे आयोजित केलेल्या भव्य ‘वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम’ मैदानात प्रथम क्रमांकाच्या ‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताबासाठी झालेल्या हिंदकेसरी जास्सा पट्टी विरुध्द हिंदकेसरी कृष्णकुमार यांच्यातील लढतीत कृष्णकुमार ‘जनसुराज्यशक्ती श्री’ किताबाचा मानकरी ठरला.

प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत दोघेही एकमेकाचा अंदाज घेत होते. अत्यंत अटीतटीच्या लढतीत जास्सा पट्टी कृष्णकुमारच्या पकडीतून दोन वेळा बचावला. पंचवीस मिनिटानंतर पंचांनी ही कुस्ती गुणावर करण्याचा निर्णय झाला. यामध्ये सुरुवातीपासूनच कृष्णकुमारने जादा गुण मिळविल्याने तो ‘जनसुराज्यशक्ती श्री’ किताबाचा मानकरी ठरला. दुसऱ्या क्रमांकासाठी वारणा साखर किताबासाठी झालेल्या लढतीत भारत केसरी साबा पंजाबी व हिंदकेसरी जोगिंदरसिंग यांच्यात दोघेही वेगवेगळे डाव खेळत होते. सुरुवातीला साबा याने जोगिंदरवर ताबा घेतला होता, पण अवघ्या काही वेळेत हा ताबा सुटण्यासाठी साबा याने प्रयत्न केला. ही कुस्ती लांबल्याने पंचांनी पाच मिनिटांनी जो कुस्ती जिंकेल त्याला विजयी घोषित केले जाईल, असे सांगितले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात साबाने जोगिंदरला आस्मान दाखविले. साबा हा ‘वारणा साखर किताब’साठी मानकरी ठरला. तात्यासाहेब कोरे दूध-साखर वाहतूक’ किताबासाठी पुण्याचा किरण भगत विरुध्द दिल्लीचा अजय गुज्जर यांच्यात झालेल्या लढतीत सुरुवातीपासून गुज्जर याने भगतवर ताबा घेतला होता.अवघ्या पाच मिनिटात समोरून हप्ता मारल्याने किरण भगत हा चितपट झाला. गुज्जर याला ‘तात्यासाहेब कोरे दूध-साखर वाहतूक’ हा किताब देवून सन्मानित केले.

‘वारणा दुध संघ शक्ती’ या किताबासाठी भगवंत केसरी माऊली जमदाडे विरुध्द उत्तर प्रदेश केसरी गोपाल यादव यांच्यात सुरुवातीस दोघे आक्रमक खेळ खेळत होते. माऊली जमदाडे याने एकरी पटाने ताबा घेतला. गोपाल याने डकी डाव खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र पुन्हा माऊलीने घुटना डावावर गोपाल यादवला स्मान दाखवून ‘वारणा दुध संघ शक्ती’ बहुमान पटकाविला.‘वारणा ट्रॅक्टर ऊस वाहतूक किताब’ साठी झालेल्या लढतीत महाराष्ट्र केसरी समाधान घोडके विरुध्द कर्नाटक केसरी कार्तिक काटे यांच्या लढतीत सुरुवातीपासून घोडके याने केसरी याच्यावर ताबा घेतला. दोन्ही मल्लांना वेळेचे भान ठेवून कुस्त्या करण्याचा सूचना दिल्या. दोघांचीही धरपकड सुरु होती, मात्र कुस्ती खेळताना समाधान घोडके जखमी झाल्याने कार्तिक काटे याला पंचानी विजय घोषित केले. कार्तिक हा ‘वारणा ट्रकर ऊस वाहतूक किताब’ मानकरी ठरला. ‘वारणा बँक शक्ती’ किताबासाठी बाला रफिक विरुध्द हरियाणा केसरी प्रवीण भोला यांच्यात दहा मिनिटे कुस्ती सुरु होती. सुरुवातीपासूनच बाला रफिकने आपली पकड मजबूत केली होती. मात्र प्रवीण भोलाने घुटना डाव टाकत ‘वारणा बँक शक्ती किताब’ पटकाविला. ईडीएफ मान इंडिया शक्ती किताबासाठी उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार विरुध्द राष्ट्रीय विजेता शिवराज राक्षे यांच्यात लढतीत शिवराजने निकाल डावावर आस्मान दाखविले. शेतीपूरक शक्ती किताबासाठी कौतुक डाफळे विरुध्द राष्ट्रीय विजेता लवप्रित यांच्यात लढतीत घुटना डावावर डाफळेने चितपट करण्याचा प्रयत्न केला. मात्र डाफळे जखमी झाल्याने लवप्रीत याला पंचांनी विजयी घोषित केले. दूध कामगार शक्ती किताबासाठी संग्राम पाटील विरुध्द विष्णू खोसे यांच्या लढतीत खोसे याने घुटना डावावर चितपट करून दुध कामगार शक्ती किताब मिळविला. कोल्हापूर जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती शक्ती किताबासाठी सचिन जामदार विरुध्द अंकित कुमार यांच्या लढतीत जामदारने बाजी मारली. वारणा बझार शक्ती किताब शिवाजी पाटील याने तर वारणा कामगार शक्ती किताब दत्ता नरळे याने न मिळविला. यावेळी विश्वनाथ वारणा किताबाच्या प्रमुख १५ लढती झाल्या. एकूण सुमारे २५७ कुस्त्या झाल्या.

विजयी मल्लांना माजी मंत्री विनय कोरे, युवा नेते विश्वेश कोरे, ज्योतिरादित्य कोरे, जनसुराज्यशक्तीचे युवक प्रदेशाध्यक्ष समीत कदम, वारणा दुध संघाचे उपाध्यक्ष डॉ.भाऊसाहेब गुळवणी,वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील,प्रभारी कार्यकारी संचालक विजय कोले यांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आली. याप्रसंगी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, पी.डी.पाटील, हिंदकेसरी दिनानाथ सिंह, संभाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पंच म्हणून प्रकाश पाटील (वस्ताद) यांनी काम पाहिले . सूत्रसंचालन राम सारंग यांनी केले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरपासून

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेली सहा वर्षे चर्चेत असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा येत्या २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. एअर डेक्कन कंपनीचे १९ सीटर विमान मंगळवार, बुधवार आणि रविवारी टेक ऑफ करणार आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेतून ही सेवा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळावर रंगरंगोटी, धावपट्टी दुरुस्ती, पार्किंग आणि सुरक्षा व्यवस्थेचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

गेले काही दिवस विमानसेवा सुरु होण्याची आश्वासने दिली जात होती. मात्र मुंबईत विमानासाठी वेळेचा स्लॉट मिळत नव्हता. तो निश्चित करण्यात आला. मात्र, विमान कंपनी निश्चित झालेली नव्हती. या दरम्यान २५ आणि २६ ऑक्टोबरला भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नागरी उड्डाण संचालनालयाच्या संयुक्त पथकाने विमानतळाची पाहणी करुन प्रवासी वाहतुकीचा परवाना दिला. त्यानंतर राज्य सरकारकडून एअरजेट, एअर इंडिया, इंडिगो आणि एअर डेक्कन या कंपन्यांसोबत चर्चा सुरु होती. अखेर एअर डेक्कनने विमानसेवा देण्यास सहमती दर्शविली. दर मंगळवार, बुधवार आणि रविवारी विमानसेवा दिली जाणार आहे. प्रत्यक्षात रविवारपासून विमानसेवा सुरू होणार आहे. दरम्यान विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून नवीन टर्मिनल इमारतीचे काम मात्र अद्याप सुरु झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‌विद्यार्थ्यांना शिक्षा दिल्याची कबुली

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : कानूर बुद्रुक (ता. चंदगड) येथील श्री भावेश्वरी संदेश विद्यालयातील मुख्याध्यापिका अश्विनी अशोक देवाण यांनी विजया चौगुले हिच्यासह सात ‌विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. चौकशी अहवालात मुख्याध्यापिका देवाण आणि त्यांचे पती, सहायक शिक्षक अशोक गोविंद देवाण, विश्वास पाटील, शिक्षकेतर कर्मचारी तिपान्ना इराप्पा नाईक, नंदकुमार सटुप्पा पाटील यांनीही प्रकल्प पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांना बैठका मारण्यास सांगितल्याचे मान्य केल्याचे नमुद आहे. याबाबत मुख्याध्यापिकांवर पहिल्या टप्यात वेतनवाढ रोखण्याची कारवाई झाली. आता पुढील टप्यात देवाण यांच्यासह हायस्कूलवरही कारवाई होऊ शकते.

दरम्यान, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा आणि महाराष्ट्र खाजगी शाळा संहिता अधिनियममधील तरतुदीनुसार कोणती शिक्षा द्यायची याचा अभ्यास माध्यमिक शिक्षण प्रशासन करीत आहे. उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे गंभीर जखमी झालेली विद्यार्थिनी विजया हिचे वडील त्याच हायस्कूलमध्ये परिचर म्हणून कार्यरत आहेत. पुढील काळात संस्थाचालकांकडून त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांची दुसऱ्या अनुदानित संस्थेत बदली करण्यासंबंधीच्या सूचना सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. चौकशी अहवाल परिपूर्ण होण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना हायस्कूला भेट देऊन विद्यार्थ्यांचे जबाब घेण्याचा आदेशही सीईओंनी दिले आहेत.

मात्र, प्राथमिक चौकशी अहवाल माध्यमिक शिक्षण विभागाकडे आला आहे. त्यातूनही अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. विजया चौगुले हिच्यासह सात विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा मुख्याध्यापिका देवाण यांनी दिली. यापैकी विजया ही ३०० उठाबशा काढल्यानंतर जखमी होऊन कोसळली. तर अजित कडलगे या विद्यार्थ्याने २०० उठाबशा काढल्या आहेत, असे चौकशी अहवालात म्हटले आहे. वर्गातील अन्य विद्यार्थ्यांसमोरच ही शिक्षा सुनावल्याने या मुलांच्या मनावर विपरित परिणाम झाला आहे. जखमी विजयाही मानसिकदृष्ट्या खचली आहे. असा गंभीर प्रकार असताना दबावापोटी पोलिसांनी मुख्याध्यापिका देवाण यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केलेला नव्हता. त्यामुळे चंदगडच्या पालकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी ‌जिल्हा पोलिसप्रमुखांना भेटून कारवाईची मागणी केली.


अजितने काढल्या २०० उठाबशा

विजयासह अन्य विद्यार्थ्यांनीही उठाबशा काढल्या. यापैकी अजित अडव्याप्पा कडलगे याने तर २०० उठाबशा काढल्या. तर प्रथमेश प्रकाश गावडेने ३०, मानव मनोहर गणाचारीने २०, साहील मसणू गावडेने १५, यश दिनकर गावडेने १० आणि स्वप्नील लक्ष्मण गोंडेने १० उठाबशा काढल्या.


नोकरी धोक्यात येईल म्हणून...

शिक्षेमुळे पायांना गंभीर दुखापत झालेल्या विजया चौगुलेचे वडील त्याच शाळेत परीचर आहेत. त्यांचा सीआर व अन्य प्रशासकीय कामांचा अहवाल देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांकडे असतात. मुलगी शिक्षेमुळे गंभीर जखमी होऊनही नोकरी जाईल या भीतीपोटी ते सुरुवातील तक्रार करण्याचे धाडस करीत नव्हते. मात्र विजयाची प्रकृती खालावल्यानंतर तिला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने हे प्रकरण गांभीयाने पाहिले.

चंदगड तालुक्यातील त्या विद्यार्थिनीस मुख्याध्यापिकेने आमनुष शिक्षा दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. त्या मुख्याध्यापिकेवर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश चंदगड पोलिसांना दिले. त्यानुसार कारवाई झाली.

- संजय मोहिते,
जिल्हा पोलिस प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शालिनी ​सिनेटोनची जागा बिल्डरला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शालिनी सिनेटोन परिसरात सिनेमा व्यवसायासाठी राखीव ठेवलेली सुमारे सात एकर जागा बिल्डरकडे सोपविण्याच्या दृष्टीने मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला. चित्रपट व्यावसायिक आणि काही नगरसेवक ही जागा सिनेटोसाठी कायमस्वरुपी राखीव ठेवावी, यासाठी महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करत असताना सर्वसाधारण सभेत सिनेटोनचे दोन भूखंड आरक्षित करण्याबाबतचा ऑफिस प्रस्तावच नामंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे कोणत्याही चर्चेविना घाईगडबडीत हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेतील विविध आघाड्यातील कारभाऱ्यांनी नगरसेवकांना अंधारात ठेवून परस्पर हा निर्णय घेतल्यामुळे यावरुन वाद उफाळणार आहे.

महापालिका सर्वसाधारण सभेत यापूर्वी दोनदा हा विषय आला होता. मात्र तो पुढील मिटींगमध्ये घेण्यात आला होता. मंगळवारच्या सभेत अवघ्या अर्धा मिनिटांत ऑफिस प्रस्ताव फेटाळण्यात आला. महापालिका प्रशासनाने भूखंड क्रमांक पाच (१३,८८० चौरस मीटर) आणि भूखंड क्रमांक सहा (२०,००० चौमी) या दोन जागा शालिनी सिनेटोनच्या वापरासाठी आरक्षित करण्याबाबतचा प्रस्ताव सभागृहासमोर मान्यतेसाठी मांडला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर शालिनी सिनेटोनच्या दोन्ही भूखंडाचा वापर सिनेव्यवसायासाठीच आरक्षित झाले असते, पण सभागृहाने ऑफिस प्रस्ताव नामंजूर करत बिल्डरधार्जिणा निर्णय घेतला. त्यामुळे काही नगरसेवकांतूनच आता ओरड सुरू झाली आहे.

कोल्हापुरातील सिनेनिर्मितीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी आक्कासाहेब महाराज यांनी रंकाळा तलावालगत ४७ एकर जागेत जानेवारी १९३४ मध्ये शालिनी सिनेटोनची उभारणी केली होती. तेव्हापासून शालिनी सिनेटोनमध्ये मराठी, हिंदीसह अन्य भाषांतील सिनेमांचे ​चित्रीकरण झाले. दरम्यान, कोल्हापुरात सिनेनिर्मिती कमी झाल्यामुळे सिनेटोनची जागा खासगी विक​सकाने विकसित केली. त्याला चित्रपट व्यावसायिक, कलाकार, तंत्रज्ञांनी विरोध केल्यानंतर ४७ एकर जागेमधील दोन भूखंड शालिनी सिनेटोनसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय झाला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता.

या जागेचा हेरिटेज वास्तू व विकासाला परवाना यावरुन महापालिका आणि जागा मालक यांच्यात वाद सुरु आहे. विकासाला परवानगी द्यावी म्हणून विकसकाने सरकारकडे अपिल केले आहे. वारसास्थळ संवर्धन समितीने या जागेचा हेरिटेजमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. या जागेचा हेरिटेजमध्ये समावेश होण्यासाठी महापालिका प्रयत्नशील होती. सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर हेरिटेजमधील नियमामुळे ती जागा विकसित करता आली नसती. मात्र हा प्रस्ताव नामंजूर करुन ती जागा वापरात आणण्याच्यादृष्टीने मार्ग मोकळा केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ अपहरणकर्ते सीमाभागातील

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देवदर्शनासाठी गोव्याहून महाराष्ट्रात आलेल्या चौघा तरुणांची सुखरुप सुटका केल्यानंतर पोलिस आता अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत. पळून गेलेले दहा अपहरणकर्ते कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातील आहेत. या टोळीत काही सराईत गुन्हेगारांचाही समावेश असल्याचा संशय पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सीमाभागात संशयितांचा शोध सुरू आहे.

गोव्यातील म्हापसा येथून राहुल धारगरळकर (वय २०), सावळो गावकर, ज्ञानेश्वर गोकाककर आणि मनोज गावकर हे चौघे शुक्रवारी (ता. ८) रात्री नऊच्या सुमारास शिर्डीला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. रविवारी (ता. १०) राहुल यांच्या मोबाइलवरून अज्ञाताने त्याचे वडील दिलीप धारगळकर यांना फोन केला. ‘तुमच्या मुलासह त्याच्या मित्रांचे आम्ही अपहरण केले आहे. चौघेही जिवंत हवे असतील तर २५ लाख रुपये खंडणी द्या,’ अशी धमकी दिली. दिलीप

धारगळकर यांनी सोमवारी कोल्हापुरात येऊन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेतली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. राहुलच्या मोबाइल लोकेशनवरून संशयितांचा शोध घेण्यात आला.

पोलिसांनी आजरा तालुक्यातून तरुणांची सुटका केली. अपहरणकर्त्यांना परडण्यासाठी पथके सीमाभागात रवाना झाली आहेत. संशयित कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील आहेत. काहीजण सराईत गुन्हेगार आहेत. संशयितांनी अपहरणकर्त्यांच्या मोबाइलवरूनच खंडणी मागितली. यामुळेच पोलिसांना लोकेशन शोधता आले, असे अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.


तासात दोन कारचे अपहरण

संशयित अपहरणकर्त्यांनी सोमवारी सकाळी निपाणी ते तवंदी घाटादरम्यान पहिल्यांदा गोवा पासिंगची एक कार अडवली. चालकाला धमकावून त्यांनी चालकाला पाठीमागील सिटवर बसवले. यानंतर तासाभरातच गोव्यातील तरुणांची कार अडवली. पहिल्या कारमधील चालकासह राहुल धारगळकर याच्या मित्रांना त्यांनी आजरा परिसरातील एका खोलीत डांबून ठेवले, तर राहुलला सोबत घेऊन ते जयसिंगपूरकडे गेले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरीत चुरशीने ८५ टक्के मतदान

0
0

हुपरी

नवनिर्मित हुपरी नगरपरिषदेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी मोठ्या चुरशीने मतदान होऊन ८५.१८ टक्के मतदान झाले. भाजप, कोल्हापूर ताराराणी आघाडी, शिवसेना, मनसेची श्री. अंबाबाई आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाल्याने गुरुवारी (ता.१४) होणाऱ्या मतमोजणीत कोण बाजी मारणार याची उत्कंठता हुपरीकरांना लागली आहे.

दरम्यान, चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपचे उमेदवार आण्णासाहेब शेंडूरे व शिवसेनेचे उमेदवार संभाजी हांडे यांच्यात मतदान केंद्रावर गाडी नेण्यावरून वादावादी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद निवळला. तसेच प्रभाग क्रमांक पाचमध्ये पैसे वाटत असल्याच्या संशयावरुन दोघांना कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. प्रभाग क्रमांक सहामधील एका केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याने गोंधळ उडाला, परंतु दुसरे यंत्र दिल्याने शांततेत मतदानास सुरुवात झाली.

हुपरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी भाजपमधून जयश्री महावीर गाट, कोल्हापूर ताराराणी आघाडीतून सीमा प्रकाश जाधव, शिवसेनेतून विमल मुरलीधर जाधव, मनसेच्या श्री. अंबाबाई आघाडीतून गीतांजली दौलत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसमधून दिपाली बाळासाहेब शिंदे यांच्यासह नगरसेवक पदासाठीच्या १८ जागांसाठी ९५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.

बुधवारी सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. साडेअकरा ते साडेतीन वाजेपर्यंत मतदारांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने ७४ टक्के मतदान झाले होते. तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकूण २१७७० पैकी पुरुष ९७३० व महिला ८८३० इतके मतदान होऊन सरासरी ८५.१८ टक्के मतदान झाले. हुपरी शहरासाठी ग्रामपंचायतीतून नगरपरिषद मंजूर झाल्याने प्रथमच निवडणूक होत असल्याने याला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे भाजपने नगरपरिषद मंजूर करुन आणण्याच्या जोरावर या निवडणुकीला महत्त्व दिले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार सुरेश हाळवणकर यांनी रेंदाळ जिल्हा परिषद निवडणुकीत अल्प मतात पराभूत झालेल्या महावीर गाट यांच्या पत्नी जयश्री गाट यांना तर हुपरी परिसरात आवाडे गटाच्या ताकदीवर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी माजी उपसरपंच प्रकाश जाधव यांच्या पत्नी सीमा जाधव यांना, शिवसेनेने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या पत्नी विमल जाधव यांना, मनसेने आपल्या पक्षाचे महाराष्ट्रातील पहिले सरपंचपद भूषवलेले दौलत पाटील यांच्या पत्नी गीताजंली पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने माजी सरपंच दिपाली शिंदे यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती.

भाजपच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर,हिंदूराव शेळके, अशोक स्वामी, नगरसेवक तानाजी पोवार, महावीर गाट यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सर्व ठिकाणी लक्ष घालून प्रचार यंत्रणा नियोजनबद्धरित्या सांभळली. कोल्हापूर ताराराणीच्या माध्यमातून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या साथीने सर्व प्रचार यंत्रणा कार्यान्वित केली होती. शहरातील प्रत्येक भागात कोपरा सभा, पदयात्रा,भेटीगाटी यासह जाहीर सभा घेतल्या तसेच कॉग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना प्रचारात आणून अद्याप कॉग्रेस सोडली नसल्याचे अप्रत्यक्षरित्या दाखवून दिले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी शिवसेनेच्या खासदार, आमदार यांच्या सभा, मेळावे, पदयात्रा घेत भाजपवर केलेल्या सडकून टिकेने निवडणुकीत रंग भरला. मनसेच्या श्री.अंबाबाई आघाडीच्या दौलत पाटील यांनी कोणावरही टिकाटिपण्णी न करता स्थानिक नेते, कार्यकर्त्यांबरोबर सभा, पदयात्रा करत प्रचाराचे चांगले नियोजन लावले. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने माजी सरपंच दिपाली शिंदे यांना उमेदवारी दिली, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून आले.

मतदानासाठी पोलिस उपविभागीय अधिकारी विनायक नरळे व सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्यासह बारा पोलिस अधिकारी, १०० पोलिस कर्मचारी व होमगार्ड तसेच जलद कृतीदलाच्या दोन तुकड्या असा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार वैशाली राजमाने,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी नरळे, विजय राजापूरे यांनी निवडणूक यंत्रणा चोखपणे राबवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानसिंग बोंद्रेला न्यायालयीन कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्नाटकातील उद्योजकावर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेला मानसिंग विजयराव बोंद्रे (वय ३०, रा. रंकाळा परिसर) याला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, बोंद्रे याची तब्येत बिघडल्याने त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.

बांधकाम व्यावसायिक आणि श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मानसिंग बोंद्रे याने मंगळवारी पहाटे ताराबाई पार्कातील वृषाली हॉटेलसमोर कर्नाटकातील एका उद्योजकावर पिस्तूल रोखले होते. कार बाजुला घेण्यावरून झालेल्या वादातून बोंद्रे याने काही अंतरावर जाऊन हवेत गोळीबार केला. याप्रकरणी उद्योजक अनंत प्रेमनाथ शेट्टी (वय ४३, रा. मेंगलोर) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून बोंद्रेला अटक केले होते. पोलिसांनी बुधवारी त्याला कसबा बावडा येथील कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी मिळताच बोंद्रे याची तब्येत बिघडली. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने पोलिसांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. प्रकृतीत सुधारणा होताच बोंद्रे याची कोठडीत रवानगी केली जाणार आहे, अशी माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

दरम्यान, बोंद्रे याच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना असल्याचे स्पष्ट झाले. त्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असून, त्याने परवाना नुतनीकरणासाठी अर्जही सादर केला आहे. बोंद्रे याने हवेत गोळीबार केल्याची कबुली दिली असून, पिस्तूल काडतुसे, पुंगळीही पोलिसांकडे दिली.


तर पिस्तूल परवाना रद्द होऊ शकतो

बोंद्रे याने स्वसंरक्षणासाठी पिस्तूल परवाना घेतला आहे, मात्र दोनदा त्याच्याकडून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. जाणीवपूर्वक दहशत माजवण्याचा हा प्रकार असल्याने यातून एखाद्या व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. बोंद्रे याच्याकडून शस्त्र परवान्याचा भंग झाल्याचा अहवाल पोलिसांनी देताच जिल्हाधिकाऱ्यांकडून शस्त्र परवाना रद्द होऊ शकतो, त्याचबरोबर नव्याने परवाना मिळण्यातही अडचण येऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादामुळे सिनेमा थांबू नये

0
0

सुभाष घई यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आपल्या देशात करोडो लोक राहतात. हजारो समाज आहेत. त्यांची संस्कृती, इतिहास याच्याशी जोडलेल्या परंपरांमध्ये वैविध्य आहे. साहजिकच यावर बेतलेल्या सिनेमामुळे वाद होतच राहणार. वाद यापूर्वीही होते आणि भविष्यातही होतील. पण वाद होईल म्हणून सिनेमाची भाषा मूक होऊ नये. ती एक अभिव्यक्ती आहे. त्यातून समाजाने काय चांगले घ्यायचे आणि कुठे दुर्लक्ष करायचे एवढी प्रगल्भता रसिकांमध्ये येणेही महत्वाचे आहे, अशा शब्दात निर्माता, दिग्दर्शक सुभाष घई यांनी 'पद्मावती' चित्रपटाला होत असलेल्या विरोधाचा उल्लेख न करता नाराजी व्यक्त केली.

सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त घई यांनी सिनेजगतातील विविध गोष्टींवर भाष्य केले. भविष्यात ऑनलाइन फिल्मला महत्त्व येणार आहे आणि नव्या पिढीने त्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. कोल्हापूरसारख्या शहरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गेल्या सहा वर्षापासून सलग होतो ही फार अभिमानाची गोष्ट आहे. पण या महोत्सवाची कक्षा रूंदावण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. मुंबईतील व्हिसलिंग वूडस् इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून या महोत्सवाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाहीही घई यांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images